वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कर्णपूरण. म्हणजे कानात तेल घालणे. फक्त आणि फक्त भारतातच सांगितला जाणारा हा चिकित्सा स्वरूप आणि प्रिव्हेंटीव प्रकारचा एक उपचार. अन्य पॅथीमधे असे कर्णपूरण इन्फेक्शनच्या नावाखाली निषिध्द मानले आहे. त्याचे ‘रिट्रो इन्स्पेक्शन’ करण्याची तसदी पण कुणी घेत नाहीत.
February 22, 2018
२४-३०/११/२०१२
पासुन माओवाद्यांच्या “पिपल लिबरेशन गोरिला आर्मिचा रेझिंग सप्ताह” सुरु
झाला आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहखात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे.
स्वामी अग्निवेश यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माओवाद्यांशी वाटाघाटी
करायला तयार आहे
November 29, 2012
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत किती मोठे तत्त्वज्ञान आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे; परंतु आपल्याला साधी भाषा कळतच नसावी. एकतर आपल्या संतांचे साहित्य इंठाजीत नाही. ते ‘वेल पॉलिश्ड’ नाही.
October 8, 2006
लंकाधिपती रावणाचा पराभव केल्यानंतर रामाने शिवलिंगाची पूजा जिथे केली, ती जागा म्हणजे रामेश्वरम्. रामनाथस्वामी मंदिर, बारा ज्योर्तिलिंगांतील पवित्र स्थान. गंगोत्री, वाराणसी, रामेश्वर या पवित्र त्रिस्थळी यात्रा केल्यावर महापुण्य लागतं. त्यामुळे हजारो यात्रेकरूंचे जथेच्या जथे रामेश्वरला भेट देत असतात.
बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्यावर भारतभूमीपासून ५० चौरस कि.मी. परिसर असलेला बेटांचा समूह म्हणजे रामेश्वर व धनुष्यकोडी. ही ठिकाणं मन्नारच्या आखातात पसरलेली आहेत. या बेटांचं शेवटचं टोक श्रीलंकेपासून १९ कि.मी. अंतरावर आहे. याच जागी हनुमानाच्या मदतीनं रामाने सेतू बांधून लंकेत पदार्पण केलं होतं असे दाखले दिले जातात. रामेश्वर हे मुख्य बेट समुद्रावरील पम्बन रेल्वे पुलानं व अन्नाई इंदिरा गांधी मोटररस्त्याच्या पुलानं भारताशी जोडलेलं आहे.
मदुराई रामेश्वर प्रवास टॅक्सीनं व चार-पदरी पुलावरील रस्त्यानं होतो. हा प्रवास करताना डोळ्यांचं पारणं शब्दश: फिटतं. पुलाच्या मध्यात आल्यावर मग खालच्या पातळीवरचा रेल्वे पूल म्हणजे किती अजस्र काम आहे हे लक्षात येतं; तर दोन्ही बाजूंनी अथांग पसरलेला महासागर, त्यांतून डुलत जाणाऱ्या शेकडो होड्या, मचवे, मोटरबोटी... असा हा संपूर्ण परिसरच एखाद्या पेंटिंगसारखा वाटतो.
हजारो वर्षे छोटे पडाव, शिडाची जहाजं, मचवे यांमधून लक्षावधी यात्रेकरू भारतातून या पुण्यभूमीत जात असत. हा प्रवास अतिशय खडतर होता. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीय तीर्थक्षेत्रांना जाण्याकरता रेल्वेमार्ग बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी १९११ सालात या महान समुद्ररेल्वेपुलाचं काम हजारो कामगार व अभियंत्यांच्या मदतीने चालू करत, १९१३ पर्यंत भारतातून थेट रामेश्वर, धनुष्यकोडीपर्यंत रेल्वेमार्ग सुरू करण्याचं अशक्यप्राय काम तडीस नेलं. प्रवासी धनुष्यकोडी येथून स्टीमर बोटीनं थेट लंकेच्या किनाऱ्यावरील तलैमनार स्टेशनपर्यंत जात असत. तिथून थेट कोलंबोपर्यंत रेल्वेनं जाता येत असे. साधारण १९५०-१९५५ सालापर्यंत 'मद्रास-सिलोन एक्सप्रेस गाडी' २४ तासांत रेल्वे-बोट-रेल्वे' असा प्रवास घडवत असे. पुढे भारत-सिलोन संबंध सलोख्याचे न राहिल्याने हा मार्ग बंद झाला व गाडी फक्त धनुष्यकोडीपर्यंत धावू लागली.
१९६४ सालात मन्नारचे आखात व धनुष्यकोडी यांना वादळाचा इतका जबरदस्त तडाखा बसला, की संपूर्ण गाव, रेल्वेमार्ग, रेल्वेस्टेशन वाहून गेलं. येथील वाळवंटात जीपनं प्रवास करताना ह्या सर्वांचे भग्नावशेष जागोजागी दिसतात आणि मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही.
पम्बन रेल्वेपुलाची लांबी २०६५ मीटर असून, त्याला १४६ स्पॅन आहेत. एकदम सरळ रेषेत असलेल्या या पुलाला मध्यात ६५ मीटरचा 'लिफ्ट स्पॅन' असून तो मध्यात उघडला जाऊ शकतो, त्यामुळे मोठाल्या स्टीमर बोटी दोन्ही समुद्र ओलांडू शकतात.
भर समुद्रात त्या काळात बांधलेला हा भारतातील एकमेव लांब पूल असून, त्यावर अनेक जागी अॅनोमीटर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुलाजवळून वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाची माहिती सतत मिळते. वाऱ्याचा वेग ५८ कि.मी.पेक्षा जास्त असेल, तर वादळ होण्याची दाट शक्यता निर्माण होते आणि रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित केली जाते.
१९६४ सालातील वादळाच्या तडाख्यात पुलाच्या १२४ स्पॅनचं नुकसान झालं होतं. युद्ध पातळीवर काम करत रेल्वेने हा पूल दुरुस्त केला होता. या पुलाच्या तुटलेल्या कमानी समुद्रातून काढून पुन्हा मूळ जागी लावण्याचं महाकठीण काम टी. श्रीधरन या जगप्रसिद्ध भारतीय रेल्वे इंजिनिअरनं केलं आणि वाहतूक पूर्ववत केली. हे श्रीधरन पुढे मेट्रो मॅन श्रीधरन म्हणून प्रसिद्धीला आलेले आहेत. डिसेंबर २०१२ मध्ये नेव्हीच्या एका बोटीला खेचून नेणाऱ्या बार्जनं पुलाला धक्का दिल्यानं काही स्पॅनचं नुकसान झालं होतं.
हे रामेश्वर स्टेशनही अगदी अद्ययावत पद्धतीनं बांधलेलं आहे. स्टेशनला दोन लांब प्लॅटफॉर्मस आहेत, जिथून थेट वाराणसी, द्वारका, भुवनेश्वर, तिरुपती, चेन्नईपर्यंत जाणाऱ्या गाड्या सुटतात. मी एकदा पम्बम ब्रिजवरील प्रवासाचा आनंद लुटण्याकरता मुद्दामहून दिवसाउजेडी रामेश्वरहून तंजावरला जाणाऱ्या गाडीचं पम्बन रेल्वेपूल तिकीट काढलं होतं. गाडीत प्रवासी इतके थोडे होते, की संपूर्ण प्लॅटफॉर्म मोकळा दिसत होता. आमच्या संपूर्ण डब्यात इन मिन १० ते १२ प्रवासी. रामेश्वर नंतर १५ मिनिटांनी पम्बम स्टेशन आलं. आम्ही डब्याच्या दोन्ही दारांशी दर्शनाकरता सज्ज झालो. आमच्याबरोबर दक्षिणेकडचं एक जोडपंही ब्रिज पाहण्यास उत्सुकतेनं जय्यत तयारीत होतं.
पम्बन स्टेशन सुटलं आणि काही क्षणात अथांग पसरलेला महासागर जणू कापत गाडीचा प्रवास धिम्या गतीने सुरू झाला. मोठ्या नद्यांवरील रेल्वे पुलांना दोन्ही बाजूंनी त्रिकोणी आकाराचे अजस्र लोखंडी गर्डर्स असतात. त्यांमधून गाडी जाताना घुमणारा आवाज छातीचा ठोका चुकवतो, पण नदीच्या पात्राचं भव्य स्वरूप डब्यातून दिसत नाही; मात्र या ब्रिजच्या दोन्ही बाजूस काहीच नसल्याने आपण थेट फेसाळत येणाऱ्या समुद्राच्या लाटांवरून मार्ग आक्रमत असतो. त्या प्रत्येक कमानीवरून जाताना येणाऱ्या 'धडक आवाजा'ची एक लय असते. दोन्ही बाजूंच्या समुद्राच्या रंगाच्या निळसर, हिरवट, काळपट छटा पाहताना डोळे सुखावतात. जसजशी गाडी भर समुद्राच्या मध्यात येते तसतशी लाटांची उंची व जोर वाढत जातो, कमानींवर जोरात आपटत आणि फेसाळत येणारे शुभ्र तुषार थेट गाडीच्या चाकांपर्यंत भिडण्याचा प्रयत्न करीत असतात. गाडी अतिशय संथगतीने जात असल्याने प्रवासाचा आनंद मनापासून लुटता येतो. दोन्ही बाजूंना समुद्रात थेट क्षितिजापर्यंत शेकडोंनी छोट्या-मोठ्या बोटी, पडाव, मचवे हेलकावे खात मार्गक्रमण करीत असतात, तर एका बाजूस दुप्पट उंचीवरील मोटारी जाणारा बदामी रंगाच्या कमानींचा अजस्र पूल समुद्राच्या निळ्या रंगावर अधिकच उठून दिसत असतो. मधल्या उचलल्या जाणाऱ्या स्पॅनवरून गाडी जाताना प्रचंड गडगडाटासारखा आवाज घुमतो आणि ही सारी दृश्यं आपसुकच डोळ्यांत व कॅमेऱ्यात टिपली जात राहतात. पुलावरचा हा प्रवास संपूच नये असं मनोमन वाटतं. हळूहळू समुद्र मागे पडतो. हिरव्यागार कुरणांची जमीन भराभर मागे पळते. बघता बघता ८ ते १० मिनिटांच्या अविस्मरणीय प्रवासाची सांगता होते.
१०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भारतीय कामगारांच्या मदतीने या अवघड कामाचं धनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. रामायणात वर्णन केलेल्या वानरसेनेच्या सेतुबंधनाची ही पुनरावृत्तीच म्हणता येईल.
-डॉ. अविनाश वैद्य
June 27, 2022
‘हंपी’ सिनेमा बघत होते… साधारण अर्ध्या तासानंतर, ललित प्रभाकरच्या तोंडी एक वाक्य आहे… की Buddhist philosophy प्रमाणे जीवनात तीनच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात…
September 15, 2019
मल, मूत्र, ढेकर, शिंका, अश्रु, तहान, भूक इ. तेरा वेग सांगितलेले आहेत. यांना कधीही अडवू नये. जेव्हा हे वेग आतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा जबरदस्तीने यांना अडवून धरू नये. लगेचच त्यांना मोकळे करावे.
September 2, 2017
एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर.
लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. अगदी फिलिप्सचे रेडिओ ते इतर अनेक नावाजलेल्या ब्रॅंडसच्या वस्तू उल्हासनगरमध्ये मिळायच्या. मात्र उल्हासनगरचा माल हा कायमच डुप्लिकेट म्हणून हिणवला गेला. खरंतर त्या उत्पादनांमध्येही एक ताकद होती. उल्हासनगरची ही उत्पादने त्यांच्या नावाने विकली गेली असती तर त्याचवेळी उल्हासनगरची ही बाजारपेठ स्वत:च्या आस्तित्त्वाचा ठसा उमटवू शकली असती. तसे झाले असते तर Made in Ullhasngar च्या ऐवजी हाच माल Made in India म्हणूनच विकला गेला असता. कदाचित त्यामुळे चिनी माल भारतात येण्याऐवजी इथलाच माल देशोदेशी गेला असता.
मात्र कदाचित त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हे जाणवले असावे आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या व्यावसायिक गणितात हे बसत नसावे. नाहीतर जी मेक इन इंडियाची घोषणा पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये केली ती इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी या भारताच्या दोन महान पंतप्रधानांना करणे सहज शक्य होते. त्यांच्यात ती धमकही होती.
कालांतराने उल्हासनगरचे हे महत्त्व कमी होत गेले आणि चिनी बनावटीचा माल भारतीय बाजारपेठेत स्थिरावायला सुरुवात झाली.
आज भारतात जवळपास सर्वच क्षेत्रात चिनी बनावटीच्या वस्तूंचा सुळसुळाट झालेला आहे. कपडे, खेळणी हे तर सोडाच, पण दिवाळीतले कंदील आणि रोजच्या पूजेतील धूप, अगरबत्तीसारख्या वस्तूही यातून सुटल्या नाहीत. मुंबईत रस्तोरस्ती फूटपाथवर हा चीनी वस्तूंचा बाजार भरलेला असतो. याचे गमक हे चिनी वस्तूंच्या अत्यंत कमी किमतीत आहे.
असे म्हणतात की पश्चिमेकडच्या बाजारात काही नवे उत्पादन आले की लगेच त्याची चिनी आवृत्ती बाजारात येते. ती स्वस्त असते, पण टिकावू किंवा खरोखर उपयोगी असते असे म्हणणे धाडसाचे होईल. बहुसंख्य चिनी उत्पादनांचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते एक वर्षाचे असते. यातली काही तर दुकानातून घरी घेउन गेल्याबरोबर बंद पडतात. मात्र ती उत्पादने चिनी कंपन्यांच्या नावावर विकली जातात. यामुळे चीन हा जागतिक बाजारपेठेत एक ब्रॅंड बनला.
२०१५ मध्ये प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आल्यावर. चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत कमी केली. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार चीन स्वतःच्या उत्पादनांच्या किमती कमी ठेवून आर्थिक मंदीचा सामनाही करतोय आणि भारतातीलच नाही तर इतरही देशांतल्या बाजारपेठा काबिज करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे भारतीय आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चीनी उत्पादने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतात. शेवटी गिर्हाईकाला जे स्वस्त मिळेल ते तो घेणारच. .
भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि एकूणच भारताच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मात्र दुर्दैवाने यातील गांभीर्य आपण लक्षात घेत नाही आणि दररोज चिनी माल खरेदी करुन चिनची अर्थव्यवस्था बळकट करायला एकप्रकारे मदत करतोय.
चिन हा पाकिस्तानचा मित्र असल्यामुळे पदोपदी पाकिस्तानला मदत करतो हे काही आता लपुन राहिले नाही. भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्येही चिनच्या कारवाया सुरुच आहेत. एकीकडे आपले वीर जवान सीमेवर पाकिस्तानच्या कारवायांना बळी पडतात, शहिद होतात आणि आपण इकडे चिनी बनावटीच्या वस्तू राजरोसपणे रोज खरेदी करतो. आपण एकदातरी असा विचार केलाय का, की नकळत का होईना आपण आपल्या शूर शहिद जवानांचा अपमान करतोय?
भारत ही चीनची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीन भारतीय बाजारपेठेत दरवर्षी करोडो रुपयांचा व्यवसाय करतोय. यातील बराचसा माल चोरीच्या मार्गाने येत असावा त्यामुळे अचूक आकडे मिळणे कठीण आहे. मात्र जाणकारांच्या मते जवळपास काही लाख कोटी रुपयांची उलाढाल चीन केवळ भारतात करतो.
सीमेवर शहिद होणार्या भारतीय जवानांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची ही आपल्याला संधी आहे. चिनला एक संदेश देण्याचीही हीच संधी आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेवर थोडाफार तरी परिणाम करण्याची संधी आपल्याला भारतीय नागरिक म्हणून आहे. फक्त एक महिना कोणतीही चीनी बनावटीची म्हणजेच Made in China वस्तू खरेदी न करण्याचे जर भारतीयांनी ठरवलं तर ? चीनी बनावटीची कोणतीही वस्तू न विकण्याचं भारतीय व्यापार्यांनी ठरवलं तर?
बर्याचदा आपल्याकडे No TV Day आयोजित केले जातात. एकाद्या ठराविक दिवशी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करायचा नाही असे आवाहन केले जाते.
असाच एखादा No Chinese Goods Month पाळायला काय हरकत आहे? विचार करा.. पटलं तर इतरांना पटवा. मेलवरुन, फेसबुकवरुन, WhatsApp वरुन.. कसंही !
नाही पटलं तर खाली मान घालून स्वस्थ बसून रहा. आपल्या स्वस्थ बसण्याने कदाचित येणार्या काळात आपल्याला दूधही चिनमधल्या म्हशींचं प्यायला लागेल !
-- निनाद अरविंद प्रधान
January 18, 2016
कोणत्याही यंत्राला आपलं काम पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. विजेवर चालणार्या यंत्राना वीज ती ऊर्जा पुरवते. पेट्रोलवर चालणार्या यंत्रांना पेट्रोलच्या ज्वलनापासून ती मिळते. आपलं शरीर हे एक अतिशय गुंतागुंतीचं तरीही अत्यंत कार्यक्षम असं यंत्रच आहे असं म्हटलं जातं.
April 21, 2011
शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात.
August 24, 2022
संकल्प एक बीज आहे त्याला फळीभूत व्हायला वेळ हा लागतो. सतत दृढतेचे पाणी देत राहिले तर ह्या विचारांची किमया काय आहे ते स्वतःच अनुभव कराल.
December 20, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti