वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
चक्रस्थेऽचपले चराचरजगन्नाथे जगत्पूजिते
आर्तालीवरदे नताभयकरे वक्षोजभारान्विते ।
विद्ये वेदकलापमौलिविदिते विद्युल्लताविग्रहे
मातः पूर्णसुधारसार्द्रहृदये मां पाहि मीनाम्बिके ॥ २ ॥
आई जगदंबा मीनाक्षीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
चक्रस्थे- आई जगदंबेचे यंत्र स्वरूप असणाऱ्या श्रीयंत्रा मध्ये निवास करणाऱ्या,
अचपले- अतीव स्थिर. शांत. चंचलता अर्थात कृतीचा संबंध आहे काहीतरी प्राप्त करण्याशी. आपण तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो जी आपल्या जवळ नसते. वेगळ्या शब्दात प्राप्तीचा प्रयत्न हे अपूर्णतेचे लक्षण आहे. आई जगदंबा परिपूर्ण असल्याने, तिला काहीच मिळवायचे नाही. त्यामुळे तिच्या ठिकाणी चंचलता नाही. ती स्थिर आहे.
चराचरजगन्नाथे- चर आणि अचर संपूर्ण जगाची सम्राज्ञी. जगत्पूजिते- संपूर्ण विश्व जिच्या चरणकमलांचे पूजन करते अशी,
आर्तालीवरदे- आर्त अर्थात दुःखाने ग्रस्त झाल्याने शरणागता आलेल्या, अली म्हणजे भक्तांच्या रांगांना, समूहाला त्यांच्या मनोवांछित वरदानाने आनंदित करणाऱ्या,
नताभयकरे- विनम्र भावाने नमन करणाऱ्यांना अभय प्रदान करणाऱ्या, वक्षोजभारान्विते - विश्वतृप्तीकारक स्तनांच्या भाराने संयुक्त.
विद्ये- सकळविद्या अर्थात ज्ञानाचे मूलभूत अधिष्ठान शक्ती असणाऱ्या. वेदकलापमौलिविदिते- वेदकलाप अर्थात वेदांचा समुदाय. प्रत्येक वेदात संहिता, ब्राह्मण,आरण्यक आणि उपनिषद अशा चार प्रकारचे ग्रंथ असतात. हे सगळे एकत्रित वेदकलाप. यातील सगळ्यात वर, मौली असणारे ग्रंथ उपनिषद. त्यामुळे त्यांना वेदकलापमौली असे म्हणतात. त्या उपनिषदातील तत्त्वज्ञानाच्या द्वारे जिला जाणता येते अशी.
विद्युल्लताविग्रहे- विद्युल्लता अर्थात विजेप्रमाणे अत्यंत तेजस्वी असणाऱ्या.
मातः- हे आई जगदंबे ! पूर्णसुधारसार्द्रहृदये- सुधारस अर्थात अमृतमय करुणा रसाने जिचे हृदय पूर्ण आर्द्र आहे अशा
मां पाहि मीनाम्बिके- हे आई मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 26, 2020
… परंतु जनसामान्यांना याची काय किंमत… अहो साधे देवाच्या पूजेत काही चुकलं की आपण देव कोपेल म्हणून दहा वेळा देवा तुझ्या सेवेत कमी झाले असेल तर माफ कर… अस बोलतो… मात्र कोरोना काळात साक्षात देवाच्या रूपात लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना दुतांच्या जीवाशी खेळतो तेव्हा मात्र देव तुमच्यावर कोपणार नाय का?? देव माणसात ही असतो हे आपण कधी समजणार ???
April 15, 2021
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
December 20, 2016
काश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती .
April 30, 2023
अमेरिकेतल्या मध्यवर्ती प्रदेशाच्या अफाट गवताळ कुरणांवर एकेकाळी ज्यांचं अक्षरश: साम्राज्य होतं ते म्हणजे बायसन. खांद्यापाशी ६-६॥ फूट उंचीची आणि जवळ जवळ १ टन (१००० किलो) वजनाची ही प्रचंड धुडं, लाखोंच्या संख्येने कळपा कळपाने फिरायची. यांचं डोकं आणि खांदे खूपच अवाढव्य असतात तर त्यामानाने पुठ्ठ्याचा भाग साधारण असतो. नर आणि मादी दोघांनाही आखूड वळलेली शिंग असतात. ऑगस्ट सप्टेंबरमधे यांचा माजावर येण्याचा काळ असतो. स्प्रिंग सीझनमधे वासरांचा जन्म होतो. वासरं वर्षभर आईचं दूध पितात आणि तीन वर्षांची झाली की वयात येतात. यांचे मुख्य भक्षक म्हणजे लांडगे. स्प्रिंग-समर सीझनमधे माद्यांबरोबर छोटी बछडी असताना, त्यांच्यावर लांडग्यांचे हल्ले होतात. कधी कधी ग्रीझली अस्वलं देखील बछड्यांवर हल्ले करून त्यांना मारून खातात.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला सुमारे ६०० लाख (60 millions) बायसन्स अमेरिकेच्या प्रेअरी व ग्रेट प्लेन्सवर चरत असावेत असा अंदाज आहे. या प्रदेशातल्या निरनिराळ्या रेड इंडियन लोकांच्या जमाती, बायसनच्या कळपांच्या, ऋतुमानानुसार होणार्या स्थलांतरा (migration) प्रमाणे, त्यांच्या मागोमाग रानोमाळ भटकत गुजराण करायच्या. बायसनच्या कळपांना घेराव करून, एखाद्या विशिष्ट दिशेने हाकारा करीत न्यायचं आणि मग सार्या कळपाला एखाद्या डोंगरकड्याच्या टोकापर्यंत नेऊन, शेवटी त्या झुंडीला कडेलोट करायला लावून त्यांची शिकार करायची, ही रेड इंडियन लोकांची खास पद्धत. परंतु केवळ जरूरी पुरतीच बायसनची शिकार करून या टोळ्यांचं उदरभरण चालायचं. बायसन म्हणजे या रेड इंडियन जमातींसाठी सर्वस्व होतं, कारण त्यांचं मांस, त्यांच्या जाड केसाळ कातड्याचे कपडे, तंबू, आतड्यांपासून बनवलेल्या धनुष्यांच्या बारीक दोर्या असं सारं काही पुरवणारी, बायसन ही जणू त्यांची कामधेनूच होती. मग स्पॅनिश लोकांबरोबर घोडे आले आणि रातोरात या कुरणांचं आयुष्य बदलून गेलं. वाफेच्या शक्तीने आणि विद्युत शक्तीने शहरवासीयांच्या जीवनात जेवढी क्रांती झाली नसेल, तेवढी उलथापालथ घोड्यांच्या आगमनाने या कुरणांवर झाली.
१८३०-४० च्या सुमारास अमेरिकेचा पश्चिमेकडे विस्तार होऊ लागला होता. मिसुरी राज्यातल्या सेंट लुईस या गावापासून पश्चिम किनार्यावरील कॅलिफोर्निया किंवा ओरेगॉन राज्यापर्यंत सुमारे २००० मैलांचा प्रवास लोक बैलगाड्या किंवा घोडागाड्यांमधून करायचे. हा प्रवास अफाट माळरानांवरून, रखरखत्या वाळवंटांतून, उंचच उंच पर्वत राजींतून, नद्या नाले पार करून असा व्हायचा. रोग राई, स्थानिक रेड इंडियन टोळ्यांचे हल्ले, हिवाळ्यातील हाडं फोडणारी थंडी, उन्हाळ्यातला वाळवंटातला शरीराची लाही लाही करणारा उष्मा, या सार्या दिव्यांना तोंड देता देता हजारो लोक वाटेतच मृत्यूमुखी पडायचे. त्यातच १८४८ साली कॅलिफोर्नियामधे सोन्याचा शोध लागला आणि हा जीवघेणा प्रवास करायला अधिकाधिक लोकांच्या झुंडी उद्युक्त होऊ लागल्या. १८६० च्या दशकात रेल्वे मार्ग पश्चिम किनार्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. युनियन पॅसिफिक रेल्वे कंपनीने नेब्रास्का राज्यातल्या ओमाहा गावापासून पश्चिमेकडे आणि सेंट्रल पॅसिफिक कंपनीने कॅलिफोर्निया राज्यातल्या सॅक्रेमॉंटो गावापासून पूर्वेकडे, असा एकाचवेळी रेल्वे मार्ग बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. १७७६ मैल लांबीचा हा रेल्वे मार्ग या दोन कंपन्यांनी बुलडोझर्स, अवजड यंत्र सामग्री, कंप्युटर्स वगैरे कशाच्याही मदती शिवाय निव्वळ मनुष्यबळावर पूर्ण केला. १० मे १८६९ या दिवशी, एका ठरलेल्या ठिकाणी, दोन्ही कंपन्यांनी दोन दिशांनी बांधत आणलेले रेल्वे मार्ग एकमेकांना जोडले गेले आणि अटलांटिक महासागरापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंतचा हा खंडप्राय देश प्रवासाच्या दृष्टीने एकदम कवेत आल्यासारखा वाटू लागला.
हे रेल्वे मार्ग बांधत असताना बायसनच्या अफाट कळपांचा फारच उपद्रव होऊ लागला. ही प्रचंड धुडं येऊन इंजीनाला धडक द्यायची किंवा हजारो लाखोंच्या संख्येत असलेले हे कळप रेल्वेमार्गावर येऊन गाड्यांचा दिवसेंदिवस खोळंबा करायचे. त्यामुळे पुढे पुढे त्यांची अगदी व्यावसायिक पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामूहिक हत्या करण्यात येऊ लागली. यातच पुढे बायसन्सची पद्धतशीर हत्या करण्याची एक योजनाच आकाराला येऊ लागली. पद्धतशीर शिकारीच्या या टोळ्यांमधे एक दोन व्यावसायिक शिकारी आणि त्यांचा लवाजमा असायचा. त्यात कातडं सोलणारे कामगार, बंदुका साफ करणारे, बंदुकांत बार भरून देणारे, स्वयंपाकी, लोहार, बरेचसे घोडे आणि वॅगन्स असायच्या. सकाळी लवकर उठून माग काढणारे लोक बायसनच्या कळपांचा ठावठिकाणा धुंडाळून यायचे. मग व्यावसायिक शिकारी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपलं बस्तान मांडून बसायचा आणि हाका करणारे लोक बायसनच्या या कळपाला शिकार्याच्या पुढ्यातून पळायला लावायचे. बायसनच्या मोठाल्या कवट्या छेदून गोळ्या जाऊ शकायच्या नाहीत त्यामुळे समोरून गोळ्या मारण्या ऐवजी डोक्यावर बाजूने गोळ्या मारल्या जायच्या. अशा प्रकारे मोठाले कळप शिकार्याच्या पुढ्यातून जातांना, कैक बायसन गोळ्या लागून गतप्राण व्हायचे. उरलेला कळप जीव घेऊन पळून जायचा. त्यानंतर चामडी सोलणारे मजूर पुढे सरसावायचे. मरून पडलेल्या बायसनच्या नाकातून हातोड्याने ठोकून एक खुंटी जमिनीत मारली जायची. मग त्याची चामडी थोडीशी कापून, त्याची टोकं दोरखंडांनी घोड्यांना बांधून, घोडे विरुद्ध दिशांना धावडवून, बायसनची चामडी सोलून काढली जायची. अशा सोलून वाळवलेल्या कातड्यांचे ढीग लादून वॅगन्स परत फिरायच्या. या कातड्यांपासून फॅक्टर्यांमधे तयार होणार्या चामडी बेल्ट्स, कोट, ब्लॅंकेट्सना युरोपात मोठीच मागणी होती.
१८७३ पासून पुढचं दशकभर शेकड्यांनी, (काहींच्या मते हजारभर), अशा व्यावसायिक शिकारी तुकड्या अमेरिकेच्या या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात बायसन्सचं शिरकाण करत फिरत होत्या. सीझनप्रमाणे रोज सुमारे २००० ते १०,००० बायसन्स मारले जायचे. १८७४-७५ मधे तर अमेरिकन कॉंग्रेसपुढे बायसन पूर्णपणे नामशेष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला, कारण काय तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक रेड इंडियन लोकांच्या जीवन पद्धतीचा कणाच मोडला जावा. या कोत्या मनोवृत्तीपायी गोर्या माणसाच्या आणि रेड इंडियन टोळ्यांच्या संघर्षामधे बायसनचा बळी देण्यात आला. १८८४ पर्यंत लाखोंच्या संख्येने मारले गेल्यामुळे बायसन नामशेष होण्याच्या पंथाला लागले. यानंतर काही लोकांनी या शिरकाणातून बचावलेल्या थोड्या बहुत बायसनचे छोटे छोटे कळप करून त्यांचे पुन:संर्वर्धन करायला सुरुवात केली. हळू हळू त्यांची संख्या वाढू लागली आणि आज साधारणपणे १५०,००० बायसन्स पुनश्च अमेरिकेत फिरू लागले आहेत. त्यांची संख्या आता सुदृढ झाल्यामुळे काही राज्यांमधे चक्क त्यांच्या शिकारीला देखील परवानगी मिळू लागली आहे.
क्रमशः ....
-- डॉ. संजीव चौबळ
December 22, 2016
सर्वच देवतांना प्रिय असणारे पुष्प म्हणजे कमळ. चिखलात जन्माला येऊन सूर्याच्या तेजाच्या दिशेने झेपावण्याची त्याची वृत्ती. त्यावर गुंजारव करणार्या भ्रमरांचा शब्द, त्याचा कोमल स्पर्श, त्याचे अत्यंत आकर्षक रूप, त्यामध्ये असणाऱ्या मकरंदाचा रस आणि त्याचा नितांत मनोहारी गंध. अशा पाचही अंगाने आनंद देणारे हे पुष्प. आई जगदंबा तशीच सर्वांगसुंदर आणि सर्वांगाने आनंद देणारी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अवयवाला कमळाची उपमा देताना आचार्य श्री म्हणतात,
May 21, 2020
वीणानादनिमीलितार्धनयने विस्रस्तचूलीभरे
ताम्बूलारुणपल्लवाधरयुते ताटङ्कहारान्विते ।
श्यामे चन्द्रकलावतंसकलिते कस्तूरिकाफालिके
पूर्णे पूर्णकलाभिरामवदने मां पाहि मीनाम्बिके ॥ ७॥
आई जगदंबा मीनाक्षीच्या कलारसिक स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
वीणानादनिमीलितार्धनयने - वीणानादामुळे नेत्र अर्धवट मिटून घेतलेली.
शरीरविज्ञान सांगते की आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदनां पैकी ८३% संवेदना केवळ डोळ्यांनी प्राप्त होतात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अन्य कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी जेव्हा आपण सुखसंवेदना प्राप्त करतो त्यावेळी त्याचा अधिकाधिक आनंद घेण्यासाठी आपले डोळे आपोआप मिटले जातात.
कानावर येणारे अप्रतिम संगीत असो जिभेवर ठेवलेला रसपूर्ण पदार्थ. अत्तराचा गंध असो की गालावर फिरणाऱ्या मोरपिसाचा स्पर्श. कोणताही आनंद घेताना डोळे आपोआप मिटले जातात. पूर्ण आनंद घेण्याची ती स्वाभाविक प्रक्रिया असते. आई जगदंबा वीणा वादनाचा असा परिपूर्ण आनंद घेत आहे.
विस्रस्तचूलीभरे- केश समूह विखुरलेली. वीणा वादनाच्या तल्लीनतेत मानेला सतत झटके दिल्याने तिची वेणी विस्कटली आहे. केस विखुरलेले आहेत.
ताम्बूलारुणपल्लवाधरयुते- तांबूल भक्षण केल्याने आई जगदंबेचे ओष्ठ पल्लव लालबुंद झाले आहेत. कानाच्या आनंदासाठी वीणा तर रसनेच्या आनंदासाठी आई तांबूल भक्षण करते. ताटङ्कहारान्विते- ताटंक म्हणजे बाजूबंद. हार म्हणजे मोत्याच्या माळा. यांना धारण करून सुंदर दिसणारी.
श्यामे- सावळ्या वर्णाची. शरीरशास्त्राच्या दृष्टीने अति गोरेपण आयोग्य आहे. त्यात सूर्यकिरणांनी प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक रंग कणांचा अभाव असल्याने, भारतीय संस्कृतीत सावळा वर्ण खऱ्या सौंदर्याचे प्रतीक मानलेला आहे. चन्द्रकलावतंसकलिते- मस्तकावर आभूषण रूपात चंद्रकोर धारण करणारी.
कस्तूरिकाफालिके- भांगे मध्ये कस्तुरी भरणारी.
पूर्णे- स्वतःचाच ठाई परिपूर्ण असणारी. पूर्णकलाभिरामवदने- पौर्णिमेचा पूर्ण चंद्राप्रमाणे मुखकमल असणाऱ्या,
मां पाहि मीनाम्बिके- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 31, 2020
कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच.
February 7, 2023
हल्ली कोणत्याही प्रकारचा रोगी जर फारच अत्यवस्थ असेल तर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात. पण शहरातील रहदारीची स्थिती, वाढती वाहतूक, वाहनांची गर्दी, वाहतुकीच्या नियमाबद्दलची अनास्था यामुळे रुग्णालयापर्यंत पोचण्यास फार वेळ लागतो.
April 10, 2023
फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आदरणीय वसंत वाघ सरांचा मला महिन्यातून एकदा तरी फोन येतो, ‘गुडमाॅर्निंग सुरेशराव, मी डेक्कनला येतोय. पंधरा मिनिटांत ‘गुडलक’ला या.’ मी लगेचच निघतो. भिडे पुलावरुन पलीकडे गेलं की, दहाव्या मिनिटाला मी गुडलकला पोहोचतो. रिक्षा कडेला घेऊन सर उतरतात. आम्ही दोघे गुडलकमध्ये पलीकडील पॅसेजमधील एक टेबल पटकावतो. वेटरला दोन चहाची आॅर्डर दिल्यानंतर सर बोलू लागतात…
December 25, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti