वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्या लढाईची आठवण विसरूं या नको.
January 17, 2019
भारत आणि अमेरिका दोन्हीही खंडप्राय देश. शेती हा दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा महत्वाचा घटक. फार खोलात न जाता, किंवा रुक्ष आणि किचकट आकडेवारी सादर न करता, या दोन देशांतल्या शेतीची ढोबळ तुलना आणि त्यानंतर थोडा अमेरिकन शेतीचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
अमेरिकेचं क्षेत्रफळ (२२,६४० लाख एकर), भारताच्या क्षेत्रफळाच्या (८,२०० लाख एकर) साधारणपणे तिप्पट आहे. त्यातील शेतीच्या वापरासाठी असणारी जमीन, अमेरिकेत ९,३८० लाख एकर तर भारतात ४,०५० लाख एकर एवढी आहे. म्हणजे अमेरिकेच्या एकूण जमिनीपैकी साधारण ४१% जमीन शेतीसाठी, तर भारतात सुमारे ५१% जमीन शेतीसाठी वापरली जाते. २००० सालच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्मस आहेत तर भारतात हीच संख्या १२०० लाख आहे. भारतात एवढया प्रचंड मोठया प्रमाणावर फार्मस असण्याचे कारण म्हणजे आपल्या फार्मसचे छोटे आकार. सर्वसाधारण अमेरिकन फार्मचे क्षेत्रफळ आहे ४१८ एकर्स तर भारतात हाच आकार घटून होतो ३.३ एकर्स. त्यात पुन्हा वंशपरंपरेने वडिलोपार्जित जमीन मुलांमधे विभागली जात असल्यामुळे, दर पिढीमागे फार्मसचा आकार अधिकच लहान होत चालला आहे. शिवाय भारतात अनेक राज्यांमधे जमिनीसंदर्भाच्या कायद्यांनुसार, जमिनीच्या मालकी हक्कांवर बंधने टाकली आहेत. त्यामुळे अशा राज्यांमधे, जलसिंचित जमिनीवर १० ते २० एकर आणि कोरडवाहू जमिनीवर १५ ते ६० एकर, अशी मालकी हक्काची बंधनं आहेत.
आजमितीला भारतातले साधारण ६०% लोक शेती किंवा पशुपालनाच्या जोडधंद्यावर अवलंबून आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण केवळ २% आहे. शिवाय भारतीय शेती ही एकरी उत्पादनाच्या दृष्टीने, जगातील सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा देखील निकृष्ट दर्जाची आहे. भले दूध, तांदुळ, ऊस, गहू, शेंगदाणे, भाजीपाला, ह्या गोष्टींच्या उत्पादनात आपला जगात पहिला, दुसरा नंबर असेल, पण त्यात एकेका गायीच्या किंवा प्रत्येक एकरी उत्पादकतेपेक्षा, आपलं एकूण संख्याबळ (गायींची संख्या किंवा त्या धान्याच्या लागवडीखाली असलेले एकर्स) प्रचंड आहे, हीच खरी गोम आहे.
या पार्श्वभूमीवर, भारताच्या आणि अमेरिकेच्या शेतीचा तौलनिक अभ्यास करणं योग्य ठरणार नाही. अमेरिकन शेतांच्या प्रचंड मोठ्या आकारामुळे आणि तुटपुंज्या मनुष्यबळामुळे, शेतीचं अधिकाधिक यांत्रिकीकरण ही गरज होती आणि आहे. या उलट भारताच्या टिचभर आकाराच्या फार्मसवर मोठी यंत्र सामग्री वापरणे हास्यास्पद होईल. शिवाय शेतीच्या आधारे उदरनिर्वाह करणार्या लाखो करोडो गरीब कष्टकरी जनतेच्या पोटावर पाय दिल्या सारखं ते होईल.
अमेरिकन फार्मस एवढे मोठे कसे झाले आणि त्यांच्यात काळानुसार कसे बदल घडत गेले ते बघणं थोडं मनोरंजक ठरेल. तसंच कष्टांना आणि उद्योजकतेला जोड देऊन, पुढच्या पिढयांच्या हातात शेतीची सूत्र सोपविण्यासाठी अमेरिकेत काय केलं जातं, ते पाहणं देखील योग्य ठरेल.
August 18, 2015
जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी
भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी,
प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण,
आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन.
August 31, 2016
समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते.
May 27, 2024
गरीबाचा / मुंबईकरांचा चा नाश्ता म्हणजे वडापाव .
पण गरमागरम वडा,भजी बाधून दिला जातो वर्तमान पत्राच्या कागदात.
किवा वडे,भजी तळणारा कामगार ते तळून अतिरिक्त तेल शोषण साठी त्याच्या भांड्यात वर्तमान पत्रच ठेवलेले असते.
एव्हडेच कशाला आपल्या घरात सुद्धा तळण करताना सुद्धा आपणसुद्धा वर्तमान पत्रच वापरतो. दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते तो म्हणजे दिवाळीचा फराळ. घरात-घरात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळ्या, अनारसे असे अनेक पदार्थ केले जातात. अनेक पदार्थ तळणीचे असल्याने आणि मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने तेलातून काढल्यानंतर थेट वर्तमानपत्रावर पसरले जातात. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्याने हा पर्याय वापरला जातो.
मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
मासिकं किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. त्यामधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोकाही बळावतो. शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतू ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. वर्तमानपत्राच्या कागदामधील, शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करण्यास तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरातात. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणूनच तळलेले पदार्थ वर्तमानपत्रावर निथळत ठेवणे किंवा पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून ( पुडी) करून नंतरआहारात वापरणे आरोग्यास खूप धोकादायक आहे.
वर्तमानपत्राच्या शाईमध्ये पेट्रोलियम बेस्ड मिनरल ऑईलचा वापर करून ती अधिक पातळ केली जाते. तर ती सुकवण्यासाठी कोबाल्ट बेस्ड घटकाचा वापर केला जातो. हे दोन्ही घटक आरोग्याला त्रासदायक असतात. वर्तमानपत्रापेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.
टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हांला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा. पण वर्तमानपत्र वापरणे कटाक्षाने टाळा.
आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरील लेख
October 21, 2016
माझ्यामते मुबलक पैसा कमविला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असे नाही. खरं तर फक्त पैसा कमविला की तो “पैसेवाला” नक्कीच होतो, मात्र “श्रीमंत” होतोच असं नाही. कारण प्रत्येक “श्रीमंत” हा पैसेवाला असतोच परंतु प्रत्येक “पैसेवाला” हा श्रीमंत असतोच असे नाही.
November 10, 2018
महाभारतातील कर्णाचे स्थान अद्विती असून
मान जाई उंचावुनी त्यास समजोनी घेता ।।१।।
सुर्यपुत्र कर्ण घनुर्धारी महान
दानशूर तो असून इतिहास घडविला ।।२।।
सुर्य आशिर्वादे जन्मला कवच कुंडले लाभती त्याला
रक्षण वलय शरिराला मिळती कर्णाच्या ।।३।।
अंगातील कर्तृत्व शक्ति माणसाला उंचावती
शक्तीस वाट फुटती शोधूनी त्याची योग्यता ।।४।।
जन्मुनी प्रथम पांडव सहवासांत सारे कौरव
हेच त्याचे खरे दुर्दैव नियतीचा होई खेळ ।।५।।
महाभारत युद्ध प्रसंगी कौरवामध्ये कर्ण अग्रभागीं
होता तो विजयाच्या मार्गी हादरुन सोडले पांडवाना ।।६।।
इंद्रासह सर्व देव आकाशी बघती अर्जुन-कर्ण युद्धासी
परी चित्त त्यांचे कृष्णासी बघती त्याची लिला ।।७।।
थोपवून धरिला अर्जून रथ असूनी सारथी भगवंत
बाण शक्तिनें नेला रेटीत कृष्ण परमात्म्यासह ।।८।।
शक्तीचे हे दिव्य दर्शन बघू लागले आकाशांतून
इंद्रादी देव विस्मयित होऊन न्याहळूं लागले कर्णाला ।।९।।
चकीत झाले देवगण यश अर्जुना यावे म्हणून
कवच कुंडले मागावी दान इंद्र करी मनीं विचार ।।१०।।
प्रातः काळची सुर्य किरणे सुचवी कर्णा सावध राहणे
रुप घेतले इंद्राने दान मागण्यासाठीं ।।११।।
कर्ण होता दानशूर मन त्याचे उदार
न घेई तो माघार संकल्प करिता एकदां ।।१२।।
इंद्र देवाचा राजा ठोठती कर्ण दरवाजा
ठेवूनी मनी भाव दुजा रुप घेतले याचकाचे ।।१३।।
देवांचा नृपती दान मागण्या येती
हे माझे भाग्य असती सत्व परिक्षा देण्याचे ।।१४।।
ओळखले याचकाला इंद्राच्या सत्य रुपाला
अभिवादन केले तयाला कवच कुंडले देई दान ।।१५।।
कवच कुंडलाचे दान स्वहत्याचे ठरले कारण
असूनी कर्णा हे ज्ञान इंद्रसी दानधर्म केला ।।१६।।
इंद्रापरी याचक कोण जो मागेल मजसी दान
त्याचा कर्णा अभिमान हीच त्याची श्रेष्ठता ।।१७।।
कर्णाचे हे दान ठरले त्याचे समर्पण
करी त्यासी महान अजरामर करुनी ।।१८।।
डॉ. भगवान नागापूरकर
२०-२१११८३
January 19, 2018
काहीजणांचे उत्तर असेल पोट भरेपर्यंत; तर काहीजण म्हणतील मन भरेपर्यंत!! कदाचित काही स्वतंत्र बुद्धिवादींना असंही वाटेल की आता आम्ही किती खायचं हेदेखील आयुर्वेद ठरवणार का? ;)
ज्याला निरोगी राहायचं आहे अशी व्यक्ती मात्र या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करेल.
आयुर्वेदाने जठराचे काल्पनिक भाग करून स्थूल-द्रव आहाराची मात्रा सांगितली आहेच. मात्र असा अंदाज घेणे हे प्रत्येकाला सर्वस्वी शक्य नसल्याने तुलनेत सोपा मार्ग निवडुया. एखादा पदार्थ किती प्रमाणात खाल्ल्यावर आपले पोट भरते याचा प्रत्येकाला निश्चित अंदाज असतो. यालाच 'तृप्ती' ही संज्ञा आयुर्वेद वापरतो. आयुर्वेद सांगतो पचायला जड असलेले पदार्थ या तृप्तीच्या निम्म्या मात्रेतच घ्यावेत. उदाहरणार्थ; दोन वाट्या श्रीखंड खाऊन पोट भरत असल्यास एकाच वाटीवर समाधान मानावे. आवडतं म्हणून ओरपत बसलं तर पुढे सुस्ती, अपचन, पोट बिघडणे आणि सर्दीसारख्या तक्रारी सुरु झाल्याच म्हणून समजा. बहुतांशी गोड पदार्थ, मांसाहार, आंबवलेले पदार्थ हे पचायला जड असल्याने त्यांना हा नियम लागू होतो.
पचायला हलके असलेले पदार्थ मात्र पोट भरल्यासारखे वाटेल इतकेच खावेत; त्याहून अधिक मात्रेत खाऊ नयेत. लाह्या, घावने, कढण, पेज यांसारखे पदार्थ पचायला हलके आहेत. या पदार्थांच्या बाबतीत हा नियम लागू होतो. या नियमांनुसार जेवण केल्यास नियमितपणे व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीदेखील अपचन आणि तत्सम समस्यांपासून दूर राहू शकतील असा यामागील विचार आहे. थोडक्यात काय? तर 'चार घास कमी' जेवणे हे आरोग्यदायी आहे. या साधा नियम पाळला म्हणजे 'टमी भी खूष और मम्मी भी खूष'.
वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
October 22, 2016
त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते.
June 25, 2022
आई जगदंबेच्या भक्तीमध्ये रत झाल्याचा परिणाम किती रमणीय असतो हे सांगताना आचार्यश्री, परीसस्पर्श तथा गंगा स्पर्शाचे उदाहरण देत म्हणतात…..
February 16, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti