(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • समर्थवाणी’

    ॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

    जनी सर्व सुखी असा कोण आहे ।
    विचारे मना तूचि शोधूनी पाहे ।
    मना तांची रे पूर्वसंचीत केले ।
    तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥

    मना मानसी दु:ख आणू नको रे ।
    मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
    विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी ।
    विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥

    मना संग पां रावणा काय झाले ।
    अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ।
    म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।
    बाले लागला काल हा पाठीलागी ॥

    जीव कर्मयोगे जनी जन्म झाला ।
    परी सेवटी काळमूखी निमाला ।
    महा थोर ते मृत्युपंथेची गेले ।
    कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥

    मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
    जिता बोलती सर्व हि जीव मी मी ।
    चिरंजीव हे सर्व हि मानिताती ।
    अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥

    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

      September 20, 2017


  • छत्रपतींच्या काळातील गुप्तहेर खाते

    छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांचे हेर खाते कसे काम करत होते ते खालील ओव्या दर्शवतात .सदर माहिती मला श्री नरेंद्र नाडकर्णी यांच्या ई मेल वरून मिळाली.

    अफझलखान स्वराज्या वर चाल करून येत आहे हे महाराजांना कळवण्य साठी हि युक्ती वापरली होती. रामदास स्वामींचे शिष्य स्वराज्यात किती महत्वाचे काम करीत होते हे यावरून लक्षांत येते.

    अफझलखान निघाला हे सांगणारे पत्र सन १६५९

    वि वेके करावे कार्य साधन ।
    जा णार नरतनु हे जाणोन ।
    पू ढील भविष्यार्थी मन ।
    र हातोची नये ।।१।।

    चा लू नये असन्मार्गि ।
    स त्यता बाणल्या अंगी ।
    र घुवीर कृपा ते प्रसंगी ।
    दा समहात्म्य वाढवी ।।२।।

    र जनीनाथ आणि दिनकर ।
    नि त्य करिती संचार ।
    घा लिताती येरझार ।
    ला विले भ्रमण जगदिशे ।।३।।

    आ दिमाया मूळभवानी ।
    हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
    येकांती विवेक करोनी ।
    इष्ट योजना करावी ।।४।।

    पत्राच्या प्रत्येक ओवीचरण अद्दाक्षर घेतल्यास 'विजापूरचा सरदार निघाला आहे' ही सूचना मिळते.

    Communication च्या अनेक पद्धती त्याकाळात वापरल्या जात होत्या. बहुजन समाजाचे अनेक कलाकार त्यात वाकबगार होते. संबळ,मशालीच्या हालचाली,बोटांनी केलेल्या खुणा,कसरतीच्या प्रकारातून message देणे इत्यादी अनेक प्रकार होते.

    अफजलखान निघाला आहे हेच जर गुप्त हेरांना शिवरायांना सांगायचे असेल तर ? त्याकाळात वासुदेव,गोंधळी,बहुरूपी , रामदासी अशा अनेक प्रकारच्या लोकांना महाराज हेरगिरी करायला सांगायचे.आजही हि मंडळी आपले कार्यक्रम सदर करतात आणि message पाठवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात.

    श्री समर्थ रामदास स्वामींना शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचे महत्व पटले असल्याने आणि त्यांचे शिष्य सतत भ्रमण करीत असल्याने त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी हेरगिरी करण्यासाठी त्यांच्या शिष्यांना प्रोत्साहन दिले असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय समर्थ स्वतः स्वसंरक्षणासाठी गुप्ती बाळगत असत आणि त्यांचे शिष्य सुद्धा बाळगत असत.पण या गोष्टींचे त्यांनी प्रदर्शन केले नाही.

    मला मिळालेल्या माहिती नुसार समर्थांचे शिष्य ज्या सत्ताधीशांच्या सरदार ,जमीनदार यांच्या घरी माधुकरी मागायला जात त्या ठिकाणी ते राजकीय निरोप देत असत .

    -- चिंतामणी कारखानीस

      March 25, 2016


  • दादा लॉईड आणि सोबर्सचा (ष-फ)-टकार

    …नॉटिमगहमशायरच्या गॅरी सोबर्सने त्याच्या एका षटकातील समग्र कंदुके सीमारेषेवरोनिया दिगंतात धाडिली. पंचम कंदुक रॉजर डेविस नामक क्रीडकाच्या करांमध्ये विसावला खरा पण तोलभंगाने कंदुकासह तो मर्यादारेखा स्पर्शिता झाला.

      August 31, 2010


  • वॉरेन बफेट गुंतवणुकीचे महागुरू

    शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलं असतं . आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूक विश्वाने ‘ ओरॅकल ऑफ ओमाहा ‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे .

      November 1, 2022


  • नवरत्नमालिका – ३

    स्मेरचारुमुखमण्डलां विमलगण्डलम्बिमणिमण्डलां
    हारदामपरिशोभमानकुचभारभीरुतनुमध्यमाम् ।
    वीरगर्वहरनूपुरां विविधकारणेशवरपीठिकां
    मारवैरिसहचारिणीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ३॥

    आई जगदंबेच्या अतिदिव्य सौंदर्याचे आणि वैभवाचे लोकविलक्षणत्व विशद करतांना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

    स्मेरचारुमुखमण्डलां- स्मेर शब्दाचा अर्थ आहे दंतपंक्ती किंचित दिसतील अशा प्रकारचे मंद हास्य.
    अशा स्मेर हास्याने, चारू म्हणजे अत्यंत आकर्षक मुखकमलाने आई जगदंबा युक्त आहे.
    अशा अत्यंतिक सुंदरतम हास्याने युक्त असणार्‍या, विमलगण्डलम्बिमणिमण्डलां - विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, स्वच्छ, पवित्र. गंड म्हणजे गालाच्या वर आणि डोळ्यांच्या खाली असणारे, डोळे आणि कान यांच्यामधील उंचवटे.
    आई जगदंबेच्या या कपोल प्रदेशावर तिच्या मणी अर्थात विविध रत्न लटकवलेल्या बटा रुळत आहेत. अशा बटांनी अधिकच आकर्षक दिसणाऱ्या,

    हारदामपरिशोभमान- मोत्यांच्या असंख्य माळांनी अत्यंत शोभायमान असणाऱ्या,
    कुचभार- समस्त विश्वाच्या भरणपोषणासाठी पर्याप्त स्वरूपात विश्व तृप्तीकारक अमृताने भरलेल्या स्तन मंडलाने,
    भीरुतनुमध्यमाम् - मध्यभाग अर्थात नाजुक कंबर भंग पावेल की काय? अशी भीती असणाऱ्या, अर्थात आई जगदंबेची कंबर इतकी नाजूक आहे की हार आणि स्तनभाराने ती लचकेल की काय? अशी शंका निर्माण होते, इतकी नाजूक.
    वीरगर्वहरनूपुरां- विश्वातील समस्त वीरांचा गर्व ज्या नुपुरांच्या अर्थात त्या पैंजणांनी युक्त असणारी चरणकमले नष्ट करतात अशा,

    अर्थात जगातील सर्व वीर जिच्या चरणी शरण येतात अशा, विविधकारणेश्वरपीठिकां- अनेक शंकरांना आपले चरणपीठ म्हणजे पाय ठेवण्याचे साधन समजणाऱ्या,

    मारवैरिसहचारिणीं- मार अर्थात कामदेव. त्याचे वैरी म्हणजे भगवान शंकर. त्यांची सहधर्मचारिणी असणाऱ्या,

    मनसि भावयामि परदेवताम् - परमदेवता आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 17, 2020


  • वेदसार शिवस्तोत्रम् – १०

    भगवान श्रीशंकरांच्या वैभवाचे कथन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात….

      August 23, 2020


  • अन्यायाविरुद्ध आवाज – कवयित्री नेली जाक्स

    अन्यायाविरुद्ध आवाज – कवयित्री नेली जाक्स

    केवळ यहुदी असल्यामुळे तिला बरेच काही भोगावे लागले. याचेच अनुभव तिने आपल्या कवितेत मांडले आणि तिच्या उत्कृष्ट कवितांना १९६६ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. सॅम्युअल जोसेफ अग्नान हे आणखी एक लेखक तिच्याबरोबर नोबेल पुरस्काराचे सहविजेते होते. या कवयित्रीचे नाव होते नेली जाक्स.

      August 13, 2023


  • साडेसाती म्हणजे काय? -भाग १ ला (पूर्वार्ध)

    काल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी त्या सर्वाना सांगितले.

      January 17, 2017


  • गगनचुंबी इमारतींना आधार कशाचा?

    आजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते.

      January 13, 2023


  • डायल २६११, देशाचे सुरक्षा कवच !

    जगात सुरक्षा आणि संरक्षणासाठी विविध उपाय योजना तयार केल्या व राबवल्या जातात. कोणताही प्रगत देश असो आता पर्यंत यातील कोणतीही यंत्रणा वा कार्यप्रणाली हा ठोस किंवा निश्चित उपाय होऊ शकला नाही. अमेरिका, चीन, ईस्रायल, जपान सारखे देश आजही पर्यायी उपायासाठी चाचपडत आहेत. यावर पुण्यातील शास्त्रज्ञ, टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअर तथा माजी तंत्रज्ञान सल्लागार भारत सरकार श्री. दिनकर बोर्डे यांनी तयार केलेल्या “डायल २६११” या परियोजनेमुळे जगाला एक कायमस्वरुपी नागरी, सामाजिक, विभागीय, अंतर्गत, सीमावर्ती, तटवर्ती, अवकाशीय आणि देशीय सुरक्षा आणि संरक्षणासाठीचा ठोस व परिणामकारक उपाय मिळणार आहे

      August 9, 2010