वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात.
March 5, 2021
चित्रपटसंस्कृती ही सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया आहे. चित्रपट क्षेत्रातील बदल, त्यातील नवे प्रवाह, नवे तंत्रज्ञान, नवे व्यासपीठ या साऱ्याचा मोठा परिणाम चित्रपट संस्कृतीवर होत असतो. तो यापूर्वी होत आला आहे आणि यापुढेही होत राहील. चित्रपटसंस्कृतीतील महत्त्वाच्या बदलांचे माझ्या चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विचारमंथन…
January 23, 2024
त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र
क्षणं क्ष्मा च लक्ष्मीः स्वयं तं वृणाते |
किरीटस्फुरच्चामरच्छत्रमालाकलाचीगजक्षौमभूषाविशेषैः ‖ १७ ‖
ज्यावेळी एखाद्या शरणागत भक्ताला भगवंताची कृपा होते त्यावेळी त्याला कोणकोणते अद्वितीय लाभ होतात ते सांगतांना जगद्गुरु श्रीशंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र- हे त्र्यक्ष अर्थात तीन नेत्र असणाऱ्या भगवान शिवशंकरा ! आपल्या नेत्राचा कटाक्ष जेथे पडतो. अर्थात ज्या कोणावर ही कृपादृष्टी प्राप्त होते. त्याला,
क्षणं - क्षणात म्हणजे तत्काल. अल्पावधीतच,
क्ष्मा च - पृथ्वी अर्थात पृथ्वीचे साम्राज्य आणि
लक्ष्मीः - अर्थात सर्व प्रकारचे वैभव.
स्वयं तं वृणाते - स्वत:च वरते. अर्थात या सर्व गोष्टी त्याच्याकडे आपोआपच चालत येतात. कोणत्याही प्रयासाशिवाय त्याला प्राप्त होतात.
त्या देखील कशा? तर-
किरीट- मुकुट अर्थात शिरोभूषण,
स्फुरच्चामर- लखलखीत रत्नजडित सोन्याच्या दांडीने युक्त चवऱ्या, त्यांनी वारा घालणाऱ्या दासी, अर्थात अनेक प्रकारचे सेवेकरी,
छत्र- मस्तकावरील छत्र. सर्व प्रकारच्या तापापासून, त्रासापासून मुक्ती,
माला- मोत्याच्या माळा, सौंदर्य आणि शीतलता,
कलाची- बाहुभूषणे.
गजक्षौमभूषा- आभूषणांनी सुसज्जित असणारे , अंबारीयुक्त असे हत्ती.
विशेषैः - या सगळ्या विशेष आभूषणांसह.
अर्थात राजवैभवाशी संबंधित सगळ्याच लहान सहान गोष्टी देखील त्याला सहज प्राप्त होतात. परिपूर्ण वैभवाने युक्त असे स्वानंद साम्राज्य त्याला प्राप्त होते. आतला आनंद प्राप्त होतो.
बाहेरून आता त्याला काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 26, 2020
जगात आढळणार्या कॅन्सरपैकी कोलोरेक्टल कॅन्सर हा तिसरा क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. फक्त 1.4 दशलक्ष कोलोरेक्टल कॅन्सरची प्रकरणे एकट्या 2012 साली निदान करण्यात आली होती. आत्ताच्या परिस्थितीवरून असा निष्कर्ष काढला जातोय की 2035 सालापर्यंत 2.4 दशलक्ष प्रकरणे प्रतिवर्षी कोलोरेक्टल कॅन्सर चे निदान केली जातील. 1.08 दशलक्ष स्त्रियांमध्ये व 1.36 दशलक्ष पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त झालेले आढळेल.
व्यक्तीच्या आहारावर त्या व्यक्तीला कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका निर्माण होईल का नाही हे अवलंबून असते. साहित्य पुनरावलोकनानुसार शाकाहारी भोजन कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात तर जास्त प्रथिने व जास्त फॅटयुक्त आहार ह्या कॅन्सरचा धोका वाढवतात. तसेच आशा प्रकारचा आहाराचे सेवन तुम्ही किती काळ केले ह्यावर ही कॅन्सरचा धोका अवलंबून असतो.
कॅलिफोर्नियातील Loma Linda विद्यापीठात 70,000 लोकांच्या खाण्याच्या सवयीचं विशलेषण केले. ह्या लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका आहे का नाही आणि असल्यास तो किती आहे हे तपासण्यासाठी शाकाहारी भोजन घेणार्या व्यक्तींची तुलना मांसाहार घेणार्या व्यक्तीबरोबर केली असता शाकाहारी भोजन घेणार्या व्यक्तींमध्ये 22% कॅन्सरचा धोका कमी झालेला आढळला जेव्हा ह्याच व्यक्तींची तुलना मासे खाणार्या व्हेजिटेरिअन लोकांबरोबर केली असता हा धोका 43%पर्यंत कमी झालेला आढळला. मासे व इतर सीफूड घेणार्या व्हेजिटेरिअन लोकांच्या आहाराला pesco-vegetarian डाएट असे संबोधले जाते. वरील शोधप्रबंधाची माहिती JAMA Internal medicine ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
The Adventist Health Study 2 (AHS_2) हया प्रयोगात 96354 लोकांचा सहभाग होता. ह्या सर्व व्यक्तींचा पाठपुरावा 7.3 वर्ष केला असता 380 व्यक्तींना Colon cancer व 110 व्यक्तिंना rectal कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आढळला तसेच शाकाहार घेणार्या व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमीच आढळला. जेव्हा मांसाहार विरूद्ध Pesco-vegetarian आहाराशी तुलना केली असता Pesco-vegetarian आहार घेणार्या व्यक्तींमध्ये तो धोका कमी झालेला आढळला. हा शोधप्रबंध JAMA Intern.Medicine 2015; 175 (5):767 - 776 ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
शाकाहार कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका का कमी करताना दिसतात?
• Insulin and insulin like growth factor कोलोरेक्टल कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात असे निदर्शनास आले आहे आणि शाकाहारी जेवणामुळे ह्या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण येते आणि म्हणूनच वेस्टर्न आहाराच्या तुलनेत शाकाहारी जेवणामुळे हा त्रास कमी होत असेल.
• फोलेट, कॅल्शियम, फायबर ह्या सारखे महत्वपूर्ण अन्नघटक जे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करतात ते शाकाहारी पदार्थातून मिळतात.
• बर्याचदा ज्या पद्धतीने मटण, रेडमीट शिजवले जाते त्यामुळेही कॅन्सरचा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे, आणि हेच मटण प्रक्रिया केलेले असेल तर हा धोका दुप्पटीने वाढताना दिसतो.
कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो?
कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो ह्यावर US - BRITISH ह्यांच्या एकत्रित संशोधनात फक्त 2 आठवड्यातच खाण्या पिण्याच्या सवयी बदलीचा कॅन्सरच्या धोक्यावर परिणाम झालेला आढळला.
Imperial College London आणि The University of Pittsburgh ह्या मधील शास्त्रज्ञांनी 20 अफ्रिकन अमेरिकन आणि 20 ग्रामीण साउथ अफ्रिका भागांतील लोकांची प्रयोगासाठी निवड केली. ह्या दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या प्रयोग शाळेत ठेवले. ह्या दोन्ही गटातील लोकांच्या जेवणात वापरण्यात येणारे जिन्नस व त्याची पदार्थ शिजवण्याची पद्धत वापरून त्यांच्या साठी विशेष जेवणाची निर्मिती केली आणि ते पदार्थ त्यांना खाण्यास दिले. African American लोकांना rural African लोकांचा आहार खाण्यास दिला व rural African लोकांना African American लोकांचा आहार खाण्यास दिला. Rural African लोकांना जेव्हा पाश्चात्य पद्धतीचा आहार दिला गेला तर African American लोकांना जास्त फायबर असलेला ज्यात बीन्स डाळी कडधान्य असलेला आहार खाण्यास दिला.
प्रयोग सुरु होण्याआधी व नंतर colonoscopy, bacterial samples आणि कॅन्सरशी निगडित असलेले बाकीचे इतर महत्वाचे biomarkers ह्यांचा तपास केला. ह्या तपासात सुरवातीला असे दिसले की अर्ध्या अधिक अमेरिकन व्यक्ती मधे पॉलीप्स (polyp) दिसून आले ज्यामुळे पुढे जाऊन कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावते. परंतु एकाही अफ्रीकन व्यक्ति मध्ये हा धोका आढळला नाही पण ज्यावेळेस जेवणात अदलाबदल केली तेव्हा मात्र अमेरिकन व्यक्ती मधे अंतर्गत सूजेचे पातळी कमी आणि इतर biomarkers मध्ये लक्षणीय रित्या घट झालेली आढळली आणि अफ्रीकन गटात कॅन्सरचा धोका नाट्यमय रित्या वाढलेला आढळला.
ह्या वरून असे स्पष्ट होते की कमी दिवसातच आहारातील बदल कॅन्सरचा धोका वाढवतो आणि म्हणूनच केव्हाही अगदी ह्या क्षणापासूनही बदल केल्यास तुमचा कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. प्रयोगात असे दिसून आले आहे कि कॅन्सरचा धोका लवकरात लवकर निदर्शनास आल्यास कोलोरेक्टल कॅन्सर बरा होण्यास किंवा टाळण्यास एकदम सोपे आहे आणि त्यासाठीच वेळच्या वेळी तपासणी करणे उपयुक्त ठरू शकते. Continuous Update Project नुसार खाण्या पिण्याच्या सवयी हेल्दी केल्यास, स्मोकिंग बंद केल्यास, दररोज शारीरिक व्यायाम केल्यास, आणि उंची साठी योग्य वजन राखल्यास लोकांचा कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका साधारणतः 47% पर्यंत कमी होतो.
June 2, 2015
भगवान श्रीशंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करणारे जगद्गुरु आदि शंकराचार्यांचे आणखी एक सुंदर स्तोत्र म्हणजे दशश्लोकीस्तुती. श्लोकसंख्येच्या विस्तारा वरून केलेले हे नामकरण.
August 25, 2020
जेमतेम तीन वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेवर आलात, सर्वात आधी गॅस अनुदानित दरात न देता ती सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलीत. ठीक आहे आमचा त्या घोटाळ्यात जास्त शेअर नव्हता तर त्यामुळे आम्हाला जास्त झळ बसणार नव्हती आम्ही शांत राहिलो.
तुम्ही खताचे वाटप सुद्धा फक्त शेतकऱ्यांनाच केले अन अनुदान पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आता आम्ही परिश्रमपूर्वक एवढा मोठा काळाबाजार तयार केला तो युरिया कारखान्यांना विकून अन त्यावरची मलई खाऊन, तुम्ही शेतकऱ्यांनाच अनुदान देताय म्हणल्यावर आमची तर उपासमार होऊ लागली. पण तरीसुद्धा आम्ही (नाईलाजाने) शांतच राहिलो.
पण आता नोटाबंदीच्या काळात आमचे जे प्रचंड नुकसान झालंय ते अंशतः का होईना आम्ही कर्जमाफीच्या रूपाने वसूल करू इच्छितो तर तुम्ही त्यालाही तयार नाहीय.
आम्ही सुद्धा वेळोवेळी कर्जमाफी केलीच ना (अन त्यात गबर आम्हीच झालो कारण शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर किती बोजा चढवलाय हे माहीतच नसायचं)
तुम्ही मागील दोन वर्षात सिंचन योजनांची काटेकोर अंमलबजावणी केलीत अन आमची टँकर लॉबीची पण वाट लावली. आता आम्ही एवढे पैसे घालून (खाऊन) टँकर घेतले ते काय दारात उभे करायला काय?
असे आमचे बरेच उद्योग आहेत पण तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी चाप लावत चाललाय
बर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावे तर ते सिद्ध पण होत नाहीयेत (आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार).
आम्ही गेल्या 67 वर्षात जी सरंजामशाहीची घडी घातलीय तीच तुम्ही पार विस्कटून टाकताय?
अन ह्या वेगाने तुम्ही जर सुधारणा कराल तर आम्हाला पुढच्या निवडणुकीत कोण विचारणार (तस पण आत्तातरी कोण विचारतय म्हणा)
असं एवढं वाईट तर आपण शत्रूच सुद्धा चिंतीत नाही तुम्ही पण जगा अन आम्हाला पण जगवा असं असावं ना. पण आम्हाला जगवायची सोय तुम्ही छगनरावांसारखी कराल तर ते कसं बरं मान्य व्हावं?
म्हणून आम्हाला आता हे शेतकरी संपाचे पाऊल उचलणं भाग पडलंय. (कारण आम्हाला हे तर माहीतच आहे की संपात मेला तर शेतकरीच मरणार आहे आम्हाला काय त्याचे आम्हाला तर तो भांडवलंच देणार आहे तमाशे करायला)
आता तरी सांगा ना की आता आम्ही जगावे तरी कसे?
- आपला एक अडगळीत पडलेला राजकारणी
June 7, 2017
संयुक्त राष्ट्र संघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले. खरे तर १९७२ सालापासून युनोने आदिवासींच्या प्रश्नांना हात घालायला सुरुवात केली. आदिवासींच्या संदर्भात वाढत्या संघर्षामुळे १९७२ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे आदिवासींच्या समस्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पुढे १८ डिसेंबर १९९० च्या युनोच्या आमसभेत १९९३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष म्हणून जाहीर केले आणि हे वर्ष १० डिसेंबर १९९२ च्या मानवाधिकार दिवसापासून सुरू झाले. या वर्षाच्या दरम्यान आदिवासींचे विविध प्रश्न जगासमोर मांडण्यात आले.
भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 9, 2021
सध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन आर्थिक सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही.
March 28, 2019
शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता?
भात किंवा भाकरी.
प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते.
ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो.
बाजुला पोळी असते.
आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. ज्वारी बाजरी किंवा मका गहू यापासून बनवलेली रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी हा जेवणातील मुख्य पदार्थ होतो.
रोट म्हणजे हातावर किंवा पाटावर थापून, जाडसर केलेले असतात. तव्यावर एकदा आणि तवा उतरवून पुनः थेट अग्निवर, असे दोन वेळा हे रोट भाजले जातात. आकाराने मोठे ते रोट. आकाराने जरा लहान ती रोटी. रोट, रोटी आणि भाकरी यात आणखी एक फरक आहे तो म्हणजे भाकरीला गरम तव्यावर घातले की लगेच पाणी लावले जाते. रोटीला पाणी पण नाही तवा पण नाही. थेट अग्नीच्या संपर्कात.
अग्निचा संस्कार जेवढा जास्त तेवढा पदार्थ पचायला हलका. हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवावे.
हे रोट भाजताना जर तंदुर वापरली, म्हणजे अग्नि आणि रोट यामधे तव्याचा कोणताही अडथळा न येता हे जाडेभरडे रोट थेट अग्नीवर खमंग भाजले जातात. त्यातील पाणी लवकर सुकवले जाते. ते फुलतात, फुगतात, पापुद्रा वेगळा होतो. आतपर्यंत उष्णता जाते आणि पचायला हलके होतात. पोटही लवकर भरते.
हे तवे पूर्वी खापराचे किंवा मातीचे असायचे. नंतर लोखंडी किंवा बीडाचे म्हणजे मिश्र धातुचे असायचे. आता हिंडालियमचे. हिंडालियम हा पण एक मिश्र धातु. आजचे विज्ञान सांगते, या धातुची झीज लवकर होते. उष्णता मिळाली की त्याला चरे पडतात, त्यातील धातु अन्नातून पोटात जातात. म्हणून त्याचा वापर नियमितपणे जेवणात असेल तर मूतखडा होण्याचे प्रमाण वाढते. किंवा जो विषारी आहे. इंग्रजांच्या काळात बंदीवान कैद्यांना तुरूंगातील भोजन याच अॅल्युमिनीयम वा हिंडालियमच्या ताटल्यातून दिले जायचे. पिक्चरमधे आपण बघतोच.
आज आम्ही ही अॅल्युमिनीयम हिंडालियमची भांडी, स्वस्त वाटतात म्हणून, पटकन स्वच्छ होतात म्हणून, आमच्या घरात वापरायला सुरवात करून, स्वतःलाच स्वतःच्या घरामधे बंदिस्त कैदी बनवून टाकले आहे.
लवकरच सुटका करून घ्यायला हवी ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.10.2016
October 23, 2016
जर आपला स्वभाव चांगला असेल आणि लोकांना आकर्षित करणारा असेल, तर लोक आपल्याजवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते, आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक आपलेसे करतात.
May 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti