वाङ्मय जगतात ‘साहित्य’ आणि ‘ललित लेखन’ या दोन संज्ञा वारंवार वापरल्या जातात. वरवर पाहता त्या सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्या व्याप्तीत आणि लेखनाच्या उद्देशात मोठा फरक आहे. साहित्य ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे, तर ललित लेखन हा त्याचाच एक अत्यंत सुंदर आणि कलात्मक भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘साहित्य’ हे जर एक विशाल उद्यान असेल, तर ‘ललित लेखन’ हे त्या उद्यानातील सुवासिक आणि सुंदर फुलांसारखे आहे. साहित्याने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, तर ललित लेखनाने माणसाचे मन समृद्ध होते. दोन्हीचेही मानवी जीवनात आणि समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
August 12, 2026

शनीला घन स्वरूपाचा पृष्ठभाग नाही. तरीही या संशोधनामुळे, त्याच्या गाभ्याच्या रचनेची माहिती करून घेणं, हे शक्य झालं. कारण क्रिस्टोफर मँकोविच आणि जीम फ्यूलर यांनी शनीच्या कड्यांनाच प्रचंड ‘भूलहरीमापक यंत्रा’चं स्वरूप दिलं आहे. या संशोधनातून शनीचा गाभा आगळा-वेगळा असल्याचं दिसून आलं.
December 16, 2021
एखादं कौशल्य जनसामान्यात ओळख होण्यास पुरेसं असतं. कौशल्यानं वैगुण्यावरही मात करता येते. कौशल्य ओळखली पाहिजेत आणि जोपासली पाहिजेत. भाषण पाठ असून ते नजरेत भरत नाही; पण त्याचं सादरीकरणाचं कौशल्य लोकांच्या नजरेत भरतं, लक्षात राहातं. नुकताच दूरदर्शनवर एका लहान शाळकरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनी शाळेच्या ध्वजारोहण समारंभात त्याने आपल्या विनोदी भाषणाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘भारतात आजपासून लोकशाही लागू झाली असून लोकशाहीत आपण काहीही करू शकतो. मला स्वतःला मूर्ख बनवायला आवडते.’ त्याने लोकांना अक्षरशः मोठ्याने हसवले.
June 6, 2026

अमेरिकेतल्या रॉकी माउंटन्स या डोंगराळ परिसरात यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान वसलं आहे. नैसर्गिक वैविध्यानं नटलेल्या या राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग, त्यातील गरम पाण्याचे कारंजे, झरे, तलाव, तसंच वाफेचे स्रोत यांसाठी जगप्रसिद्ध आहे. गरम पाण्याचे आणि वाफेचे सुमारे दहा हजार स्रोत इथे सापडले आहेत. यांतला दर तास-दोन तासांनी उसळणारा ‘ओल्ड फेथफूल’ हा गरम पाण्याचा कारंजा, तसंच ‘ग्रँड प्रिझ्मॅटिक स्प्रिंग’ हा गरम पाण्याच्या झऱ्यामुळे निर्माण झालेला रंगीबेरंगी तलाव, या जागा तर वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
July 23, 2022

टोंगा बेटांचा प्रदेश हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रदेश आहे. इथे पृथ्वीच्या कवचातील दोन भूपट्ट एकत्र आले आहेत व त्यातील एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकत आहे. अनेक ज्वालामुखींनी व्यापलेला, वारंवार भूकंप घडून येणारा, असा हा प्रदेश भूशास्त्रज्ञांकडून पूर्वीपासूनच अभ्यासला जात आहे.
February 13, 2022
रमेश सकाळी ऑफिसच्या रस्त्यावर होता. ऑफिसला पोचायला त्याला साधारण ४५ मिनिटे लागत असत. बेशिस्त वाहतुकीला तोंड देतादेता ऑफिसला पोचेपर्यंत त्याला निवांतपणे विचार करायला हाच वेळ मिळत असे. एका मोठ्या खूप व्यवसायात [बिझिनेसमध्ये] असलेल्या कंपनीच्या एका व्यवसायाचा तो प्रमुख अधिकारी होता. आज त्याला जरा जास्तच आनंदी आणि समाधानी वाटत होते, कारण काल तो जबाबदार असलेल्या व्यवसायाच्या कामगिरीचे महिन्याचे निकाल बाहेर आले होते. आणि महत्वाचे म्हणजे गेल्या सात वर्षात त्याच्या व्यवसायात प्रथमच इतके चांगले निकाल दिसून आले होते.
August 28, 2026

सहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले पेंग्विन हे आजच्या पेंग्विनपेक्षा खूपच वेगळे दिसत होते. त्या काळाल्या पेंग्विनचे पाय आणि चोची आताच्या पेंग्विनच्या तुलनेत खूपच लांब होत्या. तसंच त्यांचे पंखही सर्वसाधारण पक्ष्याच्या पंखासारखेच दिसत होते. उत्क्रांतीदरम्यान पेंग्विनच्या पिसांचा रंग लाल झाला. त्यानंतरच्या काळात हे पेंग्विन दोन पायांवर उभे राहू लागले. या पेंग्विनची उंची आजच्या सर्वांत मोठ्या पेंग्विनपेक्षाही अधिक होती.
September 10, 2022

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला.
January 7, 2023

घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम दुधासाठी आणि मांसासाठी केला गेला असावा.
May 11, 2023
बुद्ध धर्माचा बुद्ध आणि महावीर यांच्या तत्व विचाराचा अत्यांतिक प्रभाव ज्या कालखंडावर जाणवतो तो कालखंड म्हणजे बुद्ध जन्म शतक इ. स. पूर्व ६०० ते गुप्त राजवटीचे आधी म्हणजे इ. स. ३०० पर्यंत होय. यालाच आरंभिक इतिहास कालखंड म्हटले आहे. या कालखंडात विश्वकर्मा समाजाच्या कला कौशल्यात जे बदल घडले, ते त्यांच्या कला कौशल्यातूनच स्पष्ट करणे महत्वाचे आहे. बुद्धाच्या आणि महावीरांच्या तत्व प्रभावाने समाजात वेगळी सामाजिक जाण निर्माण झाली. त्यांचा परिणाम धर्म विचार, कला कारागीरी व भाषा या मूलभूत सांस्कृतिक मुल्यांवर पडला तरी परंतु परंपरेने चालत आलेले वैदिक मत, वैष्णव मत, शैव मत, शाक्त मत, सौरमत आणि मंखलिपुत्त गोसालाचे आजीविकमत आपापल्या परीने राज्यकर्त्यावर व समाजावर प्रभाव गाजवितच होते. सम्राट अशोकाने अंगीकार केल्यानंतर धर्म प्रचारासाठी स्तूप, विहार, स्तंभ निर्माण करविले, व त्यावर बुद्ध धर्माचे सिद्धांत, सदाचार, नैतिकता व धार्मिक गोष्टी कोरल्या. मौर्याचे उत्तराधिकारी शुंग वैदिक धर्माचे उपासक होते तरी ते बौद्ध धर्माप्रति सहिष्णु असल्याचे दिसून येते. कारण त्यांच्या शासन काळात भारहुत, मथुरा, बौधगया, सांची येथे अनेक बौद्ध स्तूपांची निर्मिती झाली.
February 28, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti