(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १३

    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश |
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा ‖ १३ ‖

    काव्य-शास्त्रात व्याज स्तुती किंवा व्याज निंदा अलंकार आहेत. अर्थात लेखक जे लिहित असतो त्याच्या वेगळाच अर्थ अपेक्षित असतो.
    वरपांगी निंदा दिसते. अपेक्षित असते स्तुति. वरपांगी स्तुती केलेली असते मात्र प्रत्यक्षात निंदा करायची असते.
    अशीच काहीशी रचना या श्लोकात आचार्यश्री करतात. ते म्हणतात,
    न शक्नोमि कर्तुं परद्रोहलेशं
    कथं प्रीयसे त्वं न जाने गिरीश - हे भगवान गिरिजापती ! मी कधीही कोणाचा लेशमात्र देखील द्रोह करू शकत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसे प्रसन्न व्हाल? हेच मला समजत नाही.
    वास्तविक कुणाचाही द्रोह न करणाऱ्यावरच भगवान प्रसन्न होणार. मात्र येथे आचार्यश्री उलट बोलत आहेत. इतकेच नव्हे तर ते पुढे म्हणतात,
    तथाहि प्रसन्नोऽसि कस्यापि
    कांतासुतद्रोहिणो वा पितृद्रोहिणो वा - तुम्ही प्रसन्न होता ते पण कोणावर? तर जे पत्नी कन्या किंवा पित्याशी द्रोह करतात.
    पत्नीशी बेईमानी करणारा रावण, कन्येचा अपमान करणारा दक्ष आणि वडिलांची इच्छा नाकारून तप करणारी पार्वती, यांना भगवान प्रसन्न झाले. अशा विविध कथा पुराणांमध्ये आपणास वाचावयास मिळतात.त्या पौराणिक कथांचा आचार्य संदर्भ घेतात. त्यांच्यावर भगवान शंकरांनी कृपा केली होती.
    तुम्ही अशा द्रोहींना प्रसन्न होता. यात भगवंताची वरपांगी निंदा वाटते.
    मात्र त्यांना म्हणायचे आहे की अशा सगळ्यांवर, अशा अशास्त्रीय कृती करणाऱ्यांवर देखील आपण कृपा करता ,मग माझ्यासारख्या स्वच्छ व्यक्तीचा अव्हेर कसा कराल?
    यांच्या उद्धारात निंदा नाही तर त्यांचाही उद्धार करण्याइतके आपण उदार आहात अशी स्तुतीच आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 22, 2020


  • एक रुबाबदार अभिनेता – विनोद खन्ना

    गुलजार आपल्या पहिल्या मेरे अपने  चित्रपटासाठी एका वैफल्यग्रस्त तरुणांच्या भूमिकेसाठी शोध घेत होते. त्याच वेळी त्यांची नजर विनोद खन्नावर गेली. त्यांनी त्याला ती भूमिका दिली. त्याच्या या कामाला मिनाकुमारीने सुद्धा दाद  दिली.

      August 13, 2022


  • बाटलीतले पाणी

    बाटलीतले पाणी विकत घेउन पिणे ही एक फॅशन झालेय का? हा प्रकार गेल्या काही वर्षातच फोफावला आहे. खरं आहे की बाटलीतलं पाणी शुद्ध असतं, त्याने पोटाचे विकार-बिकार होत नाहीत वगैरे वगैरे. पण त्यासाठी विकत घेतलेल्या बाटलीतलंच पाणी प्यायला हवं असं कुठे आहे? घरातूनही पाणी बाटलीत भरुन घेउन जाता येतंच की? पण त्याने स्टेटस खाली येतं असं मंडळींचं म्हणणं असतं. १ रुपयाचं पाणी १५-२० रुपयाला घेतलं की स्टेटस वाढतं म्हणे !

    आता काही मजेदार गोष्टी बघूया.

    आपण एखाद्या मोठ्या नावाजलेल्या हॉटेलमध्ये जातो. टेबलावर स्थिरस्थावर होत नाही तोच वेटर आपल्याला विचारतो... “साहेब, पाणी बिसलरीचं की साधं?” (तो मराठीत विचारत नाही हा भाग वेगळा)

    आपण आजुबाजूला नजर टाकतो. आपल्याबरोबरच्या माणसांना उगाचच विचारल्यासारखं करतो आणि त्याला ऑर्डर देतो... “बिसलरी”.

    आपल्याला हे माहित असतं का, की ग्रेड १ च्या सगळ्या हॉटेल्समध्ये वॉटर प्युरिफायर बसवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. मग जर त्या हॉटेलमध्ये वॉटर प्युरिफायर बसवला असेल तर मुळातच त्या वेटरने आपल्याला बिसलरी हवंय का असं विचारायलाच नको. पण तो त्या हॉटेलवाल्याच्या व्यवसायाचा भाग झाला.

    वेटरने विचारलेला एक साधा प्रश्न.... आणि त्याच्या उत्तराने आपण फटकन पंधरा-वीस रुपयांचा चुराडा करतो. स्टेटससाठी !

    बरं आता तो वेटर आपल्यासाठी पाण्याची बाटली घेउन येतो. ती बहुतेकवेळा बिसलरीची नसते. कुठल्यातरी भलत्याच ब्रॅन्डची असते. आपण मात्र काहीही न बोलता ती निमूटपणे उघडतो आणि त्यातलं पाणी समोरच्या ग्लासात भरुन प्यायला सुरुवात करतो. इथे आपल्या त्या बाटलीतल्या शुद्ध पाण्याचे बारा वाजलेले असतात कारण तो ग्लास कुठच्या पाण्यात धुतलाय हे आपण लक्षातच घेत नाही !

    काही विशिष्ट हॉटेल्समध्ये पाणी दिलं जात नाही. तिकडे पाण्याची बाटलीच विकत घ्यायला लावतात. मॅकडोनल्ड हे त्यातलंच एक. काही वर्षापूर्वी माझं तिकडे त्यावरुन भांडण झालं. खाद्यपदार्थ विकणार्‍या कोणत्याही हॉटेलमध्ये गिर्‍हाईकाला पाणी मोफत द्यायला पाहिजे असा नियम आहे. तो नियम दाखवून पाणी न दिल्याबद्दल तक्रार करीन असे सांगितल्यावर निमूटपणे मला ग्लासमधून पाणी दिलं गेलं. किती जण या मार्गाचा अवलंब करतात?

    काही गोष्टींना एखाद्या ब्रॅंडच्या नावाने ओळखलं जातं. आपण झेरॉक्स काढतो. खरंतर ती फोटोकॉपी काढली जाते आणि त्यासाठी पहिलं मशीन आलं ते झेरॉक्स कंपनीचं म्हणून फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स असं समीकरण झालं. मी पूर्वी एकदा उत्तर प्रदेशातल्या मधल्या एका गावातल्या एका दुकानात उभा होतो. एका ग्राहकाने “लालवाला कोलगेट देना” असं त्या दुकानदाराला सांगितलं आणि दुकानदारानेही शांतपणे “क्लोज-अप”ची लाल टूथपेस्ट कार्ढून दिली.

    “बिसलरीचं पाणी” याचं पण तसंच आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही सीलबंद पाण्याच्या बाटलीला बिसलरी म्हटलं जातं. सिलबंद पाण्याचा हा हजारो कोटींचा धंदा आहे. तो असा सहजासहजी बंद होणार नाही. कारण त्या धंद्यावर आज एक इकॉनॉमी चालते. १ रुपयाचं पाणी २० रुपयांना विकल्यामुळे आज काही कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात सातत्याने वाढ होते.

    या बाटलीबंद पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांवरही एक समांतर अर्थव्यवस्था (parallel economy) चालते हे माहित आहे? सर्वसाधारणपणे ७० टक्के ग्राहक रिकाम्या बाटल्या तशाच टाकून देतात. या बाटल्या जमा करुन पुन्हा भरुन आपल्यालाच विकणं हा एक प्रचंड मोठा धंदा सुरु आहे. साधारणपणे रेल्वे स्टेशन, बस स्टॉप अशा ठिकाणी अशा रिसायकल केलेल्या बाटल्यांमधलं, कुठेही भरलेलं पाणी आपल्याला विकलं जातं.

    आता आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघू. या बाटलीबंद पाण्याला एक एक्सपायरी डेट असते. मात्र ती बाटलीवर अशा प्रकारे आणि अशा ठिकाणी छापलेली असते की सहजपणे आपल्याला ती दिसतच नाही आणि शोधत बसायला एकतर आपल्याला वेळ नसतो किंवा ती डेट शोधत बसणं हे आपल्या तथाकथित स्टेटसच्या आड येतं. आपण म्हणाल की पाण्याला कसली आलेय एक्सपायरी डेट. पण लक्षात घ्या पाण्याला एक्सपायरी डेट नसली तरी पाणी प्लास्टिकच्या बाटलीत किती दिवस साठवून ठेवायचं त्याला असते.

    इतर कोणत्या देशात पिण्याचं बाटलीबंद पाणी वापरलं जातं हे तपासायला पाहिजे. कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच देश निघतील आणि त्यातही “मेरा भारत महान”चं स्थान सर्वात वरचं असेल.

    -- निनाद प्रधान

      March 25, 2016


  • श्री भ्रमरांबाष्टकम् – ८

    कर्पूरागरुकुङ्कुमाङ्कितकुचां कर्पूरवर्णस्थितांकृष्टोत्कृष्टसुकृष्ट कर्मदहनां कामेश्वरीं कामिनीम् ।
    कामाक्षीं करुणारसार्द्रहृदयां कल्पान्तरस्थायिनीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ८॥

    कर्पूर- कापूर

    आगरु- काळे चंदन

    कुङ्कुम- कुंकू

    अङ्कितकुचां- यांनी वक्षस्थल व्याप्त असलेली. या सगळ्यांची उटी आई जगदंबेने शरीराला लावली आहे. कर्पूरवर्णस्थितां- कापरा प्रमाणे शुभ्र पांढऱ्या रंगाची.

    कृष्टोत्कृष्ट- कृष्ट म्हणजे निम्न तर उत्कृष्ट म्हणजे अप्रतिम.

    सुकृष्ट- सुयोग्यरीत्या केलेले,

    कर्मदहनां - कर्माला जाळून टाकणारी.
    कर्माची रचना एखाद्या बीजाप्रमाणे असते. बीज ज्या प्रकारचे असते वृक्ष त्या प्रकारचा निर्माण होतो. तसे कर्म जसे असते तसे फळ प्राप्त होते. मात्र जर हे बी भाजले आणि नंतर पेरले तर ते उगवत नाही. त्याप्रमाणे एकदा आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की मग कोणत्याही कर्माचे फळ अर्थात बंध लागत नाहीत.

    कामेश्वरीं - सर्व कामना अर्थात इच्छांची अधिष्ठात्री.

    कामिनीम् - भक्तांच्या, साधकांच्या सकल कामना पूर्ण करणारी.

    कामाक्षीं- काम म्हणजे इच्छा. अक्षी म्हणजे निवास. सकल कामनांचे निवास अर्थात मूळ स्थान. करुणारसार्द्रहृदयां- कारुण्य रसाने जिचे हृदय भरलेले आहे अशी. कल्पान्तरस्थायिनीं-
    भगवान श्री ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी या संपूर्ण विश्वाचा जो लय होतो तो पर्यंतच्या काळाला कल्प म्हणतात. त्यावेळी सर्वकाही नष्ट होते. मात्र त्यावेळी सुद्धा नष्ट होणारी आदिशक्ती कल्पान्तरस्थायिनी संबोधिली जाते.

    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये - श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 10, 2020


  • अल्कोहोलऐवजी इथेनॉल!

    उसाच्या इथेनॉलचा इंधनात वापर न करून आपण किती मोठी चूक केली, हे सहज लक्षात येऊ शकते. वस्तुस्थिती ही आहे, की स्वातंत्र्यानंतर साखर निर्मिती कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इथेनॉलचा संपूर्णपणे इंधन म्हणून वापर केला असता, तर आज भारतावर एका पैशाचेही कर्ज राहिले नसते. किमान आतातरी सरकारने उसापासून इथेनॉल आणि धान्यापासून मद्य निर्मितीचे धोरण स्वीकारून विनाकारण खर्च होणाऱ्या विदेशी चलनाची बचत करावी!

      January 10, 2010


  • बृहन्महाराष्ट्र व महाराष्ट्रीयत्व

    बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा.

      June 24, 2016


  • ऑक्टोबर १० – पहिले झिम्मी शतक आणि हातोडा हेडन

    १० ऑक्टोबर १९८७ रोजी भारतात हैदराबादच्या मैदानावर एक उच्चकोटीची एकदिवसीय खेळी झाली. झिंबाब्वेचा कर्णधार डेव हटनने विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली.

      October 5, 2010


  • कुरतडलेला नकाशा हिंदुस्थानचा

    ०५ ऑगस्ट म्हणजे हिंदूस्थानचा स्वातंत्र्य दिवस यावर्षी ५८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. पण ५८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत त्या देशाचा नकाशा नीट, व्यवस्थित पाहिला आहे का? जो नकाशा आपले राज्यकर्ते आपणांस दाखवितात तसा तो १९४७ साली होता का? जो नकाशा आपले राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवितात आणि आपणही त्याला हाच माझा देशाचा नकाशा आहे. असे म्हणू लागलो. पण प्रत्यक्षात तो तसा होता का? नाही.

      August 15, 2005


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४०

    भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं
    भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् |
    नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या
    सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖

    या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात,
    भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे,
    अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना अकल्प असे म्हटले. अर्थात त्यांना विनाश नाही.
    शंभो - हे भगवान शंकरा ! कल्याणकारका !
    मयैवं - मी अशा प्रकारे
    भुजंगप्रयातेन वृत्तेन - भुजंगप्रयात या वृत्तामध्ये, एखादा वळवळणारा नागराज पुढे जात असताना त्याची गती ज्या प्रकारची असते त्याप्रकारची लय या वृत्तात असल्याने याला भुजंगप्रयात असे म्हणतात.
    क्लृप्तम् - आपले स्तवन रचलेली आहे.
    नरः - जो कोणी मानव, स्तोत्रमेतत् - या स्तोत्र रचनेला,
    पठित्वोरुभक्त्या - दृढ भक्तीने पठन करील,
    सुपुत्र - सद्गुणसंपन्न संतती, सातत्यपूर्ण वंशपरंपरा,
    आयु: - प्रदीर्घ आयुष्य,
    आरोग्यम् - निरोगी जीवन, जो वेगळ्या आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. याच्याशिवाय अन्य निरर्थक आहे.
    ऐश्वर्यम् - विविध प्रकारचे ऐश्वर्य.
    एति - प्राप्त करेल.
    या एति शब्दामध्ये या सर्व गोष्टींसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागणार नाहीत तर या सर्व गोष्टी भगवान श्री शंकरांचा कृपेने, आपोआपच त्यांच्याकडे चालत येतील असा सुंदर भाव आहे.
    अर्थात या स्तोत्राच्या पठनाने त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतील.
    त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल.

    जय भोलेनाथ !

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 19, 2020


  • कोडमंत्र – एक अफलातून मराठी नाटक

    कोडमंत्र. एक अफलातून मराठी नाटक . हे नाटक पाहून बाहेर पडत असताना भारावून गेलेला नाही असा नाट्य - रसिक नसेल . भले प्रतापराव निंबाळकर ( अजय पूरकर ) ही या नाटकातील व्यक्तिरेखा जे वागते असे चित्रणजे या नाटकात आहे , ते वागणे चूक की बरोबर याविषयी मत - मतांतरे जरूर असतील ; पण हे नाटक अफलातून याविषयी मात्र पूर्णपणे मतैक्य . आणि फक्त मतैक्यच . मुक्ता बरवे आणि अजय पूरकर या दोघांच्याही नाट्य- क्षेत्रातील कारकीर्दीला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवणारी अशी या दोघांची या नाटकातली कामगिरी आहे . या नाटकातील इतर कलाकारांचीही , अगदी चाळीसच्या चाळीस NCC cadet सह , ( आमच्या डोम्बिवलिचे आहेतते ) सगळ्यांचीच कामगिरी इतकी उत्तम आहे की त्याशिवाय हे नाटक इतके उठावदार , इतके परिणामकारक होणारच नाही .

    आपण सगळेच इतके आपल्या स्वतःच्या सवयीन्चे गुलाम असतो की एखादी सवय एकदा लागली की लागली . लोक त्याबाबत आपल्याला कितीही बोलली ( चांगलेही आणि वाईटही ) तरी आपण तसेच वागत राहातो . अगदीआपल्या स्वतःच्याही नकळत .
    आता हेच पाहा ना ! अलिकडच्या काळात मला एक सवय लागली आहे . . ती म्हणजे कोणतेही नाटक , कोणताही सिनेमा पाहाताना , माझ्याही नकळत माझे मन त्या कथा - वस्तूची , त्यातल्या संवादाची सांगड गुंतवणूकक्षेत्राशी घालू लागते . इतकेच नाही तर ते मी असे फ़ेसबुक वर लिहीत जातो . त्याचीही आता सवयच लागली आहे . सवय कसली , अगदी व्यसनच म्हणा ना ! ! ! " सवयीतूराणा न भयं न लज्जा " अशातली गत . . . . मीअसे लिहिलेले वाचण्याची सवय तुम्हांलाही लागली असेल आणि तो " जुलमाचा राम - राम " नसेल अशी आशा आहे .
    हे आता इथे आठवायच कारण म्हणजे या नाटकाच्या प्रौढ नायकाला आपली कमांड सर्वोच्च पातळीवर असण्याची इतकी सवय झालेली असते की ते स्थान टिकवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो . अगदी त्याच्यावरिष्ठनी तसे करण्यास औपचारिक , आणि अनौपचारिक रित्याही , मनाई केलेली असूनसुद्धा . या स्थितीचे वर्णन या नाटकाच्या जाहिरातीत फार छान , समर्पक शब्दांत येते . . . . " कर्तव्य आणि कर्त्यव्याचा अतिरेक यांतलीसीमारेषा पातळ . . . "
    दोन - तीन वेळा हे नाटक पाहूनही ही ओळ काही माझा पिच्छा सोडता सोडत नाहीये . माझाही याबाबतीत अतिरेक होत आहे की काय अशी माझी मलाच शंका यावी इतका पिच्छा .
    पण दरवेळी मला असे वाटते की आपणां सगळ्यांचे स्वतःच्या गुंतवणुकीबाबत असे झाले पाहिजे . अगदी पूर्णपणे नाही तरी फार मोठ्या प्रमाणात तरी .
    पण ते नाही होत ना तसे ! ! ! झाले तरी ते फारच थोड्या जणांचे होते आणि झाले तरी फार थोड्या प्रमाणात होते . हीच तर खरी शोकांतिका आहे . अशावेळी " कोडमंत्र " हे नाटक ज्या मूळ पुस्तकावर आधारीत आहे , त्यापुस्तकाचे नाव " A Few Good Men " असॆ आहे याचे नवल वाटेनासे होते . काही ( काहीच हो ) माणसे गुंतवणूक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असतात आणि ती " चांगलीही " असतात बरं का ! ! अगदी " पैशांच्या मागेलागला " अशी हेटाळणी जरी त्यांच्यामागे केली गेली तरी .
    जणू काही इथेही ते काम फक्त " A Few Good Men " यांचेच .आपण सगळे गुंतवणुकीच्या बाबतीत अनिच्छ आणि अनिच्चेचा अतिरेक , अद्न्यान आणि अद्द्न्याचा अतिरेक , आळस आणि आळसाचा अतिरेक , अभाव आणिअभावाचा अतिरेक यांच्या सीमारेषा पातळ करण्याच्या फिकिरीत असतो . खरं म्हणजे , याच नाटकातील वाक्य वापरत सांगायचे तर याबाबतीत आपली मनोभूमिका " १ टक्का जरी चान्स असला तरी त्यासाठी आपण टक्के प्रयत्नकरायला हवे . " अशी आणि अशीच असायला हवी . फक्त त्यासाठी गुंतवणूक करत राहण्याची सवय अंगी बाणवून घेतलिच पाहिजे . आणि तीही भक्तिने ; सक्तीने नव्हे . पुन्हा याच नाटकातील वाक्य आधाराला घेत सांगायचेझाले तर " मंत्र श्रद्धेने म्हणायचे असतात ; सक्तीने नव्हे . " मंत्र म्हणण्यासाठी आधी त्याची माहीती , मग त्यांचा अभ्यास आणि मग त्यांचा सराव असावा लागतो . तेंव्हाच ते मंत्र पावतात . गुंतवणूकीचेही अगदी तसेच असते. अगदी अविचल श्रद्धेची दोन्ही क्षेत्रे आहेत ही . . . . . .

    हे असे जमवण सुरवातीला कदाचित कठीण वाटेलही . पण ते जमवण असलेच तर कठीण आहे ; अशक्य नाही . वेगळ्या शब्दांत सांगायचे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे . नियमितपणे गुंतवणूक करत राहणे हीआपली स्वतची गरज आहे हे आपण मनमोकळं होत मान्य करावे लागते . एकदा ते मान्य केले की या नाटकात सांगितले आहे तसे " जरूरत की चीज़ें ढूँढ़ने मे वक्त नही लगता " याचा ( प्रसन्न ) अनुभव येऊ लागतो . हे असॆवागणे हळूहळू अंगवळण पडले की तो आचारधर्म ही बनू शकतो . बनतोही काळाच्या ओघात . आणि असे होत असतानाच परत एकदा " कोडमंत्र " नाटकातले वाक्य आधाराला घेत बोलायचं असेल तर " गरज ही धर्मापेक्षा मोठीअसते " हे मनोमन उमजू लागते . ( हे नाटक पहिल्यांदा पाहात असताना हे वाक्य जेंव्हा मी ऐकले तेंव्हा निष्कारणच मला दूरचित्रवाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या एका चहाच्या ब्रॅंड ची जाहिरात आठवली होती . असो . )

    नियमितपणे गुंतवणूक करत राहण्याची सवय स्वतःला लावून घेत असताना एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअर - बाजारात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टींवर नाहीयाची माहिती करून घेत राहण्याची ही सवय करून घेत राहावी लागते . कारण बळीचे बकरे शोधण्यात हे क्षेत्र एकदम तरबेज असते . " जाळे कुठे टाकायचे हे कोळ्याला नेमके माहीत असते " हे या नाटकातील वाक्य त्यापरिस्थितिचे एकदम चपखल वर्णन आहे .
    हे महत्वाचे अनेक कारणांनी आहे . असते . पहिले म्हणजे हा पैशांचा मामला आहे . त्याबाबत आपली सहनशक्ती सर्वार्थाने मर्यादीत असते .
    दूसरे म्हणजे चांगल्या सवयी लागायला नेहमीच जास्त वेळ लागतो . वाईट सवयी मात्र लगेचच लागतात . निदान लागू शकतात .कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब आणि तीही टोकाची प्रतिक्रिया देण्याची शेअर - बाजाराला उपजतसवय असते . ती तेवढी आपण विनासायास अन्गिकारतो . मग त्यातूनच " सफरचंद कापायला सूरी ऐवजी कुर्हाड " वापरली जाऊ शकते .
    तिसरे म्हणजे गुंतवणूक क्षेत्रातील संधी या नेहमीच माहितीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात . अशी माहीती विश्वासार्ह्य असणे अत्यावश्यक असते . या बाजारातच असॆ नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी चूक आणि बरोबर ,सत्य आणि असत्य अशा सगळ्याच बातम्या फिरत असतात . त्यातही खरी बातमी पसरायला जास्त वेळ लागतो . खोटी बातमी मात्र वाऱ्यांच्या वेगाने फिरते . या नाटकात याबाबत छान वर्णन आहे . त्यानुसार " सत्य पायातचप्पल घालून घराबाहेर पडे पर्यंत असत्य अनवाणी अख्ख गाव फिरून आलेले असते . " त्यामुळे त्याची शहानिशा करावी लागते .

    याबाबत अजूनही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे या नाटकात जरी " पुरावे नसतात ही सत्याची लाचारी असते " असॆ जरी म्हणले असले तरी गुंतवणूक क्षेत्रात मात्र सत्याला पुरावे असतात . खरं म्हणजे , फक्तसत्यालाच पुरावे असतात . ते सहजासहजी उपलब्ध असतीलच , असतातच असॆ नाही . पण ते असतात . प्रसार - माध्यमे आणि जग - दुनिया यांनी उठवलेल्या उलट - सुलट चर्चेच्या गदारोळत ते नीट दिसत नाहीत , ऐकूयेत नाहीत काहीवेळा ! ! ! पण ते असतात . ते पाहाणयाची सवय मात्र लावून घ्यावी लागते . ते फारसे सोपे नसते . आपल्या मनाच्या ठाम समजूती , आपले भाबडे विश्वास , आपणच आपलीच घातलेली , करून घेतलेलीसमजूत अशा अनेक गोष्टी त्याच्या आड येत असतात . सत्य आणि भाव - बंध , सत्य आणि नातेबन्ध याची बहुपदरी वीण ओलांडून पुढे जाणे का सोपे असणार आहे ? पण तसे जाणयाला काही पर्याय नाही . ( " आयुर्विम्यालापर्याय नाही " हे वाक्य निश्कारनच मनात डोकावून गेले ना ! ) पण गुंतवणूक क्षेत्रातली " शर्यत जिंकणे आणि हरणे " त्यावर अवलंबून असते . त्यासाठी नियमित गुंतवणूक हे आपल्या सगळ्यांचे नित्य - कर्तव्य बनलेच पाहिजे. " कोड - मंत्र " नाटकातील संवाद घेत सांगायचे झाले तर गुंतवणूक नियमितपणे करत राहण्याच्या " कर्तव्यात सबब दिली नाही आणि स्वीकारलीही नाही " असं झाले पाहिजे . यातूनच सत्य स्वीकारण्यास लागणारी " ताकद ,हिम्मत आणि किंमत " मिळते . आणि ती मिळाली की " सत्याला धरून चालन्याची ताकद असणारा आत्महत्या करत नाही " म्हणजे काय ते प्रत्यक्षात अंमलात आणता येते .

    त्यासाठी आपल्या स्वभावानुसार , ऐपतीप्रमाणे आपलीच आपणच एक आचार - विचार संहीता बनवायची गरज , आवश्यकता असते . कारण ती व्यक्तिसापेक्श असते . एखादे औषध खोकल्यावर चालते हे जरी बरोबर असलेतरी त्या औषधांची त्या संबंधित माणसाला अलेर्जी तर नाही ना याचा विचार ते औषध त्या माणसाला देण्या - घेण्याआधी करावाच लागतो . तसेच ते औषध , त्या माणसाला , त्यावेळी देता येणार असले तरी ते किती प्रमाणातद्यायचे हे परिस्थितींनुसार बदलू शकते . औषधांच्या प्रमाणाबाबत जरी काही ठोकताळे असले तरी ते काही प्रमाणात सापेक्ष असतात . त्याबाबत आपण ठरवलेली संहीता म्हणजे कोडमंत्र . ती काही कोणत्या पुस्तकात लिखितस्वरूपात दिलेली नसते . ती अनुभवातून सिद्ध होत राहते . " Internally official Disciplinary Measure " म्हणजे कोडमंत्र असंच तर या नाटकात सांगितले आहे . यंत्र ( हत्यार ) , तंत्र ( जबाबदारी ) आणि मंत्र (चुकिला क्षमा नाही ) यातूनच हा आणि असा " कोडमंत्र " घडत जातो . घडत राहतो . त्याचा अतिरेक झाला तर " कोर्टमार्शल " होते असॆ नाटक आहे .

    कोणत्याही " कोडमंत्र " च्या अभावातून आपले आर्थिक आयुष्य प्राणांस मुकते .
    कोडमंत्र हे मराठी नाटक मूळ गुजराथी नाटकावरून बेतले आहे हे अशावेळी फार सांकेतिक वाटू लागते .
    तसेच हे नाटक आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना अगदी पहिला विचार जो माझ्या मनात आला ( इथे मात्र तो मी या लेखाच्या शेवटी मांडत आहे . ) तो मात्र अगदी बालिश होता . या नाटकात ४० NCC cadetsआणि दहा कलाकार मिळून एकूण ५० कलाकार आहेत . आपल्या NIFTY या निर्देशान्कातही ५० कंपन्यांच्य शेअर्सच्या बाजार - भावांचा समावेश असतो ; तर या चाळीस आणि दहा यांच्या वजाबाकी इतके म्हणजे ३० कंपन्यांच्याशेअर्सचा आपल्याच Sensex मधे समावेश असतो . हा गन्मतीचा भाग सोडून देत आपली गुंतवणूक कोडमंत्र या नाटकांसारखीच प्रचंड यशस्वी होवो हीच सदिच्छा . शुभेच्छा .
    असा साक्षेपी , सापेक्ष कोडमंत्र उघड्या डोळ्यांनी , सदसदविवेकबुद्धी जाग्रुत ठेवत नियमितपणे गुंतवणूक करण्यातून आपल्याच आयुष्याची कामगिरीही वेगळ्याच पातळीवर जाईल . . . . या नाटकातल्या कलाकारांच्याअभिनयासारखी . याविषयी अगदी मतैक्य . आणि मतैक्यच .

    कोडमंत्र . कोडमंत्र गुंतवणूकीचा .

    चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१
    मोबाईल - ९८२०२९२३७६ .
    E-Mail - tilakc@nsdl.co.in

    ९ डिसेंबर २०१६

      December 17, 2016