(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे

    दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिर या थिएटरमध्ये ही जवळपास २४ वर्ष म्हणजेच, १२७४ आठवड्यांपर्यंत चालला.

  • नवान्न पौर्णिमा

    घरासमोर लावलेल्या हरतर्‍हेच्या भाज्या हे नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते.

  • संगीत संशयकल्लोळ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची १०५ वर्षे

    या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला.

  • मिसिंग टाइल थेरपी

    मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!

  • हे कुटुंब तब्बल ३२ जणांचे.. स्वतः जगतात,आणि शेतीलाही जगवतात

    हे कुटुंब तब्बल 32 जणांचे.. स्वतः जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्त जगवतात. आजच्या शहरी विभक्त कुटुंबपद्धतीत आदर्श ..

  • प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पी.डी.ए.)

    पीडीए ही संस्था म्हणजे आधुनिक मराठी रंगभूमीची गंगोत्री. या रंगमंचावर भालबा द्रोणाचार्यासारखे वावरले. त्यांनी वसंतराव कानेटकरांसारखे स्वतःचे दालन निर्माण करणारे नाटककार, डॉक्टर श्रीराम लागूंसारखे नटसम्राट आणि जब्बार पटेलांसारखे कुशल दिग्दर्शक निर्माण केले.

  • ई-कचऱ्याच्या भंगारातून…. कॉम्प्युटर बनवणारा जॉब्स…

    आपल्या मनाने एकदा का नवीन काही करायचं ठरवलं, तर एखाद्या खडकाळ जमिनीतूनही पाण्याचा झरा सापडतो. अगदी तसेच मनात असलेल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जयंत परबने ई-कचऱ्याच्या भंगारातून कॉम्प्युटर तयार केला. आपल्या स्वतःच्या हिंमतीवर हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये आपल्या प्रगतीची गुढी उभारणाऱ्या या छोट्या स्टीव्ह जॉब्सचा हा प्रवास...

    आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी सर्वांनाच मिळत नाही. त्याचे उच्च शिक्षण घेताना पैशांचा अडसर येतो आणि हे जमले तरी अपेक्षित नोकरी मिळेल की नाही, याची साशंकता असते. पण मुंबईतील घाटकोपरमधे राहणाऱ्या जयंत रवींद्र परब या 17 वर्षीय तरुणाने मात्र शाळेतच असताना कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्कचे क्षेत्र निवडले. त्यात प्रावीण्य मिळवून फक्त अडीच हजारांत कॉम्प्युटरही तयार केला आहे. त्यात ड्युअल कोअर प्रोसेसर, 1 जीबी रॅम, 80 जीबी क्षमता असलेली हार्ड डिस्क, वाय-फाय, ब्ल्यू टूथ आणि स्पीकरची सोय दिली आहे. जयंतने फक्त अर्ध्या तासात भंगारातील ई-कचऱ्यापासून हा कॉम्प्युटर तयार केला आहे. पाचवीत असताना त्याच्या वडिलांनी त्याला बिघडलेला लॅपटॉप खेळण्यासाठी म्हणून दिला, खेळता-खेळता त्याने लॅपटॉप उघडून दुरुस्त केला.

    जयंतचे वडील रवींद्र परब आधी रिक्षाचालक होते, जोडधंदा म्हणून त्यांनी कॉम्प्युटर दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. वडिलांसोबत जयंत हे काम शिकू लागला. कार्यालये, रुग्णालये, शाळांमधील भंगार आणि ई-वेस्ट विकत घेण्यासाठी वडिलांसोबत तो जात असे आणि अचानक एके दिवशी जुने पार्टस्‌ वापरून कॉम्प्युटर बनवावा, अशी कल्पना त्याला सुचली. मग त्याने व्हेंटीलेटर नऊ इंच स्क्रीन वापरून हा कॉम्प्युटर तयार केला. तोही फक्त साडेपाच हजार रुपयांत. यापुढे तो गरजू मुलांना अद्ययावत कॉम्प्युटर बनवून वर्षभर त्याची सर्व्हिसिंग मोफत देणार असल्याचे सांगतो.

    अभ्यासात नापास... हार्डवेअर नेटवर्किंगमधे प्रावीण्य ....जयंतने नववीत नापास झाल्याने शिक्षण अर्धवट सोडले होते. शिक्षणाची आवडच कमी असल्याने त्याने शाळेकडे कायमची पाठ फिरवली. घराच्यांनीही त्याला विरोध न करता आवडीच्या क्षेत्रात शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अपयशाने न खचता जयंतने हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला. वडिलांच्या कामात हातभार लावत होताच. शिक्षण सोडले तरी त्याचा आत्मविश्‍वास ढळला नव्हता. कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये नव्याने आलेले तंत्रज्ञानही शिकत गेला. काळाप्रमाणे बदलण्याच्या त्याच्या या सवईमुळेच आज हे शक्‍य झाले आहे, असे त्याचे वडील रवींद्र परब सांगतात. जयंतला अभ्यासाठी कधीही आग्रह केला नाही. जे काम करशील त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न कर, इतकेच त्याला सांगितले होते. या वर्षी त्याने दहावीची परीक्षा दिली. सर्व विषयही त्याला सोपे गेले आहेत. दहावीनंतर पुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगकडे जाण्यापेक्षा कॉम्प्युटरमधे नव्याने येणाऱ्या प्रणालीबाबत जाणून घेण्याचा माझा प्रयत्न राहील, असे त्याने सांगितले.

    ई-कचऱ्याबद्दल निरक्षरता... आपल्याकडे ई-कचऱ्याबद्दल असाक्षरता असल्याने त्याच्या पुनर्वापराबद्दल कमी विचार केला जातो. मुंबईत नऊ हजार 400 टन ई-कचरा दरवर्षी तयार होतो, त्यापैकी तीन हजार टन कचऱ्याचा पुनर्प्रक्रियेसाठी वापर केला जातो. कॉम्प्युटर इंजिनिअर्स आणि कुशल कारागीरांना सोबत घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम जयंत हाती घेणार आहे. ई-वेस्ट गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कॉम्प्युटरचे वापरायोग्य पार्टस्‌ वेगळे केल्यास कॉम्प्युटर बनवण्याचा बराच खर्च वाचू शकेल.

    व्यवसायाभिमुख व्हा... या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय करावा. विद्यार्थी आपला वेळ व पैसा शिक्षण घेण्यासाठी खर्च करतात, त्यापैकी सगळ्यांनाच मनासारखी नोकरी मिळत नाही, अशाने बेरोजगारी वाढते. व्यवसायाबद्दल नियोजन सुरू करून योजना आखली असता त्यात यश शक्‍य आहे, असे जयंतचे मत आहे. तो आणि त्याचे वडील सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे प्रशिक्षण देतात. नवउद्योजकांना त्याबद्दल व्यवसाय मार्गदर्शनही करतात.

    -- संतोष द पाटील

  • जनता सहकारी बँकचा ७२ वा वर्धापनदिन

    आज ‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या सात दशकाहून अधिक काळ राज्याच्या सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेल्या जनता सहकारी बँक पुणे चा वर्धापन दिन. १८ ऑक्टोबर १९४९ रोजी समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनता बँकेची स्थापना झाली.

  • चहा बनवण्याची सोपी व शात्रीय पद्धत

    चहाचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सिनेन्सिस आहे. तसेच या वनस्पतीच्या पाने व पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून चहा हे पेय बनते.. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते.

    पाण्यानंतर हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो.
    एकोणीशे चाळीस च्या दशका पर्यंत भारता मद्धे सकाळी चहा पिण्याची पद्धत नव्हती. त्याऐवजी लोक लिंबू पाणी प्यायचे. मित्रांना आमंत्रण देतानाही लिंबू पाणी पिण्यासाठी या असे असायचे.

    नंतरच्या काळात ब्रिटिश लोकांनी दक्षिण भारत व ईशान्ये कडे डोंगरउतारावर चहाची लागवड सुरु केली. तो चहा खपवण्या साठी त्यांनी लोकांना चांगल्या प्रकारे प्रलोभन दाखवून भारतीयांना चहाची सवय लावली. आमच्या लहान पणी आठवडे बाजारात लिप्टनचा चहाची टांग्यामधून जाहिरात करणारे एजंट यायचे व लोकांना फुकट चहा पावडर वाटायचे. अशा प्रकारे लोकांना सवय लावून नंतर विक्री करायचे.

    जगामद्धे नाही तरी भारतात चहाचे असंख्य प्रकार आहेत. त्यातील काही मुख्य प्रकार असे आहेत

    १. बदाम पिस्ता चहा, २. बिरयानी चहा, ३. गुलाबी चहा, ४. ईराणी चहा, ०५. आसाम चहा ०६. दार्जिलिंग चहा ०७. निलगिरी चहा ०८. तंदुरी चहा. ०९. कहवा काश्मिरी चहा.१० चॉकलेट चहा ११. कोल्हापूर कडील बासुंदी चहा १२. इराण्यांचा मस्का बन टी १३. ब्रिटिश लोकांचा हाय टी (खारी व बेकरी पदार्था बरोबर)

    अलीकडे कोविड महामारीत प्रसिद्धीस आलेले, मसाला टी, मालेगावचा काढा चहा, गवती चहाची पाने, तुळस वगैरे टाकून केलेला औषधी चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादी.

    चहा तयार करण्याच्या पद्धती:

    चहाच्या पत्तीमद्धे टॅनिन नावाचे रसायन असते. पत्ती उकळत्या पाण्यात टाकली कि त्यातील टॅनिन पाण्यामद्धे उतरते.त्याची चव तुरट-तिखट असते. या रसायनामुळे मेंदूला तरतरी येते व त्याची सवय लागते. ब्रिटिश लोक चहा कोरा बिनदुधाचा घेतात. पण भारतीय लोकांना दूध व पत्ती घालून केलेला चहा आवडतो.

    चहाची चव हि पत्ती कितीवेळ उकळत्या पाण्यात आहे व त्यात किती प्रमाणात दूध घातले जाते यावर अवलंबून असते.काहींना कडक चहा आवडतो असा चहा उकळत्या पाण्यात बराच वेळ ठेवला जातो त्यामुळे त्यात ज्यास्त टॅनिन उतरते व चहा कडक बनतो.

    चहापत्तीची गुणवत्ता देखील चांगला चहा बनवण्यास कारणीभूत असते. त्यामुळेच बाजारात चहापत्तीचे विविध ब्रँड उपलब्ध आहेत. जो तो आपल्या आवडीप्रमाणे चहापत्ती वापरतो. सर्वात महाग व उत्कृष्ट चहा हा दार्जिलिंगचा मानला जातो.

    अनेकांना चहाशिवाय चैन पडत नाही. काही जण आळस घालवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी आवर्जून चहा पितात. तसंच बरेच जण दिवसाची सुरुवात चहाने करतात. विशेषतः विद्यार्थी वर्ग रात्री अभ्यास करताना हुशारी येण्यासाठी व झोप घालवण्या करता चहा घेतात. दिवसाची सुरुवात मनाजोग्या चहाने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो; मात्र हाच चहा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं चहा बनवतो. त्यामुळे चहाची चवसुद्धा वेगवेगळी असते.

    चहात केवळ चार गोष्टी वापरल्या जातात. प्रत्येक जण आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून चहा तयार करत असल्याने चव वेगवेगळी लागते. कोणी साखर वापरून, तर कोणी गुळाचा वापर करून चहा बनवतो. तसंच यामध्ये दूध टाकून किंवा बिनदुधाचाही चहा बनवला जातो.

    आपल्या, तसंच मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो; पण चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा याची खास माहिती/ पद्धत सांगणार आहे. चहा विविध प्रकारे तयार केला जातो. प्रत्येकाची चहा बनवण्याची एक खास पद्धत असते. तसंच प्रत्येकाची चहा उकळण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. दूध किंवा दुधाशिवायही चहा बनविला जातो. बिनदुधाचा चहा आरोग्यास चांगला असतो; मात्र आपल्याकडे दुध घालून बनवलेला चहा सर्वांत जास्त प्रमाणात प्यायला जातो.

    चहा बनविताना चुकीची पद्धत वापरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे चहाची चव बिघडते. बरेच जण आधी दूध उकळून मग त्यामध्ये पाणी, चहा पावडर घालतात. ही चुकीची पद्धत आहे. यात बराच वेळ दूध उकळावं लागतं. गॅस जास्त लागतो. सर्वांत शेवटी चहा पावडर घालणंही चुकीचीच पद्धत आहे. चहा चांगला उकळावा लागतो. तसं केलं, तर कमी चहा पावडर वापरूनही चहाला चांगली चव आणि गंध मिळतो.

    ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने (BSI) वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने चहा करण्याची पद्धत सांगितली आहे. चहाचे भांडे हे नेहमी स्टीलचे किंवा पितळेचे असावे. या पद्धतीत एका स्टील किंवा पितळी भांड्यामध्ये फक्त दूध उकळवावं. चमच्याने ते ढवळत राहावं. दुसऱ्या भांड्यात चहासाठी पाणी गरम करायला ठेवावं. पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण एकसमान असावं. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये चहा पावडर घालावी. चहा पावडर साखरेच्या प्रमाणापेक्षा थोडी कमी असावी. त्यानंतर चहाला चांगली उकळी येऊ द्यावी. साखर चवीनुसार घालावी. कांही लोक चहा पाण्यामध्ये न उकळवता मुरवत ठेवतात. त्यानंतर आवडीनुसार चहात आलं, लवंग, मिरपूड यांपैकी काही घालायचं असेल तर घालू शकता. चहात आले कुटून घालताना चहाचे तापमान थोडे कमी होऊ द्यावे नाहीतर दूध नासते. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं दूध चहामध्ये घालावं. त्यानंतर मात्र चहा जास्त वेळ उकळू किंवा मुरुवू नये.
    अशी ही चहा बनवण्याची खास पद्धत आहे. विशेष म्हणजे जुन्या शहरांमध्ये बरीच वर्षं चहा विकणारे अमृततुल्य विक्रेतेसुद्धा चहा बनवण्यासाठी हीच पद्धत वापरतात. ही पद्धत तुम्हीही नक्की वापरून पाहा. ह्यात पण तुम्ही छोटा मोठा बदल करून तुम्हास आवडणाऱ्या चवीचा चहा बनवू शकता.
    चहा हे पृथ्वीवरील अमृत समजले जाते व ते प्राशन करण्यासाठी एवढा सोहळा केलाच पाहिजे ना?

    सध्या ह्या व्यवसायात उच्च शिक्षित तरुण पण उतरले आहेत. ते वेगवेगळे प्रयोग करून स्वतःचा चहाचा ब्रँड निर्माण करतात. त्यांचा व्यवसाय पण छान चालतो. जसे कि पुण्यात येवले टी ईत्यादी.

    सावधानता : चहा हा पित्तकारक गुणधर्माचा आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी जास्त चहा घेऊ नये. साधारण पणे दिवसातून २-३ कप चहा पुरेसा असतो.

    -- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

  • जागतिक रजोनिवृत्ती दिन

    रजोनिवृत्ती दरम्यान आणि त्यानंतर स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल जागृती करण्यासाठी १८ ऑक्टोबर हा ‘जागतिक रजोनिवृत्ती दिन’ म्हणून पाळला जातो. रजोनिवृत्ती म्हणजे जीवनातून निवृत्ती नव्हे; ती केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे हे समजून घेतले पाहिजे.