वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
याला वैद्यकीय भाषेत ‘हिपेटायटीस’ असे संबोधतात तर मराठीत त्याला ‘यकृतदाह’ असे म्हणतात. हिपेटायटिस म्हणजेच कावीळ हा आजार आजही भारतात चिंतेचा विषय आहे. सर्वात जास्त मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. पण, आजही कावीळबाबत लोकांमध्ये तितकीशी जनजागृती पाहायला मिळत नाही. खरंतर, दुषित पाण्यामुळे, उघड्या वरच्या खाल्लेल्या अन्नपदार्थांमुळे कावीळ होते. पण, आजही लोकांचा या आजारासाठी गावठी औषधं म्हणजेच झाडपाल्यांच्या औषधांकडे जास्त कल असल्याचं समोर आलं आहे. भारतात ५० टक्के नागरिक आजही कावीळसाठी झाडपाल्यांची औषधं वापरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात प्रत्येक ३० ते ४० सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा यकृताच्या आजाराने होतो. पण, तरीही आपल्या शरीरामधील पाचशेहुन अधिक कार्य करणाऱ्या आणि अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही जागरूकता आलेली नाही. कावीळबाबत भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत. जसे की, माळ बांधणे आणि कावीळ उतरणे या गैरसमजुतींचा या रोगाशी काहीही संबंध नाही. या अंधश्रद्धेतूनही अनेकदा लोकांचा जीव जातो. कावीळ आपणास अनोळखी नाही. डोळ्यांमधील पांढरा भाग पिवळा होणे, त्वचा पिवळसर दिसणे आणि लघवी गडद पिवळी होणे ही काविळीची लक्षणेही आपल्याला माहिती असतात. मुळात कावीळ हा काही आजार नव्हे, ते एक लक्षणच आहे.
कारण ते आपल्याला जाणवते, दिसून येते. कावीळ होण्याची कारणे अनेक आहेत. त्यांचा परिणाम यकृताच्या कार्यपद्धतीवर होत असतो. यात सर्वात महत्त्वाचे व नेहमी दिसून येणारे कारण म्हणजे यकृतावर झालेला विषाणूंचा हल्ला.
कावीळबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून २८ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड हिपेटायटिस डे’ म्हणून साजरा केला जातो.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आजच्या दिवशी १९७३ साली अभिमान चित्रपट प्रदर्शीत झाला याला आज ४८ वर्षे झाली.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'अभिमान' होय.
सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटांमध्ये अनेक सिनेरसिकांनी 'अभिमान' या चित्रपटालाही पसंती दिली होती. 'अभिमान' चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस. डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते.
चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही 'अभिमान'ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती. 'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'पिया बिना' या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ व जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.
'अभिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना 'फिल्मफेअर'तर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
संजीव वेलणकर, पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अभिमान चित्रपटाची गाणी
https://www.dailymotion.com/video/x3gknt8
मला अजूनही आठवतंय, माझ्या आठवणीनुसार त्याकाळी अकरावी ssc ची परीक्षा होती आणि 12 वी इंटरची परीक्षा. त्यावेळच्या 12 वी च्या इंटर च्या परीक्षेच इतक वजन होत की आताच्या double graduate ला सुद्धा इतक महत्व नाही. पुढचे शिक्षण घेण्यासाठी इंटर ची परीक्षा हीच एकमेव प्रमाण परीक्षा होती . इंटर ची परीक्षा पास झाला म्हणजे तो विद्यार्थी पुढचे शिक्षण घेण्यास पूर्णपणे सक्षम झाला असे समजण्यात येई . काय तो इंटर च्या परीक्षेचा दरारा. 75 % मार्क म्हणजे डिस्टीनशन आणि हेच सर्वात जास्त मार्क्स 75 % मार्क मिळवणारा मुलगा खूप हुशार समजला जायचा.
आणि आज पहिलं तर प्रत्येक पायरीवर वेगवेगळी प्रमाण परीक्षा !
आमच्या ssc , बारावी , पदवीधर या परीक्षांना काही महत्वच उरलेल नाही .अगदी कचरा परीक्षा झाल्या आहेत. , मार्क मात्र पहा 98%, 97% इतक असूनही पुढच्या शिक्षणासाठी वेगळी प्रमाण परीक्षा द्यायलच हवी , बरं पुढच्या प्रमाण परीक्षा सुध्दा याच अभ्यास क्रमावर घेतल्या जातात मग हे मार्क फक्त social मीडिया वरती दाखवण्यासाठी असतात का असा प्रश्न पडतो ! , त्या मारकांची किंमत शून्य ठरते !
ssc आणि बारावीच्या परीक्षांची लायकीच नसेल तर घेतात कशाला ? सरकारी धंदा तेजीत आणि मुलं बसतात मार्क मोजीत असा सगळा महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा बॅन्ड बाजा वाजलेला आहे. आमच्या राज्यकर्त्यांना सुद्धा याची लाज वाटत नाही .
याची कारणं पुढील लेखात ,
प्रतिक्रिया अपेक्षित .
-- गणेश वेलणकर
हा विजय इतिहासात सोनेरी अक्षरात लिहण्यासारखा आहे. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले चौथे युद्ध मे ते जुलै असे तीन महिने चालले होते.
इतिहासात प्रथम २६ जुलै १७४५ मध्ये महिलांचा पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. १८८७ साली प्रथमच यॉर्कशायरमध्ये महिला क्रिकेट क्लबचे नाव समोर आले. तीन वर्षानंतर इंग्लंडमध्ये पहिली महिलांची टीम बनली जिचे नामकरण इंग्लंड लेडी क्रिकेटर ठेवले गेले.
इजिप्त हे जगातील पहिले साम्राज्य आहे ज्यांनी या पृथ्वीवर प्रथमतः मानवनिर्मित कॅनॉल बनवला. हा कॅनॉल मेडिटेरीनियन समुद्र आणि रेड सी (लाल समुद्र) यांना जोडतो. हाच कॅनॉल याच्या भौगोलिक स्थानामुळे पूर्व आणि पश्चिम जग जोडणारा एक दुवा मानला जातो. या कॅनॉल ची खुदाई आणि बांधकाम वेगवेगळ्या शासकांच्या काळात शेकडो वर्षे होत आले. कॅनॉल च्या उत्तर भागाला पोर्ट साईड तर दक्षिण भागाला सुएझ ही ठिकाणं आहेत.
जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करुन घेतात काय, सगळेच अघटित आहे.
झोप हा फार गहन विषय आहे. झोपेसंबंधीच्या फक्त येथे आवश्यक असलेल्या संकल्पनांचा उल्लेख केला आहे.
पद्माकर शिवलकर म्हटले की अनेक गोष्टी आठवतात त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख हमखास होतो परंतु पद्माकर शिवलकर यांनी सहसा स्वतःबद्दल भाष्य उघडपणे फारसे केले नाही , ते केले तो प्रसंग त्यांच्या क्रिकेट-आत्मचरित्रात आढळला आणि तो प्रसंग होता रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘ मराठी माणसावरचा अन्याय ‘ ह्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते .
जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स आकारण्यास सुरवात केली म्हणून आजच्या दिवशी आयकर (इन्कम टॅक्स) दिवस साजरा करण्यात येतो.
Copyright © 2025 | Marathisrushti