(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • एक रुबाबदार अभिनेता – विनोद खन्ना

    गुलजार आपल्या पहिल्या मेरे अपने  चित्रपटासाठी एका वैफल्यग्रस्त तरुणांच्या भूमिकेसाठी शोध घेत होते. त्याच वेळी त्यांची नजर विनोद खन्नावर गेली. त्यांनी त्याला ती भूमिका दिली. त्याच्या या कामाला मिनाकुमारीने सुद्धा दाद  दिली.

  • “वळू”-एका डॉक्यूमेंट्रीचा सिनेमा

    हा..कॅमेराकडे बघून बोला..
    हो..हो तुम्हीच..
    डूरक्याबद्दल बोला..
    वळू म्हणजे देवाला सोडलेला बैल...
    बाया माणसांचा फोटो काडू नये..
    अशा अतरंगी बाईट्सनी वळू हा सिनेमा सुरु होतो..
    आणि मग सुरु होते हास्याच्या सागरातली एक रोलर कोस्टर राईड..
    दोन तासांची अशी राइड जी पूर्ण चित्रपट तुम्हाला खूपच हसवते..
    एका वळूला पकडण्याचा झगडा..त्यावर बनलेली एक अनोखी डाक्यूमेंट्री..आणि त्यातली सर्व बहुरंगी, बहुढंगी पात्रं...
    ही राइड सिनेमा संपल्यावर मात्र तुम्हाला अंर्तमुखही करते..
    याला कारण गिरीश आणि उमेश या कुलकर्णी व्दयांची जबरदस्त पटकथा. पण मी हा लेख या सिनेमावर बेतणार नाहीये. मी फक्त या अविस्मरणीय सिनेमाच्या तितक्याच अविस्मरणीय प्रसंगांवर व संवादांवर लिहीणार आहे.
    आपल्याला एखाद्या सिनेमाचे प्रसंग कशामुळे लक्षात राहतात तर मुख्यतः त्यातल्या संवादांमुळेच. (शोले, दिवार ही उदाहरणे. सलीम-जावेद जोडीकडे ते कसब होते) खरं तर छोट्या प्रसंगातून, संवादातून सिनेमा जेंव्हा पुढे सरकत राहतो तेंव्हा त्याची मजा येते कारण तो सिनेमा आपल्यात हळूहळू झिरपत जातो. ऑन-द-राॕक्स घेतलेल्या स्कॉच प्रमाणे जसे जसे प्रसंगांचे, संवांदाचे बर्फ ग्लासमधे वितळतात तसे तसे त्या सिनेमाची झिंग वाढत जाते..आणि हळू हळू तुम्हाला त्या सिनेमाची नशा चढू लागते.
    वळू सिनेमा बद्दल अगदी तेच झालय...
    आता पहा ना..खरं तर सिनेमाची स्टोरी म्हंटली तर 'वन-लायनर..'
    "एका खेडेगावात मोकाट झालेल्या एका वळूला एक फॉरेस्ट ऑफीसर येउन पकडून नेतो". बस्स..एवढीच स्टोरी. पण इंग्रजीत म्हण आहे. 'The devil is in the details'. वर म्हंटल्याप्रमाणे या कथेची पटकथा होताना या सिनेमात अनेक समांतर कथा गिरीश व उमेश कुलकर्णींनी इतक्या बेमालुमपणे मिसळलेत की हा एक एक बर्फाचा खडा सिनेमा संपेपर्यंत हळूहळू वितळत या स्कॉचची मजा तुम्हाला देत राहतो.
    पात्रे सिनेमात येत राहतात व सिनेमा खुलत जातो.
    फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी), त्याचा डॉक्यूमेंट्री बनवणारा भाउ समीर आणि त्यांचा ड्रायव्हर जगनाडे हा सिनेमाचा मुख्य ट्रॅक. बिबट्या आणी बायसन पकडणाऱ्या गड्डमवारांना जबरदस्ती वळू पकडायला त्यांचे साहेब 'कुसवडे' या गावी पाठवतात. समीरही त्याच्यांबरोबर हा विचार करुन येतो की या वळूला पकडण्यात काही थ्रील असेल तर ते शुट करता येईल. आणि खरंच त्याला जे शुट करायला मिळते ते थरारक असतं हे नक्की.
    सिनेमाची दुसरी ट्रॅक म्हणजे गावचे सरपंच म्हणजे अण्णा (मोहन आगाशे), त्यांची चेंगट बायको (भारती आचरेकर) आणि त्यांचा राइट हँड माणूस म्हणजे जिवन्या (गिरीश कुलकर्णी).
    जीवन्या स्वतःची ओळख 'फारेस्ट' म्हणजे गड्डमवारांना करुन देतानाचा तो सीन फारच अप्रतिम. 'आँ..डाउट काढला व्हय..अवो जीवन सुखदेव चौधरी..अण्णांचा राइट हँड..अण्णानीच सांगीतलं म्हणून सकाळपास्न कुसवडे फाट्याला थांबलोय तुमची वाट बगत..' असं म्हणत हे हसरं पात्र पहिल्याच सिनमधे आपल्याला आणी गड्डमवारांना जिंकून घेतं.
    सरपंच अण्णा म्हणजे तालेवार माणूस. सुपारी कातरत पहिल्या भेटीत फारेस्टला 'स्वानंद गड्डमवारsss..वा..जोरदार नाव आहे..' असे संबोधून सुपारीचा एक तुकडा खायला देत अण्णा त्यांना जेंव्हा सांगतात 'आमच्या कुसवड्याला ऐतीहासीक परंपरा आहे बरं का..!! पानीपतच्या युद्धात आमच्या कुसवड्याची गाढवं गेली होती' असे ते जेंव्हा सांगतात तेंव्हा फारेस्टला ठसका लागतो आणी आपण सोफ्यावरुन हसत खाली येतो..
    जीवन्याची गोड लोभस आई (ज्योती सुभाष) आणी त्याची गुपचुप चाललेली तानी (वीणा जामकर) बरोबरची लव्ह स्टोरी हा या मुख्य ट्रॅक मधला एक साइड ट्रॅक. तानी बोलायला फटकळ. त्यामुळे तिचे डॉयलॉग ही तसेच. जेंव्हा आबा रेणुसे तिला अगदी खेटून आपली बुलेट नेतो तेंव्हा ती आपल्या मैत्रीणीला संगीला म्हणते
    'गावातली समदीच जनावरं माजल्यात जणू..' तेंव्हा आपण लगेच त्याच्याशी रिलेट करतो. वळू (बैल) प्रत्यक्ष सिनेमात येण्याआधीच त्याच्याबद्दलची वातावरण निर्मीती असे अनेक संवादातून होत राहते.
    सरपंच अण्णांचा कट्टर विरोधक आबा रेणुसे (नंदू माधव) व त्याचे चमचे हा सिनेमाचा तिसरा महत्वाचा ट्रॅक. या चमच्यांमधेही नामचीन मंडळी होती जशे की सतीश आबनावे (फक्त सतीश तारें), सुरेश (श्रीकांत यादव) आणि पोपट (सिद्धार्थ झाडबुके).
    या तिघांनी ग्रामीण भागात राजकीय नेत्याला गोड बोलून झाडावर चढवणारे आबाचे चमचे इतके मस्त रंगवलेत की बस्स..
    आबाच्या दोन वर्षाच्या पोरालाही (संपतराव) ते यात सोडत नाहीत. आबाही फुशारकीत 'संपतरावांसाठी तर दिल्लीचा प्लॕन तयार आहे हो..' असे म्हणतात तेंव्हा राजकारणातल्या घराणेशाहीला घेतलेला हा बारीक चिमटा आपल्याला गुदगुल्या करुन जातो.. आणि बिचारे संपतराव आबाच्या अंगावर शू करतात तेंव्हा तिघे आबाची मस्त फिरकीही घेतात.
    आबाला डुरक्याला पकडून गावात हिरो व्हायचं असतं पण अण्णानी फॉरेस्ट ऑफीसरच त्याला पकडायला आणल्याने अण्णांनीच पहिला डाव जिंकलेला असतो. 'आयला या अण्णाच्या....!! न्हाय या फारेस्टच्या आधी डुरक्याला पकडला तर नावाचा आबा रेणुशे नाही' अशी शपथ आबा घेतो तेंव्हा गावातल्या या व अशा राजकीय चढाओढीचा आपल्याला गंमतशीर अनुभव सिनेमाभर येत राहतो.
    संगीता (अमृता सुभाष) आणि शिवा (मंगेश सातपुते) यांची लव्हस्टोरी हाही एक सिनेमातला मजेशीर ट्रॅक आहे. ग्रामीण भागातली एक अल्लड, स्वप्नाळु, प्रेमात पडलेली तरुण पोरगी जशी बोलेल तसेच संवाद संगी च्या तोंडी आहेत. तिचा प्रियकर शिवाही असाच गावठी हिरो. 'संगीवर माझं लव्ह हाय..ती माझी हाय आणी माझीच होणार..' असले संवाद त्याला बरोबर शोभतात.
    असाच एक समांतर ट्रॅक देवळाचा भटजी (दिलीप प्रभावळकर) आणी त्यांची बायको (निर्मीती सावंत) यांचा. घरात संडास नसल्याने गावाबाहेर विधीला सतत जावं लागत असतं आणि डुरक्याची भिती असल्याने बिचारी बायकोही रात्री अपरात्री दिवा घेउन त्याच्यामागे सोबतीला जात असते. त्यात बायकोचा विरोध असूनही तिखट खाणारे भटजीबुवा प्रभावळकरांनी मस्त केलाय. चटणीचा तो प्रसंग आणि बोलता बोलता झालेलः दोघांचे भांडण हा प्रसंग एकदम सुरेख. 'डुरक्याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्याच घराला होतो. आमच्या ह्यांना जरा पोटाचा त्रास आहे..त्यामुळे रात्री अपरात्री यांना परसाकडला जायला लागतं' असं फारेस्टने बोलावलेल्या गावच्या मिटींगमधे त्या सांगतात तेंव्हा हसू आवरत नाही. 'तुम्ही सरकारचेच आहात ना..मग आमचं संडासाचं काम तेवढं करुन द्या' असे फॉरेस्ट ऑफीसरलाच सांगतात तेंव्हा त्यांच्या विनोदावर हसावं की त्यांच्या निष्पाप भावनेचे कौतुक करावे हेच समजत नाही.
    इतर पात्रेही आपल्या खास संवादांमुळे लक्षात राहतात.
    तानीची वहिनी तिला म्हणते कशी दिसते ग मी तेंव्हा तानी 'प्रिती झिंटाच जणू' म्हणते ते खूप नैसर्गिक वाटतं.
    गावच्या हागीणदारी शेजारी राहणारे सतीश (तारे) जेंव्हा 'हागीणदारी हलवा' म्हणतो तेंव्हा भटजींचा पडलेला चेहराही लक्षात राहणारा.
    कुठल्याही प्रसंगात 'मधल्या हिरीतला गाळ काढून टाका' असे सुचवणारा अण्णांचा नोकर शंकऱ्या (प्रशांत तपस्वी) ही भारीच.
    अण्णासाठी सुपारी घ्यायला दुकानात आलेल्या शंकऱ्याला पैसे घेउन सुपारी न देता (कारण ती संपलेली असते) 'मी संध्याकाळी घेतलेले पैसे देत नसते' असे सुनावणारी सुऱ्याची बायको (अश्विनी गिरी), माहेरहून आल्यावर 'डॉक्यूमेंटरी गावात आली हे तुम्हाला ठाउक हुतं का नव्हतं?' आणि दिवसभरचा 'गल्ला कुठाय?' असे विचारत नवऱ्यावर जो जाळ काढते तो केवळ बघण्यासारखा आहे.
    अशा या अफलातून सिनेमाविषयीच्या बऱ्याच गोष्टी लिहीता येतील. पण इथे कितीही केले तरी मला शब्दात सर्व मांडता येणार नाही. मला सिनेमा पाहून अनेक वर्षे झाली. पण मला आजही यातले कित्येक प्रसंग आणि संवाद अजून जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात.
    तुम्हीही बहुसंख्य गल्लीकरांनी हा मराठीतला 'कल्ट' म्हणावा असा सिनेमा पाहिला असेलच. तुमचा आवडता प्रसंग वा संवाद नक्की कमेंट्स मधे लिहा.
    सर्व गल्लीकरांना दसऱ्याच्या शुभेच्छा!!
    'सिनेमाचे सोने घ्या..अन..सोन्यासारखे रहा..'
    ता.क -
    सतीश तारेंनी निभावलेला सतीश आबनावे डुरक्याविषयी माहिती द्यायला समोर येतो तेंव्हा दोन मिनीटात आपल्या भावमुद्रा व टायमींगने त्यांनी जी रंगत आणलीय ती फक्त एकदा पहा. सतीश तारे हा बाप माणूस का होता हे लगेच कळतं.
    लिंक देतोय.

