वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कोकण रेल्वे आली, रस्ते महामार्ग आले. कोकणची आर्थिक भरभराट झाली पण माणसांच्या वाढत्या गर्दीत कोकणी माणसाचे घर शोधूनही सापडत नाही मग प्रश्न उपस्थित होतो- ती प्रगती तो विकास नक्की कुणासाठी होता?
विविधतेत एकता जपलेला भारत देश म्हणजे जगासाठी ज्ञानाचा एक अथांग महासागर आहे. या देशाच्या इतिहास, परंपरा आणि वर्तमानातून जगाला घेण्या सारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. असंख्य क्षेत्रातील या देशाची वैशिष्ट्ये आणि ज्ञानाचा खजिना कदाचित भारतीयांना देखील माहीत नसेल. काही क्षेत्रानुसार आणि विषयवार अभ्यास केला तर आपल्याला आपल्या देशाच्या अमूल्य गोष्टी लक्षात येतील. विषय तर अनेक आहेत मात्र त्यातील काही निवडक गोष्टींचा घेतलेला हा धावता आढावा.
भारताच्या अति-पूर्वेकडील प्रांतांत म्हणजे आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, या भागांत काही वर्षांपूर्वी रेलगाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आय.आय.टी.च्या इंजिनीअर्सनी 'अनमॅन्ड एरिअल व्हीइकल' (यु.ए.व्ही.) चा वापर करून रात्रीच्या काळोखात हत्तींना (ते रेल्वेमार्गावर/पाशी आलेले असल्यास) शोधणारे संवेदक बसविले आहेत. या उपकरणाच्या मदतीने हत्तींच्या कळपांची हालचाल 'सेंट्रल रेल ट्रॅक कंट्रोल सिस्टिम'ला कळवली जाईल. तिथून इंजिन ड्रायव्हरला ती माहिती वॉकी-टॉकीवर कळवली जाईल. खबर मिळताच ते गाडीचा वेग कमी करतील व हत्तींच्या बळी पडण्याची शक्यता कमी होईल. ज्या विशिष्ट जंगलातील भागांतून हत्तींची हालचाल जास्त असते, त्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या खालून रस्ते काढण्यात आले आहेत. ज्यावरून हत्ती पलीकडील बाजूला जाऊ शकतील.
सौराष्ट्रातील गीर जंगलाच्या बाजूनं जाणाऱ्या रेल्वेमार्गाजवळून गाडी जात असताना सिंहांची कुटुंबं दिसू शकतात. हा रेल्वेमार्ग पिपाव्ह बंदराकडे जातो. एकदा एका मालगाडीच्या धक्क्याने दोन सिंहिणी तत्काळ मरण पावल्या व त्या मालगाडीबरोबर खेचल्या जाऊन पुढे मार्गाजवळ पडलेल्या आढळल्या. त्यांच्याबरोबर असलेले सिंहाचे ३ बछडे मात्र वाचले होते.
गीर जंगल सिंहांकरता जगप्रसिद्ध आहे. त्या जंगलाच्या बाजूनं एक रेल्वेमार्ग जातो. काही वेळा रात्रीच्या अंधारात सिंह आणि त्यांचे बछडे थेट रेल्वेमार्गावर येतात व त्यावेळी येणाऱ्या गाडीच्या धक्क्याने मरण पावतात. अशा घटना ३ ते ४ वेळा घडल्या आहेत. अशा घटनेत सिंहांचा बळी जाणे योग्य नाही हे लक्षात घेऊन या मार्गावर रात्री ७ ते सकाळी ७ या काळात गस्त घालण्याकरता जवळच्याच खेड्यातील दोन सिंहप्रेमी तरुण काठ्या, टॉर्च व वॉकीटॉकी घेऊन रेल्वेमार्गावर गस्त घालतात. तिथेच आडवे होण्याकरता एक छोटे मचाण बांधण्यात आले आहे. रात्रभरात ५ ते ६ मालगाड्या जात असतात. या वेळात जर सिंहाची डरकाळी ऐकू आली किंवा त्यांची हालचाल दिसली तर जवळच्या स्टेशनमास्तरला ताबडतोब कळविलं जातं, जरूर पडल्यास टॉर्चच्या उजेडाने इंजिन थांबविलं जातं व योग्य तो सल्ला इंजिनड्रायव्हरला दिला जातो. या तरुणांना अंदाजे प्रत्येकी ६०००रु. महिना असा भत्ता दिला जातो. सिंहांवरील प्रेमापोटी रात्रभर जागत राहण्याचं हे काम ते तरुण मनापासून आवडीने करत आहेत.
-डॉ. अविनाश वैद्य
दुसऱ्या महायुद्धात ज्या काही वीरांगना होऊन गेल्या त्यामध्ये एक महत्वाची होती ती म्हणजे वर्जिनिया हॉल.तिचा जन्म बाल्टिमोर येथे ६ एप्रिल १९०६ रोजी झाला.कोलंबिया विद्यापीठात तिचे शिक्षण झाले. तीचे फ्रेंच,इटालीयन,जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.फेब्रुवारी १९४०च्या सुरवातीला तिने फ्रांस सैन्यामध्ये रुग्णवाहिका ड्रायव्हर म्हणून काम केले.फ्रान्सचा पाडाव झाल्यावर ती स्पेनला गेली.तिथे तिची ओळख ब्रिटीश गुप्तहेर,जॉर्ज बेलोस याच्याशी झाली. तो तिच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाला. वर्जिनिया हॉल-(SOE) मध्ये एप्रिल १९४१मध्ये दाखल झाली.
पूर्वीच्या काळात चार आण्याला आगपेटी मिळायची. अजूनही ती मिळते पण आता तिचा वापर फारसा होत नाही, कारण घरोघरी गॅस पेटवण्यासाठी आपण गॅस लायटरचा वापर करतो.

माझा अत्यंत लाडका मित्र, प्रचंड कष्ट घेत घेत जेव्हा एक प्रतिभा संपन्न अभिनेता म्हणून मला मोठ्या पडद्यावर दिसला, तेव्हा त्याचा खूप अभिमान वाटणारी मैत्रीण म्हणून मला त्याला हे पत्र लिहावंसं वाटलं...आपल्या माणसांचं कौतुक करण्याची संधी कधीच सोडू नये असं मला नेहमी वाटतं..आपल्याला त्यांच्या बद्दल काय वाटतंय हे नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवावं..'व्हिक्टोरिया' हा मराठीतील एक दर्जेदार भयपट अलिकडे प्रदर्शित झालाय...या निमित्ताने हे माझ्या मित्राकरता, आशय कुलकर्णी करता खास पत्र...
प्रिय आशय.....
आपली ओळख झाली २०११ साली..'मी राधिका' या नृत्य नाट्याच्या निमित्ताने...प्रॅक्टिसेस ना तर भेटायचोच , पण त्यानंतरही मित्र म्हणून भेटत राहिलो..भरभरून गप्पा मारायचास तू.. नवीन काय करतोयस त्याबद्दल खूप काही सांगायचास.. स्टेज शोज असोत, नाटक असो, अगदी फोटो शूट असो.. सगळी कामं अगदी मनापासून करायचास..तुझ्यामधल्या ठासून भरलेल्या एनर्जी चं मला नेहमी अप्रूप वाटत आलेलं आहे.. आशय ला मी कधीही थकलेला, उदास, निराशावादी पाहिलेलं नाही.. आणि असं जरी तुला कधी वाटलं असेल तरी या सगळ्याला झुगारून तू इथवर आलेला आहेस हे नक्की..
आज हे सगळं लिहिण्याचं निमित्त ..'व्हिक्टोरिया' ...आज सिनेमा गृहात जाऊन आम्ही दोघांनी चित्रपट बघितला..
काही वर्षांपूर्वी 'आय ॲम नॉट चॅप्लिन' च्या निमित्ताने यशवंतराव ला तुला पाहिलेलं.. तेव्हा खात्री पटली.. आपला पोरगा 'लंबी रेस का घोडा है'..आणि खरं सांगू आशय.. तेव्हा तिथे बसल्या बसल्या नक्की वाटलेलं, आज नाटकात तुला पाहत्ये तसं मोठ्या पडद्यावर सुद्धा तुला पाहणार लौकरंच ..नाटक संपल्यावर back stage येऊन घट्ट मिठी मारलेली तुला..आज चित्रपट संपल्यावर वाटलं ,पडद्यातून बाहेर बोलावून तुला अशीच घट्ट मिठी मारावी आणि सांगावं.."किती मोठा झालास तू!!!
चित्रपट पाहताना हे सगळं आठवलं...
स, रे, ग, म, प च्या जाहिरातीत झी मराठी वर आशय दिसतोय..फार भारी वाटलेलं रे...' 'किती सांगायचंय मला' मधला तुझा 'ओम' पाहून मेसेज केलेला मी.. तेव्हा तू म्हणालेलास, " कौतुक होतंय, घरोघरी पोहोचता येतंय, पण पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत'. हे ऐकून खूप कौतुक वाटलेलं तुझं ..डॉ. सुयश चं fan following दिसायचं.. माझ्या विद्यार्थिनी तुझ्या जबरी फॅन बरं का!...डॉ. सुयश कसला भारीये म्हणायच्या तेव्हा मी अभिमानाने त्यांना सांगायचे.. ,"तुमचा डॉ. सुयश आपला मित्र आहे.. "
'भाडिपा' च्या सिरीज मधला कॅलिफोर्नियाचा dashing मुलगा, जो फक्त three कारणांसाठी India त येतो..हाच कोथरूड चा जावई असं वाटलेलं, इतकं छान , सहज काम केलंयस तू....???
काळ कितीही पुढे जावो..टीव्ही वर दिसणारा हिरो आपला मित्र आहे सांगताना आजही कॉलर ताठ होते बरं !...???
वाईट याचं वाटतंय की तुझ्या या सगळ्या कामाचं कौतुक प्रत्यक्ष भेटून करता आलं नाही मला..
' व्हिक्टोरिया ' अनाऊन्स झाल्यापासूनच ठरवलेलं ..थियेटर ला जाऊनच बघायचा सिनेमा..तुला अभिप्राय कसा द्यावा विचार करत होते.. मला लिखाणाचं माध्यम सोपं वाटत व्यक्त व्हायला.. म्हणून हा लेखन प्रपंच..?
नुकता कॉलेज pass out झालेला, वेगवेगळी माध्यमं explore करणारा आशय, ते आज मजल दर मजल करत, प्रचंड कष्ट घेत, इथवर पोहचून मोठ्या पडद्यावर दिसणारा एक उत्तम अभिनेता आशय कुलकर्णी..क्या बात है!!.. सॉलिड आहेस तू..!!!
तुझा खूप अभिमान वाटतो..तुझी मैत्रीण म्हणून..
किती वर्षात आपण भेटलेलो नाही..!! लौकर भेट व्हावी अशी इच्छा आहे...! पुढील वाटचालीकरता शुभेच्छा आणि खूप प्रेम, तुला आणि सौ. Saniya ला सुद्धा....and...
अनेकोत्तम आशीर्वाद...मोठेपणाच्या नात्याने?..
-नेहमी तुझी आठवण काढणारी तुझी मैत्रीण ,गौरी.
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित , पुष्कर जोग, आशय कुलकर्णी व सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला एक अप्रतिम चित्रपट 'व्हिक्टोरिया'..कालपासून सर्वत्र प्रदर्शित झालाय...सिनेमा गृहात जाऊनंच हा थरार अनुभवावा...
आवर्जून बघा...
-- गौरी सचिन पावगी
रेल्वे-कामगार संघटना पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे १९०० ते १९१४ पर्यंत अस्तित्वातच नव्हत्या.
तत्पूर्वी, काही प्रांतांतील रेल्वे-कामगार व वरिष्ठ अधिकारी यांच्यात भांडणं, मारामाऱ्या होत. काहींचे तर मृत्यूही झाले होते, पण कामगारांचे हक्क मागणारी, त्यासाठी भांडणारी कोणतीही संघटना स्थापन झालेली नव्हती. त्या काळानुसार रेल्वे कामगारांचा पगार अतिशय कमी होता. संघर्ष होतच होता. त्यांतून मार्ग काढण्याकरता, कामगारांचं संघटित बळ तयार होण्याच्या दृष्टीने १९१८ सालानंतर भारतातील विविध रेल्वे-विभागांत कामगार संघटना स्थापण्यास सुरुवात झाली. पुढे १९२२ साली 'ऑल इंडिया रेल्वेमन्स फेडरेशन'ची स्थापना झाली. तिच्यात १२ ते १५ विविध रेल्वे संघटनांचा समावेश होता, व जवळजवळ २ लाख कर्मचारी सभासद होते. १९२२ सालापासून ते १९४७ सालापर्यंत विविध प्रदेशांत रेल्वेचे ४८ संप झाले होते. त्यांतले काही एक दिवसाचे, तर काही महिनाभर चालले होते. बंगाल प्रांतातील लिलूहा येथील रेल्वे डबेबांधणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा संप इतका चिघळला, की त्याचं रूपांतर हावरा स्टेशनमधील भीषण दंगलीत झालं. त्यावेळी अंदाजे २१ लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. मागण्या मान्य झाल्याने संपकाऱ्यांना नंतर बऱ्याच सुविधा मिळाल्या, पगारवाढ व प्रॉव्हिडंड फंड योजना सुरू झाली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर (१९४७ ते १९५०) रेल्वे हे एक स्वतंत्र खातं झालं. त्याकरता निराळं अंदाजपत्रक, व रेल्वेसाठी वेगळ्या मंत्र्याची नेमणूक झाली. भारतातील सर्व विभाग 'इंडियन रेल्वे' या एक छताखाली आले. १९५१ मध्ये ९. २५ लाख रेल्वे कर्मचारी होते. दर ४०० भारतीयांमागे १ व १०० कुटुंबांमधून १ व्यक्ती रेल्वेच्या आधारानं आपलं पोट भरत होती. कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा मिळू लागल्या. अनेक हॉस्पिटल्समध्ये उपचार करवण्याच्या सोयी त्यांच्यासाठी उपलब्ध झाल्या. रेल्वेकर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी रेल्वेतर्फे शाळा उभारल्या गेल्या. उच्च शिक्षणासाठी देशात व परदेशांत जाण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात झाली. विविध खेळांकरता अद्ययावत सोयी करण्यात आल्या.
सन १९७२ पासून रेल्वे कामगारांत असंतोष खदखदत होता. त्याचं रूपांतर सन १९७४ च्या मे महिन्यातल्या अखिल भारतीय रेल्वेकर्मचाऱ्यांच्या अभूतपूर्व संपात झालं. या संपाचं नेतृत्व श्री. जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे होतं. तीन आठवडे चाललेल्या या संपामुळे भारतातील संपूर्ण रेल्वे वाहतूकयंत्रणा ठप्प झाली. ५०,००० कामगारांना अटक झाली. ५,९०० बदली-कामगारांना काढून टाकण्यात आलं. त्यात चार कर्मचारी मरण पावले. जगामधील रेल्वेचा गाजलेला संप म्हणून याची नोंद घेतली गेली, या संपात १७ लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. इंदिरा गांधी सरकारनं बरीच दडपशाही करून तो चिरडून टाकला होता. पुढे १९७५ सालात अणीबाणी लागू होण्याला हा संपही कारणीभूत होता. १९७७ च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या अभूतपूर्व पराभवाचे एक कारण हा संपही होता. पुढे निवडून आलेल्या जनता पार्टी सरकारने रेल्वेसंघटनेच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या. या सर्व घटनांची सखोल माहिती देणारं 'रेल्वे स्ट्राईक ऑफ इंडिया १९७४' या नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं.
२००० ते २०१४ या काळात मुंबईच्या लोकल मोटारमनचे अनेक वेळा आकस्मिक संप झाले. त्यातील मे २०१० मध्ये पश्चिम रेल्वे लोकल मार्गावरील मोटरमननी चर्चगेट येथे संध्याकाळी ४ ते रात्री १० पर्यंत चालवलेल्या संपात लक्षावधी लोकांचे हाल झाले; त्यावेळी झालेल्या खोळंबलेल्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी मरणही पावले.
अशा अपवादात्मक घटना वगळता गेल्या १० ते १५ वर्षांत रेल्वे कामगार संघटना व सरकार यांच्यामधले संबंध सलोख्याचे राहिले व त्यामुळे रेल्वे प्रगतीच्या मार्गावर धावत आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
विवोन फोनटेनचा जन्म 8 ऑगस्त 1913 ला फ्रांस मध्ये झाला. तिने हळूहळू 1943 मध्ये जर्मन काबिज फ्रांस मधील क्रांतिकारकारकाना मदत करायला सुरुवात केली.जेव्हा एसओई गुप्तहेर संघटनेचे दोन हेर डेनीस आणि बेनजामीन एसओई संघटनेसाठी घातपाती कारवायांसाठी ट्रॉय शहरात आले. बेनजामीन फोनटेन ला भेटला व त्याने तिला कुरियर म्हणून 2 हजार फ्रँक पगारावर ठेवले. आणि नेनेट सांकेतिक नाव दिले. ती संदेश नेऊ लागली व फ्रान्सच्या उत्तरपूर्व भागात घातपाती साहित्य पोहोचवू लागली. त्यात त्याना यश येऊ लागले. 4 जुलै ला त्यानी जर्मनांची 6 गाडीची इंजिने उद्ध्वस्त केली.फोनटेन ने 18 जखमी अमेरिकन वैमानिकांना स्विसमध्ये पळून जायला मदत केली. 1943 साली जर्मनांनी फ्रांस मध्ये घुसखोरी करून एसओई गुप्तचर संस्थेच नेटवर्क उधवस्थ केले.सप्टेंबर 1943 ते नोव्हेंबर 1943 मध्ये एसओई गुप्तचर संस्थेचे सगळे हेर इंग्लंड मध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले.
फोनटेनने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला.व प्रशिक्षण घेतले. तिथून ती फ्रांसला परतली.तिथे ती पुन्हा एसओई संघटनेच्या हेराना मिळाली. तिने आपले सांकेतिक नाव मीमी असे घेतले. कुरियरचे काम करण्याबरोबर तिने फ्रांस हेराना विमानातून शस्त्र उतरवण्यासाठी गुप्त जागा शोधल्या. ती पॅरॅशूटने उतरलेल्या फ्रांस हेराना भेटली. दोस्त राष्टरणी जर्मनव्याप्त फ्रांसमध्ये आक्रमण केले.आणि जर्मनांची अनेक गोदामे उद्ध्वस्त केली. यात फोनटेनची खूप मदत झाली. .पुढे कार्यकर्त्यापैकी ती एकटी वाचली बाकीचे मारले गेले.
ऑगस्त 1944 पर्यन्त तो जर्मनांच्या ताब्यातून मुक्त होई पर्यन्त ती एकटी लढली.16 सप्टेंबर 1944 ला ती इंग्लंडला गेली. एसओईला दिलेल्या रिपोर्टमध्ये तीने साथीदार मारल्याबद्दल कडवट टिका केली. लंडन मध्ये ती एसओईच्या आपल्या दोन साथीदारासोबत राहिली. त्यानीही एसऑईवर टिका केली. त्यामुळे तिला एसओई कडून कधीही अधिकृत मान्यता मिळाली नाही. महायुद्ध संपल्यावर तिने ड्यूपोंट या फ्रेंच माणसाशी लग्न केले. 9 मे 1996 ला तिचा मृत्यू झाला.
आजकाल आपल्यापैकी अनेकजण अमेरिकेत येत जात असतात. अमेरिकेविषयी त्यांना माहितीही असते. त्या माहितीत मी ही थोडी भर घालीत आहे. मुळात अमेरिका ही अन्य देशांतील लोकांना सर्वस्वी अपरिचित होती.. भारताच्या शोधात कोलंबस निघाला आणि तो अमेरिकेच्या किनाऱ्याला लागला.
मोबाईलच्या टीव्ही च्या जमान्यात रेडिओला तसे महत्व कमी कमी होत गेले असले तरी एकेकाळी हाच आपला सखा होता. मनोरंजनापासून माहिती देण्यापर्यंत सर्व कामासाठी ह्या सख्यावर अवलंबुन राहायचे. आज अनेकजणांना त्याच्या आठवणी असणारे अजूनही काही दुर्गम भागात रेडिओ शिवाय आणखी मनोरंजनाचे माध्यम नाही. शिवाय श्रीभागात देखील आवर्जून रेडिओ ऐकणारे आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti