वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पहिली ते आठवीपर्यंत ढकलगाडी आता थांबण्याची सुचिन्हे दिसत आहेत. परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या सातत्याने पुढे येणाऱ्या मागणी मुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या समितीत तावडे यांच्यासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तमिळनाडू या राज्यातील प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल बुधवारी मंत्रालयाला सादर केला. सध्याच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुरू करण्यात यावी. या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला एक महिना उजळणीसाठी देऊन त्याची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. पुन:परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात प्रवेश द्यावा. मात्र पुन:परीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच्याच इयत्तेत ठेवण्यात यावे, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या बाबतीत पुढाकार घेतला आहे . या बाबतीत शिक्षण मंत्री विनोद तावडे योग्य दिशेनी जात आहेत . गुणवत्तेला पर्याय असूच शकत नाही हे लक्षात आले हे बरेच झाले. अगदी लहान पणा पासून मुलांना तसेच शिक्षकांना आणि पालकांना परीक्षे बाबत बेदरकार बनवणा-या या धोरणाला तातडीने बदलले पाहिजे अशी मागणी अनेक शिक्षक करत होते .
तावडे योग्य दिशेनी जात आहेत. अभिनंदन !!!!!!
-- चिंतामणी कारखानीस
December 31, 2015
हि भाजी सर्व महाराष्ट्रभर आवडीने खातात व हि भाजी पथ्याची म्हणून देखील प्रसिद्ध आहे.ह्याचे रोप हातभर उंच असते.
हि चवीला गोड खारट व थंड असते.त्यामुळे ही शरीरातील वात व पित्त कमी करते.
आता आपण ह्याचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहूयात.
१)ताप उतरल्यावर ह्या भाजीचे सूप त्या व्यक्तीला दिल्यास त्याची भूक वाढते.
२)मुळव्याध असणार्या व्यक्तिंने हि भाजी गव्हाचे फुल्के व कारल्याच्या चटणी सह खावी त्यामुळे संडास साफ व मऊ होतो.
३)लघ्वीची जळजळ होत असल्यास धणे,जीरे घालून चाकवत भाजीचे सुप करून प्यावे.
४)कावीळ झालेल्या व्यक्तीला ही भाजी खायला देतात त्यामुळे संडास वाटे खराब व वाढलेले पित्त पडून जाते व कावीळ उतरायला मदत होते.
५)विद्यार्थी किंवा बुद्धिजीवी लोक ज्यांच्या बुद्धीवर प्रचंड ताण असतो त्यांनी लक्षात नीट रहाण्यासाठी रात्री झोपण्या आधी १/४ कप चाकवताचा ताजी रस+ १ चमचा मध हे मिश्रण १५ दिवस सलग घ्यावे फायदा होतो.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 19, 2016
ज्या काँक्रीटमध्ये पोलादी सळ्या वापरतात, त्याला ‘सलोह काँक्रीट’ अथवा ‘आरसीसी’ म्हणतात. काँक्रीट ठरावीक मर्यादेपर्यंतचा दाब सहन करू शकते. इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट दर चौरस सेंटीमीटरला साधारणपणे २०० किलोग्रॅम वजनाचा दाब सहन करू शकते, पण काँक्रीटची कांडी बनवून तिला दोन्ही टोकाकडून ताण दिला तर ती दर चौरस सेंटीमीटरला ५ किलोग्रॅमएवढ्या वजनालाही तुटू शकते. म्हणजेच काँक्रीटमध्ये दाब सहन करायची ताकद चांगली आहे, पण ताण सहन करायची ताकद नाही.
January 31, 2023
संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा....
घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये
-- संजय कान्हेरे
July 11, 2017


देशाची सार्वभौमता अखंड राखणे ही कोणत्याही देशाची सर्वाधिक प्राथमिकता असते. ही अखंडता कायम ठेवण्यासाठी केवळ लष्करानेच दक्ष राहून चालत नाही आणि अलीकडील काळात तर लष्करापेक्षा राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनतेनेच आपल्या देशाची सार्वभौमता अक्षय राखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. लष्करी आक्रमण करून एखादा देश पादाक्रांत करणे आज जागतिक स्तरावरील बदलत्या परिमाणाच्या पार्श्वभूमीवर अगदीच अशक्य आणि कालबाह्य ठरले आहे.
November 24, 2002
भारताचा माजी हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ या मैदानास ध्यानचंद स्टेडियम असे नाव देण्यात आले. ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हॉकी प्रमाणेच क्रिकेट सामन्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
July 16, 2023
डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.
डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.
१. रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
२. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटिऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
३. फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
४. पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
५. डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
६. वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
७. खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
८. डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
९. मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
१०. डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
११. कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
१२. वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
१३. कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
१४. डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.
April 7, 2017
मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले. त्यामळे पुढे काय होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. पण एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता चव्हाणांची गच्छंती लांबणीवर पडल्याचे दिसते. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशीसाठी लागणारा वेळ आणि ओबामांचा मुंबई दौरा लक्षात घेऊन चव्हाणांना तूर्तास मुदतवाढ मिळाली आहे.
November 3, 2010
स्वस्त्यात पुस्तक ही काय मला सुवर्णसंधी वाटत नाही आणि उगाच माफक किॅमतीत पुस्तक मिळतंय म्हणून पुस्तकं घेणं आणि शोपीस म्हणून घरात ठेवणं हे ही मला पटत नाही. तरीही मी अशा पुस्तक प्रदर्शनात जात असतो. न जाणो एखादं उत्तम जुनं पुस्तक सापडूनही जाईल म्हणून.
December 3, 2018
मैं तेरा साल से अंदर हूं। इस दौरान मेरे मां – बाप चल बसे। मैं अंदर आया तब मेरा बच्चा केवल दो महिने का था। बहूत भुगत चुका, अब सीधी साधी जिंदगी बिताना चाहता हूं जजसाब, अल्लाह के बाद सिर्फ आप पर ही भरोसा है। आशा करता हूं आप नाउम्मीद नही करेंगे!’ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एका आरोपीने गुन्हा सिद्ध झाल्यावर आपली कैफियत न्यायाधीशांसमोर मांडली. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जन्मठेप किंवा फाशी होणार हे निश्चित झालेल्या आरोपीचे ते वत्त*व्य होते.
September 10, 2006
Copyright © 2025 | Marathisrushti