वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कल्याणजी आनंदजी हे निर्मात्यांचे संगीतकार होते.असे म्हणण्याचे कारण ते निर्मात्याला हवे आहे तसे देत असत.थोडक्यात ते बनिया वृत्तीचे होते.आणि स्वताला बनिया म्हणवून घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे.
मैत्री ही फक्त गंमत मजा यासाठी न मर्यादीत रहाता, एकमेकांचा आधारवड बनू शकते, पडत्याला उभारी देउ शकते व एका ध्येयासाठी सर्वांना एकत्र आणू शकते याचे खूप सुंदर दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. हा सिनेमा व्यवसायीक पातळीवर फार यशस्वी नसला तरी याने समिक्षक व चोखंदळ प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली होती. फरहान (अभिनयात पदार्पण), अर्जून रामपाल, ल्यूक केनी आणि पूरब कोहली यांनी चारही मित्रांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवलीय की हे चारजण खरेच कॉलेजपासून मित्र होते असे वाटत राहते. मैत्रीत आवडत्या गोष्टी एकत्र येउन करायला स्टेटस, वेळ व वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारा चित्रपट होता.

'मालगाडी वाहतूक' हे रेल्वेचं सर्वांत जास्त उत्पन्न असलेलं खातं आहे. सामानाच्या गरजेनुसार मालगाडीचे डबे तयार करणं हे महाजिकरीचं काम असतं. डबे बनवल्यानंतर प्रत्येक विभागाचे डबे एकाच मालगाडीला जोडले जातात व काही महिन्यानंतर त्यांची तांत्रिक क्षमता उत्तम साधण्यासाठी ते डबे पुन्हा आपापल्या विभागाकडे पाठविले जातात. मालगाडीचे डबे खालील गोष्टी वाहून नेत असतात:
आज देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भरभराटीत मालगाडीच्या डब्यांमधून होणाऱ्या वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सिंहाचा वाटा आहे. भारतातील कारखान्यांतून व कार्यशाळांतून अशा डबे बांधणीचा वेग सातत्याने वाढतो आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
हिंदी सिनेमा सृष्टीत अनेक फाईट मास्टर झाले पण त्यात सर्वात नावाजलेला होता शेट्टी. कारण तो फाईट मास्टर शिवाय अभिनेता सुद्धा होता.त्याचे नाव होते मुद्दू बाबू शेट्टी. तो मुळचा मंग्लोरचा.लहानपणी त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. म्हणून त्याच्या वडिलांना काळजी होती. त्यांनी त्याला मुंबईला पाठवले.त्यावेळी तो केवळ 9 वर्षाचा होता.मुंबईला आल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. त्याला कॉटन ग्रीन येथे टाटाच्या canteen मध्ये वेटरची नोकरी मिळाली.जेवण व थोडे पैसे याची सोय झाली.प्रसिद्ध जिम्नॅस्टिक् के.एम.मंडन याची भेट झाली.शेट्टीची शरीरयष्टी बघून त्यांनी त्याला बॉक्सिंग चे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्यात तो चम्पिअन बनला.सलग आठ वेळा त्याने मुंबईतील बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली.याच वेळी अभिनेता भगवान यांची नजर त्याच्यावर पडली.त्यांनी शेट्टीला बोलावले व त्यांचे सहकारी बाबुराव पहेलवान यांच्या बरोबर फाईट सीन घेतले व त्याला 200 रुपये दिले.
मला वाटते ‘उरी’ या सिनेमाने नव्या भारताने सर्जीकल स्ट्राइक्स करुन शत्रु राष्ट्रांच्या व त्यांनी पोसलेल्या दहशतावाद्यांच्या मनात धडकी भरवण्याचे व भिती बसवण्याचे जे काम केलय ते हुबेहुब या सिनेमात प्रतिबिंबीत केलय. ‘ये नया भारत है..ये घुसेगा भी और मारेगा भी..’ हे वाक्य भारतीय लष्कराने दोन सर्जिकल स्ट्राईक करुन अधोरेखित केलय. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी हा लेख लिहीताना मला हा पूर्णतया नव्या भारताचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा वाटतो.
प्रवासी रेल्वेमधील प्रत्येक डब्याला दोन्ही बाजूंना दोन अशी समोरासमोर एकूण चार स्वच्छतागृहे असतात. ती वेळोवेळी स्वच्छ ठेवणं, त्यांत व्यवस्थित पाणी पुरवठा करणं व दिवाबत्तीची सोय करणं, कडी कोयंडे तपासून दुरुस्त करून घेणं, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं; पण या महत्त्वाच्या कामात बऱ्याच वेळा निष्काळजीपणा आढळून येतो. त्यामुळे डब्यात शिरताना दाराजवळच येणारी तसंच प्लॅटफॉर्मवर येणारी दुर्गंधी ही एक फार गंभीर समस्या बनलेली आहे. सर्व स्वच्छतागृहे खालच्या बाजूनं उघडी असतात, त्यामुळे रेल्वेरुळांवर व त्यांच्या मधल्या भागात पडणारं मलमूत्रादि सांडपाणी हे आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीनं हानिकारक ठरत आहे. चीनसारख्या देशात गाडी स्टेशनात उभी असताना सर्व स्वच्छतागृहे बंद ठेवली जातात, त्यामुळे रेल्वेस्टेशनवर अजिबात घाण नसते.
स्वच्छतागृहांमधून रेल्वेरुळांवर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे रेल्वेचे रुळ गंजतात. या कारणामुळे रुळ बदलावे लागल्यानं रेल्वेला प्रतिवर्षी ३ कोटी, ५० लाखांपर्यंत खर्च येतो. डब्यांतील स्वच्छतागृहांमुळे होणारी आरोग्य आणि पर्यावरणाची हानी टाळावी व हा खर्च आटोक्यात यावा म्हणून बायोटॉयलेटसच्या वापराची सुरुवात झाली आहे. 'डिफेन्स रिसर्च डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन' (D.R.D.O.) यांनी नवीन पद्धतीची बायोटॉयलेट्स विकसित केली आहेत. Anaerobic Bacteria चा उपयोग करून बायोटॉयलेट्स (ग्रीन टॉयलेटस्) ही Biomethanation या पद्धतीनं तयार केलेली ही नवी टॉयलेटस् पर्यावरणाला शंभर टक्के अनुकूल आहेत. या प्रक्रियेमधून तयार होणारा वायू रंग व वासविरहित असून, थोड्या प्रमाणात पेट घेऊ शकतो. प्रत्येक टॉयलेटच्या खालील बाजूस ९०० लिटर सांडपाण्याचा साठा होऊ शकणारी टाकी असून, तिच्या वरच्या तोटीतून आत निर्माण झालेला वायू वातावरणात मिसळतो. आत जमा होणारी भुकटी मोठ्या स्टेशनवर टॅकच्या खालून काढण्याची सोय आहे. पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरता येतं. अशी स्वच्छतागृहे तयार करण्याचा कारखाना ‘मोतीबाग, नागपूर' येथे आहे. ही स्वच्छतागृहे कपूरथळा (पंजाब) येथे डब्यांना विशिष्ट पद्धतीनं बसविली जातात. स्वच्छतागृहे बसविताना डब्याच्या रचनेत फार बदल करावे लागत नाहीत व संपूर्ण सुरक्षितता काटेकोरपणे सांभाळली जाते. अशा त-हेची स्वच्छतागृहे ग्वाल्हेर, वाराणसी, बुंदेलखंड एक्सप्रेस या गाड्यांना दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेली आहेत. ऑगस्ट २०१३ पर्यंत १४०० पेक्षा जास्त डब्यांमध्ये अशा प्रकारची स्वच्छतागृहे बसविली गेली आहेत, आणि २५,००० स्वच्छतागृहे तयार करण्याचं काम चालू आहे. वातावरण दुर्गंधीमुक्त व प्रदूषणमुक्त करण्याचा रेल्वेचा निर्धार आहे.
बायोटॉयलेट्स
यामध्ये वापरण्यात येणारे जंतू अंटार्क्टिकामधून आणलेले आहेत. Psychrophile नावाचे जंतू मनुष्याच्या विष्ठेच्या घन भागाचे विभाजन करतात आणि त्यामधून गंधविरहित वायू हवेत सोडण्यात येतो. (या गॅसचा बायोगॅस म्हणूनही उपयोग होतो.)
या संपूर्ण प्रक्रियेतून तयार होणारा मळीचा भाग खत म्हणून वापरता येईल व उरलेले निर्जंतुक झालेले पाणी टाकीत साठविले जाईल. या सर्व प्रक्रियेमुळे प्लॅटफॉर्मवर होणारी घाण नाहीशी होईल व रेल्वेचे रूळ सुरक्षित राहण्यास मदत होईल.
-डॉ. अविनाश वैद्य

एक दावा काही लोकं कायम करतात कि तुमच्याजवळ जर प्रतिभा, हुनर असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणी अडवू शकत नाही मग जयदेवजवळ काय नव्हते जे इतर संगीतकारांकडे होते. ज्यांना फक्त दुर्दैवाने साथ दिली? ४२ चित्रपटाना संगीत देऊनही एका खोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहायची शिक्षा मिळाली. 3 ऑगस्ट 1918 ला नैरोबीत जन्मलेल्या जयदेवनी कुटुंब लुधियानात स्थायिक झाल्यावर वयाच्या १५ व्या वर्षी मुंबईत येण्यासाठी घरून पळ काढला.बरकत राय,कृष्णराव जावकर,व जनार्दन जावकर यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले.अली अकबर खान सारख्या मातब्बराकडे शागीर्दकी केली.म्हणजे किती शास्त्रीय संगीताचे ज्ञान त्यांच्याकडे होते. नवकेतनच्या “TAXI DRIVER“ पासून एस डी बर्मन यांच्या कडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. कालापानी मधील “हम बेखुदिमे तुमको पुकारे” गाण्याची कम्पोजीशन जयदेव यांची होती.पण स्वाभाविकपणे संगीतकार म्हणून नाव लागले सचिनदाचे.
सुजाताचे संगीत दिले जात होते.”जलते है जिसके लिये” ची चाल तयार झाली. सचिनदानी सांगितले उद्या रफीला रिहर्सलसाठी बोलवा. जयदेवनी हळूच दादांना बाजूला घेतले व म्हणाले “ “दादा,ट्यून जरा ध्यान से सुनो, ये ट्यून रफिसाब कि नही, ये SOFT ट्यून तलत कि है “ दादानाही ते पटले. देव आनंदने निर्णय केला कि एक चित्रपट जयदेवना देऊ या. म्हणून “ हम दोनो “ चित्रपट जयदेवना दिला. त्यावेळी लतादीदी सचिनदाकडे गात नसत. जयदेव सचिनदाचे सहायक होते त्यामुळे लतादीदी आपल्याकडे गातील याची त्यांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी दीदींना विनंती केली “ कृपया माझ्या कडे गा नाहीतर हा चित्रपट माझ्या हातून जाईल” लतादीदी तयार झाल्या.” झायलोफोन वर वाजवलेली लायटरची ट्यून, चित्रपटाची सिग्नेचर ट्यून झाली.पण नंतर कधीही देव आनंदने जयदेवना स्वतंत्र चित्रपट दिला नाही. याच चित्रपटातील “कभी खुद्पे,कभी हालातपे रोना आया, बात निकली तो हार एक बात पे रोना आया “गाण्यासारखे जयदेव जगले. ऋषिकेश मुखर्जींचा “आलाप” व अमोल पालेकर यांचा “अनकही” हे चित्रपट तर पूर्णपणे रागदारीवर आधारित होते. गमन चित्रपटात त्यांनी गायक हरिहरन यांना ब्रेक दिला.
आयुष्यभर ते अविवाहित राहिले आणि चर्चगेट येथील रिट्झ हॉटेलसमोरच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यात एका खोलीत राहिले. कधी कधी ते दरवाज्याला कुलूप न घालताच बाहेर जात. तेव्हा त्यांना विचारले जाई कि “तुम्ही कुलूप न घालताच बाहेर कसे जाता तेव्हा ते म्हणत “माझ्या कडे चोरून नेण्यासारखे आहेच काय? एक माझं संगीत जे माझ्या हृदयात आहे आणि दुसरे माझं दुर्दैव जे माझं कधीही साथ सोडत नाही.” त्यांना मध्य प्रदेशचे एक लाख रुपयाचे लता मंगेशकर पारितोषिक मिळाले ते घेतल्यावर त्यांना विचारले “ तुम्हाला पारितोषिक मिळाल्यावर कसे वाटते?” ते म्हणाले “आयुष्यात मी कधी एकत्र एक लाख रुपये पाहिले नाहीत “ चेक घेऊन ते कामासाठी दिल्लीला गेले.मुंबईला आल्यावर त्यांनी तो चेक बँकेत भरला.तो क्लीअर होण्या आधीच ६ जानेवारी १९८७ला त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी संगीत दिलेल्या ४२ चित्रपटापैकी कितीतरी चित्रपटाची गाणी गाजली होती.त्यांची गैरचित्रपट गाणी गाजली होती.हरिवंश राय बच्चन यांच्या मधुशालामधील कवीताना चाली देऊन मन्नाडे कडून गाऊन घेतली होती त्यांना तीन वेळा उत्कृष्ठ संगीतकार रेश्मा और शेरा,गमन,अनकही चित्रपटांना मिळाले.आणि सूर सिंगार ४ चित्रपटाना मिळाले. त्यांची गाणी गाजलेले चित्रपट.
१) जोरूका भाई २) हम दोनो ३) किनारे किनारे ४) मुझे जिने दो ५) रेश्मा और शेरा ६) प्रेम पर्बत ७) परिणय ८) आलाप ९) तुम्हारे लिये १०) घरौंदा ११) गमन १२) अनकही
-- रवींद्र शरद वाळिंबे.

शेवटचा प्रसंग
Itzhak Stern:
“Whoever saves one life, saves the world entire..
There will be generations because of you..."
Oskar Schindler :
"I didn’t do enough..."
Itzhak Stern :
"You did so much...
You saved 1200 lives..."
शिंडलर्स लिस्टचा हा शेवटचा संवाद अशक्य म्हणजे अशक्य भारी आहे..
नाझी पार्टीचा सभासद आणि चंगळवादी आॕस्कर शिंडलर..
युद्धात आपली चांदी करायची म्हणून एक भांड्यांची फॕक्टरी चालवतो..
कमी पगार द्यावा लागतो म्हणून बहुतांश ज्यूंना कामावर ठेवतो..
नंतर उपरती होउन आपल्या जास्तीत जास्त कामगारांना नाझींच्या कँपमधल्या मरणापासून वाचवू पहातो..
युद्ध संपेपर्यंत या १२०० ज्यू कामगारांना सांभाळून ठेवतो..
त्यांना अॕश्वीज च्या कँपमधून, मरणाच्या दारातून परत आणतो..
आपली सारी संपत्ती नाझी अधिका-यांना लाच देण्यात संपवतो..
स्वतः कफल्लक होउन शेवटच्या या सीनमधे ती फॕक्टरी सोडून आपल्या पत्नी एमिली सोबत निघून जातो..
आणि मागे उरतात... १२०० कृतज्ञ ज्यू लोक..
आजही जे ज्यू लोक शिंडलरने वाचवले होते त्यांच्या पुढच्या पिढ्या जगभर सुखाने नांदताहेत..
जग त्यांना 'शिंडलर ज्यूज' नावाने ओळखते..
वर सांगितलेल्या या शेवटच्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर सुरु होते ती चित्रपटाची मेन थीम..
हृदय पिळवटून टाकणारे संगीत काय असते हे ऐकायचे असेल तर शिंडलर्स लिस्टची ही थीम ऐकावी..
असे वाटतं की ते तुमचं हृदय जागेवरुन उफाळून, तुमच्या गळ्यातून बाहेर येईल..
डोळ्यांचे धरण कोणत्याही क्षणी फुटून अश्रूंचा महापूर तुमच्या गालावर येईल..
स्टीव्हन स्पीलबर्ग हा स्वतः जन्माने ज्यू आहे..
त्याने निर्मीती दिग्दर्शनाची जबाबदारी अर्थात स्वतःवर घेतली..
शिंडलर्स आर्क या कादंबरीवर बेतलेला ही कथा..
ज्यावर स्टीव्ह झिलीयन ने लिहीलेली जबरदस्त पटकथा..
जानूज कमिन्सकी चे अंगावर येणारे कृष्ण धवल चित्रीकरण..
आणि पहिल्या चित्रपटापासून आजपावेतो स्पिलबर्गच्या सर्व सिनेमांना संगीत देणारा संगीतकार..जॉन विलीयम्स..
चित्रपटाची ही थीम इतकी इम्पॕक्टफुल, इतकी प्रभावी आहे की तुम्ही आधी भारावता नी मग हरवता..
पूर्ण चित्रपटात पाहिलेले असंख्य प्रसंग डोळ्यासमोर नग्न होउन फेर धरतात..
माणूसकीला काळीमा लावणारे भीषण अत्याचाराचे ते पर्व आपल्या नजरेसमोरुन सरकते..
एका ढकल गाडीत अनेक मृत ज्यूंचे प्रेत टाकून नेणारी काही माणसे दिसतात..
'ती' लाल कोट घालून रस्त्याने फिरणारी तीन वर्षाची मुलगी..
त्या ढकल गाडीत आपल्याला तिचेही प्रेत दिसते...
व्हाॕयोलीन ची ती निर्दयी सुरावट तुमच्या काळजात घुसते..
आणि तुमचा बांध शेवटी फुटतोच..
जॉन विलीयम्स हा हाॕलीवूड संगीताचा बेताज बादशाह आहे..
साधारण साडेचार दशकांच्या कारकिर्दीत ५२ आॕस्कर नाॕमीनेशन्स आणी पाच वेळा आॕस्कर जिंकणारा हा अवलिया माणूस..
आपला सुरवातीचे सिनेमे शुगरलँड एक्स्प्रेस आणि जॉज (Jaws) पासून स्पिलबर्ग ने फक्त आणि फक्त जॉन विलीयम्स बरोबरच काम केलय.
त्यांना जेंव्हा स्पिलबर्गने या चित्रपटाची पटकथा ऐकवली तेंव्हाचा प्रसंग त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता..तो असा..
"When he showed me Schindler's List," says Williams, "I was so moved I could barely speak. I remember saying to him, 'Steven, you need a better composer than I am to do this film. '
And he said, 'I know, but they're all dead. ' "
That's a joke...
म्हणजे पहा..जॉन विलीयम्स सारख्या दिग्गज संगीतकाराला देखील आपण या विषयाला न्याय देउ शकू का अशी शंका यावी असाच तो प्रोजेक्ट होता. पण जॉन विलीयम्स यांनी आपलं सर्व ज्ञान, आपलं सर्व सांगितीक कौशल्य पणाला लावून या चित्रपटाचे संगीत अजरामर केलं. यातली लिड व्हायोलीन वाजवणारा इत्झाक पर्लमन हा देखील ज्यूइश आहे. त्याने वाजवताना त्या थिममधे जी करुणा ओतली आहे ती निव्वळ अवर्णनीय आहे
आजही जगभरातील जवळजवळ प्रत्येक सिंफनी वा फिलहार्मोनीक आॕर्केस्ट्रा मधे शिंडलर्स लिस्टची ही थिम वाजवणे हे बहुमानाचे समजले जाते. Its a priviledge to play the theme of Shindler's list.
जोपर्यंत या जगात माणूस माणसासारखे वागेल तोपर्यंत
शिंडलर्स लिस्ट सारखा चित्रपट त्याला आठवण करुन देत राहील की माणसाचा हैवान झाल्यास माणूसकीला काळीमा लागणा-या गोष्टी घडू शकतात..(साठ लाख ज्यू लोक या 'नाझी होलोकाॕस्ट' मधे मारले गेले होते.) पण दुस-या बाजूला एखादा आधीचा स्वार्थी आप्पलपोटा उद्योगपती असणारा आॕस्कर शिंडलर सारखा माणूस स्वतःचे सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यू लोकांना मरणाच्या दारातूनही वाचवतो. अशा चित्रपटाची थिम व संगीत त्या चित्रपटाच्या विषयाला पूरक व प्रभावीपणाने पोहोचवणारे हवे होते.
जॉन विल्यमस्नी हे शिवधनुष्य लिलया पेललंय यात शंका नाही...
टीप:
खाली या थीमच्या तीन लिंक देत आहे
१. स्वतः जॉन विल्यम्स कंडक्ट करताना इत्झाक पर्लमनने लीड व्हायोलीनीस्ट म्हणून वाजवलेली ही थीम नक्की पहा.
३. थीम वाजवताना एका वादक महिलेला भारावून रडू कोसळले त्याचा हा अप्रतिम व्हिडिओ जरुर पहा..
रेल्वेच्या विस्तारामुळे मालाच्या देशांतर्गत वाहतुकीत प्रचंड प्रमाणात वाढ होत गेली असून, त्याचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. त्याचबरोबर परदेशांशी होणारी आयात व निर्यात यांतही भरघोस भर पडलेली आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेत तर क्रांतीच घडविली गेली. रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीमुळे देश प्रगतीच्या वाटेने चालू लागला व त्यामुळे आज भारत स्वत:च्या पायांवर खंबीरपणे उभा आहे.
आसाममधील चहा व ज्यूट; राणीगंजमधील कोळसा; उत्तरप्रदेश व महाराष्ट्र यांत बनणारी साखर; पंजाब, हिमाचल प्रदेशातली फळं; अशा अनेक गोष्टींचं वितरण भारतभर करणं आता सहजपणे शक्य झालं आहे. सर्वांत स्वस्त आणि खात्रीची अशी पोस्ट योजना व पार्सल्स भारताच्या कानाकोपऱ्यांतील दुर्गम जागी रेल्वेमुळेच पोहोचू शकतात. नवीन तयार होणाऱ्या मोटारी, दुचाकी वाहनं, थेट प्रत्येक प्रांतातील गावांपर्यंत पोहोचतात.
रेल्वेमुळे दुष्काळाच्या वेळी अन्नधान्याचा त्वरित पुरवठा तर होतोच, परंतु काही वेळा पाणी सुद्धा पोहचवलं गेलं आहे. सन २०१६ मध्ये लातूर (मराठवाडा) येथे रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला.
डिझेल, पेट्रोल, तसेच थंडगार दुधाचे कंटेनर्स घेऊन मालगाडीचे डबे सतत धावत असतात. मेल एक्सप्रेस गाड्या धावत असताना काही वेळा मालगाड्यांना बराच वेळ खोळंबून ठेवलं जातं. एखादी मालगाडी जर प्रवासीगाड्यांना थांबवून ठेवून पुढे काढली गेली तर प्रवासी किती अस्वस्थ होतात! परंतु खरं पाहता रेल्वेचं ५५ ते ६० टक्के उत्पन्न या मालवाहतुकीमधूनच मिळत असत. युद्धकाळात तर मालगाडी आपल्या सैन्याची जीवनवाहिनीच असते.
-डॉ. अविनाश वैद्य
१९४८ गांधीहत्येनंतर त्यांनी “सुनो,सुनो,ऐ दुनियावालो बापूजीकी अमर कहानी” गाणे लिहिले जे रफिसाहीबानी गायले होते संगीत होते,हुस्नलाल भगतराम यांचे. ते प्रचंड गाजले. “बडी बहन” ची गाणी खूप गाजली.त्याबद्दल निर्मात्याने त्यांना ओस्तिन कार भेट दिली.त्यांनी हिंदीतल्या जवळजवळ सगळ्या संगीतकाराबरोबर काम केले.हुस्नलाल भगतराम पासून ते आर.डी.बर्मन पर्यंत.एका झटक्यात गाणी लिहिणे हा त्यांचा हातखंडा होता. त्यांची गाणी लिहिण्यावर इतकी हुकुमत होती कि ते लिहायला कागद नसेल तर पाच मिनिटात सिगारेटच्या पाकिटावर गाणे लिहित असत..
Copyright © 2025 | Marathisrushti