वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणार्यालाही लक्षात येणार नाही. पण ‘ र्हिदम हाऊस’ म्हटलं की चटकन, ‘च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय’ असे उद्गार ऐकू येतील..!
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त” भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता,इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.
व्ही. शांताराम प्रॉडक्शन निर्मित ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट तर मराठी सिनेरसिकांच्या मनात कायमचं घर करून बसला आहे. अगदी आजच्या पिढीला देखील या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत.
२९ मार्च १९३० रोजी ’प्रभात’चा ’खूनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीजवळच्या इमारतीत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १९२९ झाली. व्ही. शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी व विष्णुपंत दामले या तत्कालीन चित्रसृष्टीतील धुरीणांनी मोठे ध्येय घेऊन ही कंपनी उभारली. बुद्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाची त्यावेळी बरीच तारीफ झाली होती.
कालांतराने १९५२ मध्ये प्रभात कंपनी पुण्याला स्थलांतरित झाली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
२९ ऑक्टोबर हा ‘जागतिक इंटरनेट दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. भारतात १९९५ च्या सुमारास इंटरनेट उपलब्ध झालं असलं, तरी त्यापूर्वी कित्येक दशके अमेरिकेत आणि काही युरोपियन देशांमध्येही त्यासंबंधीचं संशोधन जोमानं चाललेलं होतं. २९ ऑक्टोबर १९६९ रोजी. सुमारे ४७ वर्षांपूर्वीचं हे १९६९ वर्ष विज्ञानाच्या दृष्टीनं एकूणच क्रांतिकारी होतं. २१ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पाऊल ठेवलं. त्याच वर्षी पुढे सुमारे ३ महिन्यांनी २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरचा जगातला पहिला संदेश ऑनलाईन पाठवला गेला. म्हणूनच या २९ ऑक्टोबर तारखेला ‘जागतिक इंटरनेट दिवस’ मानलं जाते.
१९६९ च्या २९ ऑक्टोबरला जो प्रसंग घडला, तो मोठा मनोरंजक आहे. १९६0 च्या दशकात अमेरिकन सैन्याला इंटरनेटसारखी व्यवस्था गुप्त संदेशवहनासाठी हवी होती. त्यादृष्टीनं अमेरिकन संरक्षण खात्यानं एका संशोधन प्रकल्पाला मोठं अर्थसाह्य देऊन अमेरिकेतील काही विद्यापीठांकडे त्या संशोधनाचे आव्हान सोपवलं होतं. या प्रकल्पांतर्गत एकूण चार संगणक अमेरिकेतील चार विद्यापीठांमध्ये जोडण्यात आलेले होते. खरं तर त्या चार संगणकांचं ते जगातलं पहिलं इंटरनेट होतं. या चार संगणकांपैकी एक होता कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठात, तर दुसरा होता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात. तिसरा आणि चौथा संगणक कॅलिफोर्निया सांता बार्बरा आणि उता विद्यापीठात बसविलेला होता. १९६९ चे ते संगणक अर्थातच आजच्यासारखे प्रगत नव्हते. मॉनिटर्स तर हिरव्यार्जद अक्षरांनी चमकणारे असत. कॅलिफोर्नियामध्ये चार्ली क्लिहने या विद्यार्थी संगणकप्रणाली निर्मात्याने एका संगणकावरून दुसऱ्या संगणकाला इलेक्ट्रॉयनिक संदेश पाठवला गेला. पहिल्या वेळी पाठविलेल्या login या शब्दापैकी केवळ lo शब्द पोचल्यानंतर सिस्टिम फेल झाली. पुढील अक्षरे जाऊ शकली नसली, तरी दूरसंचार आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासामध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे. असा तो २९ ऑक्टोबर १९६९चा प्रसंग. अमेरिकन विद्यापीठं, त्यातील तरुण विद्यार्थी आणि अमेरिकन सैन्य एकमेकांना कशी पूरक ठरत होती, हाही त्यातून आपल्यासाठी निघणारा एक बोध.
अशा प्रकारे ४७ वर्षांपूर्वी दोन तरुणांनी इंटरनेटवरचा पहिला संदेश पाठवला. तेव्हा २१ वर्षांचा असणारा चार्ली क्लाईन आता ६८ वर्षांचा आहे. मोबाईलवर इंटरनेट वापरणार्याक आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं चार्ली आणि बिल गेल्या पिढीतले आहेत; पण त्या पिढीनं पुढल्या पिढीसाठी छड यशस्वी केल्यानंतरच हे शब्द आज सहजपणे जगभर फिरताहेत. संगणकांच्या छोट्या छोट्या गटांना जोडत जगभरामध्ये निर्माण झालेल्या जाळ्यालाच वर्ल्डवाईड वेब किंवा इंटरनेट असे म्हणतात. माहिती किंवा ज्ञानाच्या साठ्याला लोकांच्या मोठ्या गटापर्यंत पोचविण्याचे काम या जाळ्यामार्फत होत असते. आजवर ज्ञान ही केवळ काही लोकांचीच मक्तेदारी असल्याचे मानले जात होते. त्यामध्ये सार्वत्रिक शिक्षणासोबतच इंटरनेटच्या निर्मितीमुळे खऱ्या अर्थाने बदल घडला आहे. त्यामुळे या प्रणालीला खरीखुरी लोकशाही प्रणाली म्हणता येईल. सुरवातीच्या काळात इंटरनेट हे अर्पानेट (Advanced Research Projects Agency Network) या नावाने ओळखले जात असे.
अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या चार जीवनावश्यक गोष्टींमधल्या कोणत्याही तीन निवडा, असा प्रश्न जर आजच्या तरुण पिढीला केला, तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनपैकी ते कोणता गाळतील, हे सांगणं अवघड आहे. एक नक्की, की कोणत्याही परिस्थितीत ते इंटरनेट वगळणार नाहीत. कारण त्यांचा प्रत्येक श्वा स आज प्राणवायूपेक्षा इंटरनेटच्या साह्यानं चालतो आहे. त्याची जीवनावश्यकता एव्हाना जगाने ओळखली आहे. एक दिवस असा येणार आहे, की संपूर्ण पृथ्वी ही मोफत वाय फायने युक्त असेल.
एव्हरेस्टसारख्या एखाद्या उंच ठिकाणी कदाचित प्राणवायू मिळणार नाही; पण वाय फायचा सिग्नल खात्रीपूर्वक मिळताना दिसेल. आज ते अतिरंजित वाटले, तरी नजीकच्या भविष्यकाळात ते होणार, हे निश्चिमत आहे. आजची तरुण पिढी संपर्कासाठी इंटरनेटचा वापर अफाट करीत असते. व्हॉट्सअँपसारखं अँप्लिकेशन हे त्याचं उदाहरण. फेसबुकवर आज जितकी सुखदु:खं व्यक्त होतात, तेवढी समक्ष भेटीतही होत नाहीत, हे आजचं सत्य आहे. जगभरातील विविध समाज, गट हे इंटरनेटमुळे एकमेकांशी संपर्क साधू शकतात. सामाजिक अभिसरण वाढले आहे. ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले झाले आहे. आपण सेकंदामध्ये आपले मत, फोटो किंवा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पोचवू शकतो. सामाजिक जाळ्यामुळे (सोशल नेटवर्किंग) एकमेकांच्या संपर्कात राहणे सोपे झाले आहे. आता मोबाईल मध्येही इंटरनेटचा वापर सुरू झाल्याने ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे.तरुण पिढी आज अशा एका वेगळ्या ‘पॅराडाइम शिफ्ट’मधून जात आहे. २४ तासांपैकी ९० % वेळ त्यांचे डोळे या ना त्या स्क्रिनवर रोखले गेलेले दिसतात. स्क्रीनवर रोखले गेलेले डोळे बाजूला करून त्यांनी आजूबाजूच्या वेगवान जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणं आवश्यक आहे. आजच्या तरुण पिढीसमोर प्रचंड ज्ञान, संपर्काचं प्रचंड सुख, छायाचित्र, संगीत, ध्वनी, चलचित्रपट वगैरेंनी उदंड भरलेलं चविष्ट ताट इंटरनेटनं ठेवलं आहे. बसल्या जागी मोबाईलमधून ते मिळत आहे. तरुण पिढीनं काळजी घ्यायची आहे ती आपल्या प्रकृतीची.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
१० डिसेंबरला मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगितले.
२६ जुलै २०१९ ला कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होतील. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. आजपर्यंतच्या युद्धांपैकी केवळ कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली.
ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जाईल व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असेल. आजचा दिवस व रात्र समान असतील. म्हणजे आज १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र!
पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. हे दिवस म्हणजे २१ मार्च रोजी म्हणजेच ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो, आणि २३ सप्टेंबर रोजी ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवीय भागात प्रवेश करतो. आपण विषुववृत्तावर असाल तर ह्या दोन दिवशी सूर्य दुपारी १२ वाजता बरोबर डोक्यावर असतो. २१ मार्च ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास 'वसंतसंपात' म्हणतात तर २३ सप्टेंबर ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास 'शरदसंपात' असे म्हणतात. तसेच २१ जून ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो ह्यालाच उत्तरायण असे देखिल म्हणतात, तर २२ डिसेंबर ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. ह्यालाच 'दक्षिणायन' असे देखिल म्हणतात. पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. त्यामुळेच दिवस व रात्र हे प्रहर व ऋतु निर्माण झाले. पण पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्याने प्रत्येक वेळी विषुव वृत्तच सूर्याच्या समोर असते असे नाही. त्यामुळे दिवस लहान-मोठा होत राहतो. मात्र २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी पृथ्वीचे विषुव वृत्त सूर्याच्या समोर येते व दिवस आाणि रात्र ढोबळ मानाने समान असतात. अर्थात दिवसाच्या गणनेतील काही त्रुटी आजही बाकी असल्याने लिप वर्षासारख्या काळात हा दिवस पुढे-मागेही होतो. आजपासून दिवस मोठा होऊ लागणार व त्यामुळे गोठवणारी थंडीही कमी होऊन वातावरण ऊबदार बनू लागते.
यासाठीच युरोपातील अनेक देशांत आज सणाचा आनंद साजरा होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संरक्षण मंत्रालयात गेल्या वर्षभरामध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. ज्यामुळे या मंत्रालयाचे काम पारदर्षक,वेगवान, व जास्त चांगले झालेले आहे. त्यामधील काही महत्त्वाच्या पैलूंवर आपण चर्चा करू.याअगोदर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची स्थिती कशी होती हे पाहाणे गरजेचे आहे. तसेच वर्षात या क्षेत्रात काय बदल झालेले आहे आणि शिल्लक असलेल्या २ १/२ वर्षांत कोणत्या अपेक्षा आहेत हे पण समोर आणणे जरुरी आहे.
१९७१ ची रोमांचक युद्ध गाथा हे श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांचे, नचिकेत प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले, १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.
१९७१ ची रोमांचक युद्धगाथा
लेखकःसुरेन्द्रनाथ निफाडकर
पृष्ठसंख्याः 112 ; किंमतः 100 रू.
नचिकेत प्रकाशन, नागपूर
Copyright © 2025 | Marathisrushti