वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पालक म्हणून स्वतःला आवडलेल्या गोष्टींना निग्रहाने नकार देणं आपल्यालाही जमलं पाहिजे.
लग्नसोहळा हा सर्वांच्या आवडीचा विषय. नवरदेव, नवरी, करवले, सोकाण्या, करवल्या, वरमाई, वरबाप , वर्हाड, मांडव, बोहला, जानवसा, देवक,अक्षता, परण्या ,आहेर, वरात हे शब्द मध्यमवर्गाच्या लग्नकार्याची साक्ष देणारे. ग्रामजीवनात लग्नपायर्या ठरलेल्या असतात. हळद लावणे, तेल चढवणे, देवाचे दर्शन, मिरवणूक , मंगलाष्टके, आशिर्वाद, सप्तपदी, सूनमुख पाहणे, भोजन, रंगनाथ दर्शन, नवरी वाटं लावणे, येतीजाती, सोळावा वगैरे. तसेच वाजंत्री, तोफ वाजवणे, घोडा नाचवणे, नवरदेवासमोर नाचणे, फोटो, व्हीडीओ शुटिंग हे आता नविन आलेले प्रकार. तीसेक वर्षापुर्वीचे लग्नपध्दती वेगळी होती.साधी पत्रिका. तांदूळ वाटपाने निमंत्रण. जांभळाच्या पाल्याचा मांडव दारी. लाप्सी,भात आणि कढी हा मेनू. बैलगाडीने वर्हाड लग्नाला जाणार.नव्या पाहुण्याच्या गंजीच्या पेंढ्या उपसणार. बैल फुगूस्तर मागं बघायचं नाही. मग मानपान आलाच. वरमायचा थाट. घागर आडवी येणार.टाॅवेल-टोपी.भेटीगाठी. आदरयुक्त बोलणे. थट्टामस्करी. चावडीत उतरणे. तेव्हाच्या बेसन , पिठले भाकरीची चव आजही जिभेवर रूळलेली. सगळा गाव यायचा. झटू लागायला. स्वयंपाक, झाडलोट सगळे एकत्रच. रात्रीच्या लग्नाची शोभा काही औरच असे.लाऊडस्पिकरची ताटली वाजे.त्यावर एक माॅनिटर ठेवत. अस्सल रांगड मराठी गाणं वाजायचं. दादाच्या गाण्याला , लावणीला विशेष पसंती.पाहुण्याच्या परिस्थितीनुसार लग्न होत. रेडीयो, सायकल, घड्याळ ही मोठी भेटवस्तू.लग्नामध्ये नवरदेवाने रूसणे फुगणे आलेच.
काळ बदलत गेला. लग्नाची पध्दती बदलली. व्यवहार बदलले.ट्रकने , टेम्पोने वर्हाड जाऊ लागले. यात मुलांचा उत्साह शिगेला पोहोचतो. नवे कपडे. एकमेकांशी मस्करी. समवयस्कांचा समूह. आनंद घेणे हे वर्हाडाचे काम.' नवरदेव जातो नवरीसाठी आणि वर्हाड जात खाण्यासाठी' ही अलिखीत पण रूढ म्हण. वर्हाडाच्या अनेक तर्हा. पोरांना ट्रकच्या टपावर ठरलेली जागा.काही ट्रकचे ड्रायव्हर चांगले तर काही खडूस. टपावर बसलं की सगळ्या जगाचे आपणच राजे असा आभास. आपणच ट्रक चालवतो असच वाटायचं. खाली बघ.वर बघ.मोघम आरडा असायचा. झाड आली की कुठलीही पर्वा करायची नाही. पाला तोडायचा . कडूनिंबाच्या निंबोळ्या तोडायच्या.मनसोक्त एकमेकांना मारायच्या.ट्रकमध्ये बसलेल्या मोठ्या माणसालासुद्धा सोडायचे नाही. मस्करी करायची.आनंद घ्यायचा.कुणी ओरडायचं.उखाळ्यांसह गावातलं इत्यंभूत वर्णन आलच.पाऊस असेल तर तिथच ताडपत्री अंगावर.कोणते वर्हाड कुठे हाणलं.हा चवीनं चर्चेचा विषय. लग्नात आलेला रूखवत वाटातच खाऊन टाकायचा.कुरडया फेकून मारायच्या.मजा असायची. मन मोकळ असायच.आता शहरातल्या गर्दीत हरवलेला माणूस पाहिला की हे आनंदाचे क्षण आठवतात.
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मंडळी, तुमची देशविदेशातील अनेक ठिकाणे पाहून झाली असतील. पुढेही पाहता येतील. पण ‘आपल्या मातीत’ घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींबाबत ‘गेले जायचे राहून’ असे व्हायला नको, म्हणून हे सगळं सांगावंसं वाटलं, इतकंच!
देशी गोवन्श पालन मध्ये आजकाल खूप फेमस व ऐकायला व बोलायला सुखकारक वाटणारा मजेशीर शब्द म्हणजे ब्रिड डेव्हलपमेंट. आमच्या गोशाळेत अनेक महान लोक भेटीसाठी नेहमी येत असतात. ज्यांना गाई म्हणजे काय? हे साधे माहित नसते, पण त्यांचे बोलणे ऐकले कि थक्क व्हायला होते. आम्ही अमुक ठिकाणी अमुक जातीच्या गाईचे तमुक इतके {किमान 25 वर} लिटर दूध पाहिले वगैरे वगैरे.
प्रत्यक्ष पत्ता यातील 99% लोकांना माहित नसतो कारण हे एक सांगीवांत असते. मुळात या बाबतीत आमचे म्हणणे खूप वेगेळे आहे. अनेक लोकांना ते पटत असेल किव्हा पटावेच असा आमचा हेतू अजिबात नाही. देशी गोवन्श हा मुळात दुधा साठी नाही. हे आधी आपण आपल्या मनात पक्के केले पाहिजे. गाई पासून मिळणारे पंचगव्य हे तिचे आपणाला मुख्य देणे आहे. बोनस म्हणून आपण दुधाची अपेक्षा केली पाहिजे.
पूर्वीचे गोपालन याच बेस वर सुरु होते म्हणून तेव्हा लोक व गाई दोन्ही खुशीत व सुखात होत्या. नंतर हे जास्त दूध देणारे प्राणी येऊ लागले तसे आपले लक्ष आमच्या या गोमातेच्या कासे कडे गेले व मग आम्ही सुद्धा तिच्या कडून अवास्तव्य अपेक्षा करायला लागलो व आमच्या गोवन्शची व आमची हानी करून घेऊ लागलो.
अनेक पिढ्या नासविल्या, त्यांना अनेक विदेशी जातींसोबत ब्रीडिंग केले व मधील जवळपास 3 दशकातील 4 पिढयांची आम्ही वाट लावली. काही जाती तर आम्ही नामशेष करून टाकल्या. का ?? तर फक्त दूधासाठी, व नंतर कंटाळून या गाई आम्ही कसायाच्या दारात उभ्या करून मोकळ्या झालो.
काय अधिकार होता आपल्याला निसर्गाच्या या कालचक्रात आपले {मूर्ख} डोके घुसवण्याचा ??
कोणी अधिकार दिला होता तो गोवन्श संपवण्याचा??
आपल्या अति लालचेने हा बळींचा मेळावा आपणच भरवला होता व आता हि तेच होताना दिसत आहे.
आमच्या गोमातेला आता कुठे सुखाचे दिवस येत आहेत. लोक आत्ता तिच्याकडे वळायला लागले आहेत. अभ्यासाअंती व अनेक निष्कर्ष अंती तिचे महत्व अधोरेखित होत चालले आहे. पण आमची निद्रिस्त चेतना पण पुन्हा दूध वाढ याच संकल्पनेने जागी झाली आहे. फार काळजी वाटते जेव्हा हा शब्द कानी पडतो...
"तुमची गाय किती दूध देती " ??
व तेव्हा जास्तच वाटते जेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो " आमची गोमाता 7 ते 10 लिटर दूध देते" तेव्हा त्यांचे ओशाळलेले व काहीसे तिरस्कारिक छटेचे त्यांचे चेहरे पाहतो, तरी त्यातला एखादा जाणकार म्हणतोच .
" काय हे गुरुजी 10 वर्ष काम करताय व तुम्हाला गाय 20 लिटर च्या पुढे न्हेता नाही आली "?? छ्या... व या एका शब्दाने आमच्या गोपालनाची पुरती विल्हेवाट लावतो .
आम्ही आजही लोकांना हेच सांगण्यात मग्न आहोत कि गाय हि दुधासाठी नसून तिच्या गोमय , गोमुत्रासाठी आहे .
त्यात खरी ताकद आहे. आपली शेती, मती, गती जर वाढवायची असेल तर नुसते दूध वाढवून उपयोग नाही तर त्या माऊलीच्या वात्सल्याचे गुण वाढले पाहिजेत .
याचे उदाहरण असे....
जर आपण ब्रिड डेव्हलप करत गेलो कि आपण त्या कडे फक्त आणी फक्त दुधाचे मशीन याच नजरेने पाहत जातो. ज्यामुळे तुमचे आणि तिचे नाते एका ठराविक स्वार्थावर जिवन्त राहते कि तू मला जेवढे दूध देशील तेवढे तुला खाद्य मिळेल व हाच स्वभाव के त्या माऊलीच्या मनात, नंतर तनात, व कालांतराने दुधात जातो.
यावर विचार करून बघा....
मुळातच सध्या जगात किती स्वार्थी पणा आहे हे आपण पाहतो आहे. जर अश्या वेळेस हे दूध आपल्या शरीरात गेले तर त्याचे मनावर होणारे दुष्परिणाम आपण कसे टाळू ??
मान्य... मातेचे दूध उत्तम... पण सायन्सने हे सिद्ध केलेले आहेच कि तिची मनस्थिती हा विषय सुद्धा महत्वाचा आहेच.
जसे आपल्याला {स्त्रीत्वाला } नियम लागू होतात कि गर्भावस्थेत असताना तिच्या मनावरील विचार तिच्या गर्भावर जातात व तिच्या दूध प्राशनाने ते सबळ होतात तोच विषय इथे आहे.
म्हणून आम्हाला ब्रिड डेव्हलपमेंट या शब्दाची भीती वाटतेय.
-- श्री प्रतिक उमेश भिडे (गुरुजी)
मोरया गोसंवर्धन
वाटेगाव
९८९००८२०४५
परमेश्वराने एका हातात ‘आनंद’ आणि एका हातात ‘समाधान’ कोंबून पाठवलेलं असतं.
नेहाच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरिता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’ बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.
एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो... अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो... त्यावर माणसे ठाम असतात... खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते... विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे... म्हणजे मग तो विकसित होतो... जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात... ‘माणूस’ समजणे सोपे जाते...
दृष्टिकोन म्हणजे नकाशा. तोच चुकीचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही... एकच ध्येय असलेली माणसेही वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचतात, याचे कारण म्हणजे चुकीचे नकाशे... अर्थात चुकीचे दृष्टिकोन....
म्हणूनच ‘नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे’ असे म्हणतात.
-- Amit Sonar
श्री. शेखर आगासकर यांनी श्री. गिरीश टिळक यांचा चीनबद्दल लिहिलेला लेख , ‘मराठी सृष्टी’वर upload केला आहे. लेख उत्तमच आहे. टिळक यांनी लिहिलेले मुद्दे बरोबरच आहेत. पण आणखीही कांहीं गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील.
बाप्पाचं आगमन अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलंय. काही प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचे पाद्यपूजन सोहळे झाल्याने मंडळांमध्ये आता मंडप सजावटीसाठी सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे तरुणाईही त्यांच्या हटके पद्धतीने बाप्पाचं आगमन करायला सज्ज झाली आहेत.
गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात काढलेले तब्बल 4 हजार व्हिडीओ शॉट्स केवळ 5 मिनीटांत दाखवण्याचा प्रयत्न सर्वेश शिर्के या तरुणाने केला आहे. सर्वेश शिर्के या तरुणाच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या डॉक्यूमेंटरीचं नाव ‘आगमनाधिश’ असे असून असा अनोखा प्रयोग पहिल्यादांच करण्यात आला असल्याचं त्याचं म्हणणं आहे. ‘आगमनाधिश’चं पहिलं सादरीकरण चिंचपोकळी चिंतामनीच्या पाद्यपूजन सोहळ्यात करण्यात आलं. त्यानंतर हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला. अल्पावधितच तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 25 हजाराहून अधिक व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत. यामध्ये गणेशमुर्तीच्या सजावटीपासून ते बाप्पाच्या विसर्जनापर्यंतचं सारंकाही अवघ्या 5 मिनीटांमध्ये पाहता येईल.
या संकल्पने विषयी सर्वेशला विचारलं असता तो म्हणाला,‘या व्हिडीओचा विचार माझ्या मनात खूप वर्षांपासून होता. 2016 ला आगमनच्या दिवशी ते फुटेज शुट झाले पण ते एडिट होत नव्हते. 4000 हून जास्त शॉटस् कमी वेळात असल्यामुळे बर्याच तांत्रिक अडचणी येत होत्या. गेल्या वर्षभरात हा व्हिडीओ 7 वेळा एडिट करण्यात आला पण तो पूर्ण होतच नव्हता. शेवटी त्या बाप्पाची ईच्छा असावी, त्याच्या पाटपूजनालाच हा व्हिडीओ रिलिज करण्यात आला,’
व्हिडीओशी सुसंगत असलेलं गाणं निवडण्यापासून ते घेतलेले सर्व शॉट्स योग्यरितीने मांडण्यापर्यंत सारं काही अवघड आहे. त्यामुळे साहजिकच यासाठी एडीटींगचाही चांगलाच कस लागणार असणार. शिवाय या व्हीडीओसाठी केलेली कॅलिग्राफीही बघण्यासारखी आहे. व्हीडीओ पाहताना मधूनच संतोष जुवेकरच्या ‘मोरया’ चित्रपटातील एखादा डायलॉग मध्येच एकू येतो आणि खरंच या बाप्पाच्या सेवेसाठी तरुणाई किती झटते याची जाणीव होते. कलेचा अधिपती असलेल्या बाप्पासाठी कलेच्या मार्फतच केलेली पूजा खरेच उल्लेखनीय म्हणावी लागेल.
चिचंपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जनात आपल्या आरतीच्या तालावर सर्व भाविकांना थिरकायला लावणारे संजय नलावडे यांचा आवाज ऑडिओ-व्हिडीओ स्वरुपात सर्वेशने गेल्यावर्षी बंदिस्त केला होता. त्या व्हिडीओलाही मुंबईकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे यंदाची त्याची संकल्पनाही युट्यूबवर चांगलीच गाजते आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात, लोकांना सहज करता येत असलेले परंतु आकडेमोडीसाठी अत्यंत किचकट आर्थिक व्यवहार सुलभतेने व्हावेत, म्हणून १ एप्रिल १९५७ रोजी दशमान पद्धत आणि नवीन नाणी व्यवहारात आली. या ” नव्या ” म्हटल्या गेलेल्या पैशांची आता ” षष्ठ्यब्दीपूर्ती ” साजरी होत आहे. त्या निमित्ताने हे थोडे स्मरणरंजन !! ” नवाकाळ” वृत्तपत्राने माझा हा लेख प्रसिद्ध केला आहे.
अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे..
Copyright © 2025 | Marathisrushti