वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही. मानवाचे संपूर्ण जीवन व्यापणार्या या साखरेला महाराष्ट्रात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य म्हणून मिरविणार्या या राज्याचे राजकारण साखरेभोवती फिरत असते, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. राज्याच्या पश्चिम भागाने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर प्रचंड विकास साधून घेतला आहे आणि देशातील एक संपन्न भाग म्हणून नावारूपाला आला आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर घेतलेली प्रगतीची झेप बघून मराठवाडा व विदर्भ या तुलनेत अविकसित भागातही, सहकारी साखर कारखाने उभे राहिलेत.
अलिबाग एक निसर्गरमणीय गाव.
अलिबाग म्हटल की आठवतात,आमराया व नारळी-फोफळीच्या बागा.स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे,मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल.....निसर्गाने मुक्तहस्ताने उधळन केलेले डोंगर,कनकेश्वर, सिद्धेश्वर, रामधरणेश्वर.....
आडवडाभराचा शीण, ताण हलका करण्यास मुंबईकर गेटवे ऑफ इंडीया येथून तासाभरात मांडव्याला येतात.पण आता यापुढे हे शक्य होणर नाही कारण......
आज संपूर्ण अलिबाग तालूका औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या विळख्यात सापडला आहे.एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सात ते आठ औष्णिक विद्युत प्रकल्प अलिबाग मध्ये येऊ घातले आहेत.महाराष्ट्राच्या वीजेची गरज भागविण्यासाठी अलिबागचा बळी देण्याची योजना सरकारने आखली आहे.दररोज लाखो टन कोळसा जाळला जाणार आहे. औष्णिक वीज केंद्रातील प्रदूषणामुळे लोकांच्या संसाराची राखरांगोळी होणार आहे. हवेतून येणा-या राखेचे थरावर थर चढून जमीन नापीक होणार आहे. रुग्णालयात दमेक-यांच्या रांगा लागणार आहेत. पिकवायचं काय आणि खायचं काय याची विवंचना अलिबागकरांना भेडसावू लागलीय.
महाराष्ट्राच्या वीजेची गरज भागविण्यासाठी संपूर्ण अलिबागची राखरांगोळी करणे योग्य नाही.
जर हे सर्व औष्णिक विद्युत प्रकल्प झाले तर मुंबईकरांना सुद्धा याची किंमत भविष्यात चुकवावी लागेल.
-- संजीव म्हात्रे
लग्नांच्या मालिका ,वात्रटिका
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची अपकीर्ती करणार्या जेम्स लेनच्या ‘शिवाजी : द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकावरील बंदी महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.
सुलम उद्योजक संघटनांनी पाठ पुरावा करून नोंदणी व बिलावर नोंदणी क्रमांक जाहीर करणे बंधनकारक करून घेतल्यास, ही पळवाट ताबडतोब बंद होईल.कारण देयक सुलम उद्योगाचे असल्याचे माहित नव्हते असे कंपन्यांना म्हणता येणार नाही.असे झाल्या खेरीज कोर्पोरेत जगाच्या बेमुदत – बिनव्याजी- थकबाकी च्या फेर्यातून सुलम उद्योगाची सुटका होणार नाही.
आपल्या भारत देशाला सर्वात जास्त जर, कुणी डिवचले असेल तर ते फक्त अतिरेकी कारवायांनी ! मग ह्या कारवाया दहशतवाद्यांचा असोत की नक्षलवाद्यांच्या भारताचे यामुळे फार मोठे नुकसानच झालेले आहे. भारताचे नुकसान अंतर्गत कलहाने जेवढे झाले नाही. तेवढे या कारवायांमुळे झालेले आहे.
ऑनलाइन प्रवेश : शंका-समाधान
सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
खासदारांच्या वेतनवाढीच्या मागणीच्या विरोधात जनमताचा रेटा तयार व्हावा, याकरिता पुण्यातील सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. जागरूक नागरिकांनी त्यास पाठींबा देण्याची विनंती केली आहे. आपण ही त्यास पाठींबा द्यावा ही विनंती .
हे गणपतीचे गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण होय. मुंबईपासून अंदाजे ९० किलोमीटर व रायगड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या या शहराचा उल्लेख करताच आपल्या डोळयासमोर येतात त्या गणपतीच्या सुबक मुर्त्या. त्यांच्या नाविन्यपूर्ण मांडणीमुळे पुणे- मुंबईपासून उर्वरित महाराष्ट्रातही इथल्या मुर्तींना प्रचंड मागणी असते.
Copyright © 2025 | Marathisrushti