(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • दिशाहीन संवेदनशीलता!

    आमची संवेदनशीलता अशी दिशाहीन आहे. मनात क्रोध आहे, पण तो नको तिथे व्यक्त होणारा. मनात शांती आहे, परंतु ती सुध्दा नको तिथे आपले अस्तित्व दाखविणारी. मनात उत्साह आहे, पण तो भलतीकडेच ओसंडून वाहतोय. मनात देशभक्ती आहे, पण ती केवळ भक्ती म्हणून उरली आहे. देश कुठेतरी गहाण आहे.

  • आता उरले लुटण्यापुरते

    पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही. नारदमुनींनी लगेच त्या वराहाला स्वर्गसुखाची अनुभूती द्यायचे ठरवले आणि स्वत:बरोबर स्वर्गात येण्याची विनंती केली.

  • केवळ उत्सवप्रियताच!

    मनुष्यप्राण्याची आणि त्यातही आपल्या देशातील मनुष्यप्राण्याची काही खास वैशिष्ट्ये सांगायची असतील तर त्यात ‘उत्सवप्रियता’ या वैशिष्ट्याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. साजरा करणे या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या या देशातील लोकांनी अगदी नको त्या गोष्टीला नको तितके महत्त्व देऊन उत्सवाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे अगदी वैयक्तिक किंवा खासगी स्वरूपात साजरी करण्याची बाबसुद्धा सार्वजनिक होऊन गेली आहे.

  • सैनिकांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या सुमेधाताई

    आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यासाठी झगडावं लागलं नाही. मात्र, मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून आपण कायम प्रयत्न करतो. खासकरून सीमारेषेवर तैनात असलेले सैनिक भारताचं रक्षण करतात, स्वातंत्र्य जपतात. मग ह्या सैनिकांसाठी काय करता येईल हा विचार सुमेधाताई चिथडेंच्या मनात आला आणि त्यांनी सियाचीन ह्या जगातील सर्वात उंच रणभूमीवर सैनिकांसाठी ऑक्सीजन प्लँट उभा केला. कारण शत्रूपासून कायम धोका असलेल्या सियाचीनमध्ये ऑक्सीजन नाही. त्याची उंची इतकी जास्त आहे की तिथे सज्ज असलेल्या सैनिकांना प्राणवायू मिळत नाही. म्हणून सुमेधाताईंनी तिथे ऑक्सीजन प्लँट उभा करून दिला.

  • फंडा ब्रँड एंडोर्समेंटचा

    टीव्ही लावला की प्रत्येक वाहिनीवर एखादा तरी लोकप्रिय कलाकार किवा क्रिकेटपटू विशिष्ट ब्रँडची जाहिरात करताना दिसतो. सेलिब्रिटीजची हीच प्रसिद्धी उत्पादन लोकप्रिय करते. ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कलाकारांची अटीतटीची स्पर्धा सुरू असते. अशा जाहिरातबाजीचा फंडा अर्थविश्वात अनेक तरंग उमटवत असून त्यातून भले मोठे अर्थकारण आकाराला आले आहे. वलयांकित व्यक्तिमत्वाच्या या अर्थकारणाचा खास वेध.

  • गॉडफादरच्या शोधात…

    सध्या राज्याच्या राजकारणात गॉडफादरची चर्चा रंगली आहे. चित्रसृष्टीत गॉडफादर असल्याशिवाय काम होत नाही हे माहीत होते पण, राजकारणात ही त्रुटी तीव’तेने जाणवत असेल असे वाटले नव्हते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ही गरज नुकतीच बोलून दाखवली आणि राज्याची राजकीय पृष्ठभूमी चांगलीच थरथरली.

  • मूर्ख आणि शहाणे! शिका!

    समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

  • ब्रेक !

    ब्रेक !

    गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.

  • chk-आम्ही मागे का?

    आधुनिक काळात जगाची विभागणी प्रामुख्याने तीन गटात केली जाते. विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसित राष्ट्रांची संख्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य असली तरी संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या या मुठभर राष्ट्रांचेच वर्चस्व आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.

  • जिंदगी का सफर

    जिंदगी का सफर

    जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.