वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सध्या सर्वत्र UPSC MPSC टॉपर्सच्या सत्कार व मनोगत व्यक्त करण्याचे पीक सर्वत्र आलेय- पुढे टीप असतेच- सेमिनारच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी batch सुरु होणार ह्यातून काय समजायचे - टॉपर्सचे मनाला हळुवार भिडतील असे अत्र तत्र सर्वत्र पोस्टिंग्स करायचे- बौद्धिक मते मांडायची आणि व्हा व्हा मिळवून स्वतःची पाठ थोपटून घ्याची- मुलेही मिळतात म्हणा- दुनिया बनती है बनानेवाला चाहिये- और ये तो मुंबई है- आजकाल पूना मे भी येही फॅड है!
क्लास लावताना जरा ह्या गोष्टी विचारच:
१) result सांगा- किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलं-त्यातील कितींनी मुख्य परीक्षा दिली-त्यापैकी किती उत्तीर्ण झाले?
२) फॅकल्टी सांगा- परीक्षा पास होऊन शिकवणारे आहे कि परीक्षा पास होत नाही म्हणून लेकचर मधून आर्थिक घडी शिवणारेच आहेत- हेही काही वाईट नसतात -अनेकदा उत्तमच असतात-पण नेहमी नाही-ते तपासाच
३) UPSC असेल तर वरील मुद्दा अजून महत्वाचा-कारण मग Academicans म्हणजे विषय तज्ज्ञ आणि स्पर्धक असे दोन फळीतील फॅकल्टी लागतात- एका विषयाला किमान दोन!
४) पुण्यात,ठाण्यात,गोरेगावात म्हणे UPSC १६००० मध्ये शिकवतात- MPSC अजून १२००० मध्ये- हा निव्वळ फसवेपणा असावा किंवा मोठे औदार्य दाखवणारे फॅकल्टी असावे- आपण हे विचारा कि टोटल कोर्स किती तासांचा- UPSC सामान्य अध्ययन किमान ४०० तासांचा, वैकल्पिक विषय किमान १३० तासांचा, आणि MPSC राज्यसेवा किमान ४०० तासांचा अभ्यासक्रम आहे- तासाला उत्तम फॅकल्टी किमान ७००/- घेतात हे लक्षात ठेवून गणित मांडा- ह्यात प्रशाकीय खर्च-नफा हे वगळले आहे- तरी फीस बाबतीत एक अंदाज येईल. कमी फीस म्हणजे सर्व वाईटच असे नाही, पण मोफत शिकवणारे- ज्ञानदान देणारे सोडून बाकीचे मग स्पर्धेत टिकायचे म्हणून कमी तासात ,किंवा हलके फॅकल्टी वापरून हे गणित जुळवता- आपण डोळस पणे हे तपासले पाहिजे- MPSC राज्यसेवा शुल्क साधारणपणे ३२-३५००० असते व UPSC चे ८५००० च्या आसपास असावे.
५) पण वरील गणितात वर्गात किती विद्यार्थी आहे हे मांडलेच नाही- आपण सांगा किती असावे- एक शिक्षक किती विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकतो-१-२-३-४.... किती-हा अंदाज बांधा आणि विचार-BATCH साइझ.
६) टेस्ट सिरीज तर असावीच- सराव परीक्षा हवेच- त्याचे वेळापत्रक मागा -शक्य असल्यास मागच्या वर्षीच्या टेस्ट पहा-
७) अभ्यासिका-लायब्ररी हवीच- एक वेळ AC क्लासरूम नसेल तरी चालेल-पण समृद्ध लायब्ररी हवीच
८) मेंटॉर हवेच-जसे पी व्ही सिंधू ला गोपीचंद आहे, सचिन ला रमाकांत आचरेकर आहेत, तसे स्पर्धकाला देखील हवेच.
९) आजकाल सोशल मीडियावर मोफत नोट्स,दरोजचे बातम्या पसरवीत काही मुले नियमितपणे क्लासची जाहिरात करतात-पैसे ठेवून होत असलेली ह्या मार्केटिंगला तर मुळीच भुलू नका- ह्या मार्केटिंग तज्ज्ञांचे स्वतः कोणतीही परीक्षा पास न होण्यामागचे कारण हेच असावे कि चालू घडामोडी म्हणजे आज कि ताजा खबर नसते हे ह्यांना कळलेच नाही!
१०) ह्याव्यतिरिक्त आपण सुज्ञपणे तपासा- भेटा-वारंवार भेटा-डेमो लेक्चर हा प्रकारच फसवा असतो- का ते समजून घ्या -
भुलू नका- भान ठेवा- क्लास का लावताय तो उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाला अनुसरून क्लास काय देतेय ह्याचा तपास करा मग क्लास प्रवेश निश्चित करा
-- प्रा. हितेशकुमार एस. पटले
नमस्कार... मी म्युच्युअल फंड बोलतोय.....
खूप वर्षांपासून तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती. खरं तर तुमच्यावर खुप अारोप करायचेत, तक्रार करायचीय जमलंच तर हक्कानं रुसुनही बसायचंय, पण हे सगळं नेमकं कधी करावं हेच कळत नव्हतं. काय अाहे ना कि, अापण जो पर्यंत स्वत:ला सिद्ध करत नाही, तो पर्यंत कुणी अापल्याला हिंग लावुन विचारत नाही हेच खरं.... अाता शेअरबाजार सर्वोच्च स्थानी गेला अाहे, म्हटलं हिच योग्य वेळ अाहे हे सर्व बोलण्याची
प्रथम मी माझा अल्पसा परिचय परत एकदा करुन देतो. माझा जन्म १९६४ साली संसदेत झाला, १९८७ सालापासुन मी वयात अालो, १९९५ पासुन मी कर्तत्व गाजवायला सुरुवात केली. अाज माझ्या ताफ्यात ४५ कंपन्या अाणि ३००,००० च्या अासपास स्किम्स अाहेत. SIP, Daily- Weekly-Monthly STP, Lumpsum Investment करण्यासारखी वेगवेगळी अायुधं अाहेत. छत्रपति शिवाजी महाराजांचा अादर्श घेत गनिमी काव्याचा वापर करुन मी महागाईशी झालेल्या अनेक लढाया अाजपर्यंत जिंकल्यात. माझा परतावा नेहमीच "करमुक्त" होता. मी गेल्या २०-२५ वर्षापासुन स्वत:ला सिद्ध करत अालोय. पण तुमचा जीव त्या पीपीएफ आणि फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये अडकुन बसला. मी मानतो कि, पीपीएफ कंम्पाऊंडिंग पद्धतीने व्याज देतो, पण कंम्पाऊंडिंगमध्ये मी "बाहुबली" अाहे, माझ्या SIP चा मुकाबला तर कुणीही करु शकत नाही पण तुम्ही PPF च्या मोहात अडकुन मला विसरलात, चक्क दुर्लक्ष केलंत माझ्याकडे........ "जरा इतिहासाची पाने उलटून बघा, तुमच्या लक्षात येईल कि , पीपीएफ माझ्यासमोर किती छोटा बच्चु अाहे ते..._
पुरावाच द्यायचा झाला तर गेल्या १५ वर्षात दरवर्षी १ लाख रु तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवले असतील, तर ते अाता ३५ लाख असतील पण तेच माझ्यात गुंतवले असते तर १.३२ करोड असले असते, पण तुमच्या डोळ्यावर पीपीएफच्या "फिक्स"ची पट्टी बांधलेली. घोडा भरकटु नये म्हणुन दोन्ही डोळ्यांच्या कडेला धातुचे अावरण बांधले जाते तसंच तुम्ही स्वत:ला करुन घेतलंत, माझं तर काहीच अडलं नाही पण शेवटी नुकसान कुणाचं झालं? तुमचंच ना!!
तीच गोष्ट बँक एफडी ची..सर्वांना या एफडीने वेड लावलंय. एखाद्या चेटकीणीने सुंदर स्त्रीचं रुप घ्यावं आणि माणसांनी भुरळुन घरातील घरदांज, खानदानी पत्नीचा कसलाही विचार न करता तिच्या भ्रामक सौदर्यांला बळी पडावं तसं झालं तुमचं या एफडीच्या बाबतीत.. अाता हळुहळु तिचा मेकअप उतरतो अाहे तिचं खरं रुप दिसत अाहे, व्याजदर खाली येता अाहेत म्हणुन तुम्ही निदान अाता माझ्या डेट फंडाकडे बघतायत तरी.. पण इतके दिवस तिला पटवण्यासाठी , कर वाचवण्यासाठी काय काय नाटकं केलीत ते अाठवा ना जरा......फाॅर्म १५ जी/ १५ एच काय........ !! एकाच बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखात एफडी करणं काय.......!! एफडी मॅच्युअर्ड झाली कि परत त्याची रिन्युअल काय...जास्त व्याज मिळवण्याच्या चक्करमध्ये कुठं पतसंस्थेत जावुन एफडी कर, तर कुठं चक्क मल्टीलेवल चेन मध्ये जावुन गुंतवणुक करुन कपाळ भिंतीवर अादळुन घेतलंत..पण शेवटी काय झालं....एवढं सगळं करण्यापेक्षा थोडं माझ्याकडे प्रेमाने बघीतलं असतं तर या सर्वांची उत्तर "डेट फंडात" सापङली असती. कर वाचला असता, पांढरा पैसा पांढराच राहिला असता अाणि तुमचा पैसा घेवुन कुणी पळुन गेल नसतं.
तिच गोष्ट "रियल इस्टेटची"......... खुप भाव दिला हो तुम्ही त्याला. कुठलाही पारदर्शक व्यवहार नाही, सगळाच अडामधडाम व्यवहार केलात. माझ्या सुशिक्षित सल्लागारापेक्षा "रियल इस्टेटचा" अडाणी दलाल तुम्हाला जवळचा वाटला. बिनीच्या गोलंदाजाने जीव तोडून गोलंदाजी करावी, फलंदाजाला त्रिफळाचीत करावं पण एवढं करुनही अम्पायरने त्याच्यावर विनाकारण डूख धरत तो नोबाॅल देत त्याला नाॅट अाऊट द्यावा, हे तुम्हाला खरोखरच अन्यायकारक अाहे असं वाटत असेल तर थोडं थांबा.. तुमच्याकडूनही असाच माझ्यावर अन्याय झाला कि नाही!!!!
हो...निदान इतिहास तरी हेच सांगतोय. अाज मी पूर्ण तयारीनेच तुमच्याकडे आलोय, माझ्याकडे आता काही फंडाचा मागिल २० वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षाचा इतिहास उपलब्ध अाहे.
अगदी शानदार, पारदर्शक करमुक्त २०% च्या ही पुढे परतावा देवुनही गुंतवणुकीसाठी तुम्ही "रियल इस्टेट"चे लाड केले व मला पुर्णपणे अजुनही स्विकारलं नाही असा माझा अारोप अाहे अाणि माझ्या इक्विटी फंडाची कामगिरी पाहता तो खरा अाहे हे तुम्हाला नक्कीच पटेल. किमान यापुढे तरी तुम्ही त्यांची दखल घेवुन त्यांना प्रथम प्राधान्य देताल ही माझी अपेक्षा नक्कीच गैरवाजवी म्हणता येणार नाही.
खाली अनुक्रमे फंडाचे नाव, त्यांचे वय व परतावा (दर साल दर शेकडा, कंम्पाऊंड म्हणजेच चक्रवाढ दराने, बरं का) दिलेला अाहे.
Hdfc Taxsaver 20.81 29.23%
Hdfc Equity Fund 22.26 25.51%
Reliance Growth 21.49 25.30%
Franklin Ind Prima 23.35 24.79%
Franklin Ind Bluechip 23.35 24.48%
Birla Balanced 95 22.15 23.62%
Hdfc Prudence 23.18 22.25%
Tata Ind Taxsaving 21.01 21.92%
Reliance Vision 21.49 21.38%
Hdfc Top 200 fund 20.56 21.33%
Sbi Magnum Taxgain 24.02 20.64%
Hdfc Capital Builder 23.18 20.55%
अाज मी स्वत:ला सिद्ध केलंय..
इतके स्वच्छ, इतक्या पारदर्शकपणे तुम्ही रियल इस्टेटचे रिटर्न्स पाहु शकतो का ? केवळ एक चेक देवुन गुंतवणुक करु शकतो का? दर महिन्याला गुंतवणुक करु शकतो का? दररोज त्याचे बदलते मुल्य पाहु शकतो का? जितके असतील तितके पैसे गुंतवू शकतो का? अंशत: रक्कम परत घेवू शकतो का ?विकुन 3 ते 5 दिवसात पैसे परत मिळवु शकतो का?
याचं उत्तर जर "नाही" असं असेल, तर यानंतर अापण अापली जास्तीत जास्त गुंतवणुक माझ्या इक्विटी फंडात केली पाहिजे.
१. ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो.
२. वारंवार डीपी बदलणारे चंचल स्वभावाचे असतात.
३. छोटे स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात.
४. नेहमी स्टेटस बदलणारे हौशी असतात.
५. सतत काही न काही शेअर करणारे दिलदार मनाचे असतात.
६. कधीच कुणाला लाईक न करणारे गर्विष्ठ असतात.
७. प्रत्येक पोस्ट ला आवर्जून प्रतिक्रिया देणारे रसिक आणि दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करणारे असतात.
८. इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात.
९. फोटो किंवा पोस्ट दिसताच ओपन करणारे अधीर स्वभावाचे असतात.
१०. जुन्याच पोस्ट परत परत टाकणारे धांदरट असतात.
११. दुसऱ्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच पोस्ट पुढे ढकलण्यात पटाईत असणाऱ्या व्यक्ती वर्चस्व गाजवणाऱ्या असतात.
१२. मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे संकुचित वृत्तीचे असतात.
१३. कधीच काहीच शेअर न करणारे कंजूष असतात.
१४. मोठे मेसेज न वाचणारे आळशी असतात.
१५. वेगवेगळे वॉट्स अप ग्रुप बनवणारे महत्वाकांक्षी असतात.
१६. कामापुरते वॉट्सअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी होतात.
आधी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे.
कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये.
आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात.
कारण
कुणी माणूस घरात येऊ नये.
---------------------------------------
पुवीॅ माणूस जेवण घरी
करीत होता. आणि शौचालय बाहेर होत.
आता जेवण बाहेर करतो
आणि शौचालय घरात आहे.
_________
पुवीॅ लग्नात घरच्या स्रिया जेवण बनवायच्या.
आणि नाचणार्या बाहेरून यायच्या.
आता जेवण बनवणाऱ्या बाहेरून येतात.
आणि घरातल्या स्रिया नाचतात.
_________
पुवीॅ माणूस सायकल चालवायचा तो गरीब समजला जायचा.
आता माणूस कारने जिममध्ये जातो.
.... सायकल चालवण्यासाठी.
हल्ली आपल्याकडे खाजगी शाळा शाळांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पालक वर्ग मुलांना खाजगी शाळेमधेच प्रवेश देत आहेत .पालक आपल्या पाल्याचे भविष्य चांगले घडावे या साठी नेहमीच प्रयत्नात असतो. तांच्या अपेक्षांना नेहमीच ह्या शाळा खऱ्या उतरतील ह्याची शाश्वती वाटत नाही. दुसरीकडे सरकारी शाळाची अवस्था अतिशय बिकट आहे. अशी एकंदरीत परिस्थिती असताना भारताचे भविष्य घडत आहे का बिघडत आहे हे सांगणे कठीण आहे.
सरकारी शाळांमध्ये शाळातील शिक्षकांची शाळेतील कामाबद्दल विचार केल्यास शिक्षकांच्या नेमणुका ह्या विद्यार्थ्याना शिकवण्यासाठी असतात हे वाटत नाही .शासन नवनवीन माहिती आढावा दररोज मागते ती माहिती पुरवण्यासाठी शाळास्तरावर लिपिकांची नेमणूक नाही . हि सर्व कामे सर्व शिक्षक मिळून केली तरी संपत नाहीत . मग शिकवन्यासाठी वेळ अपुरा पडतोय आणि शिकवयासाठीचा उत्साह शिक्षकांमध्ये राहत नाही. मुलांमध्ये शिक्षक रमत नाही .
शाळेवरील मुख्याध्यापकानाही वर्ग दिलेला असतो .तो तर चार कर्मचारयाचे काम एकटा करतो. लिपिक,टपालवाहक, वर्गशिक्षक,बँकेतील कामे ,शाळा सुटल्यानंतर शाळेची ऑनलाईन माहितीची कामे करणे.सर्वात जास्त भरडला जातोय तो मुख्याध्यापक .शाळेचा मुख्याध्यापकांची मानसिक स्थिती पार बिघडून गेली आहे . अति कामाच्या ताणामुळे त्याची झोप सुधा निट होत नाही . दुसरीकडे कार्यालयात बघितले तर लिपिक,कामे नसतात म्हणून रिकामे आहेत .इथे देशाचे भविष्य घडतेय तिथे इतर कामांचा ताण जास्त आहे ,परिणामी कितीही चांगल्या योजना आणल्या तरी त्या यशस्वी होताना दिसत नाहीत .परंतु याचा विचार कोणीही करत नाही .
प्राथमिक शाळेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लेखी व ऑनलाईन माहिती मागवू नये किंवा मग अधिकार्यांनी येऊन सदर माहिती स्वतः लिहून घेऊन जावी शिक्षक असो व मुख्याध्यापक त्यांना विध्यार्थ्यंची हजेरी व परीक्षा संबधी कामे आणि शिकवणे याशिवाय इतर कोणतेच काम अजिबातच लाऊ नये .
अधिकारयानी हि काळजी घ्यावी .ह्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे.
-- WhatsApp वरुन आलेला हा लेख तुमच्यासाठी शेअर केलाय..
आता 'माझं कोकण' पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही.
दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित.
माणसं बदलली आणि कोकण पालटत चाललंय.
तरीदेखील आपल्या पिढीने जे 'कोकण' बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का?
'कोकण' म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं,
तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल का हे माहिती नाही.
पण तसं नसेल तर ते चित्र साकारण्याचा एक अल्पसा प्रयत्न.
'कोकण' म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा.
'कोकण' म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.
'कोकण' म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या.
'कोकण' म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं जातं, आजीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर झालेला कारभारणीचा चेहरा.
'कोकण' म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ, सातमाई, सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, सागरेश्वर.
'कोकण' म्हणजे कौलारू देवळे, घुमत असलेला गुरव, रोखून बघत असलेले मानाचे दगड.
'कोकण' म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ.
'कोकण' म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण, त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई.
'कोकण' म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडिलांची पुण्याई.
'कोकण' म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळीची झाडं.
'कोकण' म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास, करवंदाची घनदाट जाळी आणि कण्हेरीची फुलं.
'कोकण' म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण.
'कोकण' म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा.
'कोकण' म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.
'कोकण' म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे आणि वाटप घातलेली उसळ.
'कोकण' म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत असलेलं लोणचं.
'कोकण' म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर.
'कोकण' म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं, डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.
'कोकण' म्हणजे लाल डब्याची एस्.टी., धुरळा आणि नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.
'कोकण' म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा, भात, उसळ आणि लाऊडस्पीकर.
'कोकण' म्हणजे गणपती, मंडपी, सजावट, मोदक, उसळ आणि डबलबाऱ्या.
'कोकण' म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल.
'कोकण' म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला खांब, केलेली शिकार आणि मारलेल्या बोंबा.
'कोकण' म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती, शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्त्या आणि पोरांचं भजन.
'कोकण' म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा, पूजा, शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं.
'कोकण' म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप, धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची समृद्ध कला.
'कोकण' म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं, पिंपळाखालचं, मळ्यातलं क्रिकेट आणि 'टुर्लामेंट'.
'कोकण' म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा, ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं.
'कोकण' म्हणजे चकवणारे मासे, लागलेली रापण, ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका.
'कोकण' म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या.
'कोकण' म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची तयारी, जड झालेला चाकरमान्याचा पाय आणि सगळ्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी.
'कोकण' म्हणजे खूप काही सांगू पाहणारा, पूर्ण न उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा काशीविश्वेश्वराचा एक डाव....
मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही हे जाणत्या पूर्वजांच्या लक्षात आल्यामुळे वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्बोधन करत बसण्याऐवजी युक्तीचा शोध सुरु झाला आणि त्यातूनच जन्मला वटसावित्री नावाचा एक अत्यंत उपयुक्त सण.
पुरुषांनी सरपणासाठी वृक्षतोडीसारखी व जंगल साफ करून शेती करण्यासारखी मेहनतीची कामं करायची पूर्वापार पद्धत असल्यामुळे इतर सर्व वृक्षांबरोबरच मानवासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या वटवृक्षाचीही सर्रास कत्तल करण्यात येत होती. जे पुरुष वृक्षतोड करतात ते त्याचं संरक्षण करू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन आपल्या थोर पूर्वजांनी ती जबाबदारी स्त्रियांवर सोपवली. माणूस पापभिरू असल्यामुळे ज्या वटवृक्षाच्या खोडाला धागे बांधून त्या वृक्षाची पूजा केल्याचे त्याने बघितले त्या वृक्षावर त्याने कधीही कुऱ्हाड चालवली नाही. माणसाची विज्ञानापेक्षा जप-तप,अंगारे धुपारे,देव, पोथ्या-पुराणं यांच्यावर जास्त श्रध्दा असल्यामुळे वृक्ष रक्षणाच्या या कृतीला सणाचं रूप देण्यात आलं आणि वटसावित्री नावाचा तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला.
आपले सर्व सण हे पूर्णपणे विज्ञानाधिष्टीत आहेत, पण त्यांना हेतुपुरस्सर अंधश्रद्धेचं स्वरूप देण्यात आलं आहे.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
एका पित्याने अापल्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं.
खूप चांगल्या प्रकारे त्याचं शिक्षण केलं जेणेकरून मुलाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत झाली .
काही काळानंतर तो मुलगा एक यशस्वी व्यक्ती बनला आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा सी.ई.ओ. बनला.
उच्च पद , भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा त्याला कंपनीकडून प्रदान झाल्यात.
काही दिवसांनी त्याचा विवाह एका सुलक्षणी कन्येशी झाला त्याला मुलंही झाली. त्याचा आपला सुखी परिवार बनला.
वडील अाता म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडीलांना आपल्या मुलाला भेटायची इच्छा झाली आणि ते मुलाला भेटायला त्याच्या ऑफिस मध्ये गेले.
त्यांनी बघितलं की y मुलगा एका मोठ्या व शानदार ऑफिसचा अधिकारी बनलाय. त्याच्या ऑफिसात हजारो कर्मचारी त्याच्या अधीन राहून काम करता आहेत.
हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !
ते म्हातारे वडील मुलाच्या कॅबिन मध्ये गेले व त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले. आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलाला विचारलं की,
"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगा स्मित हास्य करत प्रेमानं म्हणाला ,
"माझ्याशिवाय कोण असू शकत बापूजी?"
वडीलांना त्याच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की त्यांचा मुलगा गर्वाने म्हणेल की, "बापूजी, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांनी मला एवढ्या योग्यतेच बनवलं!"
त्यांचे डोळे भरून आलेत. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले.
त्यांनी परत एकदा वळून मुलाला विचारलं की, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगा ह्या वेळेस म्हणाला की,
"बापूजी, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती ! "
वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले,
"अरे आताच तर तू स्वतःला जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतास आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगतो आहेस " ?
मुलागा हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलला ,
"बापूजी त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. ज्या मुलाच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर तो मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना? हो की नाही बापूजी " !
वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलाला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."
खरंच आहे की, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो.
सदैव थोरांचा सन्मान करा, आपल्या यशामागे तेच आहेत.
आपल्या प्रगती व उन्नतिने जेव्हा सगळे जळत असतात तेव्हा फक्त आई वडीलच आपल्या प्रगतीवर खुश असतात.
-- सुनील बावधनकर
गोष्ट १५ वर्षांपूर्वीची असेन कदाचित पण वार शुक्रवार होता हे नक्की. नांदेडला दर शुक्रवारी ज्योती टॉकीज जवळ बाजार भरतो. आठवडी बाजाराची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला तेवढीच असते जेवढी नोकरमान्याला महिन्याच्या पगारीची !. मी आणि माझ्या मोठ्या भावाने ४ दिवसापासूनच शुक्रवारच्या बाजाराची प्लांनिंग सुरु केली होती. प्लॅन असा होता - " गुरुवारी संध्याकाळीच भोपळे तोडून दोन पोती भरून ठेवायची आणि शुक्रवारी भल्या पहाटे नांदेडला जाऊन विकायची ".
ठरल्याप्रमाणे शुक्रवार उजडला , भोपळे एवढे वजनाने जाड असतात की सांगू नका त्यामुळे दोन पोते ठेवल्यावर आमची जुनी ऍटलास सायकल थरथर कापायला लागली. तिच्यावर बसणं तर सोडा नुसतं ढकलणं अवघड जात होत. बाजार ठिकाणापासून माझं गावं ३० किलोमीटर अंतरांवर. एवढं अंतर चालत जाणं आणि ते पण भोपळ्याने लादलेली सायकल ढकलतं, हे महा कठीण काम तेंव्हा माझ्यासाठी फक्त " बाँये हात का काम था ". कारण चार दिवसापासून मी फक्त कामाचीच प्लॅनिंग करत नव्हतो तर त्यातून मिळणाऱ्या पैशाचं काय-काय करायचं हे पण ठरवत होतो.
आमचा प्रवास सुरु झाला एकदाचा. कॅनॉल मार्गे निघालो.वाटलं शॉर्टकट आहे. सिडको पर्यंत आल्यावर थकवा जाणवत होता. कधी मी हॅन्डल धरून सायकलला रास्ता दाखवायचो कधी माझा मोठा भाऊ. थोडासा चढ आला कि धक्का द्यायला मी तर चड्डी सावरून तयारच होतो. गप्पा करत करत आम्ही निघालो. कच्चा रस्ता संपून डांबर रोड लागला. सिडकोला माझ्या दूरच्या आत्याच्या मुली शिकायला होत्या. एवढ्या मोठ्या सिडकोत मला त्यांच्याच येण्याची भीती वाटत होती. सिडको कधी जाईन आणि कधी लातूर फाटा येईन असं वाटत होत. मी नुसती सायकल ढकलत नव्हतो तर त्याच बरोबर मनातल्या मनात भोपळे विकून किती पैसे येतील याचा हिशोब पण लावत होतो. जर किलोने गेले तर जास्त येतील आणि नगाणे गेली तर कमी येतील. दोन पोत्याचे अंदाजे माझ्या हिशोबाने कमीत कमी २०० ते २५० रुपये येणार म्हणजे येणारच.
शेवटी पोहोचलो एकदाच बाजाराच्या तोंडाला. पोती सायकलवरून उतरवली. मी आणि माझा भाऊ इकडं तिकडं डोळे वासून पाहायला लागलो. नवीन जनावरांना बघून आमचं गायीचं वासरू कस करत तस आमचं व्हायला लागलं. जिकडं पाहावं तिकडं भाज्यांचं भाज्या. मी मनातल्या मनात म्हणालो , " इच्या मायला एवढ्या भाज्या असताना आमचे धोंड्या सारखी जड भोपळी कोण खाईल?'. आता माझा हिशोब खाली खाली येऊ लागला.
आमचे चुलत भाऊजी पण भाजीपाला विकायचे त्यावेळी. ते आमच्या अगोदरच बाजारात जागा धरून बसले होते. त्यांच्या भाज्यांच्या बाजूला आमच्या भोपळ्यानां थोडी जागा मिळाली एकदाची. भाऊ आणि भाऊजी भाज्यांच्या भावा बद्दल चर्चा करू लागले. तेवढ्यात दोन जाडजूड बायका , रंगबिरंगी पिशव्या घेऊन माझ्या समोर आल्या आणि भाव विचारू लागल्या. त्यांनी भाउजीने आणलेल्या भेंडी आणि कोथिंबीर बद्दल विचारलं , मह्या भोपळ्याकडे बघितलं पण नाही. एक भोपळा २ रुपयाला मागताना गिऱ्हाईकाला अजिबात लाज वाटत न्हवती. बाजारच रूप बघून आणि गिऱ्हाईकांची स्टाईल बघून माझे पाय जमिनीवर आले आणि माझा टोटल हिशोब ५० रुपयांच्या खाली आला.
भावाने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याला समजलं मला काय झालाय ते. त्याने न विचारता बाजूच्या हॉटेलातून एक ३ रुपयांची कचोरी आणून मला खायायला दिली . माझी कचोरी खाऊन झाल्यावर भाऊ म्हटला , " हे ५ रुपये घे आणि सिडको पर्यंत ऑटो नि जा नंतर मग कॅनॉल चा रस्ता धरून आलं तस पायी जा ".
मी जड अंतकरणाने घराकडे निघालो. माझा विश्वासच उडाला या सगळ्यावरून. जग मोठं असत हे कळलं पण त्याच बरोबर शेतकऱ्याचं स्वप्न किती लहान असत हे पण पहिल्यांदा जाणवलं. या बाजारात माझ्यासारखा लहान मुलगा टिकू शकणार नाही हे माझ्या भावाला माहित होत म्हणून त्यानं मला दिवसभर उन्हात उभं नाही केलं. दिवसभर काय झालं आणि किती पैसे आले याचा हिशोब मी माझ्या मोठ्या भावाला विचारला नाही , कारण त्या हिशोबाची पुरेपूर जाणीव मला होती.
जेमतेम तीन वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेवर आलात, सर्वात आधी गॅस अनुदानित दरात न देता ती सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलीत. ठीक आहे आमचा त्या घोटाळ्यात जास्त शेअर नव्हता तर त्यामुळे आम्हाला जास्त झळ बसणार नव्हती आम्ही शांत राहिलो.
तुम्ही खताचे वाटप सुद्धा फक्त शेतकऱ्यांनाच केले अन अनुदान पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आता आम्ही परिश्रमपूर्वक एवढा मोठा काळाबाजार तयार केला तो युरिया कारखान्यांना विकून अन त्यावरची मलई खाऊन, तुम्ही शेतकऱ्यांनाच अनुदान देताय म्हणल्यावर आमची तर उपासमार होऊ लागली. पण तरीसुद्धा आम्ही (नाईलाजाने) शांतच राहिलो.
पण आता नोटाबंदीच्या काळात आमचे जे प्रचंड नुकसान झालंय ते अंशतः का होईना आम्ही कर्जमाफीच्या रूपाने वसूल करू इच्छितो तर तुम्ही त्यालाही तयार नाहीय.
आम्ही सुद्धा वेळोवेळी कर्जमाफी केलीच ना (अन त्यात गबर आम्हीच झालो कारण शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर किती बोजा चढवलाय हे माहीतच नसायचं)
तुम्ही मागील दोन वर्षात सिंचन योजनांची काटेकोर अंमलबजावणी केलीत अन आमची टँकर लॉबीची पण वाट लावली. आता आम्ही एवढे पैसे घालून (खाऊन) टँकर घेतले ते काय दारात उभे करायला काय?
असे आमचे बरेच उद्योग आहेत पण तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी चाप लावत चाललाय
बर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावे तर ते सिद्ध पण होत नाहीयेत (आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार).
आम्ही गेल्या 67 वर्षात जी सरंजामशाहीची घडी घातलीय तीच तुम्ही पार विस्कटून टाकताय?
अन ह्या वेगाने तुम्ही जर सुधारणा कराल तर आम्हाला पुढच्या निवडणुकीत कोण विचारणार (तस पण आत्तातरी कोण विचारतय म्हणा)
असं एवढं वाईट तर आपण शत्रूच सुद्धा चिंतीत नाही तुम्ही पण जगा अन आम्हाला पण जगवा असं असावं ना. पण आम्हाला जगवायची सोय तुम्ही छगनरावांसारखी कराल तर ते कसं बरं मान्य व्हावं?
म्हणून आम्हाला आता हे शेतकरी संपाचे पाऊल उचलणं भाग पडलंय. (कारण आम्हाला हे तर माहीतच आहे की संपात मेला तर शेतकरीच मरणार आहे आम्हाला काय त्याचे आम्हाला तर तो भांडवलंच देणार आहे तमाशे करायला)
आता तरी सांगा ना की आता आम्ही जगावे तरी कसे?
- आपला एक अडगळीत पडलेला राजकारणी
Copyright © 2025 | Marathisrushti