वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचप्रमाणे इशान्य भारतासाठी हे वर्ष पाण्याच्या दृष्टीने दुष्काळी समजले जाते. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसर्या देशातून येणार्या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही. या लेखाद्वारे चीन ब्रम्हपुत्रेचे भारतात येणारे पाणी कसे पळवायचा प्रयत्न करत आहे याबद्दल चर्चा करू.
December 9, 2015
पोटाचे प्रश्न माणसाला अस्वस्थ करतात.शांत झोपू देत नाहीत. प्रत्येक जीवाला जसे जगण्यासाठी अन्न लागते तद्वतच मानवासही ते लागते.समाज पोटाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. त्या व्यवस्थेप्रमाणे कार्यकर्तृत्व करण्याचा माणूस प्रयत्न करतो. कमीअधिक प्रमाणात पोटाचे प्रश्न सुटतातही . तसे भाकरीच्या प्रश्नावर अनेकदा राजकारण होते. चळवळी उभ्या राहतात. समाजकारण होते.क्रांती होते. परिवर्तन होते.' भाकरी मिळत नसेल तर केक खा' असे ऐतिहासिक वाक्य प्रसिद्ध आहे. अन्न , वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात. या कष्टाचे प्रमाण सर्वांसाठी सारखेच नसते.काहींना कितीही कष्ट केले तरी उपजिवीका भागविणे कठिण जाते तर काहींना कमी कष्टात सहजसाध्य असे अमाप मिळते.यामुळे असमानता निर्माण होते.
शेतकरी वर्ग हा वर्षानुवर्षे याच गर्तेत अडकून पडलेला. निसर्गाच्या लहरीपणावर त्याची मदार असते. जमिनीत बियाणं रूजविण्यापासून सुरू होणारा, पीक आडतीवर नेईपर्यंतचा प्रवास अनाकलनिय असतो.जमिन तयार करणे. महागडी बियाणे खरेदी करणे, रासायनिक खत खरेदी करणे. पिकांना पाणी देणे, निगा राखणे . ते आडतीवर जाते तेव्हा पडलेले भाव . या सर्व व्यवस्थेचे प्रश्न गहन तर आहेत. त्याचबरोबर ते पिढी बरोबर आलेले आहेत . कृषक समाजाच्या व्यथा आजच्या काळात तीव्र बनल्या आहेत. आधुनिकीकरणांमुळे ग्रामजीवन उध्वस्तेकडे वाटचाल तर करत नाही ना ? याचा विचार करण्याची गरज आहे. जमिनीचे झालेले तुकडे .नापिकी होत असल्याने आलेले नैराश्य. त्यातून होणारी आत्महत्या . निर्माण झालेले गुंतागुंतीचे प्रश्न. उध्वस्त झालेले कुटूंब. कष्टाच्या मोबदल्यात न मिळणारी मिळकत . आरोग्य आणि शिक्षणाचे निर्माण झालेले प्रश्न.याचा विचार होणार की नाही? सारं रान पडिक आणि बांध कोरण्याची प्रवृती कधी नष्ट होईल? अंतर्गत मतभेदामुळे उत्पन्न झालेले मनभेद. भावाभावात , गावागावात आणि जावाजावातील वाद कधी संपणार ? जातीभेदातून आणि मातीभेदातून निर्माण झालेले वाद. सुरक्षा व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक . प्रशासन व्यवस्थेची सापत्न वागणूक . समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन . या बाबी चिंतनीय आहेत. वरिष्ठ नोकरी , मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. असे काहिसे बदललेले चित्र पहावयास मिळते. सणउत्सवाच्या परंपरा असतील किंवा लग्न विधींसारखे प्रसंग असतील.आत्मप्रौढीतून भरमसाठ होणारा खर्च .यातून बहुजनांचे अहितच साधले जाते.प्रत्येक हुशार, चाणाक्ष घटकांकडून शेतकरी वर्गाची अडवणूक, पिळवणूक आणि छळवणूकच होते. तद्वतच साहित्य , लेखन यांमध्येसुद्धा कृषक समाजाचे दुःख वेदना मांडले जात नाही. वेदनांचे प्रतिबिंब आवश्यक त्या प्रमाणात दिसत नाही. जिथे मांडले जाते. त्याची दखल घेतली जात नाही.शेती आणि शेतजीवन आज अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. मुलांचे शिक्षण, धान्यादी मालाचे भाव, रोजगार , उत्पन्न यांची सांगड घालणे कठिण आहे.भोंदूबाबा, कैवारी भेटतात ते फक्त मतदान रूपाने. पाच वर्षाच्या पारायणासाठी ! तेही लूप्त - अलूप्त स्थितीत.भावना आणि घोषणा यांच्या भोवती फिरत असलेली सल घेऊन. मग प्रश्न उभा राहतो की सालाबादप्रमाणे हेही वर्ष असेच ! असे वर्षानुवर्षे चालत आलेले रहाटगाडगे , दुःखाची धग, प्रश्नाची सल लेखनात उतरली पाहिजे. त्या लेखनाची दखल घेतली जावी. समाजमन तसे घडावे. शेतकरी शोषणाचा आलेख लेखकांनी मांडावा ते गरजेचेही आहे. ते बोलीतही आले पाहिजे . कृतीतून आचरणात आले पाहिजे. आमच्या एका कवितेतून तो आशय आला आहे.
