(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जसा संग तसा रंग

    स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत, परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या पारस दगडाने लोखंडाला स्पर्श केला किंवा त्यात मिसळले तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर जंक पकडतो. आपल सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनवू. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे.

  • सत्य ठरलेलं स्वप्न -कोकण रेल्वे – भाग दोन

    रेल्वेमुळे कमी खर्चात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिशय जलदपणे मालवाहतूक करता येते. पेट्रोल, डिझेलची बचत होते आणि हवेचं प्रदूषण टाळलं जातं. कोकण रेल्वेची 'रो रो वाहतूक सर्व्हिस' हे यामधले पुढचं पाऊल आहे. ही ६० ते ७० डब्यांची मालगाडी आहे. या मालगाडीत मालाने भरलेले ट्रक (ड्रायव्हर आणि क्लिनरसह) चढविले जातात. मुंबईजवळ कोलाड येथे या मालगाडीत ट्रक चढविले जातात व १८ ते २० तासांच्या प्रवासानंतर सुरतकल आणि अंकोला येथे ते उतरतात. पुढे इच्छित स्थळी पोहचतात. नाशवंत माल (फुले, फळे, भाज्या) लवकर आणि कमी पैशांत पोहचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. २००७-२००८ या वर्षामध्ये कोकण रेल्वेच्या माल वाहतुकीतून २६९ कोटी रुपये, तर प्रवासी वाहतुकीतून २३२ कोटी रुपये उत्पन्न जमा झालं. १९९१ सालाच्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १५ वर्षांतील उत्पन्नातून भरून निघाला आहे. रोज जवळजवळ ५० प्रवासी गाड्या या मार्गावर धावत असतात. एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलेल्या या कोकण रेल्वेची एकूण कर्मचारी संख्या ४१५१ इतकी कमी असून, १ कि.मी. रेल्वे अंतराला हे प्रमाण ४.६१ इतकं आहे; तर संपूर्ण भारतीय रेल्वेवर हेच प्रमाण १२.८७ इतकं आहे.

    कोकण रेल्वेच्या मार्ग बांधणीमुळे दोन शहरांतील अंतर किती कमी झालं आहे याचा तक्ता अभ्यासनीय आहे.

    मार्ग पूर्वीचा मार्ग (अंतर) कोकण रेल्वे (अंतर) बचत
    १. मंगलोर-मुंबई २०४१ कि.मी. ९१४ कि.मी. ११२७ कि.मी.
    २. मंगलोर-दिल्ली ३०३० कि.मी.

    २२४९ कि.मी. ७८१ कि.मी.
    ३. कोचिन-मुंबई १८४९ कि.मी. १३३६ कि.मी. ५१३ कि.मी.

    प्रवासाला लागणारा वेळ (तासांत)

    मार्ग पूर्वीचा मार्ग कोकण मार्ग बचत (तासांत)

    १. मुंबई-मंगलोर ४१ तास १५ तास २६ तास

    २. मुंबई-कोचिन ३६ तास २४ तास १२ तास

    ३. मुंबई-गोवा २० तास १० तास १० तास

    महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील कणकवलीच्या स्टेशनमास्तर म्हणून त्याच गावातील एक महिला श्रीमती माया पाटोळे या काम बघत असत. बारीक-सारीक तक्रारींचं निवारण करणं व बराच वेळ निर्मनुष्य स्टेशनावर देखरेख ठेवण्याचं चोख काम त्या कसोशीने करीत. आपल्या गावाचं रेल्वेमुळे भलं झालं आहे, या भावनेमुळे त्यांना स्टेशन सांभाळण्यात भरपूर आनंद मिळाला आहे.

    गोव्यातून कर्नाटकातील उडपी रेल्वेमार्ग सुरू झाला आणि गोव्यातील काणकोण स्टेशनजवळील दारूच्या गुत्त्याचं नशीबही फळफळलं. दुपारी उडपीहून निघणाऱ्या गाडीतून मद्यशौकीन या स्टेशनपर्यंत येत. कारण, कर्नाटकपेक्षा इथे दारू बरीच स्वस्त होती. संध्याकाळी मद्यप्राशन करून रात्रीच्या गाडीने ही मंडळी आपापल्या घरी मुक्कामास परतत.

    या मार्गावरील एका खेड्यातील आजीबाईंनी रेल्वे कधीच पाहिली नव्हती. लग्न होऊन दुसऱ्या गावात राहण्यास गेलेल्या आपल्या मुलीच्या घरापर्यंत रुळांवरून धावणारी ही गाडी जाते हे ऐकून त्या अचंबितच झाल्या. एरवी तिच्या गावाला जाण्याचा रस्ता चांगला ४ ते ५ तासांचा होता. खाच-खळग्यांच्या रस्त्यानं सर्व्हिस मोटारने जाणं क्रमप्राप्त असे. पावसाळ्यात तर हाल विचारूच नका. आता मात्र कोकण रेल्वेमुळे मुलगी १ तासाच्या प्रवासाएवढी जवळ असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला.

    कोकणी माणसांना, कोकणातील प्रदेशांना, अन्य जणांच्या जवळ आणणाऱ्या कोकण रेल्वेनं प्रवास करणं ही एक अक्षरशः वेगळीच अनुभूती असते. त्यातही पावसाळा संपता संपता कोकण रेल्वेचा प्रवास करणं म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची नुसती उधळण वेचून घेऊन प्रवास करणं असतं. हिरव्यागार भातशेतीच्या खाचरांमधून साचलेलं मातकट पाणी, भुरभुरत्या पावसात डोक्यावर कांबळ (इरली) घेऊन काम करणारा शेतकरी, दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, हा सर्व आनंद लुटायचा असेल तर डब्याच्या दाराजवळ उभं राहावं, गार वारा पीत हा खेळ पाहावा. या क्षणांची मजा काही और आहे. मुंबईहून रत्नागिरीकडे जाताना चिपळूण सुटलं, की निसर्गाचं रूप एकदम पालटतं. लाल माती व कातळीचे डोंगर थेट रेल्वे लाईनला भिडलेले. खळाळत वाहणारे छोटे-मोठे ओहोळ, दूरवर छोट्या खेड्यांत जाणाऱ्या तांबड्या मातीच्या पाऊलवाटा, अगदी रेल्वेरुळांना चिकटलेली हिरवी रोपटी, हे सर्व कापत अकराळ-विकराळ, तांबूस, पिंगट, काळपट अशा विविध रंगछटांच्या डोंगर-कपारीतून मार्ग काढत गाडी भोकेवाडीच्या बोगद्यात शिरते. काळ्यामिट्ट अंधारात डोंगर-कपारींच्या कडा डब्यावर चाल करून येतात. गाडीचा रुळांवरील घनगर्जनेचा घुमणारा आवाज छातीचे ठोके चुकवितो. मध्येच इंजिनाच्या जोरदार शिटीचा आवाज त्यात मिसळल्यावर आपला प्रवास कुठे चालला आहे हेच क्षणभर कळेनासं होतं. दहा मिनिटं अंधार आपला सोबती असतो, पण तो हवाहवासा वाटतो, आपला प्रवास असाच चालू राहावा असं वाटू लागतं आणि गाडी बघता बघता रत्नागिरी स्टेशनात शिरते. कोकणातील सर्वच स्टेशन चकाचक, स्वच्छ आहेत. तुरळक माणसांच्या स्वस्थ हालचालींची जाग असलेली ही स्टेशनं वातावरणामुळे मनाला समाधान देतात, पुन:पुन्हा येण्यासाठी आमंत्रण देत राहतात.

    या कोकण रेल्वेचा प्रवास म्हटलं, की आजही एक आठवण मनात हमखास जागी होते. मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत कुडाळ रेल्वे स्टेशनावर आम्ही आठ जण उभे होतो. दिवस पावसाळ्याचे होते, पण आकाश निरभ्र होतं. गाडी सव्वीस डब्यांची असणार होती आणि प्रत्येक क्रमांकाचा डबा कुठच्या जागी येणार याचे इंडिकेटर संपूर्ण प्लॅटफॉर्मवर नीट लावलेले होते. आम्ही वाट बघत होतो. काही मिनिटांतच अनपेक्षितपणे आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. हा हा म्हणता सरीच्या सरी कोसळू लागल्या आणि आम्ही सर्वजण बॅगांसह नखशिखांत ओलेचिंब झालो. गाडी काही येता येत नव्हती. आम्ही हैराण... आणि एकदाचं इंजिन दिसलं, आम्ही डब्यात शिरलो... जवळजवळ संपूर्ण डबा रिकामा होता. जणू तो आमचाच राखीव डबा होता. ओलेचिंब कपडे वाळविण्यासाठी जागाच जागा होती. भिजलेले असूनही आम्ही सुखावलो. जरा विसवतो, तो खानपानाचा मारा सुरू झाला. मांडवी एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांइतके विविध पदार्थ भारतातील कोणत्याच गाडीत बघितले नव्हते. पोहे, भजी, उपम्यापासून मटण, चिकन ते मसाला दूध अशा तब्बल बावन्न पदार्थांनी दहा तासांत हजेरी लावली होती.

    स्टेशनवर पावसानं केलेली फजिती अलगद मागे पडली होती आणि सुरू झाला होता जिव्हासुख देणारा आणि नेत्रसुखद कोकण रेल्वेचा प्रवास! कोकण रेल्वेच्या 'घडण्याचा प्रवास मनात आठवत हा रेल्वेप्रवास करणं हे तर आणखीनच सुखद असतं.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • रेल्वेचा गार्ड

    रेल्वेव्यवस्थापनात 'स्टेशनमास्तर' हे पद जसं महत्त्वाचं असतं, तसंच तांत्रिकदृष्ट्या 'गार्ड' हा संपूर्ण गाडीचा प्रमुख असतो. स्टेशनमास्तर गार्डला गाडी स्टेशनवरून सोडण्याची विनंती करतो, गार्ड-इंजिन ड्रायव्हरला आज्ञा देतो आणि मगच गाडी स्टेशनाबाहेर पडते.

    गार्डला गरज वाटल्यास, काही अपरिहार्य कारणासाठी तो इंजिनड्रायव्हरला गाडी थांबविण्यास भाग पडू शकतो. तत्काळ ब्रेक लावण्याचा अधिकार गार्डकडे.

    दिलेला आहे, म्हणूनच तत्काळ ब्रेकव्हॅनचा डबा हा गाडीच्या शेवटी गार्डच्या जवळ तैनात केला जातो. अणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास गार्ड मार्गावरती छोटा स्फोट घडवून उजेडाची सोयही करून देऊ शकतो. सिग्नल्समध्ये बिघाड असेल किंवा गाडीच्या मशिनचा एखादा भाग काम करीत नसेल, तुटला असेल, तर अशा वेळी इंजिनड्रायव्हर गार्डला विचारल्याशिवाय गाडी पुढे नेऊ शकत नाही. एखाद्या संकटकाळी गाडी पुढे न्यावयाचीच असेल, तर गार्ड तशा लेखी सूचना ड्रायव्हरला द्याव्या लागतात, मगच तो गाडी पुढे नेऊ शकतो. प्रत्येक स्टेशनातून गाडी जात असताना गार्ड स्टेशनमास्तरला दिवा वा झेंडा दाखवतो आणि मगच गाडी पुढे जाते. क्वचितप्रसंगी अगदी छोट्या स्टेशनवर तिकीट देण्याची सोय नसेल, तर गार्ड प्रवाशांना तिकीट देऊ शकतो.

    गजमुखी गार्ड: भारतीय रेल्वेच्या १५० वर्षांपूर्तीनिमित्त प्रसिद्ध केलेलं व्यंगचित्र

    मालगाडीलाही गार्ड असतो. अगदी क्वचित, कधीतरी छोट्या प्रवासात गाडी गार्डशिवाय जाते.

    डिसेंबर २०१३ मध्ये बांद्रे-डेहराहून एक्सप्रेसच्या तीन डब्यांना भीषण आग लागली. त्या स्थितीत गाडी लवकरात लवकर थांबविण्यात यश आलं. गाडीचे गार्ड श्री. पतंगे धावत धावत दोन रेल्वे कामगारांबरोबर जळत्या डब्यांत शिरले. जिवावर उदार होऊन त्यांनी आठ ते दहा प्रवाशांना जळणाऱ्या व कोंडलेल्या धुराच्या डब्यांतून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले. ही घटना गार्डचे कौतुक करण्यासारखी होती, आणि गाडीच्या 'तांत्रिकदृष्ट्या प्रमुख पदाची जबाबदारी दाखवणारीही होती.

    भारतीय रेल्वेची १५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा एक व्यंगचित्र खास प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यात 'गार्ड' हा चालत्या गाडीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो हे सूचित करण्यासाठी हत्तीच्या तोंडासारख्या ‘भोलूला' गार्डचं प्रतीक बनविण्यात आलं होतं. ह्या गजमुखी गार्डच्या हातात एक हिरवा दिवा दिलेला होता. तो गाडीसाठी पुढील रस्ता मोकळा आहे हे दर्शवीत होता. गार्ड हा गाडीच्या प्रवासात खास भूमिका बजावतो हे प्रतिबिंबित केलेलं व्यंगचित्र रेल्वेमधलं गार्डचं महत्त्व बोलकेपणानं सांगणारं होतं.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • लढा सीमेचा ! लढा अस्मितेचा !! (भाग १०)

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी माणसाने सर्वकांही केले. साम, दाम, दंड भोगला. बलिदान दिले, अनंत हालअपेष्टा सहन केल्या, कारावास भोगला. तेंव्हा कुठे दिल्लीश्वरांच्या मनात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा कांहीसा विचार येऊन गेला. त्यादृष्टीने कांही हालचाली होतात न होतात तोच प्रत्येक वेळी राष्ट्रीय आपत्ती आली नि सीमाप्रश्न मागे पडला.

  • स्वातंत्र्य संग्रामातील विरांगना – मातंगिनी हाजरा

    स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक महिला होत्या . त्यातील एक म्हणजे ‘मातंगिनी  हाजरा’.   त्यांची धडाडी मला भावली. माझ्या कलकत्याच्या वास्तव्यात ‘  हाजरा स्ट्रीट’ वरून चालताना मला गहिवरून येत असे. बंगालमध्ये ‘मातंगिनी  हाजरा’ नावाने अनेक शाळा, हॉस्पिटल्स, रस्ते आणि पुतळे उभारले गेले आहेत.

  • रेल्वेची शान दुरान्तो एक्सप्रेस’

    रेल्वेनं गेल्या २० वर्षांत अनेक नवीन प्रवासी गाड्या सुरू केल्या. त्यांपैकी गेल्या ४ वर्षांत प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या गाड्या म्हणजे 'दुरान्तो एक्सप्रेस'. 'दुरान्तो' हा बंगाली शब्द असून, त्याचा अर्थ दूर पल्ल्याची शेवटच्या स्थानकापर्यंत सतत धावणारी गाडी. या गाड्यांची सुरुवात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना झाली होती. त्यामुळे पहिली दुरान्तो मुंबई-कलकत्ता सुरू झाली व हळूहळू भारतभरात अनेक मार्गांवर दुरान्तो गाड्या धावू लागल्या.

    कुर्ला ते एर्नाकुलम (केरळ) ही १२९३ कि.मी. अंतर धावणारी दुरान्तो ही यांपैकी एक महत्त्वाची गाडी. या गाडीचा महाराष्ट्र (कोकण), गोवा, कर्नाटक व उत्तर केरळ असा २२ तासांचा प्रवास म्हणजे रेल्वेप्रेमींसाठी सुखद अनुभव आहे. या गाडीला तांत्रिक गोष्टींकरता रत्नागिरी, मडगाव, मंगलोर, कोझीकोड (कालिकत) येथे थांबे आहेत; परंतु सर्व प्रवासी शेवटच्या स्टेशनपर्यंत जाणारे, त्यामुळे उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांची गडबड-गोंधळ अजिबात नसतो.

    संपूर्ण गाडीला डिझाईन केलेल्या हिरवट-पिवळ्या रंगाच्या पातळ आवरणाने वेगळी रंगविल्याने ती इतर गाड्यांपेक्षा स्वतंत्रपणे अशी उठून दिसते. गाडी पूर्णपणे वातानुकूलित, पैंट्रीचा डबा एकदम चकाचक, सीटखालील काळपट, परंतु गालिच्यासारखे फ्लोअरिंग, या गालिच्याची सफाई करणारे सतत स्प्रे मारणारे कर्मचारी - त्यामुळे या गाडीमध्ये अगदी हॉटेलचं वातावरण अनुभवण्यास मिळतं. सकाळी उठता उठताच चहा, कॉफी, बिस्किटं हजर. मग खाण्याचा माराच असतो. ऑम्लेट, कटलेट, केशरी दूध, चिकन, पनीर ते थेट मोतीचूर लाडू, गुलाबजामपर्यंत विविध प्रकार. खाणं आणून देणारी सर्व नेपाळी मुलं रुबाबदार कपड्यांत येतात. उशाशी ताजं वर्तमानपत्र, प्रशस्त बाकं, उत्तम खिडक्या, जागोजागी चार्जरसाठी प्लग्ज अशा सुखसोयींनी युक्त असलेल्या या गाडीत अनेक प्रवासी लॅपटॉप लावून कामात गर्क असतात.

    संपूर्ण प्रवासात १७१ स्टेशनं लागतात आणि प्रत्येक प्रदेशाचा निसर्ग परस्परांहून अगदी वेगळा आहे. या प्रवासात कर्नाटकाची हिरवळ, वाटेत येणाऱ्या अनेक नद्या, खाड्या, त्यांवरील उत्तम पूल पाहता येतात; तर केरळात गाडी समुद्राच्या कडेकडेने जात असते. दर ५-१० कि.मी.वर छोटी सुबक स्टेशनं व तिथले रिकामे प्लॅटफॉर्मे, दोन्ही बाजूंनी हिरव्यागार नारळ-पोफळीच्या वाड्यांतील आकर्षक बंगले; त्यांच्या सुंदर लाल रंगाच्या भिंती, घरातील, अंगणातील पांढऱ्या संगमरवरातील काम; सारंच वेधक दिसतं. या भागात अरब देशांतील पैसा जागोजागी बोलतो. सर्व स्टेशनांवरील स्वच्छता हे या मार्गावरचं वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात कोकणातील रेल्वेमार्ग बेभरवशाचा असल्याने या गाडीला ८-८ तास उशीर होतो वा गाडी दुसऱ्या मार्गाने न्यावी लागते. त्यावेळी प्रवासी कमी असतात, परंतु एकंदरीत दुरान्तो गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे हे या गाडीला असणाऱ्या भरपूर गर्दीतून नेहमीच लक्षात येतं.

    वातानुकूलित (एसी) दुसऱ्या वर्गाचं तिकीट ज्येष्ठ नागरिकांसाठी १७५५ आहे आणि त्यांतील २५० रु. खाण्याच्या सुविधेचे आहेत.

    कोकणचे छाती दडपून टाकणारे बोगदे, गोव्यातील मांडवी नदीवरील अजस्र पूल, कर्नाटकची हिरवीगार बनं, शरावती नदीचं पात्र, मागे टाकत केरळच्या समुद्राला सलाम करीत पुढे धावणारी दुरान्तो एक्सप्रेस २२ तासांनी एर्नाकुलम या शेवटच्या स्टेशनात शिरते आणि एका अविस्मरणीय प्रवासाची सांगता होते.

    कोकण किनारपट्टीवरील दिघी बंदर ते कोकण रेल्वेवरील महत्त्वाचं असलेलं स्टेशन रोहा'. ह्या दोन्ही जागा एकपदरी ब्रॉडगेजने जोडणारा ३३ कि.मी. लांब रेल्वेमार्ग बांधण्याच्या कामास जोरात सुरवात झाली असून त्यावर ८४ छोटे-मोठे पूल व ४ बोगदे आहेत. प्रकल्पासाठी लागणारा निधी ८०० कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे. या मार्गामुळे परदेशातून होणारी मालाची आयात, तसेच परदेशांना केली जाणारी निर्यात-आयात संपूर्ण देशातून मुंबईपर्यंत न येता होणार आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • रेल्वेयार्ड व तेथील कर्मचारी

    लांब पल्ल्याची गाडी अखेरच्या स्टेशनात म्हणजे मुख्य स्टेशनात आल्यानंतर तपासणीसाठी व इतर छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी नेतात ते ठिकाण म्हणजे 'यार्ड'. यार्डात प्रत्येक डब्याची कसोशीनं तपासणी होते, स्वच्छता होते व ती गाडी परत परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते. या सर्व कामासाठी अनेक कर्मचारी फार कठीण परिस्थितीत यार्डात काम करीत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील माझगाव रेल्वेयार्डाच्या प्रसिद्ध झालेल्या समस्यांकडे पाहता येईल. काही वेळा कर्मचाऱ्यांना यार्डात जाण्यास योग्य रस्ता नसतो. ज्या रुळांवरून अनेक गाड्या वेगाने धावत असतात, त्या मार्गावरून जिवावर उदार होऊनच लाईन ओलांडावी लागते. त्यात भर म्हणून पावसाळ्यात वाढलेलं गवत, पाण्यानं भरलेले खड्डे यांचा सामना करावा लागतो आणि रात्रपाळीच्या कामगारांना तर ही सगळी कसरत काळोखातून करावी लागते. मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या खाली उभं राहून काम करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानं सर्व काम वाकूनच करावं लागतं. चाकं तपासण्यासाठी बाजूनं जाण्यासाठी पुरेशी जागाच नसते. या पासून कँटीन फार दूर असल्यानं कँटीनपर्यंत पोहोचण्यासाठी बरंच चालावं लागतं आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दुपारचा डबा अपरिहार्यपणे उन्हात कुठेतरी झाडाखाली बसून खावा लागतो. माझगाव रेल्वेया मध्ये अतिशय गलिच्छ अशी एक छोटीशी पत्र्याची शेड एका गटाराजवळ बांधलेली आहे. अशा परिस्थितीत काम उत्तम त-हेनं करणं अशक्य होत चाललेलं आहे.

    मध्य रेल्वेच्या माटुंगा व वाडीबंदर या यार्डात डब्यांची मोठी दुरुस्ती केली जाते. तिथे दिवसेंदिवस सुट्या भागांची फार चणचण भासते आहे. शेवटी ठरावीक वेळात गाडी बाहेर काढणं आवश्यक असल्यानं 'इसकी टोपी उसके सर' या म्हणीप्रमाणे एका गाडीचे पार्ट्स दुसऱ्या गाडीला लावण्यावाचून पर्याय उरत नाही.

    मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून, त्या प्रमाणात सुट्या सामानाचा पुरवठाही होत नाही. तरीही, अजून तरी गाडी रुळांवर येताना तिच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही असं रेल्वे जनसंपर्क अधिकारी ठामपणे सांगतात. हे यश यार्डातील कर्मचाऱ्यांचं आहे.

    प्रवासीगाडी पुन्हा उत्तम स्थितीत आणून रुळांवर नेणं यामध्ये रेल्वे यार्डाची फार महत्त्वाची भूमिका असते. त्यामध्ये होणारी लहानशी चूकही प्रवाशांसाठी महागात पडते हेही तितकंच कठोर सत्य आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

    पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे.

  • सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

    असो. विषय वासाचा आहे. नाकाला सुगंध न येणे हे कानाला संगीत न कळण्या  इतकेच दुर्दैवी आहे. आणि हे दोन्ही एका व्यक्तीत एकवटणे म्हणजे दुर्दैव-परमावधीच म्हणायची. सकारात्मकच बोलायचे असेल तर वास न येणे याचेही वेगळे फायदे असतातच. असो. पण विषय (सु)गंधगप्पांचा आहे. मूलतः ‘सुगन्धिं पुष्टिवर्धनम्’ हा शब्द समुच्चय महा-मृत्युंजय मंत्रातील महेश्वराला उद्देशून असला तरी मोठा मौलिक आणि मानवी मनाला मोहविणारा, जवळचा आहे हे त्रिकालाबाधित सत्य –  म्हणूनच केवळ हा गंध पुराण-प्रपंच.

  • फ्रंटियर मेल (गोल्डन टेंपल मेल)

    मुंबईहून दिल्लीमार्गे थेट पाकिस्तानच्या सरहद्दीपर्यंत जाणारी पश्चिम रेल्वेवरील ही एक अति-महत्त्वाची गाडी. दोन रात्रींचा प्रवास करत ही गाडी मुंबईहून अमृतसर शहर गाठते. सरहद्दीपर्यंत जाणारी गाडी म्हणून पूर्वी तिचं नाव 'फ्रंटियर मेल' असं होतं. पुढे अमृतसर तेथील सुवर्णमंदिरामुळे प्रसिद्धीस आल्यानंतर या गाडीला 'सुवर्णमंदिर एक्सप्रेस' असं नाव ठेवलं गेलं. आज ही गाडी त्या दोन्ही नावांनी ओळखली जाते.

    ब्रिटिश राज्यकर्त्यांना मुंबईत बोटीनं उतरल्यावर दिल्ली गाठण्यासाठी मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वे मार्ग हा अधिक जवळचा होता. त्यामुळे ब्रिटिश राजवटीत ह्या गाडीचं महत्त्व बरंच होतं. व्हॉईसरॉय, ब्रिटिश सरसेनापती व इतर मान्यवर याच गाडीनं दिल्लीला जात असत. पुढे स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती राजेशाही थाटात याच गाडीनं प्रवास करीत. आजच्या घडीला ही गाडी हजारो पर्यटकांना सुवर्णमंदिराचं दर्शन घडवते.

    पंजाबचे प्रवासी म्हणजे अफाट सामान, त्यांत भलेमोठाले पेटारे, ट्रंका, खेचून नेता येणाऱ्या जम्बो बॅग्ज, त्याला साजेसे खाण्याचे अनेक कप्पी डबे, घर सजविण्याच्या अनेक शोभिवंत वस्तू, पेटिंग्ज... अशा असंख्य गोष्टी डब्या-डब्यातून दिसतील. त्यातच जर लग्नाचं वहाड असेल, तर मग माहौल औरच. गव्हाळ वा गौरवर्णीय, दागिन्यांनी मढलेल्या, नटलेल्या पंजाबी ललना, त्यांच्याबरोबर दणकट, उंचपुरे, दाढी-फेटेवाले सरदारजी. गाणं बजावणं, सतत चरत राहणं, पंजाबी भाषेत चालणाऱ्या हास्याच्या व गप्पागोष्टींच्या फैरींच्या फैरी या डब्यांमधून लग्नाघराचंच वातावरण तयार करतात. पंजाबी लोक असे दिलदार, की तुम्ही सहप्रवासी म्हणून त्यांच्या डब्यात असाल तर तुम्हालाही आपल्या मौजमजेत व खाण्यापिण्यात सामील करून घेतात.

    माझा वैद्यकीय महाविद्यालयातील मित्र परांजपे ह्या गाडीच्या महाप्रेमात असे. मेडिकल इंटर्नशिप करताना आम्ही पालघर स्टेशनजवळ राहत होतो. मुंबईहून निघालेली फ्रंटियर मेल रात्री साधारण ११ च्या सुमाराला पालघरजवळ तुफान वेगात येत असे. स्टेशनजवळच्या एका लेव्हल क्रॉसिंगच्या फाटकाजवळ आम्ही सर्व मित्र त्या वेळेच्या गप्पागोष्टी मारत या गाडीची प्रतीक्षा करीत असू. बहुतेक वेळा ती बरोबर वेळेत येत असे. दूरवरून प्रथम इंजिनाचा डोळे दिपविणारा उजेड दिसू लागला, की आम्हा सर्व रेल्वेप्रेमींचे चेहरे असे काही फुलत, की त्या आनंदाला तोड नसे. संपूर्ण गाडी जाईपर्यंत, अगदी गाडीच्या शेवटाला असलेला लाल दिवा दिसेनासा होईपर्यंत, मंत्रमुग्ध होऊन खिळून राहिलेले आम्ही नंतरच परतीची वाट धरत असू. अगदी आपणच अमृतसरपर्यंत प्रवास करीत आहोत अशी मनाची अवस्था असे. त्यात परांजपेचा रेल्वेटाईमटेबलचा गाढा अभ्यास! मग तेव्हा त्याची नुसती फ्रंटियर मेलवर आधारित प्रश्नमाला आजच्या 'कौन बनेगा करोडपती' या धर्तीवर सुरू होत असे. पहिल्या प्रश्नातच सर्व जण गारद होत. प्रश्न असे की, रात्री ११ वाजता किती फ्रंटियर मेल प्रवास करत असतील?

    तसंच, त्यावेळी त्या कोणत्या स्टेशनजवळ असतील? कारण, एकूण जाणाऱ्या २ व येणाऱ्या २ मिळून चार गाड्यांना विचारात घ्यायचं असे. उत्तर देणं सर्वांनाच अशक्य, परंतु या महाभागाला उत्तरं बरोबर माहीत असत व त्याचा खुलासा व खात्री तो टाईमटेबल दाखवून लगेचच करून देई.

    जवळजवळ १९६० सालापर्यंत या फ्रंटियर मेल गाडीला आलिशान फर्स्ट क्लासचा डबा (सलून) असे. तो डबा म्हणजे फिरता राजवाडाच होता. पुढे तो वातानुकूलित (ए.सी.) बनला. आता तर या गाडीला ६ ते ७ एअर कंडिशन्ड डबे आहेत.

    आता सुवर्णमंदिर नावाने ओळखली जाणारी ही गाडी बाराही महिने सतत पूर्ण आरक्षित असते. या गाडीची मुख्य खासियत आहे, चिकन बिर्याणी आणि मडक्यातील घट्ट दही. ती खाद्यसंधी खवय्यांना खूश करते. या फ्रंटियर मेलचा प्रवास आजही सुखाचा व आनंद देणारा आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य