वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सध्या मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्यावर आहे आणि त्यात रोज वाढच होत आहे त्यात दररोज जमा होणारा कचरा कित्येक मेट्रिक टन आहे. तसेच सातत्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, गृहसंकुलं त्यामुळे त्यात होणारी कचऱ्याची वाढ, त्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासाठी होणारा कैक कोटींतील खर्च, डंम्पिंग ग्राऊंडच्या समस्या, ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरील तोकडे उपाय अश्या सगळ्यातून मार्गक्रमण करतांना मुंबई महानगर पालिकेचा त्यावरील खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे.
December 7, 2015
।।वक्रतुण्डाय नम:शमीपत्रं समर्पयामि ।।
पांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती.
ह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट व रूक्ष असते.८-१२ अवृन्त पत्रकांच्या जोड्या असलेली पाने असतात.पानांवर बारीक कण असतात.फुले लहान पिवळसर,५-७ सेंमी लांबीची व मंजीरी स्वरुपाची असतात.फळ १०-१५ सेंमी लांब,लंबगोल १०-१२ बिया असणारी शेंग असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फल.
आता ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:
त्वचा: चवीला तुरट,कडू असते व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.
फल:चवीला गोड,उष्ण,जड व रूक्ष असते.
शमी ही कफपित्तनाशक आहे.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
सालीचा लेप हा विषनाशक आहे.
फळाची राख हि शरीरावरील रोमशातन अर्थात केस काढायला उपयुक्त आहे.मग ह्याचा वापर बायका हेअर रिमुव्हर म्हणून करू शकतील पण योग्य सल्ल्यानेच बरे.
शमी कृमिनाशक असल्याने जंतांमध्ये उपयुक्त आहे.
मुळव्याध,आवपडणे,जुलाब ह्यात देखील हिचा उपयोग होतो.
त्वचा रोगात हिच्या सालीचा लेप उपयोगी आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 3, 2017
वजन वाढू नये, यासाठी अनेक पदार्थ जेवणात टाळले जातात. पण याशिवाय जेवणाची वेळही आपलं वजन वाढवू शकते, असं एका संशोधनातून पुढे आलं आहे. रात्री उशिरा जेवल्यास वजन वाढू शकतं, असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे. कॅलिफोर्नियातील ‘सॉल्क इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीज’ यांच्या नुसार रात्री जेवताना एकीकडे इंटरनेटवर काम करत असाल किंवा टीव्ही बघत असाल, तर तुमचं वजन वाढू शकतं. “दिवसातील काही काळ आपले आतडे, मांस पेशी आपल्या कामाची परीसीमा गाठत असतात. इतर वेळी त्या सुषुप्तावस्थेत असतात. या प्रत्येक अंगाची एक वेळ ठरलेली असते. ही वेळ चयापचय चक्र ठरवत असते. जेव्हा इंदिर किंवा माणूस रात्री अपरात्री आहार घेतात, तेव्हा त्याचा परिणाम चयापचय क्रियेवर होतो.” यामुळेच अवेळी आहार घेतल्यास वजन वाढतं आणि शरीर बेढब होत जातं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 2, 2017
स्त्री यांना संधी मिळाली की त्या तिचे सोने करतात. स्त्रीशक्तीने आज आपली ताकद दाखविली आहे. आधुनिक स्त्रीचा विचार करताना ती आज लाचार नाही हे सहज दिसते. तिला शिक्षण मिळाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात, विश्वाच्या प्रांगणात तिने पाऊल टाकले. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनी तर अवकाशाचा वेध घेतला.
July 29, 2023
तज्ज्ञ’ या कुळाबद्दल मला नितांत आदर वाटतो. मलाही त्यांच्याप्रमाणे तज्ज्ञ होता यावं यासाठी मी नेहेमी प्रयत्नशील असतो. तज्ज्ञ कसं होता येतं, हे मला फारसं कळत नसलं तरी त्यासाठी खुप म्हणजे खुपच अभ्यास करावा लागतो हे ऐकीव माहित होत. अभ्यास, तो ही साधासुधा नव्हे, तर जाड जाड ग्रंथातून, हे ही ऐकुनच माहित होतं. असं काहीबाही ऐकून माझी छाती (फक्त ३५ इंचं असलेली) दडपून जाते.
July 26, 2017
प्रस्तुत स्तोत्राचा समारोप करतांना आचार्यश्रींनी पारंपरिक पद्धतीची फलश्रुती मांडलेली नाही. याच नव्हे तर कोणत्याही स्तोत्राची जी अंतिम अपेक्षा आहे, थेट तिचेच प्रतिपादन करीत आचार्य श्री स्तोत्राचे समापन करतात. त्या परमेश्वराला प्रार्थना करतात,
December 3, 2020
स्थापनेपासून २००४ पर्यंत गुगल आपला ४ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. परंतु २००५ पासून गुगलने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला.
September 4, 2021
कधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते.
September 28, 2020
जगभरात असणाऱ्या दमा किंवा अस्थमाच्या रुग्णांमध्ये आणि या विषयी संभ्रम मनात असणाऱ्यांमध्ये याबाबतची जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो.
May 3, 2022
बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले.
June 26, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti