वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महाराष्ट्रात, मुंबईत स्त्रियांनी स्त्रियांकडून स्त्रियांसाठी स्त्रियांद्वारे चालविलेला उद्योग निर्माण झाला. १५ मार्च १९५९ साली गिरगावमधील सात महिलांनी या उद्योगास जन्माला घातले. ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या नावाने आज हा उद्योग जगभर पोहोचला.
March 15, 2022
मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.
श्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत.
देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो.
या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणं) होतो. या विधीमध्ये आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर यांसह सहभोजन केलं जातं, या वेळी जत्रेचं नियोजनही ठरवलं जातं. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी...’’ असे गार्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच ‘रान धरणं’ असं म्हटलं जातं.जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही.पारध म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर, या शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते.
मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. या पारधीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जाऊन जत्रेची तारीख निश्चित केली जाते. गावाबाहेर इतरत्र असलेल्यांना या जत्रेची तारीख जाहीर होण्याबाबत प्रचंड उत्सुकता असते.
नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकर्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते.उत्सवादिवशी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. या पाषाणास मुखवटा घालून
साडीचोळी नेसविली जाते. संपूर्ण अलंकार धारण केलेलं देवीचं रूप मनात घर करून जातं. जत्रेच्या पहिल्या दिवशीच पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या दोन दिवसीय उत्सवामध्ये देवीचं रूप अवर्णनीय दिसतं. देवीची ओटी खणानारळानं, तर नवस तुळाभारानं फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटं लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो.हा मान आंगणे समाजातील कुटुंबांचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.
जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. मसुरे पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या या भराडी देवीची ही जत्रा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा योग वर्षातून एकदाच लाभतो.
March 15, 2017
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
May 22, 2022
शोभा गोखलेचं लग्न होऊन ती रानडेंच्या घरात सून म्हणून आली आणि ते घर आनंदाने भरून गेलं. तिच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने तिने सगळ्यांची मने जिंकली होती. घरात सासरे दिनकरराव, सासूबाई रमाबाई, मोठे दिर श्रेयस व जाऊबाई वैदेही वहिनी आणि त्यांची चिमुरडी मुलगी जया या सर्वांना शोभाने आपलंस केलं होतं.
September 16, 2023
खाद्य तेले
आहारात नियमित वापरासाठी कोणते तेल घ्यावे असा आजकाल सगळ्यांच्याच मनात संभ्रम असतो. मोठमोठ्या कंपन्या आकर्षक पॅकिंग करून बेसुमार जाहिराती करतात. त्यामुळे हा संभ्रम दिवसेंदिवस आणखीनच वाढत जात आहे. काही सुशिक्षित कुटुंबांमध्ये तर तेल म्हणजे जणू विषच अशी धारणा झालेली आढळते. तेलाने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हार्ट अटॅक येणारच अशी भीती मनात कुठेतरी बसलेली मंडळी आहेत. ह्या विषयावर प्रकाश टाकणार आहेच, परंतु त्यापूर्वी एका ओळीत सांगायचे तर “अति सर्वत्र वर्जयेत” हे वाक्य कायम ध्यानात ठेवावे. स्निग्धपदार्थ दोन प्रकारे आहारातून सेवन केली जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे तूप तेल यांसारखे पदार्थ आणि अप्रत्यक्ष म्हणजे आहारातील इतर पदार्थांमधून जाणारा स्निग्धांश, जसे शेंगदाणे, चिक्की, लाडू इ.
ही भीती कोठून आली?
