(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पित्ता’वर विजय मिळवा घरगुती उपचारांनी !

    अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे .......

    1) आरामदायी केळं :
    केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.
    - पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.

    2) फायदेशीर तुळस :
    तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते.
    – तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .

    3) अमृतरुपी दुध :
    दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.
    – दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.

    4) बहुगुणी बडीशेप:
    बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.
    – बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

    5) पाचक जिरं :
    जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .
    – जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.

    6) स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग :
    लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात.
    - जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.

    7) औषधी वेलची:
    आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.
    - पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .

    8) वातहारक पुदिना :
    पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते .
    - पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.

    9) आल्हाददायक आलं :
    आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.
    - पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ टाकून चुपत रहा.

    10) पित्तशामक आवळा :
    तुरट , आंबट चवीचा आवाळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील ‘व्हिटामिन सी’ , अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते .
    -रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .
    - कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.

      March 5, 2017


  • अपभ्रंश आणि भ्रम!

    एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना परोपकाराची महती पटवून देताना इतरांना आपण कशा-कशाप्रकारे मदत करू शकतो, याची अनेक उदाहरणे सांगितली. बाळबोध विद्यार्थी ही महती ऐकून चांगलेच प्रभावित झाले. आपण परोपकार केलाच पाहिजे, असे त्या विद्यार्थ्यांच्या मनात ठसले.

      June 12, 2005


  • ‘चंद्रलेखा’चं ‘‘नटसम्राट’’ नाटक रंगमंचावर आलं

    या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता.

      May 27, 2022


  • जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने

    दर वर्षी ८ मार्चला सर्व जगभर जागतिक महिला दिन मोठया प्रमाणावर साजरा केला जातो पण महिलांचे सर्व प्रश्न सुटतात का?

      March 7, 2011


  • नाशिकचे ऐतिहासिक संग्रहालय

    प्रत्येक शहराला व गावाला एक ऐतिहासिक वारसा असतो. त्यातून त्या शहराचे ,गावाचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते. असे म्हणतात की नाशिक शहराचा इतिहास हा फार जुना म्हणजे ६० हजार वर्षापूर्वीचा आहे. या कालावधीतील काही महत्वपूर्ण इतिहास नाशिकच्या श्री व्यास रिसर्च सेंटरचे श्री दिनेश वैदय , श्रीदेवेन कापडणीस , श्रीमती अनिता जोशी यांच्या प्रयत्नामुळे एका छताखाली पहावयास‍ मिळणार आहे.. महापालिका , केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून जून्या पंपिंग स्टेशनच्या जागेत संग्रहालयाची उभारणी करण्यात आली असून नुकतेच नाशिकच्या इतिहास संग्रहालयाचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांची हस्ते संपन्न झाले.

    अश्मयुगातील रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले पौराणिक नाशिक, सातवाहन काळापासून मोगल, ब्रिटीशांच्या काळातील नाशिक ते आज प्रगतीकडे झेप घेणारे नाशिक शहर आणि जिल्हयाचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न साकार होत असून अशा प्रकारचे एका शहराचा समग्र इतिहास दाखविणारे हे देशातील पहिले संग्रहालय आहे.

    नाशिकच्या अस्तिवात प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत सतत कार्यरत आहे. संग्रहालयाकरिता नाशिकच्या इतिहासाचे उत्खनन करुन अनेक काळातील नाशिकचा शोध घेण्यात आले आहे.दोन लाख वर्षापासूनचा त्रोटक इतिहास असला तरी येथे त्याचा त्रोटक संदर्भ घेवून प्रत्यक्षात ६० हजार वर्षापूर्वीचे पुरावे देखील प्रतिकात्मक स्वरुपात मांडण्यात आले आहे.

    या सा-यांचा इतिहास संग्रहालयात आढळेल. या शिवाय ६० आसनी छोटा रंगमंच असून तेथे नाशिकच्या इतिहासाची माहिती देणारे अर्धातासाचे चार लघुपट दाखविण्याची व्यवस्था आहे. श्री व्यास रिसर्च सेंटरच्या वतीने हे संशोधन, संकलन करुन संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती दिनेश वैदय , देवेंद्र कापडणीस, अनिता जोशी यांनी दिली. १ कोटी ६७ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. यात पोस्टर्स, प्रतिकृती, पोथ्या, हस्तिलिखिते, छायाचित्रे, भांडी, शस्त्रे , म्युरल्स या माध्ययमातून हा इतिहास साकारण्यात येत आहे.

    नाशिकचा रंजक इतिहास

    • मुंबई आग्रारोड भारत आणि रोम यांच्यातील व्यापार मार्ग,
    • राघोबादादांच्या काळात नाशिकमध्ये मराठा चित्रशैली अस्तित्वात आली.
    • इंग्रजांनी तत्कालीन महाराष्ट्र जिंकला परंतु नाशिक जिंकण्यास एक महिना विलंब झाला.
    • वरी, पिवळा , वासुदेव, सहदेव –भाडळी या नाशिकच्या परंपरा आहे.
    • ज्योतिष्यशास्त्राची देखील नाशिककरांना समृध्द परंपरा आहे
    • तेलीगल्ली, पगडबंद लन ही बलुतदर पध्दतीमुळे पडलेली नावे.
    • गोवर्धनगाव होते धागा निर्मितीचे ठिकाण.
    • अंजेनेरीगाव होते एका राजधानीचे ठिकाण .

    संग्रहालयाची वैशिष्ट्ये

    या संग्रहालयात ६० हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडण्यात येत आहे. आदिवासीचे वादय, पोशाख, वासुदेव, नंदी, वीर, पिंगळा यांची मूर्ती संग्रहालयात ठेवण्यात येत आहे. नाशिक मधील हस्तलिखित भांडार, गणितापासून ते धर्मशास्त्रापर्यंतचे विषय, सात कालखंडात नाशिकचे बदलत गेलेली नावे. नाशिकचे रस्ते व त्यासंबंधीची बलुतेदारी, गल्ल्यांची नावे, प्रदर्शित करण्यात येत आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून नाशिकचा इतिहास सादर करण्यात येत आहे.

    या संग्रहालयात १२७ पिच्चर्स फ्रेम ,३५ मूर्ती, १७६ माहिती फ्रेम ,१८० नाणी, तलवार तसेच १४ पेटींग्ज लावण्यात आल्या आहेत.

    ऐतिहासिक माहिती जाणून घेणा-या इतिहास प्रेमींना या संग्राहालयाचा मोठया प्रमाणात फायदा होवून इतिहास प्रेमींना ही उत्तम मेजवानी आहे. तेव्हा इतिहास प्रेमींना नागरीकांनी आवश्यक या संग्रहालयास भेट दयावीच ….

    -- अशोक साळी, जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक
    मंगळवार, ५ जुन, २०१२
    ('महान्यूज' मधून साभार)

      November 16, 2012


  • टीम वर्क ऑनबोर्ड अ शिप

    जहाजावर मुख्यता दोनच टीम असतात एक डेक किंवा नेव्हिगेशनल टीम आणि दुसरी इंजीन टीम. जहाजाचा कॅप्टन हा जहाजावरील सर्वोच्च अधिकारी तर त्याखालोखाल चीफ इंजिनियर आणि मग क्रमाक्रमाने इतर अधिकारी डेक किंवा इंजीन टीम मध्ये असतात. जहाजाचा कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर होण्यासाठी सर्वात खालच्या स्तरापासून सुरवात करावी लागते.

      November 10, 2019


  • गोव्यातील वेलिंगचा ” लक्ष्मीनरसिंह “

    गोव्याच्या  माझ्या मित्राबरोबर त्याचे  कुलदैवत असलेल्या या मंदिरात नृसिंह जयंतीला जाण्याचा योग्य आला. खरोखरच डोंगरांच्या कुशीत आणि कांहीशा आडगावी वसलेले हे सुंदर मंदिर. खूपच प्रशस्त आणि निरव शांत परिसर आहे हा.

      August 27, 2017


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सहा

    आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात.

    बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, "नीट चावून चावून गिळा." यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत.

    हल्ली लहान मुलांचे दात लवकर किडतात, दोन वेळा ब्रश करूनदेखील दात किडतात, यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी बोटांचा वापर करणे, किंवा कडूनिंबाच्या काड्यांचे टोक चावून ब्रश तयार करून वापरणे आणि टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन वापरणे योग्य ठरेल. दात दोन वेळा घासले पाहिजेत. तसेच चुळादेखील नीट भरल्या पाहिजेत, म्हणजे दात लवकर किडत नाहीत. दंतमंजन गोड नको, फेस येणारे नको आणि नुसती पांढरी पावडर नको. किंचीत कडू, किंचीत तिखट किंचित तुरट असावे.

    प्रत्येकाच्या दातांची ठेवण वेगळी असते. पण काम एकच असते. अन्नाचे बारीक चूर्ण करणे. वरची किंवा खालची एक दाढ जरी पडली तरी त्या दाढेखाली येणारे अन्न भरडले जात नाही आणि तो तुकडा तसाच रहातो गिळला जातो आणि अपचन सुरू होते. त्यामुळे पचनाशी दातांचा संबंध देखील असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.

    किडलेल्या दात आणि दाढांवर वेळीच उपचार करून घ्यावेत. शक्यतो दात काढू नये. रूट कॅनाॅल सारखी पद्धत वापरून जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवावं. गडग्यातला एक दगड काढला तर बाजूचे दगड हलू लागतात आणि सर्व गडगा ढेपाळतो. (गडगा म्हणजे दगडाची भिंत जी, कुंपण म्हणून केली जाते.) किडलेला, हलणारा दात अथवा दाढ ही अपचनाची सुरवात असते. ती जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

    त्याने जी बत्तीशी दिलीय, ते काही तरी कारण असेल म्हणूनच दिलीय ना ! त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ते ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे खरे शिक्षण.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.03.2017

      March 21, 2017


  • जे भाग्य मजला लाभले

    माझ्या व्यावसायिक निवदेनाच्या कारकीर्दीची सुरुवातच मूळात ग.दि. माडगूळकरांसारख्या श्रेष्ठ कविवर्य गीतकाराच्या शब्दांच्या साथीनं झाली. कार्यक्रम होता ‘चैत्रबन’. श्रीधर माडगूळकरच्या दोस्तीमुळे, अण्णांच्या ‘पंचवटीत’ त्यांना थेट भेटण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच भेटीत अण्णांनी मला एक प्रवासवर्णनपर पुस्तक भेट दिलं. खुद्द अण्णांशी बोलून, त्यांचे लेखनिक बाळ बापट, तसेच सुधीर मोघे, बाबूजी, श्रीधर यांच्याशी गप्पा करता करता, गदिमांच्या गाण्यांमागच्या कहाण्या कळल्या आणि त्या कहाण्या संपादीत करत मी गदिमांच्या चित्रपटगीतांचं निवेदन केलं आणि टाळी मिळवली. पु. ल. देशपांड्यांच्या वाणी आणि लेखणीतून खरेखुरे कविवर्य ग. दि. माडगूळकर सोप्या शब्दात मनात रुजत गेले.

      January 6, 2026


  • पाकिस्तानमधला प्रवेश

    पाकिस्तानमधला प्रवेश

    अमेरिकेत पुन्हा जायला मिळेल न मिळेल, पण पाकिस्तानात पुन्हा जायला मिळालं तर मला ते आवडेल, असं मी पहिल्यांदा पाकिस्तानात जाऊन आलो तेव्हा म्हणालो होतो. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानात गेलो. गेलो हेही स्वप्न आणि परत आलो तेही स्वप्नच कारण एकाहून एक प्रसंगच जिवावर बेतणारे होते. पाकिस्तानातून परतलो हे सत्य, अगदी निखळ सत्य. अन्यथा पाकिस्ताननामा लिहायला माझी लेखणी शाबूत राहिली नसती.

      July 2, 2025