वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
तरन्नुम या सौंदर्यवती बारबालेच्या आलिशान फ्लॅटवर धाड पडली आहे .एक कोटींची रक्कम ,सोनाटा गाडी , कित्येक लाखांचे दागिने हे सगळं अचानक एका रात्रीत तिला गिफ्ट करणारा कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचे फोटो … बातमी लीक झाली आहे आणि ती कव्हर करण्यासाठी इलेट्रॉनिक्स मीडिया टपून बसला आहे .
कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ?
हा काय प्रश्न झाला का ?
असं कुणालाही वाटेल .
आणि खरंच आहे ते .
पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो .
सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर बर्फच हातात घेतल्याची भावना होत असताना , कांद्याची गरम भजी आणि वाफाळलेला चहा समोर आल्यावर काय होईल ?
सुटलं ना तोंडाला पाणी ?
थांबा मग जरा ...
श्रीनगरला उतरल्यानंतर शिकाऱ्यातून हाऊसबोटीत गेल्यानंतर , जणू एखाद्या पंचतारांकित राजवाड्यात गेल्यावर होणारं स्वागत अनुभवायला मिळालं तर ...?
आलिशान डायनिंग रूम , तेथील मंद दिवे , जुन्या काळातील डायनिंग टेबल , खुर्च्या , त्यावर नजाकतीने मांडून ठेवलेला भजी आणि चहाचा सरंजाम , अदबीनं सर्व्ह केलेल्या पदार्थांची कलात्मक डिश ...
क्या बात है !
असेच उद् गार तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच ,
" आप हॉल मे भी बैठ सकते है , या फिर ऐतराज ना हो तो दिवाण ए खास , याने बाहर भी बैठ सकते हो . बाहर का नजारा भी शायद आपको पसंद आ जाएगा . "
अशी अदबशीर विनवणी ऐकल्यानंतर थेट बाहेरचा नजारा पाहण्याची इच्छा नाही झाली तरच नवल .
खरं सांगतो यार ...
बाहेरचं दृश्य बघितल्यावर भान हरपून गेलं .
बाहेर छानपैकी सजवलेला कलात्मक सोफा , सहासात जणांना आरामात बसता येईल अशी बैठक व्यवस्था , समोरचं शांत गहिरं पाणी , जवळच्या रस्त्यावरच्या दिव्यांचं पडलेलं प्रतिबिंब , सजवलेल्या हाऊसबोटी वरचं लायटिंग आणि त्यामुळं अंधारलेल्या वातावरणात निर्माण झालेले सप्तरंग ...
आम्ही सगळे मूक झालो होतो .
नंदनवनात आल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती .
आणि आम्ही सगळ्यांनी नव्या काळाला अनुसरून फोटोसेशन करून घेतलं.
हातातला चहा थंड झाल्याची जाणीव म्हाताऱ्या मालकानं करून दिली , तेव्हा आम्ही भानावर आलो .
" मैं फिरसे आप के लिये चाय लाता हूं ."
तो पाठी वळून किचनकडे गेला .
आणि पुन्हा एकदा गरम कांदा भजी आणि चहा असं सेशन झालं .
कधी नव्हे इतका दोन मोठाले कप भरून चहा घेतला .
सौभाग्यवती डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पहात होती , कारण घरी दोन चमचे चहा , इतकंच माझं चहा घेण्याचं प्रमाण होतं , आणि आज मी चहा घेण्याचा कहर केला होता .
जाने भी दो यारो ...
अशी उन्मनी अवस्था घरी कुठे अनुभवायला मिळते ?
मग सगळी हाऊस बोट म्हाताऱ्या मालकाच्या तोंडून ऐकत पाहू लागलो .
एकेक पुराण्या वस्तू पाहताना , हाऊसबोटीची अंतर्गत रचना पाहताना , थकायला झालं .
राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था , कमर्शियल असूनही घरगुती संवादाचा आणि वागण्याचा दिलेला टच ...
सारंच विलोभनीय होतं .
सगळं अनपेक्षित होतं .
आणि तरीही...
काश्मीर मधली परिस्थिती...
भूतकाळ...
वर्तमानकाळ...
तिथल्या निसर्गसौंदर्याला लागणारे गालबोट ...
विसरता येत नव्हते .
--रात्री अचानक केव्हातरी जाग आली .
थंडी आणखी वाढली होती . बंदिस्त बेडरूममध्ये खूपच जाणवत होती .
मी मोबाईल मध्ये पाहिले .
रात्रीचे तीन वाजले होते .
काय वाटलं कुणास ठाऊक .
मी रुमचं दार उघडून बाहेर आलो .
टपून बसल्यासारख्या असणाऱ्या थंडीने झडप घातली .
मी आणखी काकडलो .
हाऊसबोटीचं दार उघडून बाहेर आलो .
पाचच मिनिटात परत रूममध्ये आलो .
सुरक्षित जागी .
पण बाहेर पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर तसंच होतं .
त्या पाच मिनिटात , कडाक्याच्या थंडीत सैनिकांची एक गाडी गस्त घालण्यासाठी फिरत होती .
थंडीची तमा न बाळगता .
जिभेचे लाड न पुरवता .
गरम चहाची अपेक्षाही न ठेवता .
केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी !
काश्मीरचं अस्तित्व टिकवण्यासाठी .
- मी पुन्हा अंतर्मुख झालो .
तिन्हीसांजेला घेतलेल्या चहाची चव आता पूर्ण विसरायला झाली होती .
( क्रमशः)
- श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
----------------------------------------
लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .
‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल.
एखादी जिराफीण खूप आवडल्यावर तो आपल्या खोकल्याच्या मर्दानी आवाजाने तिच्यावर जबरदस्त भुरळ घालतो. मग जिराफीण त्याच्याभोवती सारखी घोटाळत राहते – हा प्रणयाराधन-सोहळा जगासमोर आला सेरेंगेटीच्या अगदी ताज्या संशोधनांतून ! जिराफ तसे शांत स्वभावाचे.
जगण्यासाठी , अस्तित्वासाठी जिवाच्या आकांताने संघर्ष करणाऱ्या तरुण पिढीची , मन सुन्न करणारी आणि अंतर्मुख व्हायला लावणारी ही कहाणी . या कथानकाचा शेवट मी सांगणार नाही , तो वाचायलाच हवा , तेव्हाच आपल्या आजूबाजूला काय घडतंय आणि आपण किती सावध व्हायला हवंय ते कळेल .
एके काळची काश्मिरची राजधानी .
श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !
सफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात.
प्रत्येकाचे कोणत्या ना कोणत्या बाबीवर श्रद्धास्थान म्हणून अपार प्रेम असते. तसे माझे सुरांवर प्रेम आहे. सुरांचेही माझ्यावर तितकेच प्रेम आहे. आमच्यात सुरांचे नाते निर्माण झाले आहे, असे म्हणता येईल. मी मूर्तीपूजा, कर्मकांड मानत नाही. तरीही गणपती ही देवता मला विशेष आवडते.
प्रत्येक आंदोलन हे राजकीयपक्षाना आपापली किंमत वसूल होई पर्यंत महत्वाचं वाटत असतं. प्रत्येकाची बोली असते.टार्गेट असतं. ते पूर्ण होईपर्यंत आंदोलन ताणलं जातं. गुहागर, लोटेमाळ, जयगड,रत्नागिरी, जैतापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात येणारा रिफायनरी प्रकल्प…कुठेही जा, प्रत्येक जण आंदोलनाच्या माध्यमातूनओरबाडून खात असतो.
तत्कालीन राज्यकर्ते, त्यांचे राजकारण, त्यांची स्वार्थी आणि संकुचित दृष्टी, त्यांच्या विकल्या गेलेल्या निष्ठा, जमिनीवर आणि स्त्रियांवर केलेले अत्याचार, नृशंस हत्याकांडे, देशभक्तांच्या हत्या, सांस्कृतिक वैभवावरचे भीषण आघात, प्राचीन मंदिरांचा विध्वंस, हिंदूंवर विशेषत: पंडितांवर केलेले क्रूर अत्याचार, बलात्कार अशा कित्येक कहाण्या वाचायला मिळाल्या होत्या.
Copyright © 2025 | Marathisrushti