    निर्मीती सावंत यांची जबरदस्त भटजींची बायको..अफलातून सीन. पाहताना हसून पोट दुखेल.

    वळूचे ट्रेलर

    -- सुनील गोबुरे.

  • रेल्वे-कर्मचारी

    भारत सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या सरकारी खात्यांमध्ये सर्वांत जास्त कर्मचारी वर्ग हा रेल्वेखात्यात नोकरी करतो. त्यांची संख्या अंदाजे १४ लाखांपर्यंत आहे. साधारणपणे दर ४५० ते ५०० भारतीयांमध्ये एक व्यक्ती ही रेल्वेशी संलग्न असते. हा आकडा ज्यांना रेल्वेकडून पगार मिळतो त्यांचा आहे, रेल्वेशी जोडल्या गेलेल्या अनेक कंपन्या, बांधकामांवरील कर्मचारी, हे यांहून निराळेच असतात. स्टेशनवरील अनेक जोडधंद्यात असलेली मंडळी हीसुद्धा रेल्वे धावण्याशी निगडित आहेत. असा हा प्रचंड मोठा 'जगन्नाथाचा रथ' लक्षावधी भारतीयांना रोजचा प्रवास. घडवीत असतो. यामधील तीन चतुर्थांश वर्ग हा गँगमन, साफसफाई करणारे कर्मचारी, हमाल, अशा वेगवेगळ्या विभागांतून काम करीत असतो.

    रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून काम करणारे हे लोक ब्रिटिश राज्य असताना तीन श्रेणींमध्ये कामाला होते. पूर्णत: युरोपियन, अँग्लो इंडियन आणि इंडियन. यांपैकी पहिल्या दोन श्रेणीतील लोकांचा दर्जा उच्च असे. त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र व चांगली घरे असत. दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीत काम करणाऱ्यांबाबत मात्र जाणवण्याएवढा भेदभाव असे. १९४६-४७ च्या सुमारास पहिले दोन्ही वर्ग लोपच पावले आणि कर्मचारीवर्गात एकसंधता आली. तत्पूर्वी इ.स. १९२० ते १९४० च्या दरम्यान रेल्वेकर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी ४८ वेळा संपावर गेले होते. स्वातंत्र्यानंतर सर्वांत मोठा संप १९७४ साली मे महिन्यात झाला होता. आता एखाद्या विभागातील मोटरमन, गार्ड्स हे तात्पुरत्या काळासाठी संपावर जातात. एकूण कामगारवर्ग समाधानी असल्याचं चित्रं आहे.

    रेल्वे कर्मचाऱ्यांना राहण्याकरता रेल्वेच्या मालकीच्या राहण्याच्या जागा (Quarters) भारतभर असून, त्यांची बांधणी उच्चदर्जाची आहे. येथील सर्व सोयी अद्ययावत आहेत. रेल्वेकॉलनीची व्यवस्था तर डोळ्यांत भरणारी असते.

    रेल्वेची हॉस्पिटल्स् आधुनिक असून, दवाखाने भारतभर आहेत. तिथे सर्व प्रकारची औषधं मिळण्याची सोय आहे. त्याहून अति-उच्चदर्जाची वैद्यकीय सेवा खाजगी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्समधून मिळण्याची सोय आहे.

    शिक्षण व खेळांकरता रेल्वेचं फार मोठं बजेट असून, त्यातून अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उच्च शिक्षणाची संधी मिळते.

    'भारतीय रेल्वे आपल्या देशाचा मौल्यवान ठेवा आहे' हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारतीय रेल्वेबाबतचे उद्गार होते, आणि ते किती सार्थ आहेत हे भारतीय म्हणून आज आपण अभिमानानं पाहतो आहोत.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • उत्कृष्ट अभिनेता -संजीव कुमार

    संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे  व देहबोलीतून.नया दिन नई  रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा  संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला.

  • हर घर तिरंगा अभियान काय आहे

    प्रस्तावना :-

    भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हर घर झंडा" हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

    भारताच्या स्वतंत्रता दिवसाच्या 75 व्या वर्ष निमित्त लोकांनी आपल्या घरी तिरंगा फडकवावा म्हणून लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारत सरकारचे 'हर घर तिरंगा' हे एक अभियान आहे.
    तिरंगा घरी आणून फडकवावा ही एक व्यक्तिगत बाब नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे . लोकांमध्ये देशभक्ती ची भावना जागृत करण्यासाठी सरकारने उचललेले हे एक पाऊल आहे.

    हर घर तिरंगा अभियान चा कालावधी किती आहे :

    हर घर तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत दि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान झेंडा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या व्यतिरिक्त वर्चुअल स्वरूपात खाली दिलेल्या वेबसाईटवर पिन करून झेंडा फडकवून त्यासोबत एक सेल्फी काढून पोस्ट सुद्धा करू शकतो.

    https://harghartiranga.com
    Azadi ka amrut mahotsav banner

    हर घर तिरंगा अभियानात ऑनलाइन भाग घेण्यासाठी पद्धत :

    • हर घर तिरंगा ऑफिशियल वेबसाईट ओपन करा
    https://harghartiranga.com
    • पुढे जाण्या आधी आपल्या मोबाईल चे लोकेशन ऑन करा.
    • पिन ए फ्लॅग बटन वर क्लिक करून प्रवेश करा.
    • नंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, व फोटो अपलोड करा.
    • नंतर तुमचे लोकेशन सिलेक्ट करा
    • नंतर फ्लॅग वर पिन करा.
    • तुमचा फ्लॅग पिन झाल्याबरोबर तुमचे सर्टिफिकेट जनरेट होईल .डाउनलोड करून ते तुमच्या सोशल मीडिया साईट वर अपलोड करू शकता.
    How to pin flag

    प्रत्यक्ष अभियानात भाग घेण्यासाठी हे करा :

    हर घर अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट पासून लोकांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल वर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.

    • अमृत महोत्सवी अभियान प्रत्यक्षात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान असेल.
    • झेंडा फडकवताना झेंड्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
    • फ्लॅग कोड ऑफ इंडिया च्या नियमांतर्गत येणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
    • या नियमानुसार झेंडा उलटा किंवा जमिनीला लागून नसावा.तसेच सिंगल फ्लॅग पोल वर झेंडा फडकवू नये.
    • तिरंग्याला रुमाल स्वरूपात किंवा शरीराला लपेटून वापर करू नये.

    इन्स्टाग्राम वर हर घर तिरंगा फिल्टर कसा वापरावा :

    • इन्स्टाग्राम अँप ओपन करा
    • @amritMahotsav च्या प्रोफाइल वर जा
    • bio मध्ये दिलेल्या लिंक ला ओपन करा
    • रेकॉर्ड वर प्रेस करा आणि ध्वज साठी स्क्रीन वर टॅप करा
    • आपली स्टोरी / पोस्ट ला #HarGharTiranga सोबत पोस्ट करा
    • स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या प्रोफाइल पिक्चर वर लावा
    How to use har ghar tiranga filter on instagram

    हर घर तिरंगा अभियानानिमित्त महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आहे

    जी आर डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा :

    https://www.mediafire.com/file/ilcz1znhhkw7a7v/हर+घर+तिरंगा.pdf/file

    हर घर तिरंगा अभियानाचा व्हिडीओ :

    https://youtu.be/CJw1iIF_AC0
  • रेल्वे आणि मुंबईचा डबेवाला

    रेल्वेचा पगार घेणारे रेल्वेचे कर्मचारी हा जितक्या सहजतेनं कुतूहलाचा विषय होतो, तेवढ्याच सहजपणे रेल्वेशी अतूटपणे बांधले गेलेले मुंबई शहराचे डबेवाले, रेल्वेतले फेरीवाले, लाल डगलेवाले हमाल, प्लॅटफॉर्मवरची निराधार मुलंमुली यांच्या आणि रेल्वेच्या नात्याबद्दलही कमालीची उत्सुकता वाटते. या लोकांचं जगं, त्यांचे व्यवसाय रेल्वे'शिवाय अगदी कोलमडून पडतील असे असतात आणि म्हणून वेगळ्या अर्थाने ही मंडळी रेल्वेची मंडळी' असतात. यापैकी 'मुंबईचा डबेवाला' हे व्यवस्थापनशास्त्रातलं नेमकं उदाहरण.

    जगप्रसिद्ध असलेला हा 'मुंबई शहरातील डबेवाला' म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरापासून त्याच्या जेवणाचे डबे त्याच्या कामाच्या जागी घेऊन जाणारी अत्यंत योजनाबद्ध व कल्पक अशी एकमेव यंत्रणा आणि संघटना. या योजनेकरता इंधन लागत नाही, संगणकाची गरज नाही आणि आधुनिक यंत्रंही लागत नाहीत. शोधूनही उणीव सापडणार नाही अशी ही कौशल्यपूर्ण यंत्रणा केवळ मनुष्यबळावर उभी आहे. पांढरा लेंगा-शर्ट, पांढरी टोपी, सायकल, डोक्यावरून सहजपणे वाहून नेता येणारे डबे ठेवलेले लाकडी पसरट खोके आणि मुंबई शहराची लोकल सेवा हेच ह्या धंद्याचे भांडवल. गेल्या १२५ वर्षांत एकदाही संप न झालेली ही एकमात्र संघटना असेल. मुंबईच्या डबेवाल्याची ही डबेवाटप योजना स.न. १८९० मध्ये सुरू झाली आणि १९२५ सालापासून लोकल गाड्या सुरू झाल्यावर त्यात आमूलाग्र बदल घडत गेले. दररोज ४५०० ते ५००० डबेवाले डब्यांच्या नेण्याआणण्याचे काम पाहतात. यामध्ये अंदाजे १,७५,००० ते २ लाख इतक्या मोठ्या संख्येनं जेवणाच्या डब्यांची उलाढाल चालते. या लाखोंच्या आकड्यातील डबे पोहोचविण्यात एखादीही चूक न होणं यासारखी अचूकता अन्यत्र कुठे सापडेल?

    नाहीच सापडणार! म्हणूनच फोर्बस कंपनीने त्यांना 'सर्वोत्तम गुणवत्ता क्रमांक' दिला आहे. इंग्लंडचे राजे फिलीप यांनी मुंबईत डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या कामाला जगप्रसिद्धी मिळाली. बी.बी.सी.नं तर त्यांच्यावर एक माहितीपटदेखील काढला होता.

    जागतिक मॅनेजमेंट संस्थेनं या डबेवाल्यांच्या संघटनाप्रमुखाकडून त्यांचं काम कसं चालतं हे विस्तृतपणे समजून घ्यावं म्हणून खास भाषणाकरता त्यांना आमंत्रित केलं होतं.

    मोबाईलवर एस.एम.एस. येण्यापूर्वीच्या जमान्यात घरचे महत्त्वाचे निरोप जेवणाच्या डब्यांतून चिठ्या ठेवून पोहोचविले जात. डब्यांच्या झाकणांवर तांबड्या-काळ्या रंगात उभ्या-आडव्या रेषा, आकडे व इंग्रजी मुळाक्षरं असतात. त्यांचे संदर्भ लावण्याचं कौशल्य प्रत्येक डबेवाल्यानं आत्मसात केलेलं असतं. कोणत्या भागातून डबा उचलायचा, कोणत्या रेल्वेमार्गानं जाऊन कोणत्या स्टेशनवर उतरवायचा व पुढे ऑफिसचा रस्ता बरोबर शोधून तो डबा योग्य वेळी, योग्य व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवायचा या सर्वांचं प्रशिक्षण डबेवाल्यांना दिलेलं असतं. हीच प्रक्रिया दुपारी उलट्या मार्गानं करीत संध्याकाळपर्यंत रिकामा डबा योग्य घरी पोहोचतो. डबेवाले व लोकल गाड्या यांचं गणित अचूक असतं. केवळ ४० सेकंदांत आपल्या लाकडी खोक्यांसकट गर्दीत डबे चढविणे हे डबेवाल्यांसाठी एक महान दिव्यच असतं. त्यात प्रवाशांची भांडणं, आरडाओरडा हे सर्व सहन करीत पुन्हा योग्य त्या स्टेशनात उतरणं हेही तितकंच कठीण असतं.

    हल्ली काही वर्षांपासून सकाळी १० ते १२ या वेळात चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस) व नंतर दुपारी २ ते ४.३० या वेळेपर्यंत सामानाचा खास डबा या डबेवाल्यांसाठी राखून ठेवण्यात येतो. त्यामुळे त्यांचे हाल बरेच कमी झाले आहेत.

    दोन्ही रेल्वे प्रशासनांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून ही अंमलबजावणी केलेली आहे. पावसाळा, संप, दंगली या सर्वांना तोंड देत डबेवाल्यांची सेवा अखंड चालू आहे. एक गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे, की हे डबेवाले आज मुंबई लोकल रेल्वेवर पूर्णपणे अवलंबून आहेत. रेल्वे व डबेवाल्यांची मेहनत या दोन्ही गोष्टींमुळे ही योजना लोकांसाठी जिवाभावाची झाली आहे.

    जगामध्ये अशा प्रकारची व्यापक सेवा अन्यत्र कुठेही नाही.

    डॉ. अविनाश वैद्य

  • सिनेमा बनताना – बॉम्बे टू गोवा

    ”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना  त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल.

  • रेल्वेची इंजिने

    इलेक्ट्रिकची इंजिनं आली आणि गाड्यांचे वेग वाढले. इंजिनड्रायव्हरचं जीवन सुसह्य झालं. मालगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढू लागली. सन १९६२ पासून, म्हणजेच जेव्हा मालगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढू लागली तेव्हापासून, डिझेल इंजिनाचं आगमन झालं. डिझेलवर चालणाऱ्या इंजिनाची हॉर्सपॉवर २६०० ते ५५०० पर्यंत असल्याने लांब पल्ल्याच्या २२ ते २५ डब्यांच्या प्रवासी गाड्यांचा वेग वाढला.

  • रेल्वेमधील फेरीवाले

    अपरिहार्यपणे रेल्वेचाच भाग असल्यासारखे वावरणारे रेल्वेतील फेरीवाले म्हणजे संपूर्ण समाजातील विविध गटांच्या सामुदायिकत्वाचा आरसाच असतो. त्यांत तरुण, मुलं, मुली, बायका, लहान मुलं, म्हातारे, इतकंच नव्हे, तर तुणतुणं वाजवून गाणी म्हणणारे अंधजन हे सर्व जण सामावलेले आहेत. ते सारे आपापल्या परीने हुशार व रेल्वेच्या वातावरणाशी अगदी मिसळून गेलेले असतात. संपूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या विक्रेत्यांकडे एम.बी.ए.ची पदवी नाही, परंतु त्यांना 'विक्री कौशल्या'चं उत्तम ज्ञान असतं. कोणत्या वस्तूंची रेल्वेप्रवाशाला गरज आहे याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला असतो. ते खरे ‘सपनोंके सौदागर' असतात. गाडीतील प्रवाशांना आपल्याजवळील माल दाखविताना त्यांचा बोलण्यातील चतुरपणा, उत्तम भाषेत बोलण्याचा सराव, एखादं लक्षवेधी वाक्य, कधीकधी हातातील सामानाचा एकमेकांवर घासून काढलेला आवाज या सर्वांच्या परिणामी अगदी डुलकी घेणारा प्रवासीसुद्धा जागा होऊन उत्सुकतेनं माल पाहण्यास सुरुवात करतो. प्रवाशांमधील सामान नक्की विकत घेणारे कोण व नुसते पाहून, हाताळूनही न घेणारे कोण याचं ज्ञान त्यांना जणू उपजतच असतं. सतत चालत्या गाडीतून फिरावयाचं, परतण्यासाठी उतरून पुन्हा परतीची गाडी पकडावयाची. सकाळपासून सायंकाळी सात-आठ वाजेपर्यंत धंदा करायचा. त्या प्रमाणात पोलिसांना हप्ता द्यायचा व उरलेल्या कमाईत संपूर्ण कुटुंब पोसायचं असा यांचा जीवनक्रम-दिनक्रम असतो. यांच्यापैकी बहुतेकांनी शाळा, कॉलेज सोडून दिलेलं असतं; परंतु वाममार्ग आचरण्याऐवजी हा कष्टाचा धंदा त्यांनी पत्करलेला असतो.

    शांत चित्ताने चार-पाच तासांचा प्रवास करीत असताना संपूर्ण बाजारपेठ तुमच्या पायाशी आणणारे फेरीवाले साधारणपणे गोड बोलत, न कंटाळता, माल दाखवितात. यांच्याजवळ कंगवे, शिवणकामाचं साहित्य, स्त्रियांसाठी अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधनं, पुस्तकं, मासिकं, लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं, काय काय म्हणून बघण्यास मिळतं! पुष्कळदा डब्यात विकावयास येणाऱ्या अशा काही वस्तू असतात, ज्या बाजारात सहजासहजी दिसतही नाहीत. 'दाम कम', 'वापरा आणि फेकून द्या' हे तत्त्व धरूनच मालाची विक्री केली जाते.

    रेल्वेमध्ये एकाचवेळी मिळणारी खाण्याच्या पदार्थांची विविधतासुद्धा दुसरीकडे कुठेही मिळण्याची शक्यता कमीच असते. रेल्वेच्या पॅन्ट्रीकारपेक्षा वेगळे खाद्यपदार्थ निवडून पुरवले जात असतात. त्यांत प्रत्येक प्रांतातील स्टेशनची खासियत निरनिराळी असते. लोणावळा म्हणजे चिक्की, कर्जतचा बटाटेवडा, शेगावची कचोरी, दिल्लीची आलूरस्सा-पुरी किंवा आगऱ्याचा पेठा... प्रवासीदेखील या सर्व गोष्टींची आतुरतेनं वाट पाहत असतात. चटपट भेळ ते कुल्फी, नाना त-हेची शीतपेयं, भारतभर मिळणारा चहा आणि दक्षिणेतली कॉफी... हजारो, लाखो प्रवाशांच्या चवींचे चोचले पुरविले जातात ते केवळ रेल्वेफेरीवाल्यांच्या सुविधेमुळे! त्यावरच फेरीवाल्यांची हजारो कुटुंबं सुखाने जगतात. या विक्रीव्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल चालते. त्यांचे ना बुक ऑफ अकांऊट, ना त्यांना जागेचे भाडं आणि सर्वच व्यवहार रोख, उधारीचा सवालच नाही. रात्री डेक्कनक्वीनमधून पुण्याला नियमित जाणारे प्रवासी घरच्यांकरता रेल्वेत विकत मिळणारी कुल्फी हमखास घरी नेतात.

    अतिपूर्वेकडील राज्यांत व दक्षिणेत चक्क चादरी, शाली व साड्यासुद्धा विक्रीस येतात. गुजरात व कर्नाटकच्या प्रवासात लहान मुलांसाठी उत्तम खेळणी मिळतात.

    बेकारी वाढत आहे, तसं फेरीवाल्यांचं प्रमाण जास्त होत आहे. त्यांच्या बेसुमार वाढीनं प्रवास करणं नकोसं वाटतं. मध्येच कधीकधी रेल्वे अधिकारी धाडी घालतात व एखाद्या भागातील विक्रेते तात्पुरते नाहीसे होतात; परंतु अखेर सगळेच एकमेकांवर अवलंबून असतात. कायद्याचा बडगा दाखविणारे रेल्वेअधिकारी, पोलीस व फेरीवाले यांच्यातील परस्परसंबंध हे एक अजब रसायन असतं.

    डब्याडब्यातून फिरत सिनेमांतील गाणी-भजनं गाऊन पैसे मिळविणारे, नुसते भीक मागणारे हा आणखी एक निराळाच वर्ग असतो. निव्वळ सहानुभूती मिळवून हे लोक पोट भरतात.

    बरेच अंध-फेरीवाले विविध त-हेच्या वस्तू विकण्याचं कामही करतात. दयेपोटी प्रवासी त्यांना जास्त पैसे देतात, परंतु त्यांच्या अंधपणाचा फायदा घेऊन वस्तू चोरणारे वा कमी पैसे देणारे ग्राहकही बरेच असतात. अंध मुली, तरुण स्त्रिया यांची छेड काढली जाते; पण पोलिसांना त्यांच्याकडून हप्ते मिळत नाहीत या निरुपयोगी लोकांच्या तक्रारींकडे पोलीसही लक्ष देत नाहीत. त्यांचं सामान फेकून दिल्यावर ते उचलणंही त्यांना शक्य नसतं.

    एकदा अतिपूर्वेकडील गाडीच्या दुसऱ्या वर्गाच्या वातानुकूलित डब्यात एकावेळी ६० फेरीवाले घुसले. त्यांतील काही गुंडच होते. टी.सी. व प्रवासी सर्व जण स्वस्थपणे बसून, हवालदिल झालेले! गाडीत एकमेव पोलीस, आणि त्याला बोलाविल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होईल ही भीती; त्यामुळे टी.सी. काहीच करू शकला नाही. नंतर याविरुद्ध बऱ्याच तक्रारी नोंदविल्या गेल्या. तृतीयपंथीयांचा त्रासही असतोच. हे सगळे सहानुभूतीपूर्वक अनुभवतानाही मधूनमधून फेरीवाल्यांवर मर्यादा आणणं गरजेचं आहे हे जाणवत राहतं. त्याची अंमलबजावणी करणं कठीण आहे हे खरं असलं, तरी गाडीमध्ये प्रवाशांच्या गरजेपेक्षा फारच अधिक गोष्टी विकावयास येतात ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही.

    डॉ. अविनाश वैद्य

  • सिनेमा बनताना – दो बिघा जमीन

    सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या  देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता.