(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मेंढ्यांचा मालक

    अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे..

  • लावालावी – एक मराठी गंमत !!!

    भाषेच्या गमती: शब्द एक, अर्थ अनेक : ‘लावणे’ ह्या क्रियापदाचा अर्थ’

  • पाटोदा ….. एक आगळेवेगळे आदर्श गाव

    औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे.

    केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .

    गावाचे आगळेवेगळे उपक्रम

    १) गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.

    २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
    i) पिण्याचे R/o पाणी
    ii) वापरायचे पाणी
    iii) साधे पाणी
    iv) गरम पाणी
    पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.
    ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
    वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
    गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.

    ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रॅक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो. त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.

    ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.

    ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.

    ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.

    ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वयीत आहे.

    ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.

    ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.

    १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.

    ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.

    १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.

    १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.

    १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.

    १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.

    १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवण देतो.

    १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.

    १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.

    १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही.

    २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.

    २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.

    २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.

    २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.

    २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .

    २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .

    २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत.

    २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

    असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..

  • नमस्कार का करावा ?

    लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले जातात. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्या व्यक्तींचेच चरणस्पर्श केले पाहिजे ज्यांचे आचरण योग्य असेल.

  • गुपचूप रद्द झालेली ५० रुपयांची नोट !

    ५०० व १००० च्या नोटा नुकत्याच रद्द झाल्या आणि मराठी भाषेला, विमुद्रीकरण--चलनबंदी-- नोटबंदी -- मुद्राबंदी इ. अनेक शब्द आणि " वैचारिक वाद" लाभले. अनेक वृत्तपत्रे आजसुद्धा फक्त याच विषयावरच्या " हेडलाईन्स" छापतायत. पण काही वर्षांपूर्वी भारतीय चलनातील
    ५० रुपयाची एक नोट चलनातून अत्यंत गुपचूपपणे काढून घेतली गेली. त्याचीच ही "नोटकथा" !

    १९७५ मध्ये श्री.एम.नरसिंहम यांच्या सहीने चलनात आलेल्या ५० रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूच्या चित्रात लोकसभेवरील भारतीय राष्ट्रध्वज गायब होता. नुसताच ध्वजदंड ( काठी) छापलेला होती. ही चूक फार गंभीर होती. त्यानंतरच्या आय.जी. पटेल व के. आर. पुरी यांच्या कार्यकालातही हा ध्वजदंड तसाच रिकामा राहिला. त्यानंतर गव्हर्नर पदी मनमोहनसिंग आल्यावर या नोटेवर पुन्हा ध्वज फडकला.

    नंतर ५० रुपयांच्या या ध्वजविरहित नोटा अत्यंत गुपचूपपणे व्यवहारातून काढून घेण्यात आल्या. ना कसला गाजावाजा, ना कुठे परिसंवाद, हेडलाईन्स ! ही चूक झाल्यामुळे आणि ती निस्तरताना करदात्यांच्या किती कोटी रुपयांचा चुराडा झाला , हे कुणाला कळलेच नाही.

    एखादी गोष्ट जर दोषपूर्ण असेल तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही.जितकी चूक मोठी तितकी ती वस्तू निरुपयोगी ! पण टपाल तिकिटे आणि चलनी नोटांच्याबाबतीत हे अगदी उलटे आहे. जितकी चूक गंभीर तितकी त्याची किंमत अफाट वाढते. विविध साईट्सवर ५० रुपयांच्या या बाद नोटा, संग्राहकांसाठी आज खूप मोठ्या किंमतीला विकल्या जात आहेत.

    ५०० व १००० च्या नोटा जवळ ठेवायलाही बंदी आहे आणि या ५० रुपयांच्या नोटेची मात्र केवढी मिजास ? असते एकेकाचे भाग्य !

    -- मकरंद करंदीकर

  • तेजस एक्स्प्रेस आणि भारतीयांची मानसिकता

    पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी 'तेजस एक्स्प्रेस'ची अक्षरश: दैना करून टाकली.

    काही व्यक्तींना नशिबाने अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. मात्र, त्याच व्यक्ती आपल्या करंटेपणाने आणि वाईट सवयींमुळे या सगळ्यावर पाणी फेरतात, याचे मासलेवाईक उदाहरण सध्या ‘तेजस एक्स्प्रेस’च्या निमित्ताने अनुभवायला मिळाले आहे. गोव्याहून आपला पहिलाच प्रवास करून मुंबईत परतलेल्या या गाडीची अवस्था बघून रेल्वे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ची अक्षरश: दैना करून टाकली आहे. ‘तेजस एक्स्प्रेस’ मुंबईत परतली तेव्हा गाडीच्या डब्यांमध्ये लावण्यात आलेल्या अनेक एलईडी टीव्हींची प्रवाशांनी तोडफोड केल्याचे समोर आले. तसेच मनोरंजनासाठी देण्यात आलेले हेडफोन्सही प्रवाशांनी लंपास केले आहेत. याशिवाय, गाडीतील स्वच्छतागृह आणि इतर परिसरात पसरलेला कचरा पाहून अस्वच्छता हा भारतीय प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला अवगुण आहे की काय, असेही जाणवले.

    तेजस एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी २.३० वाजता करमाळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर साडेआठ तासांमध्ये गाडी सीएसटी स्थानकावर दाखल झाली होती. मात्र, या पहिल्याच प्रवासात गाडीत होणारी चोरी आणि तोडफोड पाहून रेल्वे अधिकाऱ्यांसमोर नवीनच समस्या उभी राहिली आहे. या गाडीच्या ‘इकॉनॉमी क्लास’मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा संपूर्ण वृत्तांत कथन केला आहे. अनेक प्रवासी सीटसमोर लावण्यात आलेले एलईडी टीव्ही उचकटून काढण्याचा प्रयत्न करत होते. काहीजणांनी तर एलसीडी टीव्ही काढून बॅगेत भरले होते. मात्र, रेल्वे अधिकारी याठिकाणी वेळीच आल्यामुळे या प्रवाशांचा नाईलाज झाला. याशिवाय, गाडीत असणाऱ्या बायो आणि व्हॅक्युम स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांनी मोठ्य़ाप्रमाणवर घाण केल्याचे दिसून आले. स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर अनेक प्रवासी फ्लश करत नव्हते. तसेच अनेक स्वच्छतागृहांमध्ये विष्ठा आणि कचरा जमिनीवर पसरला होता. त्यामुळे आता एकूणच प्रवाशांच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    -- सुनील बिडकर

  • सूर्यप्रकाश

    पाकिस्तानातल्या कोठड्यांमध्ये २९ सप्टेंबर २०१६ पासून तब्बल चार महिने अनन्वित यातना सोसणाऱया भारतीय जवान चंदू चव्हाणांची अखेर जानेवारीत सुटका झाली. त्यानंतर त्यांनी इ-सकाळ ला दिलेल्या मुलाखतीचा अंश

  • गंमत ४ ची

    थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

  • चित्रपटातील वास्तविक खरा नायक : दारासिंघ

    माझ्या लहानपणा पासून अनेकजण असे म्हणतानां मी ऐकले आहे की- ‘’ सिनेमामुळे मुलं बिघडतात.’’ त्यापूर्वी असे म्हटले जाई की नाटक वा तमाशामुळे मुलं बिघडतात. त्याही पूर्वी असे म्हटले जाई की नवीन शिक्षणामुळं मुलं बिघडतात… मला पडलेला प्रश्न असा आहे की नाटक, तमाशा, सिनेमा वगैरे वगैरे कलां १८ व्या शतका पासूनच्या आहेत. मग त्यापूर्वी माणसं मुलं बिघडतच नव्हती का? भारतीय परंपरेनुसार सध्या आम्ही कलियुगात आहोत. म्हणजे वाईट युगात. आणि असे म्हटले जाते की हे कलियुग अर्जुनाचा नातू परिक्षित याच्या पासून सुरू झाले. म्हणजे आम्ही थेट महाभारताच्या पर्वा पर्यंत पोहचतो. तेव्हा असे काय होते की माणसे वाईट होती. चांगले आणि वाईट यांचा जो काही संबंध आम्ही लावत असतो तो मला चुकीचा वाटतो. चित्रपटांच्या सुरूवातीच्या काळात अधिकांश चित्रपट पौराणिक व धार्मिक विषया वरील होते म्हणून त्या काळात सर्व समाज खूप तत्ववादी आणि शुद्ध आचरणाचा होता हे म्हणणे हास्यास्पद आहे. असो मुद्दा हा की चित्रपट बघून माणसांवर वाईट संस्कार होतात का? मला तसे वाटत नाही.तसे असते चित्रपटगृहात रोज हजारोने जाणाऱ्या प्रेक्षकातील सर्वचजण वाईट संगतीला लागले असते. चित्रपटातील वास्तव हे आमच्या सभोवतालच्या समाजाचे प्रतिबिंब असते. ते मनोरजंक व रोचक पद्धतीने मांडले जाते कारण चित्रपट हा व्यवसाय देखिल आहे.

    ५० ते ७० या काल खंडाला चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग म्हटले जाते. या कालखंडात चित्रपट नावाच्या जादूच्या पेटाऱ्याने सगळ्यानांच सामावून घेतले. राज,दिलीप,देव आनंद पासून राजेंद्र कुमार,प्रदीपकुमार, भारत भूषण, बलराज,मोतीलाल, अशोककुमार, प्राण,धमेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना वगैरे पर्यंत किती विविध अभिनेत्याना आमच्या प्रेक्षकांनी स्विकारले. कुठेच दूजाभाव केला नाही. या सर्वांचे धूमशान चालू असतानां एका वेगळ्या चेहऱ्याला पण या मायावी नगरीची ओढ लागली होती. खरं तर हा खराखुरा नायक.६ फूट २ इंच उंच,१२७ किलो वजन आणि ५३ इंचाची भरदार छाती. कोरीव चेहरा अन् डोक्यावरचे किंचित कुरळे केस. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी हा शड्डू ठोकून आखड्यात उतरला आणि मग एक लांबच लांब सत्र सुरू झाले. अमृतसर जिल्हयातील धरमूचक या गावातल्या हरनामसिंघ या गुरूच्या पठ्ठ्याने १९४८ मध्ये थेट सिंगापूर गाठले. कशाला? तर कुस्तीतले आव्हान स्विकारायला. अतिशय सुंदर देहयष्टी लाभलेला हा तरूण म्हणजे या लेखाचा नायक दारा सिंह.

    चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच खरे तर दाराचा डंका जगभर वाजलेला. आमच्या पिढीत तर कुणी फार दांडगाई करू लागला की त्याला म्हणत- ‘स्वत:ला काय दारासिंह समजोतस का?’पूढील दोन पिढ्या हा डॉयलॉग सुरू होता.१९५२ पर्यंत जगभर आव्हाने देत व घेत दाराने सर्वांनाच धूळ चारली. मलेशियन चॅम्पियन तरलोक सिंह याला कौलालंमपूरला मध्ये हारवून मलेशियायी कुस्ती चॅम्पियन जिंकली. १९५४ ला भारतात येऊन येथे चॅम्पियन झाले. जगभर दौरा करत ऑस्ट्रेलियाचा विश्व चॅम्पियन किंगकाँगला राजस्थान मध्ये धूळ चारली. २०० किलो वजनाच्या किंगकाँगला या बहाद्दराने रिंग बाहेर उचलून फेकले होते. कलकत्ता येथे झालेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत कॅनडाचा चॅम्पियन जार्ज गार्डियान्का आणि न्युझिलँडच्या जोन डिसिल्व्हाला याने आसमान दाखवले. जगात जिथे जिथे म्हणून फ्रीस्टाईल कुस्त्या होत त्या प्रत्येक देशाचा दौरा दाराने केला व जिंकत राहिला. सरते शेवटी अमेरिकचा जगज्जेता फ्रिस्टाईलपट्टू लाऊ थेज याचा २९ मे १९६८ ला त्याच्याच देशात धूळ चारून दारा जगज्जेता बनला. दाराने आपल्या कुस्तीच्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत ५०० लढती लढल्या आणि सर्वच्या सर्वच् जिंकल्या. १९८३ मध्ये आपली शेवटची लढत जिंकून तेव्हांचे राष्ट्रपती ग्यानी झैलसंग यांच्या हस्ते ‘अपराजेय पहिलवान’ हा पुरस्कार घेऊन सन्मानाने दारासिंह निवृत्त झाला. तर असा खरोखरचा नायक १९५२ मध्ये रूपेरी पडद्याकडे वळला.

    मी दारासिंहला अभिनेता म्हणत नाही तो यासाठीच. कारण तो खरोखरचा नायक होता. त्याचं व्यक्तीमत्वच असं होतं की सिनेमात खास त्याच्यासाठी भूमिका लिहल्या गेल्या. १९५२ मध्ये आर.सी.तलवार यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘संगदिल’ या चित्रपटाद्वारे दारासिंह रूपेरी पडद्यावर अवतरला. या चित्रपटात दिलीपकुमार मधूबाला मूख्य भूमिकेत होते. नंतर १९५५ मध्ये आलेल्या ‘पहली झलक’ या चित्रपटात ते पहलवान दारासिंह म्हणूनच अवतरले. १९६२ मध्ये आलेल्या ‘किंगकाँग’ ने मात्र ते प्रसिद्धीस आले.बाबूभाई मिस्त्री ज्यानां भारतीय स्पेशल इफेक्टचे पितामह म्हटले जाते ते या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. दारासिंह जरी जगज्जेते पहिलवान असले तरी स्वभावाने मात्र एकदम शांत. कधीच कुणाला त्रास देत नसत. मनमिळावू स्वभावाचे. त्यात दिवसरात्र कितीही काम करून घ्या थकत नसत त्यामुळे अनेक व्यावसायिक निर्मात्यांना दारासिंह त्यांच्या सिनेमात हवे असत. पण एक अडचण असायची ती मूख्य अभिनेत्रीची. दारासिंह बरोबर काम करण्यास बहूतेक नट्या उत्सूक नसत. अगदी हलके जरी थप्पड लगावली तर काय होईल ही चिंता. त्यामूळे ए ग्रेडच्या अभिनेत्री तर तयारच होत नसत. कूमकूम बरोबरचा किस्सा तर त्याकाळी बराच गाजला. एका चित्रपटात दारासिंहला तिच्या गालावर चापट मारायची होती. दिग्दर्शकाने हळू मारा अशी सूचना पण दिली होती. मात्र प्रत्यक्ष शुटींगच्यावेळी दाराच्या हाताचा जोर थोडा अधिक झाला असावा..लोखंडी हातच तो……कूमकूम कोसळली. बऱ्याचवेळाने मग शुद्धीवर आली. दारासिंह बरोबर हेलेन, मूमताज, कूमकूम,निशी वगैरे सारख्याच अभिनेत्रींनी काम केले.

    वडील सूरतसिंह रंधावा आणि आई बलवंत कौर यांनी दाराचे खूपच कमी वयात आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न लावून दिले होते. त्यात आईने बदाम, दूध, तूप प्रेमापोटी खूप खाऊ घातले परीणामी १७ व्या वर्षीच दारा एका मुलाचा पिता झाला. प्रद्युम्न हे त्याचे नाव. त्यांचा लहान भाऊ सरदारा सिंह देखिल कुस्तीगिर झाला. दोघांनी मिळून आपल्या गावाला भरपूर इनाम जिंकून दिले. पूढे दाराचा लहान भाऊ देखिल चित्रपटात रंधावा या नावाने काम करू लागला. दारासिंह चित्रपटात खरा ओळखला गेला तो हनुमानाच्या भूमिकेमुळे. प्रेक्षकांनी या हनुमानावर भरपूर प्रेम केले. दरासिंहचा हनुमान, जीवनचा नारदमूनी, शाहू मोडकचा विष्णू आणि कृष्ण, त्रिलोक कपूरचा महादेव, इफ्तेखार आणि जगदिश राज याचा पोलिस इन्स्पेक्टर हे सर्व चित्रपटसृष्टीतले खास मानदंड होते. प्रेक्षकानां दाराचा अभिनय बघण्यात विशेष रस नव्हताच कधी. ज्यांनी दारासिंहची प्रत्यक्ष कुस्ती कधीच बघितली नव्हती त्यांच्यासाठी दाराचे चित्रपट एक खजिनाच होता. त्यांचा हनुमान बघतानां लहानमोठे सर्वच प्रचंड खूष होत असत. थिएटर मध्ये प्रचंड आरडाओरड. एकेकाला सहज दोन्ही हाताने उचलून जेव्हा दारा फेकत तेव्हा प्रचंड शिट्या वाजत. त्या काळातील ते एक आयकॉन होते. पडद्या वरील त्याचे शक्ती प्रदर्शन बघतानां प्रेक्षकांचे तोंड तो प्रसंग संपे पर्यंत आ वासलेलेच राही. दारासिंहने त्याचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला होता यात वादच नाही.जवळपास १०० एक चित्रपटात दाराने भूमिका केल्या. अभिनेता धमेंद्र त्यांचा खास मित्र.

    मला आठवते १९६९चे वर्ष होते. माझ्या शहरात म्हणजे नांदेडला शिवाजी महाराजाच्या पुतळ्या शेजारीच ‘अप्सरा’ नावाची एक बऱ्यापैकी मोठी लॉज होती म्हणजे आजही असावी. या लॉजच्या मागे माझा वर्गमित्र कालूराम यादव रहात असे. आणि त्याच्या घराला खेटूनच प्रभात टॉकिज नावाचे चित्रपटगृह होते.(आता हे आहे की नाही माहित नाही)तर एक दिवस मी या मित्राच्या घरी जायला निघालो. शिवाजी पुतळ्या जवळ आलो तर तेथे लोकांची प्रचंड गर्दी.खरं तर निवडणूका वगैरे नव्हत्या व मोर्चाही दिसत नव्हता. मीही गर्दीत जाऊन् उभा राहिलो. शेजारच्याला विचारले की ही गर्दी कशाची? तो म्हणाला- समोरच्या लॉजमध्ये प्राण आणि दारासिंह उतरले आहेत. त्यांची झलक दिसावी म्हणून ही गर्दी होती. माझे तर दोन्हीही आवडीचे. मग मीही तिथेच थांबलो. बऱ्याच वेळा नंतर प्राण यांनी गॅलरीत येऊन सर्वांना हात केला. माझ्या आयुष्यात मी पहिल्यादांच चित्रपटातील अभिनेत्याला त्या दिवशी बघितले. जीव अगदी आनंदून गेला. नंतर समजले की दोन दिवस एका चित्रपटाचे शुटींग नांदेडला होणार आहे आणि त्यासाठी हे दोघे आले आहेत. मग दोन दिवस माझ्यासाठी आनंदाला पारावार नव्हता. दुसऱ्या दिवशी एका गल्लीत चित्रपटाचे शुटींग सूरू झाले. प्राण तर ओळखायलाच आला नाही. एका शिख साधूच्या मेकअपमध्ये ते होते. कॅमेऱ्याचे मागे दारासिंह. मला आताही त्यांच्यावर चित्रीत झालेले गाणे स्पष्ट आठवते….’नानक दुखिया सब संसार’…महेंद्र कपूर गायक होते. नांदेडच्या विविध भागात याचे चित्रीकरण झाले. स्वत: दारासिंह या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक होते. आयुष्यात बघितलेले पहिले चित्रपट शुटींग…पूढे जवळपास वर्षभरा नंतर हा चित्रपट नांदेडला प्रदर्शीत झाला. ’नानक दुखिया सब संसार’ हा पंजाबी चित्रपट बघायला तोबा गर्दी झाली. अनेकानां वाटले आपण नक्की कुठे ना कुठे तरी दिसणार. पण संकलन नावाची कात्री तेव्हा कोणालाच माहित नसल्यामुळे अनेकांचा हिरेमोड झाला…
    दारासिंह यांनी त्यांच्या कुस्तीची कारकिर्द बहरत असतानां आपल्या आवडीच्या सूरजित कौर या एम.ए. पास मुलीशी लग्न केले.

    दुसऱ्या पत्नी पासून त्यांना तीन मुली व दोन मुले झाली. यातील विन्दू दारासिंह हा पण चित्रपटसृष्टीत आहे. छोट्या पडद्ययावर देखिल दारासिंह दिसायचे. १९७८ मध्ये त्यांनी पंजाबमधील मोहाली येथे दारा स्टुडिओची स्थापना केली. १९९८ मध्ये ते भारतीय जनता पार्टीत गेले. २००३ ते २००६ या काळात राज्य सभेत पोहचणारे ते पहिले खेळाडू मेंबर होत. हिंदीतला ‘’जब वुई मेट’’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. त्यांच्यामुळे त्या काळात अनेक तरूण कुस्तीकडे वळले. आपले शरीर दारा सारखे असावे म्हणून व्यायामाकडे पण अनेक तरूणांचा कल झुकला. मला हे चित्रपटाचे सकारात्मक परिणाम वाटतात. चित्रपटामुळे चांगले संस्कारही होऊ शकतात. यादृष्टीने मला दारासिंह हे महत्वाचे वाटतात. अभिनय करणारे नट नाही तर प्रत्यक्ष जीवनातले खरेखुरे नायक म्हणून दारसिंहने काही काळ का होईना चित्रपट माध्यमाद्वारे आमच्या पिढीवर राज्य केले हे मान्यच करायला हवे. ७ जुलै २०१२ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यानां दाखल करण्यात आले. पाच दिवस त्यांनी इथेही लढत दिली. मात्र ५०० लढती जिंकणाऱ्या दाराला ही शेवटची लढत मात्र हरावी लागली. १२ जुलै २०१२ हा त्यांचा स्मरण दिवस. खरं तर याच दिवशी मला त्यांच्यावर लिहावयाचे होते पण जमले नाही.

    दासू भगत (१७ जुलै २०१७)

  • जेंव्हा चार आठ आणे बंद झाले तेव्हा

    नोटाबंदीनंतर अचानक माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत मौन सोडले तेव्हा गांधारीने आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून आपल्या डोळ्यातील तेजशक्ती आपल्या लाडक्या पुत्राला देण्याच्या प्रसंगाची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. डॉ मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा समाचार घेताना अदमासे दहा वर्षे आपल्या मुखात साठवून ठेवलेल्या ज्ञानमयी वक्तृत्वाने काँग्रेसची लाज सावरण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेस रुपी दुर्योधनास जवळ पुण्याची कोणतीही वल्कलं नसल्याने त्याचा काही उपयोगच झाला नाही आणि उरलीसुरली लाजही गेली.

    आपल्या टीकेचा सूर टिपेला नेत डॉ मनमोहन सिंग यांनी नोटा बंदीचा निर्णय हि देशाची "ऑर्गनाइज्ड लूट" आहे असे म्हणत आपला बोलक्या बाहुल्याचा कार्यक्रम संपवला आणि संपूर्ण जनता अवाक झाली याचे कारण कि डॉ मनमोहन सिंग याना अध्यारुत असलेल्या या लुटीचा फायदा कोणाला, केंव्हा आणि कसा झाला याचे स्पष्टीकरण देण्याचे टाळून ते सूक्ष्मात परतले.

    गाझियाबाद्च्या सभेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याच डॉ मनमोहन सिंग व काँग्रेसची " तुम्ही चार आठ आणे बंद केलेत कारण तुमची तेवढीच औकात होती आमच्या औकाती प्रमाणे आम्ही ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या असे म्हणत चांगलीच खिल्ली उडवली. मोदींच्या या विधानाने त्यांच्या पाठिराख्यांचे मनोबल वाढले आणि विविधप्रकारचे विनोद या निमित्ताने व्हॅट्सअँप फेसबुक वर प्रसारित केले गेले, आणि नेमकी हीच बाब डॉ मनमोहन सिंग यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांच्या वरील वक्तव्याचा जन्म झाला.

    पण चार आठ आणे बंद करण्याचा निर्णय हा विनोदाचा विषय नसून आज त्यामुळेच देशाला महागाईच्या भस्मासुराचा सामना करावा लागत आहे याची नोंद आपण घेतली पाहिजे.

    चार आठ आणे बंद झाल्याने अगदी तळागाळातील जनतेच्या रोजच्या निकडीच्या सर्वच्या सर्व गोष्टीच्या किमती सुमारे ३३% ते १००% पर्यंत वाढ झाली केवळ चलन रद्द झाल्याने आणि आपल्या देशात आपल्याच पैशाचे अवमूल्यन झाल्यासारखे चित्र निर्माण झाले. पोळीभाझी केंद्रावर मिळणाऱ्या जीवनावश्यक गोष्टींच्या भावात लक्षणीय वाद झाली. आठ आणे असलेली पोळी १ रुपया झाली तेव्हा चक्क १००% ते ३३% टक्के झालेली वाढ आपल्या लक्षातच अली नाही दळणाचे दर रूपये १.५०/= पैशावरून रूपये २/= झाले तेव्हा ३३% भाववाढ आपल्या लक्षात आली हे आपल्या लक्षात आले नाही. हीच गत झाली भाजीपाला, पाव, अंडी, बस भाडे, रिक्षा भाडे,वडा पाव, कटिंग चहा.पान, उपमा. इडली, पोहे यांच्यातील भाव वाढीची, हे केवळ झाले कारण नियंत्रित भाडेवाढ होण्याकरिता आवश्यक असलेले चलनच सरकारकडून देशात उपलब्ध नव्हते. म्हणूनच या भाववाढीला अर्थशास्त्रातील मुख्य नियम : मागणी आणि पुरवठा यातील तफावत लागू होत नाही. कारण मागणी आणि पुरवठा कायम राहूनही केवळ चलन रद्द झाल्याने बेसुमार भाडेवाढ करणे अपरिहार्य झाले. या प्रश्नाकडे त्या वेळी कम्युनिस्ट पक्षानेही जास्त लक्ष दिले नाही. या भाडेवाढी वरून काही प्रश्न विचारले असता ह्याच डॉ मनमोहन सिंग यांनी मूळ मुद्द्याला बगल देऊन त्यावेळी भारतातील जनता आजकाल जास्त खात सुटली आहे असे विचार मांडले होते. कांग्रेस प्रवक्ता आणि अभिनेता राज बब्बर याने मुंबईत १२ तर दिल्लीत ५ रुपयात आजही भरपेट जेवण मिळते आहे असे बेताल वक्तव्य केले होते. बर सध्या पोळीचे आणि केळ्याचे उदाहरण पहिले असता. आठ आण्याची पोळी १ रुपया झाल्यानंतर ती सरळ चार आठ आणे न वाढता एक एक रुपयांनी वाढत आज चक्क ७ रुपयावर येऊन ठेपली आहे आठ आण्याचा २००८ चा मूळ भाव पकडून झालेल्या वृद्धीचे मूल्यमापन केले असता चक्क पोळीच्या किमतीत १४ पट वाढ झाली आहे. गरिबांचे अन्न असलेले केळे ५० पैशावरून आज ५ रुपयांवर, २.५० पैशाचा वडापाव १५ रुपयांवर ६० पैशाचा सामोसा आज १५ रुपयांवर ६ रुपयांचे इडली सांबर ४० रुपयांवर २ रुपयांचे सँडविच ३० रुपयांवर उपमा / पोहे ५ रुपयांवरून २५ ते ३० रुपयांवर अशी भीषण भाववाढ झाली. हातावर पोट असलेल्या जनतेला भाववाढीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच २०११ मध्ये एका दिवशी रु ४० खर्च करणारे गरीब नाहीत असे दस्तुरखुद्द तत्कालीन अर्थमंत्री मा श्री चिदंबरम यांनी जाहीर केले तेंव्हा जनतेची तळ पायाची आग मस्तकात गेली. अर्थशास्त्राच्या मूळ नियमानुसार कोणतीही भाववाढ हि त्या त्या वास्तूच्या मागणी आणि पुरवठा या मध्ये निर्माण होणाऱ्या तफावतीमुळे होत असते.

    पण सर्वसामान्यांना दररोज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी लागणाऱ्या बारीक सारीक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याचे कारण मात्र आगळे वेगळेच होते आणि ते म्हणजे चार आठ आण्याचे चलनच रद्द करण्याचा डॉ मनमोहन सिंग सरकारचा निर्णय. बर हे करताना अंत्तरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचे अवमूल्यन करण्यासही हे सरकार कचरले नाही. त्यातूनच या प्रगतसनशील देशाच्या कामगारांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे उदार हस्ते ५ वा ६वा पुढे ७ वा वेतन अयोग्य लागूंकरून पैशाचा पुरवठा करीत भाववाढीच्या आगीत तेल ओतण्याचे व सार्वत्रिक लूट करणारे डॉ मनमोहन सिंग जेव्हा हे सर्व सोयीस्कररीत्या विसरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडतात तेंव्हा त्यांच्या बद्दलचा एक व्यक्ती म्हणून असलेला उरलासुरला आदर गाळून पडतो आणि प्रचंड संताप मनात उमटतो.

    नवल वाटते ते प्रसार माध्यमांचे ९ नोव्हेंबर १६ च्या नोटा बंदी पासून ते नोटा बदली पर्यंत मोदी सरकारला टीकेचे धनी करीत एकसुरी राग आळवत आहेत. आपला देश जो जगातली सर्वात मोठी लोकशाही मनाला जात असताना याचा एक महत्वाचा स्तंभ असल्याचे भान ठेऊन प्रसार माध्यमांनी वागणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. मोदींच्या नोटबंदीमुळे भारतीय अर्थवावस्थेला लागलेल्या आणि काँग्रेसने जपलेल्या काळ्या पैशाच्या किडीचे समूळ उच्चाटन होण्याच्या प्रक्रियेत या पुढे प्रसारमाध्यमानी आपली जबाबदारी ओळखून बातम्यांचे संपादन केले पाहिजे. जनतेचा संपूर्ण पाठिंबा, निष्प्रभ विरोधीपक्ष, काळ्या पैशाच्या चिंतेने बेजार समाजकंटक असे खरेखुरे सुधारणावादी व भारताच्या भविष्यातील अर्थक्रांतीची पाऊलवाट प्रशस्त करणाऱ्या या निर्णयाचे सर्व थरातून होणारे स्वागत हेच या योजनेचे यश म्हणायचे.

    या मुळे मोदी सरकारचे "अच्छेदिनचे" स्वप्न प्रलंबित होण्याचे मूळ कारण हे चवली पावली बंद होण्याने झालेली बेसुमार महागाई आहे. या महागाईने भारतातील कर्मचारी आणि कामगारांचे पगाराचे स्थर उंचावले. कृषी प्रधान देशाच्या कृषी क्षेत्राला या पगारवाढीचा सर्वात मोठा फटका बसला. कृषी कामगारांचे वेतन वाढून कृषी उत्पनात घट झाली. शेतकऱ्यास कामगार ठेवणे कठीण होऊन बसले. शेतमजूरांच्या पगारावर आधारभूत असलेल्या शेतमालाच्या किमती बाजारात तग धरू नाहीश्या झाल्या. कृषी प्रधान देशाला धान्यवस्तू आयात कराव्या लागल्या तसेच वाढलेल्या पगारानी आपली निर्यात महागडी केली.

    समाजकारण करत जमवलेली अटलजींच्या सरकारने सुपूर्त केलेली परकीय चलनाची गंगाजळी आटू लागली. त्यातच कांग्रेस सरकारने सन २००४ ते २००८ च्या काळात १००० रुपयांच्या दुप्पट नोटा चलनात आणून कृत्रिम चालनफुगवट्यास वाट करून दिली व निर्माण झालेला पतपुरवठा रिअल इस्टेट क्षेत्रात किमती वाढू देऊन गिळंकृत करण्यात आला. आजही कोणत्याही गोष्टींच्या वाढलेल्या किमती कधीही खाली येऊ शकत नाहीत यावर ठाम विश्वास असलेला वर्ग मोठ्याप्रमाणावर आपल्या देशात मौजूद आहे आणि तोच आहे " अच्छेदिन ' येण्याच्या वाटेतील मुख्य अडसर. वाढत्या पगाराच्या (wage war) या युद्धात आपल्याकडे वस्तू निर्मतीवर (manufacturing ) फार विपरीत परिणाम झाला आहे. अगदी परवा परवा १४००० हजार कामगारांची कपात करण्याचा लार्सन अँड टुब्रोचा निर्णय याचीच निष्पत्ती आहे.

    चायनीज वस्तूं वर बहिष्काराच्या घोषणा व बातम्यांची अंमलबजावणी करण्याचे मूळ आहे कि या बेसुमार भाववाढीमुळे ( अपरिहार्य पगारवाढीमुळे) आपण वस्तू निर्मितीत लागणाऱ्या पगाराचा अडसर यामुळे जागतिक स्तरावर आपण निर्माण करीत असलेल्या वस्तूंच्या किमती स्पर्धेत टिकत नाहीत हेच खरे. अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा वाढीव पगारात भागविण्यात जनता मेटाकुटीला येत आहे. अन्न धान्यातील भाववाढ हि चवली पावलीच्या रद्द केल्याने झाली तर निवारा - पायाभूत सुविधांमधील भाववाढीचे कारण हि कांग्रेसने आपल्या सरकारच्या काळात छापलेले व चलनात सोडलेल्या अतिरिक्त ५०० आणि १००० च्या नोटा होत. म्हणून काँग्रेसचा " आक्रोश दिन " साजरा करताना केवळ नेते मंडळी दिसून आली कार्यकर्त्यांचा पत्ताच नव्हता. मोदींनी याच मुळावर घाला घातला आहे. एक गमतीदार लॉजिक सांगितले जाते १२३ कोटीच्या देशात केवळ ३ टक्के जनता श्रीमंत आहे व संपूर्ण देशाचा पैसे त्याचे कडे आहे. त्यामुळे ९७ टक्के गरिबांना श्रीमंत करण्यापेक्षा ३ टक्के श्रीमंतांना गरीब केल्यास त्यांचे धन सरकारकडे जमा होऊन ते ९७ टक्के जनतेला जन धन, अटल पेन्शन, मनरेगा, प्रधान मंत्री ग्राम सडक योजना आश्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देऊ शकतात. व्याज दर कपात होऊन गृह कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या जनतेला दिलासा देण्यात येईल. प्राप्तिकराच्या दारात सुसूत्रता आणून तो सुसह्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालमत्ता क्षेत्रात काही बंधन येऊन त्यातील गैरकारभाला अटकाव निर्माण होऊ शकतो. जवळ पैसे (cash) बाळगण्यावरही बंधने येऊन म्हणजे त्याच्या सुरक्षेची हमी काढून घेऊन प्रवृत्तीला अटकाव होऊ शकतो.

    शेवटी एक चहावाला देश बदलू पाहतोय त्याच्या साठी गरज आहे ती जनतेने एक एकसाथ कटींग चहाचा ग्लास उचलून एक मुखाने "चिअर्स" म्हणण्याची. एवढेच ........

    महेंद्र काशिनाथ मोने, ठाणे