(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • रूटीन व्हेरिफिकेशनपासून सावधान

    " Everybody must be alert of Fake Phone Calls"

    पनवेल फ्लायओव्हरवर काम करीत असतांना २०१२ ला मी कामोठे, नवी मुंबई येथे रेडी पझेशन घर बुक केलं. त्यासाठी आयडीबीआय बँकेतुन लोन घेतलं होतं आणि त्यासाठी नेरूळच्या शाखेत खातं ऊघडलं होतं.लोनचा हप्ता मोठा होता आणि तो चुकू नये म्हणून मी माझ्या खात्यात पाच सहा हप्त्यांची तरतूद करून ठेवली होती.रक्कम मोठी होती. एप्रिलमध्ये मी ईकडे रहायला आलो.

    जूनमध्ये फ्लायओव्हरचं ऊद्घाटन झालं आणि माझी बदली वडाळ्याला ईस्टर्न फ्री वे वर झाली.
    सप्टेंबरमधल्या एके दिवशी आॅफिसमध्ये बसलो होतो. दुपारची वेळ असेल आणि मला एक फोन आला.
    "क्या मेरी बात सारंगजीसे हो रही है?"
    "हां जी बोलिये, आप कौन?"
    "सर, आयडीबीआय बँकसे एक्झिकेटीव्ह रिंकु बर्मन बोल रहा हूँ|"
    "बोलिये"
    "सर, आपका हमारी नेरूल ब्रँचमे अकांउंट है, उस सिलसिले में रूटीन व्हेरिफिकेशन करना है|"

    असं म्हणुन त्याने माझा अकांउंट नंबर ,जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर, नॅामिनीचंं नांव सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर माझ्या अकांउंट मधला बॅलन्स, मागचे चारपाच ट्रान्झॅक्शनस् वगैरे सर्व माहिती दिली आणि हे सर्व बरोबर आहे का विचारलं,मी हो म्हणून सांगितलं. माझी खात्री झाली होती कीं हा बँकेचाच माणूस आहे. हे सर्व सांगितल्यावर तो म्हणाला "सर आपका व्हेरिफिकेशन हो गया है, अब आपके मोबाईलपर एक व्हेरिफिकेशन कोड नंबर आयेगा, मै दूबारा आपको फोन करूंगा आप मुझे वह नंबर बता देना फिर यह प्रोसेस पुरा हो जायेगा|हो सकता है आपको एेखादा डेबिट क्रेडिटका मेसेज आयेगा लकिन ऊसको ईग्नोर करना|"

    त्याने सांगितल्याप्रमाणे कोड नंबरचा मेसेज आला त्यानंतर त्याचा फोन आला आणि मी तो नंबर त्याला सांगितला. कांही वेळानंतर माझ्या खात्यातून पन्नास हजार रूपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्याने ईग्नोर करायला सांगितलं होतं तरी मला शंका आली, मी त्याला लगेच त्याला फोन लावला पण फोन बंद होता. मी नेरूळ ब्रँचमध्ये फोन लावला पण ब्रँच बंद झालेली होती.

    दुस-या दिवशी सकाळी मी नेट बँकींगने माझं अकांउंट तपासलं आणि हादरलोच खात्यातून खरोखरच पन्नास हजार रूपये गेले होते.एका दिवशी एकावेळी पन्नास हजारची लिमिट असल्यामुळे तेव्हढेच गेले होते. लगेेच परत मी रिंकू बर्मनला फोन लावला पण तो बंदच होता. मी ब्रँचमध्ये फोन लावला आणि मॅनेजरशी बोललो,मॅनेजरने ऐकुन सांगितलं की तुमचं अकांउंट हॅक झालं आहे आणि तुम्ही तात्काळ ब्रँचमध्ये या. मी जायला निघालो आणि परत पन्नास हजार रूपये गेल्याचा मेसेज आला.अश्या त-हेने माझ्या खात्यातून एक लाख रूपये गेले होते.

    मी बँकेत पोहचलो, मॅनेजरच्या केबिन मध्ये गेलो, त्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि माझं नेट बँकिंग आधी बंद करायला सांगितलं.खरंतर आजची पन्नास हजारांची लिमिट संपली होती त्यामुळे अजून पैसे जाण्याची शक्यता नव्हती. मॅनेजरचे आणि माझे बरेच वाद झाले.त्याचं म्हणणं होतं कीं तो नंबर सांगुन तुम्ही चूक केली. मी त्याला म्हणालो कीं तुमची सिस्टिमच फुलप्रुफ नाही. माझं अकांउंट हॅक झालंच कसं? त्याने ईंत्यंभूत माहिती बरोबर दिली त्यामुळे तो बँकेचाच कर्मचारी असल्याची खात्री पटल्यामुळे मी तो नंबर त्याला दिला.

    सर्व खातं बघिल्यावर लक्षात आलं कीं रिंकु बर्मनने लोखंडवाला कॅाम्प्लेक्समधील ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्सच्या शाखेतून हे व्यवहार केले होते.आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरने तिकडे त्वरीत फोन करून त्यांना सर्व घटना सांगितली आणि रिंकु बर्मनच्या खात्यावरचे सर्व व्यवहार बंद करण्याची विनंती केली.हे खुप त्वरेने झालं पण तोपर्यंत त्या ठगाने एटीएमद्वारे ७६००० हजार रूपये काढून घेतले होते.मी पोलीस केस केली तर पुढेे सर्व सहकार्य करू अशी मॅनेजरने मला खात्री दिली आणि तेथून मी निघालो.मॅनेजरने माझ्या खात्यात गैरव्यवहार झाल्याचं मला लिहून दिलं.

    तेथुन निघुन मी तडक सीबीडी बेलापूरचं नवी मुंबई पोलीस मुख्यालय गाठलं आणि सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवली एफआयआर केला. त्यांनी लवकरात लवकर तपास करायचं आश्वासन दिलं.

    एकदा गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नाहीच, ते अक्कलखाती जमा करून टाकायचे असं ठरवुन टाकलं आणि कामाला लागलो. एक लाख रक्कम कांही कमी नव्हती. मनात रूखरूख होतीच.एकदोन दिवसांनी माझे एक हितचिंतक आणि आर्थिक सल्लागार श्री. दिपक लाला यांच्या कानावर ही गोष्ट घातली, त्यांनाही ऐकून धक्काच बसला पण त्यांनी रिझर्व बँकेच्या 'बँकिंग ओम्ब्डसमॅन' (लोकायुक्त)कडे मला आॅनलाईन तक्रार करून ठेवण्यास सांगितलं. मी त्याप्रमाणे सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करून तक्रार नोंदवली.

    ईस्टर्न फ्री वे चं काम जोरात चालू होतं, रोज कोणाची न कोणाची तरी व्हिजिट असायची. हळुहळु कामाच्या रामरगाड्यात मी पैश्यांचं विसरून गेलो होतो. एक दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली आणि तपासाचा आढावा घेतला पण हाती कांही लागलं नाही. रिंकुु बर्मनच्या अकांउंटमध्ये दिलेल्या कळव्याच्याा पत्त्यावर पोलीस जाऊून आले पण तो ही बोगस निघाला.

    डिसेंबरमध्ये एके दिवशी साईटवर एमएमआरडीएचे कमिश्नर आले होते, कामाची पाहणी चालू होती आणि अचानक माझा फोन वाजला,आवाज महिलेचा होता, त्यांनी मला सांगितलं कीं मी बँकिंग ओम्ब्डसमॅन बोलतेय.तुमच्या बँक खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची आम्ही चौकशी केली आहे आणि त्यात आम्हाला तथ्य आढळुन आलंय.आम्ही ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्स लोखंडवाला शाखेला तुमचे एक लाख रूपये देण्याचे निर्देश दिलेले आहेत.तुम्ही तिकडे जावून तुमचे पैसे कलेक्ट करा. ते ऐकुन मला आश्चर्याचा धक्काच बसला.मी त्यांच्याकडे फक्त आॅनलाईन तक्रार केली होती पण त्यांनी सखोल कार्यवाही करून मला माझे पैसे परत मिळण्याचे निर्देश दिले होते.

    दुस-या दिवशी सकाळी मी तिकडे गेलो. तिथल्या बँक मॅनेजरने माझ्याकडून ईंडेम्निटी बाँड लिहून घेतला आणि एक लाखाचा डिमांड ड्राफ्ट मला दिला.

    त्या घटनेनंतर मी सतर्क झालो आणि कोणत्याही अनोळखी कॅालला मी आता कोणताही रिस्पॅान्स देत नाही. प्रत्येकाने हे पथ्य पाळावेत हीच माझी ईच्छा आहे.
    The main reason of sharing this experience is that by mistake if anything goes wrong everybody should know about "Banking Ombudsman"

    - सारंग प. चपळगांवकर. मुंबई. (मुळगाव - बीड )


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

  • मी, एक दहशतवादी ! 

    संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आराखडा तयार करत असताना मला आलेल्या अनुभवांवर आधारित हा लेख. 

  • मराठी आपली आई,धर्म आपली माता

    आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी आपली आई,धर्म आपली माता.आपण खरे मातृपूजक आहोत. दुसऱ्याच्या मातेची निंदा करणारे नव्हेत.’ आपली मराठी भाषा किती ओजस्वी,प्रसादपूर्ण,सहजबोधआहे हे यशवंतराव चव्हाण असं समाजातून सांगतात.

    ‘मराठीत भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची जुळणी पहा कशी आपोआप सहज होऊ लागते.तुम्ही आपल्या भाषेवर अपार प्रेम करावं, नाहीतर तुमची ऐनवेळी बोलताना फजिती होईन!

    आचार्य विनोबांनी देवनागरीचा लिपी म्हणून केवळ मराठीसाठीच नव्हे तर सर्व भारतीय भाषांकरिता उपयोग करावा असा आग्रह धरला आहे. भाषाकोषकार विश्वनाथ नरवणे यांचंही म्हणणं हेच आहे.

    विनोबा म्हणतात, ‘मराठीच्या लेखकांनी इतर भाषेतील बोधप्रद साहित्य अनुवादित करुन मराठी वाचकांना द्यावे. मराठीचे अवांतर वाचन मुलांनी केल नाही तर त्यांना पुढे फार पश्चात्ताप होईल!’ असाही निष्कर्ष ते काढतात.

    म. गांधी मातृभाषा हीच शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरली तर आपण स्वदेशीचा अंगिकार केला असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल असे सांगतात.

  • मानवी मन ( Human Mind )

    निरोगी शरीरासाठी अनुकूल वातावरण व पौष्टिक आहाराची आवशक्यता असते . तसेच मनाच्या विकासासाठी चांगला पौष्टिक आहार ,अनुकूल वातावरण आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास. व्यक्तीला वाटणारा आनंद ,दुःख ,भावना आपलं शहाणपण,आपली ताकद,आपला वेडेपणा आणि दुबळेपणा या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असतात .

  • एक संकट असेही – ब्ल्यु व्हेल

    गेले कित्येक दिवस ब्ल्यु व्हेलची माहिती गोळा करायचा प्रयत्न करतोय, परंतु हाती ठोस असे काही लागेना. काल (१ मे २०१७ रोजी ) युरोपियन पोलीसांनी ब्ल्यु व्हेलवर अधिकृत बंदी घातली आणि सोशल मिडीयातून बरीच इन्फो लिक झाली... आणि ब्ल्यु व्हेलचा खतरनाक थरकाप समोर आला. हा तुम्हाला आत्महत्या करायला लावणारा व भाग पाडणारा एक आॅनलाईन गेम आहे. याचे मायाजाल इतके स्ट्राॅंग आहे की प्रसंगी स्वतंत्रपणे खेळणार्‍या दुसर्‍या व्यक्तीला समाविष्ट करुन आत्मघात करायला लावणारा हा खेळ खेळला जातोय. हा खेळ खेळायला उद्युक्त होणारा वयोगट आहे १२ ते ५२. हा गेम पुर्णतः आॅनलाईन असल्याने तुमच्या गॅजेटवर त्याचा पुरावा सापडत नाही. ठराविक कालावधीनंतर त्या फाईल्स डिलीटच नव्हे तर गायब होतात. ह्या गेममधे एकंदर पन्नास टास्क दिले जातात. पन्नास टास्क पार पाडताना, एक लेवल पुर्ण झाली कि हातावर एखाद्या चाकूने किंवा अणकुचिदार वस्तूने मार्क करुन घ्यायचा ज्यामुळे किंचित का होईना रक्त येईल. तुम्ही पहिल्याच टास्क आणि लेव्हल मधे इतके संमोहित किंवा हिप्नोटाईज झालेले असता कि सातत्याने त्या गेमचाच विचार करत रहाता. तुमच्या रोजच्या व्यवहारांवर मात्र कसलीच बाधा येत नाही. असे एकंदर पन्नास टास्क पुर्ण करायला हा गेम भाग पाडतो...आणि पन्नासावा टास्क आत्महत्या..! सोप्यात सोपी आत्महत्या कशी करावी याबद्दल इथे ट्रेनिंगही दिले जाते व उदाहरण म्हणून व्हीडीओ द्वारा पटवूनही दिले जाते. हातावर मनगटाच्या खाली फोरआर्मसवर केलेल्या खुणानी व्हेल माशाची आकृती तयार करायला सांगितली जाते.तुम्ही एवढे संमोहित होता कि तुम्ही त्यांच्या सुचना सहजगत्या पाळू लागता आणि नकळतपणे त्यांच्या आधीन होता. काही लेव्हल्स पार पाडताच तुमच्या घरी जी व्यक्ती ब्ल्यु व्हेल खेळंत असेल त्याच्या आवडीच्या वस्तु येउ लागतात. मुख्य म्हणजे खेळणार्‍या व्यक्तीच्या त्या रोजच्या वापरातल्या वस्तु असल्याने त्याबद्दल पालकांना आणि मित्रानाही पुसटशी शंका देखिल येत नाही. खेळणार्‍या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे जमा होत रहातात. त्रयस्थ व्यक्तीला हे पैसे टास्क पूर्ण केल्याबद्दलचे आहेत हे कळल्यावर विश्वास बसेल असा हा गेम आहे. या गेमची रचना इतकी जबरदस्त आहे कि सर्वसामान्य लोक, त्या व्यक्तीचे मित्र व नातेवाइक कुठलाही विरोध न करता त्याला प्रोत्साहित करत रहातात...आणि अशा रितीने ब्ल्यु व्हेल गेम खेळणारी व्यक्ती ५० टास्क नंतर आत्महत्या करते, ज्याचे कारण फक्त आणि फक्त गेमला आणि त्या व्यक्तीलाच माहित असते. रशियात गेल्या काही महिन्यातच १५० च्या आसपास आत्महत्या घडून आल्यात. वयोगट आहे १२ ते ५२. आता हे लोण युरोपमार्गे भारतात येतंय. भारतात नेटच्या आहारी जाण्याचे प्रमाण भयंकर आहे. तरुण मुलांमधे तर खुपच..! यावर विनंती एकच कि मुलांच्या सर्फिंगबाबत प्रचंड सतर्क रहाण्याची वेळ येउन ठेपलीय. अर्थात यावर रेमिडी ही ज्याची त्यानेच शोधायचीय..!

    -- भाकु

  • ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची…

    "आईनस्टाईन म्हणायचा ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची ."

    हे पटवून देताना कालच्या लोकसत्तातून गिरीश कुबेरनी फारच सुंदर लेख लिहला आहे..

    गेल्या आठवड्यात आपल्या देशाच्या भांडवली बाजाराचा निर्देशांक ३० हजारांच्या पुढे गेला. त्याच कालावधीत अँपल कंपनीचे भांडवली बाजारातील मुल्य तब्बल ८०४ बिलियन डाँलर इतके प्रचंड वाढले.

    अजून सोपे सांगायचं तर ५२,२६,००० कोटी रुपये इतकी झाली . आपल्या देशातल्या सर्व कंपन्यांचे बाजारमुल्य आहे ५२,१५,००० कोटी.

    अजून सोपं .......

    अँपलकडे आजमितीला रोख रक्कम आहे १५,६०,००० कोटी रुपये आणि आपल्या देशातल्या तीन सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांचं (रिलायन्स , टिसीएस आणि एचडिएफसी बँक ) एकत्रित मूल्य आहे १३,००,००० कोटी रुपये . म्हणजे अँपलने या तीनही कंपन्या विकत घ्यायचे ठरवले तरी २ लाख कोटी शिल्लक राहतील .....

    हे तर काहीच नाही अँपलचे मुल्य ब्राझील, सिंगापूर ,मलेशिया वगैरे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुल्यापेक्षाही अधिक आहे.

    वरच्या संख्यापुराणाचा सारांश खूप खूप महत्त्वाचा आहे..........

    आज जगातल्या पहिल्या पाच कंपन्या आहेत अँपल , अँमेझाँन, अल्फाबेट म्हणजे गुगल, मायक्रोसाँफ्ट आणि फेसबुक.

    या सर्व कंपन्यावर नजर टाकताच लक्षात येईल की,

    १) या पाचही कंपन्या नवअर्थकाळातल्या आहेत.
    २) या पाचही कंपन्या या पहिल्या पिढीच्या आहेत.
    ३) या पाचही कंपन्या म्हणजे एक कल्पना होती.
    ४) या पाचही कंपन्या एकाच देशात जन्मलेल्या आहेत. तो म्हणजे अमेरिका . त्यातही ही सर्व मूळ अमेरिकनच्या पोटी जन्माला आलेली नाहीत तर ती निर्वासीतांची मुलं आहेत.
    ५) आतातरी कल्पनाशक्तीला महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे . ज्ञानाला मर्यादा असतात पण कल्पनाशक्तीला नाही. ज्ञान भरपूर आहे पण त्याचं काय करायचं हेच माहीत नसेल तर काय उपयोग ? तेव्हा ज्ञान कमी असलं तरी एकवेळ चालेल पण कल्पनाशक्ती हवीच हवी.

    "कल्पनाशक्तीला मुक्त वाव द्यावा" .

    हे लिहू नका, ते वाचु नका, हेच खा, हे खाऊ नका..... अशा निर्बंधी समाजाची संतती किरटीच असते.

  • स्त्री यंत्र नाही हो

    स्त्री यंत्र नाही हो , ती ही माणुस आहे .
    तीला ही मन आहे ,ह्रदय आहे.
    तीला ही भावना आहेत .
    ती ला ही हसावेसे वाटते .
    चारचौघांमध्ये मिसळावेसे वाटते .
    आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते .
    काम करून ती ही थकते .
    ती ला ही आरामाची गरज असते .

    असे म्हणतात की या जगात कोणीही परिपुर्ण नाही ,मग एका स्त्री कडून ती परिपुर्ण होण्याची अपेक्षा का केली जाते .
    प्रत्येक वेळी तीच्या चुकांचा उहापोह का केला जातो ?

    का वारंवार केलेल्या चुकांच्या उहापोहामुळे तीच्यात न्युनगंड तर निर्माण होत नाही ना?
    कधी आळशी तर अकार्यक्षमतेची लेबल्स चढविली जातात .
    केवळ पोटाला जेवण ,अंगाला कपडा व चैनीला वस्तु एवढ्याच तीच्या गरजा असतात का?

    नाही , खरी गरज असते ती भावनिक आधाराची ,तीला समजुन घेणार्या आपल्या माणसाची ,तीला गरज असते प्रेमाची ,मायेची .
    तुमचा एक कौतुकाचा शब्द तीला दहा हत्तींचे बळ देऊन जाते .
    "तु थकली असशील ,थोडा आराम कर "हे प्रेमळ शब्द तीला नवीन उत्साह देऊन जातात .
    तीला ही तीच्या आवडी निवडी असतात .
    तीला ही मित्र मैत्रिणी असताच ,त्याच्यात बसावं गप्पा गोष्टी कराव्यात असही तीला वाटते .
    कधी कधी स्वतःसाठी एक क्षण जगण्याची तीचीही इच्छा असते
    तीलाही कधी कधी एकांतात बसावेसे वाटते .
    भुतकाळातील आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो .
    तीच्या आवडत्या व्यक्तीशी खुप गप्पा माराव्याशा वाटतात .
    पण म्हणुन काय ती स्वैराचारी होते ?का ती माणुस नाही ?
    तीला भावभावना नाहीत ?
    का तीच्या गरजा इतरांपैक्षा वेगळ्या असतात ?
    मित्रांनो !

    तीला समजुन घ्या ,तीचे दुःख समजुन घ्या .
    तीच्याशी मनमोकळे पणाने बोला ,कारण हे आयुष्य खुप लहान आहे .
    व गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच परत येत नाही .आणि मागे उरतात त्या फक्त आठवणी व डोळ्यात पश्चातापाचे पाणी !!!!


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

  • व्यवसाय कसा करावा हे अंबानीकडून शिका

    १५०० रु. ३६ महिने वापरायचे,आपला माल सुद्धा विकायचा. !!
    (१५३ x ३६ =५५०८) आणि नंतर बिनव्याजी पैसे परत करायचे !

    .....आधी दिलेलं 'फुकट' व्याजाच्या पैश्यातून वसूल ! वर ५५०८ चा धंदा !

    ...आता फक्त प्रश्न एवढाच आहे कि ५५०८ गुणिले किती ?
    सरासरी ४ कोटी जरी पकडले तरी !
    २२०३२०००००००!
    22032 कोटी !
    फुकट हँडसेट देऊन दिवसाला २०.४ कोटी कमाई !

    उदाहरण समोर आहे-
    व्यवसाय कसा करावा.....हे अंबानी कडून शिका..!!

  • आजच्या तरुणांपुढील आव्हाने

    शिक्षण कशासाठी घ्यायचं तर नौकरी मिळवण्यासाठी, नौकरी कशासाठी तर चांगली बायको मिळण्यासाठी ही सध्याची परिस्थिती आहे.

    जी मुलगी आणि तिचा बाप म्हणतो की मुलगा हवा तर Gov. नौकरीवाला , आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे मुलगा नौकरी वाला हवा पण मुलगी तरी नौकरीवर आहे का?

    सगळे जर नौकरी करू लागले तर व्यवसाय कोण करतील, उद्योगधंदे कोण चालवतील, इतर व्यवस्था कशी चालेल.

    एक पुस्तक वाचत होतो त्याच नाव आहे Rich that man poor that man" खूप छान पुस्तक आहे त्यात एक उदा. दिलं आहे की एक Gov नौकरी करणारा आणि एक व्यावसायिक यांचं मासिक उत्पन्न सांगितलं आहे, Gov नौकरी करणाऱ्याला महिन्याचा 30 हजार मिळतो तर व्यावसायिकाला दर दिवसाला 300 रु.मिळतात पण ते दुसऱ्या दिवशी दुप्पट होत असतात.आता हे कसे तर gov जॉब करणाराही 8 तास काम करतो पण त्याला जॉबवर ठेवणारा व्यक्तीही 8 तास काम करतो दोघांकडे वेळ सारखा पण व्यावसायिक मात्र असे 8 तास काम करणारे बरेच व्यक्ती ठेवतो आणि सगळ्यांपेक्षा जास्त Income कमावतो.

    फक्त आपली विचारशक्ती बदला, ज्या क्षेत्रातही काम कराल ते असं करा की तुमच्यासारखा कोणताच व्यक्ती ते करू शकत नाही, " दुनिया झुकती है बस ऊसे झुकानेवाला चाहिये" जर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी इ.हे तर खूप मोठे नाव झाले असेल याहीपेक्षा एक जळगावचा माझा मित्र अविनाश (MBA) फॉरेन मधून चांगली नौकरी सोडून इथे महाराष्ट्रात शेळ्यापालनाचा व्यवसाय करतो आणि शानने BMW गाडीत फिरतो, म्हटलंन आधीच कि सोच बदलो जिंदगी बदल जायेगी,

    स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र सगळ्यांनाच जॉब देऊ शकत नाही, वेळ गेल्यावर हात हालवण्यापेक्षा वेळेआधीच जागे व्हा, आणि पालकांनो तुम्ही सुद्धा तुमचे विचार बदला,तुमच्या मनातील भूत बाहेर काढा, मुलांना समजून घ्या.

    "तुम बदल गये तो सारी दुनिया बदल जायेगा

    -- प्रा. हितेशकुमार एस. पटले

  • हे शेतकरीच आहेत ना?

    हा नक्की संप आहे का?...

    ही नक्की क्रांती आहे का?...

    हे नक्की आंदोलनच आहे ना?

    ४८ हजार लीटर दूध रस्त्यावर ओतणारा शेतकरी आहे का?

    शेकडो किलो भाजीपाला, धान्याची नासधूस करणारा हा खरोखर शेतकरीच आहे का?

    हे सर्व मेहनतीनं पिकविणारे, हेच का ते शेतकरी,

    गाड्या जाळणारे, टायर फोडणारे हे शेतकरीच आहेत का?

    एवढी करोडो रूपयांची नासधूस करणाऱ्यांना खरोखरच कर्जमाफी हवीय का?

    अमूल्य असा भाजीपाला, धान्य वगैरे फुकट घालवणाऱ्यांना, खरोखरंच बाजारमूल्य वाढवून पाहीजे का?....

    हे सर्व आंदोलनकर्ते नक्की शेतकरीच आहेत ना, की महा'राष्ट्रा'त वाद निर्माण करणारे, गेली ७० वर्षे देशाची, राज्यांची, अर्थव्यवस्था बिघडवणारे, की सत्तेत असून सुध्दा, काहीही 'खायला' न मिळणारे अतृप्त आत्मे आहेत....

    नक्की हे कोण आहेत, शेतकरीच आहेत ना?

    -- संकलन : शेखर आगासकर
    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम. लेखकाचे नाव मला माहित नाही.