वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नमन्मौलिमंदारमालाभिषिक्तम् |
नमस्यामि शंभो पदांभोरुहं ते
भवांभोधिपोतं भवानी विभाव्यम् ‖ ६ ‖
स्मरणा नंतरची अवस्था असते वंदन. भगवान श्री शंकरांच्या चरणकमलांना प्रेमभराने वंदन करण्यासाठी सिद्ध भगवान जगद्गुरु आचार्यश्री त्या भगवान श्री विश्वनाथांच्या चरणकमलांचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
स्वसेवासमायात- सेवा करण्यासाठी स्वतः एकत्रित आलेल्या,
देवासुरेंद्रा- देवता तथा सुरेंद्र म्हणजे देवराज इंद्र.
नमन्मौलि- त्यांनी नमन् म्हणजे झुकविलेल्या मौली म्हणजे मस्तकांवर,
मंदारमाला- धारण केलेल्या मंदार म्हणजे स्वर्गात असणाऱ्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांनी,
अभिषिक्तम् - ज्याच्यावर अभिषेक केला जातो असे.
कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या वंदनासाठी आलेल्या देवतांच्या मस्तकावर असणाऱ्या पुष्पमालांनी त्या चरणांवर पुष्पाभिषेक होतो. ही कल्पना किती सुंदर आहे?
वास्तविक या देवता सगळ्यांसाठी वंदनीय. मात्र भगवान विश्वनाथ या देवतांसाठी देखील वंदनीय. म्हणून तर देवांचे देव महादेव.
नमस्यामि - मी नमस्कार करतो.
शंभो ते - हे भगवान शंकरा आपल्या,
पदांभोरुहं- चरण कमलांना.
कशी आहेत हे भगवान श्री शंकराची चरणकमले? तर आचार्य श्री पुढे म्हणतात,
भवांभोधिपोतं - भव म्हणजे संसार. अंभोधी म्हणजे सागर. तर पोत म्हणजे नौका. अर्थात या संसाररुपी सागरातून तारुन नेणारी नौका असणाऱ्या, संसार मुक्तीचा मार्ग असणाऱ्या,
भवानी विभाव्यम् - भवानी म्हणजे आई जगदंबा पार्वतीने चरणसेवा रुपी सत्कार केलेल्या, त्या श्री चरणांची मी वंदना करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 15, 2020
स्त्रियांच्या पायातील पैजण हा एक अलंकार अगदी लहान वयापासून पायात घातला जातो. पायातील पैंजण लहान मुलांना घालतात त्याला वाळे म्हणतात. वाळे लहान मुलं ,मुली दोघांनाही घालावयाचा अलंकार आहे.
March 7, 2024
माघ शुक्ल अष्टमीला भीमाष्टमी असे म्हणतात. या दिवशी भीष्माचार्यांनी प्राणत्याग केला असे सांगतात. भीष्माचार्य हे ब्रह्मचारी असल्याने त्यांचे तर्पण, श्राद्ध करण्यास कोणी नाही म्हणून सर्वांनी त्यांना आपले मानून तर्पण करावे ते या दिवशी.
October 1, 2023
श्रद्धेची चिकित्सा करू नये. मलाही करायची नाही. मला या लेखात ‘कौल’च्या योग्यायोग्यतेबद्दल बोलायचं नाही. मला तसा अधिकारही नाही, कारण मी कधी कौल लावला नाही व कुणी लावताना तिथं हजरही नव्हतो. मला तुम्हाला सांगायचंय ते ‘कौल’ या शब्दाबद्दल, या शब्दाच्या जन्माबद्दल…!
July 27, 2017
नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे.
April 29, 2020
काल गडकरीला हे नाटक पाहिलं अाणि खूप दिवसांनी काहितरी विचार मनात घेऊन नाट्यगृहाबाहेर पडलो !
या माझ्या लेखाच्या वाचक मित्र—मैत्रिणिंनो , हे नाटक इतक्या ज्वलंत विषयावरचं अाहे की त्याचा अाशय काय असावा हे वेगळं लिहिण्याची गरज नाहि.या नाटकाचं परिक्षण वगैरे करण्याएवढा मी मोठा लेखक नाहि अाणि तसा माझा कांगावखोर दावाहि नाहि.हा लेख लिहिण्यामागे केवळ दोनंच उद्देश अाहेत :
१) कुठल्याहि परिस्थितीत नथुरामची प्रामाणिक देशभक्ती अाणि गांधीवधामागची भूमिका नाटकासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावी , गांधीवधामागे स्वातंत्र्यवीर सावरकर या तेजस्वी देशभक्ताचा काहिहि संबंध नव्हता हे अधोरेखित करत गांधिजींना त्यांच्या देशभक्तीचं वाजवी श्रेय देत त्यांच्या अवाजवी बनवलेल्या देशापेक्षाहि मोठ्या प्रतिमेचं चोख मूल्यमापन करत झोपी गेलेल्यांना जागं करणं , जागं असलेल्यांना मरगळ झटकत हलवणं या हेतूनं प्रेरित होऊन मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातूनंहि राहून गेलेली काहि सत्यं नीडरपणे मांडणार्या जिगरबाज शरद पोंक्षे अाणि प्रमोद धुरत या जोडीचं तोंडभरून कौतुक करणं ! अाणि
२) हे नाटक कुणी कुणी पहायलांच हवं हा { न मागता दिलेला अागाऊपणाचा } सल्लेवजा प्रस्ताव मांडणं.....
नाटक बघताना एक जाणवलं ते म्हणजे निव्वळ लेखक , दिग्दर्शक व अभिनेत्याच्या पलिकडे जाऊन केलेलं नाटकाचं संकलन..... तुमच्यापैकी ज्यांनी ह्रषिकेश मुखर्जींचा अानंद पाहिला असेल त्यांना अाठवतत्रअसेल की अमिताभच्या अावाजातलं निवेदन .... जिन दिनों मैं अादसे मिला.... ते अानंद मरतें नहिं पतचं संकलन ज्या हळुवार पण प्रभावी पद्धतीने केलं गेलंय तितक्याच ताकदीने ते शरदजींनी नथुराम गोडसेंच्या जीवनपटाविषयी { किंबहुना मृत्यूपावेतो } मांडलंय..... ३० जानेवारी १९४८ ते १५ नोव्हेंबर १९४९ या ६५५ दिवसातली नथुरामच्या मनाची अवस्था अाणि ३० जानेवारी १९४८ या दिवशी सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत त्याचा झालेला गांधीवधाचा दृढनिश्चय हे दोनहि कंगोरे अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हे येरागबाळ्याचं काम नव्हे महाराजा ! बरं हे करत असताना दिलेल्या कोपरखळ्या , पाकिस्तानातील अणि स्वतंत्र भारतातील पण मुसलमान लोकांकडून झालेले हिंदूंवरचे अनन्वित अत्याचार , सरकारचं { अजूनहि चालूच असलेलं मुसलमानांचं } लांगूलचालन ते अगदि पार बॅरिस्टर देवीदास मोहनदास गांधींचं नथुरामचं वकीलपत्र घेण्यामागचं दांभिकपण { हसत खेळंत दाखवलं असलं तरी त्यामागचं अत्यंत किळसवाणं अाणि स्वार्थी धोरण } अाणि सरतेशेवटि अखंड भारत अमर रहे या घोषवाक्यासह वेदीवर लटकलेले नथुराम ..... संवेदमशील माणसाच्या डोळ्यांना धारा अाणि अावंढे येईपर्यंतचे नाटकातील कैक प्रसंग ...... हे सगळं अनुभवण्यासारखं अाहे , नाटक अवश्य पहा अाणि सहकुटुंब सहपरिवार पहा ! , १५ नोव्हेंबर १९४९ ते अाज ३ मार्च २०१७ पर्यंत , म्हणजेच ६७ वर्षे ३ महिने १८ दिवस पर्यंत तळतळणार्या नथुरामच्या अात्म्याची ह्रद्य हकिकत जाणून घेण्यासाठी तरी पहा.....
हे नाटक कुणी पहावं?
छत्रपती शिवाजी महाराजांचं नांव सांगून ६६० कोटि रुपये खर्च { दाखवायचा हां , करायचा नव्हे ! } करत समुद्रात महाराजांचा पुतळा बसवणार्या तमाम राजकारण्यांना मतं अाणि पाठिंबा देणार्यांनी पहावं , सावरकरांसारख्या तेजपुरुषाला पण तसबीरीचाहि मान मिळू नये म्हणून अाटोकाट प्रयत्न करणार्या शिरो मणींनी पहावं , Semi Automatic Pistol ने २ फुटांवरुन ३ गोळ्या लागल्यावरहि पोलादी पुरुषाप्रमाणे कणखरपणे शेवटच्या क्षणीहि हे राम शब्द सत्य—अहिंसेचा पाठपुरावा करणार्या गांधीजींसारख्या नेत्याच्या तोंडी देणार्या दांभिक लोकांनी अाणि हाच इतिहास म्हणून तमाम भारतियांच्या गळी उतरवणार्या पाठ्यपुस्तक महामंडळ व शैक्षणिक संस्थांच्या महानुभावांनी पहावं अाणि गेला बाजार ऊठसूट संघाविरुद्धंच छापणार्या तमाम वृत्तपत्रांच्या संपादकांनी पण बघावं .....
धगधगता ज्वलंत विषय न डगमगता न थकता निडरपणे समाजासमोर अाणण्याचं धारिष्ट्य दाखवणार्या शरद पोंक्षे या लेखक—दिग्दर्शक—अभिनेता—निर्मात्या चौफेर जिगरबाज माणसाचं अाणि प्रमोद धुरत या जिगरबाज निर्मात्याचं करावं तेवढं कौतुक कमीच अाहे !
जाता जाता एक विनंती मात्र शरदजी व प्रमोदजींना : तिकिटविक्री अाजपासून सुरु असं वृत्तपत्रांत अाल्या दिवसापासूनंच संपूर्ण थिएटर House Full घोषित करणार्या Ticketees.com व फोनबुकिंगचा नंबर न उचलणारे असे दोन्हि - Booking वाले कृपया बदला , फार मनस्ताप होतो !
कळावे ,
अापला विनम्र ,
उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
०३ मार्च २०१७
March 29, 2017
दरवर्षी प्रमाणे आज म. द. वारे सरांना भेटायला मी त्यांच्या सहकार नगरमधील ‘स्नेहल’ बंगल्यावर गेलो. पहातो तो काय बंगल्याच्या फाटकाला कुलूप. शेजारची बेल वाजविल्यावर एकाने फाटक उघडले. वरती सरांच्या खोलीत जाऊन बसलो. दहा मिनिटांनी सर आले.
वर्षातून या दिवशीच मी सरांना भेटत असल्यामुळे, मधल्या कालावधीत न भेटल्याची मला खंत वाटत होती.
December 27, 2022
पावसाळ्यात बाहेर मोकळ्यावर व्यायाम करणे कठीण होते. कधी चिखल, कधी तुंबलेले पाणी तर कधी जोरात आलेली पावसाची सर. पण अश्या वेळी आपण घरात किंवा जिममध्ये व्यायाम करू शकतो.
July 9, 2019
भारतातील मंदिरे देशातील समृद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिबित करतात. भारतामध्ये २ दशलक्षाहून अधिक मंदिरे आहेत, ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कारांची ठिकाणे मानली जातात, जगभरातील भक्तांना आकर्षित करतात. आधुनिकतेच्या या युगात आपली संस्कृती, चालीरीती आणि धर्म कसे जपायचे आणि अंगिकारायचे हे आपण भारतीयांना माहीत आहे.
May 3, 2024
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग सात
ज्यांची प्रतिकारशक्ती जास्ती, त्यांना औषधांची गरज रहात नाही. ही प्रतिकार क्षमता येते कुठुन ?
अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे. जसे, खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे, व्यायाम करणे, इ. इ. गोष्टीवर अवलंबून असते.
एक श्लोक आपण बघितला होता...
दूष्य देश बल काल वय ......
...... अवस्थाश्च पृथक्विधः ।।
या श्लोकाचा पूर्ण सविस्तर अर्थ यापूर्वी बघितला असल्याने पुनरूक्ती दोष टाळण्यासाठी, पुढे जाऊया.
आपण जे औषध घेतोय त्याची गरज भासू नये, यासाठी आपला आहार संतुलीत असावा. सहा चवींचा समावेश नेहेमीच्या जेवणात असावा. खाताना, भीती बाळगून, फार चिकित्सक बुद्धीने खाऊ नये. आणि खाल्ल्यानंतर आठवत बसू नये. खाल्लेलं अन्न पचवायला पुरेसा वेळ द्यावा. म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व घटकपदार्थ आतल्या आत तयार करता येतील. आणि बाहेरून काही भरावे लागणार नाही. म्हणजेच औषधांची गरज उरणार नाही.
यासाठी जेवणाची वेळ बदलावी. सर्व साधारणपणे सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत खावे, नंतर शक्यतो काही खाऊ पिऊ नये. म्हणजे शरीराला आवश्यक ते घटकपदार्थ तयार पुरेसा वेळ मिळेल, आणि सगळी ए टू झेड द्रव्ये आतल्या आतच तयार होतील. हा विषय देखील सविस्तर यापूर्वी लिहून झालेलाच आहे.
विचारांचा गोंधळ होतोय ना !
आपण काय करतोय, दोन परस्पर विरूद्ध विचार एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे गोंधळ होतोय. पाश्चात्य पद्धतीने आरोग्य आणि भारतीय पद्धतीने आरोग्य अभ्यासले तर ठीक आहे, पण दोन्ही पद्धतींना "काळाची गरज" या गोंडस नावाखाली एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून वैचारिक गोंधळ होतोय. एकाच बाजूला येऊन विचार केला तर विचारांना स्थिरता येईल. मग आयुर्वेदात कॅल्शियम वाढण्यासाठी काय आहे ? थायराॅईडसाठी काय औषध सांगितले आहे? कॅन्सर वर काही आहे काहो उपाय ? असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत.
दोन भिन्न विचार प्रवाह एकत्र करणं खूप कठीण गोष्ट आहे. आपल्या जीवनपद्धती मधे होत असलेला हा बदल एका मधल्या पिढीने आपल्या डोळ्यादेखत बघितला आहे.
औषधांशिवाय आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून आयुर्वेद शिकणं, जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं.
कुछ पाने केलिए कुछ तो खोना पडता है ।
और यहा तो जिंदगी का सवाल है ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
25.04.2017
April 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti