वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या हृदयामध्ये सदैव शिवभक्ती आणि श्वासांमध्ये ॐ नमः शिवाय गुंजत होते. त्यांचे नाव आहे, “संत नरहरी सोनार…..”
April 1, 2021
आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं.
March 4, 2013
शिरो दृष्टि हृद्रोग शूल प्रमेहज्वरार्शो जरायक्ष्महिक्काविषार्तान् |
त्वमाद्यो भिषग्भेषजं भस्म शंभो
त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय ‖ १५ ‖
जगद्गुरूंच्या अफाट संदर्भ विश्वाची चुणूक दाखवणारा हा श्लोक. आरंभीच्या दोन चरणात त्यांनी विविध रोगांची सूची सादर केली आहे.
शिरो - डोक्याशी संबंधित रोग,
दृष्टि- दृष्टीशी संबंधित रोग,
हृद्रोग- हृदयाशी संबंधित रोग,
शूल - आयुर्वेदात वर्णिलेले वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, आमज, वातश्लैष्मिक, पित्तश्लैष्मिक तथा वातपैत्तिक हे आठ प्रकारचे शूल म्हणजे आतून काटा टोचल्याप्रमाणे वेदना देणारे रोग,
प्रमेह- यौवनांगाशी संबंधित रोग, प्रदर रोग,
ज्वर- आयुर्वेदात वर्णिलेले वातजन्य, पित्तजन्य किंवा रसगत, रक्तगत, मांसगत, मज्जागत इ. सर्व प्रकारचे ताप,
अर्श- मूळव्याध, गुदद्वाराशी संबंधित रोग,
जरा- म्हातारपण, त्यामुळे येणारे रोग,
यक्ष्म- फुफ्फुसे तथा श्वास यंत्रणेत होणारे क्षयरोग,
हिक्का- पोटात समान आणि कंठात उदान वायु च्या प्रकोपाने निर्माण होणारे उचकी, ठसका इत्यादी रोग,
विषार्तान् - विषाच्या परिणामाने होणारे रोग,
अशा प्रकारच्या अनेक रोगाने माणूस ग्रस्त होतो. अशा सर्व रोगांनी त्रस्त असणाऱ्या जीवांसाठी,
त्वमाद्यो भिषग्- आपणच आद्य म्हणजे श्रेष्ठ भिषग् म्हणजे वैद्य आहात.
भेषजं भस्म शंभो- हे शंभो ! या सर्व रोगांवर आपल्या दृष्टीने भस्म हेच औषध आहे.
अर्थात आपल्या चरणकमलांवरील भस्मानेच हे सर्व रोग दूर होतात.
त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय - हे भगवंता माझे शरीर हलके करण्यासाठी मला या रोगां मधून दूर कर.
रोग झाले की शरीर जड होते. त्यामुळे शरीर हलके कर अर्थात मला निरोगी कर. तसेच शेवटी या जड शरीरापासून मोकळे करून मुक्ती प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 24, 2020
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मधील महत्त्वाचे मुद्दे.
March 1, 2026
भारतातील हजारो शहरांमध्ये काही शहरे फक्त वास्तूंच्या आणि रस्त्यांच्या ओळखीवरून जिवंत राहत नाहीत; ती शहरं जन्माला येतात श्रद्धेतून, संस्कृतितून आणि अध्यात्मातून. अशीच एक नगरी म्हणजे वाराणसी किंवा काशी.
December 11, 2025
आपल्याकडे निष्क्रियता हा अपराध नाही, उलट त्याचे कौतुकच होते. एखाद्याने काही कल्पकता दाखवून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो अपराध ठरतो. सव्वाशे कोटींचा हा देश आहे.
May 18, 2008
घराच्या भिंतीसाठी वापरण्यात येणारे रंग हे आपल्या मनावर जसा परिणाम करत असतात तसेच ते आरोग्यावरही करत असतात. त्यामुळे घराचे रंग हे पर्यावरणपूरक असायला हवेत.
गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमध्ये अनेक बाबतीत जागरुकता येत आहे. जगभरातले ग्राहक ते वापरत असलेल्या उत्पादनांच्या दर्जाविषयी सतर्क असतात. भारतीय ग्राहकही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच देशात अनेक ग्राहक ते वापरत असलेली उत्पादनं पर्यावरणपूरक असावीत असा आग्रह धरताना दिसतात. या सर्वांचा परिणाम असा झालाय की देशासह जागतिक पातळीवर घराचा पेण्ट आणि कोटिंगशी संबंधित उद्योगही आपली उत्पादनं जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असतील असा प्रयत्न करत आहेत. आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम थोड्या - फार प्रमाणात आपल्या आरोग्यावर होत असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, आपल्या घरातल्या अंतर्भागात वापरल्या जाणाऱ्या रंगांचा प्रतिकूल परिणाम होत असतो. आपण घरात अधिक वेळ घालवत असतो आणि रंगांतली विषारी द्रव्यं, क्षोभकं, अॅलर्जीकारक घटक आणि वायूचा सामना करत असतो. म्हणूनच हे टाळण्यासाठी चांगल्या म्हणजे पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला पाहिजे. तसंच खालील गोष्टी केल्या पाहिजे.
घरात भरपूर मोकळी हवा राहिल, अशी उपाययोजना करा.
आर्द्रता आणि पाण्यामुळे भिंती किंवा रंगांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.
विषारी द्रव्यांशी थेट संपर्क येणार नाही, यासाठी खबरदारी घ्या.
घराला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नूतनीकरण व रिमॉडेलिंगमध्ये आपल्या नकळत होणारी हानी टाळण्यासाठी देखरेख पद्धतीत बदल घडवून आणा.
घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना करा. उदा. ओलावा काढून टाकण्यासाठी आणि आर्द्रता कमी करण्यासाठी प्रत्येक बाथरूम आणि किचनला एक्झॉस्ट फॅन बसवून घ्या.
आरोग्याची हानी टाळण्यासाठी घराची नियमित तपासणी करा.
घरातल्या हवेचा दर्जा राखणं फार महत्त्वाचं असतं. कारण त्या हवेचा तुमच्या आरोग्यावर थेट आणि दीर्घ परिणाम होत असतो. बऱ्याच घरांमधली हवा घराबाहेरच्या हवेपेक्षा २२०० पटीने अधिक प्रदूषित असते, असं एका संशोधनात आढळून आलं आहे. अशा प्रदूषित हवेमुळेच श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवणं, डोळे आणि त्वचा जळजळणं असे त्रास होतात. म्हणूनच घरातली हवा प्रदूषित असेल तर ती सायलेण्ट किलर असते.
घरातल्या भिंतींसाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतांशी रंगांची निर्मिती ही व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउण्ड्स (व्हीओजीस)पासून केली जाते. पण या घटकांमुळे हवेचा दर्जा खालावतो आणि ती आरोग्यासाठी धोकादायक बनते. या घटकांना न्यूरोटॉक्सिन्स असं म्हणतात. व्हीओसींमुळे बाळांना फुफ्फुसाशी संबंधित विकार, अॅलर्जी, पाणावलेले आणि लाल डोळे, वाहतं नाक, कफ, घशाचा संसर्ग अशा समस्या जाणवतात. तसंच त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.
मुलं दिवसातला भरपूर वेळ घरातच असतात. अशा परिस्थितीत मुलांचा संपर्क हवेतल्या प्रदूषकांशी येत असेल तर त्यामुळे त्यांच्या रक्तातलं शिशाचं प्रमाण वाढणं तसंच दमा आणि श्वसनसंस्थेशी संबंधित आजार होऊ शकतात. घराच्या रंगांमध्ये व्हीओसीजचं प्रमाण अत्याधिक असेल तर त्याची झळ प्रौढांनाही बसू शकतो. त्यांना गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.
आजचे ग्राहक जागरूक असून ते आरोग्यदायी आणि सुरक्षित घरांना प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करायला हवा. हे रंग घरात असतील तर डोकं दुखणं, मळमळणं, श्वसनविकार, चक्कर येणं, छातीत दुखणं, फुफ्फुसात जळजळणं, नाक, घसा आणि डोळ्यात जळजळ होणं आदी समस्या सहसा जाणवत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 18, 2017
आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट !
April 1, 2021
गहू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. कफकर आहे. थंड हवेत तयार होणारा आणि त्याच थंड हवेत पचण्यायोग्य असा आहे.जर गहू पचला नाही, तर तो उत्तम कफवर्धक, उत्तम आमनिर्मिती करणारा, अत्यंत चिकट, अश्या अवगुणांचा आहे.
August 24, 2017
ऍपेलेशियन पर्वतराजीची नैसर्गिक हिरवी भिंत अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला पलीकडे पसरलेल्या जंगल, दर्या आणि माळरानांपासून वेगळं करते. सुरवातीला अटलांटिक महासागर ओलांडून येणार्या निर्वासितांनी अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या. ऍपेलेशियन पर्वतराजीची नैसर्गिक सीमारेषा हीच सुरवातीच्या वसाहतीसाठी विस्ताराची लक्ष्मणरेषा होती. परंतु या अगदी सुरवातीच्या काळापासूनच काही अस्वस्थ, धडपड्या, साहसी लोकांना या नैसर्गिक सीमेच्या आत स्वत:ला बंदिस्त करून घेणं मंजूर नव्हतं. हे लोक वेगवेगळ्या देशातून, संस्कृतीतून आले असले तरी त्या सर्वांमधे काही समान गुणधर्म होते – स्वावलंबन, धाडसी वृत्ती, अज्ञाताचा वेध घेण्याचं वेड, एकांडी शिलेदार प्रवृत्ती आणि कमालीच्या अवघड परिस्थितीवर मात करण्याचा मनोनिश्चय. या लोकांमधे काही केवळ अज्ञाताचा वेध घेऊ बघणारे वेडे साहसवीर होते, काही शिकारी किंवा फासेपारधी होते, काही व्यापार उदीमाची संधी शोधणारे होते तर काही केवळ धनाच्या लालसेने संकटावर मात करू बघणारे होते. या लोकांना वसाहतींच्या थोड्याफार सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून, शेतीभातीसारख्या एका जागी जखडून टाकणार्या जीवनपद्धतीपासून, कौटुंबिक जबाबदार्यांपासून मोकळीक मिळवायची होती.
अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर दक्षिणोत्तर पसरलेल्या या वसाहतींतून हे साहसी लोक, ऍपेलेशियन पर्वतराजीच्या वेगवेगळ्या डोंगर रांगांतून, दर्याखोर्यातून, निबीड अरण्यातून पश्चिमेकडे पुढे सरकण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. सतरावं शतक संपता संपता, ऍपेलेशियन पर्वतराजीच्या दक्षिणेकडील भागांतून, झाडं झुडपं कापत थोड्या फार वाटा या लोकांनी तयार केल्या. त्यामानाने उत्तरेकडच्या अधिक निबीड जंगलांतून अशा वाटा तयार करायला थोडा अधिक वेळ लागला.
यातील बहुतेक बहाद्दर इतिहासाला अज्ञातच राहिले. कैक जणांनी, जंगलातल्या वन्य प्राण्यांशी दोन हात करता करता, नद्या ओढे ओलांडण्याच्या प्रयत्नात, पर्वतराजीतल्या अफाट थंडीत काकडून किंवा वैराण वाळवंटात अन्न-पाण्यासाठी तडफडून आपले प्राण गमावले. स्थानिक रेड इंडियन लोकांशी या लोकांचा संपर्क कायमच यायचा. त्यातील काही टोळ्या सौम्य आणि सौजन्यशील असायच्या. यातील बर्याच धाडसी लोकांना या रेड इंडियन जमातींनी आपल्यात मोठ्या आनंदानं सामील करून घेतलं. बरेच जण या रेड इंडियन जमातींकडून शिकार, मासेमारी, प्राण्यांचा माग काढण्याच्या कला शिकले. यातल्या थोड्याफार जणांनी रेड इंडियन बायकांशी लग्न करून संसार देखील थाटले.
पण याच्याच उलट काही रेड इंडियन जमाती फारच क्रूर आणि लढावू वृत्तीच्या होत्या. त्यांच्या संपर्कात येणं म्हणजे संकटालाच आमंत्रण! सुरवातीच्या या साहसी लोकांपैकी बर्याच जणांनी, या अशा क्रूर टोळ्यांच्या हाती पडून आपले प्राण गमावले. काही टोळ्या अशा पकडलेल्या गोर्या लोकांना जबरदस्तीने आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करायच्या. मग त्यासाठी या गोर्या लोकांच्या डोक्यावरचे केस उपटून काढायचे, त्यांना विवस्त्र अवस्थेत थंड पाण्यात बरेच वेळा बुचकळून काढायचे (जेणे करून त्यांचे अशुद्ध पांढरे रक्त धुवून निघेल), त्यांच्या अंगावर चित्र विचित्र रंगरंगोटी करायची, इत्यादी प्रकार केले जायचे.
हे गोरे साहसवीर अशा धाडसी मोहीमांवर निघताना कमीत कमी जाम्यानिम्यानिशी निघायचे. हरणाच्या कातडीचं जाकीट, मोठाले बूट, बंदुक, गोळ्यांची पिशवी, चाकू आणि कुर्हाड घेतली की हे लोक जंगलात शिरायला तयार व्हायचे. पाठीवरच्या चामड्याच्या पिशवीत असायचा एक शेकोटी पेटविण्यासाठी चकमकीचा दगड, एक घोंगडी, तंबाखू आणि मीठ. पुढचा आठवडा, महिना किंवा वर्षभर देखील, हे लोक जेंव्हा शिकार मिळेल तेंव्हाच खाऊ शकायचे. घरी परतायचा मार्ग सापडेलच याची शाश्वती नसायची. त्यामुळे हे लोक जर हाती पायी सुखरूप परत येऊ शकले आणि आपल्याबरोबर मारलेल्या जनावरांची वाळवलेली कातडी विकण्यासाठी घेऊन येऊ शकले तर नशीबवान म्हणायचे.
क्रमशः ....
-- डॉ. संजीव चौबळ
October 18, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti