(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दिल्ली नावामागचा इतिहास

    दिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय.

      July 10, 2024


  • आयपॅड

    आयपॅड हा प्रकार अमेरिकेत अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आयपॅड याचा अर्थ टॅबलेट कॉम्प्युटर असा आहे. ‘टाइम’ मासिकाने आयपॅडची निवड २०१० या वर्षातील पन्नास सर्वोत्तम शोधात केली आहे.

      September 21, 2023


  • सव्वा शहाणा फडणवीस

    देविदास देशपांडे यांचा हा लेख शेअर करत आहे. हा लेख Whatsapp वरुन आला आहे.

    “लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!”

    बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा शरद पवार यांनी उच्चारलेले हे एक मार्मिक वाक्य. ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यावर पवारांनी टीका केली असता “पवारांनी हा अहवाल वाचला आहे की नाही, हीच शंका आहे,” असे गोडबोले म्हणाले होते. तेव्हा पवार हे बोलले होते.

    वाचन, लेखन, शिक्षण किंवा एकूणच विचारांच्या क्षेत्रावर आतापर्यंत ब्राह्मणांची मक्तेदारी होती. आता ती राहिलेली नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नका, असे पवारांना म्हणायचे होते. कारण विजेचा प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा ठपका गोडबोले आयोगाने ठेवला होता. आता गोडबोले म्हणजे ब्राह्मण आणि त्यांनी आम्हाला उपदेश करू नये, हा पवारांच्या वक्तव्याचा आशय होता.

    अर्थात पवार हे पुरोगामी नेते असल्यामुळे त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हे सूचकपणे सांगितले होते. मात्र जायचा तो संदेश गेला होता. “वीज क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा, जी राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, ती पवार यांनी इतक्या खालच्या पातळीवर नेली आहे की यापुढे मी त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घेणार नाही व भाष्यही करणार नाही. माझ्यापुरता हा विषय संपलेला आहे. यापुढे सुजाण समाजानेच समितीच्या अहवालाबाबत मत बनवावे,” असे उद्वेगाने गोडबोले म्हणाले होते.

    शिक्षण ही जशी काही काळापूर्वी ब्राह्मणांची मक्तेदारी होती, तशी राजकारण ही साखर कारखानदार, सहकार दरोडेखोर (सम्राट!) आणि पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्यांची मक्तेदारी झाली होती. ती तशी आता राहिलेली नाही, हे पवारांना सांगणारा नेता महाराष्ट्रातच निघाला आहे.

    बापट, देशपांडे, जोशी इ. ब्राह्मणांना आम्ही पदरी बांधू, त्यांच्यामार्फतच व्यवसाय-उद्योग चालवू पण त्यांनी आमच्या राजकारणात येऊ नये, हा पवारांचा अलिखित दंडक. त्यांच्या पुरोगामी वगैरे वगैरे गणंगांनी तो प्राणपणाने जपला होता. तो मोडला नागपूरच्या देवेंद्राने. पेशवे, फडणवीस म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांची हेटाळणी केली त्यांनीच पवारांच्या गढीला सुरुंग लावला आहे. पवारांच्याच काय, मुंबई (शिवसेना), पुणे, पिंपरी-चिंचवड (एनसीपी), सोलापूर (काँग्रेस) अशा सगळ्याच गडांना या फडणवीसाने धक्के दिले आहेत.

    ऑक्टोबर २०१४ पासून म्हणजे फडणवीस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून पवार यांनी येता-जाता त्यांची जात काढण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या वरदहस्ताने मोठे झालेल्या झिलकऱ्यांची त्याला साथ होतीच. तसा तो त्यांनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांची जात काढूनही केला होता.

    मात्र फडणवीस यांच्या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा कोण मोठा दिड शहाणा लागून गेला, अशाच आविर्भावात प्रस्थापित राजकारणी वावरत होते. म्हणून त्यांच्या कारभाराची फडणवीशी अशा शिवीवाचक शब्दांनी संभावना करण्यात आली. ज्यांच्या ऐतिहासिक उपमा संपल्या त्यांनी डोरेमॉन-शिनचान वगैरेंना हाताशी धरले. आज त्यांचेच कार्टून झाले आहे.

    म्हणूनच छत्रपती पेशव्यांना नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना खासदारकी देत आहेत, असा तद्दन जातवाचक उल्लेख त्यांना करावा लागला. “छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते. तर पेशवे फडणवीसांची नेमणूक करत होते. पण आता मात्र फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केली,” हे वक्तव्य काही प्रामाणिक पणातून आलेले नाही. त्याच प्रकारे मराठा मोर्चाच्या वेळेस पवारांची भूमिका त्यांच्या स्तुतीपाठकांना वाटते तेवढी पुरोगामी खचितच नव्हती. अन् तरीही फडणवीस यांनी या सर्वावर मात करून एकहाती यश मिळवले आहे.

    ‘तावद् भयेषु भेतव्यं यावत् भयम् अनागतम्’. म्हणजे भीती वाटते ती गोष्ट येत नाही, तोपर्यंतच तिचे भय असते. ब्राह्मणाचे राज्य आले, तर पेशवाई परत येणार, ही भीती हेच आजपर्यंत काँग्रेस-एनसीपीचे कुरण ठरले होते. फडणवीस आल्यावर तसे काही नाही, हे जाणवल्यानंतर ती भीती सरली आणि त्यासरशी त्या भीतीवर जगणाऱ्यांची दुकानेही उठली. उलट गेल्या काही दिवसांत फडणवीसांचा विश्वास निर्देशांक हा अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा अधिकच झालेला आहे. म्हणून तर “लिहून देतो” म्हणणाऱ्या शदर पवारांवर लोक भरवसा ठेवत नाहीत. “मी शब्द देतो,” म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठेवतात. विश्वास एकदा गेला की गेला..

    पालिकेच्या या निवडणुकांसाठी भाजपचे केंद्रीय पातळीवरील कोणतेही नेते वा चेहरे फिरकले नाहीत. अगदी उद्धव ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतरही. प्रचाराची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली. पायाला भिंगरी लावल्यासारखे फडणवीस हेच राज्यात फिरले. शिवसेनेचे नेते भाजपवर तुटून पडत असले, तरी फडणवीस यांच्यावर त्यांनी हात राखूनच राळ उडवली, हे मान्य करावे लागेल. मात्र काँग्रेस-एनसीपीचा सगळा भर फडणवीस यांच्यावरच होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर फडणवीस यांनाच लक्ष्य केले होते.

    फडणवीसांनी अगदी हळूवारपणे आपले काम चालूच ठेवले. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना व्यवस्थित कामाला लावले. इतकेच नाही, तर निवडणुकीतल्या निकालानुसार मंत्र्यांवर कारवाई करणार, असे सांगून चुकार मंत्र्यांना इशाराही दिला. दिल्लीश्वरांचे अभय असल्यामुळे आपले कर्तृत्व दाखवायची पूर्ण संधी त्यांना मिळाली आणि ती त्यांनी 100 टक्के साधली.

    स्वच्छ चारित्र्य हे फडणवीस यांचे मुख्य चलनी नाणे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही तीच जमेची बाजू. पण चव्हाण यांनी स्वच्छ चारित्र्य हे निष्क्रियतेचे समानार्थी करून ठेवले होते. ती चूक फडणवीसांनी टाळली. स्वच्छ प्रतिमा हे फडणवीस यांचे बलस्थान. या दोन वर्षांच्या काळात एकही गैरव्यवहार झालेला नसल्याचा आनंद त्यांनी नुकताच व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांनी अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून ते परतवून लावले. तरीही एकनाथ खडसे यांना ते वाचवू शकले नाहीत. या सर्व प्रवासात झाले एवढेच, की राज्यात सरकारचा एकमेव चेहरा बनण्यात फडणवीस यांना यश आले आहे. महापौरपद वगळता अन्य कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेल्या एखाद्या राजकारण्यासाठी हे मोठेच यश आहे. प्रशासकीय कौशल्याबरोबरच आपल्या राजकीय बुद्धिकौशल्याने त्यांनी अनेक पेचप्रसंगावर मात केली आहे.

    नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून उत्तर पेशवाईच्या काळात अर्धा शहाणा मानला जाई. काँग्रेस-एनसीपीने 15 वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात उत्तर पेशावईचीच अवस्था निर्माण केली होती. त्याला उत्तर म्हणून लढाया (निवडणुका) खेळून तो जिंकणारा फडणवीस प्रतिस्पर्ध्यांना मिळाला आहे. हा शहाणा पूर्ण शहाणाच नाही, तर सव्वा शहाणा आहे.

    - देविदास देशपांडे

      March 1, 2017


  • जानेवारी १५ : सचिन आज खेळणार ४४४ वा एदिसा

    सचिन करणार एदिसांमध्ये सर्वाधिक डाव खेळण्याचा विक्रम

      January 15, 2011


  • भ्रष्टाचाराला ‘टाटा’ नाही !

    सध्याच्या उदारिकरणाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्याला विमान कंपनी उभी करण्यासाठी ठरावीक मंत्र्याला लाच देण्याचा सल्ला मिळाल्याचे सांगितले. उद्योगपती राहुल बजाज यांनी तर अशी लाच सर्रास दिली जाते असे सांगून आणखी एक गौप्यस्फोट केला. एकंदरित, भ्रष्टाचाराला ‘टाटा’ करण्याची कोणाचीच मानसिकता दिसत नाही.

      November 24, 2010


  • ओबामांची हातचलाखी

    ओबामांच्या भारत दौर्‍याने दोन देशांमधील संबंध नव्या वळणावर आणून ठेवले असून आपल्या पुढील पिढ्या समृद्धीचे गाणे गातील असे वातावरण गेले काही दिवस पहायला मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र ओबामांनी मोठ्या प्रमाणात हातचलाखी केली असून भारताच्या पदरात जे काही पडले ते तातडीने गरजेचे नव्हते असे म्हटले जात आहे. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी केलेले विश्लेषण.

      November 13, 2010


  • राजकारण्यांचे नाकाने कांदे सोलणे

    कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…!!

      December 27, 2018


  • रजोनिवृत्ती

    स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक विकासाचे जे टप्पे आहेत त्यात रजोनिवृत्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही घडत असतात. चाळिशी-पन्नाशीच्या दरम्यानचा काळ रजोनिवृत्तीचा कालावधी असतो. नेमके याच दरम्यान तिच्या आयुष्यात काही मनाविरुद्ध व काही दुर्दैवी घटनाही घडतात. मुले आपापला संसार थाटून वेगळे नांदायला जातात. कधी आयुष्याचा जोडीदार अचानक जग सोडून जातो. कधी आयुष्यभर आधार देणाऱ्या माता-पित्याचे निधन होते. अनपेक्षित आजार विशेषत: मधुमेह व रक्तदाबासारखे जीवनशैलीविषयक आजार तिला याच काळात त्रास देत असतात.

    नोकरदार स्त्रीची सेवानिवृत्तीही याच दरम्यान होते. यामुळे जीवनाची जी एक व्यस्त व मस्त अशी घडी असते ती विस्कळीत व्हायचाही हाच काळ असतो. यामुळे स्त्रीला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठा मोकळा वेळ निर्माण झाल्यासारखे वाटते. आपला आयुष्यावरचा ताबा हातातून गेला आहे म्हणून येणारी विमनस्कता आणि स्वत:बद्दलचा कमी होणारा विश्वास व महत्त्व यामुळे मानसिक खच्चीकरणही या काळात होते. विशेषत: ज्या भगिनींनी नुसती गृहिणी म्हणून भूमिका बजावलेली असते, त्यांना रजोनिवृत्तीमुळे येणाऱ्या बदलांना सक्षमपणे सामोरे जाता येत नाही. त्याचा मानसिक दुष्परिणामही त्यांना सहन करावा लागतो. याउलट ज्या स्त्रियांनी उत्तमपणे नोकरी केली आहे, करिअरमध्ये समाधान मिळविले आहे, हाताशी पसा आहे तो स्वत:साठी कुणावर अवलंबून न राहता वापरता येतो, त्या स्त्रिया रजोनिवृत्तीतील बदलांना शांतपणे सामोरे जातात.

    बऱ्याच गृहिणींचा वाढता चिडचिडेपणा घरातील नातेवाईक विशेषत: नवरा समजून घेईलच असे नाही. त्यामुळे आता तुझे वय झाले आहे म्हणून उगाचच राग राग करतेस. ‘सायकिक’ झाली आहेस, उगाचच चिडचिडी झाली आहेस अशा टोमण्यांनी तिला आणखी सतावले जाते. रजोनिवृत्तीचा काळ स्त्रियांमध्ये साधारणपणे वयाच्या ४५ नंतर चालू होतो. काही स्त्रियांच्या बाबतीत तो खूप लवकर व खूप नंतरही येतो. रजोनिवृत्ती ही खरे तर नसíगक प्रक्रिया आहे. पण बऱ्याच वेळा गर्भाशय व अंडाशय काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे जसे की, कर्करोग झाला तर शस्त्रक्रियेमुळे काढला गेल्यास रजोनिवृत्ती कृत्रिमरीत्या येते. रजोनिवृत्तीचा त्रास मासिक पाळी बंद झाल्यावर दोन ते चार वर्षांत आपसूक संपतो.

    पाळी गेल्यानंतरच्या काळात शरीरातील इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स कमी होऊ लागतात. स्त्रीची मासिक पाळी थांबते आणि नसíगकरीत्या तिला आता गर्भधारणा होत नाही.

    रजोनिवृत्तीच्या काळात जवळजवळ ८५ टक्के स्त्रियांना कमी-अधिक प्रमाणात शरीरातील कुठल्या ना कुठल्या भागात अचानक गरम झाल्यासारखे वा वाफा आल्यासारखे वाटते. विशेषत: चेहऱ्यावर मानेच्या भोवती, गालावर, कानशिलाजवळ हे जास्त प्रमाणात जाणवते. कधी कधी ही गरमागरम संवेदना एका ठिकाणी सुरू होऊन अचानक पूर्ण शरीरात पसरत जाते. काही स्त्रियांच्या बाबतीत ही संवदेना हलकीफुलकी व कालांतराने कमी कमी होत जाते. तर काहींच्या बाबतीत पूर्ण शरीरात एखादी ज्वाला भडकते आहे की काय, अशा प्रकारचा अनुभवही असू शकतो आणि तो दीर्घ काळही चालतो.

    याच काळात किंवा पाळी जायच्या काही महिने आधीपासूनच रात्री अचानक खूप घाम फुटल्यामुळे काही स्त्रिया घाबऱ्याघुबऱ्या होतात. टॉवेल पूर्ण भिजला आहे, गाऊन, कपडे पूर्ण भिजले आहेत अशा प्रकारचा घाम फुटण्याचा अनुभव भयंकर असतो. त्यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. पूर्ण रात्रभर त्या अस्वस्थ राहतात. त्यांच्यात दिवसा चिडचिडेपणा आणि तणाव वाढतो. रात्रीचे हे घाम फुटणे इतर वैद्यकीय कारणांमुळेही होऊ शकते. म्हणून यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

    काही स्त्रियांना पाळी जाण्याच्या दरम्यान विलक्षण अशक्तपणा जाणवतो. शरीरातील ऊर्जा कमी झाली आहे व खूप थकवा जाणवतो आहे, अशा तक्रारी त्या करतात. या थकव्याबरोबर त्यांना खूप चिडचिडल्यासारखे वाटते व इतर गोष्टींबद्दल काही आकर्षण वाटत नाही. बऱ्याच वेळा हा थकवा प्रचंड तीव्रतेने येतो आणि अचानक येतो. स्त्रिया आपले नियमित साधे कामसुद्धा करू शकत नाहीत. त्यांना पूर्ण गळून गेल्यासारखे वाटते. हे खरे तर रजोनिवृत्तीमधले खूप महत्त्वाचे लक्षण आहे बरं. पण बऱ्याच वेळा घरच्यांच्या ते लक्षात येत नाही. या काळात बऱ्याच स्त्रियांच्या मुलाचे लग्न झालेले असते. सूनबाई घरी आलेली असते. ती आजकालच्या काळात नोकरीला जात असते. अशा वेळी घरात काम करायचे नाही म्हणून सासूबाई सुनेला छळण्यासाठी थकल्याचे हे सोंग करताहेत असे घरातल्यांना वाटते. यामुळे घरच्यांची आणखी चिडचिड होते. कमी होणाऱ्या इस्ट्रोजनसारख्या हार्मोनबरोबर स्त्रीच्या शरीरातील शक्ती ही कमी होते. अशा तऱ्हेचा दीर्घकालीन थकवा स्त्रीची दमछाक करतोच पण तिचे नातेसंबंध व विधायकतेवरही दुष्परिणाम घडवितो. बराच काळ तिच्यात क्षमता असूनही ती सुप्तावस्थेत जाते आणि काहीच करत नाही.

    भावनिक अस्थर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत नाही. एका क्षणी ती पूर्णपणे स्थिरचित्त असते, प्रसन्न असते तर पुढच्या काही क्षणात ती अचानक चिडते काय, रडते काय, रागावते काय? हे सगळे भावनिक बदल इतरांनाही कळत नाहीत. तिच्या अशा बदलत्या मूडमुळे नातेवाईक तिला टाळायला लागतात. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेनासे होतात. कारण ती कसा काय प्रतिसाद देईल याची त्यांना खात्री नसते. मग तिला घरातले सगळे बेइमान वाटतात. आपली प्रतारणा करत आहेत असे वाटते.

    या काळात स्त्रियांना रात्री नीट झोप येत नाही. इतर अनेक लक्षणांमुळे तिची झोप बिघडते. पण रजोनिवृत्तीच्या प्रत्यक्ष परिणामामुळेसुद्धा झोप येत नाही. ती सतत उसासे देत कुशीवर वळत असते. स्त्रीला रात्र म्हणजे एक भयंकर शिक्षाच वाटते. कित्येक रात्री शांत झोप लागली नाही म्हणून पूर्ण दिवसभर अस्वस्थ वाटते. रक्तदाब वाढला आहे, मधुमेहावरचा ताबा राहत नाही. झोप न आल्यामुळे दिवसा कामात किंवा कशातही मन रमत नाही. मन एकाग्र होत नाही. नोकरीवर असल्यास नेहमीच्या कामात चुका होतात. घरातसुद्धा साध्या साध्या गोष्टी जमत नाहीत. स्वयंपाक हमखास बिघडतो. खरे तर काही स्त्रियांना रजोनिवृत्ती सुरू व्हायच्या एक-दोन वर्षे आधीच हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे झोप न येण्याची तक्रार सुरू होते. याच काळात बऱ्याच स्त्रियांना झोपेच्या गोळ्या घ्यायचे व्यसनही जडते. म्हणून झोपेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

    बऱ्याच स्त्रियांचे रजोनिवृत्तीच्या काळात वजन प्रचंड प्रमाणात वाढू लागते. हे पुन्हा हार्मोन्स कमी झाल्यामुळेच होते. हे वजन वाढल्याने स्त्रीला स्वत:विषयीच राग येऊ लागतो. आपण बेढब दिसायला लागलो आहोत, आपले म्हातारपण जवळ आले आहे, आपले सौंदर्य कमी झाले आहे, असे वाटायला लागते. कामाची जबाबदारी घरात किंवा नोकरीवर पूर्वीच्या तुलनेने कमी होते. सुस्तपणा व थकवा आल्याने शारीरिक चापल्य कमी होते. त्यामानाने आहारावरही नियंत्रण राहत नाही. शरीराची हालचाल मंदावली जाते. या काळात हाडांचे दुखणे वाढते. गुडघे दुखू लागल्याने बाहेर जाणे कमी होते आणि वजन जास्त वाढायची प्रक्रिया चालू राहते.

    या दरम्यान पोटाला फुगारा येतो वा फुगल्यासारखे वाटते. खूप अस्वस्थ वाटते. पोटात दुखतेही. अन्नपचन होत नाही. गॅस झाल्यासारखे वाटते. अॅ सिडिटी झाल्यासारखे वाटते. हा फुगारा एक प्रकारचा रोगच आहे की काय असे स्त्रियांना वाटते. मग घरगुती औषधे सुरू होतात. बऱ्याच वेळा स्वत:च्याच मनाने किंवा दुसऱ्याने सांगितले म्हणून इनोसारखं औषध घे, आयुर्वेदिक औषधे घे असे प्रकार सुरू होतात, ज्यामुळे स्त्रियांना आणखी त्रास होऊ शकतो. म्हणून वैद्यकीय उपचार डॉक्टरांना सांगूनच करावेत.

    काही स्त्रियांचे डोके खूप दुखते आहे किंवा डोक्याभोवती स्नायू आवळल्यासारखे वाटतात. डोकेदुखी वा मायग्रेन पाळी यायच्या आधी पूर्वीपासून होत असेल तर रजोनिवृत्तीच्या काळात ती जास्त प्रमाणात दिसून येते. सांधेदुखी ही दुसरी महत्त्वाची तक्रार स्त्रिया या काळात सतत करतात. मानेच्या, खांद्याच्या, पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आला तर त्यांना पूर्वीची जी कामे व्यवस्थित करता येत होती, ती आता करता येत नाहीत. याच्यावर वेळीच लक्ष दिल्यास हाडांची पुढे होणारी झीज लक्षात येऊ शकते व उपचाराने ती रोखताही येऊ शकते. रजोनिवृत्तीच्या काळात हाडांची झीज होणे अपेक्षित आहे. हाडांना ठिसूळपणा येऊन ओस्टिवोपोरोसिस व आर्थायटिससारखा विकार बळावू शकतो. या काळात हाडे नव्याने भरून यायची तरुणपणातली प्रक्रिया चांगलीच मंदावते. म्हणून पुढे येणारी हाडांची व एकंदरीत हालचाल करण्याची दुर्बलता थांबविण्यासाठी कॅल्शियम किंवा ‘ड’ जीवनसत्त्वाबाबत डॉक्टरी सल्ला व्यवस्थित घेणे आवश्यक आहे.
    याशिवाय आणखी महत्त्वाची तक्रार म्हणजे स्तनांमध्ये थोडे थोडे दुखरेपण जाणवते. एकदम तीव्र नसले तरी ठुसठुसणारी ही वेदना अस्वस्थ वाटायला लागते. आजकाल तर स्त्रियांना आपल्याला कर्करोग झाला आहे, असा संशय पटकन येतो. त्यामुळे त्या घाबरतात व डॉक्टरांकडे जायचे टाळतात. स्तनांमधली ही अशी वेदना जी कधी खुपल्यासारखी, टोचल्यासारखी, थोडय़ाशा दबावाने येणारी असेल तर स्त्रियांनी जरूर तपासून घ्यावी. ज्यायोगे इतर काही कर्करोगासारखे आजार असतील तर तात्काळ ओळखता येतील.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. शुभांगी पारकर

      January 6, 2017


  • समृद्ध शेती, श्रीमंत शेतकरी काल, आज आणि उद्या

    शेती आणि शेतकरी देशातील सर्वात महत्त्वाचा घटक जो आपणास कधीही उपाशी ठेवत नाही मित्रहो आज आपण भारतीय शेतीचा इतिहास सुरुवात नवनिर्मिती तंत्रज्ञान प्रगती संशोधन उद्योग व्यवसाय निर्यात पर्यटन आणि बरेच काही  या लेखातून आपण चर्चा करूया.

      April 25, 2023


  • अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – २

    कोलंबसने १४९२ साली अमेरिकेचा मार्ग शोधल्यापासून, युरोपमधे या नवीन जगाविषयीचे कुतूहल चाळवले गेले होते. युरोपातल्या त्या काळच्या धार्मिक आणि सरंजामशाही वातावरणाला सामान्य जनता विटली होती. कर्मठ परंपरांनी धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. सरंजामशाहीमुळे, मुठभर गर्भश्रीमंतांच्या हातात सार्‍या जमिनीची मालकी एकवटली होती आणि उरलेली जनता कष्टाच्या व दारिद्र्याच्या ओझ्याखाली पिचत होती. त्यामुळे एका सर्वस्वी नव्या अशा जगाचे दरवाजे अचानक उघडल्यावर, जुन्या जोखडातून सुटका करून घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी लोक धावले नसते तरच नवल !

    युरोपातून नवीन जगात येताना हे लोक आपल्याबरोबर परंपरा, धार्मिक रुढी, रीतिरिवाज, कायदेकानून यांच्याच बरोबर, नवीन जमिनीचा ध्यास देखील घेऊन आले. नवीन जगामध्ये जमीन मिळवणं हा एक जगण्याचा महामंत्रच झाला. जमिनीच्या आधारे लोकांना एक उपजीवीकेचे साधन मिळाले तसेच त्यायोगे त्यांना संपत्तीसाधन करता येऊ लागलं. येवढेच नव्हे तर जमिनीच्या मालकी हक्काद्वारे सामाजिक जीवनाची वरची पायरी गाठता येऊ लागली. युरोपातल्या रीतिरिवाज आणि कायदेकानूनांच्या आधारे, जमिनीच्या मालकी हक्कानुसार, लोकांना अनेक सामाजिक हक्क मिळू लागले. अनेकदा जमिनीच्या मालकी हक्कानुसार पुरुषांना मतदानाचा हक्क मिळू लागला.

    युरोपातून येऊन वसाहती करून राहिलेल्या रहिवाशांचा शेतीव्यवसायाकडे कल होता. त्यामुळे जमीन वाटपाला महत्व आले होते. त्यावेळी जमीन मिळवण्याचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात होते आणि एकंदरीतच, युरोपपेक्षा या नवीन जगात जमीन मिळवणे सोपे होते. जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण व नोंद करणारी सर्वमान्य पद्धत असणे आवश्यक होते. सुरवातीच्या जमिनीच्या सर्वेक्षणाच्या पद्धती फारच ढोबळ होत्या. केवळ नदी, ओढे, झाडांच्या आधारे केलेल्या जमीन सर्वेक्षणात खूप त्रुटी असायच्या आणि जमीन वाटपाचे पर्यवसान भांडणात आणि कोर्टातल्या खटल्यात होणं ही नित्याची बाब होती.

    १७७६ सालच्या अमेरिकेन क्रांतीमुळे जमीन वाटपाच्या पद्धतीला आणखी वेगळंच वळण मिळालं. पश्चिमेला प्रचंड मोठी जमीन नव्यानेच उपलब्ध झाली होती. ही जमीन केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे, १७८५ साली एक कायदा करुन, सरकारने जमीन सर्वेक्षणाची नवी पद्धत रूढ केली. चौकडीच्या (grid) स्वरूपात जमिनीची वाटणी करावी आणि प्रत्येक गावाच्या वाटणीला ३६ तुकडे यावेत, अशी साधारण योजना मंजूर झाली. सुरवातीला या कायद्यानुसार कमीत कमी ६४० एकराचा जमिनीचा तुकडा, एकरी १ डॉलर या भावाने लिलावात विकला जावा, अशी तजवीज होती. परंतु कमीत कमी ६४० एकर जमिनीचा तुकडा विकण्याच्या अटीमुळे, ही जमीन बर्‍याच सामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्या बाहेरची होती. परंतु धनाढय मंडळी मात्र सरकारवर दबाव आणून, एकरी १ डॉलर पेक्षा देखील कमी दराने मोठमोठे जमिनीचे तुकडे मिळवून गिळंकृत करू लागली.

    त्यावेळी अमेरिकन राजकारणात, Federalist आणि Anti-Federalist असे दोन पक्ष होते. Federalist पक्षाच्या मते, जमिनीचा भाव अधिक असणे महत्वाचे होते. त्यामुळे सरकारी तिजोरीत पैशाची भर पडण्यास मदत झाली असती. तसेच जमिनीचे छोटे छोटे तुकडे करण्यापेक्षा, थोड्याच पण धनाढ्य लोकांच्या हातात जमिनीचे मालकी हक्क एकवटणे सोईस्कर ठरले असते. या उलट Anti-Federalist पक्षाच्या मतानुसार, अमेरिकन समाज शेती प्रधान राहील अशी अपेक्षा होती. त्यामुळे थोडयाशाच श्रीमंतांच्या हातात जमिनीचे हक्क एकवटण्यापेक्षा, अनेक छोटया किंवा मध्यम शेतकर्‍यांच्या हातात जमिनीची मालकी असणे महत्वाचे होते. या विचार सरणी प्रमाणे, जमिनीच्या किंमती सामान्य माणसाला परवडतील अशा असणे जरूरीचे होते.

    पुढे सरकारने जमीन वाटपासंदर्भात बरेच प्रयोग करून पाहिले. जमीन विकत घेण्यासाठी कर्जाची सोय केली, कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रफळाची अट, ६४० एकरांवरून ८० एकरांपर्यंत खाली आणली आणि जमिनीचा दर एकरी १ डॉलर वरून २ डॉलरपर्यंत वाढवून बघितला.

    १८६१ ते १८६५ च्या अमेरिकन यादवी युद्धामुळे राज्या राज्यांमधले ताण तणाव अधिक उघडपणे दृष्टीस पडू लागले. पश्चिमेकडे होणारा विस्तार, देशाची आर्थिक घडी आणि गुलामगिरी या प्रश्नांवर, उत्तरेकडच्या औद्योगिक आणि दक्षिणेच्या शेतीप्रधान राज्यांमधे युद्धाला तोंड फुटले. दक्षिणेकडची राज्ये फुटून निघाल्यामुळे देशाच्या राजकारणात मोठाच बदल झाला. सरकारने पश्चिमेकडच्या विकासासंदर्भात आणि जमिनीच्या वाटपासंदर्भात अधिक उदारमतवादी धोरण स्विकारले. परिणामस्वरूप, १८६२ साली Homestead Act पास झाला. या कायद्यानुसार कोणाही घरचा २१ वर्षांहून अधिक वयाचा पुरुष अथवा स्त्री, १६० एकर जमिनीवर पूर्णपणे विनामूल्य हक्क सांगू लागला. अट एवढीच की त्या जमिनीवर त्या शेतकर्‍याने कमीत कमी ५ वर्षे रहावे आणि तिथे झाडं तोडून जमीन साफ करणे, जमिनीची मशागत करून ती शेतीलायक करणे, घर आणि जनावरांसाठी गोठे बांधणे, अशा सुधारणा कराव्यात. जर जमिनीवर अधिक लवकर हक्क प्रस्थापित करायचा असेल, तर ६ महिन्या नंतर एकरी १.२५ डॉलर एवढी रक्कम भरली, की काम झाले !

    पुढे देखील, १९ व्या शतकाच्या उरलेल्या दशकांमधे, सरकारने विविध कायदे सुधारणा करून जमिनीचे वाटप चालूच ठेवले. १८७३ च्या Timber Culture Act नुसार, शेतकर्‍यांना ४० एकर जमिनीवर झाडे लावण्याच्या मोबदल्यात १६० एकर जमीन मोफत मिळू लागली. जसजसं पश्चिमेला जावं, तसतशी जमीन अधिकाधिक रुक्ष होत गेली होती. त्यामुळे तिथल्या जमिनीसाठी वेगळे कायदेकानून असणे जरूरी होते. १८७७ सालच्या Desert Lands Act नुसार, शेतकर्‍यांना एकरी १.२५ डॉलरच्या भावाने, ६४० एकर जमीन मिळत होती. अट इतकीच, की त्यांनी तीन वर्षांत तेथे जलसिंचनाची व्यवस्था करावी. Homestead Act मुळे विविध प्रकारचे लोक जमिनी घेण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी जमिनीचा वापर वेगवेळ्या कारणांसाठी केला. परंतु इतर Acts मुळे, शक्यतो मोठया प्रमाणावर जमिनी विकत घेऊन, त्यांचा वापर चराऊ कुरणांसारखा करण्याचा उद्योग मोठया प्रमाणावर सुरू झाला.

    १९०२ सालच्या Reclamation Act नुसार मोठमोठे जलसिंचनाचे प्रकल्प सुरू करण्यावर भर देण्यात आला. याचं फलस्वरूप म्हणून पश्चिमेकडच्या रुक्ष जमिनीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. या कायद्यानुसार, त्या भागात जमिनीचा ताबा घेतलेल्या लोकांचाच पैसा १० वर्षांपर्यंत वापरून, सरकारने ह्या जलसिंचनाच्या प्रकल्पांना हातभार लागेल, अशी योजना केली होती. या कायद्यामुळे, विसाव्या शतकातल्या सरकारच्या जमीन वाटपाच्या धोरणातील बदलाची नांदी झाली.

    या नवीन धोरणानुसार, शेतकर्‍यांना केवळ जमिनीचे वाटप न करता, त्या जमिनीचा त्यांना अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. पुढे १९३४ च्या Taylor Grazing Act नुसार Homesteading ची प्रथा पूर्णपणे बंद झाली. यामुळे देशाच्या जमिनीवर खाजगी लोकांचा मालकी हक्क वाढला आणि त्या जमिनींवर यशस्वी होण्यासाठी लोकांना अधिकाधिक संधी मिळतील याची काळजी घेण्यासाठी सरकार अधिकाधिक कटीबद्ध झाले.

    अमेरिकन वेस्ट म्हटलं की सर्वसाधारण वेस्टर्न चित्रपटांनी दाखवल्याप्रमाणे, घोडदौड करून तुफान गोळीबार करणार्‍या काऊबॉइजचं चित्र आपल्या डोळ्यां समोर तरळून जातं. परंतु खरा इतिहास काही इतका रंजक किंवा आकर्षक नाही. चित्रपटांनी रंगवलेल्या भव्यदिव्य काल्पनिकतेपेक्षा वास्तव अगदीच साधेसुधे व रूक्ष होते. अफाट आणि अविकसित अशा “वेस्ट़”ला काबुत आणण्याचे काम खरं तर तीन साध्या सुधारणांनी केलं – नांगराचा लोखंडी फाळ, काटेरी तार आणि इकडून तिकडे सहज नेण्यासारखी पवनचक्की.

    प्रेअरीवरचे गवत म्हणजे उंच सळसळणारे. पण या गवताची मुळे खूप लांबवर पसरून जमिनीला घट्ट पकडून राहणारी. त्यामुळे प्रेअरीवरची जमीन खोदायची म्हटली की या मुळांनी जखडून ठेवलेल्या घट्ट जमिनीशी झटापट करावी लागायची. १९ व्या शतकाच्या सुरवातीचे नांगरांचे लाकडी फाळ, ही टणक जमीन आणि त्यातला गवताच्या मुळांचा गुंता, यांच्याशी टक्कर घेता घेता मोडून पडायचे. किंवा अगदीच नांगर मोडला नाही तर ही जमीन नांगराण्यासाठी चक्क आठ दहा बैल लावावे लागायचे. १८३७ साली जॉन डीर या माणसाने लोखंडाचा मोठा सुबक असा फाळ बनवला आणि प्रेअरीवरची जमीन अमेरिकन शेतकर्‍यांच्या कह्यात आली.

    चहूदिशांना अफाट पसरलेल्या या जमिनीवर गाई, गुरं काबूत ठेवायची, म्हणजे एक दिव्यच असायचं. पूर्वेकडच्या किनारपट्टीसारखी इथे प्रेअरीवर जंगले नव्हती, किंबहुना एकंदरीत झाडांचीच कमतरता, त्यामुळे लाकडाची कुंपणं घालणं शक्य नव्हतं. मग १८७४ साली, जोसेफ ग्लीडन नावाच्या माणसाने लोखंडाच्या तारेला, तारेचेच छोटे छोटे टोकदार तुकडे जोडून काटेरी तार तयार केली. त्या काळी या काटेरी तारेचे वर्णन मोठं समर्पकपणे “हवेपेक्षा वजनाला हलकी, व्हिस्कीपेक्षा ताकदवान आणि मातीपेक्षा स्वस्त” असं करण्यात आलं होतं. यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी या तारेने जनावरांच्या चराऊ कुरणांना कुंपण घालण्याचं काम चोख बजावून मोठीच मोलाची कामगिरी बजावली.

    तिसरी महत्वाची सुधारणा म्हणजे हलक्या पवनचक्क्या. या साध्या पवनचक्क्या, लाकडी खांबांनी केलेल्या ३०-४० फूट उंचीच्या चौकटीवर उभ्या रहायच्या. प्रेअरीच्या मोकळ्या आकाशाखालचा भणाणता वारा या पवनचक्क्या गरगरा फिरवत रहायचा. त्यांच्या सहाय्याने, जमिनीत जागो जागी खणलेल्या बोअर वेल्स (विहिरी) मधून काढलेल्या पाण्यावर शेकडो, हजारो एकरांवर शेती भाती पिकू लागली. सुमारे १९३० पर्यंत या पवनचक्क्या म्हणजे प्रेअरीवरच्या प्रत्येक फार्मचं जणू अविभाज्य भागच झाला होता. पुढे मग विजेवर चालणार्‍या मोटारींनी या पवनचक्क्यांची जागा घेतली. परंतु अजूनही बर्‍याच ठिकाणी या जुन्या छोटया पवनचक्क्या फार्मवर शोभेसाठी किंवा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जपून ठेवलेल्या आढळतात.

      August 20, 2015