वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मोहरीचे तेल हे बंगाल,व उत्तर भारतामध्ये स्वयंपाका करिता वापरले जाते.हे तेल चवीला कडवट,उष्ण असते व ते भुक वाढविते,पचायला हल्के,तीक्ष्ण गुणाचे,कफ व वातनाशक,पित्त वाढविणारे,संडासला बांधुन ठेवणारे अर्थातच घट्ट करणारे,लघ्वीचे प्रमाण कमी करणारे आहे.हे तेल शरीरातील मेदाचा नाश करते.ह्या तेलाचा गरजे पेक्षा जास्त वापर केल्यास शरीरातील शुक्रधातू नष्ट होतो.
त्वचेला खाज येणे,कोड,तसेच काही कफ वात प्रधान त्वचाविकारात ह्या तेलाचा आपण वापर करू शकतो.
मोहरीचे तेल हे अत्यंत उष्ण असल्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशांत हे तेल लोकांना सहज पचते.पण हेच मोहरीचे तेल जर आपण देशावर किंवा कोकण गोवा प्रांतात वापरू लागलो आपणच काय पण बंगाली किंवा युपी स्थित लोक जरी ह्याच तेलाचा वापर भरपूर प्रमाणात आपल्या स्वयंपाकात करू लागले तरी त्यांच्या अंगात पित्त दोषाची फाजील वाढ होऊन त्यामुळे पित्ताचे व रक्ताचे विकार त्यांना सतावतील ह्यात दुमत नाही.
म्हणूनच कोणतेही तेल वापरताना देश अर्थात आपण रहात असलेल्या प्रदेशाचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो तेलाचा वापर करत असताना आपल्या प्रदेशात कोणत्या तैल बिया पिकतात ह्याचा विचार करूनच त्यांच बियांचे तेल वापरावे.कारण त्या तेलबियांचे पासुन काढलेले तेल आपल्याला आपल्या प्रदेशाचा वापरायला चांगले असते.जसे कोकण,गोवा खोबरेल,देशावर शेंगदाणा,उत्तर भारत,बंगाल सरसों का तेल अर्थात मोहरीचे तेल.
मोहरीचे तेल वापरण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास वाढेल.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
चवीला कडू असली तरी आपल्या कडू चवीने काही पदार्थांना वेगळीच चव आणते.अशी ही मेथी आपण फोडणी मध्ये वापरतो.डाळ शिजवताना त्यात थोडी मेथी घालतात,तसेच गोवा कारवार भागात माशांची अथवा कैरी,अंबाड्यांची उडीदमेथी हि आमटी बनवतात तसेच गोव्यात बारशाला बाळंतीणिकरीता खास उकडे तांदूळ व मेथी घालून खीर बनवितात जिला मेथीची पेज म्हणतात.
अशी हि मेथी आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच असते.आपण मसाल्या मध्ये वापरतो त्या मेथीच्या बिया होय.मेथीचे लहान क्षूप असते त्याची पाने भाजी मध्ये वापरतात.
मेथी चवीला कडू असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते पण पित्त वाढवू शकते.
हि मेथी देखील ब-याच घरगुती औषधांमध्ये उपयुक्त आहे.
१)शरीरात वात भरल्याने हाता पायांना कळा येत असल्यास मेथ्या तूपात भाजून पीठ करावे व ह्याचे अगदी लहान लाडू वळावेत आणि रोज एक लाडू खावा साधारण पणे आठ दिवसात फरक पडतो.
२)संडासातून आव पडत असल्यास १/२ चमचा मेथी चुर्ण दह्यात मिसळून खावे.
३)प्रसुतीनंतर अंगातील दुःख कमी होण्यास आणि अंगावरचे दुध वाढण्यासाठी ४ चमचे मेथी रात्री पाण्यात भिजत घालाव्यात आणि सकाळी बारीक वाटून त्यात नारळाचा रस व गूळ घालून शिजवावे आणि थोडे तूप घालून बाळंतीण बाईला रोज खायला द्यावे.
४)मधुमेहात रोज सकाळी उपाशी पोटी १ चमचा मेथी चुर्ण गरम पाण्यासह घ्यावे.
५)६ महिन्यानंतर लहान मुलांना त्यांच्या तीन वेळच्या खाण्यामध्ये रात्री मेथी भिजत घातलेले पाणी एक एक चमचा घालावे ह्या मुळे कडू चव पोटात जाते आणि बाळाला पोटाच्या तक्रारी देखील वारंवार होत नाहीत.
मेथी खाण्याचा अतिरेक केल्यास एॅसीडीटी,संडासला पातळ होणे,अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
कपाळावर मिरी वाटणे हा वाक्प्रचार तर सगळयांनाच माहीत असणार त्यात काही नवल नाही.मसाल्या मधला अजून एक पदार्थ ज्याला मसाल्या मध्ये मानाचे स्थान आहे ती म्हणजे मिरी.
आपल्या रोजच्या जेवणात आमटी मध्ये,गरम मसाला बनवताना मिरीचा सर्रास वापर केला जातो.असा हा तिखट झणझणीत पदार्थ जेवणाला एक वेगळीच लज्जत आणतो.
मिरीचा वेल असतो आणी त्या वेलीला उगवणारी ही फळे चांगली तयार झाल्यावर उन्हात वाळवून ठेवली जातात.ही चवीला तिखट असतात आणी ब-या पैकी उष्ण असतात.हि शरीरातील कफ आणी वात दोष कमी करते पण पित्त मात्र वाढवते.
चला आता मिरीचे काही घरगुती औषधी उपयोग पाहूयात.
१)घसा बसला असल्यास जेवणानंतर १/४टिस्पून मिरपुड तूपात मिसळून खावी चांगला फायदा होतो.
२)सर्दी होऊन डोके देखील जड झाले असल्यास १/४ चमचा मिरपुड मधासोबत मिसळून घेणे आराम मिळतो.
३)पोटात दुखत असल्यास १/४ चमचा मिरपुड आणी २ चिमूट भाजलेला हिंग हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
४)मार लागून रक्त साखळले असल्यास मिरी पाण्यात वाटून त्याचा लेप त्या जागी लावला असता तिथली सूज आणी वेदना देखील कमी होते.
५)मिरीचे चूर्ण किडलेल्या दाढेत ठेवले असता तिथला ठणका कमी व्हायला मदत होते.
अतिवापराने छातीत जळजळ,पोटात आग होणे तसेच संडास,लघवी ,व नाकातून रक्त स्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.
लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
औषध म्हणून कशी वापरू शकते.
चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.
अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील
??.
आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!
१)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.
२)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.
४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.
५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.
६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.
मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
सर्वांच्याच आवडीची हि भाजी सुकीभाजी म्हणूनका,भरली भेंडी म्हणा,आमटी,तळलेले भेंडी,भरली भेंडी,आपण गोव्यात करतो ते भेंडीचे खतखते हे सर्वच प्रकार अगदी रूचकर लागतात ह्या भाजीचे.
जसा हिचा उपयोग आपण स्वयंपाकात करतो तसाच उपयोग घरगुती उपचारात देखील करू शकतो.
ह्या भेंडीचे तीन हात उंच झाड असते व त्याला हि फळे लागतात. भेंडी चवीला तुरट,आंबट,गोड अशा मिश्र चवीची असतात व उष्ण असतात.त्यामुळे हि वात व पित्त दोष कमी करतात व कफ वाढवितात.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)शरीराची आग होत असल्यास तीन भेंडी ३ ग्लास पाण्यात उकळून ३/४ ग्लास उरवावा व त्यात २ चमचे खडीसाखर व १/४ चमचा सैंधव घालून हे पाणी जेवणा सोबत थोडे थोडे प्यावे.
२)अति चालून हातपायांची आग होणे व ते दुखणे ह्यात २०० ग्राम भेंडी फोडुन १/२ लिटर पाण्यात भिजत घाला व दोन तासांनी सदर पाण्यात कपडा भिजवा व दुखणी-या भागांवर गुंडाळा.
३)चेह-याची त्वचा रूक्ष झाली असल्यास दोन कोवळ्या भेंड्याबारीक वाटा व त्याचा लेप चेह-यांवर लावा व १५ मिनीटांनी तो लेप कोमट पाण्याने धुवा.
४)गळवे पिकण्यासाठी भेंडी व हळद एकत्र वाटून पोटीस बांधावा.
५)सांधेदुखी व सांध्यामधून करकर आवाज येत असल्यास २ भेंडी कापून २ तप पाण्यात उकळावी व ते पाणी दररोज प्यावे.
अतिमात्रेत भेंडी खाल्ल्यास पुष्कळ जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शबरीने श्रीरामांना स्वत: चाखून अर्पण केलेली ही बोरे श्रीरामांनी अगदी आवडीने खाल्ली होती.
खरोखरच हि बोरे फारच रूचकर लागतात व विशेष करून उन्हाळयात मिळणारे हे रान फळ आहे.
ह्याचा मध्यम आकाराचा वृक्ष असतो जो काटेरी असतो व त्याला छोटी छोटी काटेरी पाने असतात.
कच्ची बोरे हि चवीला तुरट आंबट उष्ण असून ती शरीरात कफ पित्त दोष वाढवितात.तर पिकलेले बोर हे उष्ण असून वात पित्त दोष वाढवितात.
आता हि बोरे फक्त काहीच ऋतू मध्ये उपलब्ध असल्याने ती सुकवून ठेवतात व वापरतात.
ह्यांच देखील उपयोग घरगुती उपचारात केला जातो.कसा ते पाहुया:
१)अंगावर पित्त उठत असल्यास व खाज येत असल्यास बोराचा रस किंवा गराची चटणी अंगावर लावावी.
२)वारंवार तहान लागणे,घसा कोरडा पडणे,जीभ सुकणे ह्यावर पिकलेली गोड बोरे खावीत.
३)उमासे,कोरड्या उल्ट्या येत असल्यास बोरे खावीत.
४)जुलाब होणे,भुक न लागणे ह्यावर सुक्या बोराचे कढण डाळींबाचे दाणे,काळी मिरी,सैंधव घालून खावे.
५)वारंवार उचकी लागत असल्यास आंबट गोड बोरे खावी तसेच बोराच्या बीचे वरचे आवरण फोडून त्यातील गर उगाळून त्यात २ चमचे तुप+ १ चमचा मध घालून चाटण करून चाटावे.
बोरे खायचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होतो.कच्ची बोरे तर कधीच खाऊ नये.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते.
बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा वापर केला जातो.
चला मग बदामाचे गुणधर्म पाहूया:
बदाम चवीला गोड,तुरट,उष्ण,स्निग्ध,बलकारक,वातनाशक,
कफपित्तवाढविणारे,पौष्टिक,सारक,बुद्धिवर्धक,
पचायला जड,शुक्रवाढविणारे आहे.
आता बदामापासून बनविलेल्या व्यंजनाचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)बदामखीर/मिठाई:
गोड,पौष्टिक,उष्ण,पचायला जड,झोप आणणारी,शुक्र धातूवाढविणारी,बुध्दिवर्धक,
वातपित्तनाशक,बलकारक आहे.
२)बदामाचे तेल:
गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातपित्तनाशक,
कफकर,मेंदूलाशांतकरणारा,वृष्य,उष्ण,
पोषक,डोकेदुखी कमी करते.हे तेल कानाच्या रोगात देखील उपयुक्त आहे.
बदामाचे अतिसेवन केल्यास पित्तवाढून जुलाब देखील होऊ शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
आता आपण कंदमुळ हा वर्गपुर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळूया तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट तो म्हणजे फळांचा.फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे.आपण सर्वच जण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो.उस वक्त हम आव देखते हैं न ताव.
हो खरेच फळे पौष्टिक,रूचकर असतात हे खरे तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिज् देखील असतात.पण हिच फळे खाताना जर आपण काही नियम पाळले तर मला वाटते आपण सेवन करत असलेल्या फळांचा आपल्या शरीराला अपाय न होता फायदाच होईल.
फळं खात असताना आपण हि खुण गाठ मनाशी घट्ट बांधावी कि ती कायम पोट रिकामी असताना एक आहाराचा भाग म्हणून खावी.कारण बरीच मंडळी भरपेट जेवण झाल्यावर फळे कापून खातात,हे असे करणे म्हणजे रोगाना आयते आमंत्रण होय.कारण जेवल्यावर फळे खाण्याने त्याचा विपरीत परिणाम खाल्लेल्या अन्नाच्या पचनावर होऊन रक्तातील ट्रायग्लिसराईड्स देखील वाढतात हे माझ्या वाचनात आले होते जे मला पटले.त्याचा विस्तार येथे करणे अयोग्य होईल.
दुसरा प्रकार म्हणजे हिच फळे दुध,दही,पनीर,चक्का,आयस्क्रीम ह्या सोबत खाणे जसे फ्रूट सलाड विथ कस्टर्ड,शेक्स इ वारंवार खाणे म्हणजे त्वचा रोग,सर्दी,दमा,खोकला,सायनस ह्याला आयतेच निमंत्रण होय.
तसेच काही मंडळींना फळांचा रस पिण्यात भारी रस असतो.पण गरज नसताना असे करणे म्हणजे आपल्या पचन शक्तीवर अतिरिक्त ताण देणे होय.कारण जेव्हा आपण सबंध फळ खातो तेव्हा आपल्या पोटात त्याचा चोथा ज्यास फायबर म्हणतात ते जाते,पण रस काढायला व त्यातून पोट भरायला भरपूर फळे वापरावी लागतात.त्यामुळे सहाजीकच जास्त साखर व पर्यायाने उष्मांक शरीरात गेले कि नाही.त्यामुळे मी तर कायम फ्रूट ज्युसच पिते पण वजन मात्र कमी होत नाही अशी तक्रार करणार्याॅनी हे लक्षात घ्यावे.
तसेच सकाळी नाश्त्याला इतर पदार्थ खाऊन असे पाश्चात्यांन प्रमाणे ज्युस पिणे म्हणजे पोटाचे विकार,अपचन,व वजन वाढीला आयतेच आमंत्रण आहे हे लक्षात असु द्यावे.
म्हणूनच फळे खा पण ते खायचे नियम पाळून बरे का!
ह्या विभागाची माहिती देण्यापुर्वी मला आपणांस हे सांगणे आवश्यक वाटले कारण आपल्या पैकी बरेच जण ह्या अशा चुका फळे खाताना हमखास करत असतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
फणसा सारखा बाहेरून कडक आणी आतून अगदी नरम अशी म्हण प्रचलित आहे.असा हा सर्वांचा आवडता फणस ज्याला कोकणचा मेवा देखील म्हणतात.
ह्याचे कापा,बरंका किंवा रसाळ आणी भाजीचा असे तीन प्रकार असतात.साधारण पणे उन्हाळ्यात पिकणारे हे फळ तसे सर्वांच्याच आवडीचे नाही का?
फणसपोळी,फणसाचे चिप्स,गुळ खोबरे तांदूळ व गरे घालून केली जाणारी गोड सांजण,गोव्यात मिळणारा कच्चा फणस ज्याला कुवला म्हणतात त्याचे केले जाणारे चटणी वजा भाजी ज्याला आम्ही सपशेल म्हणतो,किंवा मग नुसतेच गरे काढुन खा ना त्यात हि एक आगळी वेगळी मजा आहे.
ह्याचा ५०-१०० फूट उंच वृक्ष असतो व ह्याच्या खोडालाच हे फणस लागतात जे १-३ फूट लांब व ५-२५ किलो वजन भरणारे देखील असतात.फणस बाहेरून हिरवा बारीक उंचवटे युक्त व आत पिवळ्या रंगाचे मऊ गरे व त्यात आठळया असलेला असतो.
कच्चा फणस हा तुरट गोड,थंड व कफवातवर्धक व पित्तनाशक असतो.तर पिकलेला फणस हा चवीला गोड,थंड व कफकर व वातपित्तनाशक असतो.
चला आता ह्याचे घरगुती उपयोग पाहू:
१)फणसाचे दुध हे गाठी व सूज कमी करते व जखम भरायला मदत करते.
२)अशक्तपणा,वजन कमी होणे अशा तक्रारींवर २ फणसाचे गरे,१/४ चमचा मिरीपूड ,१/४ चमचा सैंधव हे मिश्रण जेवणानंतर खावे.पण भुक लागत नसल्यास हा प्रयोग करू नये.
३)तोंड कडू होणे,कोरडे पडणे,पोटात गरम वाटणे,अशा तक्रारींवर फणसाचे १-२ गरे भरल्या पोटावर खावे.
४)बरंका अर्थात रसाळ फणसाचे गरे वाटून गरम करून हे मिश्रण पिकत येणाऱ्या गळूवर बांधावे म्हणजे गळू पिकून फुटेल.
५)शरीरावर झालेली जखम भरून येण्यासाठी रसाळ फणसाचा गर वाटून जखमेवर बांधावा म्हणजे रक्तस्राव थांबतो व जखम देखील लवकर भरते.
फणस खायचा अतिरेक केल्यास जुलाब,सर्दी,कृमी,खोकला होतो.
फणसाच्या अतिखाल्ल्याने होणाऱ्या अजीर्णावर खोबरे खावे.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे लोकप्रिय फळ असून सर्वांनाच आवडते त्याला आपला पोपट तरी कसा अपवाद असेल.आपल्या सर्वांना ती बाल कविता आठवत असेलच "पोपट पोपट बोलतोस गोड खाना जराशी पेरूची फोड".
ह्याचा आता जाम,आयस्क्रीम,सरबत अस,वड्या असे बरेच रूचकर पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.
पेरूचे सदाहरित झाड असते,पाने जाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.
हा कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड.कच्चा पेरू खाऊ नये.खायला व औषधासाठी पिकलेला पेरू बियाकाढून त्याचा गर वापरावा.
पिकलेला पेरू गोड,थंड,पित्त व वात दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)पोटात जळजळ,घसा कोरडा पडणे,हात,पाय,डोळे ह्याची आग ह्यात जेवणानंतर १ तासाने पिकलेला पेरू खावा.
२)चालल्यावर थकवा येणे,पोटऱ्या दुखणे,घसा कोरडा पडणे ह्यावर सकाळी रिकामी पोटी १ पेरूचा गर+२ चमचे मध+१ चिमूट सैंधव हे मिश्रण घ्यावे.
३)संडासला साफ होत नसल्यास महिनाभर रोज रात्री एका पेरूचा गर खावा.
४)मोठ्या सर्जरी नंतर थकवा कमी करायला व जखम लवकर भरून यायला रोज १ पेरू+१ चमचा मध+१/२ चमचा साजुक तूप खावे.
५)लहान मुलांना पौष्टिक म्हणून खायला १ पेरूचा गर+ मध द्यावा.
पेरू खायचा अतिरेक केल्यास सर्दी,पडसे होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti