वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
को जागरति?---- a scientific approach about कोजागिरी पौर्णिमा
आपल्याकडे साजरा होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या स्वास्थ्याशी निगडीत असतात. गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने खाणे असो किंवा दिवाळीचे अभ्यंग स्नान असो,प्रत्येकात स्वास्थ्य जपणे उद्देश सापडतोच!
शरद ऋतूत येणारी “शारदीय पौर्णिमा” अथवा “कोजागिरी पौर्णिमा” साजरा करण्यामागे देखील स्वास्थ्याशी निगडीत हेतू सापडतो. कोजागिरी म्हंटले कि डोळ्यसमोर येते ते “मसाला दुध”! चंद्राच्या चांदण्यात वेलची पूड,बदाम वगैरे टाकून थोडेसे आटवलेले दुध गार करायचे आणि रात्री सेवन करायचे!!!
दुध गार करून पिणे एव्हढाच हेतू अपेक्षित नाहीये तर चंद्राच्या प्रकाशात ते गार करणे अपेक्षित आहे.
शरद ऋतू हा पित्ताच्या प्रकोपाचा काळ असतो. पित्ताची उष्णता वाढल्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. स्वस्थ राहण्यासाठी ऋतू प्रमाणे आचरण करणे गरजेचे असते. रात्र आणि दुध दोन्ही गोष्टी स्वभावत: शीत म्हणजेच थंड गुणधर्माचे असतात. पौर्णिमेचा चंद्र आणि त्याचे चांदणे तर शीतलता देण्यास अधिक उपयुक्त असतात. स्वभावत: शीत गुणाचे दुध जर अशा शीतल चंद्रप्रकाशात ठेवले तर या “संस्कारांमुळे” त्याची गुणवृद्धीच होते आणि असे दुध शरीरास शीतलता देऊन पित्ताची उष्णता कमी करण्यास मदत करते.
या रात्रीस पूर्ण चंद्राचे चांदणे अनुभवण्यासाठी जागणे अनिवार्य असते.असे म्हणतात कि देवी रात्री संचार करत विचारत असते “ को जागरति? कोण जागे आहे??” जो जागा असेल त्याला समृद्धी देणार! या अख्यायीकेमागे देखील लोकांनी जागे राहून चंद्र चांदण्यांनी सिद्ध दुध घ्यावे असाच प्रांजळ हेतू सापडतो. देवादिकांच्या आशीर्वादाचे आमिष अथवा कोपाचे भय हे चातुर्मासाप्रमाणे इथेही लागू पडते!
आता हा हेतू च माहिती नसल्यामुळे त्याचे
“ we must meet and celebrate!!!!” होते आणि त्यात भेळ, पावभाजी अथवा इतर yummy पदार्थांसोबत “मसाला दुध” अशी theme असते. याने होते एकच की “वैद्याकडे रुग्ण वाढतात”!
जिथे चंद्राचा थंडावा अपेक्षित आहे तिथे रक्त बिघडवणारे भेळ ,पावभाजी इत्यादी पदार्थ मनसोक्त खायचे आणि मग रिवाज म्हणून त्यावर मसाला दुध प्यायचे हे सगळेच विपरीत आहे!
म्हणूनच खऱ्या अर्थाने “शारदीय कोजागिरी पौर्णिमा” साजरी करायची असेल तर काय केले पाहिजे हे वेगळे सांगायला नको, नाही का???
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
October 16, 2016
खेळण्याला असलेल्या विद्युतघटातून (बॅटरी) जोपर्यंत विजेचा पुरवठा सुरू असतो, तोपर्यंत हा विदूषक सतत हालचाल करीत राहतो.
December 22, 2021
एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांचीज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपतपडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणाराआपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे, या पेक्षा आपल्या देशाचे दुसरे कोणते दुर्दैव असावे ? पण आपली एवढी दुर्दशा का व्हावी ? काआपल्याला लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी ? याचा अजूनही कोणी फारसा गांर्भियाने विचारकेलेला नाही किंवा करत नाही. याचे फार आश्चर्य वाटते. जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आजइतके दुबळे व षंढ झालो आहोत की, आपण कोण होतो ? कोण आहोत ? याचे जरा सुध्दा भानराहिलेले नाही. हा आपल्या भारत मातेचा अपमान आहे. तिच्या गौरवपुर्ण वारशाचा खुन आहे. हेआपल्याला लक्षात का बरे येत नाही. आपला उज्ज्वल इतिहास वाचून का बरे आपला स्वाभिमानजागृत होत नाही.
युवास्सत: साधु युवाध्यापक: ।
आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ: ॥
उपनिषदात म्हटले आहे की, युवक हा साधु म्हणजे सरळ मनाचा, नविन विचार श्रेणीचा,शिक्षक, निष्कपटी, खिलाडू-वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढनिश्चयी, अभ्यासू आणि बलवान असावाकिंवा असतो. परंतु खेदाने म्हणावे लागते की, आज वरीलपैकी एक ही गुण स्पष्टपणे युवकातआढळून येत नाही. यामुळे आज युवावर्ग दिशाहिन झाला आहे. समाजात युवकांचे स्थान घसरतआहे. आज युवक म्हणजे व्यसनांचा व विकृत्तीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळखबनली आहे. आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दुषित व संशयीनजरेने पाहात आहे.
युवा वर्गाची होणारी ही दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी, युवकांत वरील श्लोकातीलसदगुणांची पुर्नस्थापना करण्यासाठी आज आध्यात्माची अत्यंत आवश्यकता आहे. कारण युवा वर्गआपली संस्कृती व संस्कार यापासून भरकटला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे.त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. हे सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरित परीणामआहेत. यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आध्यात्माशिवाय पर्याय नाही. फक्त आध्यात्मातूनचयुवकांत मनाची सरलता निर्माण करून, विकार व वासनेचा सर्वनाश करता येईल. मग आपोआपत्यांच्यात आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे गुण प्रकट होतील. यातून मग युवकांना सक्षमबनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ निश्चय महत्वाचा आहे, जो फक्तआध्यात्मातूनच युवकांत निर्माण होऊ शकतो. म्हणून युवकांनी आध्यात्मात समरस व्हावे. कारणशारीरीक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्युनगंड, विकृत्ती यांनादूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मालाच जवळ करावे लागेल.
बऱ्याच लोकांना वाटतं की, जवळ पैसा असला म्हणजे सर्व काही मिळते, मात्र जगात सर्वचगोष्टी पैशाने मिळत नाहीत. पैसा हा कधिही सुख, समाधान देऊ शकत नाही. तर त्याने फक्त लोभवाढत जातो. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असा नाही, पैसा ही सुध्दा पाहिजे आहे, पण तो फक्तआवश्यक गरजा भागविण्यापुरताच. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ हा माणसातीलमाणुसकी व घराचे घरपण नष्ट करतो. याने लाखों कूटुंबांना उध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभफक्त आध्यात्मातूनच नष्ट होतो. केवळ आध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. आध्यात्महेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. ज्याने माणूस संकट दूर करायला, त्यालाध्यैर्याने तोंड द्यायला शिकतो. आध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढिस लागते.आध्यात्मानेच मनुष्य खंबीर बनून अन्यायाविरोधात लढा द्यायला उभा राहतो. थोडक्यात सांगायचेम्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खुप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्तआध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही पैसा खर्च केला तरी काही उपयोगनाही. पण आध्यात्म आपल्याला या सर्व गोष्टी मुक्तहस्ताने व विनामुल्यपणे देते.
म्हणून युवकांनी कोणत्याही एका आध्यात्मिक मार्गाचा अंगिकार करावा. ज्यातून स्वत:चा वपर्यायाने देशाचा सर्वतोपरी विकास व प्रगती साधेल. आध्यात्माचा सहवासच आपल्याला एकआदर्श नागरीक बनवेल. एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. आध्यात्मच आपल्या विचारात प्रगल्भताआणेल. आपल्या मनगटात हत्तीचे बळ, सिंहाची शुरता आणि गरूडासारखी उंच भरारी घेण्याचीक्षमता केवळ आध्यात्मानेच शक्य आहे.
परंतु आध्यात्मिक मार्गाची निवड करताना युवकांनी योग्य ती दक्षता घेणे महत्वाचे आहे.जसा योग्य शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवतो, तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शकच आपल्याआयुष्याला योग्य वळण लाऊ शकतो. म्हणून योग्य आध्यात्मिक मार्गाची निवड करावी जेणेकरूननंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आज या मतलबी जगात भामट्या, भोंदु बुवा-बाबांचीआणि फसव्या किंवा स्वार्थी लोकांची, आणि त्यांनी चालवलेल्या आध्यात्मिक लुटींच्या दुकानांचीकाही कमी नाही. सगळी कडे त्यांचाच सुळसुळाट झाला आहे. तेव्हा अशा तथाकथित बुवा-बाबा,स्वामी, महाराजांपासून सावधान !
August 1, 2018
सू सेंटरला आल्यावर काही दिवसांतच आम्हाला एक अपार्टमेंट भाड्याने रहायला मिळालं, ते गावातल्या रहिवासी (residential) भागात. मिडवेस्टमधल्या एका छोट्याशा गावात, १०० टक्के जुन्या वळणाच्या अमेरिकन पद्धतीशी आणि जाज्वल्य अशा ख्रिश्चन विचारसरणीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, आमचे दिवस चालले होते. आमची कंपनी गायींमधे कृत्रिम गर्भारोपण आणि तत्सम विषयांमधे काम करणारी असल्यामुळे, ऑफिस, लॅब वगैरे सर्व एका मोठया फार्मवरच होते. उंच प्रशस्त इमारती, चकचकीत ऑफिस वगैरे काही प्रकार नव्हता. किंबहुना अख्या सू सॆंटरमधे दोन मजली घरंच मुळी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी. बिल्डींग असा प्रकारच नाही, सारी बंगलेवजा घरं. किंबहुना एखादी ५-६ मजली इमारत पाहायची तर आम्हाला चक्क तासभर प्रवास करत, सू सिटी किंवा सू फॉल्ससारख्या मोठ्या गावी जावं लागायचं. तिकडे देखील अशा इमारती मोजक्याच. त्यामुळे मुंबईमधे ३-४ वर्ष काढलेल्या आणि नरीमन पॉइंट वगैरे ठिकाणी फिरलेल्या आमच्या ६ वर्षाच्या सिद्धार्थला, आपण अमेरिकेत आहोत हे खरंच वाटत नसे. त्याच्या दृष्टीने अमेरिका म्हणजे मुंबईपेक्षा मागासलेली आणि फक्त शेता-कुरणांनी भरलेली अशीच होती. पुढे दोन वर्षांनी जेव्हा आम्ही कनेक्टिकटला रहायला गेलो आणि न्यूयॉर्क शहराला भेट दिली तेव्हा कुठे आपण अमेरिकेत आहोत यावर त्याचा विश्वास बसला.
आमच्या कंपनीचं ऑफिस, लॅब वगैरे बैठया इमारतीमधेच होतं. आजूबाजूला शेतकी अवजारं दुरुस्त करण्याच्या शेडस, धान्य साठवायच्या मोठया कणग्या, गायींची ने आण करण्यासाठी आणि त्यांना ट्रक्समधून उतरवून घेण्यासाठी बांधलेले सिमेंटचे उतरते धक्के आणि जवळपास ३००० गायींना सामावून घेणारा मोठ्ठा फार्म. आजूबाजूला चारी दिशांना पसरलेली मक्याची आणि सोयाबीनची शेतं.
गावापासून कंपनीचा फार्म ७ मैलांवर होता. गावातून येणार्या डांबरी रस्त्यावर ४ मैल गेलं की हा डांबरी रस्ता सोडायचा आणि कच्च्या रस्त्याला लागायचं. पहिल्यांदा जेंव्हा मी हा कच्चा रस्ता पाहिला, तेंव्हा माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अमेरिकेत आणि कच्चा रस्ता? रस्ता चक्क मातीचा आणि त्यावर खडी टाकलेली. मग पुढे लक्षात आलं की इथे आतले सगळेच रस्ते असे कच्चे आहेत. मिडवेस्टच्या बर्याच मोठ्या भागात शेतजमीन ही मैला मैलाच्या चौरस तुकड्यांमधे विभागलेली असते. आकाशातून पाहिलं तर जणू एखादा प्रचंड मोठा बुद्धीबळाचा पट उघडून ठेवलेला असावा तसं वाटतं. मैला मैलाच्या अंतरावर, सरळसोट जाणारे उभे, आडवे कच्चे रस्ते, हा शेतजमीनीचा अजस्त्र बुद्धीबळाचा पट तयार करतात. मधे मधे एखादा डांबरी रस्ता असतो. पण बाकी सर्व रस्ते माती आणि खडीचे.
या रस्त्यांवरून गाडया जातात त्या धुरळा उडवत. त्यामुळे गाडया स्वच्छ ठेवायच्या म्हणजे पंचाईत. किंबहुना कुणी गाडया स्वच्छ ठेवण्याच्या भानगडीतच पडत नाही. तुमची गाडी धुळीनं, चिखलानं भरलेली असली, की न सांगताच तुम्ही कुठे काम करता हे समजतं. सगळ्यांच्याच गाडया तशा, त्यामुळे कुणालाच पर्वा नाही. मग कधी कधी कुठे लग्नाला वगैरे जायचं असलं किंवा सू सिटी, सू फॉल्स सारख्या आसपासच्या मोठया गावांमधे जायचं असलं की तेव्हढयापुरत्या त्या गाडया धुवायच्या.
बहुतेक सगळ्या गाडया म्हणजे pickup trucks किंवा SUVs. ह्या रस्त्यांवर ना रोड साईन्स ना रोड डिव्हायडर्स. त्यामुळे येणार्या जाणार्या गाडया, धुरळ्यातून इतर गाडया दिसतील, इतपत अंतर ठेवून जाणार्या. अर्थात या रस्त्यांवर तशी रहदारी देखील तुरळक. पण येणार्या जाणार्या गाड्यांनी रस्त्यावरचे छोटे छोटे दगड उडणं आणि त्यामुळे गाड्यांच्या windshields ना तडे जाणं, हे देखील नित्याचंच. गावात रहाणार्या बहुतेकांचा शेतीशी काही ना काही कारणाने संबंध हा असायचाच. काही थोडी फार मंडळी जी शाळा कॉलेजांमधे शिक्षक किंवा प्रोफेसर म्हणून काम करायची किंवा बॅंक, दुकानं, रेस्टॉरंटस वगैरे ठिकाणी काम करायची त्यांच्या गाड्या तेवढ्या स्वच्छ आणि नजरेत भरण्यासारख्या असायच्या पण एकदा का शेतीवाडी कडे जाणं झालं आणि गाडी कच्च्या रस्त्यावर उतरली, की धुळवड खेळून आल्यासारखी झालीच म्हणून समजावं.
July 10, 2015
मोरयाला दूर्वा किती? २१. मोरया ला मोदक किती? २१. मोरया समोर दक्षिणा किती? २१. हे तर सगळ्यांना नक्की माहिती आहे पण २१ च का?
September 10, 2019
झुबकेदार मिशांसाठी व तीन षटकांमध्ये तिभागलेल्या त्रिक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मर्व ह्युजेसचा जन्म आणि ब्रिस्बेनच्या महापौराने केलेले खेळपट्टीचे राजकारण
November 19, 2010
सौदी अरेबियातून पकडून आणण्यात आलेल्या झबीउद्दिन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्या कारवायांबाबत प्रसारमाध्यमं भरभरून माहिती देत आहेत. वृत्तवाहिन्यांवर चर्चेची गुर्हाळं चालू आहेत. हा सगळा तपशील तपासयंत्रणाच पुरवत आहेत, हे उघड आहे. असा हा तपशील प्रसिद्ध झाल्यानं, आपण किती मोठं घबाड पकडून आणलं आहे, असा दावा भारताच्या गुप्तहेर संघटना करतात व तसं ठसविण्यासाठीही असा तपशील प्रसारमाध्यमांना पुरवला जात आहे.
June 13, 2016
जर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर कमी अधिक प्रमाणात रागही येतो आणि माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण हा राग जर तीव्र असेल तर काही विपरीतही घडू शकते, भांडणे मारामाऱ्या होऊ शकतात एकूणच काय तर वातावरण बिघडतंच, पण शरीरावरही वाईट परिणाम होतो.
March 25, 2019
जगाचा कुतूहलाचा विषय असणारा “डोळे गरगरवून टाकणारा” आयफेल टॉवर पॅरीसवासियांना नको होता, युनिव्हर्सल एक्स्पोझिशन या कलाकृती प्रदर्शनाचा भाग होवू पहाणारा हा टॉवर सुरवातीला शहरात व प्रदर्शनात नसावाच असे अनेकांचे मत होते. ३२४ मीटर उंचीचा व १०१०० टनाचा “गुस्ताव आयफेल” नावाच्या माणसावरून नाव पडलेले हा टॉवर शहराला विद्रूप करणार असे अनेक फ्रेंच लोकांना वाटायचे.
May 16, 2022
व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्याचा साधन म्हणून उपयोग करून मनोरंजनाबरोबरच संस्कार करण्याचे कार्य ठाणे शहरातील मंडळी करीत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व भविष्यातही बालरंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही ही खात्री आहे!
October 3, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti