लेखसंग्रह

हिरवा कॅन्सर

Category:

 

कुठे म्हणून प्रदुषण नाही ते सांगा? वायूप्रदूषण, जलप्रदूषण, अश्या अनेक प्रदूषणाने आपण घेरालेलो आहोत. तरीही त्यातून मार्ग काढत प्रदूषणावर मात करीत आहोत. झपाटयाने होणाऱ्या औद्योगीकरणाने रासायनिक तसेच अन्य कारख्यान्यांतून बाहेर जाणारे सांडपाणी ज्यामध्ये तांबे, शिसे, कॅडमियाम, क्रोमियम व चांदी यांचे विषारी क्षार कळत न कळत मोठया प्रमाणात जलसाठ्यात मिसळले जाऊन जलप्रदूषण करतात आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. रासायनिक आणि अन्य कारखान्यांतून बाहेर जाणारे सांडपाणी एका टाकीत साठवून त्यावर प्रक्रिया करून सोडल्यास जल प्रदूषण होण्यास मर्यादा येतील. परंतू असे सांडपाणी एका नैसर्गिक उपयानेही स्वच्छ व क्षारविरहित कसे करता येते ते पाहू.

  May 12, 2012


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गुरुदासाचे हितगुज

Category:

 

मी अगदी साधा सामान्य माणूस. आम आदमी कुठच्याही बडेजावाला बुजणारा. आयुष्यातील कृत्रीमता, बेगडीपणा टाकणारा जरा वेगळाच प्राणी! जीवनाचा नैसर्गिक निखळ आनंद, आस्वाद घेण्याची स्वाभाविक ओढ.

  May 12, 2012


लेखसंग्रह

तुझे आहे तुजपाशी…!

Category:

 

इंधनाच्या बाबतीतले परावलंबित्व ही देशाच्या विकासासमोरची एक मोठी समस्या आहे आणि त्यापेक्षा मोठी समस्या दूरदृष्टी नसलेल्या नेतृत्वाची आहे. सुदैवाने आज राजकारणात युवा शक्ती मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत आहे. या युवकांनी एकत्र येऊन या देशाला महासत्ता बनविण्याचा निर्धार केला, तर परिस्थिती निश्चितच बदलू शकते. नाविन्यपूर्ण विचार, ते अंमलात आणण्याची धमक, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी या सगळ्या गुणांनी युक्त असलेले नेतृत्व ही आज देशासाठी काळाची गरज बनली आहे.

  May 5, 2012


लेखसंग्रह

३ मे, ‘सन-डे’

Category:

 

आपण प्रत्यके महिन्यात कुठला ना कुठला दिन (डे) साजरा करत असतोच. नुकताच २२ एप्रिल २०१२ रोजी वसुंधरा दिन (अर्थ डे) सर्व जगभर साजरा करण्यात आला. आपल्या वसुंधरेला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जास्त कोणाची मदत मिळत असेल तर ती सूर्यदेवाची आणि त्या सूर्यदेवाचा दिन किंवा दिवस आहे ३ मे आणि हाच दिवस सर्व जगभर ‘सूर्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. यासाठी सूर्यदेवाचे आभार मानून त्यापासून मिळणाऱ्या उर्जेचा जास्तीत जास्त वापर हा मानवजातीच्या विकास व उन्नती करिता करून घेणे आवश्यक आहे आणि याचेच महत्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  May 2, 2012


लेखसंग्रह

शिक्षण क्षेत्रातील दुकानदारी बंद करा !

Category:

 

सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले असले तरी ते देण्यासाठी शाळांचे आणि अन्य सुविधांचे जाळे सरकार उभे करू शकणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. सरकारने या मुलांना शिक्षणाचा हक्क कायद्याने बहाल केला असेल तर त्या हक्काचे जतन करण्याची जबाबदारीदेखील सरकारने घ्यायला हवी. सरकार आपल्या स्तरावर ही जबाबदारी उचलू शकत नाही, हे स्पष्टच आहे आणि म्हणूनच खासगी शिक्षण संस्थांना अनुदान देऊन शाळा स्थापन करण्याची परवानगी सरकार देत असते.

  April 30, 2012


लेखसंग्रह

वादग्रस्त एनसीटीसी…

Category:

 

देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शासन सध्या आस्तत्वात असलेल्या संस्थांना सक्षम करण्याचे जाहीर करते, त्यासाठी समित्या नेमते, समित्या अहवाल देतात, पण अंमलबजावणी शून्य. त्याची चर्चा पुन्हा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यावरच होणार. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचेही असेच होणार असेल तर त्याची गरजच काय?  यांना आपण का सक्षम करत नाही. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे, वाहतूक तसेच शस्त्र का पुरवले जात नाही? ज्या संस्था आस्तत्वात आहेत त्यांनाच जर आपण सक्षम करू शकत नसू तर त्यात आणखी एका संस्थेची भर घालण्याची आवश्यकताच काय? 

  April 26, 2012