स्निग्ध पदार्थ हृदयाला घातक आहेत ही भीती पश्चिमी देशांकडून आपल्याकडे आली. ज्यांच्या आहारात फक्त आणि फक्त मांसाहारच असतो त्यांना ही भीती असणे साहजिक आहे. मांसाहारातून (रेड मीट) अप्रत्यक्षपणे अवाजवी प्रमाणात घातक स्निग्धांश शरीरात जातो आणि त्यामुळे अशांना “तेल – तूप खाऊ नका” हे आवर्जून सांगणे जरुरीचे आहे. शाकाहारी लोकांच्या आहारात फोडणीच्या स्वरूपात आणि अप्रत्यक्ष स्वरूपात स्निग्धांश सेवन केला जातो. त्यामुळे शाकाहारींनाही ही भीती बाळगायला हवी. प्रथिनांमध्ये आणि पिष्टमय पदार्थांमध्ये प्रत्येक ग्रॅममध्ये ४ तर स्निग्ध पदार्थांमध्ये ९ उष्मांक (कॅलरीज) असतात. म्हणून जास्त स्निग्ध पदार्थ सेवन करणाऱ्यांना व्यायामाच्या माध्यमातून त्या बर्न करणे अधिक जरुरीचे असते. तेल तूप पचायला तुलनेने अधिक जड असतात आणि शरीरातील मेदाशी ह्याचे साधर्म्य असते म्हणून ह्याने चरबी वाढते. प्रौढ पुरुषांना दर दिवशी सुमरे २५ ते ४० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते तर स्त्रियांना २० ते ३० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते.
आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा आणि मज्जा असे ४ प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात. ह्यापैकी गुणधर्मांच्या दृष्टीने घृत हे सर्वोत्तम, तेल हे त्यापेक्षा कमी, वसा त्याहून कमी आणि मज्जा सर्वात कनिष्ठ असल्याचे वर्णन आहे. ह्या ४ स्निग्ध पदार्थांपैकी तेल संपूर्णपणे वनस्पतीजन्य असून बाकीचे प्राणिज स्नेह आहेत. घृत (तूप) हे प्राण्यांच्या दुधातील स्निग्धांश वेगळा काढून तयार केले जाते आणि वसा आणि मज्जा प्रत्यक्ष प्राण्यांच्या शरीरातून काढली जाते. ह्यात ट्रान्स फॅट्स, धार्मिक विचारांच्या दृष्टीने ह्याचा वापर आपल्याकडे जास्त होत नाही. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही वसा आणि मज्जा खूप जड आहेत. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्यपदार्थाची चव सुधारते. भाजलेला पापड आणि तळलेला पापड, साधे वरण आणि फोडणीचे वरण किंवा साधी भाजलेली पोळी आणि तूप लावलेली पोळी अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.
आधुनिक विज्ञान शाखेत स्निग्ध पदार्थांवर बरेच संशोधन झाले आहे. स्निग्ध पदार्थांचे विश्लेषण करून त्यातील सूक्ष्म घटकांचा अभ्यास आज आपल्याला उपलब्ध आहे. विविध खाद्य तेलांविषयी विचार करतांना पुफा, मुफा, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड असे अनेक शब्द आपल्या वाचण्यात आले असतील. त्याविषयी नेमकी व थोडक्यात माहीती आपल्याला असणे जरुरीचे आहे.
वनस्पतींमधून निर्माण केल्या जाणाऱ्या तेलांना टिकाऊपणा विशेष नसतो. अशा तेलांना लवकर खवट वास येऊ लागतो म्हणून आहारात वापरता येत नाहीत. त्यांना अधिक टिकाऊ व अधिक स्वादिष्ट करण्यासाठी हायड्रोजनेशन नावाची प्रक्रिया केली जाते. ही हायड्रोजनेशनची क्रिया अपूर्ण झाल्यास त्यांच्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात. ह्या ट्रान्स फॅट्स रक्तातील एल. डी. एल. (स्वास्थ्यास घातक चरबी) वाढवितातव एच. डी. एल. (स्वास्थ्यवर्धक चरबी) कमी करतात. परिणामी हृदयाला रक्ताभिसरण करणाऱ्या धमन्या कडक होतात, कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून तेल खरेदी करतांना शक्यतो हायड्रोजनेटेड तेलाचा वापर करू नये. सरकारी नियमांनुसार तेलाच्या डब्यावर/ पाकिटावर हे छापणे बंधनकारक आहे.
स्निग्ध पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड असे दोन प्रकार आढळतात. २२ ते २५० डिग्री तापमानात गोठणारे सॅच्युरेटेड व ह्याच तापमानात द्रवावस्थेत राहणारे अनसॅच्युरेटेड असे ढोबळ मानाने समजावेत. सॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेल द्रव्य स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक व अनसॅच्युरेटेड त्यामानाने चांगली असतात. संपूर्णपणे अनसॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेले असत नाहीत. त्यात किंचित प्रमाणात सॅच्युरेटेड स्निग्धता असतेच. पण हे प्रमाण नगण्य असावे एवढेच ध्यानात असावे.
अनसॅच्युरेटेड स्निग्धता ही पण दोन प्रकारांची असते. ह्यात मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) आणि पॉलिअनसॅच्युरेटेड (PUFA) असे दोन प्रकार आहेत. ओमेगा जातीचे वसाम्ले मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) मध्ये असतात व ही स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायक असतात. हृदय, मेंदू, सांधे, ज्ञानेंद्रियांची शक्ती उत्तम राखणे अशी गुणवत्ता त्यांमध्ये असते.
भारतीय आहारात मुख्यतः खालील तेलांचा वापर मुख्यत्वाने होतो. त्यातील घटकांमधील रसायनांचा तक्ता –
| मराठी नाव | इंग्रजी नाव | सॅच्युरेटेड
स्निग्धांश |
MUFA | PUFA | ओमेगा ३ | ओमेगा ६ |
| तीळ तेल | Sesame oil | १४ % | ४३ % | ४३ % | ०.३ % | ४१ % |
| भुईमूग तेल | Peanut oil | १८ % | ४९ % | ३२ % | ० % | ३१ % |
| पाम तेल | Palm oil | ५२ % | ३८ % | १० % | ०.२ % | ९.१ % |
| सोयाबीन तेल | Soybean oil | १५ % | २४ % | ६१ % | ६.७ % | ५० % |
| सुर्यफुल तेल | Sunflower oil | ११ % | २० % | ६९ % | ० % | ५६ % |
| सरकी तेल | Cotton seed oil | २४ % | २६ % | ५० % | ०.२ % | ५० % |
| खोबरेल तेल | Coconut oil | ९२ % | ०६ % | ०२ % | ० % | १.८ % |
| करडई तेल | Safflower oil | १० % | १३ % | ७७ % | ० % | ७४ % |
| ऑलिव्ह तेल | Olive oil | १४ % | ७३ % | ११ % | ० % | ० % |
| राईचे तेल | Mustard oil | १३ % | ६० % | २१ % | ५.९ % | १५ % |
| तांदूळ कोंड्याचे तेल | Rice Bran oil | २० % | ७४ % | ३३ % | १.६ % | ३३ % |
| मक्याचे तेल | Corn oil | १३ % | २५ % | ६२ % | १.१ % | ५३ % |
| जवसाचे तेल | Flax Seed oil | ११ % | २१ % | ६८ % | ५३ % | १३ % |
तीळ तेल -
रिफाइंड आणि नॉन रिफाइण्ड असे तिळाचे तेल दोन प्रकारचे असते. सेंद्रिय, रिफाइण्ड न केलेले तिळाचे तेल आपल्या अन्नाला मोहक सुगंध देते. तीळ तेलात मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्स् असतात जे फ्री रॅडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे गुण आहे. तीळ तेल चिंता करणार्यांसाठी तसेच आपल्या नसा (नर्व्ह) आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. ते रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. तसेच पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. जे लोक तीळ तेल नियमितपणे वापरतात, ते ताण-तणावावर मात करू शकतात, मज्जासंस्थेला पोषक ठरते, थकवा कमी करते, रात्री झोप बरी येते आणि आयुष्य वाढवते. तीळ तेलाने कर्करोगापासून रक्षण होऊ शकते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.
शेंगदाणा तेल :
यामध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या फॅट्स्चं उत्तम मिश्रण आहे. शेंगदाण्याच्या तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडन्ट्स असतात जे फ्री रॅडिकल्स (पेशीविघातक दोष) तयार होण्यापासून रोखतात आणि विविध प्रकारच्या कर्करोगांपासून रक्षण करतात. ते शरीरातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉलचीही पातळी कमी करतात. चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एचडीएल. हे कोलेस्टेरॉलची परत यकृताकडे पाठविते आणि अडथळ्यांपासून बचाव करते. वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल. हे कोलेस्टेरॉलचे वहन पेशींकडे आणि वाहिन्यांकडे करून वाहिन्यात अडथळे निर्माण होतात.
पाम तेल
जगात होणाऱ्या खाद्य तेलाच्या निर्मितीपैकी ४४ टक्के हिस्सा पाम तेलाचा आहे. ह्यात पाल्मेटिक अम्ल नावाचा घटक असतो. ह्यात ट्रान्स फॅट व सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे प्रमाण मोठे आहे व हृदयाच्या रक्ताभिसरणासाठी योग्य नाही असे जागतिक आरोग्य संघटन संस्थेने प्रसिद्ध केले आहे.
सोयाबीन तेल
सोयाबीनच्या द्विदल बियांपासून सुमारे ५०% खाद्य तेल काढता येते. यात प्रथिनांचे प्रमाण उत्तम असते. रिफाइंड सोयाबीन तेलाचा खप शेंगदाण्याच्या तेलाच्या खालोखाल आहे. रक्तातील घातक स्निग्धांश व स्वस्थ्यकर स्निग्धांशांचा याने समतोल राखला जातो. प्रथिनांचे उत्तम स्रोत असल्याने शुद्ध शाकाहारी लोकांनी ह्याचा वापर जरूर करावा. सोयाबीनमधील अॅन्टिऑक्सिडंट घटक विशिष्ट कॅन्सर पेशींना आळा घालून त्यांची वाढ रोखतात असे संदर्भ मिळतात.
सनफ्लॉवर तेल -
या तेलामध्ये जीवनसत्त्व ‘ई’ जास्त आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असते. हे तेल हृदयास हितकर आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते कारण त्यात पॉलिसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असते. यातील PUFA आणि MUFA जातीची स्निग्धाम्ले तीव्र उष्णता, प्रखर प्रकाश, हवेतील बाष्प अशा कारणांमुळे तेलाचे गुणधर्म नाश पावतात. म्हणून ह्याच्या निर्मिती प्रक्रियेत आणि साठविण्याच्या पद्धती नियंत्रित असणे जरुरीचे आहे.
सरकी तेल –
कपाशीच्या बियांना सरकी म्हणतात. यात फॉस्फरससुक्त संयुगे, स्टेरॉल, क्षार आणि अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे आहेत. याशिवाय सरकीत अल्प प्रमाणात पण विशिष्ट गुणधर्मांचे घटक म्हणजे ‘गॉसिपॉल’ नावाचे संयुग आणि कच्च्या सरकी तेलाला गडद रंग देणारी रंगद्रव्ये असतात. पितळी भांड्यांवर ह्याची रासायनिक क्रिया होते म्हणून स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. हृदय स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले आहेच शिवाय ई जीवनसत्वाचे प्रमाणही ह्यात चांगले आहे. गॉसिपॉल’ नामक विशिष्ट घटकामुळे स्त्री व पुरुष प्रजननक्षमता खालावते असे काही वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहे.
खोबरेल तेल -
खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक आहे. त्यानुसार हे खाण्यास अत्यंत घातक आहे असा निष्कर्ष निघतो. परंतु ह्यातील मीडियम चेन फॅटी अम्ल हृदयाला हितकार आहेत. ह्याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमधील घातक चरबी कमी होते. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच दोन बाजू तेलांनाही असतात. सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे लाभही अनेक आहेत. मेंदूच्या जडणघडणीमध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अशा तेलांना पूर्णपणे वर्ज्य करून चालत नाही. अल्झेमर्स डिसीजमध्ये (वार्धक्यात होणारा स्मृतिभ्रंश) खोबरेल तेलाचा उपयोग अतिशय प्रशंसनीय आहे असे संशोधन नुकतेच झाले आहे.
करडई तेल (सॅफ्लॉवर) -
ह्या तेलात पॉलिअन्सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करते. तसेच ते पेशीचे आवरण मजबूत करण्यात मदत करत ज्यामुळे विषारी घटकांना प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो ज्यामुळे मग रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या रोगांपासून बचाव करते. हे तेल मधुमेहींनासुद्धा वापरायला सांगितले जाते कारण ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच स्त्रियांमध्ये पाळी येण्यापूर्वीची लक्षणे कमी करते.
ऑलिव्ह तेल
हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो. या तेलाचा वापर तळणीसाठी केल्यास गुणधर्म नाश पावतात म्हणून कच्च्या स्वरूपात याचा वापर करणे अधिक योग्य आहे.
राईचे तेल –
हे खाद्यतेल मोहरीपासून बनविण्यात येते. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात. हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो. भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली कडे याचा वापर होतो. ह्यात MUFA चे प्रमाण उत्तम असल्याने ओमेगा ३ जातीचे मेदाम्ल प्रचुर प्रमाणात आहेत. हे प्रमाण एकंदरीत स्वास्थ्यासाठी चांगले आहे. मात्र याचा वास उग्र असतो. अन्य तेलांचा वापर करणाऱ्यांना रुचत नाही.
राईस ब्रान तेल -
या तेलात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि ट्रान्स फॅट नसतात. त्यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडन्ट्सही असतात. त्यामुळे ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याला सूक्ष्म असा वास असतो आणि धुराचा बिंदू जास्त असतो. त्यामुळे ते तळणासाठी व अन्न शिजवण्यासाठी व भाजण्यासाठीही वापरता येते.
मक्याचे तेल –
मक्याच्या अंकुरापासून तेल काढतात. याच्यात क्लोरेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असल्याने हृदयरोगावरती उपयुक्त आहे. मक्याच्या अंकुरातून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीपासून जनावरांचे खाद्य तयार केलं जात. तसाच कोरडया प्रक्रियेतून निघालेला कोंडा पशुखाद्यात वापरला जातो. ऑलिव्ह तेलाच्या तुलनेत हे तेल अधिक उष्णता सहन करते म्हणून तळणीसाठी हे अधिक योग्य आहे. मशीनद्वारे काढलेले मक्याचे तेल अधिक स्वास्थ्यकर आहे. आजकाल बाजारात हेक्झेन किंवा आयसोहेक्झेन या रसायनांचा वापर करून काढलेले तेल अधिक प्रमाणात मिळते. त्यातील रसायनांचा घातक परिणाम होण्याची शक्यता असते.
जवसाचे तेल -
जवसाच्या बिया (flaxseed किंवा linseed) अत्यंत आरोग्यदायी आहेत. यालाच अळशी असेही नाव आहे. आजकाल जवसाला खूप महत्त्व लाभले आहे. याचे प्रमुख कारण आहे जवसामध्ये असलेले ओमेगा-3 हे मेदाम्ल. आहारशास्त्रानुसार आपल्या आहारात ओमेगा-3 व ओमेगा-6 या दोन मेदाम्लांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. सामान्यतः ओमेगा-6 हे मेदाम्ल रोजच्या वापरातल्या तेलांमधून सहजपणे मिळत असते; परंतु ओमेगा-3 असलेले पदार्थ कमी आहेत. म्हणून हे मेदाम्ल शरीराला सहजासहजी मिळत नाही. तेलीय मासे, अक्रोड, मोहरी, मेथी, जवस या पदार्थांपासून आपल्याला ओमेगा-3 मिळू शकते. हे मेदाम्ल विशेषत्वाने हृदय व त्याच्या धमन्यांचे आरोग्य राखण्याचे काम करते. रक्तातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स या घटकांचे प्रमाण ओमेगा-3 ने कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उच्चरक्तदाब, संधीविकार, कर्करोग व स्थूलता यांपासून संरक्षण मिळते. ओमेगा-3 या मेदाम्लामुळे स्मरणशक्ती वाढते, डोकेदुखी, नैराश्य कमी होते. जवस हे रजोनिवृत्तीशी संबंधित तक्रारी कमी करते. रोज साधारणपणे ३० ग्रॅम जवस खाण्याने रजःनिवृतीपूर्वी होणारी डोकेदुखी, चिडचिडेपणा, शरीरातून गरम वाफा निघणे, हे त्रास कमी होतात. जवसाची चटणी किंवा जवसाचे तेल या स्वरूपात जवसाचा आहारात वापर करता येईल. जवसाच्या बिया बडीशेपेसारखे तव्यावर परतून खाव्यात. किंचित मीठ घालून मुखवास रूपाने खूप रुचकर लागतात. जवसाचे तेल शक्यतो तापवू नये, ते चटणीवर किंवा सॅलडवर घ्यावे. तापवल्याने याला विशिष्ट उग्र वास येतो.
सारांश:
खाद्य तेलांबद्दल एवढी माहीती वाचल्यावर “मी कोणते तेल वापरू” हा प्रश्न आपल्याला नक्कीच भेडसावणार आहे. म्हणून सारांशाने थोडक्यात महत्वाचे मुद्दे आता पाहूया –
१) लेबलवर “हायड्रोजनेटेड” शब्द दिसला तर असे तेल वापरू नये.
२) तळणीसाठी एकदा वापरलेले तेल परत वापरू नये. (निरांजनात वापरण्यास हरकत नाही)
३) “ट्रान्स फॅट्स” असलेले तेल वापरू नये.
४) मांसाहाराचे बंधन नसेल तर मधूनच फिश ऑईलचा आहारात वापर करावा.
५) सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असलेले तेल टाळावे (याला खोबरेल तेल अपवाद आहे)
६) नॉन-रिफाइंड तेलांना नैसर्गिक गंध असतो व ती तेले अधिक पौष्टिक असतात. परंतु तुलनेने लवकर खवट होतात. तळणीसाठी अशा तेलांचा वापर शक्यतो करू नये.
७) रिफाइंड तेलांचा वापर तळणीसाठी अधिक योग्य असतो. रिफायनिंग प्रक्रियेत तेलामधील कित्येक स्वास्थ्यकर जीवनसत्व नाश पावतात. रिफाइंड तेल अधिक टिकाऊ असते, मात्र त्याला नैसर्गिक स्वाद फारच कमी असतो.
८) ज्याज्या ठिकाणी गायीचे तूप वापरता येईल त्यात्या ठिकाणी तेलाऐवजी अशा तुपाचा वापर करावा.
९) उपलब्ध असलेल्या सर्व तेलांचा वापर अदलून बदलून करावा. एकच एक तेल कधीही खाण्यास वापरू नये.
१०) आहारात कोणतेही तेल घ्या पण ‘४५ मिनिटे नियमित व्यायाम करणे’ हा नियम कधीही विसरू नका.
११) स्निग्ध पदार्थ म्हटल्यावर सर्वांच्या मनात “कोलेस्टेरॉलची” दहशत बसलेते. म्हणून ह्याबद्दल थोडी माहीती हवीच -
कोलेस्टेरॉलबद्दल ज्यांच्या मनात भीती आहे त्यांनी त्याचे फायदेही समजून घेतले पाहिजेत. कोलेस्टेरॉल हा यकृतात निर्माण होणारा एक घटक आहे. हा घटक सर्वस्वी वाईट असता तर निसर्गाने ह्याची निर्मिती केलीच नसती. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अति सर्वत्र वर्जयेत हा नियम येथेही लागू होतो. त्याचे संतुलन शरीराच्या गरजेपुरते असावे, अति वाढू नये ह्याची काळजी घ्यावी. शरीरात निर्माण होणाऱ्या कोलेस्टेरॉलशिवाय आपण आहारातून घेतलेले कोलेस्टेरॉल देहाचे स्वास्थ्य खालावत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डॉ. संतोष जळूकर, मुंबई
+917208777773
March 3, 2017
आई जगदंबेच्या अपर्णा नावाचा विचार करीत आचार्यश्रींनी इथे एका वेगळ्याच पद्धतीने आईचा गौरव केला आहे.
February 11, 2020
अभ्रक हे महारस समूहातील पहिले खनिज असून, त्याचा उपयोग औषधी हेतूंसाठी भस्म स्वरूपात केला जातो . आचार्य वाग्भट्ट यांनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अर्श रोगावरील उपचारांमध्ये अभ्रकाचा प्रथम उल्लेख केला होता. त्याचे लॅटिन नाव “मायका” (Mica) आहे आणि इंग्रजीमध्ये हे खनिज “ग्लिमर” (Glimmer) या नावाने ओळखले जाते.
June 3, 2026
आपण व्यवहारात रेशमी वस्त्रे, लोकरीची वस्त्रे, सोन्या-चांदीचे अलंकार इत्यादींचा वापर करीत असतो. त्यांच्या परिधानांमुळे होणाऱ्या घर्षणाने नकळत त्यांचे फायदेही मिळत असतात; परंतु त्याचा जाणीवपूर्वक विचार केला जात नाही, तो करणे अत्यंत आवश्यक असते. उदा. रेशमी वस्त्र परिधान केल्यामुळे स्वाभाविकपणे शरीराच्या हालचालींबरोबर शरीरामध्ये घर्षण निर्माण, वीज निर्माण होते व त्याचा रक्ताभिसरण क्रियेला उपयोग होतो.
April 15, 2023
हा आंब्याच्या सारखा दिसणारा ८-१० मीटर उंच सदा हिरवा राहणारा वृक्ष आहे.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पाना सारखी दिसतात.फुले दाट व गुच्छात येतात.हि सुगंधी व आकर्षक पिवळट तांबड्य् रंगाची असतात.फळ ८-२५ सेंमी लांब व ४ सेंमी रूंद असते शेंगा चपट्या असतात व त्यात ४-८ बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,बीज व फुले आहेत.हा चवीला तुरट,कडू असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कफ पित्तनाशक आहे.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
१)वेदना प्रधान विकारात अशोक सालीचा लेप करतात.
२)तुरट असल्याने रक्तस्तंभक व कडू रूक्ष गुणाने रक्त शुद्धी करते म्हणून रक्त दुष्टी जन्य विकारात अशोक उपयुक्त आहे.
३)तुरट चव व शीत वीर्य ह्या मुळे अशोक क्लेद नाशक अाहे त्यामुळे गर्भाशय शैथिल्य नष्ट करून वेदना व स्त्राव अशोक कमी करतो.तसेच गर्भाशयाच्या कार्याला चालना देतो.त्यातील रक्तवाहिन्या व स्नायूंचा संकोच करून त्यांची क्रिया सुधारते व रक्तस्त्राव थांबवितो.Endometrium व Ovary वर उत्तेजक कार्य करते.
४)अंगावर लाल अथवा पांढरा स्त्राव जात असल्यास अशोक साल चुर्ण तांदुळाच्या धुवणातून देतात.
५)गर्भिणी स्त्रीला सगर्भावस्थेत अशोक घृत सेवन करायला दिल्यास गर्भपाताचा धोका टळतो.
६)अशोक तुरट चवीचा व थंड गुणाचा असल्याने स्तंभक व दुष्ट कफनाशक म्हणून चांगले काम करतो त्यामुळे अतिसार,प्रवाहिका व कृमी मध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2017
भारत जगातील प्राचीन देशापैकी एक देश आहे.येथील संस्कृती ही प्राचीन आहे. भारतातील शिक्षण देणे घेणे ही प्रक्रियाही प्राचीन काळापासून निरंतरपणे चालू आहे.येथे गुरु शिष्यांची परंपरा प्राचीन अनादी काळापासून चालत आलेली आहे.प्राचीन काळातील शिक्षण हे विशिष्ट वर्गातील ,जातीतील लोकांनाच दिले जाई. शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध नव्हते.
June 8, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti