C-सौ. वासंती अनिल गोखले
भारतीय ‘संविधानाच्या’ निर्मितीत हातभार लावणाऱ्या १५ स्त्रिया
Category:
लेखसंग्रहडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर पुरुष प्रतिनिधी आपल्या स्मरणात आहेत परंतु या १५ महिला सदस्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा आपल्याला सहजपणे विसर पडला आहे. भारतीय ‘संविधानाच्या’ निर्मितीत हातभार लावणाऱ्या अश्या १५ स्त्रियांची अगदी थोडक्यात ही ओळख.
पत्रप्रपंच – जेष्ठ नागरिकांच्या ‘पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय
Category:
साहित्य - ललित2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’!
‘अस्सं माहेर’ सुरेख बाई …..
Category:
अवर्गिकृतमागच्या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्यावर त्यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.
बालपणीची ‘स्मृती चित्रे’
Category:
अवर्गिकृतलहानपणीचे संस्कार जसे आयुष्यभर टिकतात ताशा या आठवणी आणि स्मृती सुद्धा! माझे बालपण ‘गिरगाव’, येथील एका ‘मोक्याच्या जागी , अगदी रहदारीच्या रस्त्यावरील आंग्रेवाडीत संपन्न झाले. त्यात एकत्र कुटुंबात वाढलेली आम्ही भावंडे त्यामुळे आमच्या आठवणीसुद्धा तितक्याच भिन्न भिन्न , गमतीच्या, आनंदाच्या आणि नवलाईच्या. महाराष्ट्राच्या ‘लोक कला जीवनातील आख्यायिका आणि त्यांचे बालपणी घडलेले दर्शन हि माझी स्मृती चित्रे झाली आहेत.
प्रवासातील चित्तथरारक प्रसंग
Category:
साहित्य - ललितआजूबाजूचं सौंदर्य नजरेने टिपत असताना काही मिनिटातच एकदम आरडाओरडा ऐकायला आला. समोर बघितलं तर मी सोडून दिलेली ‘गोंदोलो बोट’ पाण्यात पूर्णपणे उलटली होती. सर्वजण गंटागळया खात होते. जीवाच्या आकांताने ओरडत होते.
सख्खे शेजारी’ – भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे
Category:
व्यक्ती-परिचयलहानपणी फक्त एवढेच कळायचे की ते खूप विद्वान आहेत. दिवस-रात्र वाचन, लेखन करतात. History of Dharma Shastra हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. केवळ शिक्षण-संशोधन नव्हे तर सतत पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे अशी थोर, महान, विद्वान व्यक्ती आणि आमचे ‘सख्खे शेजारी’ वाडीतील आम्ही सर्व जण त्यांना ‘काणे अण्णा’ च म्हणत असू. राहण्याचे ठिकाण म्हणजे, अर्थातच, – सुप्रसिद्ध, आंग्रेवाडी, दुसरा मजला, वि. पी. रोड, गिरगाव, मुंबई.