(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पंचाच्या कुटुंबाला प्रसाद नि हेडिंग्लेवरील चमत्कार

    हेडिंग्लेवर एक चमत्कार. वसिम अक्रमचा चेहरा धूमकेतूच्या शेपटाने माऊन्ट एव्हरेस्टला धडकून जाण्याची घटना नुकतीच पाहिल्यासारखा झाला होता. तब्बल सहा वर्षांच्या अंतरानंतर इंग्लिश कप्तान माईक आथर्टनने कसोटी सामन्यात चेंडू टाकण्यासाठी हात फिरवला होता…

      August 11, 2010


  • नसेल स्पर्धा तर माणूस ‘अर्धा’

    आजचे युग स्पर्धेचे युग आहे असे नेहमी म्हटले जाते. पण मला ते तितकेसे पटत नाही. स्पर्धा हा काही केवळ आजच्या युगाचाच युगधर्म नाही. तर स्पर्धा हा निसर्गचक्राचाच अविभाज्य घटक आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून स्वतःचे अस्तित्व राखण्याच्या स्पर्धेत अवघी सजीव सृष्टी धडपडताना दिसते. जे या स्पर्धेत यशस्वी झाले ते टिकले आणि मागे पडले ते नामशेष झाले. “सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट” या तत्वातून हीच गोष्ट तर स्पष्ट होते. -डायनॉसोरसारखे अजस्त्र, महाकाय प्राणी नष्ट झाले पण डासांसारखे बचावले कारण अस्तित्व टिकविण्याच्या स्पर्धेत ते यशस्वी झाले. एकाच जागी उभी राहून वाढणारी झाडेसुद्धा अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी एकमेकांपेक्षा उंच वाढण्याची स्पर्धा करतात मग अशा सर्वव्यापी स्पर्धेपासून मानवी जीवन मुक्त कसे असेल?

    स्पर्धा ही वैश्र्विक चैतन्याचे प्रतिक आहे असे मला वाटते. गुणवत्ता यादीत येण्यासाठी झटणारे विद्यार्थी, वर्ल्डकप मिळवण्यासाठी क्रीडागंणावर झुंजणारे विविध देशाचे क्रिकेटचे संघ, आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनाचा खप वाढावा म्हणून परिश्रम करणारे उद्योजक. चित्रपटसृष्टीतील आपले आघाडीचे स्थान अबाधित रहावे म्हणून धडपडणारे सिनेस्टार्स इतकेच काय ९.५२ च्या लोकलमध्ये विंडोसीट पकडण्यासाठी धावपळ करणारा सामान्य माणूस देखील या चैतन्याचा भाग आहे. जे पुढे जाते ते जीवन आणि पुढे जायचे म्हणजे स्पर्धा आलीच म्हणून तर शिक्षण, राजकारण, कला, क्रीडा, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात स्पर्धा आढळते आणि ती असायलाच हवी. ती जर नसेल तर एक प्रकारचे साचलेपण येउन त्या क्षेत्रावर मरगळ पसरेल.

    स्पर्धा म्हणजे चालना. स्पर्धा म्हणजे गती. प्रगती साधण्यासाठी गती अनिवार्य असते. पण ही गोष्ट लक्षात न घेता अनेकजण स्पर्धेचा विनाकारण बाऊ करतात. स्पर्धेमुळे निर्माण होणारी चुरस गतीला पूरक, पोषकच असते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किमान गुणवत्ता जोपासणे आवश्यकच असते. .आणि स्पर्धेत आघाडी मिळविण्यासाठी कमाल गुणवत्ता राखणे अपरिहार्यच असते. म्हणजे त्या त्या क्षेत्रातील सेवा, उत्पादनाचा दर्जा राखण्यात आपोआपच ढिलाई येते. आणि समाधान होत नसतानाही नाईलाजाने समाज ती सेवा ते उत्पादन स्वीकारतो. पण संधी मिळताच अशा उत्पादनाकडे पाठ फिरवतो. दूरध्वनी सेवेबाबतचा अनुभव याबाबत पुरेसा बोलका आहेच.

    इतरांपेक्षा अधिक चांगले असे काही करून दाखविण्याची भावना स्पर्धेमुळे निर्माण होते. ही भावनाच विकासाची वाट दाखवते. काही जणांना असे वाटते की, स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होतो. त्यांची शक्ती स्पर्धेत अनाठायी खर्च होते. विशेषत: मार्कांची संधी - गुणवत्ता यादी - विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. असा विचार करणाऱ्यांना स्पर्धेचे तत्व उमगलेले नाही असे मला वाटते. स्पर्धा कोणाबरोबर आणि कशासाठी याचे भान जरुर राखायला हवे. प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ शकणार नाही. पण प्रत्येकाने त्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न केले तर त्याची कामगिरी निश्चितच सुधारेल. धावण्याच्या स्पर्धेत फक्त तीन खेळाडूच पुरस्कार प्राप्त ठरतात म्हणून इतरांनी स्पर्धेत भाग घ्यायचाच नाही किंवा स्पर्धाच भरवायची नाही हा विचारच अपरिपक्व आहे. स्पर्धेचे दडपण आणि त्यातून येणारा ताण काहीवेळा विद्यार्थ्याच्या बाबतीत अनुभवायला मिळतो खरा पण त्याला पालकांचा दुराग्रह, अवाढव्य अपेक्षा असे इतर घटकच जास्त जबाबदार असतात. आपल्या मुलांची शारीरिक, बौद्धिक क्षमता ओळखण्याची कुवत पालकांमध्ये नसेल तर त्याचा दुष्परिणाम मुलांवर निश्चित होतो. पण दोष मात्र स्पर्धेवर ढकलला जातो.

    म्हणून आपली स्पर्धा कोणाबरोबर आहे हे ओळखणे जरुरीचे आहे. तुल्यबळ स्पर्धकांमध्येच खरी स्पर्धा रंगत असते. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्या क्रिकेट संघात स्पर्धा संभवतच नाही कारण दोन्ही संघाच्या गुणवत्तेत अफाट फरक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या दृष्टीने बांगला देशचा संघ स्पर्धकच नाही. पण बांगला देशच्या संघासाठी मात्र वेगळया अर्थाने स्पर्धा आहे - ऑस्टेलियाविरुद्ध याआधी केलेल्या खेळापेक्षा जास्त चांगला खेळ करून दाखवण्याची स्पर्धा आणि हीच स्पर्धा त्यांच्या खेळांचा दर्जा उंचावयाला मदत करणारी ठरेल. म्हणजे स्पर्धा नेहमी इतरांशीच असते असे नाहीतर कधीकधी ती स्वत:शी देखील असते. आणि अशी स्वत:शी 'असलेली स्पर्धा हीच सर्वोकृष्ट
    स्पर्धा असते. इथे तुम्हाला ज्याच्यावर मात करायची त्याची बलस्थाने आणि कमजोर जागा पूर्ण माहीत असतात. त्यामुळे कमजोर जागा नष्ट करून स्पर्धा जिंकण्याची संधी तुम्हाला सहज उपलब्ध असते. या संधीचा जे फायदा घेतात ते आपोआपच इतरांबरोबरच्या स्पर्धेत पुढे येतात.

    स्पर्धा मग ती स्वत:शी असो की इतरांशी, त्यात भाग घ्यायचा तो जिंकण्यासाठीच. पण अपेक्षित यश मिळाले नाही तर नाराज, निराश व्हायचे नाही. मिळालेल्या अनुभवातून शहाणे होऊन अधिक जोमाने पुढल्या स्पर्धेची तयारी करायची. यश मिळण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब मात्र कधीच करू नये. स्टिरॉईड घेऊन एखादा धावपटू सुवर्णपदक मिळवू शकेल किंवा पेपर फोडून विद्यार्थी भरघोस मार्क मिळविलही पण हे यश निर्भेळ नसेल. शिवाय जगाला माहीत नसले तरी, त्यांच्या अंतर्मनाला नक्की माहीत असते की तो या यशाला खऱ्या अर्थाने लायक नाही. अशा फसवणूकीमुळे स्पर्धेचा हेतूच नष्ट होतो. गैरव्यवहार फोफावतात आणि खऱ्या गुणवत्ता धारकांवर अन्याय होतो.अशा अपप्रवृत्तीमुळे स्पर्धा बदनाम होते. ह्या अपप्रवृती दूर करून निकोप स्पर्धा जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्पर्धेची भीती न बाळगता, खुल्या दिल्याने आणि अथक परिश्रमांसह स्पर्धेला सामोरे जायला शिका. तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली स्पर्धेतच दडलेली आहे. तुमच्या गुणवत्तेला दाद स्पर्धेमुळेच मिळणार आहे तेव्हा स्पर्धेतील, जीवन जगा आणि जीवनाची स्पर्धा जिंका.

    -चिंतामणी कारखानीस

      December 16, 2015


  • “पाणवठा” जिथे माणुसकी सोबत प्राणुसकी नांदते.

    सावली गौरव सोहळ्याचा दिवस हा गणराज आणि डॉक्टर अर्चना यांच्या घरचा सोहळा असल्यासारखा वाटत होता. अर्चनाजी म्हणाल्या सुद्धा, आर्थिक विवंचना रोजची असतेच पण या दिवशी मात्र आम्ही आणि आमचा संपूर्ण पाणवठा परिवार एका वेगळ्याच आनंदात विहार करत असतो.

      September 12, 2022


  • जागतिक हास्य दिन

    जगातील कोणत्याही दोन हसणार्याम व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या, वयाच्या का असेना. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी साधन आहे असेही आपण म्हणू शकतो. नेहमी हसा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा……!!!!

      May 10, 2022


  • उकडीच्या मोदकांच्या निमित्ताने

    उकडीच्या मोदकांच्या निमित्ताने

    गणपती जेमतेम ६-७ आठवड्यांवर आलेत; उकडीच्या मोदकाविषयी कोणी काहीच न लिहिण योग्य दिसत नाही. ते खरोखर तोंडात पडण्यापूर्वी निदान थोडी वातावरण निर्माण करण गरजेच वाटतय.

      August 21, 2019


  • ब्रेक्झिट आणि केजरीवाल

    ‘ब्रेक्झिट’साठी जनमत घेतलें गेलें, आणि ब्रिटननें युरोपीय समुदायातून (EU) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तें होतांच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक पुकारा करूं लागले. ब्रेक्झिटचा आणि केजरीवाल यांचा संबंध काय, असा प्रश्न मनांत येणें स्वाभाविक आहे .

    तो संबंध आहे ‘जनमत’ हा. सध्या दिल्ली हें जरी ‘राज्य’ असलें तरी, तें इतर राज्यांसारखें पूर्णपणें स्वतंत्र राज्य नाहीं ; दिल्लीतील Law & Order हें केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. दिल्लीच्या राज्य- सरकारला कांहीं गोष्टींसाठी दिल्लीच्या लेफ्टिनंट-गव्हर्नरची परवानगी घ्यावी लागते ; दिल्लीचे पोलिस केंद्राच्या गृह-मंत्रालयाच्या एकप्रकारें आधीन आहेत. केजरीवालांचं दिल्ली-पोलिसांच्या मुख्याशी पटत नाहीं ; केजरीवाल यांचें दिल्लीच्या लेफ्टिनंट-गव्हर्नरशी पटत नाहीं, केजरीवाल यांचें केंद्राच्या गृहमंत्रालयाशी पटत नाहीं. नुसतेंच या सर्वांशी पटत नाहीं असें नव्हे, तर संघर्ष आहे. केजरीवाल हे म्हणताहेत की दिल्लीला संपूर्ण statehood मिळालें पाहिजे , म्हणजे सगळें राज्य-सरकारच्या अखत्यारीत येईल. दिल्लीच्या इलेक्शनमध्ये AAP ला मोठें बहुमत मिळालें आहे. त्यामुळे, आतां ‘ब्रेक्झिट’च्या धर्तीवर, दिल्लीला संपूर्ण ‘स्टेटहुड’ मिळावें यासाठी, referendum, जनमत, घ्यायला हवें अस प्रचार केजरीवाल करत आहेत . तसें झाल्यास , आपल्या मताला बहुमत मिळेल, अशी त्यांना कदाचित खात्री वाटत असावी.

    अमेरिकेतही (USA) राजधानी वॉशिंग्टन डी.सी. हें शहर क्रेंद्राच्या ( फेडरल सरकारच्या) अखत्यारीत आहे. तेथेंही कांहीं नेते, त्या शहरासाठी ‘स्टेटहुड’ची मागणी करताहेत, पण तेथील फेडरल सरकारनें अजून तरी त्यांना दाद दिलेली दिसत नाहीं. भारत सरकारनेंही ही गोष्ट ध्यानात ठेवावी, आणि दिल्लीची सुरक्षा या विषयावर अजिबात compromise करूं नये.

    केजरीवालांची AAP जेव्हां इलेक्शनसाठी उभी होती, तेव्हांही त्यांना दिल्ली राज्याचें ‘स्टेटस’ काय आहे, हें पूर्णपणें ठाऊक असणारच. त्यांनी ‘दिल्लाला संपूर्ण राज्याचा दर्जा हवा’ या प्रश्नावर निवडणूक लढवली असती , व त्या मुद्द्यावर त्यांची पार्टी जर बहुमतानें निवडून आली असती, तर मग , हा प्रश्न धसास लावण्यासाठी केले त्यांचे प्रयत्न , ‘योग्य प्रयत्न’ या सदरात मोडले असते. पण एखाद्या प्रश्नाची आधीच माहिती असणें , व ती प्रत्याप्रक्षरीत्या स्वीकारणें, आणि नंतर जनमताचा आग्रह धरणें कितपत योग्य आहे , खास करून ‘ब्रेक्झिट’चें उदाहरण देऊन ?

    मात्र प्रत्येक गोष्टीसाठी जनमत घ्यायलाच हवें, असें नाहीं ; खास करून प्रश्न जेव्हां सुरक्षेशी संबंधित असेल तेव्हां. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तेथें आपली पार्लियामेंट आहे, व राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेकानेक महत्वाच्या व्यक्ती तेथें रहातात, परदेशीय वकिलाती तेथें आहेत. म्हणूनच, दिल्लीची सुरक्षा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतच असली पाहिजे, राज्य सरकारच्या नव्हे. आणि, या गोष्टीचा संबंध केवळ सिक्युरिटीशीच संबंधित आहे, आणि, असायला हवा ; केंद्रात कोणाचें व दिल्लीत कोणाचें सरकार आहे, या प्रश्नाशी तो अजिबात निगडित नाहीं, आणि नसावाही.

    केजरीवाल यांचा व माझा कांहींच संबंध नाहीं ; आणि बादरायण संबंध जोडायचा असलाच तर, आम्ही दोघेही आय्. आय्. टी. खरगपुरचे विद्यार्थी आहोत , एवढाच तो आहे. पण मी त्यांना ( आय्. आय्. टी. मधून पास कधी झालो, या निकषावरून) बराच सीनियर आहे ; त्यामुळे त्यांचा माझा तेथेंहीं संबंध येण्याची सुतराम् शक्यता नव्हती. तसेंच, मी AAP चाच काय, कुठल्याही राजकीय पार्टीचा सभासद नाहीं. हे सर्व सांगायचा हेतू इतकाच की, माझें वरील analysis हें केवळ तर्काधिष्ठित आहे, त्याचा संबंध देशाच्या राजधानीच्या सुरक्षेशी आहे, अन्य कशाशीही नाहीं.

    ‘दिल्लीला संपूर्ण स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे न देणे’ या प्रश्नाचे राजकीय व अन्य पैलू तपासणें हा या लेखाचा उद्देश नाहीं. मात्र, ब्रिटनमधील ‘ब्रेक्झिट’साठीचें जनमत, हें दिल्लीसाठी योग्य उदाहरण, किंवा precedent, असूंच शकत नाहीं. देशाच्या राजधानीच्या सुरक्षेचा विचार करून, इतकें नक्कीच वाटतें की, केंद्र सरकारनें कोणाच्याही कसल्याच दबावाला बळी पडूं नये, व दिल्लीची सुरक्षा-व्यवस्था स्वत:च्याच हातात ठेवावी.

    -- सुभाष स. नाईक.

      June 25, 2016


  • “औषधी गर्भसंस्कार” : काळाची गरज

    निरोगी समाज निर्माण करणे ही आपल्यासमोरील सद्यपरिस्थितील एक अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी ‘औषधी गर्भसंस्कार’ ही काळाची गरज आहे!!!

      September 17, 2014


  • नखांची स्वच्छता

    निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्‍या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना नखांची चांगली स्वच्छता करावी. जेवण्यापूर्वी किंवा कोणताही खाद्यपदार्थ हातात घेण्यापूर्वी हात नखांपासून स्वच्छ धुवावेत. नखंवर कोणतेही पॉलिशिंग रंग, चकमक आदी आर्टिफिशल्स शक्यतो वापरू नयेत. पोटाचे व आतड्याचे आजार इन्फेक्शन आदींपासून बचाव होतो.

      December 16, 2015


  • श्यामला गोपीनाथ – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

    श्यामला गोपीनाथ ह्यांचा  जन्म २० जून १९४९ रोजी झाला  ह्या  बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कर्जदाता असलेल्या एचडीएफसी बँकेची अध्यक्षा आहेत सुश्री गोपीनाथ ह्या  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या माजी डेप्युटी गव्हर्नर आहेत , त्यांनी हे पद सात वर्षे भूषवले.

      September 13, 2025


  • आज जडी-बूटी दिवस

    आज जडी-बूटी दिवस

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती.

      August 4, 2018