बाप रगत ओकतो,दुष्काळा पोटात घेतो
कणगीला आभावल्ली,धान्य बरकत्ता मागतो
बाप रगत ओकतो, हुकलेली सालचंदी
कापूनशी कणसांचा, मळा वाटे चोरामंदी
बाप रगत ओकतो, बरडाच्या गराड्यात
म्हशी कळप वळीतो,खाट्या भाकड काळात
बाप रगत ओकतो, जगण्याच्या आशेपोटी
लेकराच्या तोंडावरी, मूठभर मासासाठी
बाप रगत ओकतो, भेगा भूईच्या सांधतो
खरबड्या हातातली, माया गाली फिरवितो
बाप रगत ओकतो, धोतराच्या तडूपाला
उमेदीने जगण्याच्या, नवा आशावाद दिला
बाप रगत ओकतो, काटी शेताला लावतो
मात्रे खळ्याचे स्वतःस, रास जगाला चारतो
जगाच्या पाठीवर शेतकरी असा वर्ग आहे की जो जगाचे हीतच साधतो. पण त्या बदल्यात त्यास अपेक्षित फलश्रुती मिळत नाही . हे दुर्दैव म्हणावे लागेल.जगाचा पोशिंदा माझा बाप खडकावर राबताना आसवं तरळतात . त्या आसवांची किंमत पृथ्वीवरील इतर कोणत्याही तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. सतत इतरांचा विचार करणारा शेतकरी बाप खंगलेला, भंगलेला आणि दुष्काळास पोटात सामावून नव्या आशावादी उमेदीने जगणारा आहे.तो जगला तर देश जगेल. तो उभा राहण्यासाठी पाठबळाची गरज आहे.
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
January 27, 2017
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. मोहिनी वर्दे यांनी लिहिलेला हा लेख
रस्त्यावर पडलेला रूमाल त्या दिवशी मी सहज उचलला चार बाजूंनी लेस विणलेली कोपऱ्यात दोन पक्षी एकमेकांच्या चोचीत चोच घालून;... एक आवंढा गिळला. कुठे गेले ते दिवस? तो रोमान्स? स्वप्नांच्या थरकत्या पुलावरुन पैलतीर गाठण्याचा दिवस कोणाकोणाच्या आयुष्यात येतो? त्यांच्या? माझ्या?
तसं पाहिलं तर जीवनात काही मिळवलं नाही असं नाही. घर संसार तर आहेच. मुलं बाळं, नातवंड! लेखन केलं थोडं फार नाव मिळवलं कधी स्फूर्तीसाठी अडून बसले, तर कधी सहज सुचत गेलं. तेव्हा वाटायचं हे आपण लिहीत नाही कोणीतरी आपल्या हातून लिहून घेतंय.
साळुंकी ती कैसी बोले मंजुळवाणी।
बोलविता धनी वेगळाची ।।
पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला तेव्हां श्री. वसंत शिरवाडकर (कुसुमाग्रज यांचे बंधू) यांनी संपादकांना लिहिलेलं एक पत्र संपादकांनी मला वाचायला दिलं.
“स्त्रियांनी लिहिलेले कथासंग्रह परीक्षणासाठी पाठवू नयेत असं मी आपल्याला लिहिलं होतं. पण ही नवी लेखिका कथेच्या माध्यमातून जीवनाची जाणीव वाढवू पाहात आहे. संग्रह वाचनीय आहे.” अभिप्राय वाचला आणि पोस्टकार्ड संपादकांकडून मागून घेतलं. जपून ठेवलं. आपोआप वाट निश्चित झाली. लेख, परीक्षण लिहिता लिहिता कथा सुचू लागल्या. इकडे कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका म्हणून थेट बी.ए. आणि नंतर पी.एच्.डी केल्यानंतर एम.ए. च्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली. मान मिळाला. खूप वाचन केले. व्यवसायाकरिता ते आवश्यक होते.
मी लहानपणापासून नाटक- सिनेमा खूप पाहिले. घरात आईवडिलांना आवड होती. पूर्वी गिरगावात केळेवाडी येथे साहित्य संघ मंदिरातर्फे वर्षातून एकदा नाट्यमहोत्सव होत असे. त्यात आठदहा नवी जुनी नाटकं सादर केली जात. वडील त्या काळातील संगीत नाटकातील अनेक अभिनेत्यांना ओळखत असत. त्या वेळी दहा बारा वर्षांची असताना रंगमंचाच्या मागच्या बाजूला नटांना भेटण्यासाठी मी देखील वडिलांबरोबर जात असे. रंगमंचावरचा कृष्ण मागच्या बाजूला फुर् फुर् चहा पितांना पाहिलं तेव्हा धक्काच बसला. आदल्या दिवशी पाहिलेला एखादा नट मंचावर धोतर नेसून बंडी घालून वावरताना पाहिलेला तो एकदम शर्ट-पँटमध्ये सिगरेट ओढताना दिसला, नऊवारी फाटक्या लुगड्यातली 'एकच प्याला' मधली सिंधू बॉब केलेल्या केसात बघितल्यावर माझे डोळे खोबणीतून बाहेर पडतात की काय असं वाटायला लागलं. मनात यायचं की हे अॅक्टर लोक एका जन्मात मरणाविना किती जन्म भोगतात? मजाच आहे.
मी कथा लिहीत राहिले. माझ्या पहिल्याच संग्रहातील 'देवकी' ही क्रांतिकारी म्हणा किंवा अपारंपारिक कथा आहे. आपले प्रत्येक बाळ कंसाच्या क्रूर सूडभावनेपोटी मारले जाते आहे हे पाहून देवकीच्या मनात विचारांचे वादळ उठते. आपले बाळ वाचवणे आपल्या हातात नाही. पण होऊच दिले नाही तर? ती वसुदेवाच्या जवळ जाण्यास घाबरते. अशीच एक त्या काळातील म्हणजे १९७६ मधल्या संग्रहातील कथा आहे. आमच्या लांबच्या नात्यातील सीतामावशी आणि त्यांचा भाऊ अविवाहित. खूप वृद्ध झाले. भाऊ वारला. तेव्हा मी त्यांच्यावर कथा लिहिली.
सीतामावशींनी स्वत: अंत्यविधी केले, पिंडदान केले. मग स्त्रियांनी अंत्यसंस्कार करायचे नाहीत म्हणून कुणातरी लांबच्या नात्यातल्या पुरुषाला बोलवायचे, किंवा परक्याकडून अंत्यविधी करवून घ्यायचे हे त्यांच्यासारख्या परंपरा जपणाऱ्या, कर्मकांड मानणाऱ्या सीतामावशींना का वाटले असावे? माणसाच्या मनाचा ठाव लागत नाही. प्रत्यक्षात सीतामावशींनी काय केले हे महत्त्वाचे नाही. पण माझी कथा अशी जन्माला आली. एका प्रसिद्ध कंथाकाराने मला कथेवर नाट्य उत्तम रीतीने व्यक्त करता येते आणि माझे संवाद सहज प्रगट होतात असे मला सांगितले. एकंदरीत मी नाटक लिहिले नसले तरी
नाट्यात्मक संवाद चांगले जमत होते. कुठेतरी माझ्या नकळत नाटक माझ्यात घर करून होते.
नाटक चित्रपट यांची समीक्षा करणे हा छंद लहानपणापासून होता. त्या वेळी मी काही पाक्षिकातून नियमित लिहीत असे. थोडी प्रगल्भता, आल्यावर समीक्षेचे दोर आवळून, साहित्य आणि नाटक, किंवा 'प्रयोगशील कला, त्यातील त्रुटी आणि संभाव्य फायदे यावरील व्याख्याने कॉलेजविश्वात, इतर कॉलेजात जाऊन देत असे. जसे आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम (सांस्कृतिक) आयोजित करावे लागत तसे इतर कॉलेजमध्ये त्यांची आवश्यकता होती. एकूण असे साटेलोटे असायचे. तरीही नाटकाची साहित्यिक मूल्यांच्या आधारे चर्चा करीत असताना नटाच्या अभिनयामुळे आपण अधिक प्रभावित होतोअसे वाटायचे.
नाटक, चित्रपटांच्या निमित्ताने, अभिनेत्यांना भिन्न भिन्न भूमिकांमध्ये पाहाताना एक विलक्षण अननुभूत आनंद मला मिळतो. आपल्या मनाचा कल असेल तसे नाटक सिनेमा पाहातांना हव्या त्या भूमिकेत स्वत:ला कल्पून प्रसंगात (सिचुएशन) मध्ये हवे तसे बदल करून स्वप्नरंजनाचे सुख मी सतत घेत असते. नाटक संपले प्रेक्षागृहातून बाहेर जायची वेळ आली तरी मी नायक किंवा नायिकेच्या भूमिकेमध्ये गुंतलेली असते.
.
लहानपणापासून पोहायला जाण्याची आम्हा दोघी बहिणींना सवय होती. एकदा असा प्रसंग आला की स्वतःमधल्या देवत्त्वाची नकळत प्रचीती आली. पूर्वी पुणे, नाशिक, नागपूर या शहरांची आजच्यासारखी भरमसाठ वाढ झाली नव्हती. नाशिक शहराबाहेर गंगापूर धरणाच्या परिसरात गोदावरी नदीला एके ठिकाणी रुंद धबधबा निर्माण झाला होता. आज हा परिसर पूर्ण बदलेला आहे. आमच्या ओळखीच्या एका श्रीमंत बाईंनी आम्हाला दोघींना सोबतीला नेले. त्यांना पोहोण्याची हौस होती. त्या आणि त्यांचा दोघी मैत्रिणी नदीत पोहायला उतरल्या. शांती नावाची त्यांची न पोहता येणारी मैत्रीण काठावर बसली. नदीला पाणी कमी होते. त्यामुळे काठावरचे खडक उघडे पडले होते. जणू काळ्या पाठीचे अजस्त्र प्राणी काठावर तणावून निद्राधीन झाले होते. मी शांतीला सोबत करीत होते. शांती मला पुन्हा पुन्हा सांगत होती. “तू जा. तुला पोहोता येतंय तर मजा कर."
मी देखील बसून बसून कंटाळले. पाण्यात उतरले, मुख्य सांगायचं म्हणजे आम्ही सर्व साडी नेसून पोहत होतो. स्विमिंग सूट असा उघड्यावर घालण्याची कल्पना देखील कोणी करू शकत नव्हते. पाण्याचा थंडगार अमृतस्पर्श दुपारच्या टळटळीत उन्हात सर्वांगाला सुखावून गेला. इतक्यात “भाभी ! भाभी ! बचावो ऽऽ!”
अटीतटीचे काकुळतीचे शब्द कानावर पडले. शांती प्रपाताखाली नदीच्या प्रवाहाच्या मध्यावर मध्येच तिचे डोके पृष्ठभागावर दिसे आणि पुन्हा गायब होई. मी प्राणपणाने तिच्यापर्यंत जाऊन कशी पोहोचले, तिला बळजबरीने माझी कंबर घट्ट पकडायला कशी लावली तिचा भार अंगावर झेलून किनाऱ्याला कशी आले. काही उमगले नाही. होती ती
केवळ ईशकृपा. हातून पुण्य घडायचे होते किंवा पूर्व संचिताने पुण्य घडवून आणले होते.
असे कुठेतरी खोल खोल रूतलेले जाणिवेतून निसटलेले नेणिवेत मंद हेलकावे खाणारे. रंग उधळणारे, काळोख पसरवणारे, आपल्याशी झगडणारे, जवळच्या माणसांच्या कायमच्या विरहाने पोळणारे, विजयोन्मादाने वाऱ्यावर फडफडणारे, खरेपणाचे, खोटेपणाचे, समुद्राची लाट वाळूच्या किनाऱ्यावर फेसाची नक्षी कोरून ओसरते, नव्याने सरसावते नवी नक्षी कोरते. आठवणी जाग्या होतात. तेव्हा ते खरे वर्तमान असते.
मी कथा कादंबऱ्या लिहिल्या त्यात 'टीझर' ही एका स्टड फार्मवरच्या घोड्यावरची वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी लिहिली पण दुर्दैवाने समीक्षकांनी माझी घोड्याविषयच्या अभ्यासपूर्ण कादंबरीला लेखणीच्या एका फटकाऱ्याने कर्जाऊ माल असल्याचे जाहीर केले. ही कादंबरी मूळ इंग्रजीवरून घेतली असावी असा आरोप केला. चिखलफेक करणं सोपं असतं. नवनिर्मिती ह्या जिवाला लागलेल्या कळा असतात. त्यांचे व्रण खोलवर जातात.
मोटर चालवायला शिकणे हा मी माझा एक पराक्रम मानते माझ्या नवऱ्याने मला मोटार चालवण्याची शिकवणी देण्याचे ठरवले. माझे जरा काही चुकले की आरडाओरड करीत. ब्रेक दाब, ब्रेक दाब म्हणता म्हणता स्वतःच व्हील हातात घ्यायचे, मी ब्रेक दाबला आणि गाडी थांबली की यांचा संताप, झाडून टाकायच्या झुरळाकडे बघणारी नजर माझ्याकडे लागायची. मग मी सरलाबेन लोहाणा या प्रेमळ शिक्षिकेकडून ड्राइव्हिंगचे धडे घेतले. तिने मस्त शिकवलं आणि मी मस्त शिकले. परमनंट ड्राइव्हिंग लायसन्स मिळवलं. पण हे गाडीत असले की माझ्या चुका व्हायच्या.
“कोणी मूर्खाने हिला ड्राइव्हिंग शिकायला सांगितलंय? ” असं म्हटलं की मी मनात म्हणायची 'तुम्हीच' !
माझे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या एका प्रकाशकांना मी नेहमी स्वहस्ते केलेले लाडू, चिवडा, भजी वगैरे देत असे. त्यातून माझे स्वयंपाकावरचे 'स्वादिष्ट कृती' पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या वेळी माझ्या मैत्रिणीची नुकतीच लग्न झालेली मुलगी अमेरिकेला गेली होती तिला त्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला. ह्या गोष्टी १९७७/७८ सालच्या.
आजच्यासारखे त्या वेळी खाजगी जीवन सार्वत्रिक झाले नव्हते. आपल्या स्वतःबद्दल कुटुंबाबद्दल सर्व सगळ्याना कळावे इतके खाजगी आयुष्य स्वस्त झाले नव्हते. 'फेसबुक' चा आज इतका प्रचंड प्रसार झाला आहे की 'फेसबुक' म्हणजे आई, बाप, बंधू, भगिनी सगळे आप्त. जे फेसबुकवर नाहीत ते मागासलेले. इतके सगळे खूप काही, कधी महत्त्वाचे कधी निरुपयोगी कधी वायफळ काही बाही केले. वाचन, लेखन, कला, साहित्य हा एक जीवनाच्या उभारीचा स्तंभ. त्यावर आयुष्य तोलून धरले. चरित्र लेखन हा माझा पिंड असावा. “डॉ. रखमाबाई एक आर्त' या चरित्राचा बोलबाला झाला. पारितोषिके मिळाली. 'टीझर' लाही पारितोषिक मिळाले.'बालगंधर्व' या अभिजात नटसम्राटाचे चरित्र लिहिले. नाटके वाचली, पाहिली, शिकवली पण प्रत्यक्ष रंगभूमीवरचे नाटक जगून पाहायचे राहून गेले. नाटक दुरून भोगले पण नाटकात भूमिका करण्याचा योग आला नाही. कशी दिसले असते मी रंगमंचावर?
शाळेत असतानाची शाळेच्या रंगमंचावरची एकच आठवण. त्या काळात 'टॅब्लो' बसवत असू. मी मुमताज महाल झाले होते. आईची शॉकिंग पिंक रंगाची बहारदार चंदेरी नऊवारी साडी नेसलेली मुमताज आणि भाऊ पांढरा लेंगा झब्बा घातलेला शहाजहान. मी त्याच्या मांडीवर डोके टेकून पडले होते.
असे माझे पहिले आणि शेवटचे रंगमंचावरचे अस्तित्व. बेछूट! बहारदार ! बेदरकार !
अखेरीस नाटकात काम करण्याचे राहूनच गेले.
'हुकली ती संधी हुकली!'
-डॉ. मोहिनी वर्दे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
July 28, 2022
मराठीसृष्टीच्या नागरिक पत्रकार योजनेनेद्वारे आपल्या अवतीभवती घडणार्या घटना टिपून त्या आपण आता थेट अपलोड करु शकाल मराठीसृष्टीच्या नागरिक पत्रकार विभागात
February 23, 2012
उन्हाळ्यात विशेषतः देशावर वा कोरड्या प्रदेशांत होणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे हा होय. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान बदलणे आणि आपल्याला वातावरणाशी समायोजित ठेवणे याकडे आपल्या शरीराचा नैसर्गिक कल असतो.
December 28, 2017
बांगलादेशमधून घुसखोरी करुन भारतात आलेल्या विस्थापितांची संख्या आता 2 कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती केंद्र शासनाने राज्यसभेत ०१/१२/२०१६ ला दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे.मात्र ही संख्या ५-६ कोटी असावी.
January 18, 2017
आफ्रिकन सुंदरीनी विश्वसुंदरी स्पर्धेत प्रथम विजयश्री प्राप्त केली १९५४ साली. त्यावर्षी इजिप्तच्या अॅंटीगॉनने सुंदरी पद पटकावले. १९५८ ला सादर झालेल्या स्पर्धेत पेनीलोप नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने चषक पटकावला. १९७४ साली स्पर्धेत नाट्य घडले. हेलन मॉर्गन या ब्रिटीश सुंदरीला मुकुट मिळाला. चार दिवसांनंतर समजले, तिला अठरा महिन्याचा मुलगा होता. ‘आई’ असल्याचे समजल्यावर तिला राजीनामा द्यावा लागला.
December 28, 2024
किस बाई किस दोडका किस हे फुगडी गीत मंगळा गौरीमध्ये लय फेमस हाय बुवा.तर आज आपण नव्याने ओळख करून घेऊयात ह्या दोडक्याची.अहो काही नाही हे दोडके आकांराने दिसते अगदी घोसाळ्याच सारखे फक्त ह्याला धारदार शिरा असतात बरं का.चला आपण ह्याला घोसाळ्याचा सावत्र भाऊच म्हणूयात ना.मग आता दोडके व घोसाळे ह्यात गफलत होणार नाही ना.
हिचा देखील बराच पसरलेला वेल असतो.वेल लावल्यापासून सव्वा महिन्यात फळे येतात.आपण खातो ते दोडके हे त्या वेलीचे फळ.हि दोडकी देखील कडू व गोड अशा दोन प्रकारची असतात.ह्यातील कडू औषधी करिता वापरतात तर गोड खायला वापरतात.
दोडके हे चवीला गोड व थंड आणी तिन्ही दोष कमी करणारे असते.आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात.
१)मुलांना अंगात ताकद भरण्याकरिता आठवड्यातून तीन वेळेस हि भाजी जेवणात द्यावी.
२)ज्यांना संडासला साफ होत नाही त्यांनी रात्रीच्या जेवणात उकडलेले दोडके सैंधव व जिरे पूड घालून खावे.
३)ज्या व्यक्तिंना कृमी होण्याची सवय असते त्यांनी दोडक्याची कोरडी भाजी एक दिवस आड खावी.
४)तोंडाला रूची नसल्यास दोडक्याच्या काढलेल्या शिरा +चिमूटभर मीठ+१/२ इंच आले हे मिश्रण चावून येणारी लाळ थुंकावा व नंतर चोखोही थुंकावा.
५)शरीरातील धातूक्षीण होऊन चिडचिडे पणा व मानसिक त्रास वाढल्यास जो थकवा येतो तो कमी करण्यासाठी दोडक्याचे सूप बडीशेप ,जिरे व धणेपूड घालून त्यावर साजूक तूपाची फोडणी देऊन प्यावे.
दोडके खाण्याचा अतिरेक केल्यास संडासमधून आव पडू शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 9, 2016
आजच्या बदलत्या काळात व्यक्ती स्वातंत्र इतकं फाजील बोकाळलं आहे कि सतत एकमेकांवर कुरघोडी करण्या पलीकडे कोणताही संवाद होत नाही .जगण्यासाठी पैसा निश्चितच आवश्यक आहे पण जगण्याचे ध्येय पैसा असू नये . जीवन हे बंधन युक्त असेल तरच सुखी होऊ शकत.
August 22, 2023
…एका इसमाने पैज म्हणून अंगावरील सर्व कपडे काढले आणि मैदानात धाव घेतली. हा एका जहाजावर खानसामा होता (स्वयंपाक्या) आणि त्या दिवशी पाच तास एका खानावळीच्या भट्टीसमोर तो वैतागला होता.
August 4, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti