(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गणपती पूजेच्या मागची अवधारणा

    येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. प्रजातान्त्रिक पद्धतीने महाराष्ट्रातील जनता राज्याचा प्रमुख निवडणार आहे. श्री गणेशाची पूजा करताना, गणेशाचे किती गुण निवडणूकीत उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये आहे याचा विचार करून जनतेने राज्याचा प्रमुख निवडला पाहिजे. असे केल्यास राज्याची भरभराट होईल. प्रजा सुखी आणि समृध्द होईल.

      August 29, 2014


  • सौंदर्य व लावण्य असलेला : ताम्हण वृक्ष

    ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो.

      November 3, 2024


  • अलविदा २०१६..!!

    वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..

      December 31, 2016


  • किचन क्लिनीक – जायफळ

    किचन क्लिनीक – जायफळ

    जायफळ हा भारतीय स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ.
    गोडाची खीर असो साखरभात असो जायफळ घातल्या शिवाय त्यांना मजा नाही.गरम मसाला असो कि दिवाळीच केला जाणारा फराळ ह्याच्या हजेरी शिवाय सगळेच फिके. मसाले दूध म्हणू नका की चहाचा मसाला सगळ्यांतच हा हवा.

    असे हे सुगंधी जायफळ ह्याचा भला मोठा उंच सुगंधी व्रुक्ष असतो. आणी जायफळ हे त्याचे फळाचे बी.हे चवीला तिखट कडू असे मिश्र चवीचे असते.आणी उष्ण देखील असते.म्हणूनच शरीरातील वात व कफ दोष कमी करते.

    चला आता ह्याचे काही औषधी उपयोग पाहूयात.

    १)मुरूमांवर दुधात उगाळून ह्याचा लेप लावल्यास मूरुमं कमी होतात व चेहर्यावरचे डाग कमी होतात.

    २)वारंवार उल्टया होत असतील तर जायफळ तांदूळाच्या धुवणातून उगाळून त्याचे चाटण द्यावे फायदा होतो.

    ३)लहान मुलांना पोटात थंडी साठून पातळ संडासला होते तेव्हा गाईच्या तूपामध्ये जायफळ व सुंठ समप्रमाणात उगाळून हे चाटण थोड्या थोड्या वेळाने देत रहावे.

    ४)पोट फुंगून जुलाब होत असल्यास जायफळ लिंबु रसात उगाळून ते चाटण मध्ये मध्ये चाटावे.

    ५)शरीरावर कुठल्या ही भागावर सुज आली असून तिथे दुखत असल्यास तिथे जायफळाचा लेप करावा.

    जायफळ जर जास्त प्रमाणात सेवन केले तर पोटात आग होते,चक्कर येते,छातीत धडधड होते घूसमटल्यासारखे वाटते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 22, 2016


  • अनंत चतुर्दशी

    अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात.

    भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल किंवा अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे व्रत मागून घेतलेले असेल तरच त्या त्या लोकांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते.

    अनंताची पूजा होईपर्यंत गणपती विसर्जन करत नाहीत. माणूस जेव्हा त्याचे एखादे इप्सित साध्य करतो तेव्हा त्याच्या मनात त्याच्या कर्तृत्वाबद्दल अहंकाराची भावना उत्पन्न होते. असा अहंकार मनी भरलेला माणूस माणसाला ओळखू शकत नाही; परंतु जेव्हा हा अहंकार गळून पडतो तेव्हा मात्र साध्या साध्या गोष्टींमध्ये त्याला देव मिळू लागतो. असा परमेश्वर घराघरात पाहायला शिकणे म्हणजे अनंत दर्शन होय.

    अनंत पूजेत प्रामुख्याने यमुना, शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दो-याची पूजा असते. यमुना हे मनावरील कामक्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे. शेष हे महासामर्थ्य शाली पण अहंकाररहित तत्त्वाचे प्रतीक आहे. अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे. कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरकही चौदा धाग्यांचा असतो. या दिवशी चौदा या संख्येला महत्त्व अधिक असते. हे व्रत कोणाकडूनही घ्यायची गरज नसते. हे व्रत कोणीही सुरू करू शकतं. चौदा र्वष व्रत केल्यावर चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.

    या दिवशी मध्यान्हकाळी स्नान करून अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेऊन त्याला दोन पंचे गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेषनाग करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात.

    त्याप्रमाणे चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरक घेऊन त्याचीही पूजा करतात. या दो-याला अनंत असं म्हटलं जातं. तो पुरुषाने उजव्या हातात बांधावा. त्याचप्रमाणे मिळणारी अनंती पत्नीने उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा पठण करावी. रात्री मंत्रजागर करून ब्राह्मणास दक्षिणा देऊन पक्वान्नांचे वाण देतात. याप्रमाणे चौदा र्वष अनंत पूजन केलं जातं. या व्रतामुळे इच्छित हेतू सफल होतो, असं म्हणतात.

    चौदाव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं. या व्रतासाठी दांपत्य भोजन देण्याची प्रथा आहे. निमंत्रित केलेल्या दाम्पत्यांना चौदा अनारशांचं वाण दिलं जातं. अनारसे देणे शक्य न झाल्यास चौदा पेढे किंवा लाडू द्यावेत. अनंताचा दोरक वास्तविक वर्षभर ठेवायचा असतो. परंतु शक्य नसल्यास एखाद्या चांदीच्या डबीत ठेवून ती डबी देव्हा-यात ठेऊन रोज तिला हळदीकुंकू वाहून नमस्कार करावा. पुढल्या वर्षी त्या दो-याने विसर्जन करावं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.प्रहार

      September 14, 2016


  • आजचा आरोग्य विचार – भाग सहा

    भारतीय परंपरेतील बिछाना हा असाच होता. जमिनीवर अथवा एका लाकडी बाकावर पथारी पसरायची की झाले ! त्यावर एखादी चटई, धाबळी, घोंगडी, सतरंजी, गोधडी, रजई, किंवा शाल. झोपल्यानंतर इंग्रजी एस आकाराचा पाठीचा कणा पूर्णपणे जमिनीला समांतर टेकला जावा. ज्यामुळे मेरूदंडातील सर्व मणके देखील एका सरळ रेषेत येतात. आणि मज्जारज्जूवरील ताढ कमी होतो. म्हणजे मणक्यातील अंतर वाढणे, कमी होणे, मणक्यातील गादी सरकणे, गादीला सूज येणे, त्यामुळे होणारी पाठदुखी, कंबरदुखी, मुंग्या येणे आदि प्रकार कमी होतात.

      February 6, 2018


  • उत्क्रांती, आयुर्वेद, संस्कृती आणि आरोग्य

    p-24495

    आपण जागरूक आहोत आहाराबद्दल , आरोग्याबद्दल . मिळेल त्या माध्यमातून भाषेतून आपण आरोग्य विषयी जाणून घेत आहोत . त्यात हि आज आयुर्वेद शास्त्राबद्दल जनजागृती आणि आयुर्वेदातील मूल्यवान आहार आणि औषधी विषयी खूप छान माहिती रोज whats app , Facebook आणि इतर माध्यमातून उत्तम प्रकारे प्रसारित होत आहे . आरोग्याविषयीचे हे अभियान म्हणजे एक क्रांतीच म्हणावी लागेल . याचे दूरगामी फायदे पिढ्यान पिढ्या दिसतील .

    आरोग्य ह्या संकल्पनेकडे बघण्याची वेगळी दृष्टी आज आयुर्वेदातील संकल्पना समजून घेताना आपल्याला गवसत असणार. आम्ही आयुर्वेदा चे शिष्य हि अनुभूती घेत च समृध्द होत आलोय .मनुष्य प्राण्याचे जीवन हे शरीर धारणास्तव केलेले अन्न भक्षण , मलमूत्र विसर्जन ,संभोग आणि कालयोगाने मृत्यू इतके अप्रगल्भ निश्चित नाही.तसेच आरोग्य ह्या शब्दाची व्याप्ती, शरीरातील काही अवयव त्यांचे बिघाड आणि त्यावरील उपाय एवढी संकुचित किंवा mechanical नाही (सुदैवाने ). कारण अजूनतरी आपण गाडी servicing ला टाकतो त्याप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीला डॉक्टरकडे सोडून ,” ए बघ रे जरा काय part बिघडलाय , कुरकुर चाललीये दोन दिवस झाले . उद्या ऑफिसात जाताना घेऊन जातो , तोवर करून ठेव नीट” असे म्हणत नाही .

    पृथ्वीच्या निर्मितीपासून निर्माण झालेल्या अमिबीय जीवापासून मनुष्य अशी अचाट , अकल्पित उत्क्रांती , प्रगती किंवा अजून काही योग्य शब्द असेल तर तोः घ्या . तर हे सगळे निसर्गातील दृश्य , अदृश्य , सिध्द , प्रत्यक्ष प्रमाण असलेले, अनुमान प्रमाण सचोटीवर उतरणारे , कलनीय अनाकलनीय बाजू असणारे हजारो प्रमेय च आहेत कि .

    माणूस हा “प्राणी टप्प्यावर” च असताना केवळ प्राणीसुलभ शारीरिक विकासाचा एक limited era ओलांडून त्याही पलीकडे जाऊन माणूस नावाच्या प्राण्याचा विकास झाला . ह्या प्राण्याच्या उत्क्रांतीचे महत्वाचे टप्पे हे मानसिक विकासावर आधारलेले होते.

    निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्गाचे , ऋतूंचे , निसर्गातील घडामोडींचे , आपत्तींचे ,उपलब्धींचे, सौंदर्याचे , सुहृदाचे, सृजनाचे, प्रसंगी क्रौर्याचे , विनाशाचे , संहाराचे धडे हा भविष्यकाळातील महाशक्ती असणारा परंतु त्याकाळी प्राणी ह्या परिभाषेची कात टाकायला निघालेला मनुष्य प्राणी गिरवत होता . हे धडे तोः असे गिरवत होता कि त्याची ABCD येणाऱ्या हजारो लाखो पिढ्या तो वारसा पुढे नेणार होत्या. प्रत्येक वेळी पुढे नेताना त्या तोः वारसा प्रगत, सोप्या भाषेत सांगायचे तर update करत जाणार होत्या . genetic mutation हो वेगळे काही नाही . हा आता कळले बुवा , इतका वेळ काय बोलताय कळत नव्हते न , असो .

    तर एका विशिष्ट काळानंतर निसर्गाने जन्माला घातलेले हे मनुष्य बाल निसर्गावर राज्य करू लागले . स्वताचा अभ्यास करू लागले .

    गरज , भूक इतपत झेप न राहता निर्मिती हि सगळ्यात महत्वाची झेप माणूस घेत होता.

    या मानसिक विकासाचा मनुष्याच्या शारीरिक अवयवान इतकाच विकास आणि बदल होत होता . निसर्गाचे शरीरावर होणारे परिणाम माणूस जसा जसा जाणून घेऊ लागला तसतसा त्याच्या जीवनशैलीत बदल झाला . हे प्राथमिक सत्य आपण सगळे जाणतोच . परंतु यातून जी एक मोठी गोष्ट घडली , ती म्हणजे संस्कृती निर्माण झाली. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या जागी राहणाऱ्या , वेगवेगळी भौगोलिक परिस्थती , वेगवेगळे उपलब्धी असणाऱ्या मनुष्य गटांचे राहणे ,खाणे आणि एकंदरीत च एक जीवनशैलीचा उदय झाला .

    जीवन शैलीचा असा उदय होणे हि आरोग्य या संकल्पनेची नांदी होती . कृपया मागील वाक्य नीट परत परत वाचा . सजीव सुलभ स्वतःचे शरीर धारण करणे , स्वतःचा बचाव करणे आणि स्वतःची जात ( मनुष्य जात , कृपया जात शब्द tolerantly घ्यावा ) प्रजनन करून वाढवणे ह्या मूळ हेतुंमध्ये उत्तमोत्तम बदल या जीवन शैली मुले घडून आले .

    म्हणून जीवन शैली आणि संस्कृती हे दोन खूप महत्वाचे मुद्दे या लेखात अधोरेखित करावेसे वाटतात .

    कारण हि जीवन शैली आणि संस्कृती त्या ठिकाण आणि काळ ह्या कसोटीवर उतरत असते . तसेच पिढ्यान पिढ्या आहार , विहार आणि जगण्याची एक विशिष्ट पद्धत ज्याला आपण आचार म्हणतो हि संस्कृती जपत असते .

    तर मुद्दा असा आहे आरोग्य हि संकल्पना हे संस्कृतीच्या उगमापासून असावी . अश्या वेगवेगळ्या संस्कृती पृथ्वीतलावर वेगवेगळे अलिखित, अफाट literature निर्माण करत होत्या .

    कुठे न कुठे ह्या सगळ्यांचा संबंध मनुष्या प्राण्याच्या टिकणे , जगणे आणि निरोगी राहणे इथे येउन च संपत . शरीरा बरोबरच मनाचा पसारा आणि महत्व हळू हळू उलगडत होते . माणसाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या तीन गरंजा चा वेगवेगळ्या शाखां मध्ये विस्तार झाला .

    असा विस्तार होत असताना मूळ उद्देश मात्र अबाधित होता . माणूस त्याचे जगणे , टिकणे आणि प्रजनन . या गरजांच्या आजू बाजू च वेग्व्गेल्या शाखा विस्तारित होत होत्या अभ्यासल्या जात होत्या.

    थोडक्यात या विस्ताराला जीवन शैलीला , ज्या काळात विज्ञान , शास्त्र , सिद्ध असे शब्द अस्तित्वात पण नव्हते , त्या काळात स्व प्रामाण्याचा अनुभव होता .

    आणि म्हणूनच ह्या विशिष्ट काळानंतर मनुष्य प्राण्याची सर्व शास्त्रातली प्रगती आणि तरीही मूळ हेतू अबाधित होता आणि आहे .

    आज golbalisation च्या युगात संस्कृती ह्या concept चे सगळे खांब च गळून पडतात . जगाच्या पाठीवर वेग्व्गेल्या भौगोलिक वातावरणात राहणारे आपण पामर जीव कुठल्याही संस्कृतींची जीवन शैली आपल्या हवी तशी हव्या त्या पद्धतीने अमलात आणतोय . आपण जास्त काळ राहतोय त्या आजूबाजूचे निसर्गाचे आणि आपल्या शरीरातले अणू रेणूंचे करार आपल्याला माहित नसतात पण असतात हे १००% सत्य .करार मोडला कि दंड भरावा लागणारच . करार मोडण्याचे मध्यम काय तर , मी काय खातो , मी कसा राहतो (जीवनशैली) आणि मी कसा वागतो ( मानसिक आणि शारीरिक नियम ). म्हणजे च संस्कृती .

    संस्कृती हि कुठल्याही जाती अथवा धर्माची नसते . संस्कृती आणि धर्म या खूप वेगळ्या गोष्टी आहेत असे सुजाण वाचक जाणतातच.

    जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी शरीर आणि शरीर भाव सारखेच राहणार हो , परंतु त्या भौगोलिक वातावरचा , तापमान , उपलब्ध अन्न , ऋतू प्रकार , समुद्र सपाटी पासूनची उंची , यानुसार शरीराचा आणि निसर्गाचा करार झालेला असतो . त्यानुसार बदल होतात शरीर भावात निसर्गाला अनुसरून .

    त्यानुसार खाण्या पिण्याचे आणि इतर जीवन शैलीचे नियम आपोआप च आत्मसात होतात .

    अरे हो हेय सगळे लिहण्याचा प्रपंच का तर माझ्या एका patient ने मला विचारलेला निरागस प्रश्न . patient भारतीय नाही, email मधली प्रांजळ शंका , ” I wonder whether , we Europeans too have vaata pitaa and kafa dosha like you Indians as said in Ayurveda ? ”

    त्याच्या शंकेचे योग्य उत्तर पोचवले अन लगेच लिहायला घेतले .

    संस्कृती global असेल किंवा नसेल , परतू आयुर्वेद ग्लोबल आहे निश्चित . कारण आयुर्वेदात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांनुसार मनुष्य शरीतातील प्रकृती , दोष , धातू , आहार , विहार , आचार , व्द्याधी त्यावरील उपाय आणि व्याधी च होऊ नयेत म्हणून follow करायची संस्कृती ह्याचे विवेचन आहे .

    अहो कुठल्या medicine science मध्ये उलेख्ह असेल का, कि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आरोग्याशी निगडीत रोज संबंध येणाऱ्या गोष्टी यथोचित कशा कराव्यात .बाराखडी च कच्ची असेल तर ग्रंथ काय लिहणार . असे महत्व दिनचर्ये चे आहे म्हणून प्रत्येक ग्रंथात सुरुवात दिनचार्येपासून च आहे .ऋतूनुसार आपला आहार , आचरण आणि preventive measures कसे असावे हे आयुर्वेद च सांगणार कारण …कारण संस्कृती हो बाकी काही नाही .

    रोज खाण्यात असणार्या भाज्या , फळ , इतर व्यंजने यांचे गुणधर्म आणि व्याधीवर त्यांची उपयुक्तता याचे सविस्तर वर्णन इतर कुठल्या pathy मध्ये सापडेल का …आयुर्वेदातातच का ..कारण संस्कृती हो .

    syllabus उघडला कि रोग आणि औषधे असे शास्त्रच नाही मुळी.

    मला तर आयुर्वेद हा सर्वांग सुंदर अत्त्युत्तम कलेचा नमुना वाटतो कायम . असो विषय लांबतोय …उपलब्ध माहितीचा फायदा घ्या , अर्धी हळद पिउन गोरे व्यायचा प्रयत्न करण्या अगोदर योग्य वैद्या चा सल्ला घ्या . टिप्स च्या आहारी किती जायचे याचे सुज्ञ भान ठेवा . आयुर्वेदा बद्दल उत्तम माहिती पोचवण्याचे काम अखंड सुरु राहो .

    -- वैद्या. रुपाली जोशी पानसे
    आद्यं आयुर्वेद , पुणे
    aadyam .ayurved@gmail .com
    ९६२३४४८७९८

    (लेख आणि लेखातील माहिती आवडली आणि आपल्या सुहृदापर्यंत पोचवावी वाटल्यास कृपया लेखिकेच्या नावासकट share करावे . लेखावरील प्रतिक्रिया शंका आणि अनुभव यांचे स्वागत आहे कारण त्यामुळे लेखाचा उद्देश अजून सफल होतो )

      June 1, 2016


  • कोरोनाची शाळा

    पूर्वीच्या काळाची आठवण झाली. एक शिक्षक अनेक वर्गांना शिकवीत असत. या शाळेत मुळात एकच शिक्षक आहे. जगातले हे विलक्षण ज्ञानपीठ आहे. इथे मी काय शिकलो याची चाचणी देणे बंधनकारक नाही. मी जर एक चांगला माणूस बनू शकलो व निसर्गाचा आदर केला तर शाळा सोडल्याचा दाखला मला नक्की मिळेल.

      July 2, 2020


  • कपालभाती

    कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपालभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयंपूर्ण होतो.

    कपालभातीने हार्टमधले ब्लाॅकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् 15 दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता. कपालभाती करणार्‍याच्या हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंक्शन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगते, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली 70 ते 80 टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.

    कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॅल्व होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

    कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतात.

    कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते. कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात 12% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात 16 ते 18 पर्यन्त जाते. महिलांच हीमोग्लोबिन 16 व् पुरुषांच्ं 18 असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.

    कपालभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यात सामान्य होतात. हे पहाण्यात आले आहे.

    कपालभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते.
    एवढंच नाही तर, कपालभाती करणारा 5 मिनिटात मनाच्या पलीकडे जाता. गुड़ हार्मोन्स क्रिएट होऊ लागतात. स्ट्रेस हार्मोन्स गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही. किती विशेष आहे पहा.

    कपालभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात.

    कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दुसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट असणं जसा आजार आहे तसं ओव्हरवेट असणं ही आजारच आहे.

    कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

    कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

    अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होणं. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तुटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुळ होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुळ होतात व् त्याच रुग्णास स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विज्ञानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

    कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् 3 ते 9 महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.

    लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज 10% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलीच पाहिजे.

    विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.

    एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी तज्ञाकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.

    करा योग रहा निरोग.

    -- डॉ. गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ञ
    9820584716

      April 25, 2017


  • अमरीश पुरी

    काही माणसे अमर असतात तसेच अमरीश पुरी. मला त्यांना अनेकवेळा स्वाक्षरीच्या निमित्ताने भेटता आले ,

      July 23, 2021