वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजच्या काळात निदान भारतात तरी कोणतेही क्षेत्र भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटलेले नाही. शिक्षणक्षेत्र पुण्याचे आणि ज्ञानदानाचे कार्य सर्वश्रेष्ठ मानले जाते. शिक्षणाने माणसाचा उद्धार होतो आणि तो नीती-अनितीमधील फरक ओळखू शकतो असा गैरसमज सर्वत्र आढळून येतो, पण आज शिक्षणाच्या नावाखाली केवळ तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे.
आजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे.
धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती .
काश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती .
उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही .
वडिलांबरोबर राजकारणाचे धडे गिरवायला मिळाले तरी आज खासदार म्हणून स्वतंत्रपणे वाटचाल करावी लागत आहे. सर्वात तरुण खासदार म्हणून नावलौकीक मिळाला असला तरी वाढत्या जबाबदारींची जाणींवही होती. हीं जबाबदारी पेलताना पक्षातील कार्वकर्त्यांबरोबरच अन्य पक्षातील सदस्यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळे गल्लीतून सुरू झालेली दिल्लीची वाटचाल उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सफल राहिली आहे.
संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !
अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान !
' कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .'
ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो .
प्र .ल. वाट बघत होते .
' आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .'
माझ्या स्कूटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कूटरला किक मारायला विसरलो .
' दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ?'
मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले .
' एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल ?'
' ते त्यालाच विचारा .'
त्यांनी विषय संपवला .
आम्ही हॉटेलवर आलो .
रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
' जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .'
' अहो पण ...'
मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .
त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . कीआणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती .
पण त्या कथेवर नाटक ?
मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .
प्र ल मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .
आणि प्रकाश बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती .
हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .
शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले .
एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .
त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते . आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .
पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .
दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .
' नाटकाचे नाव काय ठेवणार ? '
प्रकाशजीनी विचारलं .
अरे , चल उचल !
' असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .'
ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
' हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला . '
-- आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस ...अनेक गोष्टी .
'खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..'
त्यांना मी एक प्रत दिली .
ते त्या रात्री मुंबईला गेले .
नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
अचानक संपर्क थांबला .
मीसुद्धा व्यग्र होतो .
आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
' प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू झाला आहे ...'
मला धक्काच बसला .
अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .
नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं .
त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं . त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं .
पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं .
त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .
एखाद्या संहितेचं भागधेय असतं.
प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही .
पण मी नाराज नाही .
कारण माझी संहिता दमदार आहे .
कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे .
दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी देणारं आहे .
आणि ... आणि बरंच काही आहे त्या संहितेत .
मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय .
केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;
"...श्रीनटेश्वर , रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी , धमाल विनोदी नाटक , अरे , चल उचल ! "
आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे.
- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
८९५१९०६७०१
-------
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही
कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ?
हा काय प्रश्न झाला का ?
असं कुणालाही वाटेल .
आणि खरंच आहे ते .
पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो .
सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर बर्फच हातात घेतल्याची भावना होत असताना , कांद्याची गरम भजी आणि वाफाळलेला चहा समोर आल्यावर काय होईल ?
सुटलं ना तोंडाला पाणी ?
थांबा मग जरा ...
श्रीनगरला उतरल्यानंतर शिकाऱ्यातून हाऊसबोटीत गेल्यानंतर , जणू एखाद्या पंचतारांकित राजवाड्यात गेल्यावर होणारं स्वागत अनुभवायला मिळालं तर ...?
आलिशान डायनिंग रूम , तेथील मंद दिवे , जुन्या काळातील डायनिंग टेबल , खुर्च्या , त्यावर नजाकतीने मांडून ठेवलेला भजी आणि चहाचा सरंजाम , अदबीनं सर्व्ह केलेल्या पदार्थांची कलात्मक डिश ...
क्या बात है !
असेच उद् गार तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच ,
" आप हॉल मे भी बैठ सकते है , या फिर ऐतराज ना हो तो दिवाण ए खास , याने बाहर भी बैठ सकते हो . बाहर का नजारा भी शायद आपको पसंद आ जाएगा . "
अशी अदबशीर विनवणी ऐकल्यानंतर थेट बाहेरचा नजारा पाहण्याची इच्छा नाही झाली तरच नवल .
खरं सांगतो यार ...
बाहेरचं दृश्य बघितल्यावर भान हरपून गेलं .
बाहेर छानपैकी सजवलेला कलात्मक सोफा , सहासात जणांना आरामात बसता येईल अशी बैठक व्यवस्था , समोरचं शांत गहिरं पाणी , जवळच्या रस्त्यावरच्या दिव्यांचं पडलेलं प्रतिबिंब , सजवलेल्या हाऊसबोटी वरचं लायटिंग आणि त्यामुळं अंधारलेल्या वातावरणात निर्माण झालेले सप्तरंग ...
आम्ही सगळे मूक झालो होतो .
नंदनवनात आल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती .
आणि आम्ही सगळ्यांनी नव्या काळाला अनुसरून फोटोसेशन करून घेतलं.
हातातला चहा थंड झाल्याची जाणीव म्हाताऱ्या मालकानं करून दिली , तेव्हा आम्ही भानावर आलो .
" मैं फिरसे आप के लिये चाय लाता हूं ."
तो पाठी वळून किचनकडे गेला .
आणि पुन्हा एकदा गरम कांदा भजी आणि चहा असं सेशन झालं .
कधी नव्हे इतका दोन मोठाले कप भरून चहा घेतला .
सौभाग्यवती डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पहात होती , कारण घरी दोन चमचे चहा , इतकंच माझं चहा घेण्याचं प्रमाण होतं , आणि आज मी चहा घेण्याचा कहर केला होता .
जाने भी दो यारो ...
अशी उन्मनी अवस्था घरी कुठे अनुभवायला मिळते ?
मग सगळी हाऊस बोट म्हाताऱ्या मालकाच्या तोंडून ऐकत पाहू लागलो .
एकेक पुराण्या वस्तू पाहताना , हाऊसबोटीची अंतर्गत रचना पाहताना , थकायला झालं .
राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था , कमर्शियल असूनही घरगुती संवादाचा आणि वागण्याचा दिलेला टच ...
सारंच विलोभनीय होतं .
सगळं अनपेक्षित होतं .
आणि तरीही...
काश्मीर मधली परिस्थिती...
भूतकाळ...
वर्तमानकाळ...
तिथल्या निसर्गसौंदर्याला लागणारे गालबोट ...
विसरता येत नव्हते .
--रात्री अचानक केव्हातरी जाग आली .
थंडी आणखी वाढली होती . बंदिस्त बेडरूममध्ये खूपच जाणवत होती .
मी मोबाईल मध्ये पाहिले .
रात्रीचे तीन वाजले होते .
काय वाटलं कुणास ठाऊक .
मी रुमचं दार उघडून बाहेर आलो .
टपून बसल्यासारख्या असणाऱ्या थंडीने झडप घातली .
मी आणखी काकडलो .
हाऊसबोटीचं दार उघडून बाहेर आलो .
पाचच मिनिटात परत रूममध्ये आलो .
सुरक्षित जागी .
पण बाहेर पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर तसंच होतं .
त्या पाच मिनिटात , कडाक्याच्या थंडीत सैनिकांची एक गाडी गस्त घालण्यासाठी फिरत होती .
थंडीची तमा न बाळगता .
जिभेचे लाड न पुरवता .
गरम चहाची अपेक्षाही न ठेवता .
केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी !
काश्मीरचं अस्तित्व टिकवण्यासाठी .
- मी पुन्हा अंतर्मुख झालो .
तिन्हीसांजेला घेतलेल्या चहाची चव आता पूर्ण विसरायला झाली होती .
( क्रमशः)
- श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
----------------------------------------
लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .
‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल.
आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगला सुरूवातीला खूप वाहवा मिळाली. पण, ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यातील वादानंतर आयपीएलचे खरे स्वरूप लोकांसमोर आली. त्या आधी आयपीएलकडे व्यवस्थापन विद्यार्थ्यासाठी आदर्शभूत मॉडेल म्हणून पाहिले जाऊ लागले होते. पण, भ्रष्टाचाराच्या आगीत या व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti