(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • केवळ कृषी पर्यटन नव्हे. . . . .तर एक संस्कार !

    केवळ कृषी पर्यटन नव्हे. . . . .तर एक संस्कार !

    लक्ष्मीपूजन आटोपलं की दुसऱ्या दिवसापासून भटकंतीला निघण्याचा शिरस्ता आम्ही कसोशीने पाळतो. कृषी क्षेत्रातील कामाच्या निमित्ताने मी सतत देशभर भटकत असलो तरी आम्हा तिघांना एकत्र भटकंती करण्याची ही एकमेव संधी आम्ही कधीही सोडत नाही. या वर्षीच्या भटकंतीचा प्रारंभ झाला ‘आमंत्रण’ या कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन. पुणे व मुंबईपासून केवळ ९५ किमी अंतरावर असलेलं व सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, जुन्नरपासून हाकेच्या अंतरावरील हे पर्यटन केंद्र ओझर व लेण्यान्द्री येथील गणपती व शिवनेरी किल्याच्या सानिध्यात शांतपणे पहुडलेलं आहे. मुंबई-पुण्याच्या प्रदूषित वातावरणापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात मोकळा व आरोग्यपूर्ण श्वास घ्यायचा असेल आणि आजच्या जगात अत्यंत दुर्मिळ झालेली निखळ शांतता अनुभवायची असेल तर निसर्गाचं हे ‘आमंत्रण’ अवश्य स्वीकारा! शहनाईच्या पार्श्वभूमीवर पाकळ्यांच्या वर्षावात व पंचारती ओवाळून होणारं पर्यटकांचं देवदुर्लभ स्वागत त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. नक्षत्रवन, सुगंधी व औषधी वनस्पती, अस्सल देशी बियाण्यांपासून लागवड केलेली विविध पिके, फुलझाडे व फळझाडांची ओळख करून देण्यासाठी अफाट उत्साहाचा धबधबा असलेले आमंत्रणचे संचालक श्री. शशिकांत जाधव आपल्यासोबत असतात. त्यांच्या सानिध्यात या परिसराची भटकंती हे केवळ पर्यटन नसून एक चालता-बोलता संस्कार वर्ग कसा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. दमछाक झाल्यानंतर सौ. कविता जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या सुग्रास भोजनाचा आनंद घेऊन बांबूच्या बनातील गर्द सावलीत थंडगार वाऱ्याच्या लाटांवर स्वतःला झोकून देत एक झकास डुलकी घ्यावी आणि जाग आल्यानंतर मसालेदार चहाचे घोट घेत काव्य-शास्त्र-विनोदाची मैफल जमवावी. ज्यांना धांगडधिंगा, डी.जे., वॉटर स्पोर्ट्स या गोष्टींची आवड आहे त्यांनी ‘आमंत्रण’च्या वाटेला जाऊ नये. पण ज्यांना आयुष्यातील मोलाचे क्षण शुध्द प्राणवायूने भरलेल्या शांततेत व्यतीत करायचे असतील त्यांनी मात्र ‘आमंत्रण’ला विसरू नये !

    पर्यटकांच्या माहितीसाठी :
    आमंत्रण कृषि पर्यटन केंद्र, गोळेगाव, ता : जुन्नर, जि : पुणे.
    संपर्क : श्री. शशिकांत जाधव : 99700 56412
    ई.मेल : jadhavshashikant778@gmail.com
    वेबसाईट : www.aamantranagritourism.com
    यूट्यूबवर व्हिडिओ : Aamantran agri tourism

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिवस

    केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिवस

    CISFची स्थापना झाली तेव्हा त्यात एकूण २८०० जवान काम करत होते, पण आज या सुरक्षा दलात सुमारे १६५००० हून अधिक जवान आहेत.

  • कुमारी/कोरफड

    कुमारी/कोरफड

    हिचा वापर आपण घरगुती उपचारांमध्ये सर्रास करत असतो.तशी हि आपल्या सर्वांचीच अगदी जीवाभावाची सखी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.कारण प्रत्येकाच्या घरात अंगणात हिचे एखादे तरी रोप आढळतेच.

    हिचे क्षुप ०.३३-०.६५ मीटर उंच असते.पाने ३०-४० सेंमी लांब व ७-१० सेंमी रूंद असतात.हि टोकाकडे निमुळती होत जातात.पाने मांसल असतात त्यांच्या कडा काटेरी असतात व पृष्ठ भागावर पांढरे ठिपके असतात.पानात बुळबुळीत पारदर्शक गर असतो.जुन्या क्षुपात मध्यभागी अंक दण्ड निंघतो व त्याच्या टोकाला तांबूस फुल येते.कोरफडीच्या रसा पासून घनसार बनवितात ज्याला काळाबोळ असे म्हणतात.

    हिचे उपयुक्तांग आहे पान.कोरफड चवीला कडू,गोड असून थंड,जड व स्निग्ध असते.तर काळा बोळ हा कडू,उष्ण तसेच हल्का,रूक्ष,तीक्ष्ण असतो.
    हिचा उपयोग अवस्थानुरूप तीन्ही दोषांवर होतो.

    चला आता आपण हिचे उपयोग जाणून घेऊयात:

    १)वेदना व सुज असलेल्या जागी काळ्याबोळाचा लेप करतात.

    २)पोटफुगी व पोटदुखी ह्या कुमारच्या गर साजूक तुप व मिरपूडी सोबत देतात.

    ३)तापामधील अंगाचा दाह कमी करायला कुमारीचा उपयोग होतो.

    ४)रक्ताल्पते मध्ये तसेच काविळ ह्यात यकृताचे कार्य कुमारीने सुधारते.

    ५)कोरफडीचा गर भाजलेल्या व्रणावर लावल्यास जखम लवकर भरते व दाह कमी होतो.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • कुत्र्यांशी मैत्री

    कुत्र्यांशी मैत्री

    ए२बी ही खूण आढळणारे हे सर्व कुत्रे, सायबेरिआतील कुत्र्यांच्या पूर्वजांपासून सुमारे तेवीस हजार वर्षांपूर्वी निर्माण झाले असल्याची शक्यता या संशोधकांना दिसून आली.

  • कूछ तो लोग कहेंगे

    कूछ तो लोग कहेंगे

    माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपली जडण घडण देखील या समाजात झाली आहे… आपण सर्व या समाजाचे भाग आहोत आणि या समाजात राहणाऱ्या लोकांची आपण जरा जास्तच पर्वा करतो. आम्हाला नेहमी अशी भीती असते ही लोकं काय म्हणतील पण आपण विसरलो की आपल्या त्रास आणि संघर्ष या मध्ये हे  लोकं कधीच आपल्या सोबत नसतात.

  • किस डे

    किस डे

    ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या केवळ एक दिवस आधी येणारा किस डे हा दिवस म्हणजे प्रेमाचा शेवटचा टप्पाच म्हणावा लागेल. आज याच किस डे निमित्त किस या शब्दाचा उगम कसा झाला याबद्दल बघू.

    किस (Kiss) हा शब्द जुन्या इंग्रजीमधील ‘सीसन’ (cyssan) या शब्दापासून जन्माला आला आहे. ‘सीसन’चा अर्थ होतो चुंबन घेणे. पण आता हा सीसन शब्द कुठून आला याबद्दल ठोस माहिती कोणालाच नसली तरी अनेकांच्या मते चुंबन घेताना लोक जो आवाज करतात त्यावरून या मूळ शब्दाची निर्मिती झाली असणार.

    रोमन लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चुंबनासाठी वेगवेगळे शब्द वापरले. जसे हात किंवा गालावर घेतलेल्या चुंबनाला बासीयम (basium) म्हणत तर चुंबन घेताना तोंड बंद केल्यास त्या चुंबनाला ऑस्कूलम (osculum) म्हणून संबोधले जात असे. तर उत्साहाने (उत्कट भावनेने) घेतलेल्या चुंबनाला सेव्हील्यूम (saviolum) म्हणून ओळखले जात असे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • किशोर मासिकाची पन्नास वर्ष

    किशोर मासिकाची पन्नास वर्ष

    महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत ‘किशोर’ची निर्मिती झाली, ती मूळ संकल्पना होती, तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची.

  • किर्लोस्करवाडी : महाराष्ट्राचा मानबिंदू!

    किर्लोस्करवाडी : महाराष्ट्राचा मानबिंदू!

    सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली.

  • किराततिक्त/काडेचिराईत

    किराततिक्त/काडेचिराईत

    आपण लहान असताना आपली आई किंवा आज्जी दर रविवारी आपल्याला सकाळी उठवून जे बाळकडू पाजत ते हेच किराईते.कृमींपासून संरक्षण व पोटला बरे म्हणून आज हि बऱ्याच घरांमधून सर्वांनाच हा कडू काढा रविवारी पाजण्याची प्रथा आहे.

    ह्याचे ०.५-१.५ मीटर उंचीचे वर्षायू क्षुप असते.काण्ड खाली गोल व वर चतुष्कोणी असते.पाने अभिमुख ५-७ सेंमी लांब व १-२ सेंमी रूंद असतात.पाने भालाकार असतात.पुष्पमंजिरी अनेक उपशाखा युक्त व त्याला हिरवट पिवळी फुले येतात.फळ अंडाकार व ५ सेंमी व्यासाचे असते व बीज स्निग्ध व बहूकोणी असते.

    ह्याचे उपयुक्तांग पंचांग अाहे.ह्याची चव कडू असून,हे थंड गुणाचे असते व हल्के व रूक्ष असते.हे वातकर असून शरीरातील कफ व पित्त कमी करते.

    चला आता आपण काडेचिराईताचे उपयोग जाणून घेऊ:

    १)काडेचिराईताचा काढा जखम धुवायला वापरतात.

    २)ह्याचा काढा कृमिंमध्ये उपयुक्त आहे.

    ३)तापामध्ये देखील काडेचिराईत उपयुक्त आहे.

    ४)त्वचा रोगांमध्ये स्त्राव व खाज कमी करण्यासाठी काडोचिराईत उपयुक्त आहे.

    ५)अम्लपित्तामध्ये काडेचिराईत व माक्याचा काढा मध घालून देतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किनारी भागात होणारी बांगलादेशीं घुसखोरी देशाच्या सुरक्षेकरता एक मोठा धोका

    किनारी भागात होणारी बांगलादेशीं घुसखोरी देशाच्या सुरक्षेकरता एक मोठा धोका

    २०१८ आणि २०१९ मधे होणार्‍या निवडणुकात बांगलादेशींना बांगलादेशात परत पाठवणे हा एक महत्वाचा मुद्दा म्हणुन पुढे आला पाहिजे. भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात बोलायला भारतातील राज्य सरकारे, बहुतेक राजकीय पक्ष,नोकरशाही आणि वृत्तपत्रे तयार नाही. बांगलादेशींना Detect करणे, त्यांची नावे मतदारयादीतून Delete करणे व त्यांना बांगलादेशात Deport करणे हाच यावर उपाय आहे.