(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ

    धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन

    धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. खजूर आणि खारीक, आलं आणि सुंठ, द्राक्षे आणि मनुका या जोड्या लक्षात आणा, म्हणजे हा विषय समजेल. (उगाच आंबटगोड गैरसमज नकोत.)

    ज्या फळामधील रस. (रस म्हणजे जलमहाभूत.) कमी होत जातो, ते टिकाऊ होत जाते. आमरस आणि आंब्याची पोळी ( आमच्या कोकणात आंब्याच्या पोळीला "साट" म्हणतात.) यात टिकाऊ काय आहे ? साट जास्ती दिवस टिकते, कारण त्यातील पाणी कमी होत जाते.

    निसर्गामधे सूर्य हा जणुकाही साक्षात अग्निदेव. अन्न पदार्थातील रस, पाणी, द्रवांश, जलमहाभूत ओढून घेत असतो. याला "आदान कर्म" असे म्हणतात. या पाण्याला शोषून, ओढून घेण्यामुळे अन्न टिकाऊ बनते. आजच्या भाषेत, सूर्यापासून येणाऱ्या काही किरणांमधून काही उपकारक तर काही अपायकारक किरणे येत असतात. या किरणांमधे प्रचंड उर्जा साठवलेली असते. व्हिटामिन डी सारखी उर्जा जी फक्त थेट सूर्य किरणांमधूनच मिळत असते, ती पत्र्याच्या डब्यातील टाॅनिकच्या पावडरीमधे कशी भरतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. असो.

    धान्य वाळवून ठेवल्याने, त्यांना चार पाच कडकडीत उन्हे दिल्याने ती टिकून रहातात, हे सत्य आपण बघतोच आहोत. धान्यामधे टोका, बरड आदि जंतुसंसर्ग देखील होत नाही.

    टीव्हीवरील एका कंपनीच्या बासमती तांदळाची जाहीरात बघितली आहे ? ती कंपनी चक्क जाहीरात करते आहे, की आमचे तांदुळ एवढे जुने करून ठेवल्यानंतर, आता आम्ही विकायला काढले आहेत. ( म्हणून त्याची किंमत एवढी जास्त आहे)
    बिझनेस सोडला तर जाहीरातीमधे तथ्य आहे. जुना तांदुळ शिजल्यानंतर, तो वाफेवर झाकून ठेवल्यानंतर, छान फुलतो. नवीन तांदळाचा भात केला तर कसा होतो, ते सुगृहिणीला विचारून बघा. शिजताना कमी पाण्यात जरी शिजवला तरी, नवीन तांदळामधे अंगभूत पाणी जास्ती असल्याने, शिजताना जरा जोरात ढवळले तरी त्याची कणी होते, तुकडा पडतो, परिणामी तो भात चिकचिकित, गिजगिजीत होतो. अशा भाताची बिर्याणी कशी चांगली होणार ?

    भातात अपेक्षित असलेला मोकळेपणा येण्यासाठी तो जुनाच हवा ! जुना करूनच वापरायला हवा.

    प्लॅस्टिकच्या डब्यात भात साठवून ठेवले तर, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम तर त्यावर होणारच. प्लॅस्टिकमधे उष्णता असतेच, पण डबा अगदी "एअर टाईट" झाल्यामुळे भाताच्या गोट्यातील आतील पाण्याची होणारी जी वाफ आहे, ती कुठे जाणार ? ती बाहेर तर जाऊच शकत नाही, म्हणजे ती पुनः डब्यातील भातातच मुरून राहते.

    गवताच्या मुडीत साठवून ठेवलेला भात आणखी हलका होतो, कारण हे गवताच्या मुडीत, साठवलेले भात "वेल व्हेंटिलेटेड" असते. या मुडीतून भाताचा गोटा बाहेर पडणार नाही, पण तयार होणारी वाफ मात्र गवतामधून बाहेर जायला, भरपूर जागा असते. हीच तर निसर्गाची किमया आहे.

    गवतामधे मात्र प्रचंड उष्णता दडलेली असते. ही उष्णता मुडीमधील भातातील जलांशाचे, वाफेत रूपांतर करायला पुरेशी असते.

    आवश्यक असतील ते बाकी सर्व बदल घडवायला गवताच्या मुडीतील निसर्ग समर्थ आहे.
    सिर्फ अपना "मूड" बनना चाहीये ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.05.2017

      May 14, 2017


  • भाऊबीज

    कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज किंवा यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहिण यमुना हिचे घरी भोजनाला गेला. यास्तव या दिवसाला यम द्वितीया हे नांव पडले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने घरी पत्नीच्या हातचे भोजन घेऊ नये.

      October 1, 2023


  • ऊन्हाळा ईतका तीव्र का होतोय

    मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे.

      June 9, 2026


  • मृत्यूनंतरचे जीवन !!

    मी उत्सुकतेपोटी या विषयावरचे बरेच काही वाचले आहे. काही ज्येष्ठ माहितगारांकडून माहितीही घेतली आहे. अगदी रुपरेषेच्या स्वरूपात थोडे लिहितो आहे.

    हिंदू धर्मातील मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची संकल्पना अन्य कुठल्याही संस्कृतीत इतकी परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच राहते.

    पण या गोष्टी मान्य केल्या तर मग जन्ममृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य ( unsolved ) रहात नाही.

    सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदूधर्माचे तत्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत ! मग हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते ? १ लक्ष ८४ हजार विविध जन्मांनंतर मनुष्य जन्म मिळतो. सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. पुढे संशोधनच झाले नाही म्हणून, नाहीतर १ लक्ष ८४ हजार वेळा recycle म्हणजे इतके विविध जन्म घेतल्यावरच मनुष्य तयार होतो या आकड्याचाही काही संबंध असू शकेल. मनुष्य जन्मानंतरच्या उत्क्रांतीबद्दल मात्र विज्ञानाला काही सांगता आलेले नाही.

    पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू:, भुव, महा, जन , तप आणि सत्य लोक / स्तर असे उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहितीही दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह( कोष ) गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात.मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा (energy )असल्याने Law of Indestructibility of energy नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजे एका मोठ्या कोषात ( Universal Reservoir ) खेचली जाते. शरीराचे material जळून पुन्हा ते अनेक materials मध्य रूपांतरित होते.

    या बद्दलची अनेक पुस्तके माझ्याकडे आहेत. असेच एका पुस्तक म्हणजे - - -मेटा सायन्सचे श्री. जॉर्ज मिक यांनी लिहिलेले " आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?" नावाचे एक पुस्तक ! त्याचा मराठी अनुवाद ( " मृत्यूनंतर होते तरी काय? अनुवाद- पद्मा कुलकर्णी) पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे.यात आत्म्याची छयाचित्रेही दिली असून त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नसला तरी त्यांची सर्व अनुमाने ही हिंदू धर्मांतील या बाबतीमधील सर्वच्या सर्व १०० टक्के खऱ्या आहेत यावर शिक्कामोर्तब करतात.

    ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ मात्र या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत. पण आपल्याकडे मात्र या सर्व गोष्टी भंपकपणा, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. असो.

    (यात मी फक्त तत्वज्ञानासंदर्भात थोडेसे लिहिले असून कर्मकांडे, विधी, प्रचलित चालीरीती, त्यांची योग्य-अयोग्यता याबद्दल काहीही लिहिले नाही)

    (हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा.)

    -- मकरंद करंदीकर

      September 19, 2017


  • कार्तिक महिन्यातील छठ पूजा

    कार्तिक महिन्यातील छठ पूजा

    हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.

      November 10, 2021


  • वाल्मिकी रामायण – रामसेतुचे पूर्ण सत्य

    रामसेतूबाबत अनेक भ्रम पसरलेले आहेत. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे हे वर्णनवाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.

    आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका) यांच्या मध्ये असणार्‍या १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भौगोलिक संरचना आहे. यासंरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठलाही पूल समुद्रावर बांधला नव्हता. दुसरी कडे सनातनी लोक म्हणतात, हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.

    दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्टही केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसालाही सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजही समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती. त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेही भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आजपेक्षा निदान २० फूट खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.

    आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.

    आपल्या देशात आजही दुर्गम भागातले लोक पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास, नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ पूल तयार करतात. त्याच प्रकारे श्रीरामांनीही जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल. अश्या प्रकारचे पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.

    p-20193-Ram-Setu-2वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्‍यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्‍यावर घेऊन आले. किनार्‍यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.

    वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारांच्या सैन्याला उथळ समुद्रावर रामसेतु निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.


    टीप:
    वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:

    ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
    बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥

    ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
    कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥

    बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
    चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥

    हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
    पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥

    संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.

    समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
    सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥

    दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
    वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥

    मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
    पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥

    संक्षिप्त अर्थ : कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥

    -- विवेक पटाईत

      December 10, 2015


  • देव दर्शनास पूर्व परवानगी ?………….

    माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे.

      August 24, 2010


  • श्री मीनाक्षी पंचरत्नम् -२

    मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां -
    पूर्णेन्दुवक्त्र प्रभां
    शिञ्जन्नूपुरकिंकिणिमणिधरां पद्मप्रभाभासुराम् ।
    सर्वाभीष्टफलप्रदां गिरिसुतां वाणीरमासेवितां
    मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ २॥

    आई जगदंबेच्या लोकविलक्षण सौंदर्याचे तथा तिच्या दिव्य तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करतांना, आचार्य श्री प्रथम दोन चरणात आईने धारण केलेल्या अलंकारांचे आणि त्यांनी फुललेल्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
    मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां- मोत्यांचे हार लटकत असल्यामुळे अधीकच शोभून दिसणाऱ्या मुकुटाने सुशोभित असणारी.

    आईच्या मस्तकावर असणाऱ्या रत्नजडित सुवर्ण मुकुटाला मोत्यांचे हार लटकत आहेत. त्याने मुकुटाचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे. अशा मुकुटाने आई अधिकच सुंदर दिसत आहे.

    पूर्णेन्दुवक्त्र प्रभां- पूर्ण विकसित पौर्णिमेचा चंद्रबिंबा प्रमाणे अत्यंत सुंदर मुखाची आभा सर्वत्र विलसत आहे अशी.

    शिञ्जन्नूपुर- जिच्या चरणातील नूपुर अर्थात पैंजणांचा अत्यंत सुंदर ध्वनी सर्वत्र गुंजत आहे अशी.

    किंकिणिमणिधरां- जिच्या कंबर पट्ट्यात, वस्त्रात तथा अन्य अलंकारात लावलेले छोटी-छोटी घुंगरू किन् किन् असा सुंदर आवाज करीत आहेत अशी.

    पद्मप्रभाभासुराम् - कमळाच्या सौंदर्या प्रमाणे तेजस्वी असणारी. परम आकर्षक असणारी. भक्तगणांच्या चित्ताला मोहीत करणारी.

    सर्वाभीष्टफलप्रदां- साधकांना सुयोग्य अशी सकल फले प्रदान करणारी. गिरिसुतां- गिरी म्हणजे पर्वत. सकल पर्वतांचा राजा हिमालय. त्याच्या घरी कन्या रूपात अवतार घेतलेली . वाणीरमासेवितां- वाणी अर्थात देवी सरस्वती आणि रमा अर्थात देवी लक्ष्मी यांच्याद्वारे, अर्थात समस्त ईश्वरी शक्तींच्या द्वारे सेवा केली जात आहे अशी.

    मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् -

    कारुण्याचा जणू काही सागर असणाऱ्या देवी मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 11, 2020


  • अहोवा

    हा एक सुरक्षितता या विषयावरील लेख आहे ज्यात अपघात होता होता वाचणे या बद्दल चा विचार मांडला आहे. गुगलने स्त्री-दाक्षिण्य या शब्दाचे इंग्लीश मध्ये आणि Near miss accident याचे मराठी मध्ये पराकोटीचे हास्यास्पद भाषांतर केले आहे. इतके विक्षिप्त की त्याची अर्थ-कारणमीमांसा शोधणे मराठी (मराठीच काय कुणाच्याही) बुद्धीच्या पलीकडे आहे. अपघात होता-होता वाचला याला चपखल बसेल असा एकही शब्द न मिळाल्यामुळे आणि गुगल महाराजांनीही मार्गदर्शन न केल्यामुळे त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणून अहोवा या संक्षिप्त रूपाचाच (शॉर्ट-फॉर्म) या लेखात वापर करावयाचे ठरविले आहे.

      June 1, 2021


  • माहूरची रेणुका

    श्रीक्षेत्र माहूरगड नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असून ते डोंगराळ भागात वसले आहे. समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर माहूरगड असून दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेस सहस्त्र कुंड आणि उत्तर व वायव्य दिशेला पैनगंगा नदी सर्पाकृती वाहताना दिसते. या गडावर श्रीविष्णूंनी उन्मत्त राक्षस लवणासुराला मारल्यामुळे श्री ब्रह्मदेवाने आनंदाप्रीत्यर्थ आपल्या कमंडलूतून आणलेल्या पाण्याने श्रीविष्णूचे पाय धुतले तेव्हा त्यांचे चरणतीर्थ जे पृथ्वीवर वाहू लागले तीच पैनगंगा नदी आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

      June 10, 2025