वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शिक्षण कशासाठी घ्यायचं तर नौकरी मिळवण्यासाठी, नौकरी कशासाठी तर चांगली बायको मिळण्यासाठी ही सध्याची परिस्थिती आहे.
जी मुलगी आणि तिचा बाप म्हणतो की मुलगा हवा तर Gov. नौकरीवाला , आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे मुलगा नौकरी वाला हवा पण मुलगी तरी नौकरीवर आहे का?
सगळे जर नौकरी करू लागले तर व्यवसाय कोण करतील, उद्योगधंदे कोण चालवतील, इतर व्यवस्था कशी चालेल.
एक पुस्तक वाचत होतो त्याच नाव आहे Rich that man poor that man" खूप छान पुस्तक आहे त्यात एक उदा. दिलं आहे की एक Gov नौकरी करणारा आणि एक व्यावसायिक यांचं मासिक उत्पन्न सांगितलं आहे, Gov नौकरी करणाऱ्याला महिन्याचा 30 हजार मिळतो तर व्यावसायिकाला दर दिवसाला 300 रु.मिळतात पण ते दुसऱ्या दिवशी दुप्पट होत असतात.आता हे कसे तर gov जॉब करणाराही 8 तास काम करतो पण त्याला जॉबवर ठेवणारा व्यक्तीही 8 तास काम करतो दोघांकडे वेळ सारखा पण व्यावसायिक मात्र असे 8 तास काम करणारे बरेच व्यक्ती ठेवतो आणि सगळ्यांपेक्षा जास्त Income कमावतो.
फक्त आपली विचारशक्ती बदला, ज्या क्षेत्रातही काम कराल ते असं करा की तुमच्यासारखा कोणताच व्यक्ती ते करू शकत नाही, " दुनिया झुकती है बस ऊसे झुकानेवाला चाहिये" जर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी इ.हे तर खूप मोठे नाव झाले असेल याहीपेक्षा एक जळगावचा माझा मित्र अविनाश (MBA) फॉरेन मधून चांगली नौकरी सोडून इथे महाराष्ट्रात शेळ्यापालनाचा व्यवसाय करतो आणि शानने BMW गाडीत फिरतो, म्हटलंन आधीच कि सोच बदलो जिंदगी बदल जायेगी,
स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र सगळ्यांनाच जॉब देऊ शकत नाही, वेळ गेल्यावर हात हालवण्यापेक्षा वेळेआधीच जागे व्हा, आणि पालकांनो तुम्ही सुद्धा तुमचे विचार बदला,तुमच्या मनातील भूत बाहेर काढा, मुलांना समजून घ्या.
"तुम बदल गये तो सारी दुनिया बदल जायेगा
-- प्रा. हितेशकुमार एस. पटले
May 16, 2017
न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 4
ज्या पाण्याला गती नाही, त्या पाण्यावर शेवाळ धरते. बुळबुळीतपणा वाढतो. साठण्याची प्रक्रिया वाढली कि, कुजण्याची क्रिया सुरू होते. कुजणे म्हणजे बुडबुडे येणे. असे आपोआप बुडबुडे येणारे पाणी पचायला जड असते. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे जंतुनिर्मिती. जंतु पाण्याशिवाय वाढू शकतच नाहीत.
म्हणजेच जिथे जंतु असतात, तिथे फरमेंटेशन सुरू असते. जिथे फरमेंटेशन असते तिथे पाणी असते. जे पाणी स्थिर असते तिथे जंतुसंसर्ग आणि फरमेंटेशन सुरू होते. म्हणजेच स्थिर असलेले पाणी पिऊ नये. स्थिर पाण्यात शेवाळ धरते असे म्हणतात. प्रत्यक्षात तसेच दिसते. समुद्राच्या किंवा नदी, धबधब्याच्या हलणाऱ्या पाण्यात शेवाळ धरत नाही. पण तलावाच्या काठाला शेवाळ आढळते.
फेस आलेले पाणी पिऊ नये असेही ग्रंथकार म्हणतात. शुद्ध पाण्यात फेस येत नाही. याचा अर्थ ज्या पाण्यात फेस किंवा बुडबुडे दिसतात त्या पाण्यात काहीतरी अशुद्ध द्रव्य नक्कीच मिसळली गेली असणार. म्हणून हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे.
पाणी तापवून प्यावे. एकदाच तापवावे. वारंवार तेच पाणी गरम करू नये. अतिथंड पाणी देखील पिऊ नये. हे ग्रंथकर्ते सांगताहेत, त्या काळात फ्रिजपण नव्हते आणि कोल्ड्रींक्सही नव्हती.
कार्बन डाय ऑक्साईड सारखे विषारी वायु, जे आपण उच्छ्वासावाटे बाहेर सोडतो, जे शरीरात राहिले तर शरीराचे नक्की नुकसान होणार असते असे आजचे विज्ञान पण सांगते, ते कार्बोनेटेड वाॅटर आपण गरज म्हणून पितोय कि गंमत म्हणून ????
शास्त्रकार द्रष्टे होते, त्यांना माहिती होते, आमची पुढची अतिबुद्धिमान पिढी पाण्याबरोबर जीवघेणे खेळ खेळत आपले आयुष्य पणाला लावू पहात आहे.........
निदान त्यांच्या पुढील पिढीच्या सुरक्षित आरोग्यासाठी तरी चार ओळी खरडून ठेवाव्यात, म्हणून जस्ट टाईमपास म्हणून लिहिले असावे कदाचित. एकतर त्यांच्या दौतीतली शाई संपत नसावी, किंवा बोरूच्या टोकाला, केवळ धार काढावी म्हणून बहुतेक लिहून ठेवण्याचे कर्म त्यांना सुचले असणार !
ही कोल्ड्रींक्स हे विष आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले असताना, त्यात बुडबुडे दिसताना, त्यांच्या पिण्यामुळे दात, हिरड्या, जीभ यांना झिणझिण्या येत असताना, पिल्यानंतर जीवघेणी ढेकर येत असताना, आपल्याला त्याची गरज नसताना, हे फेसयुक्त अतिथंड पाणी प्यायची काय हौस आहे, काही कळत नाही.
विनाशकाले विपरीत बुद्धी. दुसरं काय ?
शास्त्रकारांनी याच श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे,
फेनिलं, जन्तुम्, अतप्तम्, दन्त अग्राह्यम्, अति शैत्यतः न पिबेत् !
पण लक्षात कुणी घ्यायचे ?
शास्त्रावर विश्वास नाही, शास्त्रकारांवर विश्वास नाही.
आधुनिक विज्ञान सांगते तेही व्यवहार्य वाटत नाही.
अंगवळणी पडले आहे, एवढे सवयीचे गुलाम झालो आहोत ?
एवढं माहित असून पिणार असाल तर प्या. आणि भोगा आपल्या कर्माची फळे !
दुसरं काय म्हणणार ना ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
23.12.2016
December 23, 2016
गावखेड्यातील मुलं शाळेत येतात. शिक्षण घेतात. तसेच महाविद्यालयातही प्रवेश घेतात. मात्र ग्रामीण भागात शिक्षण घेण्यास आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षणाच्या सोयी अत्यल्प असतात. घरची परिस्थिती नाजूक असते. कृषी संस्कृतीशी निगडित व्यवसाय असतो. घरचे संस्कार त्यांच्यासोबत असतात. गावचे रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांचा पगडा मनावर असतो. शिक्षण ही संकल्पना जसजशी प्रगल्भ होऊ पाहते, तितकीच ती कठीण होत जाते. मुलं मोठी झाली की, पालकांना त्यांची जबाबदारी वाढल्याचे जाणवते. किंबहुना ते आपल्या पाल्याचे पालनपोषणाचे ओझे डोक्यावर घेऊन हिंडताना दिसतात. तत्कालीन परिस्थितीत ते योग्यच असते. तसेच साहजिकही आहे. दहावीनंतर शिक्षणाचा अनेक शाखांमध्ये विस्तार होतो. ती शाखा विद्यार्थ्यास त्याच्या आवडीनिवडीप्रमाणो मिळेलच असे नाही.
मुलींच्या त्यातही विशेषत: ग्रामीण भागातील मुलींच्या बाबतीत तर अनेक समस्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षणात मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. पालकांनी करून घेतलेला गैरसमज. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी नसणो. शिक्षणाची सुविधा नसणो. आपल्या मुली सुरक्षित नाहीत ही पालकांना भेडसावणारी अनाठायी चिंता. आर्थिक दुर्बलता. महाविद्यालयात जाण्यासाठी वाहनांची सोय नसते. मुलगी हे परक्याचे धन आहे ही मानसिकता. समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, अडाणीपणा ही काही प्रमुख कारणो त्यामागे आहेत. आजही तिला सन्मानाची वागणूक देण्यास समाज कचरतो.
दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिका, चित्रपट यातून जे अवास्तव दर्शन घडविले जाते. जे विकृतीकरण करतात, ते वर्तमान सामाजिक परिस्थितीशी साधर्म्य असतेच असे नाही. रक्षण करणार्या यंत्रणांवर असणारी विश्वासार्हता. रक्षण करणारी आणि न्याय देणारी यंत्रणा हे कितपत तिच्या रक्षणासाठी सजग राहतील, यावर हे अवलंबून असते. महाविद्यालये शिक्षण देण्यासाठी कितपत सोयी उपलब्ध करून देतात? हाही एक प्रश्न आहे. कारण या युवती एकतर प्रवेश घेत नाहीत आणि घेतला तर फक्त पटावर नाव असते. केवळ परीक्षेसाठी येणो जाणो असते. ती परीक्षाही कॉपीयुक्त. शिष्यवृत्ती, तडजोडी, शिक्षणाचा खर्च, संस्थाचालकांचे हित अशा अनेकविध बाबी अशा आहेत की, त्या शिक्षणातील अडथळा ठरतात. परगावहून येणार्या मुलींच्या अनेक समस्या आहेत. वाहनांची सुविधा अपुरी असणो. वाटेत, प्रवासादरम्यान मिळणारी वागणूक या सर्वांचा परिणाम मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणावर होतो आहे. आज महाविद्यालयात पाहिले तर तास नियमित होत असतील. परंतु काही शहरांतील मोजकी महाविद्यालये सोडली तर इतर महाविद्यालयांत मात्र मुलींचे बेंच रिकामेच असतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. एखाद्या वर्गात एखादी-दुसरी विद्यार्थिनी असलीच तर ती नियमित येतेच असे नाही. हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे.
मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी हमी देऊन शिक्षणसक्ती का करू नये? तसेच जन्मदर वाढविण्यापासून ते आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराची साधने उपलब्ध करून देणो. हे या व्यवस्थेचे कामच आहे. ते आवश्यक आहे. ज्या ठिकाणी मुली अधिक प्रवेश घेतात, त्याठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक दाखविलेली आहे.
महाविद्यालयीन स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व, गायन, वादन किंवा मैदानी खेळ असतील तिथे मुलीच अग्रक्रमाने पुढे असतात. एमपीएससीच्या किंवा तत्सम परीक्षेच्या निकालात पाहिले तर मुली प्राधान्यक्रमाने पुढे गेलेल्या पाहावयास मिळतील. सचोटी, प्रामाणिक प्रयत्न आणि उपजत गुणकौशल्य यांच्या बळावर अनेक यशशिखरे पादाक्रांत केलेली आहेत. हा इतिहास आहे आणि हे वर्तमानही आहे.
महाविद्यालयाचा परिसर पाहिला तर ग्रंथालयापेक्षा चहाच्या कट्टय़ावर जास्त गर्दी असते. तेथील परिसराचे वातावरण प्रदूषित असते. व्यसनाधिन किंवा कॉलेज म्हणजे मौजमजा असा गैरसमज करून आलेले विद्यार्थी. काही फसलेले, फसवलेली युवाशक्ती पाहिली की, पालक गंभीरपणे विचार करतो. मुलींच्या बाबतीत काळजी करतो. तिथेही तिच्या शिक्षणाला गतिरोध निर्माण होतो.
मुलींच्या वसतिगृहाच्या संदर्भात किंवा आश्रम शाळांमधील मुलींची सुरक्षितता, एकंदरीत सर्वच ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळाली तर पालकांमध्ये नक्कीच आत्मविश्वास वाढेल. ते मुलींना महाविद्यालयीन शिक्षण देतील. पालकांची इच्छाशक्ती असूनही ते हे शिक्षण देऊ शकत नाहीत. परिणामी देशाची प्रचंड हानी होते. भरमसाट वाढलेल्या फीस, शिकवणीचे फुटलेले पेव, त्यांच्याकडून होणारी आर्थिक फसवणूक, महाविद्यालयाची कमी असलेली संख्या या बाबी घातक आहेत.तसेच महाविद्यालयीन शिक्षणाचा बाऊ करू नये. सोप्या पध्दतीने शिक्षण दिले जावे. कॉपीमुक्तीही गरजेची आहे. परीक्षा पध्दतीही सदोष असते. अशा सर्व बाबींचा कमी अधिक परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो.शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक पिळवणूक थांबवून समानतेने त्यांना शिकविले तर मुलींचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. रथाची दोन्ही चाके मजबूत आणि भक्कम असतील तेव्हाच रथ व्यवस्थित चालू शकेल. म्हणून महाविद्यालयीन युवतींचे शिक्षण हे भयमुक्त, भेदभावविरहित विश्वासपूर्ण, सौहार्दपूर्ण वातावरणात व्हायला हवे.
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
( पुण्यनगरी मध्ये पूर्वप्रकाशित)
February 6, 2017
एक संवादच संपूर्ण चित्रपटच आपल्यासमोर उभा करतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’.
बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’
राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.
ऋषिकेश मुखर्जी यांचा "आनंद' चित्रपट लोकप्रिय झाला, तो दुर्धर कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णाने, "आनंद' ने जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितल्यानेच! त्या चित्रपटात आनंदची भूमिका राजेश खन्ना आणि डॉक्टरची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती. क्षणाक्षणने मृत्यू आपल्याला गाठत असल्याचे माहिती असूनही, आनंद मात्र व्यथा, वेदनांची पर्वा न करता सहवासातल्या साऱ्यांच भरभरून आनंद वाटतो. कुणालाही आपला त्रास होवू नये, याची काळजी घेतो. शेवटच्या श्वासापर्यंत आनंद द्या आणि आनंदी जगा, हे या चित्रपटाच्या कथेचे सूत्र होते. या चित्रपटातील भावणारी गोष्ट म्हणजे हृषिकेश मुखर्जी ह्यांनी दाखवलेलं साधसं घरगुती वातावरण; माणसासारखी साधी माणसं, चांगली माणसं, भावनिक मानसं आणि शेवटी सगळं ठाउक असूनही फक्त आपल्या माणसाच्या प्रेमापोटी अगतिक होत अतर्क्य गोष्टी करु पाहणारी माणसं हे सारं. हे सर्व वेगळच वातावरण. हृषिकेश मुखर्जींचा हाच साधेपण मनाचा ठाव घेउन जातो. फार मोठा कॅनव्हास, अतिप्रचंड दे दणादण असं काही नाही. चित्रपटात "भावनिक" प्रसंग असले तरी कंटाळ्वाणा "मेलोड्रामाटिक" पिक्चर आपण ह्यास म्हणू शकत नाही.
आनंद ची भूमिका राजेश खन्ना यांनी ज्या पद्धतीनं सादर केली; तरी इतरही पात्रं अगदि व्यवस्थित लक्षात राहतात. म्हणजे ती लोकं येताहेत, नुसती दिलेले संवाद बोलताहेत असं होत नाही. अगदि पात्रं जिवंत होउन आल्यासारखी वाटतात. ललिता पवार ह्या एकाच वेळी कडक शिस्तीच्या पण प्रेमळ नर्स आहेत. "ए मुरारीलाल" ह्या बाष्कळ हाकेला विनाकरण "ओ" देणारा गमत्या पण "माणूसपण" जाणणारा जॉनी वॉकर आहेत. काहिसा व्यवहारी, थोडासा बनेल पण मित्रांची काळजी घेणारा डॉक्टर, डॉ. कुलकर्णी म्हणजेच रमेश देव, त्यांची डॉक्टरची पत्नीही म्हणजेच सीमा देव. रमेश देव यांचे मित्र हे तिचेही आप्त बनलेत.असा सारा मामला. बाबु मोशाय्,अजून एक भावनिक, जरा अव्यवहारी म्हणता यावा असा, मनाने सच्चा असा एक डॉक्टर, डॉ. बॅनर्जी आहे. अमिताभ बच्चन त्याकाळातील नवोदित कलाकार होते. ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर उत्तर 'आनंद' हे येऊ शकेल.
या चित्रपटात भव्य दिव्य असे काहीच नाही. यातील गाणी तर लाजाब
"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..."
“ना जिया लागे ना...”
"जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....कभी ये रुलाये...."
"कहीं दूर जब दिन ढल जाये..”
चारही गाणी अप्रतिम
या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, फिल्मफेअरचा सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार: राजेश खन्ना, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार: अमिताभ बच्चन, सर्वोत्तम संवाद पुरस्कार: गुलझार, सर्वोत्तम संपादन पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, सर्वोत्तम कथा पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी.
आनंद चित्रपट पूर्वी कधी पाहिला नसेल तर आता पहा. खरं तर पाहू नकाच. "अनुभवा" आनंद. सोबत लिंक दिली आहे.
https://www.youtube.com/shared?ci=GCgBGXC2yMU
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 12, 2022
२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.
March 26, 2021

पोपटांच्या आकलनशक्तीवर आधारलेल्या पूर्वीच्या संशोधनात पोपट आणि माणसाच्या मेंदूतील अनेक साम्यस्थळं स्पष्ट झाली होती. यांनुसार माणसाप्रमाणेच पोपटाच्या मेंदूचा आकारही, शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठा असतो. तसंच दोघांच्या मेंदूच्या पुढच्या भागात मज्जापेशींची संख्या मोठी असते. इतकंच नव्हे तर, दोघांच्या जनुकीय आराखड्यातल्या, मेंदूच्या विकासाशी संबंधित भागांतही मोठं साम्य दिसून आलं आहे. माणसाला जशी उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य मिळालं आहे, तसंच पोपटाच्या बाबतीतही उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य यांचा मिलाफ घडून आला आहे.
May 3, 2022
सुरुवातीलाच डाॅ. प्रदीप कुरुलकर म्हणजे कोण हे सांगतो. डाॅ. कुरुलकर यांनी जवळपास सहा वर्ष भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्यासोबत भारताच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पावर काम केलं आहे.
August 14, 2016
केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या पहिली लेडीज स्पेशल लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर ५ मे १९९२ रोजी विरारहून सकाळी पहिली लेडीज स्पेशल लोकल सुटली. तेव्हापासून गेली २८ वर्षं ही लेडीज स्पेशल रोज धावतेय.
May 5, 2022
१९५६ साली गव्हर्नमेंट ऑफ नागालँडची घोषणा करण्यात आली, मुळात साहित्यिकाचा पिंड असणाऱ्या फिझोने तर स्वतंत्र नागा राष्ट्राचे राष्ट्रगीत देखील लिहून ठेवले होतेचं, शिवाय राष्ट्रध्वज देखील तयार करण्यात आला. या हालचाली पाहता नागाहिल्सवर भारतीय लष्काराची संख्या वाढविण्यात आली.
December 1, 2021
थोडक्यात- मानवाच्या प्रत्येक जखमेवर, दु:खावर काळच मात करू शकतो. त्यावर तोच उपाय आहे. काळाच्या ओघात हा आघातही दूर होईल. आता मी जे या खेपेला सांगितले, त्याचे तूही रोज मनन करशील. हे दोस्त, उदास… निराश नको होऊस!
June 5, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti