वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांच्या विमानाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल उड्डाण केले.
एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने झाली होती, भारतीय व्यावसायिक जे आर डी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटा यांनी इंपिरियल एअरवेज साठी मेल घेऊन जाण्याचा करार मिळवला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.
१५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Neville Vincent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला.
टाटा एअर सर्व्हिसेसने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.
भारत सरकारने १९५३ मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास करून आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली.कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. जे आर डी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले.
२१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. या विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी मुंबई न्यूयॉर्क सेवा सुरू केली. ८ जून १९६२ मध्ये एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली.
२३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली. नुकतीच एअर इंडिया परत टाटांच्या कडे आली आहे.
‘भरत नाट्य मंदिर’ या सर्वांची पंढरी आहे. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडकपासून ते राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत विविध स्पर्धा याच ठिकाणी होतात.
थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ.
थोरला लहानपणापासूनच एकदम हुशार , कर्तबगार , शिस्तप्रिय.
व्यक्तिमत्व रुबाबदार आणि स्वभावाने व्यवहारी.
आपल्याच धुंदीत आणि विश्वात मग्न ...
आजूबाजूच्या कशातच न अडकता अलिप्त राहणं जमायचं त्याला.
धाकटा मात्र त्याच्या अगदी विरुद्ध.
अभ्यासात जेमतेम असला तरीही स्वभावाने मनमिळाऊ.
माणसांत रमणारा , नर्मविनोदी स्वभावाचा आणि तितकाच भावनाप्रधान .
नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांच्या सुखदुःखात गुंतायचा तो.
आपलेपणाने कोणासाठीही काहीही करायला सदैव तयार.
मोठा भाऊ छोट्याला नेहमीच म्हणायचा ...
“तू एक “ईमोशनल फूल” आहेस !!”..
“मोठं व्हायचं असेल तर असं राहून नाही चालत या जगात !!” .. वगैरे
तेच म्हणत-ऐकत दोघेही मोठे झाले . प्रपंचात गुरफटले.
आपापल्या कुवतीप्रमाणे वेगवेगळ्या शहरात बस्तान बसवलं.
थोरल्याने अपेक्षेनुसार बक्कळ पैसाअडका कमावला.
यश , कीर्ती , मानमरातब सगळं मिळालं.
पण त्याच्या अशा स्वभावामुळे फारसं पटायचं नाही त्याचं कुणाशी .
बाकी जगाशी त्याला काही घेणं देणं नसायचं ..
आणि त्यात काही गैरही वाटायचं नाही.
त्याचमुळे मुलंही शिक्षणानंतर दूरवर स्थिरस्थावर झाली.
तिकडे धाकट्याची थोरल्याइतकी घोडदौड नव्हती .
पण गरजेपूरतं सगळं होतं .. व्यवस्थित खाऊन पिऊन सुखी.
आजही थोरल्याच्या लेखी हा ‘ईमोशनल फूल’ होताच .
अनेकदा त्याला याची जाणीव करून द्यायचा तो.
कधी चेष्टेने , कधी रागाने तर कधी अधिकारवाणीने समजावत.
पण या ईमोशनल फूल भावाने माणसं मात्र खूप जोडली होती.
अनेक भावनिक नाती जिवापाड जपली होती.
आप्तेष्ट, सुहृदांकडे जाणं-येणं , संपर्क ठेवला होता.
अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असायचा .
तसं कुठल्या मंगलकार्यात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात जायचे दोघेही.
पण तिथेही धाकटा सगळ्यांना हवाहवासा, आपलासा वाटायचा ,
तर ज्येष्ठ बंधूंचा कायम नुसता दरारा असायचा सगळीकडे ..
एकाचा दृष्टीकोन फार व्यवहारी तर दुसऱ्याच्या लेखी भावभावनांना प्राधान्य.
असं करत करत वार्धक्याकडे झुकले.
थोरल्याची पत्नी काही वर्षांपूर्वी जग सोडून गेली .
एके दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं.
शेजाऱ्यांनी कर्तव्य भावनेने लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं .
मुलांना आणि धाकट्या भावाला कळवलं .
हृदयविकराचा सौम्य झटका येऊन गेला होता.
भाऊ ताबडतोब निघाला आणि काही तासातच पोचला त्याच्याजवळ.
मुलंसुद्धा निघाली होती पण काकानी फोनवर परिस्थिती सांगितली .
बाबा आता बरे आहेत हे समजल्यावर त्यानीही येणं टाळलं.
बापलेकांच्या मनातला दुरावा हा भौगोलिक अंतरांपेक्षा जास्त होता.
आपण वर भोज्जाला शिवून आलो याची जाणीव एव्हाना थोरल्याला झाली.
दोघे बंधु हॉस्पिटलच्या खोलीत गप्पा मारत होते.
“ बघ रे !! खरं तर काही काही कमी नाही मला .. तरी सगळे दुरावले !”
“ बायको तर कायमची गेलीच ... माझी मुलंही लांब गेली !” ..
“ पण त्यांना काय दोष देणार मी .. माझा स्वभावच कारणीभूत आहे !”
“ तू मात्र मागचं सगळं विसरून तडक आलास !!”
कधीनव्हे ते भावनिक झालेल्या भावाला बघून तो सुद्धा गहिवरला.
पलंगावर त्याच्या अगदी बाजूला जाऊन बसला.
“ अरे , असं काय म्हणतोस ?”
“ मी तिऱ्हाईतांसाठी सुद्धा करतो , तू तर माझा सख्खा मोठा भाऊ !! “
“ तू त्रासात आहेस म्हंटल्यावर मग येणारच ना मी धावत !!”
हे ऐकून धाकट्याचा हात अलगद आपल्या हातात घेत..
“ तुला आजवर इतकं बोलूनही प्रसंगी तूच धावत आलास !”
“ माझ्या ईमोशनल फूल भावा ss .. तू मात्र नातं जपलंस रे !!”..
बोलता बोलता आपसूक त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
मन मोकळं करत अक्षरशः ढसाढसा रडला.
धाकट्याचेही डोळे साहजिकंच पाणावले.
आपला भाऊ आधीच हृदयविकाराने आजारी आहे ,
आत्ता इतकं भावूक होणं तब्येतीसाठी चांगलं नाही ,
वातावरण हलकंफुलकं ठेवणं गरजेचं आहे याचं भान होतं त्याला.
त्याने समोरच असलेल्या फुलदाणीतलं एक प्रसन्न “गुलाबाचं फूल” काढलं
“ अरे ss ते सोड रे जूनं सगळं आता !!”
“ हे घे !! या ‘ईमोशनल फूल’ कडून तुला हे ‘ईमोशनल फूल’.. हा हा ss !!”
लहान भावाच्या मिश्किल बोलण्यामुळे चेहऱ्यावर आपोआपच हसू तरळलं.
बंधुप्रेमात मिठी अधिक घट्ट झाली.
आता पुढेही हे असंच निर्मळ नातं राहील का ?
मोठ्या भावात झालेला हा बदल कायमचा की तात्पुरता ?
विभिन्न स्वभावामुळे निर्माण झालेली भावाभावांमधली दरी कमी होईल का ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित काळच देईल.
पण आत्ता या क्षणाला हॉस्पिटलच्या त्या खोलीतलं वास्तव हेच की ,
नेहमीप्रमाणेच भावनिक झालेला धाकटा “ईमोशनल फूल” .
थोरल्याच्या हातात सकारात्मक उर्जेचं ते गुलाबाचं टवटवीत “ईमोशनल फूल”.
आणि वातावरण मात्र झालं होतं अगदीच “ईमोशनल फुल्लल्लल्ल “.
-- क्षितिज दाते.
ठाणे.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला होता.
महापालिकेच्या अखत्यारित असलेले केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वी पॅलेस थिएटर म्हणून ओळखले जात होते. राज्यातील एक प्रसिद्ध नाट्यगृह म्हणून ओळख होती.
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर रोजी असलेला जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जातो.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पहाटे पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात.
अंध व्यक्ती चालताना व फिरताना जी सफेद काठी वापरतात, त्या काठीचे महत्त्व अंधांसाठी किती आहे व अंध व्यक्तींना तिचा किती फायदा होतो, यासाठी साजरा केला जातो.
अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते.
अश्या प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये, नैसर्गिक आव्हानांचा सामना करत जोस अल्वारगेन्गाने भरकटलेल्या अवस्थेत समुद्रामध्ये सर्वांत जास्त काळ जिवंत राहण्याचा विक्रम केला आणि जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते हे पण सिद्ध केले.
Copyright © 2025 | Marathisrushti