
कपी हा वानरवर्गीय प्राण्यांचा एक गट आहे. या प्राण्यांची शारीरिक रचना इतर वानरवर्गीय प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते. त्यांच्यातला सहजपणे लक्षात येणारा फरक म्हणजे कपींना शेपूट नसतं. आजच्या गिब्बन, चिम्पांझी, गोरिला, ओरांगउटान, तसंच मानव, या सर्वांचा या गटात समावेश होतो.
January 23, 2024
आफ्रिकेतून आशियात जाण्यासाठी माणसानं कुठला मार्ग वापरला असावा, हा मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीनं पूर्वीपासून कुतूहलाचा विषय ठरला आहे. तो अरेबिआतून आशियात शिरला असण्याची शक्यता खूपच आहे. मात्र त्यानं अरेबिआ नक्की कुठून पार केला, याबद्दल संशोधकांत एकमत नाही. काही संशोधकांच्या मते तो खालच्या बाजूनं – दक्षिण अरेबिआतून – तांबड्या समुद्रामार्गे आशियात शिरला असावा; तर काही संशोधकांच्या मते, तो वरच्या बाजूनं – उत्तर अरेबिआतून – जमिनीमार्गेच आशियात गेला असावा. मात्र पुरेशा पुराव्यांच्या अभावी याबाबतीत कोणतंच मत खात्रीशीर ठरलेलं नाही. जर्मनीतील मॅक्स प्लँक इंस्टिट्यूट फॉर द सायन्स ऑफ ह्यूमन हिस्टरी ही संस्था, ‘ग्रीन अरेबिआ’ या आपल्या प्रकल्पाद्वारे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं आता दिसून येत आहे!
ग्रीन अरेबिआ प्रकल्पाद्वारे अरेबिआतील अतिप्राचीन मानवी संस्कृतीचा अभ्यास केला जातो. आजच्या वाळवंटी अरेबिआत एके काळी मोठ्या प्रमाणात हिरवाई असल्याचं पूर्वीच्या संशोधनानं दाखवून दिलं आहे. ग्रीन अरेबिआ या प्रकल्पामध्ये, अरेबिआच्या वाळवंटी प्रदेशातील जमिनीचं कृत्रिम उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केलं जातं. त्यावरून अतिप्राचीन काळी अरेबिआतल्या, जिथे नद्या वा तलाव असण्याची शक्यता होती, अशा जागा शोधल्या जातात व त्या जागी प्राचीन मानवी खुणांचा शोध घेतला जातो. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या हूव ग्राउकट आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी उत्तर अरेबिआतल्या नेफूडच्या वाळवंटातील, अशाच एका नव्वद मीटर उंच वाळूच्या ढिगाऱ्यांनी वेढलेल्या तलावसदृश जागेवर उत्खनन केलं. जेव्हा त्यांनी मातीचे नमुने घेऊन या पुरातन काळातल्या तलावाचं वय काढलं, तेव्हा त्यांना अगदी अनपेक्षित गोष्ट आढळली. इथे एकच नव्हे तर, वेगवेगळ्या काळात निर्माण झालेले पाच तलाव अस्तित्वात होते. या पाच तलावांच्या परिसरात सापडलेल्या अवशेषांवरून काढले गेलेले निष्कर्ष हे अर्थातच लक्षवेधी ठरले आहेत. हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे सर्व संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.
हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उत्खननाच्या जागेला केएएम-४ (खाल अमायशान-४) या नावानं ओळखलं जातं. ही जागा आज पूर्णपणे कोरडी आहे. इथे आढळलेले पुरातन तलाव हे अनुक्रमे, सुमारे चार लाख, तीन लाख, दोन लाख, एक लाख आणि पंचावन्न हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचं या संशोधकांना दिसून आलं. या तलावांच्या जागी, हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, पाण्यात आढळणाऱ्या विविध मृदुकाय प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. तसंच त्यांना इथे पाणघोड्याचे अवशेषही सापडले आहेत. पाणघोडा हा गोड्या पाण्याच्या मोठ्या जलाशयात वावरतो. इथे सापडलेले मृदुकाय प्राण्यांचे आणि पाणघोड्याचे अवशेष हे, इथे पूर्वी अस्तित्वात असलेल्या, गोड्या पाण्याच्या मोठ्या तलावांचे स्पष्ट पुरावे आहेत. तसंच या तलावांच्या परिसरात, या संशोधकांना गायी-गुरांसदृश प्राण्यांचे अवशेषही सापडले आहेत. गवत व तत्सम वनस्पतींवर जगणाऱ्या या सर्व प्राण्यांचे अवशेष, या तलावाच्या परिसरातली जमीन पूर्वी गवताळ असल्याचं दर्शवतात.
या सर्व तलावांच्या अस्तित्वाचा काळ हा, ज्या काळात इथलं हवामान पावसाला अनुकूल झालं होतं, त्या काळाशी जुळणारा आहे. यावरून, या काळात हे तलाव पाण्यानं भरत असल्याचं दिसून येतं. आज अत्यंत शुष्क असलेल्या या प्रदेशात अनेक ठिकाणी पूर्वी, काही काळासाठी बदलत असलेल्या हवामानामुळे पाऊस पडून, पाण्यानं भरलेले असे तलाव व हिरवाईही निर्माण होत असे. याचा परिणाम म्हणून, अनेक ठिकाणचे प्राणीही अशा परिसरात मोठ्या प्रमाणात येऊन वसती करीत असत. तलावातलं पाणी जितका काळ टिकून राही, तितका काळ प्राण्यांची ही वसती टिकून राही. प्रतिकूल हवामानाच्या काळात तलावातलं पाणी पूर्णपणे आटलं की, हे प्राणी इतरत्र स्थलांतरीत होऊन तिथली वसतीसुद्धा नाहीशी होत असे.
आता यापुढचा भाग… या तलावांजवळ या संशोधकांना अनेक अश्मयुगीन हत्यारं सापडली आहेत. विविध कामांसाठी वापरली जाणारी ही हत्यारं वेगवेगळ्या काळातली आहेत, त्यांची घडणही वेगवेगळी आहे, ती तयार करण्यासाठी वापरलेले दगडही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या हत्यारांचा काळ आणि ज्या-ज्या तलावाजवळ ती सापडली, त्या-त्या तलावांच्या अस्तित्वाचा काळ हा सारखाच आहे. याचा अर्थ तलाव भरलेला असताना, त्या तलावाच्या काठी मानवी वसतीही असायची. यातील चार लाख वर्षांपूर्वीच्या तलावाजवळ सापडलेली हत्यारं ही आजच्या माणसाची हत्यारं नक्कीच नाहीत. ती दुसऱ्या कोणत्या तरी मानवसदृश प्रजातीची असण्याची शक्यता आहे. कारण आजचा होमो सेपिअन्स हा माणूस, सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी, म्हणजे या तलावाच्या निर्मितीनंतर एक लाख वर्षांनी अस्तित्वात आला. त्यानंतरची, तीन लाख वर्षांपूर्वीच्या तलावाजवळ सापडलेली हत्यारं हीसुद्धा आजच्या माणसाची असण्याची शक्यता वाटत नाही. कारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत जन्माला आलेला आजचा माणूस, लगेचच अरेबिआत पोचण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही हत्यारंसुद्धा इतर कोणत्या तरी मानवसदृश प्रजातीनं तयार केली असावीत. या काळात, एकाच वेळी विविध मानवसदृश प्रजाती अस्तित्वात होत्या. मात्र यापैकी नक्की कोणत्या प्रजातींनी इथे वसती केली असावी, हे आज तरी सांगता येत नाही.
तिसऱ्या तलावाजवळची म्हणजे दोन लाख वर्षांपूर्वीची हत्यारं ही, आजच्या आधुनिक माणसाची असण्याची शक्यता आहे. या हत्यारांना सुबकपणा आहे. जवळपास याच काळातली अशी हत्यारं, जवळच्याच ईशान्य आफ्रिकेतही आढळली आहेत. हीच माणसं कदाचित अरेबिआत येऊन पोचली असावीत. चवथ्या, एक लाख वर्षांपूर्वीच्या तलावाकाठची हत्यारं ही मात्र नक्कीच आजच्या माणसाची आहेत. हे होमो सेपिअन्ससुद्धा आफ्रिका सोडून आशियात आले असावेत. अगदी अलीकडच्या म्हणजे पंचावन्न हजार वर्षांपूर्वीच्या तलावाकाठी सापडलेली हत्यारं काहीशी वेगळ्या प्रकारची आहेत. ही आजच्या माणसाचीही असू शकतात किंवा निअँडरटाल या मानवसदृश प्रजातीचीही असू शकतात. कारण युरोपातला निअँडरटाल, सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वीच युरोपातून निघून मध्य-पूर्व आशियात पोचला होता. तिथूनच पंचावन्न हजार वर्षांपूर्वी तो या उत्तर अरेबिआत आला असावा.
हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे सर्व संशोधन, माणसाच्या वेगवेगळ्या काळातल्या भाऊबंदांचं, अरेबिआतलं अस्तित्व दर्शवतं. याचा अर्थ माणसाचे भाऊबंद, हवामान अनुकूल असताना, तात्पुरते का होईना, परंतु उत्तर अरेबिआत वावरत होते. निअँडरटाल, होमो सेपिअन्स, अशा विविध प्रजाती इथूनच अरेबिआ पार करून पलीकडील दक्षिण आशियात शिरल्या असाव्यात. हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या या शक्यतेनुसार, उत्तर अरेबिआ हे दक्षिण आशियाचं प्रवेशद्वार असू शकतं. यापूर्वीही जरी उत्तर अरेबिआतील मानवी वसतीचे पुरावे मिळाले असले, तरी ते अत्यल्प आणि विखुरलेल्या स्वरूपात होते. यामुळे मानवी स्थलांतरातला उत्तर अरेबिआचा सहभाग स्पष्ट होत नव्हता. परंतु हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेले पुरावे हे अतिशय व्यापक स्वरूपाचे आहेत. माणूस हा दक्षिण अरेबिआतूनही दक्षिण आशियात गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु उत्तर अरेबिआनंसुद्धा माणसाला दक्षिण आशियाकडचा मार्ग दाखवून दिला असल्याचं, या संशोधनावरून दिसून येतं. असं असल्यास, अरेबिआत अधूनमधून येणाऱ्या या हिरवाईनं, पुरातन काळातल्या माणसाच्या प्रवासात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
चित्रवाणी:
-- डॉ. राजीव चिटणीस.
June 12, 2026
एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणायचा, ‘ए मॅन शुड बी नोन फॉर व्हॉट ही इज दॅन व्हाट ही हॅज.’ अनेकांचे सुप्त गुण वेळीच ओळखायला हवेत. आपण कसे आहोत? आपल्यात कोणते सुप्त गुण आहेत? हे अनेकांना आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत समजतच नाहीत.
June 1, 2026
“मेरे लिखने की प्रेरणा वहा से आती है जहाँ के लोग शोषित है मगर फिरभी हार नही मानते”- असे महाश्वेता देवी यांनी म्हटले आहे. संघर्ष सुद्धा प्रेरणेची बाब असू शकते. एखाद्याचा संघर्ष, दुःखं,वेदना पाहिल्यानंतर आपले दुःखं त्याच्यासमोर काहीच नाही हे समजून माणूस पुन्हा जोमाने उभा राहतो. योग्य वयात संघर्ष करावा लागला तर त्याचं एवढं अप्रूप नसतं पण बालपणीच एखादी मोठी जबाबदारी अंगावर पेलावी लागली तर ती विचार करायला लावते.. बालपण हे खेळण्याचे वय, आनंदी राहण्याचे वय पण त्या वयात पोटासाठी धोकादायक कसरती करून आपलं व कुटुंबाच पोट भरणं हे तो मुलगा शिकतो व त्याला पाहून आपण किती सुखी जीवन जगत आहोत, जराही कष्ट नाहीत याची जाणीव व्हायला लागते. जाणीव होणं म्हणजेच प्रेरणाची सुरुवात असते. नैराश्यात आशेचा किरण दिसणें ही सुद्धा प्रेरणाची पहाट असते. आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत व त्या कोवळ्या जीवांचा उपयोग अर्थाजनासाठी करतात तेंव्हा, आपल्या मुलांचा गृहपाठ करण्याची काही पालकांची कीव येते. आपल्या पाल्यांना कसली शिक्षा होऊ नये म्हणून काही पालक इतके हळवे होत असतील तर तो मुलगा कोणत्या संघर्षाला पुढे उभा राहील? अथक परिश्रम, जिद्द यांनी संघर्षावर मात करता येते. आमच्या मुलांना काही पालक संघर्ष करू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
June 13, 2026

पृथ्वी झुकते आहे… खरं तर, पृथ्वी साडेतेवीस अंशांनी अगोदरच झुकली असल्याचं सर्वज्ञात आहे. पण ती आणखी झुकते आहे… पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते आहे, तो अक्ष आणखी कलतो आहे. परिणामी, पृथ्वीचे ध्रुव बिंदूही सरकत आहेत. अक्षाच्या दिशेतला हा बदल पृथ्वीवर होत असलेल्या बदलांमुळे होत आहे. नैसर्गिक कारणांमुळे असे बदल घडून येत असले, तरी या कारणांना अनेकवेळा अप्रत्यक्षपणे मानवी हातभारही लागलेला असतो.
June 28, 2023

बर्फाच्या वितळण्याची भाकितं करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीतली अडचण ही आहे की, समुद्रावरच्या बर्फाचं प्रमाण हे अनेक घटकांवर अवलंबून असतं – वातावरणातल्या घटकांवर तसंच समुद्राच्या पाण्यातल्या घटकांवर! त्यामुळे या प्रारूपांची अचूकता ही काहीशी मर्यादितच असते.
December 18, 2021
अब्राहम लिंकन सांगून थकले की माझ्या मुलाला हे शिकवा माझ्या मुलाला ते शिकवा, त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र मुख्याध्यापकांच्या खोलीत फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त झालं आहे. फ्रेम मध्ये बंदिस्त केले की विचार ही बंदिस्त होतात कां?प्रेरणेच्या पायवाटा या धूळ खाण्यासाठी नसून त्याच्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी असतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवतात. संस्कार करणं शाळेची जबाबदारी आहे असं परिपत्रक तरी अजून निघालेले नाही कारण परिपत्रकाच्याच मार्गाने काही शाळा मार्गक्रमण करतात.
June 18, 2026

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला.
January 7, 2023
विश्वकर्मा समाजाच्या सांस्कृतिक अध्ययनात सर्वप्रथम शिल्पकारांच्या अस्तित्वाचा शोध घेतल्या गेला आणि नंतर अन्य पैलुवर विचार करण्यात आला आहे. विश्वकर्मा शिल्पकारांनी आपल्या कला कौशल्याने धर्म, रुढी, परंपरा, श्रद्धा, दैवते, कुलाचार, नैतीकता, शिष्ठाचार, या सर्व मनो व्यापाराना शाश्वत रुप दिले आणि एका पिढीने जतन केलेली सांस्कृतिक ठेव पुढच्या अनेक पिढींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी राष्ट्रीय जीवनच समृद्ध करुन नवोन्मेषाने जगण्याची प्रेरणा दिली. पाषाणात प्रेम, शौर्य, हास्य, करुणा किंवा कोणताही भाव मूर्तीमंत (जसाच्या तसा) कोरणे मोठे अबघड काम आहे. पुराण ग्रंथातील प्रसंगाना सुद्धा मूर्त रुप देऊन पाषाणातून सजीव केल्या गेले, त्यामुळे वाचा नसलेले दगडही बोलते झाले; प्रेक्षकांशी संबाद साधू लागले.
January 17, 2026
मोठा आवाज असलेली एक लहान मुलगी: ग्रेटा
एका मुलाला मी विचारले ग्रेटा कोण आहे माहित आहे कां? त्याने सांगितले की माहित नाही. आमच्या असंख्य मुलांना अनेक व्यक्तिमत्त्वाची ओळख नाही व ती त्यांना करूनही घ्यावीशी वाटत नाही हे दुर्दैव आहे. आजी आजोबा आज गोष्टी सांगण्यापूरतें सुद्धा उरलेले नाहीत. पूर्वीच्या काळी आजी आजोबांचं ऐकलं जायचं,आता नाही.आजी आजोबांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सुनावलं जातं, आमच्या मुलाचे पेंरेंटिंग आम्ही पाहून घेऊ, त्यामुळे मुलांना घडवण्याचं आज आई-वडीलावरच अवलंबून आहे, त्यांनीच घडवायला हवं.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रेरणेच्या पायवाटेवरून जर प्रवास केला तर आयुष्याला एक दिशा मिळते.पायवाट नसली की माणसें भरकटतात.
June 8, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti