वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अगदी खरे सांगायचे तर नेत्रतज्ज्ञांनाही हे माहीत नाही. नक्की माहिती असलेले एकच कारण आहे- ते म्हणजे आनुवंशिकता. आई-वडिलांना चष्मा असल्यास मुलांना चष्मा लागण्याची शक्येता खूपच असते. इतर कुठलेही एकच एक कारण अद्याप सिद्ध झालेले नाही. ‘मुले सारखी टीव्ही-कॉम्प्युटरसमोर असतात, त्यामुळे चष्मा लागतो का?’ असे अजून तरी सिद्ध झालेले नाही. ज्यांना चष्म्याचा नंबर असतो, ते जवळ जाऊन टीव्ही बघतात. कारण त्यांना लांबून टीव्ही दिसत नाही. म्हणजे जवळून टीव्ही बघितल्यामुळे चष्मा लागतो, असे म्हणता येत नाही. तर चष्म्याचा नंबर असल्यामुळे टीव्ही जवळून बघितला जातो. एकदा त्यांना चष्मा लावायला दिला, की ते व्यवस्थित अंतरावरून टीव्ही बघतात. सिद्ध झालेले नसले तरी बहुतेक नेत्रतज्ज्ञांच्या मते- आधुनिक बैठी जीवनशैली आणि चष्मा यांचे नाते असू शकेल. सिंगापूर व जपानमध्ये झालेल्या पाहणीत काही वर्षांपूर्वीच्या मानाने तेथील सध्याच्या मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यांत घरात राहून बैठे खेळ खेळणे, कुठल्यातरी स्क्रीन (टीव्ही-कॉम्प्युटर)समोर नजर सतत खिळवून ठेवणे, या अशा शहरी जीवनशैलीचा परिणाम असण्याची शक्यलता सांगितली आहे. ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी निश्चि तच चांगले असते; परंतु चष्म्याचा नंबर ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येत नाही. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांवर इतर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कितीही पालेभाज्या खाल्ल्या, गाजर खाल्ले तरी चष्म्याचा नंबर कमी होत नाही. काही लोकांमध्ये असाही एक गैरसमज असतो, की सारखा चष्मा वापरला, की चष्म्याचा नंबर कमी होतो; परंतु असे काही नसते. चष्मा वापरणे व नंबर कमी अथवा जास्त होणे, या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चष्मा कायम घातला तरी नंबर जर वाढायचा असेल, तर वाढतोच.
नंबरांचे वर्गीकरण
चष्म्याच्या नंबरांच्या प्रकाराचे वर्गीकरण ऱ्हस्वदृष्टिदोष, दीर्घदृष्टिदोष व चाळिशीनंतर लागणारा चष्मा, असे करता येईल.
ऱ्हस्व दृष्टिदोष - अशा रुग्णांचा डोळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघतो, त्याची प्रतिमा डोळ्याच्या रेटिनाच्या पुढे तयार होते. या रुग्णांना लांबचे दिसत नाही; जवळचे मात्र दिसते. लांबचे न दिसल्यामुळे हे रुग्ण टीव्ही जवळ जाऊन बघणे, पुस्तक डोळ्यांच्या जवळ घेऊन बघणे, असे करतात. ऋण (मायनस) नंबरचा चष्मा अथवा कॉन्टॅक्टय लेन्स वापरून या रुग्णांची नजर सुधारते. सर्वसामान्यपणे लहान वयात ऱ्हस्वदृष्टी चष्मा लागल्यावर शरीराची वाढ होते; त्या प्रमाणात नंबरही वाढत जातो. वाढ पूर्ण झाल्यावर नंबर वाढण्याचे प्रमाणही थांबते; परंतु काही रुग्णांमध्ये त्यानंतरही नंबर वाढू शकतो. त्यांच्या आधीच्या पिढीतील नातेवाइकांचा नंबर कसा व किती आहे, यावर बरेचसे अवलंबून असते.
काही ऱ्हस्वदृष्टिदोष असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचा रेटिना नावाचा भाग काही ठिकाणी झिरझिरीत झालेला आढळून येतो. जास्त जाड चष्मा असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. झिरझिरीत- पातळ झालेल्या भागात जर भोक पडले, तर त्यातून नेत्रपटल अथवा रेटिना आपल्या जागेवरून सरकण्याची शक्यळता असू शकते. असे झाल्यास एकाएकी दृष्टी एकदम कमी होते किंवा नजरेसमोर पडदा आल्यासारखे वाटून फक्त वरच्या भागातले दिसणे किंवा कुठल्या तरी एकाच भागातले दिसणे, असे होऊ शकते. उदाहरणार्थ- समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचे फक्त डोके व मान दिसते. खालचा भाग दिसत नाही किंवा फक्त खालचे शरीर दिसते; वरचा भाग दिसत नाही. एखाद्या रुग्णाला कपबशीतील फक्त कप दिसतो; बशी दिसत नाही, असे घडते. नेत्रपटल जागेवरून सरकलेले असल्यास त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे गरजेचे असते.
जाड चष्मा असलेल्या सर्व रुग्णांनी आपल्या डोळ्याचा रेटिना वर्षातून एकदा तपासून घ्यावा. त्यात जर काही झिरझिरीत अथवा भोके असलेला भाग दिसला, तर त्यावर लेझर उपचार करून पुढील संभाव्य धोका व त्यावरील मोठी शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. ज्यांच्या कुटुंबांमध्ये (आई-वडील-बहीण-भाऊ इत्यादी) असा प्रकार आधी झालेला आहे, त्यांना हा धोका जास्त असतो. असे घडल्यास करावी लागणारी शस्त्रक्रिया ही जवळ जवळ तातडीची शस्त्रक्रियाच समजली जाते; जितक्या् लवकर करू, तेवढी ती यशस्वी होण्याची शक्य्ता वाढते. जाड मायनस नंबरचा चष्मा असलेल्या रुग्णांनी त्यांना जर डोळ्याच्या आत वीज चमकल्यासारखी वाटली, तर डॉक्ट.रना लगेच दाखवावे. रेटीनाला भोक पडले असल्यास, असे होऊ शकते. अशा वेळी आधी सांगितल्याप्रमाणे लेझर उपचार केल्यास पुढचा धोका टाळता येऊ शकतो.
डोळ्यांच्या उपचारांमध्ये लेझर वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. लेझर म्हणजे फक्त काही विशिष्ट पद्धतीचे लाईटचे किरण डोळ्यातील हव्या त्या भागावर केंद्रित करतात. अगदी पाच ते दहा मिनिटांत हे काम होते. कुठल्याही प्रकारचे इंजेक्शकन, शस्त्रक्रिया यात नसते.
दीर्घदृष्टिदोष या रुग्णांचा डोळा आकाराने लहान असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघायचे तिची प्रतिमा रेटिनाच्या मागच्या भागात तयार होते. प्रत्यक्ष रेटिनावर धूसर प्रतिमा दिसते. या रुग्णांना मुख्यत्वे जवळचे बघायला त्रास होतो. लांबचे चष्मा न लावल्यासही दिसते; परंतु जास्त नंबर असल्यास डोके दुखणे - डोळे दुखणे असे होऊ लागते. त्यामुळे लांबचे बघतानासुद्धा चष्मा लावावा. ऱ्हस्वदृष्टिदोषाप्रमाणे दीर्घदृष्टिदोषाच्या रुग्णांमध्ये शरीराच्या वाढीनुसार नंबर वाढत नाही. रेटिनाही बहुतांश रुग्णांत चांगला असतो. त्यामुळे त्यामानाने नेत्रपटल सरकण्याचा प्रकार कमी असतो.
प्रेसबायोपिया म्हणजेच चाळिशीनंतर येणारा चष्म्याचा नंबर! चाळिशीआधी आपल्या डोळ्याचे स्नायू लवचिक असतात. त्यामुळे डोळ्यापासून जवळच्या अंतरावर, लांब अंतरावर व त्यामधील कुठल्याही अंतरावर आपल्याला नजर केंद्रित करता येते; परंतु चाळिशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होते, त्यामुळे लांबची नजर फारशी खराब होत नाही. मात्र जवळचे अंधुक दिसू लागते. पेपर जरा लांब धरल्यावर चांगला दिसतो. वयाप्रमाणे काही प्रमाणात हा नंबर वाढतो. त्यामुळे चाळिशीनंतर बायफोकल अथवा प्रोग्रेसिव्ह चष्मा किंवा लांबचा व जवळचा वेगवेगळा, असे दोन चष्मे करावे लागतात. ज्यांना आधीपासून मायनस नंबरचा चष्मा आहे, त्यांना लांबचा चष्मा काढून जवळचे चांगले वाचता येते; परंतु तरीही जवळचा नंबर वेगळा काढणे व त्यानुसार वेगळा चष्मा करणे चांगले. कॉम्प्युटरवर ज्यांना जास्त वेळ काम करावे लागते, त्यांना कॉम्प्युटरच्या अंतरासाठी वेगळा नंबर वापरल्यास डोळ्यांवर ताण येत नाही.
सिलिंड्रिकल नंबरचा चष्मा असणे बऱ्याच रुग्णांची सिलिंड्रिकल नंबर आहे म्हटल्यावर ‘काही तरी भयंकर आजार आहे’, अशी भावना होते. खरे असे काहीच नाही. नंबरचा तो एक प्रकार आहे, एवढेच. कॉनियाचा पृष्ठभाग सर्व भागांत सारखाच गोलाकार नसेल, तर सिलिंड्रिकल नंबर लागतो. उदाहरणार्थ- उभा भाग जास्त गोलाकार असणे किंवा तिरपा भाग (१४० अंश-१२० अंश इत्यादी) जास्त गोलाकार असणे, असे. अशावेळी सर्व भागांत सारखाच गोलाकार असणारा नंबर देता येत नाही. सिलिंड्रिकल नंबरची काच हव्या त्या भागात कमी-जास्त गोलाकार करून घेता येते. सिलिंड्रिकल नंबर प्लस किंवा मायनस किंवा दोन्हींचे मिश्रणही असू शकतो. हा फारसा वाढत नाही; मात्र चष्मा न घातल्यास पेशंटना डोळे दुखणे, डोके दुखणे असे त्रास सुरू होतात. कोणता का नंबर असेना, डोळ्यांना त्रास होत असेल तर चष्मा वापरणे हितावह आहेच.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.- संतोष शेणई
मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांच्या निधनाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने स्मरणांजली
शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधार फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव.
असं म्हणतात की माणसाने निसर्गाकडून गोष्टी शिकल्या पाहिजेत. आता समुद्राचंच उदाहरण घ्या ना , तो कधीही निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादांचं उल्लंघन करत नाही आणि जर का त्याने मर्यादा ओलांडल्या तर काय होतं ह्याचं त्सुनामीपेक्षा दुसरं कुठलंच मोठं उदाहरण नाही. जर माणसांनी मर्यादा पाळल्या तर आयुष्यात कितीतरी संकटांना तो टाळू शकतो.
रामसेतूबाबत अनेक भ्रम पसरलेले आहेत. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे हे वर्णनवाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.
दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्टही केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसालाही सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजही समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती. त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेही भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आजपेक्षा निदान २० फूट खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.
आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.
वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर घेऊन आले. किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.
वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारांच्या सैन्याला उथळ समुद्रावर रामसेतु निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.
टीप: वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:
ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥
ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥
बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥
संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.
समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥
दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥
मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥
संक्षिप्त अर्थ : कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥
एका ओळखीच्या मराठी कुटुंबाच्या घरी गेलो असतांना त्यांचा गोड लहान मुलगा दिसला. त्याला जवळ घेऊन थोडी मस्ती करतांना त्याला त्याच्या वर्गातील एखादी गोष्ट सांगण्यास सांगितले … लगेच त्याच्या “मम्मीने” मागून त्या मुलाला सुचना केली “टेल स्टोरी इन इंग्लिश” …..
यशोगाथा सार्वत्रिक व सर्व दूर असायलाच हव्यात.पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेचा वापर करून नवनवीन मार्ग व त्यावर उपाय शोधत आहेत.गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक तलावांनी मोकळा श्वास घेतलाय,त्याचबरोबर६३तलावांचे पुनरुज्जीवनही झाले आहे.
केव्हाही, कोठेही हे गीत ऐकले की आत काहीतरी अनामिक कालवाकालव होते. बापाची लेकासाठीची धडपड डोळ्यांसमोर येते. ती खोटी, फसवी असू शकत नाही (भलेही चित्रपटात ती बऱ्यापैकी बटबटीत दाखविली असली तरी ! ).आणि दरवेळी बापाने अंगाई म्हणायलाच हवी असे कुठाय? त्यासाठी त्याने कुठून आणायचा किशोरचा “सोलफूल ” आवाज ? शेवटी बापाला स्वतःची धडपड, धावाधाव असतेच की !
सर्जिकल स्ट्राईक’चे गांभीर्य कळायला उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य कळायला हवे. 18 सैनिकांचा जीव घेणारा हल्ला झाल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली.तेव्हा लष्कराच्या मानसन्मानाला ठेच लागली.
उद्योग क्षेत्रात ५० वर्षे वावरल्यानंतर, वारंवार वापरले जाणाऱ्या नवनवीन लाडक्या शब्दांबद्दल मी जरा सावधच असतो. काही वेळा तर असे नवीन शब्द वा घोषणा म्हणजे ‘बाटली नवीन पण दारू तीच’ अशी परिस्थिती असते. अशा शब्दांचा संध्याकाळच्या सोशल पार्टीमध्ये वापरण्यापलीकडे फारसा उपयोग नसतो. असे शब्द फारसे टिकत पण नाहीत. मात्र काही नवीन शब्द त्यांच्यामधील बळकट संकल्पनेमुळे काळाच्या प्रवाहात टिकून रहातात. उदा. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट [TQM], रिव्हर्स इंजिनियरिंग इ.
Copyright © 2025 | Marathisrushti