वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दहावीच्या परीक्षेत 83000+ विद्यार्थ्यांना मिळालेल्या 90% पेक्षा अधिक मार्कांची कारणमीमांसा आणि त्याचे असंभाव्य परिणाम…!
स्तोत्राच्या शेवटी मी जे काही करतो, अर्थात या देह मन बुद्धी च्या द्वारे जे जे काही घडते, त्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या अज्ञानामुळे ज्या ज्या चुका होतात, त्या सगळ्यां करिता आचार्यश्री एकत्र क्षमायाचना करीत आहेत. ते म्हणतात,
स्तोत्राच्या शेवटी मी जे काही करतो, अर्थात या देह मन बुद्धी च्या द्वारे जे जे काही घडते, त्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या अज्ञानामुळे ज्या ज्या चुका होतात, त्या सगळ्यां करिता आचार्यश्री एकत्र क्षमायाचना करीत आहेत. ते म्हणतात,
लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आवडता खाद्यपदार्थ म्हणजे कूकीज. कूकीज न आवडणारे फार क्वचितच आढळतील. उलट हा पदार्थ खाऊ म्हणून बऱ्याचदा आपल्याला डब्यात बऱ्याचदा मिळतो. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सगळी कामं भरभर झाली पाहिजेत असाच विचार प्रत्येकजण करीत असतो , पण बरेचदा ह्या धावपळीत भूक लागलेली असताना आपल्याला तिच्याकडे दुर्लक्ष करावे लागते , का? तर इतर पदार्थ खायला जास्त वेळ लागतो म्हणून. पण अशावेळी कूकीज आपल्या मदतीला धावून येऊ शकतात. एकतर त्या खायला जास्त वेळ जात नाही आणि दुसरं म्हणजे आकाराने लहान असतात त्यामुळे आपण आपल्यासोबत त्या सहजरित्या घेऊन जाऊ शकतो , म्हणजे एका बाजूला आपलं काम पण वेळेत पूर्ण आणि आपापली भूक पण तात्पुरत्या स्वरूपात भागते.
आज ४ ऑगस्ट , ह्या तारखेला चॉकलेट चिप्स कूकीज दिवस परदेशात साजरा केला जातो. ह्या दिवसाचा नक्की असा इतिहास कोणी सांगू शकत नाही.
आपल्याला ह्या दिवसाच्या इतिहासाशी काही देणंघेणं नाही. आपण पटकन ह्याला बनवण्याची कृती जाणून घेऊ.
वन लूक
रेसिपी type: Baking
वेळ: 1.5 ते 2 तास
खाण्याचा प्रकार : Veg
आवश्यक घटक
2 कप (240 ग्रॅम) मैदा
2 छोटे चमचे बेकिंग पावडर
एक कप (120 ग्रॅम) ब्राउन शुगर (ब्राउन शुगर)
एक कप (120 ग्रॅम) Salted Butter
एक चिमूटभर दालचिनी पावडर
5 ( मोठे )चमचे दूध
50 ग्रॅम चॉकलेट चीप
2 चमचे चॉकलेट सार ( इसेन्स )
पद्धत
मैद्यामध्ये बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स करा.ओव्हनला 180 डिग्री सेन्टिग्रेट किंवा 356 डिग्री सेल्सियट प्री-हिट करा. एक कटोरी बटर ब्राऊन शुगर टाकून, साखर विरघळेपर्यंत चांगली फेटा. मग बटरसोबत दूध , चॉकलेट सेन्स आणि दालचीनी पावडर चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर चॉकलेट चिप्स विरघळवून, दुधाच्या-बटरच्या मिश्रणात टाका आणि चांगल्या पद्धतीने मिसळा. आता चाळलेल्या मैद्याच्या पीठाचा गोळा करून घ्या. आता एका ओव्हनच्या ट्रेला लोणी ( butter ) लावून घ्या. मैद्याच्या पीठाचे छोटे-छोटे बॉल तयार करून दोन हातां मध्ये ठेवून त्याला चपट बनवा आणि वरच्या बाजूने २- ३ चॉकलेट चिप्स ठेवून त्याला हलकेच दाबा. अशा पद्धतीने सर्व कुकीज तयार करा आणि ट्रेमध्ये ठेवत जा. नंतर प्री-हीटेड ओव्हन मध्ये कुकीज ठेवून तपकिरी होईपर्यंत बेक करावे, ओव्हनमधून कुकीजची ट्रे काढा. एगलेस चॉकलेट चीप कुकीज सज्ज आहेत. तुम्हाला हवे तेव्हा सर्व्ह करा.
मित्रांनो ही सहज सोपी कृती आहे. घरी नक्की try करा आणि हो कूकीज बनल्या की मला पाठवायला विसरू नका.
कृती संदर्भ :- टीम पकवानगली , नई दिल्ली
मंडळी आज ३ ऑगस्ट आणि आज कलिंगड दिन परदेशात साजरा केला जातो. चला तर थोडासा ह्याचा इतिहास जाणून घेऊ.
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥
या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात,
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं - पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे म्हणजे ईश्वरी सेवेची एक संधी नष्ट होणे आहे. वाढत्या वयासोबत ही जाणीव वाढली नाही, तर वाढ नेमकी कशाची?
याति क्षयं यौवनं- तारुण्य लयाला जात आहे. पर्यायाने क्षमता नष्ट होत आहेत.
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः - एकदा गेलेला दिवस कधीही परत येत नाही. शेवटी पश्चातापच करावा लागेल.
कालो जगदभक्षकः - काळ हा संपूर्ण विश्वाचे भक्षण करणारा आहे. त्याच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. आपणही सुटण्याची शक्यता नाही.
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला - ज्या पैशाच्या आधारावर आपण स्वतःला सुरक्षित समजतो तो पैसा पाण्यावरच्या तरंगा प्रमाणे चंचल आहे. कधी, कुठून आणि कसा निघून जाईल सांगता येत नाही. या जगातील मोठमोठी साम्राज्ये, राजसत्ता नष्ट झाल्या मग माझ्या पैशाचा पाड तो किती?
विद्युच्चलं जीवितं - विजे प्रमाणे जीवन चपल आहे. विजे प्रमाणेच त्याला धरून ठेवता येत नाही. अनेकदा ते धक्केच देते.
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना - त्यामुळे शरण आलेल्या माझे, हे शरण देणाऱ्या भगवंता आता आपणच रक्षण करा.
या जगात आपल्या शिवाय सर्व नश्वर आहे. त्यामुळे मी आपल्याला शरण आलो आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥
या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात,
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं - पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे म्हणजे ईश्वरी सेवेची एक संधी नष्ट होणे आहे. वाढत्या वयासोबत ही जाणीव वाढली नाही, तर वाढ नेमकी कशाची?
याति क्षयं यौवनं- तारुण्य लयाला जात आहे. पर्यायाने क्षमता नष्ट होत आहेत.
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः - एकदा गेलेला दिवस कधीही परत येत नाही. शेवटी पश्चातापच करावा लागेल.
कालो जगदभक्षकः - काळ हा संपूर्ण विश्वाचे भक्षण करणारा आहे. त्याच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. आपणही सुटण्याची शक्यता नाही.
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला - ज्या पैशाच्या आधारावर आपण स्वतःला सुरक्षित समजतो तो पैसा पाण्यावरच्या तरंगा प्रमाणे चंचल आहे. कधी, कुठून आणि कसा निघून जाईल सांगता येत नाही. या जगातील मोठमोठी साम्राज्ये, राजसत्ता नष्ट झाल्या मग माझ्या पैशाचा पाड तो किती?
विद्युच्चलं जीवितं - विजे प्रमाणे जीवन चपल आहे. विजे प्रमाणेच त्याला धरून ठेवता येत नाही. अनेकदा ते धक्केच देते.
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना - त्यामुळे शरण आलेल्या माझे, हे शरण देणाऱ्या भगवंता आता आपणच रक्षण करा.
या जगात आपल्या शिवाय सर्व नश्वर आहे. त्यामुळे मी आपल्याला शरण आलो आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
आज दिनांक २ ऑगस्ट आणि ह्या महिन्यातील पहिला रविवार. भारतात पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. परदेशात हा दिवस ३१ जुलै रोजी साजरा केला जातो. सरतेशेवटी खरा मित्र तोच जो मैत्रीच्या काट्याकुट्याच्या मार्गाला जाणतो व मैत्रीतील त्याग जाणतो.
गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे.
गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे.
Copyright © 2025 | Marathisrushti