वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सातवा बरोबरीत सुटलेला एकदिवसीय सामना आणि एक वर्षाहून अधिक काळ १३३ हून अधिक सरासरी राखणारा अँडी फ्लॉवर.
November 17, 2010
हुतात्म्यांनो ! तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द. काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण. असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय !
December 12, 2020
सिप्रीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शस्त्रास्त्र आयातीत भारत आघाडीवर असून दुसर्या स्थानी चीन आणि तिसर्या स्थानी पाकिस्तान आहे, असे म्हटले आहे. अहवालातील ही आकडेवारी बरोबर आहे. यापूर्वी चीनचा क्रमांक शस्त्रास्त्र आयातीत पहिला होता. परंतु चीनने आपल्या शस्त्रास्त्रासंबंधीच्या धोरणात बदल केला.
April 9, 2014
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने नीटची परीक्षा देत असताना परीक्षा अर्ज भरतानाच मराठी ही उत्तराची भाषा निवडण्याची काळजी घ्यावी असे केल्यास मिळणारे मोठे यश पुढील वर्षी निकाला नंतर मला कळवावे हे आवाहन !
November 11, 2018
कार्तिक शुक्ल एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवंतांना जागे केले जाते आणि बाळकृष्णाचा तुळशीजवळ विवाह लावला जातो. या दिवशी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. वृंदावनात उस, फुलांसहित झाडे उभी करतात.
October 1, 2023
आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे.
June 12, 2020
उर्वीसर्वजनेश्वरी जयकरी माताकृपासागरीवेणीनीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी ।
सर्वानन्दकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥
आई जगदंबेचा वैभवाचे आणखी काही पैलू कडून दाखवताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत,
उर्वीसर्वजनेश्वरी- उर्वी अर्थात पृथ्वी, त्यावरील सर्वजन अर्थात सर्वप्रकारचे लोक त्यांची ईश्वरी म्हणजे स्वामिनी. त्याचप्रमाणे सर्व म्हणजे सर्वप्रकारचे जीव. त्यांची जनेश्वरी म्हणजे उत्पन्न करणारी देवता. सोप्या शब्दात पृथ्वीवरील सर्व जीवांची तथा लोकांची माता ती उर्वीसर्वजनेश्वरी.
जयकरी- उपासकांना त्यांच्या सुयोग्य, इच्छित कार्यात विजय प्रदान करणारी.
माताकृपासागरी- जसा सागराचा अंतपार लागत नाही तसाच तिच्या कृपेचा पारावार सापडत नाही , अशा अपार करुणामयी आई जगदंबेला माताकृपासागरी म्हणतात.
वेणीनीलसमानकुन्तलधरी- खूप काळ्या केसांना तेल लावले तर ते निळसर दिसतात. अशा निळसर, कुंतल म्हणजे केसांची समान अर्थात व्यवस्थित रचना करून तिने धारण केली आहे. त्यामुळे तिला वेणीनीलसमानकुन्तलधरी संबोधिले आहे.
नित्यान्नदानेश्वरी- मा अन्नपूर्णा समस्त जीवांना नित्य अन्नाचे दान करीत असते.
सर्वानन्दकरी - पोट भरल्यानंतर प्राप्त होणारा आनंद सर्वांना प्रदान करणारी. सर्व प्रकारचे आनंद प्राप्त करून देणारी.
सदा शुभकरी- साधकांचे, उपासकांचे सदैव कल्याण करणारी. मंगल करणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचे अधिष्ठान असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती,ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 3, 2020
गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला.
September 8, 2010
आजच्या यंत्रयुगात आपण सुध्दा एक यंत्र बनलो आहोत. यंत्राप्रमाणे घाई घाईत आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपले जीवन झाले आहे. शारीरीक श्रम कमी झाले, जीवन आरामातजगणे सोपे व सुकर झाले, सर्व सोई -सुविधा उपलब्ध झाल्या. मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट कायमचीच हरवून गेली, ती म्हणजे मन:शांती होय ! आजआपल्याकडे मन:शांती सोडून सर्व काही आहे.
July 31, 2018
प्रत्येक माणसाची सकाळ कुठल्याना कुठल्या वृत्तपत्राने होत असते. भले मग कितीही बातम्या टीव्ही समोर बसून बघीतल्या असतील तरी सकाळ झाल्यावर वर्तमानपत्र वाचल्या शिवाय कुणाही माणसाचा दिवसच सूरू होत नाही. देशात व परदेशात घडणार्या सर्व घडामोडींची बित्तम बातमी वृत्तपत्रातून येते.
June 21, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti