वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतात चलनात असलेल्या प्रमुख दिनदर्शिका म्हणजे ग्रेगरियन, तिथी दर्शक शालिवाहन शक, विक्रम संवंत आणि नवीनच सुरु झालेली राष्ट्रीय सौर कालगणना. त्याशिवाय हिजरी आणि पारशी कालगणना वेगळीच प्रत्येक धर्माची स्वतंत्र कालगणना पद्धती असते.
भारतातील पहिली मोनोरेल १९०२ ते १९०८ या काळात कुंडला व्हॅली, मुन्नार, केरळ येथे धावत होती. ही रेल खाजगी मालकीची होती. पुढे त्या मार्गाचं नॅरोगेजमध्ये रूपांतर झालं. १९२४ सालापर्यंत तो मार्ग चालू होता. पुढे पुरात वाहून गेल्यावर तो मार्ग बंद पडला.
पतियाळा राज्यात फेब्रुवारी १९०७ मध्ये मोनोरेल चालू झाली व ती १९२७ मध्ये बंद पडली.
पुढे बऱ्याच प्रतीक्षेनंतर स्वतंत्र भारतातील पहिली मोनोरेल १ फेब्रुवारी २०१४ मध्ये वडाळा ते चेंबूर (मुंबई) अशी सुरू झाली आहे. पहिली मोनोरेल चालविण्याचा मान अलिबागच्या जुईली भंडारे या प्रशिक्षित इंजिनीअर मुलीला मिळाला हे विशेष.
मुहूर्ताच्या दिवशी उत्साही प्रवाशांची प्रचंड गर्दी दोन्ही स्टेशनांवर होती. या मोनोरेल मध्ये एका वेळी ५६० प्रवासी नेण्याची व्यवस्था आहे. प्रवास मजेदार असून, ही मोनो रेल दोन घरांच्या मध्यातून व घरांच्या इतक्या जवळून जाते, की घरात जेवायला बसलेलं कुटुंब, अभ्यास करणारी मुलं यांचंही दर्शन प्रवाशांना होत असतं. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी ही किती प्रमाणात उपयुक्त ठरणार हा मात्र एक महत्त्वाचा परंतु सध्यातरी अनुत्तरित प्रश्न आहे. साडेनऊ कि.मी. अंतराचं तिकिट सध्या ९ रुपये असून, असे अनेक मार्ग यानंतर बांधण्याची शक्यता विचाराधीन आहे. मुलुंड-गोरेगांव-बोरिवली हा ३० कि.मीटर व ठाणे-भिवंडी -कल्याण ३० कि.मी. असे हे मार्ग बांधण्यास २०,२९५ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज आहे. पहिली मोनोरेल बांधण्याच्या आर्थिक यशाविषयी शंका असल्याने पुढील मार्ग बांधणे व्यावहारिक ठरेल का हा कळीचा मुद्दा आहे. त्यामधून केवळ राजकीय लाभ मिळविण्याकडे राजकारणी लोकांचे डोळे लागलेले आहेत, पण प्रत्यक्षात या रेलमुळे शहराची वाहतूक समस्या किती प्रमाणात सुटेल याबाबतचा विचार गंभीरपणानेच करावा लागेल.
या सर्व पद्धतीच्या गाड्यांना डबे पुरविणे हा एक स्वतंत्र, पण कठीण प्रकल्प आहे. सुरुवातीला सर्व डबे परदेशांतून आयात केले आहेत व अजूनही करावे लागतात. अशा तऱ्हेचे २०० डबे Hundrai Rotin BEML या कंपनीने पुरविले होते.
सावली (गुजरात) येथे बॉम्बारडिअर कंपनीने २६ दशलक्ष पौंड भांडवल टाकून २००९ मध्ये ६०० डबे बांधण्याचा कारखाना सुरू केला आहे.
श्री-सिटी आंध्रप्रदेश येथे २०१३ साली अल्स्टोम कंपनीने २४३ दशलक्ष पौंड भांडवल खर्ची घालून १५६ एकरांमध्ये भव्य कारखाना सुरू केला आहे. येथून भारताला लागणारे डबे बनविले जातील. डबे परदेशी निर्यातही केले जातील. प्रगत देशांच्या यादीत समावेश व्हावा म्हणून व देशवासींच्या सुखसोयीकरिता हा महाकाय खर्च अटळ आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
मुरेल बेकचा जन्म ८ जून १९१८ रोजी लंडन येथे ज्यू कुटुंबात झाला.त्यांचे कुटुंब १९२३ ला विसबेडन जर्मनी येथे स्थायिक झाले व तिथून ते १९२६ मध्ये फ्रांस येथे गेले.तिचे शिक्षण फ्रांस मध्येच झाले. १९३५ मध्ये तिने लिली विश्वविद्यालयात दाखला घेतला. १९३६ ते १९३८ मध्ये तिने एका कंपनीत सचिव म्हणून काम केले. त्याच बरोबर १९३७ मध्ये गेट थिएटर मध्ये सहायक स्टेज मॅनेजर म्हणूनही काम केले.दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिने रेड क्रॉसमध्ये दाखला घेतला. १९४१ ला ती टोऱ्कयू येथे गेली व असिस्टंट क्लार्क व वॉर्डन चे काम पाहू लागली. १९४२ मध्ये ती वुमन एअर फोर्स मध्ये गेली आणि ड्यूटी क्लार्क चे काम पाहू लागली. नंतर तिचे प्रमोशन सेक्शन ऑफिसर म्हणून झाले.
तिचे फ्रेंच उत्तम होते म्हणून तिला स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव गुप्तहेर संघटनेत १९४३ मध्ये दाखल करून घेण्यात आले.सप्टेंबर १९४३ मध्ये तिचे सूरी येथे प्रशिक्षण सुरू झाले. पुढे तिचे para-military फोर्सचे शिक्षण सुरू झाले. व पुढे वायरलेस ऑपरेटर चे प्रशिक्षण घेतले. एसओई मध्ये तिला गुप्तहेरीचे काम देण्यात आले.गुप्तहेराचे सर्व आवश्यक गुण तिच्यात होते. ८ एप्रिल १९४४ रोजी तिला पॅरॅशूटने फ्रांस मध्ये उतरवण्यात आले. तिचे कोडनाव व्हायोलेट ठेवण्यात आले. तिने सालब्रासिस येथे सुरक्षित घर मिळवले. तिने ट्रान्समिशन यंत्र गेरेजच्या शेड मागे लपवले जेथे जर्मन जीप व ट्रक दुरुस्ती साठी येत असत.तिथे तिला संशयित जर्मन सैनिक दिसले . तिने यंत्र दुसरीकडे हलवले.ती पर्शियन सेक्रेटरी बनली. तिथून ती एका लोहाराच्या घरी राहू लागली. खूप वेळ काम केल्यामुळे तिला ताण आला व ती बेशुद्ध झाली. तिला तातडीची वैद्यकीय गरज होती तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तिथे meningitis चे निदान झाले व तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले,पण प्रत्येक हॉस्पिटलवर जर्मनांचा पहारा होता. तिला नन्स द्वारा चलवणाऱ्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही २५ मे १९४५ रोजी वयाच्या 27 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.
काही वर्षांपूर्वी युथ होस्टेल पुणे शाखा सिंहगड ते रायगड अशी शिवदुर्ग दर्शन साहस सहल आयोजित करीत असे. पुण्यातून रोज ३० जणांची तुकडी निघायची ती सर्व भ्रमण पूर्ण करून दहा दिवसांनी परत येत असे. युथ होस्टेल आयोजित हा टेक त्या काळात खूप प्रसिद्ध होता. दहा दिवसाच्या या ट्रेकचे वर्णन तीन भागात देत आहे.
आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ.. २०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं.
घामणगांव ( जिल्हा –अचलपूर-महाराष्ट्र) येथे २५० वर्ष जूनी गढी (मातीचा किल्ला) आहे. या गढीची माती सिमेंटपेक्षा उत्तम काम देते. ३५ वर्षांपूर्वी दगड व ही माती वापरून बांधलेल्या गांवातील विहिरी अजूनही इतक्या मजबून आहेत की छिन्नी हतोडयाने फुटत नाही.
वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यामध्ये मी पंधरा दिवस फिरायला जात असतो. 35 वर्ष रेल्वे त नोकरी केली कुठे सुद्धा फिरता आले नाही रेल्वेची ड्युटी बारा तासाची फक्त मला एक फायदा झाला तो म्हणजे वाचन आणि लेखन. ड्युटी बरोबरच वाचन-लेखन असल्यामुळे माझा वेळ कधी जात होता हे मला समज त सुद्धा नव्हते इतका मी वाचनात आणि लेखनात रंगून गेलो होतो.
डिक्शनरी आणि डिरेक्टरी आता नामशेष होण्यातच जमा आहेत. आजची e -पिढी गुगल वरच त्यांचे अर्थ सर्च करेल. पण आमचे हे संपर्क आणि शब्दांचे ब्राउझर आठवणींच्या ट्रंकेतला एक कोपरा व्यापुन विराजमान राहतील.
कार्तिक शुक्ल अष्टमीला हे नांव आहे. सकाळी गाईंना स्नान घालून त्यांची पूजा करावी.
लिली सरगयू हि दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर होती . तिने डबल एजंट म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
आधी आपण डबल एजंट म्हणजे काय समजून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले.
ती “ ट्रेजर” या नावाने प्रसिद्ध होती. तिचा जन्म रशियातील सेंट पिटसबर्ग गावी २४ जानेवारी १९१२ रोजी झाला. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीच्या वेळी त्यांचे कुटुंबाने फ्रांसला पलायन केले. तिचे शिक्षण पॅरिस येथे झाले. ती पत्रकारीतेत पारंगत होती. तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.तिला १९३७ मध्ये जर्मनीद्वारे गुप्तहेर खात्यात भरती होण्याविषयी विचारले होते पण तिने नकार दिला. पण फ्रान्सच्या पडवानंतर तिने जर्मनीला गुप्तहेर खात्यात काम करण्यास होकार दिला.
मेजर एमील किलमनने तिला शिक्षण दिले. १९४३ ला ती आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन स्पेनला गेली. तिने लगेच इंग्लंडच्या मादरीद येथील m15 या गुप्तहेर संघटनेशी संपर्क केला. आपण जर्मन गुप्तहेर असल्याचे सांगून इंग्लंडसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. ती मागणी मान्य होऊन तिला लगेच इंग्लंडला रवाना केले. लिलि ला “treasure” नाव देण्यात आले व बऱ्याच अधिकाऱ्याबरोबर कामाची संधि दिली. तिने डबल एजंट संबंधी आपल्या अमेरिकन मित्राला सांगितले.
१९४४च्या मेमध्ये तिला बातमी समजली की तिच्या आवडत्या कुत्र्याचे निधन झाले. यावर तिला प्रचंड राग आला. तिने m15ला कळवले की तिच्याकडे काही गुपिते आहेत. तिने त्यातील काही फोडली.त्यावर तातडीने बैठक बोलावण्यात आली. पण तीला m15 मध्ये काम करू देण्यात आले. ती जर्मनीला खोट्या बातम्या पुरवत राहिली. नंतर तिला संघटनेतून काढून टाकण्यात आले. इंग्लंडचे काही संदेश जर्मनीच्या एगनीमा यंत्राने पकडले १९४४ च्या शेवटी ती फ्रांसला परतली व फ्रेंच वूमन आर्मी सर्विस मध्ये काम करू लागली. ती रशियन भाषेची दुभाषी म्हणून काम करू लागली. १९४६ मध्ये तिने मेजर जॉन बारटन कॉलीन याच्याशी पॅरिसमध्ये लग्न केले. ते सोलोन येथे स्थायिक झाले.
१७ मे १९५० रोजी तिचे किडणीच्या आजाराने निधन झाले.
--रवींद्र शरद वाळिंबे
Copyright © 2025 | Marathisrushti