तीन ओंजळी पाणी
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकआई, वडील, आजी, आजोबा आपल्यात भौतिक नव्हे तर नैतिक मूल्यं ही ओंजळभर सोडून जातात. ओंजळभर पाणी काय असतं? अर्घ्य देणं काय असतं? पूर्वीच्या काळी काशीयात्रेला काही दिवस नाही तर काही महिने लागायचे. काशीयात्रेला जाणं कष्टाचं तर होतंच पण कधी व्यक्ती जर गेलीच तर तिला एक नेम करावा लागायचा. गंगेच्या पात्रात उभं राहून तीन ओंजळी पाण्याचे अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशी शपथ सूर्याच्या साक्षीने घ्यायची. गंगेला दिलेला हा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, त्यामुळे ते वचन कधीच मोडायचं नाही.