वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, बीडच्या सीताफळाला GI मानांकन
बीड जिल्ह्यातला किल्लेधारुर परिसर सीताफळाचं आगार म्हणून ओळखला जातो. इथल्या बालेघाटात उगवणारी सीताफळंही अतिशय गोड आणि मधूर. म्हणूनच इथल्या बालानगर जातीच्या सीताफळाला केंद्रातर्फे भौगोलिक निर्देशन म्हणजेच जीआय मानांकन मिळालं आहे. यामुळे या सीताफळांचं भविष्य आता बदलण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
कमी पाण्यात, खडकाळ जमिनीत येणारं फळपीक..बालेघाटाच्या डोंगररांगा या बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. यामुळे इथल्या मातीत खनिजांची भरमार आहे. याचाच परिणाम इथल्या सीताफळावरही झाला आहे. या सीताफळांना वेगळी चव आणि गोडवा आहे आणि याच गोष्टीमुळं इथल्या बालानगरी जातीच्या सीताफळांना जीआय मानांकन मिळालं आहे.
अत्यंत कमी उत्पादन खर्चात सिताफळाची लागवड..सीताफळ अतिशय कमी पाण्यात आणि मुरमाड जमिनीतही चांगलं येणारं फळपीक आहे. यावर कोणती कीड वा रोग येत नाही. तसंच याला खतही द्यावं लागत नाही. यामुळं उत्पादन खर्च अतिशय कमी असतं. मात्र, असं जरी असलं तरी याला बाजारात चांगला भाव मिळत नाही. डोंगराळ भागातून पायपीट करत शेतकरी ही सीताफळ बाजारात घेऊन येतो आणि याला व्यापारी दर देतात किलोमागं अवघे 3 ते 4 रुपये. तसंच ही फळ तीन चार दिवसांत विकली गेली नाही तर खराब होतात. यामुळं शेतकरी या फळाची लागवड करण्यास उत्सुक नसतो. मात्र, जीळाला बाजारपेठेत चांगला दर मिळेल आणि शेतकरी पुन्हा या फळाच्या लागवडीकडं वळेल, अशी तज्ज्ञांना आशा आहे.
जीआय नामांकन मिळाल्यानंतर परदेशातील निर्यात वाढणार..कोणत्याही शेतमालास जेव्हा जीआय मानांकन मिळतं, सीताफळाला परदेशात मोठी मागणी..सीताफळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मोठी मागणी आहे. आईस्क्रीमपासून ते जामपर्यंत अनेक गोष्टीत सीताफळाचा वापर होतो. मात्र, हे फळ लवकर खराब होत असल्यानं याला दर मिळत नाही. म्हणूनच बीडसाऱख्या जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग उभं राहणं गरजेचं आहे. तरच इथल्या शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीसाठी प्रोत्साहन मिळेल.
सीताफळ हे बालाघाटच्या डोंगररांगाना मिळालेलं एक वरदान आहे. कोणत्याही कीड नाशक आणि रासायनिक खतांचा वापर न केल्यानं हे फळ विषमुक्त आणि अतिशय मधूर आहे. यामुळं आता शासनानं याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग उभं करणं गरजेचं आहे. ज्यामुळं इथल्या शेतकऱ्यांच्या सीताफळाला किंमत तर मिळेलच. शिवाय यातून या दुष्काळी भागातील लोकांना रोजगारही मिळेल.
मोदी: काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
उद्धव: मज फूलही(कमळ) रुतावे हा दैवयोग आहे !
केजरीवाल: सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
राहुल गांधी: चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे !
अजित: काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
मनमोहन: माझे अबोलणेही विपरीत होत आहे !
भुजबळ: हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना
बारामती: आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !
देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला ११२ हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय.
पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी ११२ हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी १००, अग्निशमन दलासाठी १००, ऍम्ब्युलन्ससाठी १०२ आणि आपत्कालीन संकटासाठी १०८ हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ ११२ हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत.
ट्रायने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. अमेरिकेतील ९११ आणि इंग्लंडमधील ९९९ या इमरजन्सी नंबरच्या धर्तीवर भारतातही ११२ हा एकच इमरजन्सी नंबर असणार आहे.
तुमचं सिमकार्ड किंवा लँडलाईन नंबर काही काळासाठी बंद असेल किंवा आऊटगोईंग बंद असेल, तरीही हे ११२ या क्रमांकावर तुम्ही कॉल करु शकाल. त्याचप्रमाणे एसएमएसद्वारेही ही सुविधा उपलब्ध असेल. लोकेशन ट्रेस करुन तुमच्या गरजेनुसार संबंधित विभागाकडून मदत केली जाईल. त्याचप्रमाणे पॅनिक बटणवर ११२ नंबर सेव्ह करता येईल.
लोकमान्य टिळक लहानपणी म्हणाले होते.
"मी शेंगा खाल्ल्या नाहीत... मी टरफलं उचलणार नाही"
आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा:
महात्मा गांधी:
"मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलणार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलणार"
बाळासाहेब ठाकरे:
"यांच्या बापाचा माल आहे काय? शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली तर त्याला सरकार जबाबदार असेल"
जय महाराष्ट्र!
शरद पवार:
"महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याने कुणी कुणाला शेंगा खाण्यापासून रोकू शकत नाही...
यात शेतकरयांचं भलं आहे आणि उरलेल्या टरफलांपासून alcohol बनवता येईल का याबद्दल विचार करण्यासाठी सरकार लवकरच समिति नेमेल"
नरेंद्र मोदी:
"मित्रोंssss....
शेंग खाने का वर्णन तो हमारे वेदों में भी किया हुआ है....
चाहे हिन्दू हो या मुस्लिम या सीख़ हो या ईसाई हो सबने शेंग खानी चाहिए...
और सबने अपने आसपास का टरफल उठा के भारत को स्वच्छ रखना चाहिए"
सोनिया गांधी:
"अमने चार साल पहले एक सपना देका ता की देश के हर एक नौजवान को शेंग खाने का मौका मिलना चाइये...
और कांगरेस ने ये सपना पूरा किया.
और "
दिग्विजय जी ये तरफल कौन सा फल होता है??"
दान्यवाद...
मनमोहन सिंह:
"..........
...........
...........
...........
...........
............
.....!!!"
देवेन्द्र फडणवीस:
"हे बघा....
महाराष्ट्रात शेंगा खायच्या की नाही याचा निर्णय आम्ही आदरणीय मोदीजींना विचारून उदया जाहिर करू आणि टरफलांबाबत नाथाभौ काय ते लवकरच सांगतील"
नितिन गडकरी :
"विदर्भाच्या लोकांवर वेळोवेळी अन्याय झाला आहे त्यामुळे आता आम्हाला खाण्यासाठी आमच्या वेगळ्या शेंगा पाहिजेत आणि टरफलांपासून आम्ही ऊर्जा निर्मिति करता येईल का याचा विचार करू "
किरीट सोमय्या:
"या चेंगा काण्याच्या कामात प्रछंड ब्रष्टाचार जाला आहे असा माजा पश्त आरोप आहे आणि प्रमाणा पेक्चा जास्त तरफलं जमा केल्याबद्दल बुजबलांना अटक ज़ालीच पायजे"
छगन भुजबळ:
"या शेंगा आमच्या वडिलोपार्जित असुन माझ्याकडे सर्व शेंगा आणि टरफलांचा हिशोब आहे आणि शेंगा खायचा निर्णय सर्वांचा असताना मला एकट्यालाच लक्ष्य केले जात आहे तरीही मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे"
अण्णा हजारे:
"हे पहा असं आहे की ....
या शेंगांच्या कामात खुपच अनियमितता आढळून येत आहे ,एका शेंगेत एकच दाणा दुसऱ्या शेंगेत तीन तर तिसरीत दोन....
आणि टरफलं पण अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत....
तर असं आहे आणि याची चौकशी तर झालीच पाहिजे नाहीतर मी उपोषणाला बसणार"
उद्धव ठाकरे:
"आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचे पालन आम्ही करू आणि सर्व शिवसैनिकांना शेंगा खाणे बंधनकारक करू आणि टरफलां बाबत संजय राउत "सामना" मध्ये लिहितील"
राज ठाकरे:
"या सर्व परप्रांतियांनी इथे येऊन शेंगांचे भाव वाढवून ठेवलेत आता काय करायचं आपल्या मराठी मुलांनी, सरकारला मराठी मुलांसाठी शेंगा राखीव ठेवल्याच पाहिजेत नाहीतर राज्यभर खळ्ss खट्याक होईल....
आणि टरफलं फेका त्या अबु आजमी च्या बंगल्या बाहेर...
जय महाराष्ट्र"
अबु आजमी:
"देखिये इस्लाम में किधर भी नहीं लिखा है की मुस्लिमो ने शेंग खाना जरुरी है.....
और ये टरफल क्या होता है
मुझे नहीं पता"
अजित पवार:
"ज्या शेतात या शेंगा आढळून आल्या, ते शेत माझ्या मालकीचं असल्याचा खोटा नाटा आरोप उगाचच होतोय...
आरोप सिदध झाल्यास शेंगा खायच् सोडून देईल"
तटकरे:
"जसं दादा म्हणतिल,
तसं"
राहुल गांधी:
"देखो भैया...
आज देश का गरीब क्या चाहता है ...
वो खाली शेंग ही तो खाना चाहता है ...
और ये सरकार क्या कर रही है ...
हमारे सामने टरफल फेक रही है ....
हमे इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए....
बोलो हाँ - आवाज उठाना चाहिए ..."
रामदास आठवले:
"मी नक्की खाणार शेंगाsss...
"मी नक्की खाणार शेंगाsss...
कॉँग्रेस-राष्ट्रवादीला देणार ठेंगा...
और किसीने टरफलं नहीं उचल्या...
और किसीने टरफलं नहीं उचल्या...
तो विनाकारण करुंगा मैं दंगा ."
साध्वी प्राची:
"हर हिंदु ने चार चार गोनी शेंग खानी ही चाहिए और जिसको नहीं खानी वो पाकिस्तान चला जाये"
अरविंद केजरीवाल:
"सुनो भई....
ये शेंग खाने का सवाल नहीं है ...
ये आम आदमी के हक़ का सवाल है ..
और कोई अगर आपको दिल्ली में शेंग खाने के लिए मना करे तो हमारे helpline पर फोन करो...
और इस काम में अण्णाजी भी हमारे साथ है"
निखिल वागळे:
"भाई जगताप तुम्ही शांत रहा....
मी शेंगा खायच्या की नाही याबाबत प्रेक्षकांची मतं मागवणार आहे आणि टरफलांचा विषय आपण ब्रेक नंतर घेऊ...
पाहत रहा point blank"
प्रसन्न जोशी:
"एकूणच काय...
तर शेंग खाण्यापासून सुरु झालेला हा विषय गंभीर वळणावर येऊन पोचलाय, बघुया सरकार काय करतय ...
तुर्तास येथेच थांबूया,
तुम्ही बघत राहा
ABP माझा..!"
सकाळी लवकर उठायचे......
रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम व योगासने करायची...
रोज आंघोळ करायची........
रोज किमान दोन किलोमीटर तरी चालायचे.....
आहारावर व खाण्यावर नियंत्रण ठेवायचे, तेलकट, तुपकट & गोड पदार्थ(?) कमीच करायचे.....
खर्च कमी व सेव्हीँग जास्त करायचे.......
स्वदेशी वस्तुच जास्त वापरणार..........
रोज एखादे चांगले काम करायचे............
रोज रात्री फेसबुक व Whattsup वर कमी व निद्रेमध्ये जास्त रहायचे........
जिमला नियमितपणे जायचे.......
रोज सकाळी पेलाभर गरमलिंबुपाणी प्यायचे.....
चांगले पुस्तक आणि कविता वाचतच झोपायचे....
लिफ्टचा वापर कमी करत जिन्यानेच वर जायचे....
रोज पाच ईँग्रजी शब्द पाठ करायचे.....
रोज किमान 15 मिनिटे तरी वर्तमानपत्र वाचायचे.....
गाडी चालवताना मोबाईल वापरायचाच नाही.....
रोज सकाळी ऑफीसला जाताना एकाला तरी लिफ्ट द्यायची..
रोज घरातले एक तरी काम करायचे.....
आठवड्यातुन एकदा तरी घर आवरायला आईला मदत करायची......
नातेवाईकांना महीन्यातुन एकदा तरी कॉल करायचा.....
रोज आंघोळ झाल्यावर (?) एक जपमाळ करायची आणि एक आवडते स्तोत्र वाचायचे.".....
हे असे अनेक संकल्प आपल्या सभोवतालची हिंदु माणस ख्रिस्तींच्या "न्यु ईयर"ला करतात. (सर्वधर्मसमभाव )
पण या संकल्पाशी वर्षभर कितीजण प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहतात देवच जाणे.
-- विवेक जोशी
उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे.
अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला. ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते.
हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास नातलगांना 10 लाख, कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यावरही 10 लाख, कायमचे (पार्शल) अपंगत्व आल्यास 7.5 लाख, जखमी झाल्यास उपचारासाठी 2 लाख आणि अपघातस्थळापासून आपल्या घरी जाण्यास प्रवासासाठी 10 हजार रुपये मिळतील.
वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे मित्रांनो यापुढे रिझर्वेशन करताना आपण ही बाब नक्की ध्यानात ठेवा इतरांनाही सांगा.
अधिक माहितीसाठी -http://contents.irctc.co.in/en/InsuranceTermCondition.pdf
आमीर खानचा 'दंगल' चित्रपट काल बघीतला.
आमीर खानचा हा चित्रपट कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाराच ठरणार आहे. 'म्हारी छोरियाँ छोरो से कम हैं के?' असा प्रश्न पुरुष प्रधान व्यवस्थेला विचारत एक बाप आपल्या मुलींना कुस्तीपटू म्हणून कसं घडवतो आणि त्याच्या पोरीही आखाड्यात कशी 'दंगल' करतात, याची ही कथा मनोरंजक आहेच, व प्रेरणादायी ही आहे. कुस्तीपटू महावीर सिग फोगट यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उतरविण्यासाठी आमीर खान यांनी नेहमी प्रमाणे खूप मेहनत घेतली आहे. आपल्या मुलींनी उत्तम असे कुस्तीपटू बनावे यासाठी एक पिता आपल्या मुलींशी कठोरपणे वागतो, व आपल्या दोन्ही मुलींना कसे घडवतो यांचे सुंदर चित्रण आमीर खान यांनी मांडले आहे. हरियाणातील एका छोट्या गावात राहणाऱ्या महावीर सिंह फोगट (आमीर खान) यांची ही कथा आहे. फोगट हे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेते आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून द्यायचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं असतं. परंतु, घरच्या हलाखीमुळे कुस्तीचा आखाडा सोडून त्यांना नोकरी करावी लागते. देशासाठी पदक न जिंकता आल्याची सल त्यांच्या मनाला सतत बोचत असते. त्यामुळे आपल्याला एक मुलगा व्हावा आणि त्यानं आपलं हे स्वप्न पूर्ण करावं, अशी त्यांची तीव्र इच्छा असते. मात्र, त्यांना चौथीही मुलगीच होते. आपलं स्वप्न अधुरंच राहिल्यानं ते काहीसे निराश होतात. अशातच, एक दिवस त्यांच्या दोन मुली - गीता आणि बबिता त्यांची छेड काढणाऱ्या शेजारच्या दोन पोरांची चांगलीच धुलाई करून घरी येतात. त्यांचा हा 'पराक्रम' पाहून महावीर फोगट यांच्या आशा पल्लवित होतात. मुली मुलांपेक्षा कुठेच कमी नसल्याची जाणीव त्यांना होते आणि मग सुरू होतो एक जिगरबाज प्रवास. मुलींना कुस्तीपटू म्हणून घडवण्याचा महावीर फोगट यांचा निर्धार पक्का असतो, मुलीही सज्ज असतात, पण समाज - संस्कृतीचा सामना करत त्या सगळ्या आव्हानांना कसं अस्मान दाखवतात, हे पाहणं नक्कीच रंजक आहे.
पटकथा, संवाद आणि चित्रण सगळंच प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. अनेक दृश्यं पाहताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. अभिनयाबद्दल बोलायचं तर, आमीर खानने 'मिस्टर परफेक्शनिस्ट' पणा परत सिध्द केला आहे. आमीर खाननं महावीर फोगट यांच्या भूमिकेत कमाल केली आहे. वयाप्रमाणं बदलत जाणारी देहयष्टी आणि देहबोली केवळ आमीरच साकारू शकतो. मुलींवर जिवापाड प्रेम करणारा मात्र आपलं स्वप्न साकार होऊ शकणार नाही म्हणून निराश झालेला बाप व नंतर मुलींमध्येच आपलं स्वप्न पाहात मेहनत घेणारा प्रशिक्षक त्यानं जबरदस्त साकारला आहे. महावीरचे तरुणपणातील कुस्तीचे प्रसंग (सिक्स्पॅक ऍब्ज) ते उतारवयात वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट हे सर्व मोठं आव्हान त्यांनी सहज पेललं आहे. तो सिनेमाभर इतका सहज वावरतो की तो अभिनय करतोय असं वाटतंच नाही. त्याशिवाय, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम आणि सुहानी भटनागर या चार मुलींनीही त्याला उत्तम साथ दिली आहे. साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराना आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. ज्यांना कुस्ती म्हणजे काय हे पण माहित नाही, त्यांनाही हा सिनेमा आवडेल, अशी मांडणी दिग्दर्शकाने केलीय. सिनेमा कुठेच कंटाळवाणा होत नाही. उलट, कुस्तीचा थरार सिनेप्रेमींच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. पार्श्वसंगीत त्यात अधिकच भर घालतं. तारे जमिन पर, गजिनी, ३ इडियट्स, धूम ३, पीके यांसारखे चित्रपट देणा-या आमीर खानच्या यशात आता दंगलचा उल्लेख हा कायम उंचावत राहणार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तिथी आणि तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे माहितीये?
तुम्हाला जर आज उचलून कुणी एखाद्या निर्जन बेटावर नेऊन सोडले तर तारीख फार फार तर महिनाभर लक्षात राहील तुमच्या. त्यातही एखादाच जरी दिवस चुकला तरीही पुढचं सगळंच चुकणार, हे निश्चित. पण तिथीचं तसं नाही. तुम्ही एखाद्या निर्जन बेटावर असलात तर महिनाभराने कदाचित तिथीही विसरुन जाल. पण जर तुमचा खगोलशास्त्राचा जुजबी अभ्यास असेल तर चंद्राची कला आणि पौर्णिमेला चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, केवळ एवढ्याच निरीक्षणावरुन तुम्ही तिथी, महिना आणि पक्ष, तिन्ही ठरवू शकता. अगदी बिनचूक. आज मोठमोठ्या शहरांमध्ये दुर्बिणीद्वारे आकाशदर्शनाचं फॅड आलंय. मी ह्या खगोलशास्त्र प्रसाराच्या क्षेत्रात तब्बल ६ वर्षे काम केलंय मित्रांनो. जे ज्ञान मिळवण्यासाठी तुमच्यापैकी अनेकांनी रांगा लावल्या असतील, ते ज्ञान प्राचीन काळापासून प्रत्येक हिंदूला अगदी नकळत्या वयातच शिकवले जायचे. केवळ आणि केवळ कालगणनेसाठी!! आजसुद्धा खेड्यापाड्यांमध्ये अशी कित्येक वृद्ध मंडळी तुम्ही पाहिली असतील, जी कोणतेही घड्याळ वापरत नाहीत आणि तरीही केवळ सूर्याच्या अथवा चंद्राच्या स्थितीवरुन अचूक वेळ सांगतात. ही आहे हिंदूंची कालमापनपद्धती. जे तिथीला मानत नाहीत आणि ज्ञान केवळ ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते अशी फेकाफेक करतात, त्यांनी एकवार आपल्या आजोबांना अथवा आजीला याबद्दल चौकशी करावी. ते सांगतील ही कालमापनपद्धती प्रत्येक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात कशी वापरायचा ते. आणि ती सगळ्या जातीवर्णांच्या अगदी सामान्य माणसापर्यंत पोहोचवली गेली होती, यावरुनच हिंदूंना संशोधनाच्या दृष्टीने कालगणना किती अत्यावश्यक वाटत असे हे समजते.
प्रत्यक्षात इंग्रजांनी आमचं उपरोल्लिखित रोजच्या आयुष्याला पूरक असं सकस शिक्षण बंद केलं आणि त्याऐवजी त्यांच्या कारभाराला सोयीचं असं कारकूनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. याचाच परिणाम आजही दिसतो की, एखादी व्यक्ती शिकलेली असली म्हणजे तिला अक्कल असेलच याची आजही खात्री देता येत नाही. यांच्यापेक्षा आमच्या रुढार्थाने कमी शिकलेल्या सिंधूताई सपकाळ जास्त सुशिक्षित वाटतात की मग!! असो. तर त्याचसोबत इंग्रजांनी आमची विज्ञाननिष्ठ कालमापनपद्धती नष्ट करुन सगळीकडेच त्यांची अवैज्ञानिक आणि अपूर्ण कालमापनपद्धती लागू केली. मी मुद्दामच विज्ञाननिष्ठ आणि अवैज्ञानिक असे दोन शब्द वापरतोय. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. विज्ञानानुसार काळ ही एक मिती आहे. आणि म्हणूनच ती नेहमीच सापेक्ष असते. त्यामुळेच आपण काळ मोजण्यासाठी जितकी अधिक परिमाणं आणि संदर्भ लावू तितका तो अचूक येतो. इंग्रजांच्या मुळात कॅलेंडरमध्येच ग्रेगोरियन आणि ज्युलियन असे घोळ. त्यातून दिवसांचा होणारा बेहिशोब कसाबसा सावरण्यासाठी दर महिन्याआड १ दिवस वाढवणं आणि फेब्रुवारीत कधी १ तर कधी २ दिवस कमी करणं अशी बनवाबनवी आहेच. इतके करुनही ह्या कॅलेंडरमध्ये महिना, तारीख आणि वर्षच तेवढे समजते आणि घड्याळात केवळ तास, मिनिटे व सेकंद. याउलट हिंदू पंचांगाच्या नावातच त्याचा अर्थ दडलाय. पंच अंग म्हणजे पाच अंगे. कोणकोणती पाच अंगे? तर तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. प्रत्येक दिवसाला ही पाच परिमाणे लावली जातात, तेव्हा कळणारा काळ हा इंग्रजी कॅलेंडरपेक्षा केव्हाही जास्तच अचूक असतो. शिवाय प्रहर, घटीका, पळे इ. तर वेगळेच!!
लक्षात घ्या, इथे फक्त रोजच्या जीवनातलं कालमापन तेवढं घेतलंय. याहून खोलात गेलो तर फारच धक्कादायक निष्कर्ष निघतात. भागवतपुराण हे अतिशय प्राचीन आहे. आपल्या सवयीप्रमाणे सारे काही शक्यतो बायबलच्या नंतरचे ठरवायचे ह्या अट्टाहासापायीदेखील पाश्चिमात्त्यांना त्याचा काळ सहाव्या शतकाच्या पुढे ओढता आलेला नाही. ह्या भागवतपुराणाच्या ३ऱ्या स्कंधाचा ११वा अध्याय वाचा. कालमापनाची परिमाणे दिली आहेत त्यात. सगळ्यात सूक्ष्म परिमाण सांगितलेय परमाणू. सगळ्यात मोठे सांगितलेय ते श्रीहरिचा एक निमेष अर्थात हरिनिमेष. संपूर्ण अध्यायच सूक्ष्मापासून जडापर्यंत काळ कसा मोजायचा हे स्पष्ट करण्यासाठी वाहिला आहे. मी यावर पूर्वी गणित केले होते. जोडीला एक संगणकतज्ञ मित्र त्याच्या अत्याधुनिक संगणकासह मदतीला होता. गंमत काय झाली? सगळ्यात सूक्ष्म काळ मोजताना आणि सगळ्यात मोठा काळ मोजताना, दोन्ही वेळेस त्याचा अत्याधुनिक संगणक ताण सहन न होऊन अक्षरश: बंद पडला!! याचाच दुसरा अर्थ असा की, गोऱ्या चमडीला ज्याकाळी चमडी झाकण्यासाठी झाडाच्या साली गुंडाळण्याइतकीसुद्धा अक्कल आली नव्हती, त्याकाळापासून आपण अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्मापासून मोठ्यातमोठ्या काळापर्यंत अचूक कालमापन करतो आहोत. अहो, येत्या गुढीपाडव्याला युगाब्द किती सुरु होतोय माहितीये? ५११९! यावरुन दिसते की, आज जे कॅलेंडर वापरतो ना आपण, त्याच्या किमान ३००० वर्षे आधीपासून आपण रोजच्या आयुष्यात कालगणना करतोय.
-- विनय
राजकारणातील सर्व थोर इशू सम्राटांना समर्पित!
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला.
बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केले.प्रयत्नशिल व वैचारिक चळवळ सुरु करुन त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले. त्या निमित्ताने हा विशेष लेख . . . .
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधित महाराष्ट्राच्या जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजाचा विकास केला. त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे प्रवर्तक म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.
मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून “दर्पण” पत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे. दर्पण हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. त्यांनीच १८४० मध्ये दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढले. बाळशास्त्री जांभेकर यांचा लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हाच हेतू ,या उपक्रमांमागे होता.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात केले.
विलक्षण जीवन कहाणी -
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी १८१२ मध्ये बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला.. अज्ञान,दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन १८२५ मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३० मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन १८३१ मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पत्राची मुहूर्तमेढ रोवली.
मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन १८३४ मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक ( “प्रोफेसर”) होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन १८४५ मध्ये राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन व विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी तेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.
अष्टपैलू व्यक्तिमत्व -
आचार्य बाळशास्त्रीं जांभेकर यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी व विदेशी ९ भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषांचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासविषयात भाषाशास्त्रे, इतिहास व संस्कृती, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविद्या इत्यादीचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली.
त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते व त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे.डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विदवत्तेचा गौरव केला होता.
भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे, ते पश्चिम भारत खंडातील अर्वाचीन विव्दान मुकुटमणी, प्रख्यात पं. अव्दितीय विव्दान होते. “मुंबईना समाचार” या गुजराथी पत्राने या शिक्षण महर्षींची स्मृती भारतीयांनी सतत जागृत ठेवावी असे आवाहन केले होते. १७ मे १८४६ रोजी जांभेकरांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण अल्पावधित त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले.
समाजसुधारक चळवळीचा आदर्श -
प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली !
राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे ते भारुन जाऊन जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला व तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ जांभेकरांनी गिरविला व त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा - जमनी व्दैभाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली. अशा या थोर आद्य पत्रकारास आपले लाख, लाख प्रणाम !
Copyright © 2025 | Marathisrushti