वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे.
November 8, 2023
भिन्न मतप्रवाहांचे अनेक पक्ष एकत्र घेऊन सरकार चालवणे अवघड असल्याचा अनुभव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांना रोजच येत आहे. विविध पक्षांचे मंत्री एकमेकांवर आरोप करत असताना काँग्रेसचे वरिष्ठ मंत्रीही गेल्या काही दिवसांपासून सहकार्यांबद्दल जाहीर विधाने करताना दिसत आहेत. त्यांच्यात अनेक मुद्यांवर असलेले मतभेद सतत चव्हाट्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग निष्प्रभ आणि हतबल दिसत आहेत.
August 14, 2010
“गितू, इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे काय ते बघितलं, उदाहरण म्हणून एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये जानेवारी १९९५ ला १ लाख रुपये गुंतवले असते आणि २ जूलै २०१५ला त्याचे पूर्ण रिडम्प्शन केले असते तर ४७ लाख रुपये मिळाले असते हे बघितलं. इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत याची दखल घेतली. मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते, हा म्युचुअल फंडाचा वैधानिक इशाराही लक्षात घेतला. १९९५ साली फक्त एकदाच केलेल्या १ लाख रुपयाच्या गुंतवणूकीतून हा लाभ झाला खरा, पण विम्याचे हप्ते सहसा दिले जातात वार्षिक पध्दतीने. मग तसंच २५ वर्ष जर इक्विटी म्युचुअल फंडात नियमित गुंतवणूक करत राहिलो असतो तर किती लाभ झाला असता?” विक्रमजीतने विचारले.
“मागच्यावेळी बघितलं, ३५ वर्षाच्या व्यक्तीला २५ वर्षे मुदतीच्या ४० लाख सम अॅशुअर्डच्या एन्डावमेंट प्लॅनसाठी एका कंपनीचा वार्षिक प्रिमियम होतो १,५१,२४० रुपये आणि त्याच कंपनीच्या त्याच मुदतीच्या, ४० लाखाच्याच टर्म प्लॅनसाठी वार्षिक हप्ता होतो ९,८८४ रुपये. एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला तर बाकीचे १,४१,३५६ रुपये वार्षिक इतके इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतात. विमा हप्ता मासिक, त्रैमासिक, वार्षिक असा दिला जातो. म्युचुअल फंडातही गुंतवणूक या पध्दतीने करता येते. दर महिन्याला नियमितपणे म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी ही फार लोकप्रिय पध्दत आहे. तेव्हा एसआयपी म्हणजे काय ते आधी बघू, एन्डावमेंटपेक्षा जास्त लाभ किती होऊ शकेल ते नंतर बघू,” संयोगिता म्हणाली.
“शिस्तशीर जाऊ, ” विक्रमजीतची मस्करी.
“एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ज्या प्रकारे मासिक विमा हप्त्याची रक्कम किंवा बॅंकेतील रिकरींग डिपॉझीटची रक्कम बॅंक खात्यातून परस्पर वळती होते, तसंच एसआयपीद्वारेही बॅंक खात्यातून ठरावीक रक्कम, ठरवलेल्या म्युचुअल फंडात परस्पर गुंतवता येते. याची फ्रिक्वेन्सी दरमहा किंवा त्रैमासिक असते. सहसा दरमहा हा पर्याय निवडला जातो. महिन्यातील १०, १५ इत्यादी एका विशिष्ट तारखेला गुंतवणूकदारांच्या बॅंक अकाऊंटमधून ठरलेली रक्कम डेबीट होते आणि ती ठरवलेल्या म्युचुअल फंडाकडे वळती केली जाते. एसआयपीचा फायदा हा की दरमहा नियमित स्वरुपात म्युचुअल फंडात गुंतवणूक होत राहते. कमीत कमी ५०० रुपयांपासून आपण एसआयपी सुरु करु शकतो. काही फंडात त्याहीपेक्षा कमी रकमेची एसआयपी सुरु करु शकतो. इक्विटी म्युचुअल फंडाबाबत त्याचा एनएव्ही कमी-जास्त होत राहतो. शेअरमार्केट वर गेले तर सहसा एनएव्ही वाढतो, खाली आले तर तो कमी होतो. एनएव्ही कमी झाला असेल तर आपल्याला म्युचुअल फंडाचे जास्त युनिट मिळतात आणि एनएव्ही वर गेला असेल तर कमी युनिट मिळतात, थोडक्यात कधी जास्त भावात खरेदी तर कधी कमी भावात खरेदी यामुळे कॉस्ट ॲव्हरेजिंग होते. ”
“एकरकमी गुंतवणूक ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ही खूपच चांगली सोय आहे. ह्या एसआयपीची मुदत किती वर्ष असते? ”
“ती आपण ठरवू तशी, १ वर्ष, २ वर्ष, १० वर्ष इत्यादी किंवा आपण बंद करा सांगेपर्यत कायमची अशी मुदत राहू शकते. म्युचुअल फंडाला आधी सूचना देऊन कधीही ती बंद करता येते, तसेच मधेच पैसे हवे असतील तर युनिट्सचे रिडम्प्शन करुन पैसे घेऊ शकतो. एसआयपी मात्र पुढे सुरु ठेवू शकतो. ”
“आता एन्डावमेंट प्लॅनच्या तुलनेत किती लाभ मिळेल ते बघू. ”
“एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला तर वार्षिक १,४१,३५६ रुपये गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतात, म्हणजे दरमहा सुमारे ११७५० रुपये. एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये दरमहा ११७५० रुपयांची एसआयपी १० जानेवारी १९९५ला सुरु केली असती आणि जमा झालेल्या सर्व युनिट्सचे ६ जुलै २०१५ला रिडम्प्शन केले असते तर ५ कोटी ८१ लाख रुपये मिळाले असते, म्हणजे एन्डावमेंट प्लॅनपेक्षा सुमारे ५ कोटी जास्ती. एसआयपीद्वारे आपण गुंतवलेल्या एकूण २८ लाख ९० हजार ५०० रुपयांवर हा लाभ झाला असता. फ्रॅन्कलीन इंडिया ब्ल्यूचीप आणि इतरही काही फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमधील एसआयपीमधूनही असा चांगला लाभ मिळाला असता. २० वर्ष ६ माहिने इतक्या दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकीतून हा लाभ मिळाला आहे. समजा एचडिएफसीसी इक्विटी फंडातील हीच एसआयपी १० जानेवारी १९९५ ऐवजी १० जानेवारी १९९९ला सुरु केली असती तर गुंतवलेली रक्कम झाली असती एकूण २३ लाख २६ हजार ५०० आणि रिडम्प्शन घेऊन मिळाले असते २ कोटी १९ लाख ५४ हजार रुपये. लवकरात लवकर गुंतवणूकीला सुरवात करणे किती आवश्यक आहे ते यातून कळतं. बॅंकेतील मुदतठेवीवर चक्रवाढ व्याज मिळतं तेव्हा पॉवर ऑफ कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो, तसाच इथे दिसतो. ”
“विमा हा विषय जरा बाजूला ठेऊ. पण एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये १९९५ ला फक्त २००० रुपयांची २० वर्ष मुदतीची एसआयपी सुरु केली असती आणि मार्च २०१५ मध्ये रिडम्प्शन घेतले असते तर ४ लाख ८० हजाराच्या गुंतवणूकीतून १ कोटी रुपये मिळाले असते. २००० रुपयांची एसआयपी सुरु करणं तर कोणालाही सहज शक्य आहे. तसंच इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत त्यामुळे आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्याने गुंतवणूक करावी. ”
वैधानिक इशारा: म्युचुअल फंडाच्या मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते. (सर्व आकडे ढोबळमानाने व केवळ माहितीसाठी)
टीप: लेख मी मराठी लाईव्ह दैनिकात ११ ऑगस्ट २०१५ ला प्रकाशित झालेला आहे.
उदय कुलकर्णी
August 18, 2015
बाबा पोलीस खात्यामध्ये थेट फौजदार म्हणून भर्ती झाले होते त्यामुळे त्यांची खाकी वर्दी आणि खांद्यावर असणारे दोन चांदीचे स्टार बघत बघत मोठे होत होतो. सहावित असतानाच बाबांचं प्रमोशन झाल्याने आणखीन एक तिसरा स्टार वाढला. पी एस आय चे इन्स्पेक्टर झाले आणि रिटायर होता होता ए सी पी झाले. त्यांच्या खाकी वर्दीला असणारा रुबाब आणि त्याहीपेक्षा असणारा दरारा इतर कुठल्याही युनिफॉर्मला अजूनपर्यंत तरी बघायला मिळाला नाही. बाबांसारखे खांद्यावर तीन तीन चंदेरी स्टार नाही मिळाले पण बाबां सारखा खाकी युनिफॉर्म आणि खांद्यावर तीन सोनेरी पट्ट्या मात्र मिळाल्या.
October 18, 2019
माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमी असे नांव आहे. खरे पाहता चैत्र-वैशाख या महिन्यांत वसंत ऋतूचा काल आहे. परंतु माघ महिन्यात वसंत ऋतूचे आगमनाची चाहूल पूर्वी लागत असावी म्हणून पूर्वी या पंचमीला वसंतारंभाची तिथी मानीत असावे.
October 1, 2023
छंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली.
August 12, 2026
मराठा मोर्चा सर्व महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, होणारच, कारण ज्यांच्या मताने गेली चार पाच दशके मराठा सरपंचा पासून मराठा मुख्यमंत्री या राज्याच्या सिंहासनावर बसून शासन करत होते, ते सर्व आज पूर्ण मराठा समाजाला, वेठबिगारी बनवून सत्तेसोबत मालमत्तेची मलई आपल्या ताटात ओढून या अभागी जनतेला देशोधडीला लावण्यास कारणीभूत ठरले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य उघड झाले.
हे असे का झाले, याचा कानोसा घेतला तर दिसते कि,
मराठा धनदंडग्यांनी अर्थात सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्री, संत्री, यांनी जवळपास सर्व सहकारी बँका बुडवल्या. याच सहकारी बँकेत अश्या गरीब मराठा लोकांचा पैसा जो त्यांनी काबाड कष्ट करून मिळवला तो ठेवलेला होता, त्यांची नावे सर्वाना माहित आहेत. भाबडेपणाने मराठा लोक आपले भाऊ, आण्णा, तात्या, असे बिरुद लावणारे बँकेचे चेअरमन आपल्या जातीचे आहेत, सर्व डायरेक्टर आपलेच जातभाई आहेत, आपल भल करण्यासाठीच हि बँक त्यांनी सुरु केली, या गोड गैरसमजुतीत राहिले, आणि पैसा घालवून बसले, दोष तरी कुणाला द्यायचा, आपलेच दात आणि आपलेच ओठ. असे चेअरमन, आजही ताठ मानेने एक कोटीच्या गाडीतून फिरतात व वर्षातून दोन तीन वेळा हवापालट करण्यासाठी विदेश वारी करतात, जेव्हा कि त्यांना कारावासाची हवा मिळायला पाहिजे.
महाराष्ट्रातील पन्नास टक्के मराठा आमदार, खासदारांनी त्यात पवार कुटुंब आहेच, आपल्या नातलगांना भरमसाठ कर्जे दिली, आणि बँक बुडवल्या, उदाहरण देऊ का, सुनील केदार ने गरीब जनतेचे 155 कोटी बँक बुडवुन फस्त केले, हे कुणाचे पैसे आहेत, कधी विचार केलात? आपल्या माजी राष्टपती यांनी प्रतिभा महिला बँक बुडवली, चौकशी करा, त्यात कुणाचा पैसा होता, अहो गरीब मराठयांचा होता, कुणी खाल्ला, त्यांच्या भावाने व भाच्याने. का नाही त्यांच्या घरावर मोर्चा काढत? या सर्व कार्यकाळात मराठा मुख्यमंत्री होते, याचा अर्थ काय. म्हणजे या ठेवीदार मराठ्यांची हि दशा कुणी केली, इतर जातींनी नक्कीच नाही, मग सध्याच्या सरकारवर का दबाव आणण्याचा का प्रयत्न करताय? मराठीत याला साप साप ओरडून दोरखंडाला काठीने मारणे म्हणतात. आज सुनील केदार तोंड वर करून फिरतो, निवडणूक लढवतो, आणि हे मराठे आपला माणूस म्हणून त्याला आजही भरगोस मतदान करतात, याला हसावं का रडावं हेच कळत नाही.
उसाला हेच साखर कारखानदार योग्य भाव देत नाहीत, व मराठा शेतकऱ्याची गळचेपी करतात. सर्व सहकारी साखर कारखाने जाणूनबुजून आजारी केले आहेत, हे त्रिवार सत्य असताना पिचलेला मराठा का त्यांना शरण जातो, काय मोहिनी हे लोक करतात हेच समजत नाही? जे प्रायव्हेट साखर कारखाने चालवले जातात ते उसाचा भाव या सहकारी करखान्यांपेक्षा खूप जास्त देऊन सुद्धा नफा दाखवतात, भागधारकांना भरगोस लाभ देतात, मग असा लाभ सहकारी कारखाने का देत नाहीत? दरवर्षी नुकसान का दाखवतात? मला नेहेमी प्रश्न पडतो, हा नुकसानीचा धंदा असूनही हे नेते लोक जीवाचा आटापिटा करून कारखान्याची सत्ता हातात घेण्यासाठी आसुसलेले का असतात. सामान्य माणसे नुकसान होत असेल तर धंदा बंद करतात, मग हे नेते का निवडणूक लढवतात?
आजही आपल्या देशात मारवाडी, सिंधी, गुजराथी, बोहरा मुस्लिम हे स्वतःच्या गरीब जात बांधवाना व्यवसाय करण्यासाठी पैसे गोळा करून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देतात, ते ना आरक्षण मागतात, न भीक मागतात. मराठा समाजातील जे मागासवर्गीय राहिले, त्यांना इतर श्रीमंत मराठयानी वर येण्यासाठी मदत करायला पाहिजे कि नको? तसे हे धनदांडगे का करत नाहीत? तुम्हाला आरक्षण देऊन पोसणे हे सरकारचे काम नाही, हेच या मोर्चे काढणाऱ्याना समजत नाही, इथेच तुमची गफलत होते आहे. लक्ष्यात घ्या फाळणी नंतर सिंधी समाज फक्त अंगावरच्या कपड्यांनी हिंदुस्तानात आला, देशभरात विखुरला, आणि आज अरबो रुपयांच्या संपत्तीचा मालक बनला आहे, तेही फक्त 70 वर्षात. तुमच्याकडे तर गेल्या चारशे वर्षापासून जमिनी आहेत, तुम्हाला सिंधी समाजासारखा घरदार सोडून जावे लागले नाही, मग तरी तुमच्यावर आज आरक्षण मागायची वेळ का यावी? होळकर, शिंदे, गायकवाड उत्तर हिंदुस्तानात काही एकटे गेले नाहीत, त्यांच्यासोबत मोठया संख्येने मराठे स्थलांतरित झाले, त्यांच्यावर अशी वाईट वेळ आलेली दिसत नाही, ते मराठे गुजरात, मध्यप्रदेशात राहतात, पण आरक्षण मागत नाहीत.
आज जो प्रकार चालू आहे त्याला आपली लत्करें वेशीवर टांगणे म्हणतात. यदाकदाचित शिवाजी महाराज आज परत आले आणि त्यांनी हे सर्व पहिले, तर सर्वात प्रथम तुमच्या साहेबांपासून सर्व साखर व शिक्षण सम्राटांना तोफेच्या तोंडी देतील, मग या मोर्चेकऱ्यांचा छडीचे समाचार घेतील, आणि म्हणतील कष्ट करून, घाम गळून पैसा कमवा, आणि तो पैसा सरकारी बँकेत ठेवा. मनगटात जोर असताना भीक का मागता, असे म्हणून दोन फटके जास्त लावतील.
मीही किती स्वप्नाळू, म्हणजे मूर्ख आहे, कि या नासलेल्या जगात महाराज पाय ठेवतील अशी भाबडी आश्या बाळगतोय, अशक्य आहे ते. माफ करा महाराज, मोर्चा असाच सुरु राहूदे, विनाश काले विपरीत बुद्धी यालाच तर म्हणतात.
-- अभागी मराठा
फेसबुकवरील पोस्ट
October 15, 2016
भगवान विश्वनाथाच्या विश्वव्यापक वैभवाचे विशेष वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
August 12, 2020
आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती . तसे गजा आणि त्याची बायको स्नेहा चांगल्या नोकरीत आहेत . गजा इंजिनियरींग कॉलेजला प्रोफेसर आहे , तर बायको सॉफ्टवेअर ऍनालिस्ट . दोघांनाही अत्यंत चांगला पगार आहे. त्यावरच गजाने तीन वर्षापुर्वी साठ लाखांचे घर घेतले होते , आणि मागच्या वर्षी कारलोन घेऊन होंडा सिटी घेतली . तिचाच हप्ता आता थकला होता .कारण काही कळाले नव्हते . गजाची पण बर्याच दिवसात भेट नव्हती . संध्याकाळी मी गजाच्या घरी जायचे ठरवले , आणि त्या लिस्टवर सही केली . अर्थात त्या आधी गजाच्या नावापुढे फुली मारायला मी विसरलो नव्हतो . काही प्रतिष्ठित ग्राहकांना आमची बॅंक थोडा वेळ देते , आणि त्यांच्या अडचणीपण समजावुन घेते . फिल्ड ऑफिसर म्हणुन एवढा अधिकार माझ्याकडे आहे.
’ क्लाउड नाइन ‘ या गेटेड कम्युनिटीमधे गजाचे घर आहे. स्विमिंग पुलापासुन जॅकुजीपर्यंत सर्व सुविधा या अपार्टमेंटमधे आहेत. गाडी लावली आणि गजाच्या घराची बेल वाजवली . बागेकडे माझे लक्ष गेले , गजाने बागेत अत्यंत सुंदर झाडे लावली होती. मोगर्याचा फुलांचा घमघमाट सुटला होता. गजाने दार उघडले .
” अरे तू , ये बस बस . “ गजा लुंगी आणि बनियनवरच होता . कितीही मोठा झाला तरी माणसाच्या काही सवयी बदलत नाहीत .
” बर्याच दिवसात घरी आला नाहीस ? इकडे आलो होतो , म्हटलं जरा चक्कर टाकावी . कसा आहेस ? “
” मजेत . मधे तु काय आठ दिवस दिल्लीला होतास म्हणे . स्नेहा सांगत होती . तिची आणि वहिनींची मार्केटमधे भेट झाली होती. “
” हो , गौरी म्हणाली मला . ‘ कस्टमर सॅटिसफॅक्शनच ‘ ट्रेनिंग होतं दिल्लीला . नेमकं मला पाठवलं बॅंकेनी . तुला सांगतो गजा , या ट्रेनिंग म्हणजे नुसता वैताग बघ ! या एमबीए मुलांपेक्षा आपल्या शाळेतले शिक्षक बरे. ते रागवायचे , पण किमान त्यावेळेला त्यांच्या चेहेर्यावर रागवण्याचा अविर्भाव तरी असायचा . ही एमबीए मंडळी अत्यंत सुतकी चेहेर्याने प्रेझेंटेशन करतात . आपलच सॅटिसफॅक्शन होत नाही , कस्टमरचं काय होणार बोडख्याच ! ”
यावर मी आणि गजा खदाखदा हसलो.
” बरं काय घेणार चहा , की कॉफी ? “
” चहा चालेल .”
“ स्नेहा , दोन कप चहा टाक गं , सागर आलाय “.
मधुन जोरात भांडी आपटण्याचा आवाज आला , आणि नंतर चहासुध्दा गजाच जाउन घेउन आला , मी ओळखले , नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे . चहा पिला थोड्याफार गप्पा मारल्या , आणि मी निघालो. गेटचे दार लावताना गजाला विचारले ,
” गजा , इज एव्हरीथिंग ओके ? “
” सागर , एक्चुअली थोडा प्रॉब्लेम झालाय. ” गजाचा आवाज खोल गेला .
“ कॅन आय हेल्प यु ? “
” आपण उद्या दुपारी भेटु . मी बॅंकेत येतो “ . गजा म्हणाला .
” ओके . टेक केअर . “ मी गजाच्या खांद्यावर थोपटत म्हणालो.
दुसर्या दिवशी कामात लक्षच लागेना . दुपारची वाट बघत बसुन राहिलो . एक वाजता गजा आला .
” सागर आपण बाहेरच लंचलाच जाउ या . आर यु फ्री ? “
” या शुअर . जरा पाच मिनिट थांबतोस ? मी चाव्या साहेबांकडे देउन येतो. “
“ प्लीज कंटीन्यू .”
साहेबांना चाव्या दिल्या आणि बॅंकेसमोरच्याच एका चांगल्यापैकी हॉटेलात गेलो . ऑर्डर दिली .
” आता बोल गजा . काय प्रॉब्लेम ? “
” अरे एक्चुअली - काय झालय ? स्नेहाला त्यांच्या कंपनीने पिंक स्लिप दिलीये . “
“ मग ? “
” मग काय ? त्याचा अर्थ आपण रिझाइन करायच किंवा एक महिन्याने कंपनी आपल्याला काढुन टाकणार .”
” का ? “
” का काय बाबा, त्यांच्या कंपनीचे सर्व क्लायंटस युएसचे . त्यांच्याकडे आलय रिसेशन. त्याचा फटका बसतोय आम्हाला . “
” अरे पण एवढ काय त्यात ? “
” तुला कळणार नाही सागर , तु अजुन होमलोन घेतल नाहियेस ना , मी तीन वर्षांपुर्वी साठ लाखाच लोन काढुन घर घेतलय . त्याचा हप्ता मला पन्नास हजार येतोय . तो मी माझ्या पगारातुन भरतो. तोपण थोडाथोडका नाही वीस वर्ष भरायचाय . तो भरल्यानंतर दहा हजार रुपये उरतात . मागच्या वर्षी स्नेहाच्या सॅलरीवर कारलोन घेउन होंडासिटी घेतली. तिचा हप्ता वीस हजार रुपये जातो . तिच्या पगारातले पंधरा हजार उरतात , अशा पंचवीस हजारात आमचा महिना भागतो .”
” ओके .”
” तुला खरे वाटणार नाही , इतक्या वर्षांची सर्विस झाल्यावरपण पाच पैशाचीही सेव्हिंग माझ्याकडे नाही . सगळ काही क्रेडिटवर आहे . तुला माहित आहे , मागच्या तीन महिन्यापासुन कारलोनचा हप्ताही भरला नाहीये मी .”
मला ही गोष्ट माहित असल्याचे मी बोललो नाही . गजा अत्यंत भावनाविवश झाला होता .
” आणि आता या नविन लाइफस्टाइलची इतकी सवय झालीये , दर रविवारी कंपल्सरी मल्टीप्लेक्सला जातो , रविवारी घरी जेवण बनवत नाही , बाहेर साधं हॉटेल चालत नाही , थ्री स्टार लागतं , दरवर्षी हॉलिडेला जावच लागत , इव्हन सोनुलापण या सर्वांची सवय झालीये. माहितीये , काल शाळेत रिक्शातुन जा म्हणालो तर गेला नाही . गाडी नसेल तर शाळेत जाणार नाही म्हणाला . अजुन चार वर्षाचा झाला नाही आणि याचे नखरे बघा .”
” त्याच्यावर काय चिडतोयंस गजा ? ही सवय तुम्हीच लावली ना त्याला ? “
” होय रे बाबा , तेच चुकलेय . बर त्याचेच नाही , स्नेहाचेपण तसेच . महागड्या साड्या , मॉलमधे शॉपिंग , महागडी परफ्युम्स , आमच्या घरात ब्रॅंडेड वस्तुंना फार महत्व आलयं . सकाळच दुधपण साधं चालत नाही , ब्रॅंडेड लागतं .”
“गजा चिडु नकोस . हे बघ ,या सगळ्या सवयी तूच लावल्यांस ना त्याला . मग बदल . त्यात अवघड ते काय आहे ? “
” सागर ही वेळ तुझ्यावर आली नाहियेना , म्हणुन तु सल्ला देतोयस ,एकवेळ संपुर्ण माणुसच बदलणे शक्य आहे , पण त्याच्या सवयी , अशक्य ! “
” हे बघ, स्नेहाशी एकदा समोर बसुन बोल , तिला परिस्थितीची कल्पना दे . ती समजुतदार आहे , मला वाटतय ती समजावुन घेईल. “
“सगळे प्रकार झाले सागर , म्हणुनच मी म्हणालो ना , माणसाच्या सवयी बदलणे ,अशक्य ! ती बदलायला तयार नाही . मीच चुकलो , पुर्वी लहान घरात मी सुखी होतो , थोडाचा पैसा आला आणि मी वाहावत गेलो . या वर्षी ईन्क्रीमेंट मिळाले ,या एवढ्या गोष्टीवरच खुश राहिलो. पुढच्या आयुष्याचा काडीचाही विचार केला नाही , आणि स्वतःवर ही वेळ आणुन घेतली .”
“मला वाटतय , तु तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोलावस . आणि सर्व परिस्थीती समजावुन सांगावीस . मी गजाच्या हातावर हात ठेवत म्हणालो .”
“ट्राय करतो .”
जेवण करुन गजा गेला . बिल देउन मी बॅंकेत आलो. फारफारतर दोन महिने मी गजाच्या कारलोनची रिकव्हरी थांबवू शकलो असतो. त्यानंतर मात्र काहीही माझ्या हातात नव्हते .
संध्याकाळी घरी आलो. फ्रेश झालो . पेपर हातात घेउन बसलो.गौरी म्हणाली
“उद्या आमीरचा थ्री इडियटस आयनॉक्सला लागतोय . मी तिकीट बुक करायला सांगितलीयेत . नंतर बाहेरच जेवण करुन घरी येउ.”
मी चरकलो .डोळ्यासमोर गजा उभा राहीला.
“माझा मुड नाहिये ग . आपण उद्या नको, पुढच्या आठवड्यात जाउ . एखाद्या आठवड्यात बाहेर पिक्चरला आणि जेवायला नाही गेलो तर काही बिघडत नाही .”
“ते काही नाही . मला शक्य नाही . मी उद्या स्वयंपाक करणार नाही . आणि रविवारी बाहेर जेवायला नेले नाही तर पिंटु रडुन गोंधळ घालतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा , मी जाणार म्हणजे जाणारच ..”
ताडताड पाय आपटत गौरी मधे निघुन गेली. मला गजाचे शब्द आठवले
‘ एकवेळ माणसेच बदलणे शक्य आहे पण त्यांना लागलेल्या सवयी ,अशक्य ! ‘
या बदलत्या जगाने माझेच घर कधी विळख्यात घेतले होते , माझे मलाच कळाले नव्हते !
-- निखिल मुदगलकर
March 26, 2010
भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे.
August 7, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti