वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंच प्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर काय द्याव ?
हा प्रश्न या मालिका पाहणार्याअ सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्य प्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्या आवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या उत्सूकतेने आजचे प्रेक्षक पाहतात का ? पूर्वीच्या त्या मालिकांतील कोणत पात्र कोणी साकारलयं हे शेंबडया पोरांना ही माहित असायचं पण ! आज मालिकात काम करणार्यार काही मोजक्याच कलाकारांची नावे लोकांना माहित असतात. आज लोक कोणत्याही मालिकेत फार गुंतत नाहीत. मी तर एकाच वेळी तीन-तीन मालिकांचा एक-एक तुकडा पाहतो आणि तरीही मला त्या तीनही मालिका पाहिल्याचं मानसिक समाधान मिळतं. एखादी मालिका एक महिना जरी पाहिली नाही तरी आपण फार काही गमावलं असं हल्ली कोणा प्रेक्षकाला बहूदा वाटत नसावं. कोणत्या मालिकेत कोणत कथानक किती खेचावं याला काही मर्यादाच राहिलेली नाही.
एखादा सरडा ही जितके रंग बदलत नाहीत इतके रंग या मालिकेतील पात्र बदलत असतात. मालिका म्हटली की ती श्रीमंतच असायला हवी असा या मालिकांची निर्मिती करणार्यांबनी जणू ठरवूनच टाकलेलं दिसतयं. या मालिकात श्रीमंत लोकांच्या गरीब समस्या दाखविल्या जातात आणि मध्यामवर्गीय माणूस चणे खात त्या पाहात राहतो. या मालिकांतील पात्र क्षणात गरीब आणि क्षणात श्रीमंत होताना दिसतात. प्रत्येक मालिकेत खास करून हिंदीत मालिकेच्या सुरूवातीला सर्व श्रीमंत दाखवायचे सारं इतक भव्यदिव्य दाखवायची की ते पाहून गरीबांचे डोळेच दिपतील, त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले की मग त्या श्रीमंताना गरीब करायचं मग गरीबांच्या भावनानां हात घालून त्यांच्या मनाचं समाधान झालं की त्यांना जादूची कांडी फिरवून पुन्हा श्रीमंत करायचं आणि गरीबाला ही श्रीमंत होता येत असं स्वप्न गरीबांना दाखवायचं. गरीब ते स्वप्न पाहात असतानाच अचानक ती मालिका बंद करायची आणि गरीबांच्या स्वप्नावर पोतेरं फिरवायचं.
टेलिव्हिजनवर आता एक नवीनचं प्रकार सुरू झालेला आहे पुरूष कलाकारांनी बायकांच्या वेशात वावरण्याचा एक विनोदाचा भाग म्ह्णून हे होत होत तो पर्यत ठिक होतं पण आता ते फारचं किळ्सवाण वाटू लागलेलं आहे. एखाद्या भुमिकेची गरज म्ह्णून पुरूषांनी स्त्री वेशात वावरणं ठिक आहे पण हल्ली बायकांना पुरूषांना स्त्री वेशात पाहायला आवडू लागलंय की काय अशी भिती हळूच मनात डोकावू लागते की काहीतरी नवीन करायचं म्ह्णून पुरूष कलाकारांनी स्त्री वेशात वावरायचं अशी काही नवीन प्रथा सुरू झाली असेल तर ते फारचं विचित्र म्ह्णावं लागेल. कॉलेजात जाणारे तरूण फॅशन म्ह्णून साडी नेसून कॉलेजात नाही गेले म्ह्णजे मिळविली असं म्ह्णण्याची वेळ आलेली आहे.
मी मालिकेशी संबंधीत माझ्या एका मित्राला म्ह्णालो ही तुमच्या मालिकेच्या प्रत्येक भागातील अर्धा-अधिक वेळ स्वयंपाक घरात आणि रॅम्पवॉक करण्यातच जातो त्यावर तो म्ह्णाला मलाही याचा कंटाळा आलायं पण काय करणार ? आता बोला !
समाजात जे घटस्फोटाचे आणि विवाह बाहय प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढत आहे त्याला हया मालिका तर जबाबदार नाहीत ना ? असा प्रश्न ही मला कधी - कधी सतावू लागतो. माझ्या मित्रांना मी मालिका पाहतो हे ऐकल्यावर फारचं आश्चर्य वाटतं ते वाटण्याचं कारण शोधलं असतात आपल्या देशातील फार कमी पुरूष या मालिका पाहतात. पण मला वाटत पुरूषांनी या मालिका नाक्कीच पाहायला हव्यात म्ह्णजे त्यांना हया मालिका आपल्या घरातील बायकांच्या मेंदूत नक्की काय घुसडतं आहेत हे अगदी सहज लक्षात येईल.
मालिकांतीला पात्रे जे पोषाख परिधान करतात तेच पोषाख परिधान करण्याची हुक्की मध्यमवर्गीय स्त्रियांच्या मनात निर्माण होऊ लागते. मालिकेत सती सावित्री दाखविलेल्या नायिकेला जेंव्हा एखादा पुरूष एका बारमध्ये दारू पिताना पाहतो तेंव्हा तो ती मालिका डोळे फाडून पाह्णे थांबवतो. मालिकांतील पात्रांमध्ये आपल्या कडील प्रेक्षक गुंतून पडतात. मालिकांतील कथानकासोबत ते स्वतः ही वाहत जात राहतात.
एखादया माणसाच्या आयुष्यात किती संकट यावी आणि त्यातून त्याने सहीसलामत बाहेर निघावं किती वेळा यालाही काही मर्यादा राहिलेली नाही. या मालिकातील कोणत्या पात्राची बुध्दी कधी भ्रष्ट होईल अथवा त्याची स्मृती नाहिशी होईल हे तर साक्षात परमेश्वरालाही सांगता येणार नाही मला तर वाटत ती मालिका लिहणार्याहलाही ते नक्की माहित नसावं. माझ्या आतापर्यतच्या आयुष्यात असा स्मृती नाहिशी झालेला मी एक ही माणूस पाहिलेला नाही म्ह्णून मी माझ्या एका डॉक्टर मित्राला उत्सूकतेतून विचारलं हे जे मालिकेतील पात्रांची स्मृती जाताना दाखवितात त्यंना काही गोष्टी कशा काय आठवत असतात ? तेंव्हा तो मला म्ह्णाला आपल्या मेंदूत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्मृती साठविलेल्या असतात त्यामुळे मेंदुचा ज्या भागाला इजा पोहचलली असते फक्त त्या भागातील जमा स्मृतीच नाहीशी होते. मालिकेतील कथानक पुढे जाव म्ह्णून एखाद्या मालिकेतील एखाद्या पात्राची स्मृती जाणे मान्य केले जाऊ शकते पण त्यानंतर आणखी चार-पाच मालाकांतील पात्रांची स्मृती जात असेल तर हा कहरच म्ह्णायला नको का ? माझं तर असं ही निरीक्षण आहे की स्मृती जाण्या सारखे प्रकार मालिकात एखाद्या पात्राच्या मृत्यूच्या बाबतीत ही घडताना दिसतात.
सासू सुनेच नातं हा तर या मालिकांचा जणू प्राणच आहे असा समज करून घ्यायला या मालिकांचे निर्माते ही नाही म्ह्णणार नाहीत. सध्याच्या सासू – सूना यामधील नातं बदलत चाललयं अर्थात सूनेला आता सासूचा धाकच उरलेला नाही याला या मालिकाच जबाबदार आहेत. काही पालक स्वतःहून आपल्या मुलाला लग्न झाल्यावर स्वतत्र राहण्याचा सल्ला देतात. एका मालिकेतील लेखक एक पुस्तक प्रकाशित होताच सिलेब्रेटी होतो आणि दुसरीकडे कविता लिहणार्याा नायिकेला एक कविता लिहल्याबद्द्ल फक्त शंभर रूपयाचे मानधन मिळते आणि त्याचा आनंद तिला करोडो रूपये मिळाल्यासारखा व्यक्त करताना दाखविला आहे.
रोजच्या जीवनात घडणार्या घटना हल्ली मालिकांत डोकावताना दिसतात पण हल्ली वडपोर्णिमेलाही मालिकांत मानाचे स्थान मिळू लागले आहे त्यात कहर म्ह्णजे हे असे सण पुरूषांनी ही साजरे करावेत हा अट्टहास खरोखरंच विचार करायला भाग पाडणारा आहे. आता समाजात कायं घडावं, कोणते सण कसे साजरे व्हावेत, कोणत्या परंपरा बुरसटलेल्या आहेत आणि कोणत्या समाज हिताच्या हे सारे आता हया मालिका ठरविणार का ? सध्याच्या माणसाचा खाजगी आयुष्यात मर्यादेपेक्षा अधिक डोकावताना दिसतात. काही पात्रांच्या प्रत्यक्ष आयुष्या घडणार्या् घडामोडींचा संबंधही या मालिकातील कथानकाशी जोडला जातो.
सध्याच्या मालिकात होणारे अंगप्रदर्शन मालिकेची गरज म्ह्णून कमी आणि टी.आर.पी वाढविण्यासाठी अधिक केले जाते हे सत्य आता कोणीही नाकारणार नाही, आपल्या देशातील बहूसंख्य पुरूष ते पाहण्यासाठीच या मालिका पाहत असतात असं बरेच पुरूष खाजगित मान्य करतात. घटस्फोटानंतर आपल्या आयुष्यात लगेच दुसरी व्यक्ती येऊ शकते आणि आपले जीवन पुन्हा आनंदाने बहरू शकते हा फाजील आत्मविश्वास या मालिका आजच्या पिढीच्या मनात निर्माण करतात आणि काही मालिकात घटस्फोटा घेण्यासाठी दाखविली जाणारी कारणे फारंच शुल्लक असतात. इतकी शुल्लक की ती वास्तवापासून प्रचंड दूरची असतात.
देवांवर असणारी मालिका पाहताना त्या मालिकेतून लोकांच्या मनात त्या देवाबद्द्ल श्रध्दा निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर नसतोच उलट त्या पाहणार्यााची डोळ्याची भुक वाढविण्याचे कार्य या मालिका अधिक करताना दिसतात. काही मालिका आहेत ज्या खरोखरच मनोरंजन करतात पण त्यातून बोध घ्यावा असं त्याच्यांत काहीही नसतं.
लोक सध्या मालिकेंच्या प्रेमात पडून आंधळे झालेले आहेत त्यामुळे त्या डोळसपणे पाहण्याची त्यांची तयारीच नसते.
लेखक – निलेश बामणे
गोरेगांव (पूर्व) मुंबई-65
मो. 8652065375 / 9029338268
September 5, 2015
गेल्या १५ दिवसात भारत चीन संबंधांवर परिणाम करणार्या अनेक घटना घडल्या. त्याचे विश्लेशण करुन पाउले उचलणे महत्वाचे आहे. या घट्ना होत्या, दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी चीनने मागितली भारताची मदत, पाकला चीनने दिलेल्या अणुभट्ट्या,उत्तराखंडमधील चीनी घुसखोरी,प्रचंड यांच्या रूपाने भारताला नेपाळत मिळालेली संधी
August 14, 2016
आई जगदंबेच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात….
February 17, 2020
मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.
श्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत.
देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो.
या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणं) होतो. या विधीमध्ये आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर यांसह सहभोजन केलं जातं, या वेळी जत्रेचं नियोजनही ठरवलं जातं. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी...’’ असे गार्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच ‘रान धरणं’ असं म्हटलं जातं.जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही.पारध म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर, या शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते.
मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. या पारधीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जाऊन जत्रेची तारीख निश्चित केली जाते. गावाबाहेर इतरत्र असलेल्यांना या जत्रेची तारीख जाहीर होण्याबाबत प्रचंड उत्सुकता असते.
नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकर्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते.उत्सवादिवशी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. या पाषाणास मुखवटा घालून
साडीचोळी नेसविली जाते. संपूर्ण अलंकार धारण केलेलं देवीचं रूप मनात घर करून जातं. जत्रेच्या पहिल्या दिवशीच पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या दोन दिवसीय उत्सवामध्ये देवीचं रूप अवर्णनीय दिसतं. देवीची ओटी खणानारळानं, तर नवस तुळाभारानं फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटं लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो.हा मान आंगणे समाजातील कुटुंबांचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.
जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. मसुरे पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या या भराडी देवीची ही जत्रा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा योग वर्षातून एकदाच लाभतो.
March 15, 2017
December 4, 2021
शिरो दृष्टि हृद्रोग शूल प्रमेहज्वरार्शो जरायक्ष्महिक्काविषार्तान् |
त्वमाद्यो भिषग्भेषजं भस्म शंभो
त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय ‖ १५ ‖
जगद्गुरूंच्या अफाट संदर्भ विश्वाची चुणूक दाखवणारा हा श्लोक. आरंभीच्या दोन चरणात त्यांनी विविध रोगांची सूची सादर केली आहे.
शिरो - डोक्याशी संबंधित रोग,
दृष्टि- दृष्टीशी संबंधित रोग,
हृद्रोग- हृदयाशी संबंधित रोग,
शूल - आयुर्वेदात वर्णिलेले वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, आमज, वातश्लैष्मिक, पित्तश्लैष्मिक तथा वातपैत्तिक हे आठ प्रकारचे शूल म्हणजे आतून काटा टोचल्याप्रमाणे वेदना देणारे रोग,
प्रमेह- यौवनांगाशी संबंधित रोग, प्रदर रोग,
ज्वर- आयुर्वेदात वर्णिलेले वातजन्य, पित्तजन्य किंवा रसगत, रक्तगत, मांसगत, मज्जागत इ. सर्व प्रकारचे ताप,
अर्श- मूळव्याध, गुदद्वाराशी संबंधित रोग,
जरा- म्हातारपण, त्यामुळे येणारे रोग,
यक्ष्म- फुफ्फुसे तथा श्वास यंत्रणेत होणारे क्षयरोग,
हिक्का- पोटात समान आणि कंठात उदान वायु च्या प्रकोपाने निर्माण होणारे उचकी, ठसका इत्यादी रोग,
विषार्तान् - विषाच्या परिणामाने होणारे रोग,
अशा प्रकारच्या अनेक रोगाने माणूस ग्रस्त होतो. अशा सर्व रोगांनी त्रस्त असणाऱ्या जीवांसाठी,
त्वमाद्यो भिषग्- आपणच आद्य म्हणजे श्रेष्ठ भिषग् म्हणजे वैद्य आहात.
भेषजं भस्म शंभो- हे शंभो ! या सर्व रोगांवर आपल्या दृष्टीने भस्म हेच औषध आहे.
अर्थात आपल्या चरणकमलांवरील भस्मानेच हे सर्व रोग दूर होतात.
त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय - हे भगवंता माझे शरीर हलके करण्यासाठी मला या रोगां मधून दूर कर.
रोग झाले की शरीर जड होते. त्यामुळे शरीर हलके कर अर्थात मला निरोगी कर. तसेच शेवटी या जड शरीरापासून मोकळे करून मुक्ती प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 24, 2020
पुणे हे एके काळचं विद्येचं माहेरघर. त्या काळात सर्वत्र विद्वता नांदत होती. शहरातील मुख्य पेठांमध्ये, डेक्कनला व कॅम्पमध्ये पुस्तकांची मोठी दुकाने दिमाखात उभी होती. या ज्ञानमंदिरांना मी अनेकदा भेटी दिलेल्या आहेत.
May 11, 2023
नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी.
जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही.
दिसायला बारीक सुरकुतलेली जरी दिसली, तरी जिभेवर चुरूचुर निर्माण करणारी चव काही औरच असते.
त्रिकटू या आयुर्वेदीय प्रक्षेप द्रव्यातील सुंठ आणि पिंपळीच्या मधे बसलेली ही मिरी कच्चीच वापरली जाते, हे बहुधा पाश्चात्य मंडळींनी पाहिले, तेव्हापासून ते काळी मिरीची पावडर सूप सॅलेडमधे वापरू लागले. मिरची वापरण्याएवढी आपली योग्य प्रकृती नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मिरचीची तहान त्यांनी मिरीवर भागवली बहुतेक !
आजारपणातून उठल्यावर पहिला घासाच्या तूपभातावर मिरी हवीच. सकाळी दात घासण्याच्या दंतमंजनापासून, पापड आणि ऊसळीपर्यंत तर असतेच. पण अगदी आमरसाच्या वाटीत जावून तुपाच्या बरोबरीने विराजमान होणारी ही मिरी.
सणसणीत उष्ण तीक्ष्ण गुणाची, उत्तम दीपक म्हणजे भूक वाढवणारी, पाचक म्हणजे पचन घडवणारी, घाम आणून ताप कमी करणारी, ह्रदयाला हितकर, उत्तम जंतुघ्न, कृमींचा नाश करणारी, स्रोतसांमध्ये असलेला आमाचा चिकट अडथळा स्वशक्तीने दूर करणारी, आतून जखम स्वच्छ करणारी, सर्दी खोकल्यापासून डायबेटीस आणि ह्रदयरोगापर्यंत अप्रतिम रिझल्ट देणारी, वात कफावर विजय मिळवणारी आणि पित्ताला वाढवणारी असते. सर्व रोगांचे मूळ असलेल्या, मंद अग्निला वाढविणारी असल्यामुळे, वैद्यप्रिया बनलेली आहे.
जिथे पाणी, आंबटपणा, गोडपणा जास्त असतो, तिथे मिरी वापरली जाते. म्हणून कदाचित कोकणात जास्त वापरली जाते. कोकणात उत्पन्न होत असल्याने कोकणी प्रकृतीला सहजपणे मानवणारी, तसाच स्वभाव बनवणारी, पण अंतिमतः सुखकर ठरणारी, ही मिरी म्हणजे अगदी कोकणप्रिया. कोकणी महिलेला आपल्या गळ्यामधील मंगळसूत्रातील जणु काळे मणीच वाटावेत, एवढी प्रिय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.11.2016
November 18, 2016
शिवलीलामृत, स्तोत्ररत्नकार, गुरुचरित्र यासारख्या ग्रंथातून या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णिलेला आहे. इतकेच नव्हे तर श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, श्रीधर स्वामी व संत नामदेवांनीही या शिवतिर्थाचा उल्लेख केला आहे.
August 13, 2013
आपल्या देशात एक पद्धत आहे – जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीं आपण त्या थोर व्यक्तीच्या नांवाचा घोष करतो, समारंभ, भाषणें वगैरे करतो, पुतळ्याला हार घालतो. आणि दुसर्या दिवसापासून पुन्हां ‘जैसे थे’ ! पण, नुसतीच व्यक्तिपूजा नको, तर त्यांच्या विचारांचें मनन, व पालन करणें हेंच खरें तर आवश्यक आहे
May 27, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti