(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आजची औषधी : हरिद्रा (हळद)

    ● हळद हे सर्वश्रेष्ठ नैसर्गिक जंतूघ्न औषध आहे.

    ● कोणत्याही त्वचारोगात हळद उपयोगी पडते. खाज - खरूज असल्यास हळद उगाळून लेप द्यावा. सोबत कडुनिंबाची पाने ठेचून हळदीच्या चूर्णासोबत पोटात घ्यावी.

    ● 'हरिद्रा प्रमेहहराणाम्…..' म्हणजेच मधुमेहाच्या औषधांमध्ये हळद सर्वश्रेष्ठ आहे.

    ● कोणत्याही वयामध्ये पोटात जंत झाले असल्यास हळद चूर्ण व कडुनिंबाच्या पानांची गोळी करून वावडिंगाच्या काढ्यातून घ्यावी.

    ● हळद ही उत्तम शोथहर (सूज कमी करणारी) व जंतूघ्न असल्यामुळे घसा दुखी व सूज ; सर्दी , खोकला असताना गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्या.

    ● याशिवाय , अंगावर कोठेही मार लागून आलेल्या सुजेवर हळद आणि तुरटी एकत्र उगाळून लेप द्यावा.

    ● कोणत्याही प्रकारची जखम हळदीने भरून येते. जखमेतून येणारे रक्त थांबवतेच , शिवाय हळदीने जखम धुतल्यामुळे त्यात संक्रमण (infection) न होता ती लवकर भरून येते.

    ● वाताच्या रोगांमध्ये हळद तुपातून घेणे फायदेशीर ठरते. हळद साखरेबरोबर पित्तशामक आहे. तर मिठासोबत घेतल्यामुळे ती कफाचे रोग बरे करते. अशा प्रकारे हळद त्रिदोष शामक आहे.

    ● हळद मधातून चाटल्याने श्वसनसंस्थेचे रोग , जसे सर्दी-खोकला , दमा , आवाज बसणे , क्षयरोग यांच्यामध्ये लाभ होतो.

    ● स्त्रियांमध्ये प्रसुतीपश्चात दुधातून हळद घेणे फायदेशीर ठरते. याने अंगावरचे दूध (breast milk) वाढते आणि रक्तशुद्धीही होते. या काळात होणारे कंबरदुखी सारखे त्रासही टळतात.

    ● हळद ही सर्वश्रेष्ठ वर्ण्य म्हणजेच त्वचेचा रंग उजळणारी आहे. नुसता हळदीचा वास असणार्‍या क्रीम्सपेक्षा खरी हळद उगाळून लावल्यास उत्तम फरक पडतो.

    ● कोणतेही गळू किंवा फोड पिकून फुटण्यासाठी हळद आणि सुंठ उगाळून लेप लावावा.

    ● मुळव्याधीत हळद तुपात उगाळून लेप द्यावा.

    ● निरोगी व्यक्तीनेसुद्धा एक ग्रॅम हळद गरम पाणी किंवा दुधातून रात्री झोपताना घेतल्यास माणूस वज्रदेही बनतो. म्हणजेच , त्याची रोग प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा उत्तम राहाते.

    [ टीप - सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]

    डॉ. अमेय गोखले ,
    रत्नागिरी.
    9422662772.
    (05-05-2017)

  • शनीचा गाभा

    शनीला घन स्वरूपाचा पृष्ठभाग नाही. तरीही या संशोधनामुळे, त्याच्या गाभ्याच्या रचनेची माहिती करून घेणं, हे शक्य झालं. कारण क्रिस्टोफर मँकोविच आणि जीम फ्यूलर यांनी शनीच्या कड्यांनाच प्रचंड ‘भूलहरीमापक यंत्रा’चं स्वरूप दिलं आहे. या संशोधनातून शनीचा गाभा आगळा-वेगळा असल्याचं दिसून आलं.

  • आहाररहस्य २

    सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, नाहीतर जुलाब.

  • “धड भारतीय; मस्तक विदेशी!”

    भारतातील गरिबी दूर झाली, हा देश बलाढ्य झाला, इथे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले, काम करणार्‍या हातांची संख्या वाढली, तर आपली दुकानदारी बंद होईल, ही भीती ज्यांना वाटते त्या परकीय शक्तींचा पगडा इथल्या सरकारवर आहे. हे सरकार भारतातील नव्हे, तर विदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे डोके चालवित आहे आणि त्यातूनच देशविघातक धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. अन्यथा “गरिबी हटाओ” या नार्‍याऐवजी “अमीर बनो” असा नारा काँगे्रसने दिला असता.

  • अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – ३

    अमेरिकन शेतीच्या प्रगतितील ठळक टप्पे
    १९ व्या शतकातील प्रगती – मनुष्यबळ ते अश्वशक्ती – शेती हा नेहमीच एक कष्टाचा उद्योग राहिला आहे. जमिनीची मशागत, पेरणी, तण काढणे, पिकाला पाणी देणे, पिकाचे रक्षण करणे, तयार झालेले पीक काढणे, धान्य साठवणॆ किंवा धान्य बाजारात नेण्यासाठी तजवीज करणे, एक ना दोन, हजार गोष्टी. १९ व्या शतकातलं अमेरिकेतलं महत्वाचं पीक म्हणजे गहू. अमेरिकन शेतकरी जुनीपानी लाकडी अवजारं वापरून मातीतली ढेकळं फोडण्यापासून सारी कामं हाताने करायचा. अगदी पार कापणी, मळणी आणि गव्हाची साठवणी करण्यापर्यंत सारी कामं हातानेच व्हायची.

    १९ व्या शतकात, जसजशी तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली, तसतसं कमी कष्टात अधिक धान्योत्पादन शक्य होत गेलं. शेतं मोठी मोठी होत गेली. वेगवेगळ्या तांत्रिक अवजारांच्या कंपन्यांनी, पेरणीची वेगवेगळी यंत्रं तयार केली. १८३० च्या दशकात, शेतातलं तयार पीक कापण्यासाठी देखील यंत्रांचा वापर सुरू झाला. घोडयांच्या जोडीमागे असं कापणीचं यंत्र लावल्यावर कापणी अधिकच सुलभ होऊ लागली. कापणीच्या यंत्रामागे फिरत शेतकरी कापलेल्या ओंब्या गोळा करून, त्यांच्या राशी बनवून शेतात सुकण्यासाठी ठेवू लागले. पुढे तंत्रज्ञानात आणखी सुधारणा झाली आणि कापलेल्या गव्हाच्या ओंब्या नीट गोळा करून त्यांच्या राशी बनवण्याचं काम देखील यंत्रच करू लागली. गव्हाची मळणी करण्यासाठी सुरवातीला बैल किंवा घोडे, खळ्यात कापलेल्या पिकावर चालून धान्य सुटं करायचे. १८४० च्या सुमारास धान्य मळणीसाठी देखील यंत्र निर्माण होऊ लागली. १८५० च्या सुमारास वाफेच्या शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरवातीला ही वाफेवर चालणारी यंत्रे एका जागी स्थिर (Stationary) असायची. नवीन शतकाचा उदय होण्याच्या सुमारास, ही वाफेवर चालणारी यंत्रे फिरती झाली होती. मळणीची कामे करण्यासाठी ठिकठिकाणी गिरण्यांची व्यवस्था होऊ लागली होती आणि त्यामुळे शेतकरी आपापल्या खळ्यात मळणी करण्या ऐवजी अशा गिरण्यांमधे आपलं धान्य पाठवायला लागले होते.

    सुरवातीला शेतीच्या कामात बैलांचा वापर सर्रास व्हायचा. १८७० सालापर्यंत बैलांऐवजी सर्वत्र घोडयांचा वापर होऊ लागला होता. सन १८०० च्या सुमारास शेतकर्‍याला जे काम करायला ३॥ -४ तास लागायचे, तेच काम सन १८८० च्या सुमारास केवळ १० मिनीटांमधे होऊ लागले. १८९० साली पेट्रोलवर चालणारे इंजीन शेतीच्या वापरात आले आणि शेतीच्या यांत्रिकीकरणात एका नव्या इंधनाची भर पडली.

    २० व्या शतकातील प्रगती – १९ व्या शतकातील प्रगतीमुळे, अंगमेहनतीची जी कामे त्यांचे आजोबा किंवा पणजोबा कष्टाने करत होते, तीच कामं आताची नवी शेतकरी पिढी घोडयांनी ओढण्याच्या यंत्रांत बसून करत होती.

    २० व्या शतकातील शेतीच्या दृष्टीने कदाचित सर्वाधिक महत्वाची प्रगती म्हणजे ट्रॅक्टर. सुरवातीचे ट्रॅक्टर्स खूपच अवाढव्य आणि बोजड असे होते. २० व्या शतकाच्या सुरवातीच्या काही वर्षांतच ट्रॅक्टर अधिक लहान आणि सुटसुटीत होत गेले आणि त्यांचा वापर शेतीच्या बहुतेक कामांसाठी होऊ लागला.

    अमेरिकन यादवी युद्धानंतर जशी परिस्थिती उद्भवली होती तशीच परिस्थिती दुसर्‍या जागतिक युद्धानंतर (१९३९-१९४५) पुन्हा उद्भवली. एक संपूर्ण तरूण पिढी मोठया प्रमाणात युद्धात कामी आली होती अथवा जायबंदी झाली होती. अमेरिकन शेतांमधे काम करणार्‍या कष्टकर्‍यांची कमतरता भासायला लागली होती. त्यामुळे ट्रॅक्टर्स आणि इतर तंत्रज्ञानाची कास पकडण्याशिवाय शेतकरी वर्गापुढे दुसरा पर्याय उरला नव्हता. तंत्रज्ञानाच्या प्रगती मधला, Combine Harvestor हा आणखी पुढचा टप्पा. या मशीन्समुळे पिकाची कापणी आणि मळणी एकाच वेळी करता येऊ लागली आणि शेतातलं उभं पीक सरळ निवडलेल्या धान्याच्या स्वरुपात शेतकर्‍याच्या हातात येऊ लागलं.

    २० व्या शतकातील शास्त्रीय संशोधनाने शेतकर्‍याचे जीवन चांगलेच बदलून टाकले. रासायनीक खते वापरून जमिनीचा कस वाढवणे, पिकांच्या नवीन नवीन जाती वापरून धान्योत्पादन वाढवणे, नवनवीन औषधांचा वापर करून पिकांवरील रोगांचा सामना करणे, वगैरे गोष्टी शक्य होऊ लागल्या. Hybrid crops नी आणखी पुढचे पाऊल टाकले. त्याही पुढे जाऊन दुष्काळाला तोंड देऊ शकतील, रोगांचा प्रतिकार करू शकतील, लवकर तयार होऊ शकतील अशी विविध प्रकारची पिकं, ह्या प्रगतीच्या वाटेवरच्या आणखी पुढच्या पायर्‍या ठरल्या. या सर्व आधुनिक साधनांमुळे, शेतकर्‍याला निसर्गावर अधिक नियंत्रण ठेवता येणे शक्य होऊ लागले.

    आता तर उपग्रहांच्या मदतीने शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज अधिक लवकर व अचूक स्वरूपात मिळू लागला आहे. याचा फायदा म्हणजे शेतीची कामे करण्यासाठी, हवामानाच्या लहरीवर न अवलंबून रहाता शेतकरी आपल्या सोयीनुसार त्यांचे वेळापत्रक आखू शकतो आहे. इंटरनेट देखील शेतकर्‍याच्या दैनंदिन कामाचं एक महत्वाचं अंग बनलं आहे. सारे जग ही एक मोठी बाजारपेठ बनत चालल्यामुळे, जागतिक घडामोडींचा अभ्यास करून शेतकरी आपल्या शेतात त्या अनुषंगाने फेरफार करू शकतो आहे.

    अर्थात सर्वसाधारण अमेरिकन शेतकर्‍याची आणि सर्वसामान्य भारतीय शेतकर्‍याची जीवन पद्धत आणि कामाचं स्वरूप यांची सांगड कितपत घालता येईल हा मोठाच प्रश्न आहे.

  • प्रत्येक “जाणं” सारखंच असतं !

    काल रात्रीच भूपेंद्र सिंग यांच्या जाण्याची बातमी वाचली. इतकं आगंतुक आणि न सांगता -सवरता जाणं वाटलं की खूप वेळ मी अस्वस्थ होतो. नुक्तीच त्यांच्या आणि सुवर्णा माटेगावकरांच्या “बिती ना बिताई ” वर मी पोस्ट लिहिली होती.

  • चंद्रावरचं बर्फ

    चार अब्ज वर्षांपूर्वी, चंद्राच्या कवचावर लावा सांडला आणि आज आपण पाहत असलेल्या चंद्रावर माणूस कोरतो. पण ज्वालामुखींनीही खूप थंड वारसा सोडला असेल आणि तो बर्फाच्या स्वरूपात असावा असा संशोधकांचा दावा आहे.

  • अलविदा २०१६..!!

    "आहीस्ता चल जीन्दगी,
    अभी कर्ज चुकाना बाकी है..!
    कुछ दर्द मिटाना बाकी है,
    कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!"
    आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस..
    वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..

    एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन पुढं सरकत आणि मेहेनतीने प्राप्त केलेल्या त्या गोष्टीचा नीटसा आस्वादही घेता येत नाही..
    "रफ्तारमे तेरे चलने से,
    कुछ रुठ गये, कुछ छुट गये..
    रुठोंको मनाना बाकी है,
    रोतोंको हसाना बाकी है..!"

    तसच दु:खाचही..! एखादं खुप जवळचं माणूस हरवावं पण त्याच दु:ख करायलाही वेळ नसतो हल्ली आपल्याकडे..
    "कुछ हसरते अभी अधुरी है,
    कुछ काम भी जरूरी है..
    ख्वाईशें जो घुट गयी इस दिल मे,
    उनको दफनाना बाकी है..!"

    वर्षाच्या सुरुवातीस नविन वर्षात आपण काय काय करायचं हे ठरवत असतो..त्यातल्या काही गोष्टी होतात, काही अर्धवट होतात तर काहींवर पाणी सोडांव लागतं..तरीही दर नविन वर्षाच स्वागत आपण त्याच उत्साहानं करत असतो कारण नविन वर्षात काहीतरी आणखी चांगलं घडेल ही उमेद असतेच..

    आयुष्याबरोबर चालावंच लागतं..तु पुढे चल, मी येतो मागून असं म्हणून नाही चालत..
    "तू आगे चल, मै आता हूॅं
    क्या छोड तुझे मै जी पाऊंगा?
    आहीस्ता चल जिंदगी
    अभी कई कर्ज चुकाना बाकी है..!!"

    अलविदा २०१६..!!

    -- नितीन साळुंखे

  • विससे विष सेल्फी…

    मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासून सेल्फी घेण्याचं फॅड सुरु झालं. पूर्वी आपला फोटो काढण्यासाठी दुसऱ्याला विनंती करावी लागायची. आता कॅमेराचा मोड बदलला की, आपण स्वतःचा फोटो काढू शकतो….

  • मराठी आडनाव – अणे

    लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.