वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या क्षमता लक्षात घेऊन आपल्या आकांक्षांसाठी सर्वोत्तम करिअर निवडताना आपल्या सर्वांचाच कस लागत असतो. सद्य:स्थितीत सर्वच व्यवसायांतील स्पर्धा, स्पर्धेत मिळवावं लागणारं यश ह्यादृष्टीकोनातून चांगले करिअर म्हणजे न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स होय.
प्रत्येक प्रवासीगाडीला नाव असतं. नाव नसेल, तर ती गाडी जिथून निघते त्या सुरुवातीच्या स्टेशनच्या किंवा जेथे ती अखेरीस थांबते, त्या शेवटच्या स्टेशनच्या नावानं ओळखली जाते; परंतु रेल्वे स्टेशनं, तिकीट कंट्रोल रूम येथे मात्र त्या गाड्या क्रमांकानुसार ओळखल्या जातात. १०० वर्षांपूर्वी गाडीला साधा एक अंकी किंवा दोन अंकी क्रमांक असे. मुंबईहून निघणाऱ्या गाड्यांना ‘डाऊन’ गाडी व मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना ‘अप’ असं संबोधले जाई. त्याप्रमाणे डाऊन गाडीला जो क्रमांक दिला असेल, त्याच्या पुढचा क्रमांक अप गाडीसाठी दिला जाई.
मूर्तीपूजा ही पंचेद्रियांवर अवलबून असलेल्या माणसाच्या आकलनशक्तीची अगतिकता आहे. मूर्तिपूजक आणि मूर्तिभंजक या दोघांनीही जर हे सत्य समजावून घेतले तर दोघेही त्या विश्वनिर्मात्याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने करतानाही परस्परबंधुभाव सांभाळू शकतील. एवढेच नव्हे तर तो वृद्धिंगतही करू शकतील.
१९८० साली जगातील उत्कृष्ट रेल युरेल (युरोप रेल्वे) ने प्रवास करीत असताना उत्तम रेल्वे काय असू शकते याचा ‘याची देही याची डोळां’ अनुभव आला. जर्मनीतील म्युनिक येथील जगप्रसिद्ध म्युझियममधील रेल्वेदालन ही त्याचीच छोटी प्रतिकृती आहे.
सीमाभागातील मराठी माणूस मात्र महाराष्ट्राकडे नि दिल्लीतील मराठी नेत्यांकडे आशाळभूतपणे पहात राहीला नि अजूनही पहातोच आहे. सीमाप्रश्नाचे गांभिर्य केंद्राला कधी वाटलेच नाही. त्याचा नेमका फायदा कर्नाटकाने उचलला. बेळगावची एक इंच भूमीही कर्नाटकाला देणार नसल्याची दुर्योधनी दर्पोक्ती ते करू लागले.
जगात सर्वत्र आर्थिक घडामोडी मोठय़ा प्रमाणावर घडत असतात किंबहुना बहुतेक घडामोडींचं केंद्र हे अर्थकारणच असतं. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राची निवड ही ह्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
भारतीय रेल्वेमधील स्वप्ननगरीचं सुख अनुभवावयाचं असेल, तर ‘पॅलेस ऑन व्हील्स’ या एकमेव अतिश्रीमंत गाडीचं नाव समोर येतं. देशाचा अभिमान, असलेली ही राजेशाही गाडी नवी दिल्लीहून निघून पुढे जैसलमेर, जयपूर, जोधपूर, रणथंबोर (व्याघ्र प्रकल्प), आग्रा असा आठ दिवसांचा आरामदायी व आनंददायी प्रवास घडविते. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे पारंपरिक भारतीय पद्धतीनं सजविलेला महालच आहे.
जगाचा कुतूहलाचा विषय असणारा “डोळे गरगरवून टाकणारा” आयफेल टॉवर पॅरीसवासियांना नको होता, युनिव्हर्सल एक्स्पोझिशन या कलाकृती प्रदर्शनाचा भाग होवू पहाणारा हा टॉवर सुरवातीला शहरात व प्रदर्शनात नसावाच असे अनेकांचे मत होते. ३२४ मीटर उंचीचा व १०१०० टनाचा “गुस्ताव आयफेल” नावाच्या माणसावरून नाव पडलेले हा टॉवर शहराला विद्रूप करणार असे अनेक फ्रेंच लोकांना वाटायचे.
‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीय भाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारतात (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे ) आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’ असा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यक ग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनाम त्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीज नावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ या नावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो.

सिग्नल व्यवस्था अखंड सुरळीत ठेवण्याचं काम केबीन सिग्नलतंत्रज्ञ करतात. रेल्वेचे रुळ, त्यांतील सांधे खेचण्याचा हलणारा दांडा, बॉक्स, विद्युतप्रवाह या सर्वांचा समन्वय झाला, की सिग्नल लागतो. मध्ये एखादा छोटासा खडा जरी आला, तरी यंत्रणा बिघडते. हा बिघाड तत्परतेने शोधणारे रेल्वे कर्मचारी केबिनमध्ये सतत सतर्क असतात. प्रत्येक केबिनची कामाची हद्द २२ कि.मी. किंवा त्याहून जास्त किलोमीटर एवढी असते.
केबिनमध्ये भल्या मोठ्या पॅनेलवर अनेक लाल, पिवळ्या, हिरव्या दिव्यांची उघडझाप होत असते. ती बटणं दाबून रेल्वेचे सांधे बदलून, येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग मोकळा केला जातो. पुणे स्टेशनच्या बाहेरील आउटर सिग्नल केबीनजवळून दहा वर्षांपूर्वी ५०० गाड्या व इंजिनांची ये-जा होत असे, आज २००० गाड्यांच्या व इंजिनांच्या हालचाली होत असतात. यांतील बरीच वाहतूक रात्री १२ ते पहाटे ५ यामधील काळात असते. हे सर्व बघण्यासाठी ओणव्यानं, वाकून काम करावं लागे. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना पाठीच्या दुखण्यांनी ग्रासलं. आता ही सर्व कामं इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. कोणतीही गाडी स्टेशनात शिरताना वा स्टेशनातून बाहेर पडतानाची संपूर्ण जबाबदारी या केबिन कर्मचाऱ्यांची असते. अत्यंत जोखमीचं असं हे काम डोळ्यांत तेल घालून करावं लागतं.
भारतभर पसरलेले १.१५ लाख किलोमीटर अंतराचे रेल्वेमार्ग, ७५०० ते ८००० रेल्वेस्टेशनं व प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या १४,३०० गाड्या, हा सर्व व्याप व्यवस्थितरीत्या सांभाळण्याचं अजस्र काम रेल्वेचे हे सर्व कर्मचारी जोखमीने पार पाडतात.
शंभर वर्षांपूर्वी 'रस्कीन बाँड' हा प्रसिद्ध ब्रिटिश लेखक भारतात रेल्वेनं फिरला. भारतीय रेल्वे यंत्रणेच्या तो इतक्या प्रेमात पडला, की तो भारतातच स्थायिक झाला. त्यानं भारतीय गँगमन, के बिनमन, पॉईंटमन यांच्या प्रामाणिकपणा, चिकाटी या गुणांवर व अथक काम करण्याच्या जिद्दीवर अनेक कथा लिहिल्या. भारतीय रेल्वेच्या या साऱ्या दर्जेदार व्यवस्थेची ही संवेदनापूर्ण पावतीच आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Copyright © 2025 | Marathisrushti