वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प फायदेशीर ठरत असल्याने भारतासारख्या विकसनशील देशात तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. तुटीचा अर्थसंकल्प भाववाढ घडवून आणणारा असल्याने त्यावर योग्य नियंत्रण नसेल तर चलनवाढीचे भय संभवते.
January 23, 2023
लेखक : शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : दर वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणपती आणतो. आणि म्हणतो “घरोघरी गणपती आले.” किंवा “आमच्या घरी गणपती आला.” किंवा “आमच्या घरी गणपती असतो.” नक्की काय आहे हे?
September 3, 2019
जयललिता यांच्या मृत्यू नंतर पुन्हा एकदा भारतीय चेह-या वरचा मुलामा उडाला आहे.जयललिता या ब्राह्मण विरोधी राजकीय पक्षाच्या सर्वेसर्वा होत्या . किंबहुना ब्राह्मण विरोध हाच या पक्षाचा इतिहास आहे. चेन्नईतील उच्च जातीचे लोक केव्हाच हद्दपार झाले आहेत .
December 16, 2016
हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.
2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.
माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.
आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते
वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.
ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत
ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.
अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे,
सनसिटी रस्ता, आनंदनगर,
सिंहगड रोड, पुणे
फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk
May 3, 2017
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परकीय चलन मिळवून देणाऱ्या पिकामध्ये काजूचा तिसरा नंबर लागतो. या पिकामुळे परकीय चलन मिळवून आर्थिक परिस्थिती जर सुधारतेच पण त्याचबरोबर रोजगाराची संधीही उपलब्ध होते. हे पीक ४०० वर्षापासून पोर्तुगीजांनी भारतात आणले. याचा मुख्य हेतू जमिनीची सुधारणा करणे हा होता. जंगलामध्येही मिळू शकणारे पीक आहे.
December 14, 2023
‘जून’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या सर्जनशील व मोकळ्या मनाच्या असल्याचे मानले जाते. चालू ‘जून’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
June 29, 2025
संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ…. यांचे ज्ञान होऊ लागते. नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा.
December 15, 2022
प्रल्हादासी करितो नमन बालक असुनी महान
अणुरेणूंत असे भगवान दाखवूनी देई जगाला ।।१।।
बघावी सृष्टी ठेऊनी संत द्दष्टी
त्यासी दिसेल जगत् जेठी सर्व ठिकाणीं ।।२।।
प्रल्हादाचे तत्वज्ञान प्रभुमय सारे जग् जीवन
त्यासी घ्यावे ओळखून श्रद्धा द्दष्टीनें ।।३।।
अपूर्व प्रभू भक्ति उन्मत्त असूरी शक्ति
संघर्षकथा होती भक्त प्रल्हादाची ।।४।।
बहूत महान वीर प्रभुपुढे कोण टिकणार
परि प्रभूसीच वाकवणार प्रल्हाद बालक ।।५।।
नारद ऋषीं एके दिनीं हिरण्यकश्यपूचे राजधानीं
पाद्यपुजा स्वीकारुनी गेले प्रसन्न होऊनी ।।६।।
शिवाची करावी भक्ति मिळवावी तप शक्ति
सामर्थ्यवान ह्या जगतीं होऊनी करावे राज्य ।।७।।
नारद राणीस उपदेशीती जो नारायणाचे नाम घेती
उद्धार ह्या जगती त्याचा होत असे ।।८।।
गर्भवती तूं राणी भक्तिभाव ठेवतां मनीं
ईश्वर संस्कार पडूनी बनेल बालक महान ।।९।।
राजा उपदेश ऐकूनी गेला तपश्चर्येस वनीं
राणी राजधानी नारायणाचे नामस्मरण करी ।।१०।।
करुनी तप महान शिवासी केले प्रसन्न
वरदान घेई मागून वाढवी आपली शक्ति ।।११।।
असे मागीं वरदान जेणे टळावे मरण
परि प्रभू लिला महान कसे टाळी ब्रह्मालिखीत ।।१२।।
पशू अथवा नर राजगृहीं वा बाहेरी
कुणी न करी ठार हिरण्यकश्यपूला ।।१३।।
मृत्यु न यावा शस्त्रानीं भय नसावे अग्नीपासूनी
टाळावे मरण बुडोनी ही इच्छा करी राजा ।।१४।।
दिवस असो वा रात्र मृत्यु टाळावा मात्र
निष्प्रभ ठरावे अस्त्र फेकता राजा वरी ।।१५।।
शिवाचे मिळतां वरदान राजा झाला बेभान
सामर्थ गेले वाढून शिवकृपेमुळे ।।१६।।
सामर्थ्यांत असे शक्ति शक्ती ओघांत वाहती
ओघास दिशा लागती परिणाम दिसण्या योग्य ।।१७।।
मिळतां योग्य मार्ग होईल चांगला उपयोग
नम्रतेचा असता भाग मिळालेल्या शक्तिमध्ये ।।१८।।
दुरुपयोग होता शक्तिचा दुष्परिणाम दिसेल तिचा
उद्वस्त करी जीवनाचा केंद्र बिंदू अहंकार असतां ।।१९।।
पावन करुनी शिववर जागृत झाला अहंकार
मूळचा होता असूर हिरण्यकश्यपू ।।२०।।
गरोदरपणीं नामस्मरण मंत्र जपूनी नारायण
महान संस्कार करुन बाळास संगोपिले ।।२१।।
लागला ईश्वरी ध्यास सतत प्रल्हाद बाळास
बघे सर्वत्र प्रभूस रात्रंदिनी ।।२२।।
गोष्ट येता ध्यानीं राजा गेला संतापूनी
मजविण श्रेष्ठ नाही कुणी सांगु लागला प्रल्हाद बाळासी ।।२३।।
मीच प्रभूचे ठायी तुझी भक्ति अर्पावी
इच्छा नारायणाची सोडावी ताकद देई प्रल्हादबाळा ।।२४।।
नाम नारायणाचे शब्द ते अंतर्मनांचे
भाव गुंतले ह्रदयाचे प्रल्हादबाळाचे ।।२५।।
जन्मबीजाचे संस्कार सहजतेने न जाणार
बाह्य शक्तीचा करी अव्हेर प्रल्हादबाळ ।।२६।।
धमकावले प्रल्हादासी त्यास जीवे मारण्यासी
चालू ठेवता नामस्मरणासी नारायणाच्या ।।२७।।
आत्मा हा अविनाशी समर्पित झाला नारायणाशी
न देई महत्व देहाशी प्रल्हादबाळ ।।२८।।
सर्वत्र सोडता प्रभूवर काळजी तोच घेणार
संशय नसावा त्याचेवर समर्पण करते समयीं ।।२९।।
प्रल्हादाचा हट्ट बघूनी राजा जाई क्रोधूनी
ठार करण्या ठरवूनी हूकुम देई प्रधाना ।।३०।।
पर्वतावरुन लोटले उकळत्या तेलांत ठाकले
ऐरावताच्या पायीं बांधले सर्व प्रयत्न जाई निष्फळ ।।३१।।
प्रभू असतां तारणधारी कोण त्यास जीवें मारी
राजाचे प्रयत्न निष्प्रभ ठरी परमेश्वर शक्तीपुढे ।।३२।।
राजाचा क्रोधाग्नी पेटला प्रश्न करी प्रल्हादाला
नारायण कोठें दाखव ? नाश करीन मी त्याचा ।।३३।।
हे विश्वची प्रभूमय अणूरेणूंत तो होय
सर्वत्र समावून जाय हीच त्याची लीला ।।३४।।
ईश्वर आहे महान ब्रह्मांड त्याचा भाग असून
अंशरुपें जायीं समावून प्रत्येक वस्तूमध्ये ।।३५।।
महासागरातील नीर अगणीत थेंबांचा बनणार
थेंबांत सागरी अंश असणार हे घ्यावे समजावूनी ।।३६।।
'तो नाही' ऐसे ठिकाण न सापडेल ते शोधून
तुझ्या माझ्यांत ही तो असून वास करीत राही ।।३७।।
नारायण आहे सर्व ठिकाणीं घ्यावे हे समजावूनी
हया खांबी तो बसूनी हास्य वदन करी ।।३८।।
प्रल्हादाचे शब्द ऐकूनी राजा गेला चवताळूनी
जोरानें लाथ मारुनी प्रहार केला खांबावरी ।।३९।।
भयंकर होऊनी आवाज कडाडून चमके वीज
हिरण्यकश्यपू न येई समज ह्या चमत्काराची ।।४०।।
मानव देही सिंह शिर नखें त्याची भयंकर
गर्जना देत बाहेर पडला खांबांतूनी ।।४१।।
रुप आक्रळ विक्राळ जणु भासला महाकाळ
घाबरुनी सोडी सकळ ओढूनी घेई असुराला ।।४२।।
सायंकाळचे समयीं भयंकर रुप घेई
हिरण्यकश्यपूस मारण्या येई नारायण ।।४३।।
बसूनी उंचावरी घेऊन राजास मांडीवरी
नखानी पोट चिरी नृसिंह ।।४४।।
वचनाचे करुन पालन वरदानाचा ठेऊन मान
नृसिंह आवतार घेवून ठार करी राजाला ।।४५।।
डोळे मिटूनी नामस्मरण ऐकूनी प्रल्हादाचे भजन
प्रसन्न होई नारायण दर्शन देई विष्णूरुपे ।।४६।।
प्रल्हाद झाला पावन प्रभूचे नामस्मरण करुन
भक्तीचा विजय होऊन अहंकारासी केले नष्ट ।।४७।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१२- ०११२८३
January 12, 2018
रयतेतून राजे निवडले जातात; परंतु निवडून आल्यावर ते राजे रयतेचे राहत नाहीत. रयतेचे राज्य म्हटले, की आधी विचार रयतेच्या कल्याणाचा व्हायला हवा. संपूर्ण भारताला एक बाजारपेठ बनवून ती बाजारपेठ विदेशी कंपन्यांच्या हवाली करणार्यांना रयतेचे राजे कसे म्हणता येईल? लोकशाहीचे वर्णन जनतेने जनतेसाठी जनतेद्वारा चालविलेले राज्य असे केले जाते.
March 13, 2011
अश्मयुगात रानोमाळ भटकणारा, शिकार करून कच्चे मांस खाऊन जगणारा माणूस शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यावर स्थिर झाला. आधी त्याचे हे संघटन टोळ्यांच्या स्वरूपात होते. पुढे या संघटनेला अधिक रेखीव स्वरूप प्राप्त झाले आणि समाजाची निर्मिती झाली.
June 19, 2005
Copyright © 2025 | Marathisrushti