भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हर घर झंडा" हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
भारताच्या स्वतंत्रता दिवसाच्या 75 व्या वर्ष निमित्त लोकांनी आपल्या घरी तिरंगा फडकवावा म्हणून लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारत सरकारचे 'हर घर तिरंगा' हे एक अभियान आहे.
तिरंगा घरी आणून फडकवावा ही एक व्यक्तिगत बाब नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे . लोकांमध्ये देशभक्ती ची भावना जागृत करण्यासाठी सरकारने उचललेले हे एक पाऊल आहे.
हर घर तिरंगा अभियान चा कालावधी किती आहे :
हर घर तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत दि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान झेंडा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या व्यतिरिक्त वर्चुअल स्वरूपात खाली दिलेल्या वेबसाईटवर पिन करून झेंडा फडकवून त्यासोबत एक सेल्फी काढून पोस्ट सुद्धा करू शकतो.
हर घर तिरंगा अभियानात ऑनलाइन भाग घेण्यासाठी पद्धत :
- हर घर तिरंगा ऑफिशियल वेबसाईट ओपन करा
- पुढे जाण्या आधी आपल्या मोबाईल चे लोकेशन ऑन करा.
- पिन ए फ्लॅग बटन वर क्लिक करून प्रवेश करा.
- नंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, व फोटो अपलोड करा.
- नंतर तुमचे लोकेशन सिलेक्ट करा
- नंतर फ्लॅग वर पिन करा.
- तुमचा फ्लॅग पिन झाल्याबरोबर तुमचे सर्टिफिकेट जनरेट होईल .डाउनलोड करून ते तुमच्या सोशल मीडिया साईट वर अपलोड करू शकता.
प्रत्यक्ष अभियानात भाग घेण्यासाठी हे करा :
हर घर अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट पासून लोकांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल वर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.
- अमृत महोत्सवी अभियान प्रत्यक्षात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान असेल.
- झेंडा फडकवताना झेंड्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
- फ्लॅग कोड ऑफ इंडिया च्या नियमांतर्गत येणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
- या नियमानुसार झेंडा उलटा किंवा जमिनीला लागून नसावा.तसेच सिंगल फ्लॅग पोल वर झेंडा फडकवू नये.
- तिरंग्याला रुमाल स्वरूपात किंवा शरीराला लपेटून वापर करू नये.
इन्स्टाग्राम वर हर घर तिरंगा फिल्टर कसा वापरावा :
- इन्स्टाग्राम अँप ओपन करा
- @amritMahotsav च्या प्रोफाइल वर जा
- bio मध्ये दिलेल्या लिंक ला ओपन करा
- रेकॉर्ड वर प्रेस करा आणि ध्वज साठी स्क्रीन वर टॅप करा
- आपली स्टोरी / पोस्ट ला #HarGharTiranga सोबत पोस्ट करा
- स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या प्रोफाइल पिक्चर वर लावा
हर घर तिरंगा अभियानानिमित्त महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आहे
जी आर डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा :
हर घर तिरंगा अभियानाचा व्हिडीओ :





रेल्वेचा पगार घेणारे रेल्वेचे कर्मचारी हा जितक्या सहजतेनं कुतूहलाचा विषय होतो, तेवढ्याच सहजपणे रेल्वेशी अतूटपणे बांधले गेलेले मुंबई शहराचे डबेवाले, रेल्वेतले फेरीवाले, लाल डगलेवाले हमाल, प्लॅटफॉर्मवरची निराधार मुलंमुली यांच्या आणि रेल्वेच्या नात्याबद्दलही कमालीची उत्सुकता वाटते. या लोकांचं जगं, त्यांचे व्यवसाय रेल्वे'शिवाय अगदी कोलमडून पडतील असे असतात आणि म्हणून वेगळ्या अर्थाने ही मंडळी रेल्वेची मंडळी' असतात. यापैकी 'मुंबईचा डबेवाला' हे व्यवस्थापनशास्त्रातलं नेमकं उदाहरण.
अपरिहार्यपणे रेल्वेचाच भाग असल्यासारखे वावरणारे रेल्वेतील फेरीवाले म्हणजे संपूर्ण समाजातील विविध गटांच्या सामुदायिकत्वाचा आरसाच असतो. त्यांत तरुण, मुलं, मुली, बायका, लहान मुलं, म्हातारे, इतकंच नव्हे, तर तुणतुणं वाजवून गाणी म्हणणारे अंधजन हे सर्व जण सामावलेले आहेत. ते सारे आपापल्या परीने हुशार व रेल्वेच्या वातावरणाशी अगदी मिसळून गेलेले असतात. संपूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या विक्रेत्यांकडे एम.बी.ए.ची पदवी नाही, परंतु त्यांना 'विक्री कौशल्या'चं उत्तम ज्ञान असतं. कोणत्या वस्तूंची रेल्वेप्रवाशाला गरज आहे याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला असतो. ते खरे ‘सपनोंके सौदागर' असतात. गाडीतील प्रवाशांना आपल्याजवळील माल दाखविताना त्यांचा बोलण्यातील चतुरपणा, उत्तम भाषेत बोलण्याचा सराव, एखादं लक्षवेधी वाक्य, कधीकधी हातातील सामानाचा एकमेकांवर घासून काढलेला आवाज या सर्वांच्या परिणामी अगदी डुलकी घेणारा प्रवासीसुद्धा जागा होऊन उत्सुकतेनं माल पाहण्यास सुरुवात करतो. प्रवाशांमधील सामान नक्की विकत घेणारे कोण व नुसते पाहून, हाताळूनही न घेणारे कोण याचं ज्ञान त्यांना जणू उपजतच असतं. सतत चालत्या गाडीतून फिरावयाचं, परतण्यासाठी उतरून पुन्हा परतीची गाडी पकडावयाची. सकाळपासून सायंकाळी सात-आठ वाजेपर्यंत धंदा करायचा. त्या प्रमाणात पोलिसांना हप्ता द्यायचा व उरलेल्या कमाईत संपूर्ण कुटुंब पोसायचं असा यांचा जीवनक्रम-दिनक्रम असतो. यांच्यापैकी बहुतेकांनी शाळा, कॉलेज सोडून दिलेलं असतं; परंतु वाममार्ग आचरण्याऐवजी हा कष्टाचा धंदा त्यांनी पत्करलेला असतो.