(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १०

    भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
    केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही.

      October 11, 2020


  • कल्की जयंती

    भगवान विष्णूंचा दहावा अवतार. काहींचे मते तो होऊन गेला तर पुराणांच्या मते तो होणार आहे. कल्की पुराणात कलीयुगाचे शेवटी हा अवतार होईल असे सांगितले आहे.

      August 22, 2023


  • किचन क्लिनीक – लिंबू

    किचन क्लिनीक – लिंबू

    लिंबू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके फळ.ह्या फळाचा आपण खायला तर उपयोग करतोच जसे लिंबू सरबत,लोणचे ते हि वेग वेगळ्या प्रकारची,तसेच कोणत्याही पदार्थांची लज्जत वाढवायला ह्याचा रस आपण हमखास त्या पदार्थावर पिळतो.तसेच हे फळ फक्त खायलाच वापरले जाते असे नाही बरं का ह्या बिचाऱ्याचा उपयोग जारण मारण अर्थात काळ्या विद्येत करतात म्हणे,तसेच दृष्ट बाधा होऊ नये म्हणून आपण लिंबू मिरचीचे तोरण आपल्या घर वाहन ह्याला लावतोच ना! तर मंग असा हा बहुपयोगी लिंबू.ह्या फळाने अगदी आनंद,आजारपण,वाईट काळ ह्या सर्वांत आपली साथ न सोडण्याचा जणू पणच केला आहे.
    असा हा बहुपयोगी मित्र लिंबू.

    ह्याचे मोठे झुडूप असते.ह्याच्या फांद्यावर काटे असतात.पाने गोल,तेलकट,हिरवी चमकदार व विशिष्ट गंधयुक्त असतात.ह्याचे दोन भेद आहेत गोल,व पातळ पिवळी साल असलेला आणी दुसरा लांबट जाड हिरवी साल असलेला.
    मला पिवळे रसरसशीत लिंबू जाम आवडतात बुवा.

    लिंबु हा चवीला आंबट,उष्ण व वातनाशक आहे पण हा पित्त व कफ वाढवतो.
    चला आता ह्याचे काही घरगुती उपचार पाहूया:

    १)संडासमधून आव पडणे किंवा पातळ जुलाब होणे ह्या लिंबू गरम करून त्याचा रस काढावा व त्यात सैंधव व साखर मिसळून थोड्या थोड्या वेळाने १/२ चमचा पित रहावे.

    २)अजीर्ण,उल्ट्या,तोंडाला चुळा सुटणे ह्यात लिंबाचा रस १ चमचा+ मध २ चमचे हे मिश्रण चाटावे.

    ३)अजीर्णा मुळे घशाशी आंबट येत असल्यास २ चमचे लिंबू रस+ १/४ कप गार पाणी+ १ चिमूट खायचा सोडा हे मिश्रण घ्यावे.

    ४)लघ्वीतून खर पडत असल्यास लिंबाचा रस १ चमचा+कोथिंबीर रस १ चमचा हे मिश्रण कोमट पाण्यातून २-३ वेळा दिवसातून काही दिवस घ्यावे.

    ५)लिंबूरसात हळकुंड उगाळून त्यात १ चिमूट कापूर घालून हे मिश्रण सर्वांगास चोळावे ह्याने त्वचे खाली असणारी चरबीची फाजील वाढ थांबते.तसेच त्वचा निरोगि व चांगली राहते.

    ६)एरंडेल लिंबूरसात घालून त्याचे मलम करावे व हे मलम पायांच्या भेगांना,त्वचा मऊ व्हायला व Natural After shave lotion म्हणून आपण वापरू शकता.

    लिंबू प्यायचा अतिरेक केल्यास दात आंब्यात व ठिसूळ होतात,तसेच हाडांवर देखील ह्याचा दुष्परिणाम दिसतो,त्यांच प्रमाणे सर्दी होते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 20, 2016


  • तेथे कर माझे जुळती…….

    वळवाचे पाऊस सुरू झाले,पहिल्या पेरण्या झाल्या की वारक-यांना वेध लागतात पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचे. मनामनात गजर सुरू होतो “ विठ्ठल विठ्ठल , जय जय पांडुरंग हरी...” वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. मी अगदी लहानपणापासून ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन, वारीला जाण्याची गडबड बघत व अनुभवत आलेली आहे. पण ते सर्व पुण्यासारख्या शहरी वातावरणात आलेल्या वारीची. प्रत्यक्ष वारक-यांशी बोलणे किंवा त्यांची पंढरपूरपर्यंत चालत जाण्याचे श्रम करण्यामागची भावना जाणून घेणे कधी जमलेच नव्हते. गतवर्षी योगायोगाने तुकारामांची पालखी जेव्हां बारामतीत पोहोचते तेव्हां आम्ही तिथेच होतो. त्यामुळे आसपासच्या छोट्या गावातून येणारे वारकरी जवळून पहाण्याचा योग आला.

    सकाळपासूनच वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून छोट्या मोठ्या दिंड्या यायला सुरूवात झाली होती. आम्ही जिथे उतरलो होतो तो रस्ता भर वस्तीतला, गजबजलेला होताच. पण या दिंडीतल्या वारक-यांच्यामुळे आज वेगळाच वाटत होता. उंच काठीवर डौलात फडकत असलेल्या भगव्या पताका एका खांद्यावर मिरवत, दुस-या खांद्याला अडकवलेली पिशवी सावरत, डोक्याला मुंडासे, लांब बाह्यांचा पांढरा सदरा,पांढरे धोतर व पायात चपला अश्या वेशातले वारकरी तोंडाने विठ्ठलाचा गजर करत रस्त्याने लगबग करत चालले होते. त्यांच्या मागोमाग गोल किंवा नऊवारी साडीतल्या नथी घातलेल्या बायका भराभर नामस्मरण करत चालल्या होत्या.काही बायकांच्या काखेत स्वच्छ चकचकीत पाण्याच्या तांब्यापितळेच्या कळशा तर काहींच्या डोक्यावर छान रंगवलेले तुळशी वृंदावन होते. त्यातली तुळस त्यांच्या चालण्याच्या ठेक्याबरोबर डुलत होती.बहुतेक जणांच्या गळ्यात लांबलचक दोरीला बांधलेले टाळ होते.कुणाकुणाच्या खांद्यावर वीणा तर कुणाच्या हाती चिपळ्याही होत्या.एका ठेक्यात येणारा टाळांचा आवाज आसमंत भरून टाकत होता.

    दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येत होते, तुकारामांची पालखी ज्या भल्यामोठ्या मैदानात उतरते त्याच्या जास्तीत जास्त जवळ आपापली पडशी/पिशवी ठेऊन जागा मिळवून विसावत होते.संध्याकाळच्या सुमारास रस्ता परत एकदम गजबजला. विठ्ठलाचा गजर दुमदुमू लागला, त्याच्या जोडीला “ ज्ञानोबा माऊली तुकराम ” हाही गजर सुरू झाला.या सर्वांच्यावर आवाज काढत टाळ दुमदुमू लागले. रस्त्यात एकच लगबग सुरू झाली. प्रत्येक वारक-याची धावपळ पालखीला सामोरे जाण्यासाठी सुरू झाली. अशातच तुकाराम महाराजांची पालखी गावच्या वेशीवर पोहोचल्याची बातमी आली आणि वारक-यांची उत्सुकता व आनंद त्यांच्या चेह-यावर ओसंडून जायला लागला. हातातल्या टाळांचा आवाज वाढला, तोंडाने होणारा विठ्ठलाचा गजर गगनाला भिडला.वेशीवर योग्य आगत स्वागत होताच पालखी मंडपाच्या दिशेने येऊ लागली. तुतारीचा आवाज पालखी जवळ आल्याची कल्पना देत होता.भालदार चोपदार आपापल्या पारंपारिक वेशभूषेत पालखीवर चवरी ढाळत होते, उत्तम सजवलेला घोडा गर्दीच्या मधोमध शांतपणे पण डौलात चालला होता. ना त्याला माणसांच्या गर्दीची भीती वाटत होती,ना माणसांना तो उधळेल याची ! टाळांच्या, तुतारीच्या, कर्ण्यावरून होणा-या मोठ्या आवाजातल्या सूचनांचा कोणताही विपरित परिणाम त्याच्यावर होत नव्हता. एका ठेक्यात दुडक्या चालीतले, इकडेतिकडे पहात जसे काही तुकाराम महाराज त्याच्यावर स्वार आहेत, त्यांना सांभाळणे आपले कर्तव्य आहे अशा अविर्भावातले घोड्याचे चालणे लक्ष वेधून घेत होते. पालखीला लोटांगण घालणारे, पालखीतल्या पादुकांना हात लाऊन नमस्कार करणारे, पालखी ओढणा-या बैलांच्या पायावर पाणी घालणारे यांची एकच गर्दी झाली. जो तो भक्तीभावात मग्न होता. दोन तगड्या बैलांच्या गाडीवर तुकाराम महाराजांचा फोटो व पादुका असणारी पालखी विसावलेली होती. पालखी उत्तम रंगकाम केलेली फुलांनी सजवलेली होती. दुरूनही पादुकांचे दर्शन घेता येत होते. वारकरी आनंदाने नुसते नाचत होते. मुखाने अखंड विठ्ठलाचे नामस्मरण, तुकारामांचा जयजयकार चालू होता. स्त्रिया,पुरूष,गरीब,श्रीमंत,आबाल वृद्ध यांची सरमिसळ झाली होती. प्रत्येकजण भक्तिरसात मग्न होता.पालखी मंडपात मुक्कामाला पोहोचली आणि रस्त्यात थोडीफार शांतता पसरली.

    रात्री आम्ही मंडपात पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गेलो,तर तिथले वातावरण वेगळेच होते.मंडपात कीर्तन चालू होते. तबलजी व हार्मोनियम वादक यांच्या मध्ये कपाळावर बुक्का,डोक्यावर पागोटे, पांढरा सदरा, पांढरे धोतर, कमरेला कसलेले लाल मोठ्या काठाचे उपरणे,हातात चिपळ्या, गळ्यात हार अशा पोशाखातले मध्यम वयाचे कीर्तनकार डोळे मिटून कीर्तनाला उभे होते. त्यांच्या मागे २०-२२ टाळकरी दिवसभराच्या चालण्याचे श्रम विसरून हातात टाळ घेऊन गोलाकार उभे होते.कीर्तनकारांनी “पांडुरंग हरी” चा जयजयकार करताच मंडपात एकच शांतता पसरली व कीर्तन रंगू लागले.रात्र चढायला लागली तसा उत्साह वाढायला लागला.कीर्तनकारांच्या इशा-यानुसार मागचा वारक-यांचा गोलाकार एका तालात डोलायला, नाचायला लागला.कीर्तन रंगू लागले,पादुकांच्या दर्शनासाठी म्हणून गेलेले आम्ही सुद्धा बघता बघता त्यात तल्लीन झालो.

    सकाळी जाग आली ती रस्त्यावरच्या गडबडीने. छोटे टेंपो घेऊन माणसे आली होती त्या माणसांनी टेंपोतून येताना मोठमोठ्या पातेल्यातून पोहे, खिचडी, पराठे असे पदार्थ आणले होते. वारक-यांना बोलावून प्रत्येकाच्या हातात यातील काही ना काहीतरी दिले जात होते. पंढरीला जाणा-या सर्वांसाठी हे अन्नदान चालू होते. आपण जाऊ शकत नाही तर निदान जे जाताहेत त्यांच्या रूपाने विठ्ठलाला आपल्यातर्फे नैवेद्य पोहोचावा ही या मागची भावना ! वारकरी याचा आस्वाद घेऊन तृप्त होत होते. आता त्यांची पुढच्या प्रवासाला जाण्याची लगबग चालू झाली होती.पालखी तयार झाली होती. पालखीचा अश्व, भालदार चोपदार सज्ज होते. तुतारीचा इशारा होताच परत भजनाचा दमदार आवाज आसमंत भरून टाकू लागला, टाळ वाजू लागले, नगारे घुमू लागले. आम्हीही पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलो. हे सर्व जवळून बघता आले याची धन्यता वाटत होती.हळू हळू पालखी, तिच्या बरोबरचा लवाजमा पुढे पुढे सरकायला लागला. रस्त्यावरची गर्दी पांगू लागली.आता तुरळक तुरळक वारकरी मागे उरले. त्यातच एक म्हातारा वारकरी काठी टेकत टेकत हळू हळू चालत होता. त्याला तेवढ्या श्रमानेही तहान लागली असावी. त्याला पाणी देण्यासाठी मी त्याच्याजवळ गेले. अणि इतके दिवसात न मिळालेली एका सामान्य वारक-याशी बोलण्याची संधी मला मिळाली.

    “बाबा, तुम्ही कुठून आलात?”
    “माउली,आमचं गाव इथून धा मैल तरी दूर असलं!”बाबा घाम पुसत म्हणाले.
    “काल गावापासून चालतच आलात की काय?”
    “तर वो! फाटं फाटं निघालो. मला चालाया येळ लागतोय. म्हनूनशान समदी गाववाली निघायच्या आत म्या रस्ता धरला. काल पालखी अदुगर पोचलो.”
    “मग इथूनच परतणार काय? चालायला त्रास होतोय म्हणून विचारलं.”
    “त्यात काय, माऊली,पाय हाएत तर त्ये दुकणारच की वो ! असं त्याचं कवतूक करून चालतय व्हय! जास्त तरास वाटल तर कलाकभर बसायच आनी फुढ जायाचं!”
    “म्हणजे बाबा, पंढरी पर्यंत जाणार म्हणाकी तुम्ही !त्याच्या पुढं दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगेत उभ रहायच,त्या गर्दीत दर्शन घ्यायच आणि परत फिरायच. एवढ सगळ झेपेल का तुम्हाला?”
    “इटुराया घेईल की काळजी माजी. म्या कशाला इचार करू? पंढरी पत्तुर जायाच ,कळसाला हात जोडायचे ,रातभर कीर्तन भजन ऎकायच आन परत माघारी फिरायच.दरसाल जातोय म्या. एकडाव बी चुकलो न्हाई.”
    “बाबा, इतक्या दूर जाता तर दर्शन तरी नीटपणे घेता येते का?”
    “माऊली, इटुरायाच्या द्येवळात मुंगीलाबी जागा नसतीया. तिथं कशाला जायाचं?”
    “म्हणजे दर्शन न घेताच तुम्ही परत फिरणार?”माझ्या पांढरपेशी मनाला इतक्या दिवसांची पायपीट ,श्रम करून देवदर्शन न घेताच परतण काही केल्या पटत नव्हत.

    म्हातारा मिशीतल्या मिशीत हसला. म्हणाला “माउली, तू बी एक माउली हायेस,तुजी लेकरं जवा गावावरून येतात तवा तू काय घरात बसून असतेस का? दारात येत न्हाईस? तसाच माजा इटोबापन.आमी त्येची लेकरं त्यो माउली. आमास्नी येताना बगून त्यो काय द्येवळात दडी मारून बसल व्हय? अग, आमी जवा वाखरीला ४ मैलावर येतो ना तवाच त्यो द्येवळाच्या कळसावर चढतो आन आमची वाट बघतो बघ. त्यो आमाला लांबूनच वळकतो. म्हनून्शान त्येला तिथूनच कळसावर बसलेला बगतो, हात जोडतो आनी परतीची वाट धरतॊ.”

    म्हाता-याचे बोलणे ऐकताना मी त्याच्या शब्दातील भक्तीभावाने इतकी भारवून गेले की त्याच्या पुढे मी नतमस्तक झाले. आपोआप माझे हात जुळले, डोळे पाण्याने डबडबले, त्याच्या सामान्य रूपात मला दिव्यत्वाची प्रचीती आली, त्याच्या रूपाने मला पांडुरंगच भेटल्याची जाणीव झाली व मनात शब्द उमटले “दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,तेथे कर माझे जुळती.”

    “पांडुरंग हरी”.

    -- अनामिका बोरकर
    ए १८, वुडलॅंड्स, गांधी भवन मार्ग,
    कोथरुड, पुणे ४११ ०३८.

    ९८१९८ ६९०९०

      June 30, 2019


  • अनुभव वास्तुतज्ज्ञाचे

    व्यवसायातले अनुभव म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच आहे. म्हणतात ना, अनुभवातून माणूस शिकतो, सावरतो, कधी शहाणपण येते तर कधी सर्किटही बनतो, मात्र संवेदना जागृत होऊन सिंहावलोकन ही करता येते आयुष्याचे..

      November 25, 2024


  • केवळ कृषी पर्यटन नव्हे. . . . .तर एक संस्कार !

    केवळ कृषी पर्यटन नव्हे. . . . .तर एक संस्कार !

    लक्ष्मीपूजन आटोपलं की दुसऱ्या दिवसापासून भटकंतीला निघण्याचा शिरस्ता आम्ही कसोशीने पाळतो. कृषी क्षेत्रातील कामाच्या निमित्ताने मी सतत देशभर भटकत असलो तरी आम्हा तिघांना एकत्र भटकंती करण्याची ही एकमेव संधी आम्ही कधीही सोडत नाही. या वर्षीच्या भटकंतीचा प्रारंभ झाला ‘आमंत्रण’ या कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन. पुणे व मुंबईपासून केवळ ९५ किमी अंतरावर असलेलं व सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, जुन्नरपासून हाकेच्या अंतरावरील हे पर्यटन केंद्र ओझर व लेण्यान्द्री येथील गणपती व शिवनेरी किल्याच्या सानिध्यात शांतपणे पहुडलेलं आहे. मुंबई-पुण्याच्या प्रदूषित वातावरणापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात मोकळा व आरोग्यपूर्ण श्वास घ्यायचा असेल आणि आजच्या जगात अत्यंत दुर्मिळ झालेली निखळ शांतता अनुभवायची असेल तर निसर्गाचं हे ‘आमंत्रण’ अवश्य स्वीकारा! शहनाईच्या पार्श्वभूमीवर पाकळ्यांच्या वर्षावात व पंचारती ओवाळून होणारं पर्यटकांचं देवदुर्लभ स्वागत त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. नक्षत्रवन, सुगंधी व औषधी वनस्पती, अस्सल देशी बियाण्यांपासून लागवड केलेली विविध पिके, फुलझाडे व फळझाडांची ओळख करून देण्यासाठी अफाट उत्साहाचा धबधबा असलेले आमंत्रणचे संचालक श्री. शशिकांत जाधव आपल्यासोबत असतात. त्यांच्या सानिध्यात या परिसराची भटकंती हे केवळ पर्यटन नसून एक चालता-बोलता संस्कार वर्ग कसा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. दमछाक झाल्यानंतर सौ. कविता जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या सुग्रास भोजनाचा आनंद घेऊन बांबूच्या बनातील गर्द सावलीत थंडगार वाऱ्याच्या लाटांवर स्वतःला झोकून देत एक झकास डुलकी घ्यावी आणि जाग आल्यानंतर मसालेदार चहाचे घोट घेत काव्य-शास्त्र-विनोदाची मैफल जमवावी. ज्यांना धांगडधिंगा, डी.जे., वॉटर स्पोर्ट्स या गोष्टींची आवड आहे त्यांनी ‘आमंत्रण’च्या वाटेला जाऊ नये. पण ज्यांना आयुष्यातील मोलाचे क्षण शुध्द प्राणवायूने भरलेल्या शांततेत व्यतीत करायचे असतील त्यांनी मात्र ‘आमंत्रण’ला विसरू नये !

    पर्यटकांच्या माहितीसाठी :
    आमंत्रण कृषि पर्यटन केंद्र, गोळेगाव, ता : जुन्नर, जि : पुणे.
    संपर्क : श्री. शशिकांत जाधव : 99700 56412
    ई.मेल : jadhavshashikant778@gmail.com
    वेबसाईट : www.aamantranagritourism.com
    यूट्यूबवर व्हिडिओ : Aamantran agri tourism

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

      November 2, 2016


  • अरूणाचल प्रदेश – अनोळखी प्रवास पथांचा शोध

    अरूणाचल प्रदेश – अनोळखी प्रवास पथांचा शोध

    भारताच्या पूर्वेकडील टोकावर, जिथे उगवता सूर्य पहिल्यांदा हिमालयाच्या कुशीत हसतो, त्या भूमीतील काही ठिकाणं नकाशावर दिसतात, पण त्यांचं सौंदर्य मनाने अनुभवावं लागतं – तेव्हाच प्रवासाचा अर्थ उमगतो. ‘तवांग’ आणि ‘सेला खिंड’सारख्या प्रसिद्ध ठिकाणां पलीकडेही अरूणाचल प्रदेशात अशा अनेक अद्भुत जागा आहेत – ज्या तुम्हाला अनोख्या संस्कृतींच्या, निसर्गाच्या आणि मानवी साधेपणाच्या जवळ नेतात. चला, या भागात करूया अशाच काही “गुप्त रत्नांचा” शोध, ज्यामुळे तुमचा पुढचा प्रवास एक नवीन अनुभव ठरेल.

      November 7, 2025


  • पर्यावरणस्नेही लाकूड!

    आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात.

      July 28, 2023


  • सुखकर हवाई प्रवास

    जून-जुलै महिन्यापासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांच्या आई-बाबांची तिकडे जाण्यासाठी तयारी सुरू होते. काहींचा हा प्रवास पहिलाच असल्यामुळे मानसिक ताण असतो. या प्रवासाची मानसिक व शारीरिक तयारी करावी लागते. हवाई प्रवास मुख्यत्वे कित्येक तासांचा प्रवास एका बंदिस्त जागेत करावा लागतो.

      July 19, 2023


  • ऐतिहासिक ओरेब्रो किल्ला: वैभव आणि अंधाऱ्या कोठड्यांचा प्रवास

    ऐतिहासिक ओरेब्रो किल्ला: वैभव आणि अंधाऱ्या कोठड्यांचा प्रवास

    ओरेब्रो किल्ला (Örebro Castle) हा स्वीडनच्या मध्यभागातील ओरेब्रो शहरात स्वारटॉन नदीच्या एका बेटावर उभा असलेला एक अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला गेल्या ७०० वर्षांहून अधिक काळ स्वीडनच्या राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार राहिला आहे.

      June 16, 2026