वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शुष्क, कोरड्या, पडीक जमिनीवर वाढणारी बोर आणि रुई यांच्यासारखी झाडं अनेक गुणांनी समृद्ध असतात.
March 2, 2012
माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची आराधना केल्यास सर्व रोग बरे होतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच सूर्याची आराधना केली जाते. रथसप्तमी याचा अर्थ सूर्याचा सारथी "आरुणी‘ सात घोडे असणाऱ्या रथाचे सारथ्य करीत असतो. मकरसंक्रांतीपासून सूर्य हा तीळ तीळ वाढत जातो. रथसप्तमीनंतर संक्रांतीची समाप्ती मानली जाते.
रथसप्तमीच्या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ अंगणात सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी पाटावर रांगोळीने सूर्याची प्रतिमा किंवा काही ठिकाणी सूर्याची मंडळे काढली जातात. बारा आणि सात मंडळांचा गोलक असतो. ही संख्या शुभ मानली जाते. यावर विड्याची पाने, सुपारी ठेवून तांबडे गंध, तांबडी फुले वाहिली जातात. या दिवशी नैवद्याच्या खिरीला अत्यंत महत्त्व असते. मातीच्या सुगड्यात दूध, तांदूळ घालून ते भांडे अंगणात गोवऱ्या पेटवून दूध ऊतू जाईपर्यंत तापवितात. त्याचा प्रसाद कुटुंबीय ग्रहण करतात. यालाच "पायस‘ असे म्हणतात. या दिवशी नैवेद्याकरिता गुळाची पोळीदेखील करण्याची परंपरा आहे.
सकाळी सूर्याला सूर्यफूल टाकून अर्घ्य वाहिले जाते. "तुझ्याप्रमाणे माझे जीवन तेजोमय होऊ दे‘, अशी प्रार्थना सूर्याची 12 नावे घेऊन केली जाते. मात्र, ही पूजा सूर्याच्या साक्षीने अंगणातच करण्याचा दंडक आहे. सूर्याची उपासना आपल्याकडे हजारो वर्षांपासून रथसप्तमीच्या निमित्ताने करण्याचा प्रघात आहे. या दिवशी हळदीकुंकू वाटले जाते व सायंकाळी देवळात जाऊन संपूर्ण दिवस आनंदात घालविला जातो.
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 9, 2017
यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं
स्थितिं याति यस्मिन्यदेकांतमंते |
स कर्मादिहीनः स्वयंज्योतिरात्मा
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३७ ‖
जगद्गुरू स्वरूपात कृपाळू असल्याने जरी भक्तांच्या साधन रूपात आचार्य श्री विविध देवतांच्या अत्यंत रसाळ स्तोत्रांची निर्मिती करीत असले तरी त्यांचा मूळ पिंड निर्गुण निराकार उपासक वेदांती असाच आहे.
प्रत्येक देवतेकडे देखील ते तसेच पाहतात.
मागील श्लोकात शिवोऽहम् चा उल्लेख आल्यावर आचार्य श्रींची ती मूळ वेदांतनिष्ठा जागृत झाली.
त्याआधारे परब्रह्म स्वरूपात भगवान शंकरांचे वर्णन करताना ते म्हणतात,
यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं - ज्याच्या पासून हा विचित्र प्रपंच निर्माण होतो. अर्थात खरेतर ज्याच्या अधिष्ठानावर या चित्रविचित्र पदार्थ आणि घटनांनी भरलेल्या प्रपंचाचा भास होतो,
स्थितिं याति - ज्याच्या अधिष्ठानावर या संसाराचे कार्य चालते, यस्मिन्यदेकांतमंते - शेवटी तो सर्व प्रपंच त्याच्यातच लय पावतो,
स कर्मादिहीनः - अशा त्या कर्मविहीन, अर्थात या सगळ्याचे अधिष्ठान असले तरी स्वतः कोणतेच कर्म न करणारे,
स्वयंज्योतिरात्मा - आत्म ज्योती स्वरूप असणारे, जे भगवान श्री शंकर तेच माझे मूळ वास्तव स्वरूप आहे.
शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् - मी शिव आहे. मी शिव आहे. मी शिव आहे.
अर्थात या विश्वाची निर्मिती,स्थिती आणि लयाला कारणीभूत असणारे, खरेतर आधारभूत असणारे जे परम निर्गुण-निराकार स्वरूप तेच माझे मूळ रूप आहे. त्यात विलय पावणे, एकरूप होणे हे माझे ध्येय आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 16, 2020
माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बांधकाम क्षेत्रात येणारा काळापैसा रोखण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करणे गरजेचे आहे असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. परंतु मुद्रांक शुल्कात कपात केल्याने काळापैसा रोखता येईल म्हणणे धाडसाचे होणार तर नाहीच पण हा पर्यायही होऊ शकत नाही. मुळात काळा पैसा कसा निर्माण होतो ह्याच्या मुळाशी जाऊन त्यावर नियंत्रण व निर्बंध घालण्यासाठी काही उपाय योजना कठोरपणे अमलात आणल्या तरच काळ्या पैशाला रोखता येईल अन्यथा हे स्वप्नवत भासेल.
March 22, 2011
आपल्या आराध्य देवतेच्या सौंदर्याने विमोहित होणे ही भक्तांची आवडती गोष्ट. त्या देवतेच्या सौंदर्य वर्णनाने स्तोत्र वाङ्मय मोहरून येते. या श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री भगवान श्री गणेशांच्या विविध अलंकारांचे वर्णन करीत आहेत.
January 8, 2020
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते… नड येते ….. आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!
March 10, 2019
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. नेताजी रा. पाटील यांनी लिहिलेला हा लेख
पांडुरंग बुवा फुलावरकर नावाचे प्रसिद्ध भजनीबुवा माझ्या वडिलांचे मित्र होते. उंची सहा फुटांच्या वर, धिप्पाड शरीरयष्टी, तेज:पुंज चहरा, दिलखुलास स्वभाव आणि पहाडी आवाज असलेले बुवा उत्कृष्ठ हार्मोनियम पटू होते. बाजाच्या पेटीवर त्यांची बोटे जादू सारखी चालत. सहीसमाक्षीने गावी आले की मुक्काम आमच्याच घरी असे. गावातील श्रीराम प्रासादिक मंडळी त्यांना भजनाचं निमंत्रण देत असे. पांडुरंगबुवांची भजन आणि विशेषत: त्यांचं पेटीवादन माझ्या आजही स्मरणात आहे. मी त्या वेळी आठ-दहा वर्षाचा असेन. 'धनिसारे सानिसा सानिधाप मपधप गमप मगरेसा' हे बुवांचे नोटेशन माझ्या मुखोद्गत आहे. त्याच अबोध, अजाण वयात माझ्या मनात हार्मोनियमचं बीज अंकुरलं गेलं.
शिक्षण सुरू झालं, एस्.एस्.सी. झालो, गावातील माध्यामिक शाळेतच नोकरीला लागलो. नोकरी, संसार आणि अन्य छंद त्या व्यापात हा छंद बाजूलाच पडला. वय सरत गेलं आज आयुष्याची सायंकाळ सुरू झाली आहे पण आपणास हार्मोनियम वाजवता यावी हे स्वप्न अधुरंच राहिलं. हार्मोनियमची धून ऐकली की मन मोहरतं, बहरतं, पण दुधाची तहान ताकावरच भागवावी लागते. ही उत्कट इच्छा आयुष्याच्या धबडग्यात पूर्णत्वाला गेलीच नाही.
मी सातवीत - आठवीत असताना गावातील भजनीमंडळ दसक्रोशीत प्रसिद्ध होतं. केशवबुवा आमचे भजनीमास्तर मुंबई नायगावचे वामन खोपकर नावाचे भजनीबुवा भजनीमंडळाचे मार्गदर्शक. परिसरात भजनाचे सामने असले की मंडळाला आवर्जून 'सुपारी' मिळत असे. आमच्या बुवांचं वैशिष्ट्य म्हणजे 'नागीन', 'अनारकली', 'तुमसा नही देखा', ‘प्यासा’ वगैरे सिनेमांतील सुप्रसिद्ध संगीत त्यांनी भजनात आणलं. ते हे सिनेसंगीत पेटीवर इतकं मस्त वाजवीत की पब्लिक त्यांच्यावर फिदा होत असे. माझं मन मला बजावून सांगत असे, “अरे तुला कधी अशी धून वाजविता येईल? ”
माझे मावसभाऊ सुभाष आणि दिलीप हे दोघेही छान हार्मोनियम वाजवतात. शिवाय तबला, बासरी वाजविण्यात देखील दोघेही निष्णात. मनात आलं, सुभाषलाच आपला गुरू करावं आणि त्याच्याकडून पेटी शिकून घ्यावी. आपली स्वतःची पेटी असावी म्हणजे कधीही फावल्यावेळी पेटीचा सराव करात येईल. सुभाषला घेऊन शुभस्य शीघ्रम या न्यायाने दादरला विश्वनाथ हरीभाऊ कंपनीच्या दुकानात गेलो. आणि बाजाची पेटी खरेदी करून आणली.
सर पेटी शिकत आहेत, सुभाषकाका त्यांना शिकविणार आहेत ही कौतुक वार्ता गावात, शेजोळात पसरली तेव्हा माझं वय चाळीस-पंचेचाळीस असेल. रोज सुभाष माझ्या घरी येऊन काळी पाच, सफेद पाच सारेगमपदनी हे सप्तसूर कोणते वगैरे प्राथमिक माहिती देऊन पेटी शिकायची तर शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायची हा महत्त्वाचा धडा देत असे. पण मला पेटी शिकायची इच्छा असली तरी अवधानं अनेक नोकरी, संसार आणि समाजसेवा या शिवाय शेती व्यवसाय यात खूप वेळ जात असे. शिवाय वाचन-लेखन-भ्रमंती-निसर्ग निरीक्षण वगैरे छंद होतेच. नव्या छंदाला साहजिकच वेळ फार कमी मिळत असे.
सुभाषने सुरुवातीला स्वर दाखवून दिले आणि 'तू प्यार का सागर है' हे सिनेगीत शिकवलं. एका दिवसात हे गाणं मी पेटीवर वाजवू लागलो. आणि मला कोण आनंद झाला? 'आनंदाचे डोही, आनंद तरंग! आनंदची अंग आनंदाचे' अशी माझी भावावस्था झाली. आपण लवकरच सराईतपणे पेटी वाजवू असं अंतर्गत म्हणू लागली. पण कसचं? 'अ मॅन प्रपोजेस अँड द गॉड डिस्पोजेस्' हेच खरं.
मला पोटदुखीने ग्रासलं, सुभाषला मुंबईला नोकरी लागली मला शिक्षकाची नोकरी करणं क्रमप्राप्तच होतं. दोन परिणामत: छंद पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. बाजाची पेटी कोणाला तरी देऊन टाकली. 'तू प्यार का सागर है' च्या पलीकडे मी गेलो नाही. आज पंच्याहत्तर वय चालू आहे. हा छंद पूर्ण होणं आता कठीण आहे.
- डॉ. नेताजी रा. पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
August 18, 2022
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक, दासबोध सारख्या लिखाणातून समर्थांनी जगायचं कसं हे सांगितलं. सुमंत उवाच हे जगावं कसं? या प्रश्नाला समर्थांच्या कृपेने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आलेले उत्तर आहे
August 24, 2021
माझे वडील डॉक्टर होते तसेच काँग्रेसचे पुढारीही होते. काही काळ त्यांनी आमदारकीही भूषवली. मीही डॉक्टर होऊन त्यांची जागा घ्यावी आणि आपल्याला शांत मनाने निवृत्त होता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे नाटकाची आवड असूनही शाळेत कधी अभिनय केला नाही.
May 5, 2024
१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्नावली सुचवली. समाधान, आयुष्यावरील नियंत्रणाची भावना, सहभाग, बांधिलकी (वचनबद्धता), दैनंदिन जीवनात कामाचा समतोल इत्यादी घटकांबाबत एखाद्याचे व्यक्तिगत आकलन काय आहे, मूल्यांकन काय आहे हे घटक जीवनाची गुणवत्ता मोजण्याच्या प्रक्रियेत महत्वाचे ठरतात.
February 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti