वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
उरी ‘ पुन्हा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ‘ ऍक्सिडेंटल प्राइमिनिस्टर ‘ पाहिला , आणि खरं सांगतो राहवलंच नाही. लेखणी पुन्हा हाती घेतली.
February 13, 2023
या जगातला प्रत्येक व्यक्ती व्हॉटसअप स्टेटस स्वतःच्या पद्धतीने वापरत असतो. जसे एखादा नाराज असलेला व्यक्ती आपले दुःख त्याला कोणाला सांगायचे असेल तर तो इंटरनेट वर जाऊन त्याचा दुःखाचा संबंधित फोटोज् स्टेटस वर टाकतो. त्यातून त्या व्यक्ती अनेक अर्थ त्याचा ओळखीच्यांना सांगायचे असतात. त्यात अनेक प्रकार आहेत. जसे कोणाचे प्रेम संबंध मध्ये भांडण झाले असेल तर त्याचा लगेच आजकल चे मुल मुली व्हॉटसअप स्टेटस वर त्या संबंधित लिहितात किंवा नाराजीचा emoji टाकतात.
July 8, 2024
१६ एप्रिल १८५३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली ट्रेन धावली. तीन इंजीनं आणि वीस डब्यांच्या या गाडीनं हे अंतर ५८ मिनिटांत पूर्ण केलं..हे त्या काळचं एक मोठ्ठ आश्चर्य होतं.
April 22, 2016
जगभरात कृषि प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकर्यांाची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रातात प्रगति की अधोगती सुरू आहे. शेती उद्योगाला गती देण्यासाठी शेतकर्याससाठी कृषि व्याख्याने,या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्याा व्यक्तींचा सत्कार,कृषि प्रदर्शन,मेळावे आदि उपक्रम राबवणे गरजेचे आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता.तो आज २२ ते २५ टक्याच्या आसपास आला आहे. आज समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करते. मात्र देशाचा व जगाचा पोशिंदा अशी मोठी बिरुदावली असलेल्या शेतकरी व शेतीच्या प्रगतीसाठी, शेतीमालच्या दरवाढीसाठी, शेतकर्याटची आर्थिक,सामाजिक स्थिति सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात का हाही संशोधनाचा विषय आहे.
आज देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत असताना देशभरातील शेतकरी राजाची सध्याची स्थिति, त्यांचा आर्थिक स्तर, सामाजिक पत, त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक आदि बाबीचा विचार करणे यानिमित्ताने गरजेचे आहे. सरकारे आली पुन्हा बदलली मात्र शेतकरी राजाची परस्थिती मात्र जैसे थे अश्याच स्वरूपाची असते. राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमिताने शेतकर्यारची आर्थिक ऊंची वाढवण्यासाठी शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल सुचवणे, ते अमलात आणण्यासाठी त्यांना तयार करने व विशेष म्हणजे शेतकरी सद्य स्थितीत भेदरलेल्या व कर्जबाजारी अवस्थेत असल्यामुळे त्याला उभे करण्यासाठी अर्थ पुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकरी उभा राहिला तरच देश प्रगतीची शिखरे पार करू शजेल.
शेतीच्या क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ला मोठी संधी आहे. त्याकरिता तंत्रज्ञानाचा विकास व गुंतवणुकीची गरज आहे. आज जो शेतीचा थोडा फार विकास झाला आहे. त्याला मोठय़ा प्रमाणात यांत्रिकीकरण कारणीभूत आहे. १९६५-६६ सालापर्यंत शेतीतील यांत्रिकीकरणाने गती घेतलेली नव्हती. शेती ही पारंपरिक पद्धतीने माणसाची मेहनत व कष्ट तसेच बलांच्या साहाय्याने केली जात होती. नांगर, वखर, पाभर, नांगरी ही बल मशागतीची साधने, तर पाणी उपसण्यासाठी मोटांचा वापर होत होता. त्यामुळे त्या वेळी शेतीत उत्पादकताही कमी होती. लोकांच्या भुकेचा प्रश्न ही शेती सोडवू शकली नाही. पहिल्या दोन पंचवार्षकि योजनांमध्ये भर देऊनही कृषी यांत्रिकीकरणाला गती मिळाली नाही. मात्र हरितक्रांतीनंतर हे चित्र बदलले. त्यातून उत्पादकता वाढीस लागली. बहुपीक पद्धती आली. शेतीविकासाला खरी गती विजेच्या वापरामुळे मिळाली. मोटा गेल्या, विजेचे पंप आले. त्याने पिकांचा पाणीपुरवठा गतिमान झाला. देशात कृषी यांत्रिकीकरण २२ टक्के आहे. त्यापकी पंजाबमध्ये ते सर्वाधिक ७५ टक्के एवढे आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र पिछाडीवर आहे. आता पिकाला पाणी देण्याकरिता यांत्रिकीकरणाची गरज सर्वाधिक आहे.
दुर्दैवाने ठिबक व स्प्रिंकलरच्या अवघ्या ४० कंपन्या आहेत. मात्र असे असले तरी आयएसआय मानांकन नसलेल्या हजारांहून अधिक ठिबक व तुषारच्या कंपन्या आहेत. आयएसआय असलेल्या ठिबकला अनुदान मिळते, इतर कंपन्यांच्या ठिबकला सरकार अनुदान देत नाही. असे असूनही शेतकरी आता या कंपन्यांकडे वळले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील आयएसआय ठिबक मक्तेदारी असलेल्या कंपन्यांपुढे संकटे आली आहेत. पूर्वीचे दोष दूर झाल्याने शेतकरी ठिबककडे वळले आहेत. त्यात जमिनीखालचे ठिबक, रेन पाइप, रेन गन, मिनी स्प्रिंकलर हे तंत्र आले आहे. या तंत्राने पाणीवापर कमी होत असून जास्त उत्पादन निघत आहे. पावसाचे पडलेले पाणी तळ्यात साठविले जाते, तळ्यात ५०० मायक्रॉनचा प्लास्टिक कागद वापरला जातो. पडलेले पाणी पकडून ते जमिनीत मुरवण्याऐवजी थेट पिकाला दिले जाते. पॉली हाऊस, ग्रीन हाऊसची संख्या वाढत आहे. अत्यंत आशादायी असे चित्र निर्माण होत असले तरी अद्याप काही ठरावीक कंपन्यांची मक्तेदारी या क्षेत्रात असून त्यामुळे स्पर्धा न झाल्याने दर कमी झालेले नाहीत. जर गुंतवणूक वाढली, नवे उद्योग उभारले गेले, तर बंदिस्त शेतीला अधिक चांगले दिवस येतील.
शेतीत माती परीक्षण व पाणी परीक्षण याला महत्त्व आहे. यापूर्वी केवळ माती परीक्षणाच्या सरकारी प्रयोगशाळा होत्या. आता खासगी प्रयोगशाळा आल्या आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील द्राक्ष बागायतदारांनी पाने तपासणीच्या प्रयोगशाळा उभारल्या आहेत. विशेष म्हणजे पिकावर कीड व करपा येतो. कोणता रोग आला हे तपासणाऱ्या प्रयोगशाळा कृषी विद्यापीठांमध्ये नाहीत, पण त्या शेतकऱ्यांकडे आहेत. त्याकरिता लागणारी यंत्रणा ही आयात करावी लागते. देशात त्याचे उत्पादन झाले तर किडीमुळे होणारे नुकसान टळून रसायनांचा वापर कमी होईल. आता संगणकाचा वापर शेतीत वाढला आहे. परदेशात शेतकरी हे संगणकाच्या साहय़ाने पिकांना खते व पाणी देतात. खासगी कंपन्यांचे तंत्रज्ञान त्याकरिता घेतले जाते. ते तंत्रज्ञान महागडे आहे. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात त्यावर जोर दिला तर मात्र वेगळे चित्र पाहायला मिळेल.
आज देशात एकही कीटकनाशक व बुरशीनाशक तयार होत नाही. हजारो कोटी रुपयांची ही बाजारपेठ आहे. त्याकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने लक्ष दिलेले नाही. ते जर आपल्याकडेच तयार झाले तर परदेशी चलन वाचू शकेल. आज काढणीपश्चात तंत्रज्ञानही विकसित झालेले नाही. प्रक्रिया क्षेत्रातही आपण पिछाडीवर आहोत. भात, डाळी, तेल व साखर एवढेच उद्योग त्यात आहेत. अन्य शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. आज जगात रोबोटिक टेक्नॉलॉजी, ड्रोन, पॉलिफोनिक, गार्डनर, एरोपॉनिक व हायड्रोएरोपॉनिक हे तंत्र आले आहेत. त्यामुळे भविष्यात शेतीचा प्रवास एका नव्या दिशेने होणार आहे.
भविष्यात जागतिक तापमानवाढ, पाणीटंचाई, हवामानबदल या पाश्र्वभूमीवर कृषी अभियांत्रिकीचा वाटा अधिक असणार आहे; पण त्याकडे संशोधन संस्थाच दुर्लक्ष करीत आहे. आíथक गुंतवणूक न येण्याचे ते कारण आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ हे केवळ स्वप्न ठरू नये म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ अशोक तुपे
December 23, 2018


भारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. प्रत्येक चित्राचा वेगळा ठसा (ब्लॉक) बनवून छपाई केली जात असे. एकदा व्यंगचित्र प्रकाशित झाल्यावर त्या ब्लॉक/ ठोकळ्याचा काहीही उपयोग होत नसे म्हणून छोट्या दैनिकांना/ छोट्या मासिकांना व्यंगचित्र छपाईचा खर्च करणे परवडत नसे. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात फारच कमी व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्र रेखाटणे हा पूर्ण वेळेचा, पोटापाण्याचा व्यवसाय नसल्याने व्यावसायिक चित्रकारच कधीतरी गरजेप्रमाणे व्यंगचित्रे रेखाटून देत असत. फारच मोठ्या दैनिकांकडे/ प्रकाशन संस्थांकडे निवडक व्यंगचित्रकार नेमण्याची ऐपत असे.
July 3, 2025
पूर्वीच्या काळी आपल्या सर्वांची जीवनशैली आणि राहणीमान, ही सोपी आणि सुटसुटीत आणि एकसंध अशी होती. एकत्र कुटुंबामध्ये सर्वप्रकारचे सण, कार्ये उत्सव साजरे व्हायचे. शेती, नोकरीधंदा तत्सम उद्योगामध्ये घरची मंडळी व्यस्त असायची. त्यामुळे जगण्याला फारसे पदर नसायचे वा सार्वजनिक वावर हा क्वचित प्रसंगी असायचा. आजच्या गतिमान युगात मात्र बदलत्या वेगवान जीवनशैलीमुळे सर्वांचा सार्वजनिक जीवनातला सहभाग वाढला आहे.
December 26, 2015
१०४ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची अफाट कामगिरी केल्याबद्दल इस्रो च्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके कमी आहे. इस्रो असू दे किंवा डी आर डी ओ यात काम करणारी शास्त्रज्ञ मंडळी म्हणजे आधुनिक ऋषी आहेत आणि सुदैवाने आजपर्यंतच्या सरकारांनी त्यांची हि स्वायतत्ता कायम राखली आहे. बहुसंख्य मंडळी दक्षिण भारतीय, बहुसंख्य मंडळी ब्राह्मण आणि अत्यंत धार्मिक. खऱ्या अर्थाने ज्ञानी आहेत आणि त्यामुळे मानवी ज्ञानाच्या कक्षा सुद्धा त्यांना ज्ञात आहेत. कर्मयोगी आहेत आणि त्यातूनच नकळत अध्यात्मिक प्रगती सुद्धा साधली गेली आहे आणि म्हणूनच मी फक्त निम्मित्तमात्र आहे, कर्ताकरविता तो ईश्वर आहे आणि म्हणून माझी प्रत्येक रचना त्याच्या चरणी अर्पण करून मी पुढे जातो आहे हि अस्सल योग्याच्या हृदयात असणारी भावना, आपल्या हृदयात बाळगून हि मंडळी कार्यरत असतात. काम करण्यासाठी मिळणारा अत्यल्प निधी, सरकारी खाक्यातूनच मिळणारे श्रेणीनिहाय वेतन जे तुलना केली असल्यास पाश्चात्य देशातील शास्त्रज्ञांच्या वेतनाच्या फक्त १० % भरेल त्यात सुद्धा समाधानी राहून, इतर केंद्रीय कर्मचारी ओव्हर टाईम सारख्या सगळ्या सुविधा घेत असताना घड्याळ्याच्या काट्याकडे न पाहता काम करणारे हे आधुनिक ऋषी पहिले कि आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते.
केंद्र आणि राज्य सरकार चालवत असणाऱ्या इतर कोणत्याही संशोधन संस्थाना टार्गेट नसते. तेथील मंडळी अक्षरशः पाट्या टाकत असतात. हे मी पाहून पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे. मध्यंतरी औरंगाबाद मधील बाजरी संशोधन संस्थेच्या एका शास्त्रज्ञाच्या भेटीचा योग आला. मी त्यांना विचारले तुम्ही काय करता ? बाजारीवर संशोधन करतो. मग एखादे नवीन वाण विकसित करत आहात का ? नाही आम्ही संशोधन करतो. उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी संकरीत वाण तयार करत आहात का ? नाही आम्ही संशोधन करतो . इतकेच उत्तर ते देत होते. मी त्यांना विचारले तुम्हाला काही टार्गेट नसते का ? त्यावर त्यांनी नाही हे उत्तर दिले. आपल्या देशातील कृषीक्षेत्राची वाट लागण्यास असल्या कृषी संस्था आणि विद्यापीठे जबाबदार आहेत आणि या उलट इस्रो हि सतत नासाशी स्पर्धा करण्याच्या आणि त्यांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात असते. डी आर डी ओ ला तर सतत चीन आणि अमेरिकेवर नजर ठेवून त्यांच्या तोडीची शस्त्रात्रे विकसित करावी लागतात आणि ती सुद्धा इंडियन प्राईस मध्ये. परंतु हि मंडळी जिद्दीने आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन हे कार्य निरलसपणे करत असतात.
मंगलयान प्रकल्पावर मध्यंतरी डिस्कव्हरी च्यानेलने एक सुंदर वृत्तांत दाखवला. त्यात त्यांनी दाखवले कि ज्यावेळी मंगलयान हे मंगल ग्रहाच्या कक्षेत जाणार होते त्यावेळी काही काळ अश्या लोकेशन ला असणार होते कि त्या यानाला सूर्य अथवा पृथ्वी काहीही दिसणार नाही आणि तरीसुद्धा त्याला त्याचे को ordinate पृथ्वीशी सेट करावे लागतील. या टप्प्यावर जाऊनच यापूर्वीच्या मंगलयानांच्या मोहिमा अपयशी झालेल्या होत्या. इस्रो ने या साठी प्राचीन भारतीय ऋषींच्या ज्ञानाची मदत घेतली. वराहमिहीर हा प्राचीन astro फिजिशियन होता त्याने या परिस्थितीत तुम्ही तुमचे लोकेशन इतर ग्रहांच्या अभ्यासाने कसे ठरवावे याचे मार्गदर्शनपर लेखन केलेले आहे. ( त्याच्यामते तो देहातीत अवस्थेत या पद्धतीने अंतराळात संचार करू शकत असे आणि ते इतर ऋषींना सुद्धा साध्य होते ) त्याच्या गणितीय माहितीचा आधार घेऊन इस्रो मध्ये कार्यरत असणाऱ्या astro फिजिशियन शास्त्रज्ञांनी मंगलयानाचे परिभ्रमण ठरवले आणि त्यांचे ज्ञान किती परिपूर्ण असेल कि पहिल्याच प्रयत्नात भारताने हि मोहीम यशस्वी केली. हा संपूर्ण प्रकल्प अत्यल्प खर्चात पूर्ण करणे साध्य व्हावे म्हणून या मंडळीनी गोफणीच्या तत्वाचा वापर करून मंगलयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यावर अंतराळात अक्षरशः भिरकावून दिले. आणि तब्बल ३०० दिवस कोणत्याही इंधनाचा वापर न करता इंजिन बंद करून हे मंगलयान मंगळाजवळ दाखल झाले. या शास्त्रज्ञांच्या बुद्धीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. भोवताली नकारात्मक वातावरण असताना सुद्धा सकारात्मक वृत्तीने प्रत्येक संकटाला प्रत्येक अल्प साधनांना एक संधी समजून आपल्या बुद्धीला आव्हान समजून त्यातून काही तरी असे अफाट घडवणाऱ्या या शास्त्रज्ञ मंडळीना आपण सामान्य भारतीयांनी लाख वेळा शीरसाष्टांग वंदन केले तरी सुद्धा ते कमीच असेल. या अश्या तमाम अग्नीदिव्यातून जाऊन हि मंडळी प्रकल्प पूर्ण करतात आणि कृष्णार्पणमस्तु भावनेतून त्याची प्रतिकृती ईश्वराला अर्पण करतात आणि नवीन जबाबदारी स्वीकारतात.
दुर्दैवाने आपल्या देशात पुरोगामी नावाची एक अत्यंत मनोविक्रृत जमात अस्तित्वात आहे त्यांना प्रतिकृती मंदिरात अर्पण करणे सुद्धा त्यांच्या पुरोगामी पणाचा अपमान वाटतो आणि ते या शास्त्रज्ञ मंडळीना अंधश्रद्धा पसरवत आहेत म्हणून फैलावर घेतात. यांच्या विद्वत्तेच्या आणि ज्ञानाच्या एक शतांश पातळीवर नसणारी अर्धवट अक्कल असणारी मंडळी अशी टीका करताना पाहून मन खरच विदीर्ण होते.
असो. परत एकदा आधुनिक ऋषी मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि आम्हाला विश्वास आहे असे अभिमानाचे क्षण या राष्ट्राच्या नशिबी तुमच्यामुळे वारंवार येणार आहेत .
(अतिशय सुंदर असलेल्या या लेकाचे लेखक कोण आहेत ते माहित नाही. Whatsapp वरुन आलेला हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत)
March 3, 2017
आपल्या विश्व प्रसिद्ध असणाऱ्या मेघदूतम् नावाच्या काव्यात महाकवी कालिदास यांनी ज्या नगरीचे वर्णन करताना, वाट वाकडी करावी लागली तरी चालेल पण या नगरीला निश्चित जा.
September 6, 2020
आपल्यापेक्षा उच्च पातळीवर असलेल्या कशाहीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा नैसर्गिकपणे आपण गृहीत धरलेले असते- ते काहीतरी गुह्य,गूढ असते आणि कदाचित अज्ञातात (आपल्या आकलनाच्या परिघापलीकडे) अस्तित्वात असू शकेल, जेथे आपले विचार पोहोचू शकत नाहीत. कदाचित म्हणूनच आपल्याला अध्यात्माचे आकर्षण वाटत असेल.
March 9, 2023
आत्मपूजा उपनिषद केवळ १५ श्लोकांचं आहे आणि त्याच्या प्रत्येक श्लोकात स्वतःचा उलगडा घडवून आणण्याची किमया आहे; म्हणून ही लेखमाला. : सर्व प्रस्थापित अध्यात्मात मी हा एकमेव अडथळा मानला गेला आहे. या मी लाच सर्वेजन अहंकार समजतात आणि तो हटवण्यात साधकांचं आयुष्य वेचलं जातं; तरी तो हटत नाहीच.
December 28, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti