युवा-विश्व

तीन ओंजळी पाणी

Category:

 

आई, वडील, आजी, आजोबा आपल्यात भौतिक नव्हे तर नैतिक मूल्यं ही ओंजळभर सोडून जातात. ओंजळभर पाणी काय असतं? अर्घ्य देणं काय असतं? पूर्वीच्या काळी काशीयात्रेला काही दिवस नाही तर काही महिने लागायचे. काशीयात्रेला जाणं कष्टाचं तर होतंच पण कधी व्यक्ती जर गेलीच तर तिला एक नेम करावा लागायचा. गंगेच्या पात्रात उभं राहून तीन ओंजळी पाण्याचे अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशी शपथ सूर्याच्या साक्षीने घ्यायची. गंगेला दिलेला हा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, त्यामुळे ते वचन कधीच मोडायचं नाही.

युवा-विश्व

दिसण्यावर जाऊ नका असण्यावर जा

Category:

 

ओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.

युवा-विश्व

तीन हजार टाके

Category:

 

काही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.

युवा-विश्व

मोक्षा रॉय

Category:

 

मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.

युवा-विश्व

मन कल्लोळ

Category:

 

एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणायचा, ‘ए मॅन शुड बी नोन फॉर व्हॉट ही इज दॅन व्हाट ही हॅज.’ अनेकांचे सुप्त गुण वेळीच ओळखायला हवेत. आपण कसे आहोत? आपल्यात कोणते सुप्त गुण आहेत? हे अनेकांना आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत समजतच नाहीत.

लेखसंग्रह

फितूर दिवसांचे संदर्भ

Category:

 

ज्या संदर्भात माणसं जगलेली, असतात, ती जेव्हा बदलतात , फितुर होतात, तेव्हा एकाकी होण्याची संभावनाची, नैराश्याची भावना जास्त असतें.सभोवताली पसरलेल्या उजाड वस्त्या, फितूर झालेले हंगाम, डाटा जीबी वरचे जग, व्यवस्थेच्या टाचाखाली जगणारी हतबल माणसं पाहून येणारी हतबलता या सर्व बाबींचा धांडोळा कवी स्वप्नील मेश्राम यांनी घेतला आहे.

लेखसंग्रह

शिक्षण प्रक्रियेला दिशा देणारे “अभ्यासाचे तंत्र आणि मार्कांचा मंत्र”

Category:

 

सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील नेमके मर्म ओळखून डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अभ्यासाचे तंत्र आणि मार्काचे मंत्र हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठीचे उपयुक्त असे मौलिक मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे. बालकापासून पालकापर्यंत शिक्षणा बाबत अनेक संभ्रम आहेत, अनेकांचे शिक्षणा मधील संकल्पनेचे संबोध स्पष्ट नाहीत.

साहित्य - ललित

करपलेल्या बालपणाचा व्याकुळपट – अरसड

Category:

 

या कादंबरीतील काही पात्राच्या माध्यमातून उदाहरणार्थ चक्रम, यादव, गंगा,सूर्याजी,मारुती ही पात्रे व्यंकटेश सोळंके आपल्यासमोर व्यक्तीचित्रणाची फळी उभी करतात.अनेक नातेसंबंध हे दिखाऊ असतात त्यातलं पोकळ असणं काय असतं हे आपल्याला अस्वस्थ करून जातं. श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत समाजात असलेली धारणा, पूर्वपार चालत आलेल्या प्रथा, परंपरा, विविध चालीरीतीतून साकारलेलं समाजमन सर्वसामान्या

साहित्य - ललित

रिवर्सल मंत्र

Category:

 

ज्यांनी मधुमेहाचे जीवघेणे अनुभव सोसले, वडिलांच्या मधुमेहाचा दीर्घ लढा पाहिला असे गोल्ड मेडलिस्ट डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अनुभवातून जाणले की मधुमेह हा केवळ औषध व इंजेक्शन घेऊन बरा करता येत नाही, तो जीवन शैलीशी निगडित आहे. युट्युब वरील त्यांच्या अनेक व्याख्यानामधून व इतरत्र झालेल्या अनेक व्याख्यानांमधून ते सडेतोडपणे काय करायला पाहिजे ते सांगतात. सगळं संपलं आहे असं वाटणाऱ्यांना व नैराश्य आलेल्यांना हे पुस्तक मधुमेहातून नक्कीच बाहेर काढेल.

लेखसंग्रह

गाण्यातून उमगणारी लता

Category:

 

लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आत्मा म्हणजे भावनांची नाजूक छटा—प्रेम, विरह, भक्ती, आनंद किंवा देशप्रेम.प्रत्येक भावना त्यांच्या सुरेल आवाजातून श्रोत्यांच्या मनाला भिडते. लता मंगेशकर यांचं गाणं हे फक्त सुरावटींचं नव्हे तर भावविश्व उलगडणारं एक अविस्मरणीय अनुभवविश्व आहे.